(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संगीतकार शंकरराव व्यास

    कोल्हापूरला पुरोहित कुटुंबात जन्मलेल्या शंकरराव व्यास यांच्या वडीलांना संगीताची आवड होती. त्यांचा जन्म २३ जानेवारी १८९८ रोजी झाला. शंकरराव व्यास यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. नंतर आपले काका श्रीकृष्ण सरस्वती यांच्या कडे शिक्षणासाठी गेले. त्याच काळात पण्डित विष्णु दिगम्बर पलुसकर हे संगीत प्रचारासाठी भारतभर फिरत होते. शंकरराव व्यास यांची संगीताची आवड बघून पलुसकर यांनी त्यांना आपल्या बरोबर घेतले. पलुसकर यांनी स्थापन केलेल्या गंधर्व विद्यालयात ९ वर्ष शिक्षण घेतले. नंतर ते अहमदाबाद येथील राष्ट्रीय विद्यालय येथे शिक्षक झाले. पलुसकर यांनी लाहोर येथे स्थापन केलेल्या गंधर्व विद्यालयात प्राचार्य म्हणून गेले. १९३८ मध्ये शंकरराव व्यास हिन्दी फिल्म संगीतच्या क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली. १९३८ मध्ये आलेल्या ‘पूर्णिमा’ या चित्रपटात काही गाणी गायली. गायना बरोबर चित्रपटातील रचना त्याच्या गाजू लागल्या होत्या. व्यास यांच्या संगीतबद्ध, भक्ति प्रधान गाणी लोकांना आवडू लागली होती १९४० मध्ये ‘सरदार’, ‘नरसी भगत’ व १९४२ मध्ये ‘भरतमिलाप’ या चित्रपटातील गाणी खूप गाजली. १९४३ मध्ये ‘रामराज्य’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

    रामराज्य’चे दिग्दर्शक विजय भट्ट महात्मा गांधींना ‘रामराज्य’ दाखवायला घेऊन आले होते, पण राम रामासारखा दिसत नाही आणि सीता ही सीतेसारखी वाटत नाही म्हणत एक-दोन रिळे पाहून गांधीजी निघून गेले. महात्मा गांधींनी आयुष्यात पाहिलेला हा एकमेव चित्रपट म्हणून ‘रामराज्य’ची खूप पब्लिसिटी झाली. सीतेच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या धोबिणीची भूमिका पाश्र्वगायिका अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकीने केली होती. लव यशवंत निकम तर कुश मधुसूदन होते. प्रभातच्या ‘संत ज्ञानेश्वर’मध्ये याच यशवंताने बाल ज्ञानेश्वराची भूमिका केली होती. मन्ना डे यांनी हिंदी व मराठी या दोन्ही चित्रपटांत पाश्र्वगायन केले होते. हा चित्रपट गाजला तो शंकरराव व्यास यांच्या सुमधुर संगीतामुळे! विशेषत: रंजनावर चित्रित झालेल्या व सरस्वती राणे यांनी गायिलेल्या भीमपलासी रागातील ‘बीना मधुर मधुर कछु बोल’ या गाण्यामुळे! असा भीमपलासी गेल्या सत्तर वर्षांत परत कधी ऐकायला मिळाला नाही. त्यांना विजय भट यांच्या ‘रामराज्य’ या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. खरे तर हे गाणे के. सी. डे यांनी म्हणावे अशी संगीत दिग्दर्शक शंकरराव व्यास यांची इच्छा होती. पण के. सी. यांनी मन्नादांचे नाव सुचविले.

    मन्नादांचा आवाज व्यास यांना आवडला. या चित्रपटाचे संगीतकार होते शंकरराव व्यास. या चित्रपटातील राग वर आधारित गाणी खूप लोकप्रिय झाली होती, ‘भारत की एक सन्नारी की हम कथा सुनाते हैं...’ ‘वीणा मधुर मधुर कछु बोल...’। शंकरराव व्यास यांनी ही दोन्ही गाणी राग काफी व भीमपलासी मध्ये रचली होती. व्यास यांची कुशलता केवळ फिल्म संगीत मध्ये नव्हती तर त्यांनी शास्त्रीय गायन, संगीत शिक्षण और ग्रन्थकार म्हणून काम केले. फिल्म के साथ कई उल्लेखनीय तथ्य जुड़े हुए हैं, जिनमें शंकरराव व्यास यांनी पार्श्वगायक मन्ना डे यांच्या कडून ‘रामराज्य’ चित्रपटातील गाणी गावून घेतली होती. शंकरराव व्यास यांचे १७ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मराठी साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

    ‘मराठी विनोदपीठाचे आद्य कुलगुरू’ अशी सार्थ पदवी प्र. के. अत्रे यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना दिली ते मराठीतील श्रेष्ठ विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

  • चिंतामणराव कोल्हटकर

    चिंतामणराव कोल्हटकर यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि वक्ते होते. त्यांचा जन्म १२ मार्च १८९१ रोजी नेवरे रत्नागिरी येथे झाला.चिंतामण कोल्हटकरांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणी अभ्यासात अधिक गती नसल्याचे पाहून काही वर्षे त्यांनी पिढीजात असलेली शेती केली. सातारा येथे ‘तुकाराम’ या नाटकात त्यांनी ‘मंबाजी’ची भूमिका साकारून (१९०७) रंगभूमीवर प्रवेश केला. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर याचं बोट धरून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत आले आणि १९१८ मध्ये दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्या समवेत स्थापन केलेल्या ‘बळवंत संगीत नाटक मंडळी’पर्यंतचा साराच इतिहास मोठा संघर्षमय, रोमांचकारी आणि अद्‌भुत असाच आहे. कोल्हटकर १९११ मध्ये महाराष्ट्र नाटक मंडळीत दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते भरत नाटक मंडळीत गेले. १९१४ साली ते किर्लोस्कर नाटक मंडळीत आले. तेथे त्यांना प्रसिद्धी मिळाली. १९१८ मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत त्यांनी बलवंत नाटक कंपनी काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक प्रकारची कामे केली.

    कोल्हटकरांनी भूमिका केलेली पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन, इ. नाटके खूप गाजली. वेड्यांचा बाजार हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक त्यांनी पूर्ण केले. राम गणेश गडकरी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे, वीर वामनराव जोशी, अशा अनेक नामवंत नाटककारांकडून त्यांनी नाटके लिहून घेतली आणि मोठ्या दिमाखात रंगभूमीवर आणली. चिंतामणराव कोल्हटकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी आपल्या बळवंत संगीत मंडळीतर्फे उत्तमोत्तम नाट्यकृती सादर केल्या आणि गद्य आणि पद्य यांचा अपूर्व साक्षात्कार रंगभूमीवर घडवला. १९३३ च्या सुमारास मराठी संगीत रंगभूमीला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला. तेव्हा चिंतामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली. मा.चिंतामणराव कोल्हटकरांनी बळवंत संगीत मंडळीचे बळवंत पिक्च र्समध्ये रूपांतर केले. पण त्यांना या व्यवसायात प्रचंड खोट बसली. कोर्टकचेर्यास, नामुष्की आणि पदरी आलेलं प्रचंड अपयश पाहून आणि आपल्याच कंपनीत नोकर म्हणून काम करावे लागण्यासारखी मानहानी झाल्याने ते चित्रपट व्यवसायातून बाहेर पडले आणि परत नाटकाकडे वळले. चिंतामणरावांनी पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये गेले.

    अखेरीस त्यांनी ललित कला कुंज नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच पु.ल. देशपांडे यांना उदयास आणले. कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंनी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला बहुरूपी हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या माझे नाटककार या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक १९६६ मध्ये मुंबईच्या आंतरनाट्य या संस्थेने रंगमंचावर आणले होते. जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला. त्यांचा मुलगा मा.चित्तरंजन कोल्हटकर हे सुद्धा नाट्यअभिनेते होते. चिंतामणराव यांच्या नात आणि मा.चित्तरंजन कोल्हटकर यांची ज्येष्ठ कन्या, मा.विनीता करमरकर यांनी मा.चिंतामण कोल्हटकर यांचे बलवंत चिंतामणी या नावाने चरित्र लिहिले आहे. मा.विश्राम बेडेकर, मा.पु.ल. देशपांडे, मा.चंद्रकांत गोखले, मा.वसंत शिंदे, मा. शांता जोग हे सर्व मा.चिंतामण कोल्हटकर यांचे नाट्यक्षेत्रातले शिष्य म्हणून पुढे नावारूपाला आले. मा.चिंतामणराव कोल्हटकर १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५ व्या, आणि १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते. त्यांच्या या रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला होता. चिंतामणराव कोल्हटकर यांचे २३ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    चिंतामणराव कोल्हटकर यांनी कामे केलेली नाटके
    आंधळ्यांची शाळा, आशीर्वाद, एकच प्याला, कमला, काकाची शशी, कांचनगडची मोहना, जग काय म्हणेल, झुंझारराव, तानसेन, तुकाराम, तोतयाचे बंड, त्राटिका, द्रौपदी, नेकजात मराठा, पाणिग्रहण, पुण्यप्रभाव, प्रेमध्वज, बेबंदशाही, ब्रह्मकुमारी, भाऊबंदकी, भाग्यवान, भावबंधन, माते तुला काय हवंय?,
    मानाजीराव, मानापमान, रणदुंदुभी, राजमुकुट, राजसंन्यास, विद्याहरण, वैजयंती, शिवसंभव, संन्यस्त खड्ग, संशयकल्लोळ, सोन्याचा कळस, स्वयंसेवक, हॅम्लेट, हाच मुलाचा बाप, हिरवा चुडा.

  • थोरले माधवराव पेशवे

    पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला.

  • नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले

    अनंत दामले यांनी सत्तेचे गुलाम, कृष्णार्जुन युद्ध, संगीत सौभद्र, संगीत शारदा संगीत संशयकल्लोळ संगीत पंढरपूर रीती अशी प्रीतीची, संगीत मृच्छकटिक, सुवर्णतुला, शारदा अशा अनेक नाटकात कामे केली.

  • संदीप कराजनगी

    बोस्टोन येथील हार्वर्ड मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये सर्जरी विभागात इन्स्ट्रक्टर म्हणून काम करणार्‍या संदीप कराजनगीने पोस्ट डॉक्टरेट अभ्यासादरम्यान एमआयटीमधील तज्ज्ञांसोबत व्होकल कॉर्डच्या आजारांवर उपयुक्त अशा जेलची निमिर्ती केली आहे. आवाजाच्या आजारांवर मात करून आवाजाला पुर्नजन्म देण्यासाठी तो झटत आहे.

    जिद्द, सचोटी आणि महत्त्वाकांक्षा ज्याच्याकडे असेल, त्याला यश हमखास मिळणारच. याच त्रिसूत्रीचा वापर करून डोंबिवलीच्या संदीप कराजनगी या तरुणाने आज जगातील तमाम वैद्यक क्षेत्राचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. गायक, शिक्षक अशा गाण्याच्या किंवा बोलण्याच्या व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना अनेकदा व्होकल कॉर्डचा आजार उद्भवतो. या आजारावर तोडगा काढण्यासाठी २०व्या शतकाच्या अखेरच्या दशकात अमेरिकेत संशोधनाला सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे १५वर्षांनी अमेरिकेतील मॅसेस्टस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एमआयटीमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक रॉबर्ट लँगर यांच्या लॅबमध्ये एका टीमने या संशोधनाला मूर्त स्वरूप देऊन व्होकल कॉर्डसारखं काम करणारं जेल तयार केलं आहे. या टीममध्ये संदीपची भूमिका महत्त्वाची ठरली.

    संदीप लहानपणापासूनच हुशार. डोंबिवलीतील ग्रीन्स इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी असलेला संदीप दहावीत ९१.२८ टक्के गूण मिळवून शाळेतून पहिला आला होता. इंजिनीअरिंग करायचं हे ठरलेलं असल्यामुळे त्याने रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. अभ्यासातील कामगिरी कायम ठेवत संदीपने बारावीत ९८ टक्के मिळवले. केमिकल इंजिनीअरिंग करायचं असल्यामुळे अर्थात पहिलं प्राधान्य त्याने युडीसीटीला दिलं होतं. मात्र तेथे प्रवेश मिळू शकला नाही म्हणून त्यानं विलेपार्ले येथील डी.जे. संघवी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. विद्यापीठ पातळीवरही आपली अव्वल क्रमवारी कायम ठेवत संदीपने इंजिनीअरिंग पूर्ण केलं. हे करत असतानाच त्यानं जीआरई, टोफेल यासारख्या परीक्षा दिल्या. या परीक्षांमधील चांगल्या गुणांमुळे त्याला सुमारे आठ ते दहा परदेशी विद्यापीठांनी पूर्ण स्कॉलरशिप देऊ केली. यातील न्यूयॉर्कमधील ट्रॉय येथे असलेल्या 'रेन्सलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट'मध्ये त्याने प्रवेश घेतला. या सर्वात विशेष नमूद करायची बाब म्हणजे संदीपने कोणतंही शिक्षण घेण्यासाठी कधी कोचिंग क्लासेसची मदत घेतली नाही. शाळेतील अभ्यास आणि स्व-अभ्यास यावरच त्यानं यशाची शिखरं गाठण्यास सुरुवात केली. याचा त्याला भविष्यातही फायदा झाला.

    २००१मध्ये संदीप केमिकल आणि बायोलॉजिकल इंजिनीअरिंगच्या अॅडव्हान्स अभ्यासासाठी ट्रॉय येथील शैक्षणिक संस्थेत दाखल झाला. तेथे घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेतही तो पहिला आला. यामुळे त्याच्या आवडीचा विषय निवडण्याची संधी त्याला मिळाली. पाच विषयांतून नॅनोटेक्नॉलॉजी हा विषय त्याने निवडला. २००६मध्ये त्याने रेन्सलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून आपली डॉक्टरेट पदवी मिळवली. हा अभ्यास करताना तो जैवशास्त्रातील नॅनोमटेरिअल्सची नवलाई शोधण्यात गुंतला होता. याबाबतीतील त्याची निरीक्षणं त्याने ११ संशोधन प्रबंधांच्या माध्यमातून विज्ञान जगतासमोर मांडली. यानंतर २००६मध्ये प्रतिष्ठीत अशा एमआयटीमधील प्राध्यापक रॉबर्ट लँगर यांच्या लॅबमध्ये त्याला पोस्ट डॉक्टरेटल संशोधनाचं काम करण्याची संधी मिळाली. एमआयटी आणि मॅसेस्टस जनरल हॉस्पिटल अर्थात एमजीएच या दोन प्रतिष्ठीत संस्थांचा मिळून बायोमटेरिअल आणि टिश्यू इंजिनीअरिंगचा हा अभ्यास होता. यामध्ये व्होकल कॉर्डमध्ये होणार्‍या आजारांवर उपाय म्हणून इंजेक्टेबल बायोमटेरिअल तयार करण्याचं त्याच्यासमोर आव्हान होतं. त्याच्यासोबत तेथील काही तज्ज्ञ डॉक्टरांची टीमही काम करत होती. हे आव्हान स्वीकारून संदीप कामाला लागला आणि त्याने त्यात यशही मिळवलं. संदीप आणि त्याच्या टीमला व्होकल कॉर्डच्या आजाराने त्रस्त असलेल्यांवर उपचार करण्यासाठी व्होकल कॉर्डसारखं काम करणारं काहीतरी कृत्रिम मटेरिअल तयार करायचं होतं. त्यासाठी त्यांनी पूवीर्ची सर्व गृहितकं मागे ठेवून ही समस्या केवळ एक यांत्रिक समस्या आहे, असं समजून त्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी आवाजाचा दर्जा सुधारण्यासाठी अथवा त्या आजारांवर मात करण्यासाठी उतींचा वापर करणं टाळण्याचा निर्णय घेतला. याला पर्याय काय असू शकेल यावर विचार करत असताना त्यांनी पॉलिथिलीन ग्याकोल अर्थात पीईजीची निवड केली. याचं मुख्य कारण म्हणजे पीईजी हे एफडीएने मान्यता दिलेल्या विविध औषधांमध्ये वापरण्यात येतं. यानंतर संशोधकांनी व्होकल कॉर्डच्या हालचालींसारखी पीईजीची हालचाल कशी करता येईल यावर भर देण्यास सुरुवात केली. यासाठी पीईजीच्या सूक्ष्म कणांचा त्यांनी अभ्यास करण्यास सुरुवात केली. आपली व्होकल कॉर्ड ही फुप्फुसातून येणार्‍या हवेमुळे व्हायब्रेट होत असते. अशाप्रकारेच पीईजीला व्हायब्रेट करण्याची गरज होती. यासाठी व्होकल कॉर्डच्या व्हायब्रेशनचं प्रमाण लक्षात घेणंही गरजेचं होतं. अखेर संशोधकांना एका ठिकाणी पीईजी आणि व्होकल कॉर्डचं व्हायब्रेशन समान जाणवलं. या स्थितीला त्यांनी पीईजी ३० असं नाव दिलं. नव्याने तयार झालेलं हे जेल प्राण्यांमध्ये इंजेक्ट करून चाचण्या यशस्वी करण्यात आल्या. आता मानवावर याची चाचणी करण्यात येणार असून हा प्रयोग यशस्वी झाला तर जगातील अनेक पेशंट्सना दिलासा मिळेल.

    या संदर्भातील रिसर्च पेपर्स प्रसिद्घ करून संदीपचं पोस्ट डॉक्टरेट पूर्ण झालं. त्याच्या या संशोधनाची दखल तेथील प्रसिद्घ वृत्त वाहिनी सीएनएनने घेऊन संदीपची खास मुलाखतही घेण्यात आली. संदीप सध्या हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये सर्जरी विभागात इंस्ट्रक्टर म्हणून काम करत आहे. तो अमेरिकन केमिकल सोसायटी आणि अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनीअर्सचा सभासदही आहे. त्याचं संशोधनाचं काम सुरू असून आवाजाचा हा किमयागार भविष्यात मायदेशी परतणार आहे, हे मात्र निश्चित!

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • मराठी अभिनेते यशवंत दत्त

    प्रत्येक नटाला मोह पडावा अशी भूमिका म्हणजे “नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकरांची..“ती वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतकी सहजगत्या साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तीरेखेला अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यानंतर यशवंत दत्त यांनी “गगनभेदी” नाटक केले.

  • संगीतकार व गायक शंकर महादेवन

    प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे. त्यांचा जन्म ३ मार्च १९६८ रोजी झाला.

    भारतीय चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन करणाऱ्या शंकर एहसान लॉय यातील ते एक सदस्य आहेत. त्यांचे ब्रेथलेस साँग तर पुन:पुन्हा ऐकावेसे वाटते. मन उधाण वाऱ्याचे हे ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील गाणे शंकर महादेवन यांच्या जादुई आवाजामुळे मनाला भिडते. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात सूर निरागस हो, घेई छंद मकरंद, मनमंदिरा ही एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली.

    केरळमधल्या तमिळ अय्यर कुटुंबात मुंबईत जन्मलेल्या महादेवन यांची मातृभाषा तमिळ असली तरी त्यांची कर्मभूमी बालपणापासूनच महाराष्ट्र राहिली. मराठी भाषेवर आणि मराठी मातीवर प्रचंड प्रेम असलेल्या महादेवन यांनी बालपणीच ख्यातनाम संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे आणि गायनाचे धडे घेतले. शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षणही घेतले. पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायिलेल्या "राम का गुनगान गाईयेगा' या देशभर गाजलेले गीत श्रीनिवास खळे यांनी एचएमव्हीसाठी संगीतबध्द केले. त्या वाद्यमेळ्यात वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी महादेवन यांनी सतारीची साथ केली होती. वीणा, सतार आणि अन्य वाद्यांच्या वादनाचे प्रशिक्षण, रियाज सुरू असताना, त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनियरिंगची बी. ई. पदवी मिळवल्यावर ओरॅकल व्हर्शन ६ या कंपनीत त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचीही नोकरी केली. ख्यातनाम सॉफ्टवेअर कंपन्यातही त्यांनी काही काळ नोकरी केली. संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह देशातील ख्यातनाम संगीतकारांच्याकडे त्यांनी तमिळ, तेलगु, कन्नड, मराठी, हिंदी चित्रपटांसाठी गीते गायिली आहेत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या आणि अजय-अतुल यांनी संगीतबध्द केलेल्या "मोरया मोरया' या लोकप्रिय गीताचे गायक शंकर महादेवनच आहेत.

    १९९५ पासून चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्या महादेवन यांनी गायिलेल्या कंडुकोदायन या तमिळ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हिंदी, तेलगु, कन्नड चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटामधून शंकर महादेवन अभिनय क्षेत्रात पण पदार्पण केला आहे. आतापर्यंत दोनशेच्यावर चित्रपटात गीत गायन करणाऱ्या शंकर महादेवन यांना केरळ, तमिळनाडू, आंध्र सरकारने अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. पाच राष्ट्रीय पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाबद्दल चार फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाले. त्यांचा आशा भोसले जीवन गौरव पुरस्कारानेही सन्मान केला आहे. शंकर महादेवन हे नवी मुंबई महानगर पालिकेचे स्वच्छता ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून अभियानात सहभागी झाले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • डॉ. सुहासिनी कोरटकर

    भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानगुरू, बंदिशकार आणि विचारवंत डॉ. सुहासिनी कोरटकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४४ रोजी झाला.

    डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण खरे म्हणजे अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय घेऊन झाले. मात्र पुढे त्यांनी पीएच.डी. केली ती मात्र संगीत विषयात. लहानपणापासूनच त्यांना असेही संगीताचे धडे मिळाले होतेच. त्यांच्या आई सरलाताई यादेखील शास्त्रीय गायिका होत्या आणि सुहासिनीताईंच्या संगीत शिक्षणाबाबत अत्यंत काटेकोर आणि शिस्तप्रिय असत. पं. त्र्यंबकराव जानोरीकर, श्रीमती नैना देवी हे त्यांचे गुरू होत. भेंडीबाजार घराण्याच्या गायकीबाबतचे पहिले श्रेय त्या आपल्या वडिलांना देत असत. वडिलांनी जर योग्यवेळी आपला संगीत शिक्षक बदलला नसता तर कदाचित या घराण्याच्या सुंदर गायकीला आपण कायमचे मुकलो असतो, असे त्या म्हणत.

    बंदिशींचे सुरेख सादरीकरण, लयीत गुंफलेली सरगम आणि ताना हे सुहासिनीताईंच्या गायकीचे वैशिष्टय़ होते. शास्त्रीय संगीताशिवाय ठुमरी, दादरा, नाट्यसंगीत, अभंग आदी प्रकारदेखील त्यांनी हाताळले. दिल्ली आकाशवाणी केंद्राच्या ‘केंद्र संचालिका’ तसेच ‘कार्यक्रम संचालिका’ (संगीत) या पदांवरही त्यांनी काम केले. आकाशवाणीच्या अ. भा. गंधर्व महाविद्यालयाची ‘संगीताचार्य’ या सर्वोच्च पदवीने त्यांना गौरविण्यात आले होते. त्याशिवाय सूर-सिंगार संसद या संस्थेचा सुरमणी पुरस्कार, गानवर्धन, पुणेतर्फे स्वर-लय भूषण पुरस्कार, संगीत शिरोमणी पुरस्कार, संगीत मर्मज्ञ पुरस्कार अशा अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविले गेले होते. आपले गुरू पं. जानोरीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सुरू केला होता. ‘निगुनी’ या टोपणनावाने त्यांनी केलेली उत्तमोत्तम बंदिशींची रचना हे तर त्यांचे कार्य खरोखर अलौकिक होते आणि संगीत इतिहासात त्याची कायमची नोंद राहील. रसाळ निवेदनासह विषयाची प्रात्यक्षिकासह साकल्याने मांडणी हे त्यांच्या कार्यक्रमांचे वैशिष्टय़ होते.

    कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या हिंदूी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’, उपशास्त्रीय संगीताची ओळख करून देणारा ‘ठुमरी ते कजरी’, स्वरचित बंदिशींवर आधारित ‘शब्द-स्वरांचे लेणे’, विविध ऋतूंमधील रागांवर आणि गीतांवर आधारित ‘ऋतुरंग’, शास्त्रीय संगीताचे सौंदर्य उलगडणारा ‘ख्याल गायनाचा रसास्वाद’ ही काही उदाहरणे. मराठी, हिंदूी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झाले आहेत. डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे ७ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.

    डॉ. सुहासिनी कोरटकर यांची वेबसाईट
    http://www.suhasinikoratkar.com/#!/page_Home

    डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे गायन
    https://www.youtube.com/watch?v=AcgChcpfeEk
    https://www.youtube.com/watch?v=PGvytWN-eMs

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • श्रीनाथ शेषगिरी कलबाग