जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्याबरोबर वयाच्या आठव्या वर्षी नंदेश रंगमंचावर गायला उभा राहिला. परिणामी ‘ये दादा आवार ये…’ म्हणणाऱ्या कोळणीपासून ते ‘नाय बा किस्ना असून उपकाल, संगत तुजी नाई बली ले’ म्हणणाऱ्या पेंद्याच्या बोबड्या गवळणीपर्यंत लोकशाहिरांची गायकी नंदेशने सहीसही उचलली.
करंदीकर, (प्रा.) अभय
संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पदवी, पदव्युत्तर पदवी शिवाय पीएच.डी. मिळालेली व्यक्ती सर्वसाधारणपणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एखाद्या नामांकित कंपनीमध्ये अतिवरिष्ठ पदावर गडगंज पगारनिशी रूजू होते. मग काही वर्षांतच सीइओपदापर्यंत पोहोचते किंवा स्वतची कंपनी सुरू करते. या सर्व गोष्टी प्रा. अभय करंदीकर यांनी सहज शक्य होत्या. मात्र त्या मार्गाने न जाण्याचा निर्णय त्यांनी जाणीवपूर्वक घेतला. मूळ शिक्षणामध्येच त्यांना अधिक रस होता.
कालच घोषित झालेल्या भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रदान केल्या जाणाऱ्या मानाच्या डॉ. विक्रम साराभाई पुरस्कारातील पाच मान्यवरांमध्ये प्रा. अभय करंदीकर यांचा समावेश आहे. स्वत:ची शैक्षणिक आवड जोपासतानाच ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. शालेय शिक्षण ग्वाल्हेरला झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते बाहेर पडले. कानपूर आयआयटीमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (१९८६) पूर्ण केले. नंतर एम.टेक (१९८८) व पीएच.डी.ही (१९९५) पूर्ण केली. मध्यंतरीचा काही काळ त्यांनी पुण्याला सी-डॅकमध्येही काम केले. सी-डॅकमध्ये असताना हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग ग्रुपचे मुख्य समन्वयक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सध्या ते आयआयटी पवईमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअिरग विभागात प्राध्यापक असून टाटा टेलिसव्र्हिसेसच्या निधीतून साकारलेल्या सेंटर फॉर एक्सलन्स इन टेलिकॉमचे समन्वयक आहेत. त्यापूर्वी एम. टेक पूर्ण केल्यानंतर ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) रूजू झाले होते. इस्रोच्या अहमदाबाद येथील पीआरएलमध्ये त्यांनी काम पाहिले. माहिती तंत्रज्ञान विषयातील या पीएच.डी.नंतर मात्र त्यांच्या कामाला अधिक आयाम मिळाले. सध्या ते एकाच वेळेस सहा महत्त्वाच्या विषयांवर प्रगत संशोधन करीत आहेत. वायरलेस नेटवर्कमधील कंट्रोल आणि परफॉर्मन्स मॉडेिलग, वायर्ड आणि वायरलेस नेटवर्क मधील रिसोर्स अॅलोकेशन आणि सेवेतील दर्जा, नेक्स्ट जनरेशन वायरलेस नेटवर्क, को-ऑपरेटिव्ह रीले आणि सेल्फ ऑर्गनायझिंग नेटवर्क, करियर इथरनेट आणि मोबाईल बॅकहॉल, ग्रामीण भागातील वायरलेस नेटवर्क असे हे संशोधनाचे प्रमुख सहा विषय आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा एक चमू या विषयांवर काम करतो आहे. ग्रामीण भागातील वायरलेस नेटवर्क हा विषय सर्वाधिक महत्त्वाचा आहे. कारण भारतासारख्या देशांत दूरसंवाद क्रांती खऱ्या अर्थाने तळागाळात पोहोचवायची असेल तर त्यासाठी आपल्याला वायरलेस नेटवर्कवर भर द्यावा लागणार आहे. सध्या त्यांचे डिजिटल कम्युनिकेशन थिअरीवरही प्रगत संशोधन सुरू आहे. करंदीकर व त्यांच्या चमूने केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली. इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स ही महत्त्वाची संस्था डिजिटल नेटवर्किंग आणि इतर संबंधित बाबींमधील प्रमाणके ठरविण्याचे काम करते. करंदीकर यांच्या नेतृत्त्वाखालील चमूने यातील एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रमाणक निश्चित करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रा. करंदीकर प्रमुख असलेल्या सेंटरमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधन सुरू आहे. संशोधनाचेही दोन प्रमुख प्रकार असतात. एक पूर्णपणे शक्षणिक स्वरूपाचे आणि दुसरे प्रयोगात्मक प्रत्यक्षात येणारे. प्रा. करंदीकर यांचा विशेष म्हणजे त्यांना शक्षणिक संशोधनाबरोबरच प्रत्यक्षातील त्याच्या उपाययोजनांमधील संशोधनामध्येही तेवढाच रस आहे. आयआयटीतील प्राध्यापकांचा विशेष म्हणजे अनेक महत्त्वाच्या स्टार्ट-अप कंपन्यांच्या स्थापकांमध्ये त्यांचा समावेश असतो. ही बाब प्रा. करंदीकर यांनाही लागू आहे. इसोडस नेटवर्क्सच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग आहे. ही कंपनी आपल्या देशात तसेच एशिया- पॅसिफिक परिक्षेत्रात मेट्रो इथरनेटच्या क्षेत्रात कार्यरत आहे. आता जाहीर झालेला डॉ. साराभाई संशोधन पुरस्कार म्हणजे त्यांच्या आजवरच्या संशोधनावर उमटलेली राष्ट्रीय मोहोरच आहे.
दशरथ पुजारी यांनी आपल्या संगीतिक कारकीर्दीत मंगेश पाडगावकर, रमेश आणावकर, शांताराम नांदगावकर, कवि सुधांशु, योगेश्वर अभ्यंकर, मधुकर जोशी अश्या नामवंत गीतकारांच्या गाण्यांना चाली बांधल्या. यापैकी काही लोकप्रिय ठरलेली गाणी म्हणजे ‘झिमझिम झरती श्रावणधारा’,’अशीच अमुची आई असती’,’देव माझा विठू सावळा’,’केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’,’नकळत सारे घडले’,’मुरलीधर घनश्याम’,’मृदुल करांनी छेडित तारा’,’सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले’.
थोड्याच वेळाने आणखी एक टांगा आला. त्यामागे कोणीतरी पळत होते आणि मोठ्याने ओरडत होते, ‘गोंद्या आला रे आला ! गोंद्या आला रे आला! तीच खूण ठरली होती. ते इशाऱ्याचे वाक्य होते. झाडीत लपलेले दामोदर हरी चाफेकर सरसावले. ते स्वतःशी म्हणाले, होय, हीच रँड साहेबाची गाडी आहे. मघाच्या टांग्यात दुसरा कोणीतरी साहेब असेल. बाळकृष्णाने घाई केली, पण त्यात काही बिघडले नाही. मुख्य रँडसाहेब मला सापडला म्हणजे योजना यशस्वी झाली. त्यांनी हाताने खूण करून वासुदेवाला थांबविले. चित्ता हरिणावर झेप घेतो त्याप्रमाणे त्यांनी टांग्यावर उडी मारली. छपरामुळे पडदा होता तो त्यांनी सर्रकन् बाजूला सारला. रँडच्या बरगड्यांजवळ पिस्तुल नेऊन त्यांनी सटासट गोळ्या झाडल्या. रँड गाडीतच कोसळला.
त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे पं. गोविंदराव अग्नी व पं. गोविंदप्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतले. नंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली.
अजित कडकडे यांनी सुरुवातीच्या काळात 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र' या संगीत नाटकांतून गाणाऱ्या पात्रांच्या भूमिका केल्या होत्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगीतले होते की ‘संगीताचा कोणताही वारसा आमच्या घरात नव्हता. माझ्या मनात गाण्याचा कसलाही विचार नव्हता. मला डॉक्टहर व्हायचे होते. परंतु पं. अभिषेकीबुवांमुळे मी या क्षेत्रात आहे. मा.आर.एन.पराडकर यांची परंपरा अजित कडकडे चालवताना दिसतात. मा.अजित कडकडे यांनी गेल्या तीस वर्षांत दत्तगुरूंवर सुमारे चाळीस-पन्नास अल्बम केले आहेत, यातल्या बहुतांश रचना कवी प्रवीण दवणे यांच्या आहेत तर संगीत नंदू होनप यांचे आहे. ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी, अलौकिक दत्तात्रेय अवतार’ आदी त्यांची गाणी भक्तप्रिय ठरली आहेत. दत्तगुरूंवरील अन्य रचनांपैकी ‘त्रिगुणात्मक त्रमूर्ती दत्त हा जाणा’ ही पारंपरिक आरती तर घरोघरी म्हटली जाते. ‘मला हे दत्तगुरू दिसले’ हे आशा भोसले यांचं गीतही (आम्ही जातो आमच्या गावा) अजरामर आहे आणि रघुनाथ साळोखे यांनी गायलेलं ‘दत्त दर्शनाला जायाचं, जायाचं, आनंद पोटात माझ्या माईना’ हे गीतही आगळंवेगळं आहे. मा.अजित कडकडे आणि संगीतकार मा.नंदू होनप यांच्या भक्तिसंगीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. तब्बल ३५ वर्षे या जोडीने एकत्र काम केले. मा.अजित कडकडे यांना "संगीतकार प्रभाकर पंडित स्मृती पुरस्कार‘ मिळाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपीडिया
संगीतकार सी. रामचंद्र अर्थात 'अण्णा' यांच्याबद्दलचे सुप्रसिद्ध पण विखुरलेले किस्से एकत्र गुंफले की एक विलक्षण असं मिश्रण तयार होतं. वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या झाडांवरची फुलं एका गुच्छात बांधली की त्याचं बहुरंगीपण जसं आकर्षक होतं तसंच !
"पतंगा" या चित्रपटाची गाणी तयार होत असताना 'राजेंद्रकृष्ण' यांनी एक ओळ लिहीली, 'ओ दिलवालॊ दिलका लगाना अच्छा है' ! खरं म्हणजे किती छान आणि सरळ अर्थ होता या ओळीचा! पण शेजारी बसलेल्या अण्णांना गंमत करायची लहर आली . ही ओळ एेकून, हातातल्या ग्लासकडे पहात, अण्णा खट्याळपणे म्हणाले, "पर कभी कभी! मग काय विचारता? गाण्याचा सगळा नूरच एकदम पालटून गेला ... "किसीकी खातिर जान जलाना अच्छा है - पर कभी कभी!" "दिलमें किसीका प्यार बसाना अच्छा है - पर कभी कभी" ...... अण्णांच्या चेष्टेखोर स्वभावामुळे एका धमाल गाण्याचा जन्म झाला.
"चित्रपटाची सगळीच्या सगळी गाणी (आणि पार्श्वसंगीत) दहा दिवसात तयार झाली पाहिजेत" या "आजाद"च्या निर्मात्याच्या 'आदेशा'चं पालन करण्यासाठी सी. रामचंद्र व राजेंद्रकृष्ण मद्रासला रवाना झाले खरे पण या दोघांनी पहिले नऊ दिवस 'आवडत्या छंदा'त बुडवले ! निर्माते टेन्शनमधे ! मग शेवटच्या दिवशी (म्हणजे रात्री) जोडी 'बसली'! नऊ सुंदर गाणी जन्मली ! निर्माते टेन्शनमधून 'आजाद' आणि श्रोते गाण्यांच्या माधुर्यात कायमचे "कैद!"
बरं अश्या 'बिनधास्त- 'हॅपी-गो-लकी'- वृत्तीच्या माणसाला 'perfection' शी काय देणं घेणं असं आपल्याला वाटतं . पण इथं अण्णा आपल्याला चकवतात.
मोहोब्बत ही न जो समझे या तरल गाण्याचं रेकॉर्डिंग, तलतच्या तलम आवाजात पूर्ण झालं होतं. शूटिंग मात्र नंतर होतं. सी रामचंद्र सहज सेटवर गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा सेट गाण्याच्या चालीशी पूर्णपणे विसंगत आहे. शांतारामबापूंनी तर सेटवर बराच पैसा खर्च केला होता. सेट बदलायचा तर त्यांचा पैसा वाया जाणार होता. पण सी रामचंद्रनी गाण्याची चाल व सेट यातली विरुपता "बापूंना" पटवली आणि पूर्ण सेट बदलायला लावला.
कधी कधी 'खट्याळ युक्त्या' योजून ते स्वतःला हवं ते साध्य करत. "साजन" या चित्रपटातली गाणी नायक 'अशोककुमार'ने म्हणू नयेत असं त्यांना मनापासून वाटत होतं. पण अशोककुमार पडला सुपरस्टार! त्याला ही गोष्ट सांगायची कोणाची हिंमत नव्हती. शेवटी अण्णांनी शक्कल लढवली. 'अशोककुमार'च्या वेगवेगळ्या शूटिंगच्या तारखा मिळवल्या आणि गाण्याची रेकॉर्डिंगज् बरोबर त्याच तारखांना ठरवू लागले . रेकॉर्डिंगला दरवेळी 'नाही' म्हणणं अशोककुमारला अवघड वाटू लागलं तेव्हा तो वैतागून म्हणाला, 'दुसऱ्या कोणाकडून तरी गाऊन घ्या'. अण्णांना हेच हवं होतं. त्यांनी 'आज्ञाधारकपणे' रफीच्या आवाजात गाणी रेकॉर्ड केली.
पण हा कलंदर माणूस 'आतून' खूप हळवा होता. नौशादजी गंभीर आजारी होते तेव्हा सी रामचंद्र त्यांना म्हणाले, 'तुम्ही लवकर बरे ह्वावं म्हणून मी रोज आमच्या देवाला प्रार्थना करतो'. तेव्हा नौशाद म्हणाले की त्यापेक्षा मी लवकर 'जावं' अशी प्रार्थना करा म्हणजे माझी वेदनांतून सुटका होईल आणि त्याचबरोबर तुमची 'competition' सुद्धा कमी होईल. अण्णा म्हणाले, अहो पण तुम्ही आहात म्हणून तर आमच्या हातून काही चांगली निर्मिती होते - तुमच्या समोर टिकाव लागावा म्हणून ! तुम्ही गेलात तर आम्ही आळशी होऊ!' हे ऐकून नौशाद गहिवरले !
लताबरोबर वितुष्ट आल्यावर सी रामचंद्र यांच्या अनेक मित्रांनी त्यांना सुचवलं की त्यांनी लताशी 'समझोता' करावा. 'जी गोष्ट एस् डी बर्मन आणि शंकर यांनी केली ती अण्णांनी का करु नये?' पण अशा वेळी त्यांचा 'मोडेन पण वाकणार नाही' हा बाणा जागृत व्हायचा आणि ते उसळून म्हणायचे, 'समझोता तर तिने केला पाहिजे . मी तह करायला तिनं मला घडवलेलं नाही - मी तिला घडवलयं!' कदाचित, लता किती उंचीवर पोहोचली आहे हे त्यांना कळूनही वळलं नसावं.
या ब्रेकअप नंतर काही वर्षांनी घडलेला प्रसंग :
अनिल बर्वे एका संध्याकाळी अण्णांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. अण्णा एकटेच बसले होते. समोर टेबलावर त्यांची आवडती 'बॅगपाईपर' होती. पण ते नेहमीच्या मूडमधे नव्हते. उदास वाटत होते. बर्वेनी विचारलं, 'अण्णा, काय झालं ?' तेव्हा म्हणाले, 'अरे गळ्याच्या उपचारांसाठी लता लंडनला गेलीय. खूप काळजी वाटतेय रे ! या जगात गाणारे गळे खूप आहेत पण शहनाईचा स्वर फक्त लताच्या गळ्यात आहे !' अण्णांमधल्या सच्च्या कलावंताचं दर्शन घडवणारे हे उद्गार आहेत !
लता-सी रामचंद्र वितुष्टाचा 'फायदा' मिळावा या हेतूने एका मासिकाचे उपसंपादक अण्णांकडे आले व म्हणाले, 'लतापेक्षा आशा श्रेष्ठ आहे' यावर मी एक फीचर करत आहे, तुम्ही बोला त्यात'!
तेव्हा, 'तुम्हाला संगीतातलं काडीइतकं सुद्धा समजत नाही' असं म्हणून अण्णांनी त्यांची बोळवण केली.
अण्णा 'साई-सावली' मध्ये रहायला आल्यावर प्रभाकर मोने गमतीने म्हणाले, "अहो तुमचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर ! जिना अरुंद , लिफ्ट नाही! वर माणूस मेला तर 'बॉडी' खाली आणणं पण अवघड".
अण्णा नेहमीच्या 'श्टाईल'मधे म्हणाले, "पर भैय्या हम तो बाहर के बाहरही मरके जानेवाले है" .. आणि त्यांनी आपला शब्द पाळला. डिसेंबर 1981 च्या शेवटच्या आठवड्यात, के.ई.एम्. मध्ये अॅडमिट झालेल्या अण्णांनी 5 जानेवारी 1982 या दिवशी हॉस्पिटलमधेच प्राण सोडला. त्यांचं शव अंत्यदर्शनासाठी साई-सावलीत खालीच ठेवलं आणि हजारो चाहत्यांचा सोबतीनं सरळ 'चंदनवाडी'कडे रवाना झालं.
-- धनंजय कुरणे
कोल्हापूर
9325290079
ठाण्याचे आघाडीचे क्रिकेटपटु व क्रीडाविश्वाला लाभलेले अप्रतिम रत्नजडित कोंदण असे खंडेराव रांगणेकर यांच्या कारकिर्दीचे वर्णन करावे लागेल.
संस्कृत व मराठी भाषा आणि व्याकरणाचे अभ्यासक रामचंद्र भिकाजी जोशी यांचा जन्म २१ जून १८५६ रोजी झाला.
व्याकरणाची शिशुबोध, बालबोध व प्रौढबोध पुस्तके त्यांनी लिहिली आणि “मराठी भाषेची घटना”, “मराठी शब्दसिद्धी” असे ग्रंथही लिहिले.
“अलंकार विवेक”, “बालबोध व्याकरण”, “मराठी पद्य वाचन” आदी भाषाभ्यासाची, तर “लग्नविधी आणि सोहळे”, “धर्म आणि नीतिपर व्याख्याने” ही समाजविषयक पुस्तके त्यांनी लिहिली.
७ सप्टेंबर १९२७ रोजी त्यांचे निधन झाले.
# Joshi, Ramchandra Bhikaji (Sr)
अतिशय विद्वान व लोकप्रिय शिक्षक व संस्कृत भाषेचे गाढे आभ्यासक म्हणून मान्यता असलेल्या जनार्दन बाळाजी मोडक यांची १८८२ मध्ये ठाण्याच्या नामांकित बी. जे. हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. भारताच्या प्राचीन संस्कृत साहित्याच्या नानाविध पैलुंबद्दल, विशेष संशोधन व उत्खनन केल्यामुळे भारताच्या असंख्य परंपरांमधून वाहणार्या ज्ञानगंगोत्रीचे तीर्थ ते कोळून प्यायले होते.
ठाण्याच्या ऐतिहासिक छटांना गडद करणारे, व सांस्कृतिकरित्या समृध्द अशा नगरीची अचूक उहापोह व उलगडा करणारे पहिले पुस्तक जनार्दन मोडक यांनी लिहीले होते. यामध्ये ठाण्याच्या इतिहासाविषयी इत्यंभूत माहिती देण्यात आली होती. आजही लोक एक बिनचूक मार्गदर्शक या नात्याने या पुस्तकाचा संदर्भ घेत आहेत. काही काळ काव्योतिहास संग्रह या मासिकाशी त्यांचा निकटचा संबंध होता.
लेखन व संशोधनशास्त्राबरोबरच भारताच्या प्राचीन ज्योतिषशास्त्राविषयी त्यांच्या मनी प्रचंड उत्सुकता होती. या शास्त्राच्या विवीध पैलुंची उकल करून त्याला नव्या विज्ञानवादी, ज्ञानप्रवाहांचा आयाम द्यायचा हे त्यांचे स्वप्न होते. ठाण्याचे सुप्रसिध्द ज्योतिषविद्वान शंकर बाळकृष्ण दिक्षित यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्याकाळातील ज्योतिर्विषारद विसाजी कृष्णा लेले यांच्या सायनेवादावरील लेखनाने ते खुपच प्रभावित झाले होते. या दोघांनी व ठाण्यातील प्रसिध्द कवी भास्कर पाळंदे अशा तिघा विद्वानांनी मिळून मराठी भाषेतील पहिल्या पंचांगाची निर्मिती करुन ते प्रसिध्द केले. त्यांच्या ज्योतिषाशास्त्राच्या सखोल आभ्यासामुळे तसेच परिपक्व व्यासंगामुळे, पाश्चात्य इतिहासकार फ्लांट व डॉ. सेबेल यांना भारतीय कालगणना करणे सोपे गेले.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
बाबूराव बागुल हे दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक. शोषितांच्या आणि पददलितांच्या जीवनावर त्यांनी भेदक लिखाण केलं आहे. ‘धारावीत भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बुद्धिप्रामाण्यवादी आणि परिवर्तनवादी असणाऱ्या बागुल यांनी अण्णा भाऊ साठ्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून योगदान दिलं.
Copyright © 2025 | Marathisrushti