(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • ज्येष्ठ सरोदवादक राजन कुलकर्णी

    त्यांनी सरोद व इलेक्ट्रॉनिक गिटारचे फ्युजन केले आहे. त्यासंबंधी वाद्य निर्माण केले आहे. झीरॉड असे नामकरण तौफीक कुरेशी यांनी या वाद्यासंबंधी केले आहे. फ्युजन म्हणजेच शास्त्रीय संगीतातला पुढला भाग किंवा आवृत्ती. युवकांना फ्युजन अधिक आवडते. त्याचा प्रसार करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.

  • मातब्बर मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी

    महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना दत्ता धर्माधिकारी कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक वामनबुवा पाध्ये यांच्याकडे शास्त्रोक्त गाणे शिकायला जात. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापूर येथे झाला. ‘प्रभात फिल्म कंपनी’त त्यांना नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यांना ‘टाईमकीपर’ची ‘हजेरी मास्तर’ नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यावेळी कुठल्याही कर्मचार्याचला चित्रपटात एखादी किरकोळ भूमिका करावयास सांगत. काही मंडळी अगदी हौसेनं ती भूमिका करीत. हजेरी मास्तर असलेल्या दत्ताजींना १९३७ सालच्या ‘कुंकू’मध्ये नायिका शांता आपटे हिला लग्नासाठी दाखवण्यात येणार्या् एका तरुण मुलाचे काम देण्यात आले. नायिका शांता आपटे हिचा त्यावेळी इतका प्रचंड दबदबा होता की तिच्यासमोर दत्ताजी जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांना दरदरून घाम फुटला व त्यांनी कॅमेर्याहसमोरून एकदम पळ काढला. ते काम मग संकलन विभागात काम करणार्या् अनंत माने यांनी केलं. कॅमेर्या समोरून घाबरून पळणार्याे याच दत्ताजींनी पुढे ‘माणूस’मधील ‘कशाला उद्याची बात’ या गाण्यातल्या सारंगीयाचं व ‘संत ज्ञानेश्व्र’ या चित्रपटातील सोपानदेवाचं काम अगदी निर्भयपणे केलं होतं. ‘संत ज्ञानेश्वतर’च्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक राजा नेने यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री झाली.

    ‘प्रभात’मध्ये असल्यापासून दत्ताजींनी राजा नेने यांची धरलेली संगत ‘प्रभात’ सोडल्यावरही सुटली नव्हती. राजा नेने यांनी ‘प्रभात’बाहेरच्या दिग्दर्शित केलेल्या सर्व चित्रपटांचे सहाय्यक म्हणून दत्ताजींनी काम केले होते. १९४७च्या ‘शादी से पहले’ या चित्रपटापर्यंत ते राजा नेने यांचे सहाय्यक होते. ‘मायाबाजार’ पासून दत्ता धर्माधिकांरींची दिग्दर्शक म्हणून ओळख झाली. त्यांनी स्वत:ची ‘आल्हाद चित्र’ नावाची चित्रपट काढणारी संस्था स्थापन केली. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. वि. बोकील यांच्या ‘गाठीभेठी’ या कथेवरून ‘आल्हाद’चा पहिला चित्रपट ‘बाळा जो जो रे’ निघाला. आशा भोसलेंच्या आवाजातलं ‘बाळा जो जो रे’ हे अंगाईगीत महाराष्ट्रातल्या घराघरात गेलं. ‘आल्हाद’चा पुढचा ‘स्त्री जन्माही तुझी कहाणी’ हाही चित्रपट खूप गाजला. त्याच्या यशामुळे हिंदीतील प्रसिद्ध निर्माते सरदार चंदूलाल शहा यांनी त्यांच्या ‘रणजित मूव्हीज’तर्फे औरत तेरी कहानी (भारतभूषण- निरूपा रॉय) हा चित्रपट काढला. आधीचे दोन्ही चित्रपट बाहेरच्या निर्मात्यांनी हिंदीत काढल्यामुळे यावेळचा म्हणजे पुढचा तिसरा चित्रपट ‘आल्हाद’ने मराठी व हिंदी दोन्ही भाषात काढायचं ठरवलं. चित्रपटाचे नाव होते - ‘चिमणी पाखरं’ (हिंदीत-नन्हे मुन्ने) याही चित्रपटाने रौप्यमहोत्सव केला.

    १९५२ सालचा हा काळ म्हणजे ‘आल्हाद चित्र’चा ऐश्वनर्याचा काळ होता. सर्वांचं भलं चिंतणार्या् धर्माधिकारींची नियत अतिशय चांगली होती. चित्रपटसृष्टीत शोधून सापडणार नाही असा प्रामाणिकपणाचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता. वेगळ्या विषयावरचा म्हणजे बहिर्या -मुक्या मुलीच्या भावस्पर्शी कथेवरचा ‘अबोली’ हा सुंदर चित्रपट अपयशी ठरला. खादीचा पांढराशुभ्र शर्ट, पायजमा व टोपी घालणारे पुढार्या सारख्या पोषाखातले धर्माधिकारी चित्रपटसृष्टीतले वाटत नसत. चेहर्याावर कायम हास्य असणार्याय धर्माधिकारींचे सर्वांशी जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध असत. मा.दत्ता धर्माधिकारी यांचे ३० डिसेंबर १९८२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ मधू पोतदार

  • संजय केळकर

    श्री संजय केळकर हे ठाणे शहराचे आमदार आहेत. ते २०१४ च्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. १९८५ पासून सतत शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ केळकर यांनी २०१४ मध्ये काबिज करुन शिवसेनेला धक्का दिला.

    ते राजकारणासोबतच विविध सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत.

    # Sanjay Mukund Kelkar
    BJP MLA - Thane Constituency

  • महान गायक भीमसेन जोशी

    भीमसेन जोशींचे वडील शिक्षक होते. भीमसेन यांचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी झाला. भीमसेना यांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. व १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले. उस्ताद अब्दुल करीम खाँ, वझेबुवा, केसरबाई केरकर, उस्ताद बिसमिल्ला खाँ, वगैरेंचे गायन-वादन त्यांनी ऐकले. सुरुवातीला ते इनायत खाँ यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जालंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे व ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते रामपूर येथे मुश्ताक हुसेन खाँ यांच्याकडे काही काळ शिकले. अशा प्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर येथे व्यतीत केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या वडिलांशी त्यांची भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले.

    भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांचे वडील भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. त्या काळातील परंपरेनुसार भीमसेनांनी गुरुगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी, पुरिया, मुलतानी वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी १९३६ ते १९४१ पर्यंतच्या काळात शक्य तेवढे ज्ञान आत्मसात केले. त्यावेळी आणि त्यानंतरही ते रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते पुणे येथे आले.

    भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली. भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी ते ठुमरीही अतिशय छान गात. भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले. आपल्या स्वरांची नदी जगाच्या दहा दिशांना अथांग वाहणार्याी संगीतसम्राट तसेच ख्याल गायकीसाठी सर्वश्रृत असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली भजने देखील प्रसिद्ध आहेत. शास्त्रीय संगीत व भजन यासह त्यांनी अनेक चित्रपटगीते, ठुमरी देखील वेगळ्या शैलीत गायल्यामुळे प्रसिद्ध आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

    केवळ मराठीच नाही, तर संपूर्ण देशासह विदेशातील रसिक भीमसेन जोशी यांच्या आवाजाने संगीत मैफल सुरू असताना जागेवरच खिळवून ठेवत होते. आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करून त्यांच्यावर भुरळ घातली होती. त्यांच्या त्या काळी वारंवार होणार्यास विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली होती. भीमसेन जोशी यांनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. महान गायक मा. भीमसेन जोशीं यांचे २४ जानेवारी २०११ निधन रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • दीक्षित डाएट प्लॅनचे रचेते डॉ. जगन्नाथ दीक्षित

    डॉ. दीक्षित यांनी विकसित केलेल्या उपचार पद्धतीने फक्त भारतातीलच नव्हे, तर परदेशातील रुग्णांनाही फायदा झाला आहे. सोशल मीडियावरही डॉक्टरांनी सांगितलेल्या स्वास्थ्यशैलीचा प्रचार होत असून ‘दीक्षित डाएट प्लॅन’ नावाने ती प्रसिद्ध झाली आहे.

  • समृद्धी बडे

    कॉलेजमध्ये शिकता शिकता करिअरच्या दृष्टीने काही कोर्सेस करणं, किंवा समर जॉब्ज किंवा पार्टटाइम जॉब्ज तर अनेकजणं करतात. नोकरीऐवजी पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करणारेही फार कमी असतात. पण समृद्धी बडेने याहीपुढे जाऊन स्वतःचा ब्रँड डेव्हलप करण्याचा विचार केलाय.

    झेवियर्स कॉलेजमध्ये थर्ड इयर आर्ट्सला शिकणार्‍या समृद्धीला वेगवेगळ्या कलाकृती करण्यात कायमच रस होता. ज्यूट, कागद, कापड, पातळ लाकूड अशा अनेक गोष्टींपासून विविध कलाकृती तिने साकारल्या आहेत. ज्यूटच्या बॅग्ज, झोळ्या, पेंटिंग केलेले टीशर्टस, वेताचे ट्रे, चिनीमातीच्या किंवा काचेच्या मग्जवरील पेंटिंग, भित्तीचित्रे अशा अनेक क्रिएटिव्ह वस्तू ती तयार करत असते. इतकंच नव्हे तर या वस्तूंच्या विक्रीसाठी तिने फेसबुकवर ' वरुणी कलेक्शन्स ' या नावाने एक पेजही तयार केलंय. त्याला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय. या सगळ्या वस्तू ती स्वतःच बनवते. पण त्यांची विक्री करणं, किंमत ठरवणं हे सगळं समृद्धी आईच्या मदतीने ठरवते.

    तिच्या या पेजवर तिच्या वस्तूंसाठी मागणी नोंदवता येते. ग्राहकाच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार वस्तू तयार केली जाते. त्यांची घरपोच डिलीव्हरीही दिली जाते. शिवाय आपल्या प्रॉडक्टच्या प्रसिद्धीचं कामही समृद्धी मनापासून एन्जॉय करतेय. तिच्या वरुणी कलेक्शनसाठी या सगळ्या गोष्टी करणं हा तिच्या अनुभवाचाच एक भाग आहे.

    बीए झाल्यानंतर एमबीए करुन पुढे स्वतःचा हस्तव्यवसायाचा ब्रँड तयार करण्याचं समृद्धीने आत्तापासूनच मनाशी पक्कं केलंय.

    समृद्धीची घोडदौड इथेच थांबत नाही. हस्तकलेच्या जोडीला तिला फ्रेंच भाषेचीही अत्यंत आवड आहे. एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फ्रेंच इन्स्टिट्यूटमधून ती सध्या फ्रेंचच्या परीक्षा देतेय. त्याअंतर्गत चार महिन्यांसाठी ती फ्रान्समध्ये कल्चरल एक्स्चेंजची विद्यार्थिनी म्हणून शिक्षणही घ्यायला गेली होती.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • लोकगायक प्रल्हाद शिंदे

    २०१७ मध्ये राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या ‘दशक्रिया’ या चित्रपटातील त्यांची भूमिका होती. सोबतच देवाशप्पथ खोटे सांगेन, चष्मे बहाद्दर, गलगले निघाले, सत्य सावित्री, सत्यवान, सातबारा कसा बदलला, आयपीएल-इंडियन प्रेमाचा लफडा, आर्त आदी गाजलेल्या चित्रपटांतही त्यांनी काम केले होते.

  • कवी प्रभाकर बरवे

    बरवे यांचे जीवनकार्य लक्षात राहाते, ते अशा सुटय़ा-सुटय़ा चित्रमालिकांतून नव्हे, तर त्यांच्या एकंदर चित्रविचारातून! याच चित्रविचाराने, ‘अमूर्त’ म्हणजे काहीतरी पलीकडचे आणि गूढ नव्हे, नेहमी दिसणाऱ्या वस्तूंचा संबंधदेखील ‘अमूर्त’ असू शकतो, असा विश्वास अनेकांना दिला. याच चित्रविचारातून, ‘कशाचे चित्र काढू?’ हा प्रश्न अनेक कलाविद्यार्थ्यांसाठी कायमचा सुटला!

  • भाऊ पाध्ये

    पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना कादंबरीत अभिव्यक्त केल्या आहेत.

  • राम ताकवले

    ताकवले, राम

    भारतीय शिक्षण क्षेत्रात तीन दशकांच्या काळात ज्यांनी मूलभूत स्वरूपाची कामगिरी केली, अशा महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये डॉ. राम ताकवले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यांच्या या कामगिरीमुळेच नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या गोदावरी पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड सर्वथा योग्य आहे. देशातल्या महत्त्वाच्या विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून त्यांनी केलेली कामगिरी जेवढी मोलाची आहे, तेवढेच शिक्षणाच्या भावी विकासाच्या दृष्टीने त्यांनी केलेले चिंतनही महत्त्वाचे आहे.

    ग्रामीण भागातून आलेल्या ताकवले यांनी कष्टाने आपले शिक्षण पूर्ण केले. पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊन मॉस्को विद्यापीठाची डॉक्टरेट त्यांनी मिळविली. पदार्थविज्ञानाच्या क्षेत्रात उच्च पदवी मिळवल्यानंतर त्यांनी अध्यापनाचे क्षेत्र निवडले आणि त्यातच ते रममाण झाले. विद्यापीठातील उच्चशिक्षणाच्या क्षेत्राशी त्यांचा संबंधही अगदी लवकर आला आणि त्यामुळे ते पुणे विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागात अध्यापक म्हणून रुजू झाले. विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय असलेल्या ताकवले सरांनी विद्यादानाचे कार्य करत असतानाच संशोधनाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी त्यांची निवड झाली, तेव्हा भारतीय विद्यापीठांमधील विज्ञान शिक्षणासंबंधी केलेले वक्तव्य शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाच्या लक्षात राहणारे होते. विद्यापीठांमधून नुसते शिक्षण मिळता कामा नये, तर ती संशोधनाची देशातील महत्त्वाची केंद्रे बनली पाहिजेत, असा आग्रह त्यांनी त्या वेळी बोलून दाखवला होता. हा आग्रह त्यांनी त्यांच्याच कारकीर्दीत प्रत्यक्षात आणला. पुणे विद्यापीठातील विज्ञान विषयांशी संबंधित अशा सगळय़ाच विभागांना राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर जाण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केले. पुणे विद्यापीठाचा या क्षेत्रातील नावलौकिक वाढण्यास त्यांची कारकीर्द कारणीभूत ठरली, तशीच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी मुक्त शिक्षणाच्या क्षेत्रात केलेले कार्य अधोरेखित करण्यासारखे झाले. या त्यांच्या कामगिरीमुळेच दिल्लीच्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांना आमंत्रित करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर त्या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाच्या भावी विकासाच्या दिशेने त्यांनी केलेले कार्य लक्षणीय आहे. अतिशय सौम्य प्रकृतीच्या ताकवले सरांनी शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर केल्या जाणाऱ्या विविध प्रयोगांचा बारकाईने अभ्यास केला. त्या बदलांना सामोरे जाताना भारतीय शिक्षण व्यवस्थेची होणारी तारांबळ ते स्वत: अनुभवत होते. माहिती आणि ज्ञानाच्या क्षेत्रात घडत असलेल्या क्रांतीचे डॉ. ताकवले हे एक महत्त्वाचे साक्षीदार आहेत. त्यामुळेच या बदलांना आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सामावून घेण्यासाठी त्यांनी अनेक नव्या योजना आखल्या, त्या केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयापर्यंत पोहोचवल्या, त्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळेच काही वर्षांत शिक्षणाच्या बाबतीत अनेक नवे प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांलाही शिक्षणाच्या सगळय़ा संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि त्याला जगात सध्या उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा लाभ घेता यायला हवा, असा आग्रह त्यांनी सातत्याने धरला. विद्यापीठीय शिक्षण पद्धतीत संशोधनाचे महत्त्व तीन दशकांच्या काळातच वाढत गेले आणि त्यासाठी पुढाकार घेतलेल्यांमध्ये डॉ. राम ताकवले यांचे नाव ओघानेच घेतले जाते. शिक्षणाचा जगण्याशी आणि मानवी जीवनाशी असलेला संबंध स्पष्ट करताना डॉ. ताकवले यांनी व्यवहार आणि ज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. अर्थार्जनासाठी आवश्यक असलेले ज्ञान विद्यापीठीय शिक्षण पद्धतीत देता येण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजा आणि शिक्षणक्रम यांचा अन्योन्यसंबंध निर्माण करणे आवश्यक होते. उद्योग आणि व्यापाराच्या क्षेत्रात ज्या कौशल्यांची गरज आहे, ती कौशल्ये शिक्षणातून कशी देता येतील, हा व्यावहारिक विचार करत असतानाच संशोधनातून मानवी ज्ञानाची लालसा अधिकाधिक जागृत कशी करता येईल, यासंबंधीही त्यांनी मूलभूत स्वरूपाचा विचार केला. त्यांना मिळणाऱ्या गोदावरी पुरस्कारामुळे त्यांच्या या क्रांतदर्शी कारकीर्दीवर शिक्कामोर्तब झाले आहे.