(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पं. जितेंद्र अभिषेकी

    पंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत अभंग भावगीत हिन्दी भजन यांना लावलेल्या चालींची संख्या १०० ते १५०च्या दरम्यान जाईल. ‘मत्स्यगंधा’ हे पंडितजीनी संगीत दिग्दर्शन केलेले ना टक १ मे १९६४ रोजी रंगभूमीवर आले आणि खूप गाजलं.

  • प्रसिद्ध लेखक, नाटककार, पत्रकार, अनिल बर्वे

    प्रसिद्ध लेखक, नाटककार, पत्रकार, अनिल बर्वे यांचा जन्म १७ जुलै १९४८ रोजी पुणे येथे झाला. अगदी २२ वर्षी त्यांनी म रा नाट्यस्पर्धेसाठी दोन नाटके सादर केली. त्यात “कोलंबस वाट चुकला” या नाटकास सोविएत (Soviet Land) नेहरू पुरस्कार मिळाला. साप्ताहिक माणूस मध्ये ७०च्या दशकात “रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता” ही नक्षलवादी चळवळीचा आढावा घेणारी त्यांची लेखमाला गाजली. त्यांनी फुलवा नावाचे एक फिल्मी मासिक काही दिवस काढले पण त्यांचा मूळ पिंड डाव्या विचारसरणीचा असल्याने त्यानंतर “रणांगण” सारखे राजकीय साप्ताहिक त्यांनी काही दिवस चालवले पण जाहिरतिअभावी ते बंद पडले.

    पुढे नक्षलवादी पत्रके छापल्याच्या आरोपात ते दीड वर्षे तुरुंगात होते. तुरुंगाच्या वास्तव्यात त्यांनी “थांकयु मी. ग्लाड” ही कादंबरी लिहिली. ती इमर्जन्सीच्या काळात ‘सा. माणूस’ मध्ये छापून आली व अतिशय गाजली. पुढे त्या कादंबरीवर त्यांनी प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदा या संस्थेसाठी नाटक लिहिले. तेही लोकप्रिय झाले. त्यानंतर “हमिदाबीची कोठी” हे वेश्यावस्तीतील जीवनाचे यथार्थ दर्शन देणारे नाटक विजया मेहता यांनी अशोक सराफ, नाना पाटेकर आदि दिग्गज कलाकारांना घेऊन रंगमंचावर आणले. त्याला समिक्षकान्नी उचलून धरले.

    त्यानंतर त्यांनी लिहिलेली निपुत्रीकांच्या समस्येवर‘पुत्रकामेष्टी’ (प्र.भु. डॉ प्रभाकर पणशीकर), राजकीय नेत्यांवर आधारित ‘आकाश पेलताना’ (प्र.भु. डॉ श्रीराम लागू), आणि मर्सी किलिंग वर आधारित ‘मी मालक या देहाचा” (प्र.भु. विक्रम गोखले) आदि रंगमंचावर आली. आपल्या लिखाणात अगदी वेगवेगळे विषय अभ्यास करून हाताळणे ही त्यांची खासियत होती. ‘डोंगर म्हातारा झाला’ (आदिवासी जीवन) ‘११ कोटी गालन पाणी’ (चासनाला खाणीची दुर्घटना)‘होरपळ’ (अभयारण्ये) ‘स्टडफॉर्म’, ‘फाशिगेट’ अशा विविध विषयांचा वेध घेणाऱ्या त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या.

    त्यांना महाराष्ट्र शासनाचे साहित्याचे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या लेखनाचे अनेक भाषांमध्ये रुपांतर झाले. त्यावर हिंदी मराठी सिनेमेही आले. अनिल बर्वे यांचे ६ डिसेंबर १९८४ ला निधन झाले. फुलवा खामकर व राही बर्वे ही त्यांची मुलं आज आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    संदर्भ.चंद्रकात बर्वे

  • अमेरिकन विनोदी लेखिका अर्मा बॉम्बेक

    अर्मा बॉम्बेक यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९२७ रोजी बेलब्रूक अमेरिका येथे झाला.

    अर्मा बॉम्बेक या अमेरिकेन लोकांची अत्यंत लोकप्रिय आणि जिचं साहित्य प्रचंड वाचलं जातं, अशी प्रसिद्ध विनोदी कथाकार!

    त्यांनी घरगुती प्रसंगावर आणि रोजच्या आयुष्यात नेहमी घडणाऱ्या प्रसंगांवर अत्यंत खुसखुशीत भाषेत मिश्कील लेखन करून प्रचंड लोकप्रियता मिळवली.

    ७० आणि ८०च्या दशकात त्यांचे ‘विट्स एंड’ हा सिंडिकेटेड कॉलम आठवड्यातून तीन वेळा जवळपास ९०० वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध व्हायचा. तिचं प्रत्येक पुस्तक बेस्टसेलर असायचंच. मातृत्व आणि बालसंगोपन हे तिचे विशेष जिव्हाळ्याचे विषय होते आणि त्या संदर्भात तिचं धमाल विनोदी लेखन प्रसिद्ध व्हायचाच अवकाश, की लगेच त्याच्यावर वाचकांच्या उड्या पडायच्या.

    दी ग्रास इज ऑल्वेज ग्रीनर ओव्हर दी सेप्टिक टँक, इफ लाइफ इज ए बोल ऑफ चेरीज व्हॉट अॅम आय डुइंग इन दी पिट्स?, फॅमिली – दी टाइज दॅट बाइंड.. अँड गॅग, आंट एर्माज कोप बुक, मदरहूड दी सेकंड ओल्डेस्ट प्रोफेशन, अशी त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत. अर्मा बॉम्बेक यांचे २२ एप्रिल १९९६ रोजी निधन झाले.

  • बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमामालिनी

    आज १६ आक्टोबर
    आज ड्रीमगर्ल हेमामालिनी यांचा वाढदिवस
    जन्म. १६ आक्टोबर १९४८

    हेमामालिनी यांचे पूर्ण नाव हेमामालिनी चक्रवर्ती. मा.हेमामालिनी यांची आई जया चक्रवर्ती ह्या तमिळ चित्रपटाच्या निर्मात्या होत्या, त्यामुळे घरी आधीपासूनच चित्रनगरीशी जुळवून घेणारे वातावरण होते. आपल्या चार दशकाहूनही अधिक काळापासून सिनेसृष्टीत यशस्वी कलाकार म्हणून आणि कित्येक सुपरह हिट चित्रपट देणाऱ्या हेमामालिनी यांना सुद्धा सुरवातीच्या काळात निर्माते आणि निर्देशक यांनी म्हंटले होते कि त्यांच्यात स्टार अपील नाही. तमिळ दिग्दर्शक श्रीधर यांनी तिला चित्रपटात घेण्यासाठी नकार दिला होता. हेमामालीनी यांना पहिला ब्रेंक मिळाला तो राजकपूर सोबतच चित्रपट ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटात त्यांना ‘ड्रीमगर्ल’ म्हणून प्रचारित करण्यात आले होते, फिल्म बॉक्स ऑफिस वर फारशी यशस्वी ठरली नाही पण हेमा मालिनी यांचे कौतुक झाले आणि दर्शकांनी त्यांना पसंद केले होते. त्यानंतरच्या काही चित्रपटांनमध्ये सुद्धा त्यांना ड्रीमगर्ल म्हणून समोर आणल्या गेले होते आणि आश्चर्य बघा कि नंतर १९७७ मध्ये त्यांना घेऊन प्रमोद चक्रवर्ती यांनी ड्रीमगर्ल नावाचा सिनेमाच पडद्यावर आणला आणि तो गाजला सुद्धा होता. त्यांचा पहिला हिट सिनेमा होता ‘जॉनी मेरा नाम’, देव आनंद सोबतच्या त्या चित्रपटाने त्यांचे करियर उचलून धरले. आणि लोकांनी त्या जोडीची खूप प्रशंसा केली होती. त्यानंतर आलेल्या रमेश सिप्पी यांच्या ‘अंदाज’ या चित्रपटातल्या अभिनयाने हेमा मालिनी यांनी दर्शकांना मंत्रमुग्ध करून टाकले होते. रमेश सिप्पी यांचाच चित्रपट ‘सीता और गीता’ मध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि ती फिल्म त्यांच्या करियर मध्ये निर्णायक ठरली होती. या चित्रपटानंतर त्या प्रसिध्यीचा शिखरावर पोहचल्या होत्या. या चित्रपटातील अतिशय सुंदर अभिनयामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा एकमेव फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सुरवातीला ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटासाठी वैजयंतीमाला यांची निवड झाली होती पण त्यांनी वेळेवर त्यांच्या विवाहामुळे त्या चित्रपटात काम करायला आपली असमर्थता दाखवली आणि त्याऐवजी हेमामालिनी यांना संधी मिळाली होती. तसेच ज्या चित्रपटाने त्यांना प्रसिद्ध्यीच्या शिखरावर पोहचवले होते त्या ‘सीता और गीता’ मध्ये रमेश सिप्पी यांना मुमताज यांना घ्यायचे होते. पण काही कारणास्तव त्या या चित्रपटात काम करू शकल्या नाही आणि पर्यायाने तो चित्रपट हेमा मालिनी यांना मिळाला आणि मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले होते. वैजयंतीमाला यांच्या निवृती नंतर शास्त्रीय नृत्यांगना असलेली अभिनेत्री ची जागा हेमा मालिनी यांनी भरून काढली. १९७० साली आलेल्या ‘शरारत’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा धर्मेंद्र सोबत काम केले होते आणि १९७९ मध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्या सोबतच लग्न केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र सोबत एकूण २८ चित्रपटांमध्ये काम केले होते. सहसा विवाहानंतर अभिनेत्रीची कारकीर्द संपुष्टात येते, पण हेमा मालिनी यांनी जिद्दीने आणि आपल्या परिश्रमाने विवाहानंतर सुद्धा बरेच यशस्वी चित्रपट दिलेत. जसे ‘क्रांती’, ‘नसीब’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘रजिया सुलतान’, एक नई पहेली’, ‘अंधा कानून’ आणि ‘अलिबाबा और चालीस चोर’ आणखी बरेच. उतरार्धात सुद्धा त्यांनी आपला चित्रपटाचा प्रवास सुरूच ठेवला ‘बागबान’ या भूमिकेबद्दल त्यांना फिल्मफेअर पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. ‘वीरजारा’ मधील भूमिकेबद्दल पण त्यांची बरीच प्रशंसा झाली होती. त्यांनी आतापर्यंत सीता औऱ गीता, शोले, संन्यासी, धर्मात्मा, प्रतिज्ञा, सत्ते पे सत्ता, बागबान यांसारखे १५० चित्रपट केले आहेत. ड्रीम गर्ल अशी हेमामालिनी यांची ओळख आहे. भरतनाट्यम मध्ये निपुण असलेल्या मा.हेमामालिनी जगभर अनेक ठिकाणी आपल्या नृत्यांचे कार्यक्रम पण केले आहेत. सोबतच त्यांनी ‘दिल आशना है’ या शाहरुख खान आणि दिव्या भारती अभिनित चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले होते. राजकारणात पण त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्या भारतीय जनता पार्टी च्या जनरल सेक्रेटरी होत्या आणि सध्या मथुरा येथील भा.ज.पच्या खासदार आहेत. भरतनाट्यममध्ये विशारद असलेल्या हेमामालिनी यांनी १९६८ मध्ये ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटातून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मा.हेमामालिनी यांना आपल्या समूहातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट /विकीपीडीया

  • एक प्रतिभावान दिग्दर्शक बिमल रॉय

    त्यांचा जन्म १२ जुलै १९०९ रोजी झाला. दो बिगा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता आणि बंदिनी आदी चित्रपटांतून रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळात कधी शेतकऱयांची व्यथा, रहस्यमय, विरह, समाजव्यवस्था आदी विषय त्यांनी आपल्या चित्रपटातून हाताळले आणि आपली वेगळी छाप त्यांनी निर्माण केली. ते खास करून चित्रपटामध्ये सौदर्याचा वापर करून घेणार दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही कलात्मक असायची. मा.बिमल रॉय यांच्या चित्रपटात संवेदनशील नातेसंबंध आणि समाजातील उपेक्षित वर्गांचे चित्रण असायचे. मा.बिमल रॉय यांनी एक तरुण फिल्ममेकर म्हणून त्याकाळी अनेकांना प्रेरणा दिली. गुलजार यांना मा.बिमल रॉय यांनी त्यांच्या "बंदिनी' या चित्रपटासाठी त्यांना संधी दिली आणि त्यांनी लिहिलेले "मोरा गोरा अंग लै ले..' हे नूतन यांच्यावर चित्रित झालेले गाणे सुपरहिट ठरले. बिमल रॉय स्वत:च एक चित्रपटाची शाळा होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

    बलराज सहानी यांची दो बिघा जमींन बद्दल एक आठवण सांगितली जाते.

    बलराज सहानी हे त्या काळातले एक उच्चविद्याभूषित होते. कलकत्त्यात ते तेव्हा प्राध्यापकी करत. इंग्लंडवरून शिकून आल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व हे साहेबी होतं. बिमल रॉय हे चित्रपट बनवत असल्याचं त्यांना कळल्यानंतर ते त्यांना भेटायला गेले व आपल्याला या चित्रपटात भूमिका करायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बिमल रॉय यांचं पात्र हे एका गरीब शेतक-याचं, एका रिक्षावाल्याचं होतं. बलराज सहानी यांना सुटाबुटात पाहून बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देण्याचं नाकारलं. बलराज सहानी यांनाही आपली चूक कळून आली. त्यानंतर या भूमिकेसाठीच्या पोषाखात त्यांनी वावरून त्या भूमिकेचा अभ्यास केला. इतकंच नव्हे तर आपल्या बायका-मुलांना घेऊन त्यांनी कलकत्त्यात काही काळ रिक्षा ओढण्याचाही सराव केला. या सा-या गोष्टीचा अभ्यास करून मग ते पुन्हा बिमल रॉय यांना भेटायला गेले. त्यांना त्या लुकमध्ये पाहिल्यावर मग बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देऊ केली. कलाकाराच्या प्रभावापुढे न झुकणारे असे ते दिग्दर्शक व आपल्या दिग्दर्शकाच्या समाधानासाठी प्रचंड कष्ट घेणारे ते कलाकार आता सापडणं मुश्कीलच.
    मा.बिमल रॉय हे त्या काळातले एकमेव असे दिग्दर्शक होते ज्यांच्या घरी दिलीप कुमार स्वत: कथा ऐकायला येत असे. एरवी सर्वच दिग्दर्शकांना दिलीप कुमार आपल्या घरी बोलावत अस्त. बिमल रॉय यांनी मात्र कधीही फोन केला तर ते लागलीच त्यांच्या घरी येत असत. दिलीप कुमार यांच्या अभिनय कारकिर्दीतली सर्वात प्रभावी व्यक्तिरेखा म्हणजे देवदास हा चित्रपट होय असे दिलीप कुमार स्वत:च म्हणत आहे. भारतीय चित्रपट इतिहासात जे देदीप्यमान तारे चमकून गेले त्यामध्ये निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांचे स्थान अढळ आहे. रॉय यांच्या चित्रपटांना आजमितीस अनेक वर्षे लोटली तरी त्यातील आशय, कलात्मकता आणि सर्जनशीलता सामान्य रसिकांच्या हृदयाचा ठाव अजूनही घेत असतात. १९११ ते १९६६ या काळातील ‘उदयरे पथे’, ‘दो बीघा जमीन’, ‘परिणीता’, ‘बिराज बहू’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘परख’ आणि ‘बापबेटी’ अशी अनेक चित्ररत्ने रॉय यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देतात. बिमल रॉय यांचे ८ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • दिनकर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी

    काव्यसंग्राहक संपादक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुराणवस्तू संग्राहक असलेले दिनकर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी हे नाव ‘राजा दिनकर केळकर म्युझियम’ या संस्थेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेच. त्यांचे संपूर्ण शिक्षण बेळगाव व पुणे येथे झाले. ते वास्तव्याला पुण्यातच होते. राम गणेश गडकरी हे त्यांचे गुरू होते.

    दिनकर केळकर यांचा जन्म १० जानेवारी १८९६ रोजी झाला. अज्ञातवासी नावाने ते कवी म्हणूने ख्यातनाम झाले. १९१५ पासून ‘अज्ञातवासी’ या टोपणनावाने ते काव्यलेखन करत असत.

    श्री महाराष्ट्र शारदा मंदिर, पुणे या संस्थेचे ते संस्थापक होते. शारदामंदिर तर्फे केळकरांनी महाराष्ट्र शारदा भाग १ या ग्रंथाचे संपादन केले. परशुरामपंत, तात्यासाहेब गोडबोले, चिपळूणकर, केशवकुमार ते कवी अनिल यांच्यापर्यंत कवींच्या निवडक कविता त्यात समाविष्ट आहेत. भा. रा. तांबे यांची कविता, ह. स. गोखले यांच्या ‘काहीतरी’ काव्यसंग्रहातील कवितांचेही ते संग्राहक होते. अज्ञातवासींची कविता ‘अज्ञातवास’, ‘अज्ञातवासींची कविता भाग १, भाग २’ या काव्य संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. निसर्ग, प्रेमविषयक, वात्सल्याने भारावलेल्या, जीवन चितनपर, गुढात्मक अशी त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत.

    केळकर यांचे काव्यसंग्रह त्यांच्या काळातील बी.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट होते. त्याचबरोबर त्यांनी अ.स. गोखले यांचा ‘काहीतरी’ काव्यसंग्रह, भास्करराव तांबे यांची कविता भाग २ चे संकलन, प्र. के. अत्रे लिखित ‘झेंडुची फुले’ या काव्यसंग्रहाचे संपादन-संकलन केले. त्यांनी आधुनिक कवींचा ‘महाराष्ट्र शारदा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. तो त्या काळी गाजला होता. केळकर यांनी त्यांच्या काही कवितांमधून त्यांना वस्तू देणाऱ्या दानशूर आणि अज्ञात व्यक्तींचे आभार मानण्याचा प्रयत्न केला आहे.

    नंतर पराकोटीच्या इतिहास प्रेमातून त्यांनी पुराणवस्तुंचा संग्रह जमविला व आपल्या दिवंगत पुत्राच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘राजा केळकर’ ह्या पुराण वस्तुसंग्रहालायाची निर्मिती केली. यासाठी दिनकर केळकरांनी व त्यांच्या पत्नीनी सतत भ्रमंती करून, आर्थिक झीज सोसून या ऐतिहासिक सुंदर अशा कलावस्तुंचा संग्रह केला. हा पुराण वस्तुंचा अमोल ठेवा त्यांनी १९७९ साली राज्य शासनाच्या ताब्यात दिला. आज मितीला केळकर संग्रहालय पाहण्यासाठी दिवसाला सरासरी तीनशेजण येतात. वर्षाला सव्वा ते दीड लाख लोक त्या संग्रहालयाला भेट देतात. संग्रहालयाची पूर्णवेळ देखभाल केळकर यांचे नातू सुध्नवा रानडे पाहत आहेत. संग्रहालयातील वस्तूंच्या जतनासाठी, विशेष लक्ष पुरवले जाते. केळकर यांनी तो अमूल्य संग्रह राष्ट्राची संपत्ती असून, राष्ट्रास अर्पण करावा या भावनेने १९७५ साली महाराष्ट्र शासनास भेट दिला.

    दिनकर केळकर यांच्या इतिहास व संस्कृती संवर्धनातील भरीव योगदानाबद्दल त्यांना भारत शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. त्याचबरोबर संग्रहालय क्षेत्रातील विशेष कामगिरीकरता हैदराबादच्या ‘सालारजंग म्युझियम’च्यावतीने दिलेले पहिले सुवर्णपदक, इचलकरंजीच्या ‘फाय फाउंडेशन’चा पुरस्कार, ‘इंडियन असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स’तर्फे करण्यात आलेला सन्मान, पुणे महानगरपालिकेतर्फे झालेला सत्कार, पश्चिम जर्मनीचा ‘इंडियन सेंटर फॉर एन्करेजिंग एक्सलन्स’ पुरस्कार असे विविध सन्मान त्यांना मिळाले. इतिहास क्षेत्रातील त्यांच्या या अपूर्व कार्याबद्दल १९७८ साली पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय ‘डॉक्टरेट’ पदवी घेऊन त्यांचा गौरव केला.

    दिनकर केळकर यांचे १७ एप्रिल १९९० रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • डॉ. उदय बोधनकर

    बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकरांच्या कार्याची दखल इंग्लंडच्या राणीनेही घेतली. त्यांचा सत्कार केला. त्यांचा सत्कार केला. कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अॅन्ड डिसॅबिलिटीज या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेचे अध्यक्ष बनलेल्या डॉ. बोधनकरांनी ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या आरोग्यावर सतत लक्ष केंद्रित केले आहे. आंतरराष्ट्रीय परीघ वाढूनही सेवाभावी वृत्ती सोडली नाही...

    डॉ. उदय बोधनकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सने छापलेला निरामय बालकांसाठी हा लेख पुढील पानावर वाचा ..

    डॉ. उदय बोधनकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सने छापलेला निरामय बालकांसाठी हा लेख..

    bodhankar-dr-uday-modified

    ## Dr.Uday Bodhankar

  • ख्यातनाम गझल गायक गुलाम अली

    गुलाम अली यांचे नाव त्यांच्या वडलांनी बडे गुलाम अली खाँ यांच्यापासून प्रेरित होऊन ठेवले. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९४० रोजी झाला. गुलाम अली थोडे मोठे झाल्यावर बडे गुलाम अली खाँ यांच्याकडे त्यांना शिष्य बनवण्यासाठी वडलांनी चकरा मारायला सुरुवात केली. बडे गुलाम हे त्या काळचे सर्वात मोठे आणि अत्यंत व्यग्र असे व्यक्तिमत्त्व होते. गुलाम अली यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांचे वडील त्यांना पहाटे पाच वाजता उठवायचे. नाही उठले तर काठीने मारून उठवायचे. का, तर बडे गुलाम अली खाँचे नाव खराब होऊ नये. तेव्हा ते पाच वर्षांचे होते.

    बरेच दिवस गेल्यावर एके दिवशी बडे गुलाम अली खाँ त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या वडलांच्या असंख्य बिनत्यांची आबरू ठेवण्यासाठी गुलाम अली यांना ‘काहीतरी गा’ असे म्हणाले. त्यांनी धीर करून ‘सैयाँ बोलो तनिक मोसे रहियो न जाए’ ही ठुमरी गायली. गाणं संपताच बडे गुलाम यांनी पंधरा वर्षांच्या छोट्या गुलामला मिठी मारली आणि त्यांना आपला गंडा बांधला. तथापि, बडे गुलाम खरोखरीच अतिशय व्यग्र असल्याने त्यांचे तीन बंधू बरकत अली खाँ, मुबारक अली खाँ आणि अमानत अली खाँ यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले.

    १९६० साली गुलाम अली यांनी लाहोर आकाशवाणीवर गायक म्हणून कारकिर्दीची सुरवात केली. त्यानंतर त्यांना गझल गायक म्हणून भारत, पाकिस्तान व जगात अमाप लोकप्रियता मिळाली. गुलाम अलीजी एक मेहबूब गजल गायक आहेत. पाकिस्तानातील गजलचे बादशहा मेहदी हसन यांच्या नंतरच्या पुढच्या पिढीचे आणि समर्थ गजल गायक आहेत. त्यांच्या ‘चुपके चुपके’ने तीन दशकांपूर्वी लावलेले वेड अद्याप ओसरायला तयार नाही. हिंदुस्थानी ठुमरी गायकीची शैली गजलच्या फॉर्मसाठी यशस्वीपणे वापरणाऱ्या गुलाम अली यांनी शेकडो गजला गायल्या आहेत. त्यातील एक निवडणे हे इतर गजलांवर अन्याय केल्याशिवाय शक्य नाही.

    गुलाम अली व आशा भोसले यांचा मिराज ए गझल हा अल्बम फारच सुंदर आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=j3_CkTWf5HE

  • प्रिया तेंडूलकर

    बासू चतर्जींनी तिला ‘रजनी’ या दैनंदिन जीवनातील अन्यायाविरूध्द लढणा-या सामान्य गृहिणीची मालिका दूरदर्शनसाठी करायला लावली आणि या मालिकेने प्रिया तेंडूलकर या नावाला ख-या अर्थाने वलय मिळवून दिले.

  • हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा

    विजय अरोरा हे पुण्यातील फिल्म इन्स्टीट्यूट चे १९७१ सालचे अभिनयाचे गोल्ड मेडलीस्ट. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १९४४ रोजी गांधीधाम येथे झाला. बी.आर.इशारा यांनी आपल्या 'जरूरत' या चित्रपटा द्वारे विजय अरोरा यांना पहिला ब्रेक दिला. त्याच वर्षी आशा पारेख यांच्या बरोबर 'राखी और हथकड़ी' मध्ये काम केले, पण विजय अरोरा यांना लोकप्रियता १९७३ साली आलेल्या 'यादों की बारात' चित्रपटाने मिळाली. त्यांनी 'रामायण' टीव्ही सिरीयल मध्ये 'मेघनाद इंद्रजीत' ची भूमिका केली होती. विजय अरोरा यांनी 'भारत एक खोज' मध्ये 'बादशाह जहांगीर' ची भूमिका केली होती. माधुरी दीक्षितच्या बरोबर त्यांनी गुजराती चित्रपट 'राजा हरीशचंद्र' मध्ये काम केले होते. त्यांनी काही गुजराती नाटकात पण काम केले होते. त्यांचे इतर चित्रपट '36 घंटे', 'कादम्बरी', 'इंसाफ, रोटी', 'जीवन ज्योति', बड़े दिलवाला, 'जान तेरे नाम', 'इंडियन बाबू'. विजय अरोरा मॉडल व मिस इंडिया दिलबर देबारा यांच्या बरोबर लग्न केले होते. ११० सिनेमे आणि ५०० हून अधिक भाग टीव्ही सिरीयल मध्ये अभिनेता म्हणून यशस्वीरित्या केल्यानंतर विजय अरोरा यांनी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरु करत अनेक जाहिराती तयार केल्या. या क्षेत्रातील भारतातील पहिली आय एस ओ ९००० कंपनी असण्याचा मान याच्या कंपनीने मिळवला होता. त्याने जेम एन्ड ज्वेलरी कौन्सिल इंडिया या संस्थेचे असंख्य कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन तर केलेच पण त्या सोबत असंख्य कंपन्याची प्लेईंग कार्ड्स बनवत ती अमेरिकेतील वार्नर ब्रदर्स कंपनीच्या सुपर मॅन चित्रपटासाठी उपलब्ध करून दिली . विजय अरोरा यांचे २ फेब्रुवारी २००७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट