(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • काव्यनायक गजानन वाटवे

    ‘वारा फोफावला’, ‘गगनी उगवला सायंतारा’ आणि ‘यमुनाकाठी ताजमहाल’ यांच्या लोकप्रियतेची कल्पना आज एकविसाव्या शतकात करता येणं अशक्य. गजानन वाटवे यांनी मराठीतील अनेक कवितांना सुंदर चाली लावून प्रथम भावगीताचा प्रकार लोकांपर्यंत नेला. आणि त्यांच्या या प्रयत्नाला लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिला की, पुढे बराच काळ वाटवे म्हणजे भावगीत हे समीकरण झाले.

  • चिं. गं. भानु

    इतिहास व तत्वज्ञानाचे अभ्यासक, चरित्रलेखक, कादंबरीकार चिं. गं. भानु यांचा जन्म २४ जुलै १८५६ रोजी झाला.

    हबर्ट स्पेन्सरचे नीतिशास्त्रविषयक निबंध त्यांनी मराठीत आणले. “नाना व महादजी” ही लेखमालाही ग्रंथरूप झाली.

  • तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे

    विजय घाटे यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला शिकण्यास सुरवात केली. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६४ रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे झाला. १२ व्या वर्षी त्यांनी तबलामधील विशारद पदवी मिळविली होती. वयाच्या १६ व्या वर्षी ते मुंबईत आले आणि बारा वर्षांहून अधिक काळ तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्या कडे गुरुकुल पध्दतीत शिक्षण घेतले. वयाच्या १६ व्या वर्षीही ते आपल्या चमकदार एकल म्हणजेच सोलो तबला वादनाने प्रसिद्ध झाले. विजय घाटे हे काही कलाकांरपैकी एक आहे जे गायन, वाद्य आणि नृत्य या तीनमध्ये निपुण आहेत.

    विजय घाटे यांनी उस्ताद बिस्मिल्लाह खान, उस्ताद विलायत खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद अमजद अली खान, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित बिरजू महाराज, पंडित जसराज, उस्ताद शाहिद परवेझ आणि अनेक मान्यवर कलाकारांच्या सोबत साथ केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय कलाकार प्रसिद्ध संगीत जेथ्रॉटेल सारख्या प्रसिद्ध संगीतकारांसोबत आणि जॉर्ज ड्यूकेस, अल्जेर्यु, रवी कॉलतारिन यांच्या सारख्यांना साथ दिली आहे. तसेच विजय घाटे यांनी गिसॉन्टी, लॅरी कॉरीयेल, जॉर्ज ब्रुक्स इ. त्यांनी लुई बॅंक, शंकर महादेवन, हरिहरन, शिवमणी या सुप्रसिद्ध भारतीय संगीतकारांसोबत काम केले आहे. विजय घाटे यांनी कर्नाटकी फ्युजन मध्ये डॉ. सुब्रायमॅनियम, विद्याभवन विनायकम, एम.एस गोपालकृष्णन व यू. श्रीनिवास यांच्या बरोबरही काम केले आहे. विजय घाटे नेदेरलंड मधील रॉटरडॅम मधील आर्ट कॉट्स युनीव्हसीटीत व्हिजीटींग फॅकल्टी म्हणून काम करतात.

    विजय घाटे यांनी पॅरिस येथे १९८४ साली भारत-फ्रांस फेस्टिव्हल, १९८५ साली भारत फेस्टिव्हल रशिया येथे, राष्ट्रपती भवन येथे आणि भारत भवन येथे भारतीय महोत्सव येथे आपल्या तबला वादनाची प्रतीभा दाखवली होती. ते सवाई गंधर्व संगीत महोत्सव, हरवलाभा संगीत महोत्सव, तानसेन समारोह, गुनीदास संमेलन, उस्ताद अखिलिया खान संगीत समारोह, कालिदास महोत्सव, खजुराहो महोत्सव, विष्णु दिगंबर संगीत उत्सव महोत्सवामध्ये आपले उत्कृष्ट तबला वादन प्रदर्शित करत असतात. विजय घाटे यांनी तालचक्र नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला असून तो तरुण आणि नवीन कलाकारांसाठी व्यासपीठ पुरवते आणि आर्थिक दुर्बल घटकांमध्ये संगीतकारांना मदत करते. या ट्रस्टने अनुभवी संगीतकारांकडून संगीत कार्यशाळा आयोजित करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वातावरणात असलेल्या संगीतकार व संगीत शिक्षकांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याची योजना आखली आहे. तालाचक ट्रस्ट शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांना प्रोत्साहित करतो.

    विजय घाटे यांनी 'विजय' नावाचा आपला अल्बम प्रसिद्ध केला आहे. विजय घाटे यांना पं. जसराज पुरस्कार, सरस्वती बाई राणे पुरस्कार, डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारने त्यांचा २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • फॉर्मूला वन चा माजी विश्वविजेता मायकेल शुमाकर

    फॉर्मूला वन'चा माजी विश्वविजेता मायकेल शुमाकरचा जन्म ३ जानेवारी १९६९ रोजी हुर्थ, पश्चिम जर्मनीत झाला.
    मायकेल शुमाकरने १९९१ साली बेल्जियम ग्रँड प्रिक्सजमध्येद पर्दापण केले होते. त्या ने २००० ते २००४ असे सलग पाच वर्षे एफ वनचे विजेतेपद पटकावले होते. फॉर्म्युला वन स्पर्धा जिंकणारा तो पहिला जर्मन नागरीक होता त्याच्या यशामुळे फॉर्म्युला वन स्पर्धा जर्मनी मध्ये फार लोकप्रिय झाली. २००६ सालाच्या फॉर्म्युला वन चहात्यांच्या सर्वेक्षणानुसार तो सर्वात लोकप्रिय चालक होता. सर्वात पहिल्यां६दा त्याॉने २००६ साली निवृत्ती घेतली होती. मात्र २०१० साली मर्सिडिज संघातून त्या ने पुनरागमन केले होते.

    शुमाकरला १९९७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदासाठी अपात्र घोषित करण्यात आले होते.त्याने युनेस्कोचा ब्रँड अॅफम्बेसीडर म्हणूनही काम केले आहे. २०१२ साली त्याचे २० अब्ज् रूपये वार्षिक उत्पशन होते. मायकेल शुमाकर हा फॉर्म्युला वन शर्यती नंतर तो घोडेस्वारी करून आपले मन रमवत असे. जर्मन शेफर्ड आदी कुत्रे पाळण्याची त्याला आवड होती. मायकेल शुमाकर हा फॉर्म्युला वन रेसिंग व समाजसेवा या दोन्हींमध्ये सर्वात पुढे राहिला. अपघात ग्रस्त होण्याआधी मुलांचा सर्वांगीण विकास, गरीब व भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी सढळ हाताने मदत करत असे. सात वेळा फॉर्मूला वन चॅम्पियनशिप पटकावणारा शूमाकर १९९९ ते २०१० च्या दरम्यान अनेकदा दुखापतग्रस्त झाला. २९ डिसेंबर २०१३ रोजी आल्प्सवर स्कीइंग करताना शूमाकर पडला होता.

    शूमाकरच्या डोके दगडावर आपटले गेल्याने त्याच्या गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो कोमातच होता. त्यााला वॉड युनिर्व्हहसिटीच्याक रुग्णागलयात ठेवण्यायत आले होते. मृत्युशी झुंज देवून आता तो घरी परतला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • विवेक मेहेत्रे

    वयाच्या सोळाच्या वर्षांपासून व्यंगचित्रकलेला सुरुवात करणारे आणि बी.इ., एम.इ. व एम.बी.ए. असे शिक्षण घेतलेले लेखक विवेक मेहेत्रे सर्वच ठाणेकरांना परिचित आहेत.

  • भटक्या कुत्र्यांची दहशत

    ‘समर्थाघरचे श्वान, त्यास सर्वही देती मान’ असे म्हटले जाते, पण रस्त्यावरच्या बेवारशी कुत्र्यांच्या नशिबी मात्र आयुष्यभर हाड्तुड सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. परवा एक भटका कुत्रा माझ्या अंगावर भू भू करीत आला.सोबत त्याची सवंगडी खानदानही भुंकू लागली. मला त्याचे विशेष असे काही वाटले नाही. उलट मला त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांची दया आली. या कुत्र्यांसाठी माझे काहीतरी योगदान आहे. त्यांना ठाऊक नाही. खांब बघितल्यानंतर एक तंगडी वर करून घाण करणाऱ्या कुत्र्यांविषयी कविवर्य सुरेश भट म्हणतात, ‘जुना कुत्रा असो वा नवा कुत्रा, शेवटी कुत्र्याप्रमाणे वागती कुत्रे.’ मला नेहमीच किंव वाटते. कारण मी रात्री अपरात्री फिरत असतो. पण असा प्रसंग माझ्यावर कधी गुदरला नाही. या कुत्र्यांकडे आपण नेहमी भूतदयेच्या दृष्टीकोनातून पाहणे हा आपला मानवी धर्म आहे. आपण या भटक्या कुत्र्याविषयी जाणून आहात. उष्ट्या खरकट्यां अन्नाच्या ढिगात स्वत:साठी अन्न शोधीत असतात. खाण्यालायक असेल ते खातात व न खाण्यासारखे देखील खातात. पण हा उद्योग करीत असताना त्या ढिगाऱ्यातून अन्य गोष्टी बाहेर फेकल्या जातात.अस्ताव्यस्त कचरा होतो. घाण निर्माण होते. रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांची दहशत सर्वत्र पसरली आहे. एकट्या माणसावर धावून जाणारी कुत्री, गाड्याच्या मागे भुंकत पळणारी कुत्री, काही कुटुंब काबिल्यासह फिरणारी, तर टोळीने फिरणारी कुत्री.... यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढीस लागला आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा कोठे तरी बंदोबस्त व्हावा या दृष्टीने आज तरी प्रयत्नांची गरज आहे. एकूणच श्वान प्रेम आणि त्यांच्याविषयीचा कळवळा या गोष्टी कितीही खऱ्या असल्यातरी आपल्याला त्यांच्या दहशतीपासून दूर राहणे किंवा त्यांच्यावर काही उपाय करण्याची वेळ आली आहे.

    वाघ आणि मांजर यात ज्याप्रमाणे साम्य आढळते त्याप्रमाणे लांडगे आणि कुत्रा यामध्ये साम्य आढळत आले आहे. कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. आपल्या धन्याची, घराची शेताची राखण आदि इमानेइतबारे सेवा करीत असतो. वेळेला स्वत:चा जीव धोक्यात घालून मालकाचे प्राण वाचवितो. त्यामुळे काही मंडळीना भन्नाट प्रेम असते. ते नियंत्रणात असतात. स्वच्छ ठेवले जातात. वेळोवेळी डॉक्टर तपासतात. कुणाला घेतलेला चावा, गुरगुरणे मालकाला मात्र आपल्या बाब्या चिडला असं वाटत असतं. तर त्याने दुसऱ्याच्या जागेत जाऊन केलेली घाण आणि त्यातून उद्भवलेला तंटा... मालकाने म्हणावे ‘ह्यांना मुक्या जनावरांविषयी प्रेमच नाही.’ गमतीची एक गोष्ट आपणापुढे व्यक्त करू इच्छितो की, एका पत्रलेखकाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोणत्याही सिनेमात यापुढे ‘कुत्ते मै तेरा खून पी जाउंगा’ ‘कुत्ते की मौत मार दुंगा’ कुत्ते की औलाद’ अशी कुत्र्याची बदनारे संवाद उच्चारण्यास कायद्याने मनाई करावी आणि पालन न करणारावर ATROCITY अंतर्गत कारवाई करावी. ते पुढे असेही लिहितात ‘ कुत्ता मेरा साथी’ असे कुत्र्याचे महती सांगणारे चित्रपट काढेल त्याला ५०% अनुदान द्यावे. जसे वर्षातून विविध दिवस साजरे केले जातात त्याप्रमाणे भटका कुत्रा दिन सर्वत्र साजरा करण्यात यावा. हे वाचून आम्ही धन्य झालो.

    जानेवारी २०१४ मध्ये ह्युमन सोसायटी इंटरनँशनल या स्वयंसेवी संस्थेने ‘हाय-टेक’ साधनाचा वापर करीत मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण केले होते.त्यात असे आढळले की, मुंबईत दर १३० माणसामागे एक भटका कुत्रा आहे. मुंबई एकूण ९५१७२ भटकी कुत्री वावरत आहेत त्यापैकी ६६ हजार ही रस्त्यावर आहेत तर २९ हजार गल्लीबोळात बस्तान ठोकून आहेत. मुंबई पालिकेच्या सर्वेक्षणानुसार २००७ -०८ साली ४९ हजार भटकी कुत्री होती. आज दुप्पट झाली आहेत. निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करूनही दिवसेंदिवस वाढणारी संख्या आणि त्याबरोबर त्यांचा वाढलेला उपद्रव चिंता करण्यासारखा आहे. मुंबई महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री जयराज फाटक यांनी सिंगापूर धर्तीवर भटके कुत्रे दिसताक्षणी ठार करा , असा आग्रह धरला होता. पण विधी खात्याने तसे केल्यास न्यायालयीन प्रक्रियेचे आव्हान पेलणे कठीण जाईल अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे हा विषय अर्ध्यातच थांबला. घरी येणाऱ्या दैनिकात दररोज एकतरी भटक्या कुत्र्याची बातमी असते. मध्यंतरी एका खाजगी वाहनचालकाने गाडीखाली कुत्र्याला चिरडले म्हणून त्यावर गुन्हा दाखल झाला. वर्तमानपत्रात कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही तर माणूस कुत्र्याला चावला, ही मजेशीर बातमी वूत्तपत्र उचलून धरतात. कारण तसे प्रशिक्षण दिलेले असते. गमतीची गोष्ट सांगायची झाली तर दहिसर कांदरपाडा येथून २४० क्रमांकाची बस लिंक रोडच्या दिशेने निघाली. रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने वाहनचालक अर्जुन खरात याने बसचा वेग वाढविला होता. अचानक एक भटका कुत्रा धावत बसखाली आला. ब्रेक करकचून दाबला गेला. त्यामुळे प्रवाशी हादऱ्याने दचकले, काही उभे राहिले. काही उत्साही मंडळी खाली उतरली. तो भटका कुत्र्याची अखेरची धडपड सुरु होती. वाहनचालक नम्रपणे गाडीत बसा म्हणून विनवीत होता. पण प्रवाश्यांपैकी एकाने पावा संघटनेच्या कार्यकर्त्याला फोन लावला. अल्पावधीत संघटनेचा कार्यकर्ता हजर झाला. त्याने आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बिचारा अर्जुन खरात यांना निष्काळजीपणाने वाहन चालविल्याबद्दल अटक झाली. पण ही बातमी कुठल्याही वर्तमानपत्रात आली नाही की यावर विशेष विचारमंथन झाले नाही. इतकी दहशत भटक्या कुत्र्यांची पसरलेली आहे. हाड म्हणायला देखील नागरिक घाबरू लागले आहेत. दररोज श्वानदंशामुळे माणसेही मरत असतात. दर मिनिटाला एक अपघात होतो तर दर तीन मिनिटांनी एकजण मृत्युमुखी पडत असतो. रेल्वेच्या रुळावर दररोज दहाबारा जणांना मृत्यू येतो. त्याबद्दल कुणी फारसे दु:ख व्यक्त करीत नाही. एखाद्या माणसाने भटक्या कुत्र्यावर केलेला जीवघेणा हल्ला याबाबतीत आपण विचारमंथन का घडवून आणायचे. अंगावर धावून आलेल्या, चावा घेतलेल्या कुत्र्याला चोप देण्याचा स्व:सरक्षणात्मक अधिकार मानवाला असायला हवेत, याविषयावर चर्चा घडविली पाहिजे.

    या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायचा तरी कसा....! यांच्या दहशतीला लगाम घालणार कोण...? उपद्रवी कुत्र्यांपासून संरक्षण देणार तरी कोण....? भारतीय लोकशाहीत हे तरी आजमितीला कठीण होऊन बसले आहे. प्राणीमित्र संघटना याला कडाडून विरोध करतील. विचार करा भविष्यात या भटक्या कुत्र्याची दहशत वाढण्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. श्वानप्रेमी माझ्या लेखाविषयी गरळ ओकतील पण मी भटक्या आणि उपद्रवी कुत्र्याविषयी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

    अशोक भेके

  • नृत्यांगना दमयंती जोशी

    ज्या काळात पार्वतीकुमार, गोपीकृष्ण, रोशनकुमारी यांच्यासारखी नर्तक मंडळी सिनेमाकडे वळली त्या काळात दमयंती जोशी यांनी कथक नृत्यसाधनेची विशुद्ध कास धरली आणि त्यामध्ये नवनवीन प्रयोग सिद्ध केले. नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म ५ डिसेंबर १९२८ रोजी झाला. दमयंती जोशी यांनी कथक नृत्यप्रकारास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली, तर भरतनाट्यम हा नृत्यप्रकार दक्षिणेतून मुंबईत येऊन रुजण्यास त्या कारणीभूत झाल्या. बालपणापासून नृत्याचीच ओढ असलेल्या दमयंती जोशी यांचा जन्म मुंबईतल्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला. सुरवातीचे नृत्य शिक्षण सीताराम प्रसाद यांच्याकडे घेतले.

    दमयंती जोशी यांना वयाच्या चौथ्या वर्षी मादाम मेनका या नृत्यांगनेने आपली वारसदार म्हणून पंखाखाली घेतले. हे सगळे १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत घडत होते ह्या पार्श्वभूमीवर अजूनच जास्त महत्वाचे आहे. मादाम मेनका या पारंपारिकरित्या नृत्याच्या घराण्यातून आलेल्या नव्हत्या पण कथ्थक शिकलेल्या होत्या आणि मणिपुरी, कुचिपुडी अश्याही अनेक शैलींचाही त्यांनी अभ्यास केला होता. अनेक शैलींना आपल्या बॅलेमधे एकत्र करण्याचे प्रयोग मेनका जोशी यांनी केले. त्याचे संस्कार घेऊन दमयंती जोशींनीही पुढे बरेच महत्वाचे यशस्वी प्रयोग केले. या सगळ्यात त्यांना पूर्णपणे साथ देणारी त्यांची आई वत्सलाबाई जोशी यांचेही योगदान महत्वाचे होते.

    भारतीय नृत्य विदेशात पोहचवण्याचे श्रेय दमयंती जोशी यांना जाते. त्यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. मा.दमयंती जोशी यांचे निधन १९ सप्टेंबर २००४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ऐश्वर्या नारकर

    व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचं पहिलं नाटक ‘ गंध निशिगंधाचा ‘ हे होतं. पुढे त्यांनी अनेक नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचं गारुड , रसिक प्रेक्षकांच्या मनावर केलं. त्यातील सध्या चर्चेत असलेलं सोयरे सकळ ह्या नाटकात त्यांनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत.

  • डॉ. डी. वाय. पाटील

    डी. वाय. पाटील यांच्या घरात काँग्रेसची विचारधारा होती. त्यामुळे अर्थात त्यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरु होणं सहाजिक होतं आणि झालंही तसेच कोल्हापुरातून डी. वाय. पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला.

  • बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करणारी मराठमोळी विद्या माळवदे

    लॉचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्याने एअर होस्टेसच्या रुपात करिअरला सुरुवात केली होती.मात्र नशिबाने ती बॉलिवूडमध्ये आली आणि एअरहोस्टेसहून अभिनेत्री बनली. विद्याला शाहरुख खान स्टारर’चक दे इंडिया’या सिनेमासाठी ओळखले जाते. ‘चक दे इंडिया’या सिनेमात विद्याने गोलकिपरची भूमिका वठवली होती.