जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
लीलावती भागवत या माहेरच्या लीला पोतदार. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर, १९२० रोजी झाला.मराठी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या लीलावती भागवत यांनी काही काळ शिक्षिका म्हणून काम केले. आकाशवाणी मुंबई केंद्रामध्ये त्यांनी वनिता मंडळ हा कार्यक्रम यशस्वी केला. या वनिता मंडळामुळे अनेक प्रतिभावंत स्त्रियांचा समाजाला परिचय झाला. आहारशास्त्रावर बोलण्यासाठी लीलावती पुष्कळदा वसुमती धुरू यांना बोलवायच्या. त्यांतूनच वसुमती धुरू या पुढे मराठीतील पाकशास्त्राच्या नामवंत लेखिका म्हणून पुढे आल्या. लीला पोतदार यांचा विवाह भा.रा. भागवत यांच्याशी ९ मे १९४०रोजी झाला, आणि त्या लीलावती भागवत झाल्या. बालमित्र या मुलांसाठीच्या मासिकामध्ये त्यांनी त्यांच्या पतींसमवेत समवेत काम केले.
भा. रा. भागवत आणि लीलाताई या दोघांनी मिळून १९५१ मध्ये जेव्हा हे मासिक सुरू केले. त्यावेळी बँकेत त्यांच्या नावावर फक्त ३५० रुपये होते. वेळ आल्यास दागिने मोडू, परंतु मुलांसाठीचा हा उपक्रम चालू ठेवू, असा निर्धार लीलाताईंनी दाखविला. त्या काळात मुलांसाठी विशेष मासिके नव्हती. मुलांसाठी मासिके विकत घेण्याची पालकांची मनोवृत्तीही नव्हती. तरीही मुलांच्या वाचनाची भूक भागविण्यासाठी त्यांनी हे मासिक चालू ठेवले. नामवंत लेखकांचे लेखन व द.ग. गोडसे यांची चित्रे यांमुळे 'बालमित्र' खरोखरीच मुलांचा बालमित्र बनले. मात्र आर्थिक नुकसान वाढत गेल्याने नाईलाजाने ते मासिक बंद करावे लागले. मासिक बंद झाले तरी लीलावती आणि त्यांचे पती यांचे लेखन चालूच राहिले आणि बहराला येत गेले. पुढे भा.रा. भागवत यांच्या साहित्याचे संपादन लीलाताईंनी 'भाराभार गवत' या पुस्तकाद्वारे केले. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेच्या उभारणीत लीलावती भागवतांनी मोठा वाटा उचलला.
साहित्याबरोबरच संस्थात्मक कार्यातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. आपल्या वयाच्या नव्वदी नंतर सुद्धा त्या सक्रिय होत्या. त्या वयात त्यांचे 'मुलांसाठी दासबोध' हे पुस्तक प्रकाशित झाले. लीलावती भागवत यांचे २५ नोव्हेंबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
आशाताईंच्या गाण्याबद्दल आपण सगळेच जाणतो.
त्या उत्तम जेवण सुध्दा बनवतात. आशा भोसले यांनी दहा वर्षांपूर्वी “आशाज रेस्टॉरंट प्रा.लिमिटेड” या नावाने हॉटेल व्यवसायाची मुर्हूतमेढ रोवली व आशाज् हे खास भारतीय पदार्थांचे हे रेस्टॉरंट त्यांनी दुबईत सुरू केले.
त्यानंतर आबूधाबी, कतार,कुवेत, बहारीन, इजिप्त, ब्रिटन या देशांतही या कंपनीच्या शाखा काढण्यात आल्या.
विशेष म्हणजे आशाताईंनी स्वतःच्या खास रेसिपीज या हॉटेलांतून उपलब्ध करून दिल्या आहेत. जगभरात भारतीय पदार्थांची खासियत कळावी यासाठी आपण या उद्योगात उतरल्याचे त्या म्हणतात.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर डोळय़ांसमोर आली तर, या चळवळीत योगदान दिलेले शाहीर त्यांच्या कर्तृत्वाने डोळय़ांसमोर उभे राहतात. शाहीर गवाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भराडकर, जंगम स्वामी, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर कृष्णकांत जाधव अशा अनेक लोककलावंतांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागवली.
चिपळूणकर, (डॉ.) विष्णू गोविंद - 0013
१० जून १८६२
१८६२> शिकारकतांचे लेखक विष्णू गोविंद चिपळूणकर यांचा जन्म. “कृष्णसार (काळवीट) अथवा हरणाची शिकार”, “मृगया कुतूहल” (बडोदेनरेश सयाजीराव महाराज यांच्या वाघाच्या शिकारी विषयी), “बनवराहघात”, “हिंदुस्थानातील सर्प” अशी पुस्तके त्यांनी लिहिली. शिवचरित्रावर दोन व संभाजीराजांवर एक नाटकही अशी तीन नाटकेही त्यांनी लिहिली होती.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चिपळूणकर, (डॉ.) विष्णू गोविंद - 0460
३१ ऑक्टोबर १९१६
१९१६> डॉ. विष्णू गोविंद चिपळूणकर यांचे निधन. “शरीरशिक्षण”, या पुस्तकांसिवाय काही नाटकेही डॉ. चिपळूणकरांनी लिहिली होती.
क्रिकेट, शिकार, वाचन, सुग्रास भोजन या गोष्टी त्यांना मनापासून प्रिय होत्या. रसिकतेचे राजस जीवन जगत असतानाही त्यांनी आपल्या खाणीतील मजुरांकडे किंवा मंत्रालयातील फाइलींकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.
चित्रकला हे कार्यक्षेत्र असलेले श्री. कैलास अन्याल यांनी ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कुलमधून आपल्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. नंतर रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून चित्रकलेचे शिक्षण घेतले. जाहिरात क्षेत्रात ते १४ वर्षे कार्यरत होते. नंतर मुक्तपणे पूर्णवेळ चित्रनिर्मितीला त्यांनी सुरुवात केली.
कवी, कथाकार, नाटककार विठ्ठल कृष्ण नेरुरकर यांचा जन्म १४ डिसेंबर १८९२ रोजी झाला.
“मुलींची शाळा” ही एकांकिका, नागरिकता वाचनमाला पुस्तक १,२ तसेच साधना व नवा नमुना या कादंबर्या. प्रतिबिंबे फोटोचं लग्न नि इतर लघुकथासंग्रह, तसेच “मधली सुट्टी, माणूस अणि पशू, शिलाचे मोल” ही लहान मुलांसाठी पुस्तके त्यांनी लिहिली.
## Vitthal Krishna Nerurkar
गोविंदराव आदिक हे महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष होते
सध्याच्या् काळात आघाडीच्या आणि नामांकित अभिनेत्रींमध्ये समावेश होत असलेल्या काजोलचे कुटुंब चित्रपट उदयोगात अनेक वर्षांपासून आहे. तिचा जन्म ५ ऑगस्ट १९७४ रोजी मुंबईत झाला. आई तनूजा मराठी कुटुंबातली, वडील चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी बंगाली. मावशी नुतन सर्वाधिक पाच वेळा फिल्म फेअर पुरस्कातर पटकावलेली नामांकित अभिनेत्री.
पणजी रतन बाई आणि आजी शोभना समर्थ यांच्या वारशाखाली तयार झालेली काजोल. इतकेच नव्हेी तर काका जॉय मुखर्जी आणि देव मुखर्जी हे देखिल त्यांच्या काळातील गाजलेले कलावंत. शाळेत शिकत असतांना तिला पहिला ब्रेक मिळाला. काजोलचा पहिला चित्रपट ‘बेखुदी’ हा होता. काजोलने 'बेखुदी' या चित्रपटाच्या माध्यामातून जेव्हा बॉलीवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा तिच्या पदरी पडली साफ निराशा. काजोल दिसायला सर्वसामान्य् तरुणींसारखीच सामान्य. पण 'बाजीगर'मध्ये नवख्या शाहरुख सोबत आपल्याय अभिनयाची चुणूक दाखवत तिने बॉलीवूडमधले आपले स्थान पक्के केलेच. या जोडीने नंतर मग अनेक हीट चित्रपट दिले.
शाहरुखच्या यशामागे काजोल सोबत जमलेली केमिस्ट्री हा देखिल महत्वांचा विषय म्हणला पाहिजे. मात्र त्यानंतरच्या अनेक चित्रपटात तिने अनेक उल्लेखनीय भुमिका केल्या . त्याशत हळुवार प्रेमाची अनुभूती देणारी दिलेवाले... मधली सिमरन असो किंवा 'गुप्त' मधली आक्रमक खलनायिका अनेक चित्रपटात तिने अभिनयाची जादुगरी दाखविली. त्यानंतर तिने शाहरूख सोबत करण- अर्जुन,दिलवाले दुल्ह.निया ले जायेंगे, कुछ कुद होता है आणि कभी खुशी कभी गम यारखे अनेक हीट चित्रपट केले. त्यातील 'दिलवाले...'मध्ये आजही जोरदार गर्दी खेचण्याची क्षमता आहे. .या चित्रपटानेच तिला पहिल्यांदा उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कारही मिळवून दिला.
काजोल आणि अजय देवगन यांनी १९९९ मध्ये लग्न केले. दोघांची भेट 'हलचल' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हळू हळू दोघांची दोस्ती आणि प्रेम जुळले. त्यांचे लग्न पारंपरिक मराठी पद्धतीने झाले होते. बॉलीवूडमध्ये लग्न झालेल्या हिरोईनचे करीअर नंतर पूर्णतः संपल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र लग्नानंतरही काजोलने पती अजय सोबतही यशस्वी चित्रपट केले. त्यात कभी खुशी कभी गम या हीट चित्रपटाचाही समावेश आहे. काजोलच्या नावावर आतापर्यंत उत्कृष्ट अभिनेत्रीचे सर्वात जास्त फिल्मफेअर अवॉर्ड्स आहेत. या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट् अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार मिळाले. तर तिसरा फिल्म फेअर पुरस्कार ही पटकाविला.
आमीर खान सोबत तिने 'फना' हा तर पती अजय सोबत 'यु मी और हम' हा हीट चित्रपट दिला. तर शाहरुखच्या 'ओम शाती ओम'मध्ये आपल्या नृत्या चे जलवे दाखविले. तिने पतीसोबत चित्रपट निर्मिती व्यवसायातही पाउल टाकले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पंडित पुरुषोत्तम वालावलकर यांचा जन्म ११ जून रोजी झाला. बालगंधर्वांच्या नाटक मंडळींमध्ये बालपण व्यतीत केलेल्या वालावलकरांनी बालगंधर्वांपासून ते पंडित भीमसेन जोशी, पं.जितेंद्र अभिषेकी, पं. सी. आर. व्यास, शोभा गुर्टू अशा दिग्गज कलाकारांना संवादिनीची साथ केली होती.
Copyright © 2025 | Marathisrushti