जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
काका हा २००७ मध्ये बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकणारा व त्याच साली फीफाचा सर्वोत्तम खेळाडू (‘प्लेअर ऑफ द इयर’) या पुरस्काराने गौरवण्यात आलेला खेळाडू होत. त्याला हा पुरस्कार देण्यासाठी स्वत: पेले हजर होते, हा ब्राझीलच्या फुटबॉलचा मान म्हणायला हवा.
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी गांधी हत्याकांडात त्यांचे घर जळाले अन् त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांना आयुष्यातली पहिली कविता ‘मानवते तु विधवा झालीस’ सुचली. त्यांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला.
नाट्यक्षेत्रात एक नावाजलेला रत्न म्हणजे दत्तात्रय घोसाळकर होय. आतापर्यंत त्यांच्या दत्त विजय प्रॉडक्शनच्या माध्यमातून १७ नाटके त्यांनी निर्माण केली त्यात आईचं घर उन्हाचं, यदाकदाचित, देहभान, तनमन तुझ्याविना, रामनगरी सारखे वेगळे विषय त्यांनी हाताळले.
डॉ. संजय गोविंदराव पोहरकर हे लाखनी, या भंडारा जिल्ह्यामधील गावामध्ये वास्तव्यास असणारे प्रतिभावंत साहित्यीक, व कलाकारी वृत्तीचे कवी आहेत. शिक्षण कला व साहित्य या एकमेकांस बर्यापैकी पुरक असलेल्या प्रांतांमध्ये त्यांचा राबता लक्षणीय स्वरूपाचा आहे. पेश्याने शिक्षक, आवडीने साहित्यीक व उत्तुंग प्रतिभेने कवीत्व स्वीकारलेल्या पोहरकरांचे व्यक्तिमत्व या तिनही क्षेत्रांवर साज चढवणारेच आहे.
देशाच्या पहिल्या महिला पायलट, ज्यांनी साडी नेसून उडवले विमान सरला ठकराल यांचा जन्म ८ ऑगस्ट १९१४ रोजी दिल्ली येथे झाला.
सरला ठकराल यांनी वयाच्या २२ व्या वर्षी विमानाची उड्डाण भरत इतिहास रचला. १९३६ मध्ये सरला ठकराल एअरक्राफ्ट उड्डाण भरणारी पहिली महिला पायलट होत्या. त्यांनी चक्क साडी नेसून उड्डाण केले होते.
सरला ठकराल यांनी १९२९ मध्ये दिल्लीत असलेल्या फ्लाइंग क्लबमध्ये विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि येथेच त्यांची भेट पी डी शर्मा यांच्याशी झाली होती. त्यांसोबत विवाह केल्यानंतर त्यांनी पत्नीला व्यावसायिक विमान चालक होण्यासाठी प्रोत्साहित केले. पतीकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे सरला ठकराल जोधपुर फ्लाइंग क्लब येथे ट्रेनिंग घेत होत्या.
१९३६ मध्ये लाहोर येथील विमानतळ त्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षी होता जेव्हा २२ वर्षीय सरला ठकराल यांनी जिप्सी मॉथ नावाच्या दोन सीटर विमान उडवले.
परंतु १९३९ त्यांच्या साठी वाईट राहिले. कमर्शियल पायलट लाइसेंस घेण्यासाठी कठोर मेहनत करत असताना दुसरं विश्व युद्ध सुरू झाले. फ्लाईट क्लब बंद पडलं आणि त्यांना आपली ट्रेनिंग मध्येच थांबवावी लागली.
याहून दुख:द म्हणजे त्याच वर्षी एका विमान अपघातात त्यांच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्या लाहोराहून पुन्हा भारतात आल्या आणि मेयो स्कूल ऑफ आर्टमध्ये भरती झाल्या. तेथे त्यांनी पेंटिंगचे शिक्षण घेतले आणि फाइन आर्टमध्ये डिप्लोमादेखील केला.
भारताचे विभाजन झाल्यावर सरला आपल्या दोन्ही मुलींसोबत दिल्लीला परत आल्या आणि येथे त्यांना पी पी ठकराल भेटले. दोघांनी १९४८ मध्ये विवाह केले. नंतर त्या यशस्वी आणि उद्योजक पेंटर झाल्या. सरला ठकराल यांचे निधन १५ मार्च २००८ रोजी झाले.
आज गुगलने सरला ठुकराल यांच्या १०७ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने डूडल बनवले आहे. हे डूडल वृंदा झवेरी यांनी बनवले आहे
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
गांधी हत्या या अत्यंत संवेदनशील विषयामुळे ‘मी नथूराम गोडसे बोलतोय’ हे नाटक विवादाच्या भोवऱ्यात सापडूनही रसिकांनी या नाटकास उचलून धरल ते शरद पोंक्षे यांच्या अभिनयामुळे नथूराम गोडसे या व्यक्तीबद्दल प्रचलित असलेले सर्व गैरसमज काही अंशी कमी करण्यात आणि खऱ्या अर्थानी गोडसे यांची भूमिका स्पष्ट करणारे हे नाटक समीक्षकांच्या पसंतीस ही उतरले.
पिसुर्लेकरांनी या अभिलेखागाराखालील दप्तरखाना सुधारला; त्यातील कागदपत्रे खंडवार लावली आणि त्यासंबंधी सूची व दोन मार्गदर्शिका प्रसिध्द केल्या. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पणजी येथे इतिहास संशोधनकेंद्र स्थापन केले. त्याचे संचालकपद पिसुर्लेकरांकडे होते. गोमांतकातील पहिले हिंदू इतिहास संशोधक असणारे डॉ. पिसुर्लेकर पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेली सर्व ऐतिहासिक कागदपत्रे भारतीय पुराभिलेखागारात आणण्यासाठी आयुष्यभर झटले. पोर्तुगीज दफ्तरातील साडेचारशे वर्षातील सर्व कागदपत्रे अभ्यासून त्यांनी ‘पोर्तुगीज मराठे संबंध’ हा अप्रतिम साधनग्रंथ लिहिला.
आज १४ ऑक्टोबर. भारतीय शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांची जयंती. त्यांचा जन्म१४ ऑक्टोबर १९१४ रोजी झाला.
निखिल बॅनर्जी यांचे वडील जितेंद्र नाथ बॅनर्जी हे सुद्धा सतारवादक होते. वडिलांकडून प्रेरणा घेउन निखील बॅनर्जी यांनी लहानपणीच आपला संगीत प्रवास सुरु केलं. वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांनी आकाशवाणीवरील अखिल भारतीय सतारवादन स्पर्धा जिंकली. अशा प्रकारे ते आकाशवाणीवर नेमणूक होणारे सर्वात लहान वयाचे संगीत कलाकार ठरले. त्यांची आवड पाहून वडिलांनी त्यांना मुश्ताक अली खान ह्यांच्याकडे पाठवले. परंतु त्यांच्याकडे निखिलजी काही आठवडेच शिकले. त्यांचे प्रमुख गुरु म्हणजे मैहर चे अलाउद्दीन खान. अल्ला उद्दीन खान साहेबांनी निखील बॅनर्जी यांची गुणवत्ता पाहून अतिशय कठीण अशा प्रकारे त्यांच्याकडून रियाज करून घेतला. फक्त हाताची तयारी व तांत्रिक क्षमताच नव्हे तर त्याहून पलीकडील सांगीतिक ज्ञान निखील बॅनर्जी यांना त्यांच्याकडून मिळाले. यामुळे निखीलजींनी आपली वैशिष्ट्यपूर्ण अशी स्वतंत्र वादनशैली निर्माण केली. अल्लौद्दिन खान यांच्यानंतर निखील बॅनर्जी यांनी व सरोदवादक उस्ताद अली अकबर खान तसेच त्यांच्या कन्या अन्नपूर्णा देवी यांच्याकडूनही संगीताचे धडे घेतले. मैहर घराण्यातून शिक्षण घेतल्यानंतर निखिलजींनी उस्ताद अली अकबर खान ह्यांच्याबरोबर जुगलबंदी चे कार्यक्रम केले. तसेच आकाशवाणी वर सुध्धा ते नियमित वादन करत असत. त्यांचे भारतभर कार्यक्रम होऊ लागले. त्यांनी अनेक पहिला परदेश दौरे केले. ध्वनिमुद्रनापेक्षा प्रत्यक्ष कार्यक्रमांवर त्यांचा भर असायचा. निखिलजींनी आपली स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी वादन शैली निर्माण केली. त्यांच्या शैलीत गाण्यातील गेयता आणि सतार वादनातील तंतकारी अंग ह्याचा मिलाफ दिसतो. स्वर आणि ताल ह्या दोन्ही अंगांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची तयारी जबरदस्त होती. परंतु त्यांनी त्यांच्या वादनात नेहमीच सौंदर्य आणि भावपूर्णतेला महत्त्व दिलेले आढळते. सुरेख संयमी आलाप, भावपूर्ण राग विस्तार, सुरेख तिहाया, स्पष्ट-वेगवान ताना, छूट तानांवरील प्रभुत्व, लयकारी ह्यामुळे त्यांच्या शैलीत संपूर्णत्व होते. त्यांचा भर पारंपारिक राग व मैहर घराण्याचे खास राग इत्यादींवर असायचा. तसेच ते अहिरी, कौशिकी, श्याम केदार इ. अनेक अपारंपरिक रागही वाजवत असत. मनोमंजरी, हेम-ललत इ. राग त्यांनी तयार केल्याचे मानले जाते. भारत सरकाने निखिल बॅनर्जी यांना १९६८ साली पद्मश्री पुरस्कार व १९८६ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते. १९७४ साली निखिल बॅनर्जी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. मा.निखिल बॅनर्जी हे सर्वकालीन सर्वोत्तम सतार वादकांमधील एक म्हणून गणले जातात. मा.निखिल बॅनर्जी यांचे २७ जानेवारी १९८६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. मराठी विकिपीडिया
चित्रकला हे कार्यक्षेत्र असलेले श्री. कैलास अन्याल यांनी ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कुलमधून आपल्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. नंतर रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून चित्रकलेचे शिक्षण घेतले. जाहिरात क्षेत्रात ते १४ वर्षे कार्यरत होते. नंतर मुक्तपणे पूर्णवेळ चित्रनिर्मितीला त्यांनी सुरुवात केली.
जयश्री गडकर यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरू केली. त्यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४२ रोजी कणसगिरी, कारवार जिल्ह्यात झाला. १९५४ साली व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात एका गाण्यात संध्या यांच्यामागे समूहात नृत्य करणारी एक कलाकार म्हणून जयश्री गडकर यांनी सुरवात केली. १९५५ साली रशियन नेते कुश्चेव्ह आणि बुल्गानिन यांच्या हिंदुस्थान दौऱ्यातील पुणे भेटीवेळी संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी नृत्य केले. ते नृत्य पाहूनच दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांनी जयश्री गडकर यांना "दिसतं तसं नसतं' चित्रपटात लावणी नर्तिका म्हणून भूमिका दिली. भालजी पेंढारकर यांनी "गाठ पडली ठका ठका' या चित्रपटात त्यांना प्रथम नायिकेची संधी दिली. सूर्यकांत त्यांच्या नायकाच्या भूमिकेत होते. त्यानंतर या जोडीचे अनेक चित्रपट गाजले. त्यातल्या "बुगडी माझी सांडली गं' या गाण्याला आणि नृत्याला लोकांनी डोक्यावर घेतलं.
तमाशाप्रधान ग्रामीण चित्रपटाची नायिका अशी त्यांची ‘ओळख’ घट्ट झाली असता त्या शहरी भूमिकेला न्याय देऊ शकणार नाहीत, अशा होणाऱ्या चर्चेला त्यांनी ‘मानिनी’ चित्रपटातूनच चोख उत्तर दिले. दिग्दर्शक अनंत माने यांच्या १९ चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या व त्यांना त्या आपल्या गुरू मानत. हंसा वाडकर यांच्यानंतर तमाशा - लावणीपटात त्यांची जागा कोण भरून काढेल आणि सोज्वळ, सात्विक भूमिका करणा-या सुलोचनाबाईंच्या जागी कोणाला घ्यावं, या प्रश्नाना जयश्री गडकर यांनी आपल्या चतुरस्त्र आणि कसदार अभिनयाने उत्तर दिलं. अष्टपैलू अभिनेत्री असाच यांचा वावर मराठी चित्रपटसृष्टीत राहिला. १९५९ साली आलेल्या अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनावरील "सांगत्ये ऐका' या चित्रपटाने इतिहास घडवला. ‘"सांगत्ये ऐका'पासून दिग्दर्शक अनंत माने आणि नायिका जयश्री गडकर असे यशस्वी चित्रपटाचे समीकरण तयार झाले.
तमासगिरीणीची भूमिका साकारणाऱ्या जयश्री गडकर यांनी त्याच ताकदीने "मानिनी'मधली सालस, सात्त्विक, सोशीक पण जिद्दी मालती साकारली. "साधी माणसं' चित्रपटात त्यांनी मेकअप न करता लोहाराच्या पत्नीची भूमिका साकारली. "मोहित्यांची मंजुळा', "पवनाकाठचा धोंडी', "एक गाव बारा भानगडी', "मल्हारी मार्तंड', "अशीच एक रात्र होती', "लाखात अशी देखणी', "सुगंधी कट्टा' हे त्यांचे चित्रपट ग्रामीण आणि शहरी भागात तुफान गाजले."जिव्हाळा' चित्रपटातील त्यांच्या तोंडी असलेले "या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या' हे आर्त गाणे आणि त्यावेळचा अभिनय आजही रसिकांच्या स्मरणात आहे. "घरकुल' चित्रपटातील "पप्पा सांगा कुणाचे' हे अरुण सरनाईक यांच्यासोबतचे त्यांचे गाणेही खूप प्रसिद्ध झाले.
मराठी, हिंदी, पौराणिक अशा २५० चित्रपटांत त्यांनी काम केले. रामानंद सागर यांच्या "रामायण' मालिकेत त्यांनी कौसल्येची भूमिका केली. त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार, पाच वेळा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार, २००३ साली व्ही. शांताराम पुरस्कार आणि २००८ साली "चित्रभूषण' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या नावांत ‘सांगत्ये ऐका’, ‘अवघाची संसार’, ‘मानिनी’, ‘रंगपंचमी’, ‘शाहीर परशुराम’, ‘बाप माझा ब्रह्मचारी’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘वैशाख वणवा’, ‘साधी माणसं’, ‘पाटलाची सून’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘जिव्हाळा’, ‘घरकुल’, ‘सुगंधी कट्टा’ यांचा समावेश होतो.
जयश्री गडकर यांनी "सासर-माहेर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर "अशी असावी सासू' या चित्रपटाची निर्मिती, कथा, लेखन, दिग्दर्शन केले होते. अभिनेते बाळ धुरी हे त्यांचे पती. जयश्री गडकर यांचे २९ ऑगस्ट २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जयश्री गडकर यांचा जीवनपट
https://www.youtube.com/watch?v=O2TB0JM5N54
जयश्री गडकर यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=CeG2tvGeAiI
https://www.youtube.com/watch?v=Ux154gVQE6Q&list=PLrw5tGo-hU-v_Vm7TnEyN0Dme7V4X4ZeG
Copyright © 2025 | Marathisrushti