(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • धुरंधर राजकारणी स. का. पाटील

    ते जसे नेहमी सांगतात की, यशाची गुरुकिल्ली दडली आहे सातत्यपूर्णतेने काहीतरी शिकत राहण्यात. त्यांचा हा मंत्र घेऊनच त्यांची वाटचाल सुरू आहे आणखी लक्षावधी डॉलर्सच्या उद्योगांना गवसणी घालण्यासाठी!

  • विख्यात समालोचक विल्यम मॉरिस तथा बिल लॉरी

    बिल लॉरी हे भक्कम आणि अतिशय चिवट फलंदाज होते. रॉबर्ट ‘बॉबी’ सिम्पसन आणि बिल लॉरी या सलामीच्या जोडीने एक काळ गाजवला. लॉरी नंतर कर्णधार झाले.

  • संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी

    अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला.

  • संयमाचा द्राविडी प्राणायाम

    राहुल द्रविडच्या जागवलेल्या काही आठवणी. द्वारकानाथ संजगिरी यांच्या 'थर्ड अंपायर' या पुस्तकातून सारांशरूपाने!

    बर्फापेक्षा थंड काही असू शकतं का ?
    होय. होय. होय! राहुल द्रविडचं डोकं !!
    याआधी आपण पाहिलंय की चेंडू फिरणाऱ्या खेळपट्टीवर त्याने इराणी कप मुंबईच्या हातून कसा पळवला ते! एक मुंबईचा खेळाडू मला सांगत होता, "अरे, तो फलंदाजीला जातानाच बरोबर बेडिंग, कपडे, टूथब्रश वगैरे घेऊन गेलाय, असं वाटत होत. त्या सामन्यात लक्ष्मण अप्रतिम खेळला, पण द्रविडचं अस्तित्व हा त्या विजयाचा पाया, ढाचा, कळस वगैरे सर्व होतं. मी तेव्हा त्याला फोनवर म्हटलं होतं, "आईकडून दृष्ट काढून घे. आपल्याकडे क्रिकेटमध्ये दृष्ट फार लवकर लगते."
    त्याच्या फलंदाजीला दृष्ट लागून चालणार नव्हतं.

    सचिन-राहुल हे भारतीय संघाचे श्वास होते. दोघेही एक-एक नाकपुडी! एक चोंदली तर दुसरी प्राणवायू पुरवते. एकेकाळी सचिन गेला कि श्वास कोंडायचा. द्रविड असला की श्वास कोंडणार नाही, असं वाटायचं. २००३ च्या विश्वकपात सचिन बल्ल्याने काव्य लिहून जायचा, पण शेवटी निबंध कोणीतरी लिहावा लागतो. ती जबाबदारी राहुल पूर्ण करायचा.

    हे पद्य आणि गद्य हेच आपल्या क्रिकेटचं अभिजात साहित्य आहे. तेच दोघांनी प्रसवलं.
    बरं, द्रविड पूर्वीप्रमाणे बसची वाट पाहावी तसा एखाद्या धावसंख्येवर पुढच्या धावेची वाट पाहात ताटकळत उभा राहात नाही. धाव ही कष्टाने मिळणारी बस नाही. ती वाट पाहात उभी असलेली कॅब आहे आणि तरीही त्याच्या फलंदाजीएवढी शाश्वती भारतीय संघात कुणाचीही देता येत नाही. द्युतात धर्मराजाने राहुलची विकेट लावली असती तर शकुनी हरला असता... धर्मराज नाही. त्याची फलंदाजी हा ट्रान्समध्ये जाण्याचा प्रकार आहे. अभ्यासात तो हुशार आहे, असं त्याची आई सांगते. 'अभ्यासाला बस' असं राहुलला म्हणे कधी सांगावचं लागलं नाही. 'राहुल द्रविड स्क्वेअर कट मारतो तशी त्याच्या गालावर कधी मारायला लागलीय का?' माझ्या गालावरच्या जुना जखमा आठवून मी त्याच्या बाबांना विचारलं. ते म्हणाले, ''साधी रागावण्याची वेळसुद्धा त्याने कधी येऊ दिली नाही. तो क्रिकेट खेळायला लागल्यावर सुद्धा शेवटचे दोन महिने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचा. त्यामुळे क्लास मिळवायचा.'' बारावीत राहुलने त्याच्यासमोर असलेले अनेक शैक्षणिक पर्याय टाळून क्रिकेटपटू व्हायचं ठरवलं. तिथंही 'क्लास' मिळवला. आपण कधीतरी अधून मधून द्रविड जास्त बचावात्मक झाला की वैतागायचो. त्याच्या आई-बाबांना काय वाटत असेल? ते म्हणाले, ''आम्ही वृत्तीने सर्वच शांत आहोत. राहुलचं शतक झालं की आनंद होतो, पण हुरळून जात नाही किंवा अपयश फार मनाला लावून घेत नाही. कधीतरी मी त्याला विचारतो 'त्यावेळी असा का शॉट खेळलास? असा खेळायला हवा होतास'. तो फक्त हसतो. पण मला माहीत असतं तो यशापयशाचा अभ्यास करतो. ही त्याची अभ्यासू वृत्ती लहानपणापासूनच पाहिलीय. आजही तो विवेकानंद वाचत असतो.''

    काही दोन-चार क्रिकेटर्सचा अपवाद सोडला तर इतरांना विवेकानंदांच्या फोटोखेरीज त्यांच्या बद्दल इतर माहिती नसावी.
    राहुलच्या पेशन्सची एक गोष्ट. राहुलच्या आईने सांगितलेली. त्याच्या लग्नाच्या वेळी त्याच्या घरच्यांना असं वाटत होतं की लग्न हे साग्रसंगीत व्हावं. कारण त्याची मुंज साग्रसंगीत झाली होती. मुंजीत त्याला सोन्याचं जानवं सुद्धा घातलं होतं. पण राहुलचा आधी अशा विधींना विरोध होता. पण त्याच्या आईने त्याला सांगितलं की तेवढं माझ्यासाठी ऐक. हे विधी चार दिवस चालले होते. पण राहुल या खेळपट्टीवरून देखील हलला नाही.

    कळलं तुम्हाला त्याचा पेशन्स कुठून आला?
    मी आयुष्यात स्वतःच्या लग्नाचा अल्बम सोडून फक्त राहुलच्या लग्नाचा पूर्ण अल्बम पाहिलाय. एरवी लग्नाचा अल्बम म्हटलं की माझ्या अंगावर काटा येतो. त्या अल्बममध्ये मात्र फोटोफोटोत मला राहुलच्या पेशन्सच्या खुणा दिसत होत्या. शेवटी मैदानावरही लग्नच असतं. ते धावांशी असतं. मुंडावळ्यांऐवजी पॅड्स, ग्लोव्हज असतात. उलट मैदानावरचे विधी पेशन्सची जास्तच परीक्षा घेतात.

    द्वारकानाथ संजगिरी
    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • जेष्ठ नेते वसंतदादा पाटील

    वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते.

  • संवेदनशील कवी कैफी आझमी

    आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे जन्मलेले अतहर हुसेन रिझवी हेच नंतर कैफी आझमी बनले. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९१९ रोजी झाला. उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमी यांचा जन्म झाला.

  • जेष्ठ मराठी अभिनेते “डॉ.काशिनाथ घाणेकर”

    डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते, पण त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३२ रोजी झाला.संभाजीराजांचा विषय निघाला किवा भालजींचे जुने चित्रपट कुठे सुरु असले कि “डॉ.काशिनाथ घाणेकर”…यांचा विषय निघणार नाही असे होणार नाही… मा.संभाजी राजे म्हणजे फक्त आणि फक्त “डॉ.काशिनाथ घाणेकर”…रायगडाला जेंव्हा जाग येते मधला त्याचा संभाजी दुसरा कुणीही करू शकणार नाही…अंगकाठी नसली तरी केवळ जरब बसवणारे डोळे, उत्भेदक अभिनय आणि आवाज या हुकमी अस्त्रांवर त्यांचा संभाजी बघताना अंगावर शहारे येत असत., परत आम्हाला असे एकट्याला सोडून नाही ना हो जाणार म्हणताना कासावीस झालेला संभाजी अजूनही डोळ्यांपुढून जात नाही… वसंत कानेटकर यांचे‘रायगडाला जेव्हा जाग येते’ मराठी रंगभूमीवर आले आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेने ते नाटक कमालीचे गाजले.

    कांचन या काशीनाथ घाणेकरांचे “नाथ हा माझा” हे वाचून तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडले जाते…गारंबीचा बापू चित्रपट त्यांनी केला होता. चित्रपटाच्या शेवटी विठोबाssss म्हणून त्यांनी जी आर्त साद घातली होती ती आजही तशीच मनात घुमत राहते…तितक्याच आर्ततेने… कुणा एकेकाळी संभाजी आणि “डॉ.काशिनाथ घाणेकर” हे कधीही वेगळं होऊ न शकणार समीकरण होतं…केवळ किस्से ऐकून डॉक्टरांनी अजरामर केलेले संभाजी आजही कधीकधी डोळ्यासमोरून झरझर जातात…कदाचित असेच असतील त्यांचे त्यावेळचे प्रवेश असे सारखे वाटत राहते….आबा ,परत आम्हाला असे एकट्याला सोडून नाही ना हो जाणार हा संवाद कानात घुमत राहतो… मधुचंद्र हा राजदत्त दिग्दर्शित एन. दत्ता यांचे संगीत असलेल्या या चित्रपटातील सगळी गाणी लोकप्रिय झाली. या बरोबर डॉ. काशिनाथ घाणेकर, उमा यांच्या प्रमुख भूमिकाही गाजल्या. अश्रुची झाली फुले हे सुद्धा डॉक्टरांचे गाजलेले नाटक. 'हे चिंचेचे झाड दिसे मज' हे मधुचंद्र चित्रपटातील गीत रसिकांनाही मोरपिशी स्पर्श करून गेले. १९७० साली डॉक्टरांचा 'देवमाणूस' हा चित्रपट प्रदर्शित झाला. डॉक्टरांनी काही हिंदी चित्रपटात कामे केली. “डॉ.काशिनाथ घाणेकर” यांचे २ मार्च १९८६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : इंटरनेट

    हे चिंचेचे झाड गाण्याची लिंक
    https://www.youtube.com/shared?ci=guwaXT874XI

  • संगीतकार झुबीन मेहता

    १९५८ मध्ये व्हीएन्नामध्ये पहिल्यांदा ‘ म्युझिक कंडक्ट ‘ केले. त्याच वर्षी ते लिव्हरपूल येथील रॉयल लिव्हरपूल फिलॅर्मोनिकचे असिस्टंट कंडक्टर झाले. आणि इथूनच थंयच्या मोठ्या कारकिर्दीला सुरवात झाली.

  • गायिका धोंडूताई कुलकर्णी

    धोंडुताई यांनी सुरवातीला जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लदिया ख़ाँ साहेब यांचे भाचे नथ्थन ख़ाँ यांच्याकडे तीन वर्ष शिकल्या. त्यानंतर याच घराण्याची तालीम त्यांनी आयुष्यभर घेतली.

  • हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता शिरोडकर

    शिल्पा शिरोडकरची बहीण नम्रता, शिल्पा व नम्रताची आजी मीनाक्षी शिरोडकर- त्यांनी त्यांच्या तरुणपणी स्क्रीनवर स्वीमिंग सूट घालून मराठी समाजाला चांगलंच हादरवलं होतं. त्यांचा जन्म २२ जानेवारी १९७२ रोजी झाला.

    सर्वसामान्य स्त्रिया बिकिनीला सरावल्या नसल्या, तरी भारतीय चित्रपटात मात्र बिकिनीचं मुबलक दर्शन घडलं आहे. सर्वप्रथम स्वीमसूट परिधान करण्याचा मान जातो नम्रता शिरोडकरची आजी मीनाक्षी शिरोडकर यांना. त्यांनी ‘ब्रम्हचारी’ या चित्रपटात ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हय्या’ ह्या गाण्यात परिधान केलेला स्वीमसूट रुढार्थाने बिकिनी नसला, तरी त्याने तत्कालीन संस्कृतिरक्षकांच्या मेंदूला झिंझण्या आणल्या होत्या. १९९३ मध्ये तिने मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता.शिवाय मिस युनिव्हर्स स्पर्धेत ती पाचव्या स्थानावर राहिली होती. सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर काही वर्षे नम्रताने मॉडेलिंग केले आणि नंतर सिनेमांकडे आपला मोर्चा वळवला. १९९८ मध्ये नम्रताने सलमान खानसोबत'जब प्यार किसीसे होता है'या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली होती.या सिनेमात तिने छोटेखानी भूमिका साकरली होती.विशेष म्हणजे या सिनेमापूर्वी नम्रताने ‘पूरब की लैला पश्चिम की छैला’हा सिनेमा साइन केला होता.मात्र आजपर्यंत हा सिनेमा रिलीज झालेला नाही.तिच्या यशस्वी सिनेमांच्या यादीत पुकार,वास्तव,हेरा फेरी,अस्तित्व,कच्चे धागे,तेरा मेरा साथ रहे,LOC कारगिल या सिनेमांचा समावेश आहे. बॉलिवूडमध्ये अपयश पदरी पडत असल्याचे बघून नम्रताने लग्न करुन इंडस्ट्रीला रामराम ठोकला.२००५ मध्ये दक्षिणेचा सुपरस्टार महेश बाबूसोबत नम्रताने लग्न केले.२००० मध्ये'वामसी'या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तिची भेट महेश बाबूसोबत झाली होती.काही वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केले. महेश बाबू नम्रतापेक्षा वयाने साडे तीन वर्षे लहान आहे. नम्रता सध्या बॉलिवूडच्या लाइमलाइटपासून दूर आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट