जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आकाश दर्शनाचे संस्कार जर शालेय वयात झाले तर या कुतुहलाचे रुपांतर जिज्ञासात होऊ शकते. तसे झाले तर खगोल शास्त्राचा अभ्यास करण्याचा ध्यास त्या विद्यार्थांना शालेय वर्षातच लागतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सरस्वती सेकंडरी स्कूलचा माजी विद्यार्थी डॉ. गुरुराज वागळे.
वसंत शिंदे यांनी १९४६ पासून १९९६ पर्यंत ४० दिग्दर्शकांकडे कामे केली अगदी दादासाहेब फाळके यांच्यापासून संजय सुरकरपर्यंत जवळ जवळ सर्वच म्हणावे लागतील. त्यांना ‘ सांगत्ये ऐका ‘ या चित्रपटासाठी ‘ दादासाहेब फाळके गौरवचिन्ह ‘ मिळाले, तर नाटक आणि चित्रपट यांच्यामधील भूमिकांसाठी ‘ दिनकर कामण्णा सुवर्णपदक ‘ मिळाले , शांताबाई हुबळीकर पुरस्कार , बालगंधर्व पुरस्कार , चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
गेल्या काही वर्षांत मराठी साहित्यात मोलाची भर घालणार्या महत्त्वाच्या कादंबर्या ग्रामीण भागातून लिहिल्या गेल्या आहेत. 'बारोमास', 'रौंदाळा', 'निशाणी डावा अंगठा' ही त्यातली काही लख्ख उदाहरणे. याच परंपरेतील अलीकडची महत्त्वाची कादंबरी म्हणजे, आनंद विंगकर यांची 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट'. परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीने नाडल्या जाणा-या शेतक-यांचं सनातन दु:ख मांडणा-या या कादंबरीने आनंद विंगकर यांना चांगलाच नावलौकिक मिळवून दिला आहे.
या कादंबरीला आतापर्यंत आद्य कादंबरीकार बाबा पदमनजी आणि सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. तिला मानाचा 'केशवराव कोठावळे पुरस्कार'ही मिळालेला आहे. अर्थात पुरस्कारांपेक्षाही विंगकर यांनी या कादंबरीतून शेतक-यांच्या दु:खाला जी वाचा फोडली आहे, ती महत्त्वाची आहे आणि खुद्द लेखकालाही तसंच वाटतं. कारण त्याचा आजवरचा प्रवासही संघर्षाचाच आहे.
सातारा जिल्ह्यातील कराडजवळच्या विंग गावातील आनंद विंगकरांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. त्यांचं तिसरीपर्यंत शिक्षण मुंबईतच झालं. मात्र त्यानंतर आनंद विंगकर आईबरोबर गावाकडे परतले आणि गावच्या शाळेत जायला लागले. त्यानंतरचं त्यांचं वास्तव्य बहुतांशी ग्रामीण भागातच होतं. शिकून नोकरीला लागल्यावर काही काळ ते मुंबईत स्टेट बँकेत नोकरीला होते. परंतु १९८५च्या दरम्यान त्यांची कराडला बदली झाली. तिथे असतानाच एकदा त्यांची बदली खटाव-माण परिसरातील चितळी गावातल्या शाखेत झाली. तिथल्या वास्तव्यात आजूबाजूच्या परिसरातील जे भयानक वास्तव त्यांनी अनुभवलं, त्यातूनच 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' आकाराला आली. प्रकाशित झालेली ही त्यांची पहिली कादंबरी असली, तरी त्यापूर्वी त्यांनी 'दस्तावेज' नावाचीही कादंबरी लिहिली होती.
आणीबाणी ते जागतिकीकरण असा प्रदीर्घ काळ कवेत घेणा-या या कादंबरीचं ते सध्या पुनर्लेखन करीत आहेत. महत्त्वाचं म्हणजे विंगकरांची पहिली ओळख सामाजिक कार्यकर्ता आणि कवी म्हणूनच आहे. गेली अनेक वर्षं ते कवितालेखन करत आहेत. तसंच 'भारत ज्ञान-विज्ञान समुदाय' या पुण्यातील संस्थेच्या माध्यमातून ते साक्षरता व विज्ञानाच्या प्रसाराचंही काम करत आहेत. त्यांचा 'आत्मटीकेच्या उदास रात्री' हा कवितासंग्रह आणि 'सुंबरान मांडलं' ही दीर्घ कविता हा त्यांचा यापूर्वीचा प्रकाशित साहित्यिक ऐवज. त्यांचे डावे विचार व त्यातून आलेले व्यापक सामाजिक भान त्यांच्या शब्दाशब्दातून पसरलेले आहे. 'अवकाळी पावसाच्या' गोष्टीतले हेच भान वाचकांना अस्वस्थ करते.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
इक्बाल दरबार यांनी यूके, यूएई, सिंगापूर, मॉरिशस, मालदीव, फ्रान्स इत्यादी ठिकाणी नौशाद कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल ओ.पी नय्यर, आरडी बर्मन, श्रीकांत ठाकरे यांच्या सारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुतेक सर्व नामांकित संगीत दिग्दर्शकांच्या समवेत त्यांच्या मैफिलीच्या वेळी साथ दिली आहे. इक्बाल दरबार हे पुणे आकाशवाणी वरील ‘ए’ ग्रेड कलाकार आहेत. त्यांनी पुणे आकाशवाणी वरील मालिका, नाटक आणि चित्रपटांसाठी संगीत आणि शीर्षक ट्रॅक दिले आहेत.
जेव्हा जेव्हा शांताराम प्रॉडक्शनच्या चित्रपटांचा उल्लेख होईल किंवा प्रभातच्या उत्कृष्ट कलाकृतींचा विचार होईल तेव्हा नाजूक चेहर्याची, गोड गळ्याची, रुपसंपन्न नायिका म्हणून जयश्री शांताराम यांचं नाव कायमच स्मरणात राहिल.
दादा कोंडकेंच्या चित्रपटांनी आईची ही प्रतिमा बदलून रागात प्रेम व्यक्त करू पाहणारी, आपल्या मुलाच्या भल्यासाठी त्याला अस्सल गावरान शिव्या घालणारी आई रत्नमाला यांच्यारूपाने चित्रपटसृष्टीला दिली. आईच्या रूपातील रत्नमाला यांनी या आईच्या बदललेल्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला, म्हणूनच त्यांनी साकारलेली ही ‘आये’ चित्रपटसृष्टीत अजरामर झाली. किंबहुना रत्नमाला यांचे दादा कोंडकेंची ‘आये’ हेच नाव चित्रपटसृष्टीत रूढ झाले आणि आजतागायत ते तसेच आहे.
२० नोव्हेंबर २०१० रोजी नागपुरात सुरू झालेल्या भारत वि. न्यूझीलंड या कसोटी सामन्याचे समालोचन ऑल इंडिया रेडिओसाठी इंग्रजीतून सुरेश सरैया यांनी केले तेव्हा त्यांचे कसोटी समालोचनाचे शतक पूर्ण झाले. यापूर्वी त्यांनी दीडशेहून अधिक एदिसांचे (एकदिवसीय सामन्यांचे) समालोचन केलेले आहे, यात चार विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम सामन्यांचा समावेश आहे. ऑल इंडिया रेडिओसाठी त्यांनी समालोचन करण्यास प्रारंभ केला त्याला आता ४० वर्षे उलटून गेली आहेत.
भाऊ अशी ओळख असलेले मा.शशिकांत सुतार हे त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे शिवसेनेचे उपनेते म्हणून कायम चर्चेत राहिले आहेत. साधेपणा हे तर भाऊंचे आभूषण, पांढऱ्या पायजमा कुर्त्यात वावरणाऱ्या भाऊ हे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जुने सहकारी होत.
नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. प्रचंड गरिबीतूनही त्यांनी केलेला प्रवास, त्यासाठी उपसलेले कष्ट आणि त्यांना मिळालेले यश थक्क करणारे आहे.
खासदार कपिल पाटील यांचा विकासात्मक दृष्टिकोन ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी फायदेशीर ठरणार आहे. कपिल पाटील यांच्या व्हिजनमुळे ठाणे जिल्ह्यात अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. १२ पदरी ठाणे-भिवंडी बायपास, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग, एमएमआरडीएने ग्रामीण भागासाठी दिलेला निधी, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो आदी कार्य ही कपिल पाटील यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti