जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
पेठकरांच्या कामाच्या पद्धतीवर खूश होऊन मुंबईच्या प्रकाश पिक्चर्सच्या विजय भट्ट यांनी पेठकरांना मोठा मोबदला देऊन मुंबईला आणले व ‘शादी की रात’ हा हिंदी चित्रपट त्यांच्या हातात दिला. त्यात गीता बाली, रेहमान, अरुण यांसारखे आघाडीचे कलाकार होते. सुधीर फडके यांनी त्यांना ‘रत्नधर’ हा आपला चित्रपट दिला. चित्रपट उत्कृष्ट जमला होता, पण भागीदारांच्या भांडणामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. ‘अपराधी’चा नायक असणाऱ्या राम सिंग यांनी पेठकरांना ‘सौ का नोट’ हा आपला चित्रपट दिग्दर्शनासाठी दिला. त्यात गीता बाली, करण दिवाण, बेगमपारा हे कलाकार होते.
सायन येथील एका स्टुडिओत काम करताकरताच तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या नजरेतून कुमुद यांचे तेज सुटले नाही. त्यांनी राजा परांजपे यांना सांगून ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात कुमुद यांना नायिकेच्या भूमिकेत घेतले. हाच रेखा यांचा पहिला चित्रपट. चित्रादेखील त्यांच्या सहनायिका होत्या. ‘लाखाची गोष्ट’ची कथा, पटकथा ग.रा. कामत यांची होती.
त्यांनी कविता, गोष्टी, कादंबऱ्या, विनोद, अध्यात्म, साहित्य समालोचन, काव्यचर्चा अशा विविध प्रकारचा मजकूर ‘मासिक मनोरंजन’मधून प्रसिद्ध करायला सुरुवात केली होती. राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, केशवसुत, काशीबाई कानिटकर, वा. व. पटवर्धन, गो. चिं. भाटे असे अनेक साहित्यिक त्यांनी जोडले होते.
वर्गीज कुरियन यांनी गावोगावच्या लोकांना गोळा करत अमूलचे काम उभे केले. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. तसेच आपणही कोणापेक्षा कमी नाही असा आत्मविश्वास लोकांमध्ये वाढू लागला.
आविष्कार दारव्हेकर! मराठी मालिका , नाटक आणि चित्रपट क्षेत्रात नावाजलेलं नाव.
जन्म:१९३०
गीता बाली यांचे नाव हरकिर्तन कौर. गीता बाली यांनी वयाच्या १२ व्या वर्षीच फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. १९५० च्या दशकात त्या स्टारसुध्दा झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत मा. शम्मी कपूर यांचे सुध्दा नाव सामील आहे. १९५५ मध्ये शम्मी कपूर यांनी घरच्यांना न सांगता गीता बाली यांच्याशी लग्न केले होते. कारण आपले घरचे या लग्नाला परवानगी देणार नाही याची शम्मी कपूर यांना भिती होती. शम्मी कपूर गीता बाली यांना एका चाहत्याप्रमाणे पसंत करत होते, असे शम्मी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते गीता यांच्यापेक्षा वयाने लहान होते, परंतु चार महिन्यांच्या भेटीने आणि बोलण्याने एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शम्मीकपूर यांना भेटण्यापूर्वी गीता यांनी पृथ्वीराज कपूर आणि राजकपूर यांच्यासोबत काम केले होते. राजकपूर यांच्यासोबत त्यांनी 'बांवरे नैन' आणि पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत 'आनंदमठ' सिनेमात दिसल्या होत्या. मुलींनी किंवा सूनांनी सिनेमात काम करू नये असा कपूर कुटुंबातील नियम होता. परंतु गीता बाली यांनी शम्मीकपूर यांच्यासोबत लग्न केल्या नंतर सुध्दा सिनेमांत काम चालू ठेवले. गीता बाली यांचे मा. भगवान यांच्या सोबतचे खूप चित्रपट गाजले. त्यांचा शेवटचा सिनेमा १९६३ मध्ये आलेला 'जब से तुमको देखा है' होता. बोनी कपूर,अनिल कपूर व संजय कपूर यांचे वडील सुरेंद्र कपूर गीता बाली यांचे सेक्रेटरी होते. गीता बाली यांचे २१ जानेवारी १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपिडीया
ठाणे महापालिकेचे नगरसेवक असलेले पांडुरंग पाटील.
सामान्य करदात्यांना दैनंदिन आयुष्यात वाहतूकींच्या व पायाभूत सुविधांच्या निर्मीतीबाबत भेडसावणार्या समस्यांच्या बाबतीत पांडुरंग पाटील यांनी अनेक ठोस पाऊले उचलून यासंबंधी अनेक योजना व कार्यक्रम अंमलात आणले आहेत. आपल्या प्रभागाला आधुनिकीकरण व नवविकासाचा मार्ग दाखवणारे सभागृह नेते अशी त्यांची ख्याती आहे.
पाणी, रस्तेविकास, उद्यानविकास, मलःनिस्सारण योजना, व बी.एस.यू.पी. योजनेची अंमलबजावणी अशा पंचस्तरीय कामांना प्राधान्य देवून त्यांनी ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ८७ मध्ये मुलभूत सुधारणांचे पर्व सुरू केले आहे.
अनंत सेटलवाड यांचे समालोचन एखाद्या शैलीदार फलंदाजाच्या फलंदाजीसारखे असे.
त्यांचा जन्म १९३५ रोजी झाला. इंग्रज भारतातून निघून गेल्यानंतरही क्रिकेट या देशात राहिले आणि रुजले. साठ, सत्तर आणि ऐंशीच्या दशकात एकीकडे भारतीय क्रिकेट संघाची वाटचाल धिम्या गतीने होत असताना, रेडिओच्या माध्यमातून हा खेळ घराघरांत पोहोचवण्याचे श्रेय भारतातील जाणकार आणि रसिक समालोचकांनाही दिले पाहिजे.
भारतीय चित्रपट संगीताचा होता तसाच हा समालोचनाचाही सुवर्णकाळ होता. बॉबी तल्यारखान, डिकी रत्नागर, अनंत सेटलवाड, सुरेश सरय्या असे काही समालोचक त्या सुवर्णकाळाचे मानकरी होते. कालांतराने या मंडळींमध्ये विजय र्मचटही दाखल झाले. प्रत्येकाची शैली निराळी होती. यातील एक होते अनंत सेटलवाड.
अनंत सेटलवाड यांना मोजक्या शब्दांतील समालोचनाची कला अवगत होती. विख्यात इंग्रज समालोचक जॉन अरलॉट यांनी रेडिओ समालोचनात नवीन मानदंड निर्माण करताना काही युक्त्या सांगितल्या होत्या. समालोचकाने श्रवणचित्र उभे केले पाहिजे आणि श्रोत्यांना एका नवीन, अनाम विश्वाची सफर घडवली पाहिजे, असे ते सांगत. सेटलवाड यांच्यासाठी ते ब्रह्मवाक्य होते. समोर उलगडत जाणाऱ्या घटनांचे चित्र नेमक्या शब्दांमध्ये उभे करण्याची त्यांची खासियत होती. अनंत सेटलवाड यांचा आवाज हेच अनेकांना आकर्षण होते आणि ते मधूनच हलक्या फुलक्या भाषेत बोलत. टिप्पणी करत आणि श्रोत्यांप्रमाणे सहकार्यांआचीही दाद मिळवत.
मर्चंट यांच्याबरोबर त्यांची विश्रांतीच्या काळातील चर्चाही ऐकण्यासारखी आणि माहितीपूर्ण असायची आणि वारंवार आनंदजी डोसा यांनी अचूक आकडेवारी पुरवल्याचाही ते उल्लेख करत. या तिघांचं समालोचन हा एक वेगळाच समाधान देणारा अनुभव होता. इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व आणि शब्दांचा खजिना अफाट. नामवंत वकील कुटुंबात जन्म आणि पब्लिक स्कूलमधील शिक्षणाचा तो एकत्रित परिणाम. अशा शब्दवंतांना कोणत्याही परिस्थितीचे मौखिक वर्णन करतानाही फार सायास पडत नाहीत.
सेटलवाड यांचे समालोचन एखाद्या शैलीदार फलंदाजाच्या फलंदाजीसारखे होते. धावा झटपट होत नाहीत किंवा षटकार-चौकारांची बरसातही झडत नाही. पण अशा फलंदाजाचे खेळपट्टीवरील अस्तित्वच सुखावणारे, रमवणारे असते. गोलंदाज चेंडू कसा टाकतो किंवा विशिष्ट फलंदाजाची उभी राहण्याची पद्धत कशी आहे या बाबी, गोलंदाजाने चेंडू फेकण्यासाठी धाव घेतल्यापासून तो प्रत्यक्ष चेंडू टाकेपर्यंत सेटलवाडांनी सांगितलेल्या असायच्या.
अनंत सेटलवाड यांचा आवाज आश्वासक होता. त्या काळात अनेकदा भारतीय संघाचे घरच्या वा दूरच्या मैदानांवर पतन होत असताना, अनंत सेटलवाड यांच्या आवाजामुळे क्रिकेट चाहत्यांचा उद्वेग काही प्रमाणात कमी व्हायचा.
एकदा एका सामन्यात वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू वेळकाढूपणा करत राहिले आणि हातातला सामना अनिर्णित राहिला. त्या वेळी अनंत सेटलवाड यांसेटलवाड यांच्या सबुरीच्या सल्ल्यामुळेच मैदानातील प्रेक्षक शांत राहिले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. अनंत सेटलवाड यांचे ४ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
१९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैय्या, या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. १९३६ सालच्या जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले. वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणार्याम या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हीरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही.
दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे. शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती. सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले. अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे मा.अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट.
रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे. अशोक कुमार यांचे १० डिसेंबर २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
चित्रपट, दूरचित्रवाणी, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांचे माहेरचे नाव सुप्रिया सबनीस. सुप्रिया पिळगांवकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६७ रोजी झाला.
सुप्रियाचा रंगभूमीवरचा प्रवेश मधुकर तोरडमलांच्या 'म्हातारे अर्क बाईत गर्क' ह्या व्यावसायिक नाटकाने झाला. त्याच दरम्यान सुप्रिया दूरदर्शनवर 'किलबिल' ह्या मुलांसाठीच्या कार्यक्रमात म्हातारीची भूमिका करत होती. योगायोगाने सचिनच्या आईच्या नजरेत ही 'तरुण' म्हातारी भरली आणि त्यांनीच सचीनकडे त्याच्या नवीन चित्रपटाच्या नायिकेसाठी सुप्रियाची शिफारस केली. सुरुवातीच्या नकारानंतर आई वडिलांनी सुप्रियाला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली आणि सुप्रियाने 'नवरी मिळे नव-याला' द्वारा मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. चित्रपटादरम्यान दोघांमधे नाजूक बंध गुंफले गेले आणि प्रत्यक्षातली नवरी नव-याला मिळाली.
१९८५ साली सचिन-सुप्रियाच्या सहजीवनाला सुरवात झाली. पहिल्या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनयाचे 'फिल्मफेअर' पुरस्कार मिळूनही सुप्रिया फारशी चित्रपटात दिसली नाही.
मराठीसृष्टीवरील सुप्रिया पिळगांवकर यांच्यावर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Copyright © 2025 | Marathisrushti