जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
पारखी, प्रमोद
जेव्हा औद्योगिकीकरणाचे वारे जोरात वाहत नव्हते, मध्यम आणि लहान आकाराच्या कंपन्यांना कंपनी सेक्रेटरी या नावाची व्यक्ती आवश्यक वाटत नव्हती, तेव्हा प्रमोद पारखी यांनी एक उत्तम कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. उद्योगांच्या विकासात आवश्यक असणाऱ्या या पदावरील व्यक्तीचे महत्त्व त्यांच्यामुळे लक्षात येऊ लागले.
पारखी यांनी आपल्या व्यवसायात जी सचोटी आणि कार्यक्षमता दाखवली, त्यामुळेच तर त्यांना द इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकौंटंट्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेचे अध्यक्षपद १९८८ मध्ये भूषवता आले. कंपनी सेक्रेटरी म्हणून देशातील अनेक नामांकित कंपन्यांचे सल्लागार म्हणून काम करण्यापूर्वी पारखी यांनी भारत फोर्जसारख्या कंपनीत काही काळ याच पदावर नोकरीही केली. त्यांचा मूळचा पिंड अभ्यासकाचा असल्याने पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत त्यांनी सुरुवातीला काही काळ कामही केले. परंतु त्यानंतरच्या काळात आपली ही भूमिका निभावण्यासाठी त्यांनी अध्यापनाचे क्षेत्र निवडले. व्यवस्थापनशास्त्राच्या अनेक संस्थांमध्ये त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य केले. विषय समजावून सांगण्याची त्यांची पद्धत आणि तंत्र यामुळे पारखी हे एक लोकप्रिय ‘सर’ झाले. कॉस्ट अॅण्ड मॅनेजमेंट अकौंन्टसी, फायनान्स मॅनेजमेंट अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी अभ्यासवर्ग घेतले. पुणे विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीही प्रमोद पारखी यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. कॉसमॉस सहकारी बँकेच्या प्रगतीमध्ये पारखी यांचा मोठा वाटा राहिला आहे. राज्यातील एक महत्त्वाची बँक म्हणून तिला नावारूपाला आणण्यासाठी पारखी यांनी खूप कष्ट घेतले. १९७८ पासून शेवटपर्यंत ते या बँकेच्या संचालक मंडळावर होते आणि या काळात आठ वेळा त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. सामान्यांच्या मनात या बँकेविषयी विश्वास निर्माण होईल, इतकी पारदर्शकता निर्माण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सहकारी बँक म्हणून या बँकेला आज जे महत्त्व प्राप्त झाले आहे, त्यामागे पारखी यांचे कष्ट कारणीभूत आहेत. या बँकेचे संगणकीकरण आणि विकास यासाठी त्यांनी आपली सारी बौद्धिक क्षमता उपयोगात आणली. बँकिंग क्षेत्रातील एक तज्ज्ञ म्हणून त्यांनी अनेकांना विश्वासाने सल्ला दिला आणि मदतीचा हात पुढे केला. महाराष्ट्रातील सहकारी बँकिंगच्या क्षेत्रातील त्यांचे हे योगदान भरीव स्वरूपाचे आहे, यात शंका नाही. पुणे स्टॉक एक्स्चेंजच्या कार्यकारी समितीचे सदस्य, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या नियामक मंडळाचे सदस्य, पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले. जगातील २९ देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कॉन्फिडरेशन ऑफ पॅसिफिक अॅण्ड एशियन अकौंटन्टस या संस्थेच्या कार्यकारी समितीचे सदस्य होण्याचा बहुमानही पारखी यांनी मिळवला. त्यामुळे जगातील अनेक देशांत होणाऱ्या विविध परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधीही त्यांना मिळाली. पारखी यांच्या निधनाने एक अभ्यासू बँकर आणि तज्ज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे.
रघुनाथ आजगावकर यांना बंगाली भाषा उत्तम येत होती आणि बंगाली संस्कृतीची चांगली माहिती होती. ते बंगाली साहित्याचे अनुवादक होते. त्यांनी १८९५ साली ‘मासिक मनोरंजन’ सुरू केलं आणि पुढे १९०९ साली ‘मासिक मनोरंजन’चा पहिला मराठी दिवाळी अंक काढला होता.
ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी मौज साप्ताहिक आणि सत्यकथे मधून ‘ तुकाराम शेंगदाणे ‘ या नावाने त्यांनी लेखन केले.. त्यांचे ‘ तुकाराम शेंगदाणे ‘ हे नाव आणि लेखन त्यावेळी खूपच गाजले. १९५१ ते १९५३ या काळात त्यांचे इंग्लंडमध्ये वास्तव्य होते . त्यांनी भारतीय परराष्ट्रीय हायकमिशनच्या परराष्ट्र खात्यात नोकरी केली. त्यानंतर ज्ञानेश्वर नाडकर्णी पत्रकारितेत स्थिरावले .
वेगवेगळ्या भूमिकांनी रुपेरी पडदा गाजविणारे बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी यांनी मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बोमन यांनी त्याच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवुडमध्ये आज त्यांनी त्यांच्या अभिनयाने आपले प्रस्थ निर्माण केले आहे.
चतुरस्त्र बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी यांचा जन्म २ डिसेंबर १९४९ रोजी झाला बोमन इराणी बॉलिवुडमध्ये फोटोग्राफी करत होते पण त्यांचा कल हा अभिनयाकडे होता. अभिनयक्षेत्रात जाण्याचा ते नेहमीच विचार करत होते. मुन्नाभाई एमबीबीएस हा त्यांचा पहिला चित्रपट या चित्रपटातील काम आवडल्यामुळे निर्मात्यांचे, दिग्दर्शकांकडून अनेक कामे मिळाली. बोमन इराणी हे मा.बलराज सहानी, मा.अमिताभ बच्चन यांचे फॅन आहेत. बोमन इराणी मा.अमिताभ बच्चन यांच्या बद्दल म्हणतात. अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट मी अनेकवेळा पाहिले आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मिळणे ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. त्यांच्यासोबत मी केवळ कामच केले नाही तर भूतनाथ या चित्रपटाच्या पोस्टरवर त्यांच्यासोबत मी झळकलो होतो. आपण ज्या व्यक्तिचे चाहते आहोत, त्याच्यासोबत चित्रपटात काम करण्याचा, त्यांच्यासोबत पोस्टरवर झळकण्याचा आनंद मी शब्दांत व्यक्तच करू शकत नाही. अनेकवेळा हे सगळे खरे आहे का? मी कोणत्या स्वप्नात तर नाही ना असा मी विचार करतो.
बोमन इराणी यांचे काही चित्रपट
मैं हूं ना, लगे रहो मुन्नाभाई, दोस्ताना, खोसला का घोंसला, वक्त, नो एंट्री, थ्री इडियट्स वीर-जारा, मैंने गांधी को नहीं मारा, लक्ष्य, हनीमून ट्रैवल्स प्रा. लि. सॉरी भाई,पेज-3 ,माई वाइफ्ज मर्डर, फरारी की सवारी.
नुकताच मराठीत आलेला 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात डॉक्टर श्रॉफ यांच्या भूमिकेत बोमन इराणी यांनी धमाल उडवली आहे.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.
शंकर काशिनाथ गर्गे हे ‘नाट्यछटाकार दिवाकर’ म्हणून अवघ्या मराठी जनमानसांत लोकप्रिय असणारे लेखक होते. त्यांचा जन्म १८ जानेवारी १८८९ रोजी पुणे येथे झाला. वर्डस्वर्थ, ब्राउनिंग, शेक्सपीअर हे त्यांचे आवडते साहित्यिक होते. लॉर्ड टेनिसन यांनी १८४२ मध्ये पहिला ड्रामॅटिक मोनोलॉग लिहिला होता, जो पुढे मॅथ्यू अरनॉल्डने आणि रॉबर्ट ब्राउनिंगने लोकप्रिय केला. त्यापासून स्फूर्ती घेऊन शंकर गर्गे यांनी दिवाकर टोपण नाव घेऊन हा नाट्यप्रकार लिहून मराठीत रूळवला आणि तो ‘दिवाकरांच्या नाट्यछटा’ या नावानेच ओळखला गेला. नाट्यछटा म्हणजे एक छोटेखानी, एकपात्री स्वगतासारखा प्रकार.
