(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चरित्र अभिनेते नाना पळशीकर

    नाना पळशीकर यांचा जन्म २० मे १९०८ रोजी मध्यप्रदेशातील भंडारा येथे झाला. नाना पळशीकर म्हणजे नारायण बळवंत पळशीकर.

    नाना पळशीकर हे केवळ आपल्या मुद्राअभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे असामान्य चरित्र अभिनेते होते. मध्य प्रदेशात जन्म झाल्यामुळे त्यांच्यावर मराठीपेक्षा हिंदी भाषेचे संस्कार खूप होते. जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर देशप्रेमाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. नागपूर येथे हिंदू महासभेच्या कार्यक्रमात कॅम्प फायरचे आयोजन करण्यात आली. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हेगडेंवार तेथे होते, त्या वेळी नाना पळशीकर यांनी एक छोटा कार्यक्रम केला होता. तो पाहून त्यांनी नानांची प्रशंसा केली आणि म्हणाले , " तू खूप चांगला अभिनय करतोस, तू सिनेमात गेलास तर चांगले नांव कमवशील."

    त्या काळात नागपूरला एक चित्रपट संस्था मूकपट तयार करत होती. त्या मूकपटात नारायण यांना काम मिळाले. त्याचवेळी त्यांनी त्यांचे नाव ' नाना पळशीकर ' असे केले. चित्रपट क्षेत्रात नाव कमवावे या हेतूने नाना प्रभात कंपनीत पुण्याला गेले. पण तिथे काम मिळाले नाही. मग ते मुबंईला गेले आणि तिथे रोज एक रुपया रोजदारीवर रणजित स्टुडिओमध्ये काम करू लागले. त्यावेळी रणजीत स्टुडिओत १९३५ साली ' देशदासी ' या चित्रपटाचे काम चालले होते. त्या चित्रपटात त्यांना छोटी भूमिका मिळाली. त्यानंतर ' बॅरिस्टर की बीबी' या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली. पुढे काहीतरी काम मिळाले पाहिजे असा विचार करता असताना द्वारका प्रसाद जे मध्यप्रदेशचे गृहमंत्री होते त्यांच्याशी त्यांची भेट झाली. ते ' धुवादार' चित्रपटाची निर्मिती करत होते त्यांनी नाना पळशीकर यांना त्या चित्रपटासाठी करारबद्ध केले. त्यातील त्यांची भूमिका गाजली. त्यानंतर त्यांनी बॉम्बे टॉकीजच्या ' दुर्गा', नया संसार', ' कंगन', ' आझाद ' या चित्रपटात चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या. त्यामुळे त्यांना खुपच प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या नावाचा बोलबाला पाहून व्ही. शांताराम यांनी त्यांना राजकमल कलामंदिर मध्ये बोलवून घेतले. त्यांना ' माली ' या हिंदी चित्रपटात आणि ' भक्तीचा मळा ' या मराठी चित्रपटात भूमिका दिली.

    'माल' या चित्रपटासाठी त्यांनी एक हिंदी गीतही लिहिले. 'भक्तीचा मळा' हा त्यांचा पहिला मराठी बोलपट. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून कामे केली.

    त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून कामे केली त्यामुळे त्यांना मराठी चित्रपटात कामे करण्यास वेळही मिळत नसे. तरीही १९५५ च्या 'मूठभर चणे', १९६२ च्या 'प्रेम आंधळं असत' आणि १९६३ च्या ' फकिरा ' या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. त्याचप्रमाणे 'जेम्स आयव्हरीच्या ' द गुरु ' नावाच्या अमेरिकन चित्रपटातही त्यांनी काम केले. ह्या चित्रपटात काम केल्यावर जेम्स यांनी विधान केले ' की त्यांना जेव्हा ह्या चित्रपटात घेतले तेव्हा मला कल्पना नव्हती की ते इतके चांगले आणि प्रामाणिक कलाकार आहेत ते.' त्यांच्या त्या कामाची न्यूयॉर्क मॅगझीनने देखील प्रशंसा केली होती.

    नाना पळशीकर यांनी चार मराठी चित्रपटात भूमिका केल्या आणि शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांना ' कानून ' ह्या चित्रपटातील भुमीकेसाठी , तसेच एकूण तीन चित्रपटासाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअरची पारितोषिके मिळाली. त्याचप्रमाणे त्यांना १९८२ साली बोलपट चित्रपटसृष्टीच्या अमृतहोत्सवानिमित्त त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते पारितोषीक देण्यात आले. नाना पळशीकरांनी कंगन, कुवारा बाप (१९४२) , दो बिघा जमीन, बाप बेटी , श्री.४२० , जेलर , अनाडी , दोस्ती , शेर और सपना , कानून, माया , हेमराज , आखरी खत , आदमी और इन्सान , ललकार , शोर, धुंद, प्रेम पर्वत , आक्रोश , गांधी, कानून क्या करेगा अशा अनेक चित्रपटात कामे केली.

    नाना पळशीकर यांनी १०० हून अधिक हिंदी व फक्त ४ मराठी चित्रपटात कामे केली. त्यांनी चित्रपटसृष्टीत नेहमी चरित्र भूमिका केल्या होत्या.

    नाना पळशीकर यांचे २ जून १९८४ रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

  • कवी यशवंत

    स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या गाजलेल्या कवितेचे कवी यशवंत. १९५० साली मुंबईस भरलेल्या तेहतिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कवी यशवंत हे अध्यक्ष होते.

  • सॅल्युलाईड मॅनचे जनक दिग्दर्शक पी. के. नायर

    चित्रपटांचा चालता बोलता इतिहास असलेले आणि 'सॅल्युलाईड मॅन' अशी ओळख असलेले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (नॅशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया) संस्थापक व पहिले संचालक दिग्दर्शक पी. के. नायर यांचा जन्म ६ एप्रिल १९३३ रोजी केरळ येथील तिरुअनंतपुरम येथे झाला.

    परमेश कृष्णन नायर म्हणजेच पी के नायर यांचे तिरूअनंतपुरम येथेच शालेय आणि उच्च शिक्षण देखील झाले. मोठे होत असताना, त्यांच्यावर तमिळ भाषेमधील पौराणिक चित्रपटांचा विशेष पगडा होता आणि तेंव्हापासूनच त्यांना चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. त्यांनी केरळ विद्यापीठातून पदवी मिळवली, पण त्यांचे सर्व लक्ष मात्र चित्रपटांकडे होते आणि शेवटी १९५३ साली, ते केरळमधील सगळे सोडून मुंबईमध्ये आले आणि त्यांचा एक अनोखा प्रवास सुरु झाला. विशेष म्हणजे नायर यांनी अनेक मोठ्या दिग्दर्शकांकडे सहायक म्हणून, त्या काळी काम केले आहे. नावेच घ्यायची झाली, तर बिमल रॉय किंवा मेहबूब खान, तसेच ऋषिकेश मुखर्जी आणि अजून अनेक मान्यवर दिग्दर्शक. पण त्यांना चित्रपट बनवण्याची कला शिकताना हे उमजले, की ते चांगले दिग्दर्शक कदाचित होऊ शकणार नाही. त्यासाठी लागणारे कौशल्य किंवा प्रतिभा त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळेच १९६१ साली त्यांनी ‘फिल्म अँड टेलीव्हीजन इन्स्टीटयूट ऑफ इंडिया’ (एफ.टी.आय.आय) येथे रिसर्च असिस्टंट हे पद स्वीकारले. नॅशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया संग्रहालयाची सुरुवात देखील याच संस्थेतून झाली. १९६४ साली संग्रहालयाची स्थापना झाली आणि त्यानंतरच नायर यांची नेमणूक असिस्टंट क्युरेटर म्हणून तिथे करण्यात आली. नायर यांना ‘प्रभात फिल्म कंपनी’, ‘वाडिया मुव्हीटोन’ आणि ‘जेमिनी स्टुडियो’ने बनविलेल्या चित्रपटांच्या संग्रहाचा खूप अभिमान होता. तसेच ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक ऋत्विक घटक, हे त्यांचे खास मित्र होते आणि त्यामुळे त्यांचे अनेक चित्रपट आज चित्रपट संग्रहालयात शाबूत आहेत. ऋत्विक घटकांची ‘मेघे ढाका तारा’ त्यांना नायर यांना खूप आवडायची.

    नायर यांनी शून्यातून हे संग्रहालय उभे केले आहे. त्यांनी जवळपास १२००० चित्रपट संग्रहित केले आणि त्यामधील तब्बल ८००० चित्रपट भारतीय आहेत. जुन्या चित्रफिती, भारताच्या काना कोपऱ्यातून शोधणे आणि त्यांचे संवर्धन करून त्या कायमच्या संग्रहित करणे, या कामाने नायर झपाटलेले होते. त्यांनी अनेक जुने, हरवलेले असे चित्रपट मिळविले आणि शास्त्रीय पद्धतीने त्यांचे संवर्धन केले. भारतीय चित्रपटसृष्टीला कलाटणी देणा-या दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’, ‘कालिया मर्दन’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘जीवननैया’, ‘बंधन’, ‘कंगन’, ‘अछूत कन्या’, ‘किस्मत’ यांचा नायर यांनी संग्रहित केलेल्या चित्रपटांमध्ये समावेश आहे. त्यांनी संग्रहित केलेल्या १२ हजार चित्रपटांमध्ये आठ हजार भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. इंगमार बर्गमन, अकिरा कुरोसावा, अन्द्रेज वाजदा, क्रिस्तोफ झानुसी, फेडेरीको फेलिनी, विटोरोयो डे सिका इत्यादी परदेशी दिग्दर्शकाचे ४,००० चित्रपट संग्रहित आहेत.

    २०१२ साली शिवेंद्रसिंग डुंगरपुर या चित्रपट निर्माता व दिग्दर्शकाने नायर यांच्या आयुष्यावर एक माहितीपट बनविला आणि तो म्हणजे ‘सेल्युलॉईड मॅन’. या माहितीपटाने नायर यांचे आयुष्य पूर्णतः उलगडले आणि त्यांच्या कामाचे महत्व लोकांसमोर आणले. या माहितीपटाला २ राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले आहेत. हा माहितीपट बनवला गेला नसता, तर खूपच कमी जणांना नायर यांच्या कामाची माहिती आणि महत्व कळाले असते. ‘सेल्युलॉईड मॅन’ने नायर यांचे आयुष्यच संग्रहित केले आहे. नायर यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. पी. के. नायर हे पुण्यातील आशय फिल्म क्लबचे अध्यक्षही राहिले होते.

    पी. के. नायर यांचे ४ मार्च २०१६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मुकुंद श्रीनिवास कानडे

    नाट्यसमीक्षक, टीकाकार, भाषाअभ्यासक आणि इतिहासाचे जाणकार होते.

  • वसुंधरा डांगे (पेशवे पार्कातली फुलराणी)

    पेशवे उद्यानातल्या फुलराणीचे उद्घाटन ८ एप्रिल १९५६ ला पुण्यातील पूर्व प्राथमिक शाळेतील तेव्हाची विद्यार्थिनी वसुंधरा डांगे हिच्या हस्ते झाले. (पुढे त्या वाचकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांच्या पत्नी झाल्या.) इंजिन आणि दोन डबे अशी ‘फुलराणी’ची रचना होती. या रेल्वेसाठी दोन फलाट, तिकीट विक्रीची खिडकी, तिकीट तपासनीस, सिग्नल अशी सारी व्यवस्था उभारण्यात आली होती. लहानग्यांच्या करमणुकीसाठी उद्यानात चालविल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये पुण्यातली ‘फुलराणी’ देशातली सर्वात जुनी रेल्वे आहे, हे विशेष.

  • शंकरशेठ जगन्नाथ (नाना शंकरशेठ)

    मुंबई शहराच्या विकासाचा पाया रचणार्‍या त्याचबरोबर मुंबई शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थापनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार्‍या जगन्नाथ नाना शंकरशेठ यांना आधुनिक मुंबईचा शिल्पकार मानण्यात आले आहे.

  • मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर

    ऐश्वर्या नारकर या माहेरच्या पल्लवी आठल्ये. त्यांचे पहिलं व्यावसायिक नाटक होतं ‘गंध निशिगंधाचा’! त्यात प्रभाकर पणशीकर, रेखाताई कामत, अविनाश नारकर, शरद पोंक्षे,अशी तगडी स्टारकास्ट होती. मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा जन्म ८ डिसेंबर १९७० रोजी नाशिक येथे झाला. त्या नाटकाच्या दरम्यानच अविनाश नारकर यांच्या बरोबर प्रेम जमले. यानंतर त्यांनी विवाह केला.

    तंबाखू विक्रीची नारकर कुटुंबाची लोअर परळ आणि डिलाइल स्ट्रीटवर दोन दुकानं होती. ३५० चौ. फुटांच्या जागेत, तेरा-चौदा जण राहत होते. अवीनाश नारकर घरातील सर्वात लहान. त्या वेळी अविनाश नारकर नाटक, चित्रपट, मालिका व डिबग करायचे. अनेक इंग्रजी मालिकांना त्यांनी हिंदी, मराठी आवाज दिलाय. ‘अल्लाद्दीन’ मालिकेतला इयागोचा आवाज अवीनाश नारकर यांचा आहे. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या दोघांकडे मराठी सिनेसृष्टीतील अगदी सोज्वळ कपल म्हणून पाहिलं जातं. अनेक सिनेमा आणि नाटकांमध्ये हे दोघ आहेत. तसेच मालिकांमध्येही यांनी काम केली आहे. या सुखांनो या ही त्यांची गाजलेली मराठी मालिका आहे. याशिवाय 'बेटियाँ' या हिंदी मालिकेतही त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली होती.

    'सून लाडकी या घरची' या सिनेमाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून 'चॅम्पिअन्स' या सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमाचे विशेष कौतुक झाले. ऐश्वर्या नारकर हा जाहिरातींमधीलही प्रसिद्ध चेहरा आहे. ऐश्वर्या नारकर यांनी माझे मन तुझे झाले या मालिका, गंध निशिगंधाचा, तुमच्या आमच्या घरात, आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे ही नाटकं, तर बाबांची शाळा, सून लाडकी सासरची, समांतर, चॅम्पियन्स, यलो असे चित्रपट केले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • सुप्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर

    त्यानंतर त्यांनी कारदार फिल्म्स मध्ये एक चित्रपट साईन केला . त्या चित्रपटाचे नांव होते ‘ जीवन ज्योती ‘ आणि माझी सहकलाकार होती चांद उस्मानी . त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते महेश कौल . त्यानंतर फिल्मिस्तानच्या नासिर हुसेन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ तुमसा नही देखा ‘ मध्ये काम केले. हा चित्रपट १९५७ साली आला. त्याच्याबरोबर त्या चित्रपटात नायिका होती अमिता. १९५९ साली आलेल्या ‘ दिल देके देखो ‘ या चित्रपटात त्यांची नायिका होती आशा पारेख. ह्या चित्रपटापासून त्यांची स्टायलिश प्ले-बॉय आणि प्रेमी हृदयाचा म्ह्णून इमेज निर्माण झाली.

  • रवि शंकर

    सतारवादनातील श्रेष्ठतम वादक रवि शंकर यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी झाला. रवि शंकर यांचे वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमाङ्गिनी यांनी त्यांचे पालन पोषण केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले.

    १९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खान यांच्याशी परिचीत झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडिल शिक्षण १९४४ पर्यंत चालले. १९३९ साली अमदावाद शहरात प्रथम खुली मैफल केली.

    १९४५ सालापासूनच रविशंकराच्या साङ्गीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी बॅलेसाठी संगीत रचना व चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट धरत्री के लाल व नीचा नगर या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. इक्बाल यांच्या सारे जहासे अच्छा या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले. १९४९ साली रवि शंकर दिल्लीच्या ऑल इन्डिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रूजू झाले. याच काळात त्यांनी वाद्य वृन्द चेम्बर ऑर्केस्ट्रा स्थापन केला. १९५० ते १९५५ सालात रवि शंकर यांनी सत्यजित राय यांच्या अपु त्रयी - (पथेर पांचाली, अपराजित व अपुर संसार) या चित्रपटांना संगीत दिले.

    यानंतर त्यांनी चापाकोय़ा , चार्ली व सुप्रसिद्ध गांधी चित्रपटांस संगीत दिले. १९६२ साली पन्डित रवि शंकर यांनी किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, मुंबई व १९६७ साली किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, लॉस ऍन्जलेस स्थापन केली. रवि शंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. सतारवादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. सतारवादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत.

    १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकार जॉर्ज हॅरि यांच्या सोबत जॅझ, अभिजात पाश्चात्य संगीत व लोकसङ्गीत अशा विविध प्रवाहांवर काम केले. १९५४ साली सोव्हिएत युनियनमधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर १९५६ साली त्यांनी युरोप अमेरिकेत नेक कार्यक्रम केले. यात एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे. १९६५ साली बीटलसच्या जॉर्ज हॅरि यांनी सतार शिकण्यास सुरूवात केली.

    या काळात त्यांचे हॅरि यांच्याशी प्रस्थाप्त झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढवण्यास मदतभूत ठरले. जॉर्ज हॅरि हे रवी शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. मा.रवि शंकर यांचे ११ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख

    कवी प्राजक्त यांची ग्रेवयार्ड लिटरेचर, मीरा, लालनाक्या ही ईपुस्तके प्रकाशित झाली आहे. शिवाय आता त्यांचा “we चार” ह्या काव्यवाचनाचे प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यांच्या काव्याला तरूण रसिकांचा उदंड प्रतिसाद आहे.
    देवबाभळी या पुस्तकाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्राजक्त देशमुख हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेलं संगीत देवबाभळी हे नाटकही प्रसिद्ध झालं आणि लोकप्रिय ठरलं.