जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
भालचंद्र नेमाडे यांचे उच्च शिक्षण, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून, व डेक्कन कॉलेजातून झाले. नंतर त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले. नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे. त्यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी सांगवी, खानदेश येथे झाला. १९७४ पासून औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात व शेवटी ते मुबई विद्यापीठात तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासाठी स्थापन झालेल्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले. नेमाडे हे गोवा विद्यापीठातही इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख होते.
'कोसला' हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५ व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते... ' भालचंद्र वनाजी नेमाडे यांच्या कोसला' या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता. कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार (१९६७), जरीला (१९७७) व झूल(१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबर्यार लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली. कादंबर्यां्शिवाय त्यांचे 'देखणी' आणि 'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत. टीकास्वयंवर या टीकाशास्त्रावरच्या पुस्तकासाठी नेमाडे यांना १९९० साली साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच २०१३ साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कारही त्यांना देण्यात आला. नेमाडेंनी कादंबरी, कविता व समीक्षा ग्रंथांची निर्मिती या सर्व क्षेत्रांत साहित्यिक कामगिरी केली.
रंजनवादी मूल्यांना कडाडून विरोध करतानाच परंपरेविषयी चिकित्सक असण्याकडे त्यांचा कल आहे. मराठीवरील इंग्रजी साहित्याचा प्रभाव, शैलीशास्त्रीय दृष्टीने अभ्यास ही वैशिष्ट्ये असणार्याल नेमाडेंनी इंग्रजीतूनही साहित्यनिर्मिती केली. "साहित्याची भाषा‘ हे त्यांचे भाषाविज्ञानविषयक तात्त्विक स्वरूपाचे पुस्तक वाचकांना वेगळी दृष्टी देते.
नेमाडेंनी आपल्या साहित्यात बोलीभाषेला अधिकाधिक वाव दिला. कोकणी, गोंयची, हिंदीमिश्रित उर्दू आणि वैदर्भीय या बोलींमध्ये त्यांनी कविता लिहिल्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ विकिपीडिया.
‘कथालक्ष्मी’ नावाचे मासिकही ते चालवत असत. त्या मासिकाचे तब्बल वीस वर्षे त्यांनी संपादन केले. या मासिकाच्या निमित्ताने त्यांनी मराठी कथाविश्वाला अनेक नव्या लेखकांचा परिचय करून दिला. त्या मासिकासाठी त्यांनी भालबा केळकर, केशवराव भोळे यांनाही लिहिते केले.वाटवे हे मुलाखतकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी घेतलेल्या शरद तळवलकर, प्रभाकर पणशीकर, राजा गोसावी, विवेक, लालन सारंग यांच्या मुलाखती विशेष गाजल्या. त्यांची अनेकांशी मैत्री होती. चित्रपट क्षेत्राबाबतच्या गप्पांमध्ये ते रंग भरत, जुने किस्से सांगत.
भारतीय गरीब शेतकऱ्याच्या शेतात गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला. भारतासारख्या कृषिप्रधान देशात कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांनी ‘एम.एस.स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन’ ची स्थापना केली होती.
असे म्हणतात देवयानी चौबळ या अत्यंत फटकळ सिनेपत्रकार होत्या. तिच्या जिभेच्या तडाख्यात भलेभले सापडले होते. त्या बॉलीवूड मध्ये देवी या नावाने प्रसिद्ध होत्या. खरे तर त्यांना फिल्मस्टार व्हायचं होतं. घरात सगळे पोलीसखात्यात नोकरीला. त्यांचे वडील सुप्रसिध्द वकील होते. त्यांना हिरोईन म्हणून सगळीकडे मिरवायचं होतं. दिसायलाही त्या देखणी होती. छोट्या मोठ्या सिनेमात सहज काम मिळाले असते.
त्यांची अनेक देवतांच्या गाण्यांची कॅसेटसू प्रसिद्ध झाली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत गंगू बाजारला जाते,औदा लगीन करायचं, बोला दाजीबा, सख्या सजना, बायको आली बदलून, अन्याय, प्रतिकार, सुळावरची पोळी, सोंगाड्या इत्यादी चित्रपटात गाणी लिहिली.
क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटचे भारतामधील करोडो चाहते वेगवेगळ्या मार्गांनी आपलं क्रिकेटप्रेम व्यक्त करीत असतात. काही जण खेळाडुंची व या खेळातील ऐतिहासिक क्षणांची कातरणे आपल्या संग्रही जतन करून ठेवतात तर काही जण अगदी सुरूवातीपासून होत असलेल्या मॅचेसची इत्यंभुत माहिती साठवून ठेवतात.
आपल्या मलमली आवाजाने गझलप्रेमींना वेड लावणारे जगप्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांनी गझल गायकीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.आज देशातील गझल गायनातील ते एक प्रमुख गायक मानले जात.त्यांनी गझल गायनाला एक वेगळी शैली आणि आयाम प्राप्त करून दिले होती.१९८६ मध्ये आलेल्या ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आई है..’ या गाण्याने पंकज उदास घराघरांत पोहोचले.
ज्ञान प्रबोधिनी, फिलिप्स कंपनी, नाटक, सिनेमा, विनोदी मालिका, लेखन असा सुप्रसिध्द लेखक शिवराज गोर्ले यांचा जीवनप्रवास.
अलीकडेच डॉ. रविन थत्ते यांचा प्लास्टिक सर्जन असोसिएशनने ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गोवा येथे सन्मान केला. डॉ. थत्ते हे एक अद्भूत रसायन आहे. काही माणसे सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन जन्माला आलेली असतात. अशा मंडळींमध्ये कामाची प्रचंड ऊर्जा असते. एखाद्या विषयात ते आयुष्यभर निस्वार्थ बुद्धीने व अथकपणे काम करत असतात.
वयाच्या ७२ व्या वर्षीही त्यांचा काम करण्याचा उत्साह कोणालाही थक्क करणारा आहे. प्लास्टिक सर्जन (सुघटन शल्य चिकित्सक) असलेल्या डॉ. थत्ते यांनी प्लास्टिक सर्जरीमध्ये मूलभूत संशोधन केले आहे, तसेच ज्ञानेश्वरीचाही प्रचंड अभ्यास केला आणि ज्ञानेश्वरीचे इंग्रजीत भाषांतरही केले. इंग्रजीत त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या तीन आवृत्त्या हातोहात खपल्या असून त्यातून मिळालेला पैसा हा त्यांनी सामाजिक कामासाठी दिला आहे. सध्या शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’चे मराठीत भाषांतर करण्याचे त्यांचे काम सुरू आहे. डॉ. थत्ते यांचा साराच प्रवास अद्भूत म्हणावा लागेल.
वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे भटकंती कायमचीच मागे लागली होती. परिणामी १६ शाळांमधून त्यांचे शिक्षण झाले. मराठी, गुजराथी आणि उर्दू शाळांमधून त्यांचे शिक्षण घेतले असून डॉक्टर बनण्याची ओढ प्रथमपासूनच होती. मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयात तब्बल ४५ वर्षे ते प्लास्टिक सर्जरी विभागात काम करत होते. विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी शस्त्रक्रिया व प्लास्टिक सर्जरीमधील संशोधन चालूच ठेवले आहे.
एडिंबराच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जरी’ने त्यांची संशोधन चिकित्सक वृत्ती तसेच प्लास्टिक सर्जरीतील नवा दृष्टिकोन लक्षात घेऊन त्यांना एफआरसीएस पदवी दिली होती. अमेरिकेतील फुलब्राइट स्कॉलरशीप मिळवणारे ते पहिले भारतीय डॉक्टर आहेत. ब्रिटिश असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जनच्या नियतकालिकाच्या पहिल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक शोधनिबंध लिहिल्याबद्दल त्यांना असोसिएशनचे मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले.
प्लास्टिक सर्जरीतील उल्लेखनीय संशोधनासाठी प्रसिद्ध होणाऱ्या सूचीमध्ये सलग पाच वर्षे डॉ. रविन थत्ते यांचे नाव प्रसिद्ध होत होते यावरून या क्षेत्रातील त्यांच्या संशोधनाची कल्पना करता येईल. त्यांच्या संशोधनाची दखल आज जगभारातील विद्यापीठांकडून घेण्यात येत असून हार्वड विद्यापीठासह जगातील आठ नामांकित विद्यापीठांमध्ये मूलभूत संशोधन या विषयावर व्याख्याता म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात येते.
भारतासह विकसनशील राष्ट्रांसाठी उपयुक्त शस्त्रक्रिया पद्धती शोधल्याबद्दल त्यांना ‘मलेशियन प्लास्टिक सर्जरी असोसिएशन’नेही मानद सभासदत्व देऊ केले आहे. ४५ वर्षांत त्यांनी अनेक नामाकिंत प्लास्टिक सर्जन घडवले एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील जन्मजात व्यंग असलेल्या मुलांसाठी डेरवण येथे तब्बल एक तप काम केले. ‘टिळक रुग्णालय स्वच्छता न्यासा’ची स्थापना करून पालिकेच्या शीव रुग्णालयात स्वच्छता प्रकल्प राबविला.
दुर्देवाने प्रशासनातील उच्चपदस्थ तसेच कामगार संघटनांच्या विरोधामुळे हा प्रकल्प बंद पडला. मात्र रुग्णालय स्वच्छतेचा ध्यास असलेल्या डॉ. थत्ते यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीतून तसेच स्वत:च्या पदराला खार लावून तब्बल ३० लाख रुपये जमा केले. यातून त्यांनी काही वर्षे रुग्णालय स्वच्छ ठेवले होते. अनेकदा स्वत: रुग्णालयातील गटारात उतरून त्यांनी सफाई केली आहे. ते राहात असलेल्या माहीम येथील समुद्र किनारा स्वच्छ राहावा, यासाठी पालिकेशी त्यांना अनेकदा दोन हात करावे लागले आहेत. सध्या प्लास्टिक सर्जरीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहिण्याचे काम सुरू असून जाणीव, मी हिंदू झालो, विज्ञानेश्वरी, माणूस नावाचे जगणे असे सहा ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.
अखंड उत्साहाचा धबधबा असलेल्या डॉ. रविन थत्ते यांनी माणूस म्हणून जगणे म्हणजे काय याचा एक आदर्शच घालून दिला आहे.
हिमालयातील या सर्वोच्च शिखराला नेपाळी भाषेत सागरमाथा म्हणजे आकाशदेवता म्हटले जाते; तर तिबेटीमध्ये या शिखराला चोमुलुंग्मा म्हणजे विश्वदेवता म्हटले जाते. हिमालयाची भव्यता, तेथील गूढगंभीर आणि अंतर्मुख करणारे वातावरण, निसर्गाची हरक्षणाला पालटणारी रूपे आणि नजर बांधून ठेवणारे दिव्य सौंदर्य लक्षात घेतले तर ही नावे किती अर्थपूर्ण आहेत, हे ध्यानात येते. अशा या शिखरावर पाऊल ठेवावे ही तमाम गिर्यारोहकांची आकांक्षा असते. त्याची पूर्ती होणे अवघड आहे, हे माहीत असूनही असे स्वप्न पाहणारे अनेक असतात.
Copyright © 2025 | Marathisrushti