आपल्या शेजारी एक किंवा काही पात्रे आहे अशी कल्पना करून नाट्यछटा सादर करणारा त्यांच्याशी संवाद साधत असतो, त्याचे संवाद तो मोठ्याने म्हणत असतो, त्यावर शेजारच्याची प्रतिक्रिया “काय म्हणालात ..”अशी सुरुवात करून स्वतःच म्हणत असतो. त्यामुळे वरपांगी हे स्वगत वाटत असले तरी सुप्त स्वरुपातले संवाद असल्यामुळे नाट्यछटा हा प्रकार अत्यंत नाट्यपूर्ण असतो. नाट्यछटा हा अगदी छोटेखानी नाट्यप्रकार, त्याचा विस्तार आणि त्याचा कालावधी हा मर्यादित स्वरुपाचा असतो, फारफारतर पन्नास-पंचावन्न ओळींचा, पण ह्या मर्यादित अवकाशातही अतिशय वेधक पद्धतीने प्रसंगाचे वर्णन केलेले असते.
दिवाकरांच्या नाट्यछटा ही मराठी साहित्याला मोठी देणगी आहे. अरेरे! ओझ्याखाली बैल मेला!, अशा शुभदिनी रडून कसें चालेल?, अहो, आज गिऱ्हाइकच आलें नाही, एका नटाची आत्महत्या, काय! पेपर्स चोरीस गेले?, कार्ट्या! अजून कसें तुला जगातलें ज्ञान नाही?, कोकिलाबाई गोडबोले, चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच, पंत मेले - राव चढले, बाळ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें!, माझी डायरेक्ट मेथड ही!, मुंबईत मजा गमतीची।, म्हातारा इतुका न | अवघें पाऊणशे वयमान, स्वर्गांतील आत्मे!, हें काय उगीचच?, हें काय सांगायला हवें! – अशा त्यांच्या एकूण ५१ नाट्यछटा लोकप्रिय आहेत. शंकर काशिनाथ गर्गे यांचे १ ऑक्टोबर १९३१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
“ग्लोरिया”, “समुद्रकविता”, “लालकोवळा काळोख” हे त्यांचे कवितासंग्रह, तर “आदिकाळोख” हा ललितगद्य लेखांचा संग्रह ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यांची कविता गूढ, चिंतनात्मक व जीवनाच्या सखोल जाणिवेची असल्याचा समीक्षकांचा अभिप्राय आहे.
चंद्रकांत गिरी हे शिक्षण क्षेत्रात झळकलेले, मराठी तरूणाचे नाव असून ते सध्या सी. एस. कॉर्डिनेटर या पदावर काम करीत आहेत. इंग्रजी संभाषण कौशल्यावर प्रभुत्व कसं मिळवायच याचं साध्या व रोचक भाषेत सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना सविस्तर व शास्त्रशुध्द ज्ञान देणारा व मुंबई विद्यापीठाने अनिवार्य केलेला हा विषय आहे व या विषयाशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये व वस्तूंमध्ये सुसुत्रता आणण्याचे काम ते त्यांच्या पदाच्या व अधिकारांच्या अख्त्यारित राहून मोठ्या प्रामाणिकपणे करीत असतात.
बाबूजींच्या आयुष्याकडे पाहताना काही गोष्टी विलक्षण वाटतात. यशाने ते कधीही हुरळून गेले नाहीत आणि अपयशाने कधीही खचून गेले नाहीत. सत्ता असो किंवा नसो त्याची त्यांना कधीही फिकीर वाटली नाही. सत्तेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ दर्जाचे लोकमतचे व्यासपीठ हातात असताना सत्तेची पत्रास काय, असे ते म्हणायचे.
भारताचे अर्थमंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी नवी दिल्ली येथे झाला. अरुण जेटली हे भारतीय जनता पक्षाचा एक महत्त्वाचा नेता म्हणून ओळखले जातात. आधी पेशाने वकील, पण त्यानंतर पूर्ण वेळ राजकारणात उरतले. अरुण जेटली यांचे वडिल महाराज किशन जेटली हे प्रख्यात वकील होते. दिल्लीतील सेंट झेव्हियर्स शाळेतून त्यांनी आपले शालेय शिक्षण घेतले आणि पदवीचे शिक्षण त्यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून घेतले. त्यानंतर १९७७ ला त्यांनी विधीची पदवी घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनात अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते.
१९७४ मध्ये ते दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बनले. अरुण जेटली यांच्या राजकीय कारकीर्दीला महाविद्यालयापासूनच सुरुवात झाली. अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. सुरुवातीच्या काळापासूनच वक्तृत्व आणि वादविवादावर त्यांचे प्रभुत्व होते. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे ते अध्यक्ष बनले आणि त्यांचा राजकारणाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.आणीबाणीच्या काळात अरुण जेटली यांना अटक करण्यात आली होती. जेटली यांना अंबाला येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर तेथून हलवून तिहारच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. आणीबाणीनंतर ते पुन्हा राजकारणात जोमाने काम करू लागले. त्यांची १९७७ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
१९७७ ला कायद्याची पदवी घेतल्यापासून अरुण जेटली हे एक यशस्वी वकील म्हणून ओळखले जातात. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात ते काम पाहतात. १९९० मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधीज्ञ म्हणून निवडले गेले होते. कायद्याच्या क्षेत्रातील त्यांचे ज्ञान आणि अनुभव पाहून १९९८ ला त्यांची निवड संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेला जाणाऱ्या शिष्टमंडळात झाली होती.
१३ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांची नियुक्ती अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात करण्यात आली. त्यांच्याकडे तंत्रज्ञान आणि प्रसारण या मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आले. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. मे २०१४ पासून ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहे. देशात आर्थिक सुधारणा होणे हे महत्त्वाचे आहे अशी भूमिका ते मांडतात. अल्पकाळासाठी त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची देखील जबाबदारी होती. सध्या ते भारताचे अर्थमंत्री म्हणून कार्यरत आहेत. आजवर अरुण जेटली यांनी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, त्यानंतर राज्यसभेवर खासदार, तिथं भूषविलं विरोधी पक्षनेतेपदही... पण लोकसभेची निवडणूक मात्र पहिल्यांदाच लढवली; त्यात त्यांना अपयश आलं. ग्लॅमर आणि ड्रेस सेन्सच्या बाबतीत अरुण जेटली सर्वापेक्षा वेगळे दिसतात. चष्म्याच्या फ्रेमपासून चप्पल, बुटापर्यंत सर्वामधून उमदेपणा झळकतो. त्यांच्या वार्डरोबमध्ये जगभरातील ब्रँडचे कपडे उपलब्ध असतात.
२४ मे १९८२ रोजी त्यांचा विवाह संगीता डोग्रा यांच्याशी झाला. संगीता डोग्रा जम्मू-काश्मी रचे कॉंग्रेसी नेता व उपमुख्यमंत्री राहिलेल्या गिरीधारीलाल डोग्रा यांच्या कन्या. त्यांचा जन्म मात्र अमृतसरचा. जम्मू विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम.ए केलं आणि त्यानंतर १९८२ मध्ये जेटलींकडून लग्नाची मागणी आली. त्या वेळी अरुण जेटली नामवंत वकील होण्याबरोबरच भाजपमध्येही स्थिरावले होते. त्यांच्या लग्नाला अर्थातच दोन्ही पक्षांचे नामवंत होते... त्यात पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी ही बडी मंडळी होती. लग्नानंतर संगीता यांचं नाव बदललं गेलं, त्या झाल्या डॉली. आणि अर्थातच हळूहळू त्या भाजपच्या कार्यकर्त्याही बनल्या. घरातून बालपणापासूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या संगीता उर्फ "डॉली‘ या अरुण जेटली यांच्या निवडणुकीचे सारं व्यवस्थापन स्वत: पाहतात. त्यांना रोहन आणि सोनाली अशी दोन मुले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti