जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
वृत्ते व अलंकार, साहित्यदर्शन, झुपुर्झा, पेशवेबखर, साहित्यशोभा, वाचनमाला आदी ग्रंथांचे संपादनही केले. कवितेप्रमाणेच कथा, कादंबरी, टीकात्मक आणि संपादित ग्रंथ अशी त्यांची ग्रंथसंपदाही आहे.
पोलादसम्राट लक्ष्मीनिवास मित्तल ऊर्फ लक्ष्मी मित्तल यांचा जन्म १५ जून १९५० रोजी सादुलपूर, राजस्थान येथे झाला.
लक्ष्मी मित्तल हे ब्रिटन मधील सर्वात श्रीमंत भारतीय समजले जातात. लक्ष्मी मित्तल यांचे शालेय शिक्षण कोलकाताच्या श्री दौलतराम नोपानी स्कूल मध्ये झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण कोलकाताच्या सेंट झेवियर्स कॉलेज मध्ये झाले. तेथे त्यांनी बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात लक्ष्मी मित्तलांच्या वडिलांची भागीदारी असलेल्या 'ब्रिटिश इंडिया रोलिंग मिल्स' या लोखंडाच्या रसापासून पट्ट्या, कांबी व सळ्या तयार करण्याच्या कारखान्यात लक्ष्मी मित्तल सुट्टीच्या वेळी काम करत असत. त्या काळी लोखंडाच्या कारखान्यासाठी परवाने मिळवणे अवघड असल्याने लक्ष्मी मित्तलांच्या वडील आणि चुलत्यांनी मिळून जुने डबघाईला आलेले कारखाने सुरुवातीला ताब्यात घेण्याचे धोरण राबवले. १९६३ साली मित्तलांच्या वडिलांना आंध्र प्रदेशात लोखंडाचे उत्पादन करणारा कारखाना काढण्याचा परवाना मिळाला. त्या कारखान्याला त्यांनी ‘मित्तल इस्पात’ असे नाव दिले. मित्तल कुटुंबाचा तो पहिला उत्पादन प्रकल्प ठरला. इंडोनेशियातील पूर्व जावा बेटात लोखंडाचे उत्पादन करण्याचा कारखाना काढण्याची तेथील सरकारची निविदा बघून मित्तलांच्या वडिलांनी तेथे जाऊन जागा विकत घेतली. परंतु पुढे तेथील शासनाने जाचक अटी लादल्या व वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले. वीज पुरवठ्याची व्यवस्था करायलाही तिथले सरकार तयार नव्हते. या सर्व कारणांमुळे लोखंडाचा कारखाना उभारण्यासाठी घेतलेली जमीन विकण्याचा निर्णय मित्तलांच्या वडिलांनी घेतला व ही घेतलेली जमीन विकून टाकण्यासाठी त्यांनी लक्ष्मीनिवास मित्तल यांना जावाला पाठविले. मित्तल बंधूंमध्ये १९९४ साली संपत्तीची वाटणी झाल्यानंतर दोन वेगळे उद्योग समूह अस्तित्वात आले होते. त्यानंतर लक्ष्मी मित्तल यांनी २००६ ‘आर्सेलर मित्तल’ची स्थापना केली. सध्या लक्ष्मी मित्तल ‘आर्सेलर मित्तल’चे सीईओ व चेयरमेन काम बघत आहेत. २००७ मध्ये भारत सरकारने लक्ष्मी मित्तल यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसेच २००८ मध्ये लक्ष्मी मित्तल यांना फोर्ब्ज मासिकाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. २०१३ मध्ये लक्ष्मी मित्तल यांना ‘चेंजिंग द फेस ऑफ ब्रिटन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लक्ष्मी मित्तल यांच्याकडे इंग्लिश फुटबॉल क्लब 'क्वींस पार्क रेंजर्स'ची ३३ % मालकी आहे.
अमेरिकेतील ‘केल्लोग्स स्कूल ऑफ मैनेजमेंट’ च्या सल्लागार बोर्डवर व 'क्लीवलैंड क्लिनिक' च्या 'बोर्ड ऑफ ट्रस्टीज' चे सदस्य लक्ष्मी मित्तल राहिले आहेत.२००३ मध्ये लक्ष्मी मित्तल व त्यांच्या ऊषा मित्तल फाउंडेशनने राजस्थान सरकार बरोबर जयपुर मध्ये 'एल.एन.एम. इंस्टीट्यूट ऑफ इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी' ची स्थापना केली आहे.
लक्ष्मी मित्तल यांच्या पत्नीचे नाव उषा मित्तल आहे. उषा मित्तल या फारच हुशार असल्याचे बोलले जाते. आपल्या पतीच्या व्यवसायात त्यांना त्या नेहमी मदत करत असतात. उषा मित्तल यांनी शिक्षण क्षेत्रात खूप चांगले काम उभे केले आहे. त्यांचे चिरंजीव हे त्यांच्या बरोबरच आदित्य मित्तल या व्यवसायात आहेत.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
अजित पवार हे एक प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. ते सध्या महाराष्ट्राचे विद्यमान उप मुख्यमंत्री व अर्थमंत्री असून , ते बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.
तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसंस्कृती आणि लोककला यांचा त्यांनी गाढा अभ्यास केला आहे. ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी मराठी वाङ्मय कोश, तसंच मराठी विश्वकोशासाठी लेखन केलं आहे.तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसंस्कृती आणि लोककला यांचा त्यांनी गाढा अभ्यास केला आहे. ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी मराठी वाङ्मय कोश, तसंच मराठी विश्वकोशासाठी लेखन केलं आहे.
एक अतिशय वेगळ्या प्रकारचे, विरोधाभासाने गुंफलेले लक्ष्मीबाईंचे आयुष्य त्यांच्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्रातून समाजासमोर आले आणि ‘युद्धस्थ कथा रम्या’ पद्धतीने लिहिलेले त्यांच्या स्मृतिचित्रातील एक एक चित्र वरवर हलक्या फुलक्या पण आतून दाट गहिर्या रंगाने रंगलेले सार्या महाराष्ट्राच्या मनावर विराजमान झाले.
मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
वेस्ट इंडिजचा विख्यात गोलंदाज मायकेल होल्डिंग यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९५४ रोजी झाला.
मायकेल होल्डिंग हे वेस्ट इंडिजच्या तेज चौकडीतील एक भक्कम खांब. जलतगती गोलंदाज, बोलिंग करताना बाजूने धावत गेले तरी बुटांचा आवाज येत नसे. म्हणून काही इंग्लिश पंचांनीच त्यांचे व्हिस्परिंग डेथ असे नामकरण केले होते.
होल्डिंग यांच्या गोलंदाजीतली कविता रनअपपुरतीच असायची. प्रत्यक्ष चेंडू अत्यंत विध्वंसक ठरायचा. सीम, स्विंग, वेग अशा तिन्हींवर हुकूमत.
त्यांचा फिटनेसही आदर्शवत होता. निव्वळ नेटप्रॅक्टिस करून काही साधत नाही. तेज गोलंदाजांनी भरपूर धावलं पाहिजे, असं ते आजही सांगतात.
६० सामन्यांमध्ये २४९ विकेट्स, त्यांतल्या बहुतेक वेस्ट इंडिजबाहेर घेतलेल्या आहेत.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
दुर्गा खोटे यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी मुंबई झाला. पूर्वाश्रमीचे त्यांचे आडनाव लाड होते. महाविद्यालयात शिकत असतानाच बॅ. विश्वनाथ खोटे यांच्याशी विवाह झाला. मोहन भवनानींच्या “फरेबी जाल“ या मूक चित्रपटात त्यांना पहिल्यांदा भूमिका देण्यात आली. या चित्रपटातील काही भाग बोलका होता. प्रभात फिल्म कंपनीच्या अयोध्येचा राजा या पहिल्या हिंदी व मराठी बोलपटातून दुर्गाबाईंनी तारामतीची भूमिका साकारली. “अयोध्येचा राजा“ या पहिल्या मराठी बोलपटात मध्ये दुर्गा खोटेंनी गायिलेली 'बाळा का झोप येईना', 'आनंद दे अजि सुमन लीला', 'बाळ रवि गेला' ही गाणी त्यावेळी अतिशय लोकप्रिय झाली होती. त्यानंतर “सीता“, “पृथ्वीवल्लभ“, “अमरज्योति“, “लाखाराणी“, “हम एक हैं“ ,“मुगले आझम“, “नरसीभगत“, “बावर्ची“, “खिलौना“, “बॉबी“ “अश्या विविध हिंदी चित्रपटांमधून दुर्दाबाई खोटेंनी दर्जेदार व्यक्तीरेखा साकारल्या. त्याचप्रमाणे “गीता“, “विदुर“, “जशास तसे“, “पायाची दासी“, “मोरूची मावशी“, “सीता स्वयंवर“, “मायाबाजार“ यांसारख्या मराठी चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या.
पॉल झिलच्या “अवर इंडिया“ आणि इस्माईल मर्चंट यांच्या“हाऊस-होल्डर“ या दोन इंग्रजी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
१९४८ साला पासून दुर्गाबाईंचा मराठी रंगभूमीशी संबंध आला होता. “बेचाळीसचे आंदोलन“, “कीचकवध“, “भाऊबंदकी“, “शोभेचा पंखा“, “वैजयंती“, “खडाष्टक“, “पतंगाची दोरी“, “कौंतेय“, संशयकल्लोळ या नाटकांमधुन त्यांनी भूमिका केल्या आहेत. १९६१ रोजी दिल्लीमध्ये आयोजित झालेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
१९८० रोजी दुर्गाबाईंनी आपल्या “ दुर्गा खोटे प्रॉडक्शन ” द्वारे दूरदर्शन मालिका, माहितीपूर्ण ध्वनी-चित्रफित, मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच शॉर्ट फिल्म्सची निर्मिती या संस्थेतून करण्यात आली.
“धरतीची लेकरं” या दुर्गा खोटे प्रॉडक्शनचा चित्रपट राज्य मराठी चित्रपट महोत्सवातही गौरयाण्यात आले व दुर्गा खोटेंना या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गेला.
२०० पेक्षा ही अधिक चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारत तसंच वैशिट्यपूर्ण दिग्दर्शन कौशल्यामुळे दुर्गाबाईंनी कलाविश्वात सुवर्णक्षरांनी नाव कोरले.
वेळोवेळी दुर्गाबाईंचा सन्मान देखील करण्यात आला. १९४२ च्या“चरणो की दासी” आणि १९४३ सालच्या “भारत मिलाप” या चित्रपटातल्या त्यांच्या भुमिकांना "बेंगॉल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन"च्या पुरस्कारने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर १९७४ च्या “बिदाई“ चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांना फिल्म फेअर पुरस्काराने गौरविण्यात आले; त्यासोबतच संगीतनाटक अकादमीने १९५८ साली त्यांचा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव केला तर मराठी नाट्यपरिषदेतर्फे विष्णुदास भावे सन्मानपदक, १९६८ साली भारत सरकारच्या “पद्मश्री” आणि १९८४ साली भारतीय सिनेसृष्टीतल्या सर्वोच्च असलेल्या “दादासाहेब फाळके पुरस्काराने“ गौरविण्यात आले आहे.
आपला जीवन व रुपेरी पडद्यावरचा प्रवास दुर्गाबाई खोटेंनी “मी दुर्गा खोटे” या पुस्तकातून शब्दबध्द केले असून या पुस्तकाचं इंग्रजी भाषेत “आय दुर्गा खोटे” नावाने प्रकाशन झाले आहे.
उतारवयात दुर्गाबाई अलिबागच्या एका बंगल्यात स्थलांतरीत झाल्या. २२ सप्टेंबर १९९१ या दिवशी म्हणजेच वयाच्या ८६व्या वर्षी दुर्गा खोटे यांचे निधन झाले.
२०१३ साली भारतीय चित्रपटांच्या शतकमहोत्सवी वर्षात भारत सरकारने दुर्गा खोटेंच छायाचित्र असलेलं टपाल तिकिट प्रकाशित करुन त्यांच्या प्रतिभेचा सन्मान केला.
( लेखन व संशोधन - सागर मालाडकर )
दुर्गा खोटे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे (22-Sep-2016)
स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे (14-Jan-2019)
स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे (7-Oct-2017)
स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे (15-Jan-2018)
## Durga Khote
संख्याशास्त्रात कारकीर्द करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राम प्रधान यांनी वर्गमित्र स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट वरिष्ठ पदावर विराजमान झाल्यानेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि १९५२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) प्रवेश केला.
जयंतराव टिळक हे स्वातंत्र्योत्तर काळात तत्कालीन इंडियन नॅशनल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार झाले होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सोळा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीसाठी अध्यक्ष होते.
Copyright © 2025 | Marathisrushti