(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी

    १९९४ मध्ये इंद्रा नूई पेप्सिकोमध्ये सामील झाल्या त्यांना पेप्सिकोच्या दीर्घकालीन विकास धोरणाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते.

  • ज्येष्ठ निर्माता शेखर ताम्हाणे

    सविता दामोदर परांजपे’, ‘तू फक्त हो म्हण’, ‘नकळत सारे घडले’ या सारखी नाटके शेखर ताम्हाणे यांनी लिहिली. तसेच त्यांनी ‘कलकी’, ‘ट्रॅक’ यासारख्या गाजलेल्या मालिकाचे लेखन केले होते.त्यांची ‘आगंतुक’ कादंबरीचा पण गाजली होती.

  • पहिल्या आयपीएस महिला अधिकारी डॉ. किरण बेदी

    एक कठोर पोलिस अधिकारी अशी त्यांनी ख्याती होती. तिहार तुरुंगात अधिकारी असतानाही त्यांनी अनेक योजना यशस्वीपणे राबवून दाखविल्या. एक महिला पोलीस अधिकारी म्हणून संपूर्ण कारकिर्दीत प्रवाहाविरुद्ध पोहण्याची आणि कार्यकर्तृत्वासाठी नवी क्षेत्रे स्वीकारण्याची हिंमत किरण बेदींनी दाखवली आहे. किरण बेदी यांच्या पतीचे नाव ब्रीज बेदी

  • अभिनेत्री वैजयंती माला

    वैजयंतीमाला यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरवात तामिळ भाषेतील ” वड़कई ” या चित्रपटापासून केली.

  • अजरामर महाराष्ट्र गीताचे लेखक राजा बढे

    राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. शाहीर साबळे यांनी तर त्यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे अजरामर ‘ महाराष्ट्र गीत ‘ गायले.

  • केएफसी’चे साम्राज्य उभारणारे कर्नल सँडर्स

    १९६४ पर्यंत सँडर्स यांच्या ‘फ्राइड चिकन’ विक्रेत्यांच्या 600 फ्रँचायझीज होत्या. त्या वेळी त्यांनी आपली कंपनी ही 2 मिलियन डॉलर्सना विकली. जरी त्यांनी आपली कंपनी विकली तरी ते त्या कंपनीचे नेहमीच चेहरा राहिले.

  • मधुकर दरेकर

    भारतात काही विशिष्ट खेळांनाच पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता मिळते, अशी खंत आपण नेहमी व्यक्त करतो. त्यामुळेच मुख्य प्रवाहांबाहेरचे क्रीडाप्रकार समाजात रुजविण्यात ज्यांनी योगदान दिले. त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद ठरतात. महाराष्ट्राला पॉवरलिफ्टींग या क्रीडाप्रकाराची ओळख करुन देणारे मधुकर दरेकर यांनी नऊ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेच, पण हा खेळ राज्यभरात रुजविण्यात गेली ४५ वर्षे आपले जीवन वाहून घेतले.

    पॉवरलिफ्टिंगची शक्ती

  • भालचंद्र नीळकंठ पुरंदरे

    त्यांचे विशेष संशोधन म्हणजे गर्भाच्या खांद्याच्या (अॅ्ण्टिरियर शोल्डर) हालचालीवरून प्रसूतीच्या प्रगतीचा अंदाज घेणे. गर्भाशयाच्या स्खलनाची शस्त्रक्रिया त्यांनी सुधारली.

  • संगीतसमीक्षक,अभ्यासक व लेखक केशवराव भोळे

    मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती होती. त्यांचा जन्म २३ मे १८९६ रोजी अमरावती येथे झाला. केशवराव भोळे यांचे वडीलही संगीताचे शौकीन होते. ते स्वतः सतारही वाजवीत असत. केशवरावांचा जन्म होण्यापूर्वीच त्यांचे वडील वारले. तथापि घरातील संगीतमय वातावरणामुळे केशवरावांना लहानपणापासूनच नाटक-संगीतादी पाहण्या-ऐकण्याचा नाद लागला आणि तो वाढत जाऊन अखेरपर्यंत टिकला. वैद्यकीय अभ्यासासाठी ते मुंबईस आल्यावर ह्या नादाला खोली आणि चौरसपणा येऊन तो इतका वाढला की, त्यांनी वैद्यकीय अभ्यासावर पाणी सोडले. ह्याच सुमारास त्यांचा दुर्गा केळेकर (विवाहोत्तर ज्योत्स्ना भोळे) ह्यांच्याशी विवाह झाला. त्यांनीही कालांतराने संगीत-नाटकाच्या क्षेत्रांत चांगला नावलौकिक संपादन केला. जुलै १९३३ मध्ये ‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेच्या आंधळ्यांची शाळा ह्या श्री. वि. वर्तकलिखित प्रसिद्ध नाटकामध्ये त्यांनी केलेले पहिलेच बिंबाचे (नायिका) काम अतिशय गाजले. केशवरावांचाही ‘नाट्यमन्वंतरा’शी संबंध जडला. आंधळ्यांची शाळामध्ये ज्योत्स्नाबाईंनी गायलेल्या दोन गाण्यांची सुभग भावपूर्ण स्वररचना केशवरावांनीच केली होती. ह्या सर्वांमुळे केशवराव संगीताचे नवरचनाकार म्हणून प्रसिद्धीस आले.१९३३ साली गोविंदराव टेंबे ह्यांच्या नंतर केशवरावांनी ‘प्रभात’ ह्या सिनेमाकंपनीत संगीतदिग्दर्शक म्हणून प्रवेश केला. ‘प्रभात’ कालखंडात केशवरावांची स्वररचनाकाराची वृत्ती फुलून आली. हा बहर अमृतमंथन, संत तुकाराम, कुंकू, माझा मुलगा, संत ज्ञानेश्वर, संत सखू, चंद्रसेना इ. बोलपटांमधील गीतांच्या त्यांनी केलेल्या स्वररचनांमध्ये आणि संगीताच्या दिग्दर्शनामध्ये भरपूर दिसून येतो, त्यांखेरीज कित्येक सुट्या भावगीतांनाही त्यांनी चाली लाविल्या, हा प्रामुख्याने त्यांचा निर्मितिकाल मानता येईल. पुढे ते आकाशवाणी मुंबई केंद्राच्या संगीतविभागाचे प्रमुख झाले.

    ‘एकलव्य’ ह्या टोपणानावाने केशवराव भोळे ह्यांनी वसुंधरा ह्या साप्ताहिकात लिहिलेले अभिजात गायक-गायिकांविषयीचे अनेक लेख त्यांच्या रमणीय शैलीमुळे आणि माहितगारीमुळे विख्यात झाले. तेच लेख पुढे आजचे प्रसिद्ध गायक (१९३३) ह्या पुस्तकात संगृहीत करण्यात आले. ह्या पुस्तकाची सुधारून वाढविलेली आवृत्ती म्हणजे संगीताचे मानकरी (१९४९) होय. त्यांनी नंतर ‘शुद्धसारंग’ ह्याही टोपणनावाने लेख लिहिले. त्यांत त्याची चिकित्सावृत्ती, परखडपणा, बोचरेपणा इ. विशेष दिसून येतात. आवाजाची दुनिया, अस्ताई, वसंतकाकाची पत्रे, माझे संगीत, अंतरा आणि जे आठवते ते हे आठवणीवजा आत्मचरित्र सुद्धा लिहिले.
    केशवराव भोळे यांचे ९ नोव्हेंबर १९७७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • समीक्षक वा. ल. कुलकर्णी

    १९४० साली ‘ समीक्षक ‘ चे संपादक असलेल्या कुलकर्णी यांनी अभिरुची , सत्यकथा , छंद यासारख्या नियतकालिकातून सातत्याने समीक्षा-लेखन केले. त्यांचे समीक्षा लेखनाचे ऐकून आठ संग्रह आहेत. याशिवाय श्री. कृ . कोल्हटकर , ह . ना. आपटे , न.चि . केळकर यांच्या वाङ्मयासबंधी स्वतंत्र लेखन केले. त्यांच्या उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ म्ह्णून त्यांच्या वाङ्मयीन टिपा आणि टिप्पणी आणि श्रीपाद कृष्ण वाङ्मयदर्शन या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषेंके मिळाली आहेत.