(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • मराठी अभिनेत्री रंजना देशमुख 

    सुप्रसिध्द अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या असलेल्या रंजना देशमुख यांनी लहानपणीच कलाक्षेत्रात पदार्पण केले.

    १९७०-८०च्या दशकांत अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमधून रंजना देशमुखांनी विविधांगी भुमिका साकारल्या. व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटातून प्रमुख नायिकेची भूमिका साकारली. ‘अरे संसार संसार’ आणि ‘गुपचुप गुपचुप’ या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजना देशमुखला राज्यसरकारचा ‘उत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

    रंजना देशमुख यांचे इतर प्रमुख चित्रपट म्हणजे ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’, आणि ‘चानी’. रंजना देशमुख यांनी ‘फक्त एकदाच’ या नाटकातून मराठी रंगभूमीवर पदार्पण केले.

    मराठी १९८७ मध्ये ‘झुंजार’च्या चित्रीकरणासाठी तेव्हाच्या बंगलोरला जाताना मोटार अपघातात त्या कायमच्या अपंग झाल्या. पायच निकामी झाल्याने त्यांची चित्रपट कारकीर्दच अकस्मात संपुष्टात आली.

    रंजना यांचे ३ मार्च २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : इंटरनेट

  • सुरेल गायिका सुरैय्या

    सुरैया हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका स्वप्निल, सुरेल काळाचं मोरपंखी प्रतीक होतं. त्यांचा जन्म १५ जून १९२९ रोजी झाला. ४० आणि ५० च्या दशकात सुरैय्या या प्रचंड लोकप्रिय अशी गायिका/अभिनेत्री होत्या.

  • अभिनेते शशी कपूर

    हिंदी सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत कारकीर्द घालवूनही शशी कपूर यांचं मन घुटमळत राहिलं ते पृथ्वी थिएटरपाशी. काही वर्षांपूर्वी पं. सत्यदेव दुबे यांना मानवंदना म्हणून पृथ्वी थिएटरने महोत्सव आयोजित केला होता, तेव्हा शशी कपूर व्हीलचेअरवर बसून पृथ्वी थिएटरमध्ये आले होते एका कोपऱ्यात शांतपणे बसून नाटकवाल्यांचा चाललेला जल्लोष शांतपणे निरखत होते आणि स्मितहास्य करत होते.

  • अशोक रोकडे

    त्सुनामी असो, भूकंप असो वा महाराष्ट्रातला दुष्काळ.. कोल्हापूरच्या अशोक रोकडे यांनी अशावेळी धावून जाणारी “व्हाइट आर्मी” उभी केली आहे. आपत्तीची वर्दी मिळताच दीड हजार जवानांचे बळ मदतीला धावते आणि शिस्तीत काम सुरु करते.

    व्हाइट आर्मी चे कमांडर

  • द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर

    १९६८च्या सुमारास प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी शिवाजी पार्कमध्ये कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली आणि प्रशिक्षक म्हणून स्वतःला वाहून घेतले. भारतीय क्रिकेटचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. केवळ सचिन तेंडुलकरच नव्हे, तर विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, अजित आगरकर, रमेश पोवार, लालचंद राजपूत, बलविंदर संधू, सुलक्षण कुलकर्णी, समीर दिघे, पारस म्हांबरे असे त्यांचे अनेक खेळाडू पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले.

  • अजय सरपोतदार

    टाटा मोटर्स या नामांकित कंपनीसाठी सरपोतदार यांनी अनेक जाहिराती आणि माहितीपट (डॉक्युयमेंटरी) तयार केले. अजय सरपोतदार यांनी आपल्या विविधांगी कारकिर्दीत हैदराबाद येथील जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीत अनेक वर्ष वरिष्ठ निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली.

    मराठीबरोबरच प्रादेशिक वाहिन्यांचे काम त्यांच्याकडे देण्यात आले होते. आपले वडिल विश्वा स सरपोतदार आणि आजोबा नानासाहेब सरपोतदार यांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपट क्षेत्रात काम करू लागलेले अजय सरपोतदार १९९५ मध्ये "पैंजण' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले.

    आजोबा नानासाहेब सरपोतदार यांनी १९१९ साली स्थापन केलेल्या आर्यन फिल्म कंपनीचे त्यांनी पुनरूज्जीवन केले. या कंपनीच्या बॅनरखाली सरपोतदार यांनी अलिकडेच कोटींचे बजेट असलेल्या उलाढाल या चित्रपटाची निर्मिती केली होती. बॉलिवूडमधील चित्रपटांच्या तोडीसतोड असे तांत्रिक पाठबळ वापरून हा चित्रपट तयार करण्यात आला होता. त्याचे चित्रिकरण मॉरिशसमध्ये करण्यात आले.

    अजय सरपोतदार यांनी मॉरिशसमध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन केले.

    अजय सरपोतदार यांच्यावरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

    # Sarpotdar, Ajay

  • भारताचे माजी यष्टिरक्षक नरेन ताम्हाने

    नरेन ताम्हाणे यांनी आपल्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात १ जानेवारी १९५५ रोजी पाकिस्तानविरुद्ध केली होती. नरेन ताम्हाणे हे आपला शेवटचा कसोटी सामना ३० डिसेंबर १९६० रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळले होता.

  • बंगाली भारतीय चित्रपट निर्माते आणि कथा लेखक ऋत्विक घटक

    मैलाचा दगड ठरणारे अनेक चित्रपट ऋत्विक घटक भारतीय चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२५ रोजी ढाका येथे झाला. ऋत्विक घटक यांचे वडील सुरेशचन्द्र घटक जिल्हा दंडाधिकारी आणि एक कवी आणि नाटककार होते. वडिलांच्या लिहिण्याचा प्रभाव त्यांच्या वर झालेला असावा. त्यांची आई इंदू बाला देवी, त्यांची बहिण प्रतिती आणि मोठा भाऊ मनीष घटक त्याच्या वेळ मूलगामी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता. असा हा परिवार १९४७ साली बंगालच्या विभाजना नंतर भारतात कलकत्ता यथे आला. १९४८ साली घटक यांनी पहिल नाटक गडद तलाव लिहिले. १९५१ साली ते भारतीय पीपल्स थिएटर असोसिएशन (IPTA) मध्ये झाले. त्यांचे शेवटचे नाटक १९७० सालचे ज्वाला.

    घटक चित्रपटात निर्मल घोष यांच्या सोबत सामील झाले,सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते साल होते १९५०. घटक यांचे पहिले व्यावसायिक प्रकाशन अजांत्रिक. यावरच काल्पनिक चित्रपट तयार केला. कथा लेखक म्हणून घटक यांना व्यावसायिक यश मधुमती (१९५८) या चित्रपटाने दिले. हा हिंदी चित्रपट होता याचे दिग्दर्शन बिमल रॉय यांनी केले होते. या चित्रपटाच्या कथेला अरजित फिल्म फ़ेअर सर्वोत्तम कथा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ह्रित्विक घटक यांनी पूर्ण लांबीचे आठ चित्रपट तयार केलेले आहेत यातील सर्वोत्तम चित्रपट म्हणजे मेघ ढाका तारा (१९६०),कोमल गांधार (१९६१),आणि शुब्रनरेका (१९६२).

    ऋत्विक घटक हे सत्यजीत रे आणि मृणाल सेन यांचे समकालीन. ऋत्विक घटक प्रामुख्याने चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. तरी त्यांनी अनेक कथा आणि नाटक लिहिली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आठ पूर्ण लांबीचे वैशिष्ट पूर्ण चित्रपट आणि काही लघुपट,माहितीपट निर्माण केले. तसेच अनेक लघुकथा, नाटक आणि कविता लिहिल्या. ५० पेक्षा जास्त चित्रपटांवर लेख आणि निबंध लिहिले. ते फक्त चित्रपट दिग्दर्शक नव्हते तर त्यांच्या चित्रपटातली दृष आणि समालोचन विव्दातापूर्ण अभ्यास आणि शोधातून आलेल होत. त्यांना दोन देशातील विभाजनातून आलेला बंगाल मान्य नव्हता हीच धीम त्यांच्या जवळ जवळ सर्वच चित्रपटात अप्रत्यक्षपणे दिसत असे. चित्रपट बनवणे हि त्यांच्या साठी कला नव्हती,तर लोकांची दुखे आणि दुखांवर त्यांचा राग व्यक्त करण्याचे साधन होते. त्यांना १९७० साली भारत सरकारने पद्मश्री या किताबाने सन्मानित केले. ऋत्विक घटक काही काळ एफ टी आय आय चे संचालक होते.

    एफ टी आय आय मध्ये शिकवत असताना त्यांच्या कडून मणी कौल,जॉन अब्राहम ,कुमार सानी आणि असे अनेक विद्यार्थी घडले. सत्यजित रे यांना जगभरातील प्रेक्षक लाभले,पण या बाबतीत घटक हे भाग्यवान नव्हते. ते जिवंत असताना त्यांच्या चित्रपटांना न प्रेक्षक लाभले ना त्यांची समीक्षा झाली. परंतु त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे चित्रपट भारतात आणि परदेशात फिल्म मेकींकच्या विद्यार्थीना आभ्यासासाठी ठेवले जातात. सत्यजित रे वास्तववादी सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत,परंतु रे यांच्या पथेर पांचाली या सिनेमाच्या तीन वर्षे आधी घटक यांनी नागरिक नावाचा वास्तविक सिनेमा तयार करून ठेवला होता. तो त्यांच्या मृत्यू नंतर प्रकाशित झाला. या नंतरच घटक यांचा प्रभाव भरत बाहेर पडू लागला. घटक यांचे अपूर्ण राहिलेले आणि प्रदर्शित होऊ न शकलेले अनेक चित्रपट आजही आहेत. हे प्रदर्शित होऊ न शकलेले चित्रपट संकलित करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे (एनएफएआय) गेल्या काही दिवसांपासून होत आहे.

    या प्रयत्नांना आता यश येत असून, पश्‍चिम बंगाल सरकारने घटक यांचे "काटो अजनारे' (1959), "बनगार बगो दर्शन' (1964) आणि "रंजर गुलाम' (1968) हे प्रदर्शित होऊ न शकलेले चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्त केले आहेत.

    घटक यांच्या अपुरे राहिलेल्या किंवा प्रदर्शित होऊ न शकलेल्या बहुतांश चित्रपटांच्या चित्रफितींचे संकलन आता चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध असणार आहेत. यात घटक यांचे 1959 ते 1971 या कालावधीतील चित्रपटांचा समावेश आहे, घटक यांच्या "तिताश एकती नदिर नाम' (1973) या चित्रपटाची माहिती पुस्तिका, तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री जयललिता यांच्या "शहजादी मुमताज' (1977) आणि बाबजीराव राणे दिग्दर्शित "संत तुकाराम' (1932) या चित्रपटांची छायाचित्रे, अभिनेते अमिताभ बच्चन यांचा प्रदर्शित होऊ न शकलेला "जमानत' हा चित्रपट आणि ज्योतिप्रसाद आगरवाल यांनी दिग्दर्शित केलेला पहिला आसामी चित्रपट "जोयमती' (1935)ची छायाचित्रे आणि प्रेसक्‍लिपिंग उपलब्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शने यात घटक यांचे सिनेमे दाखवले जाऊ लागले आहेत. यानंतर त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाच्या मध्ये गणले जाऊ लगले.

    ऋत्विक घटक यांचे ६ फेब्रुवारी १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट /शंशाक बोरसे

  • रामकृष्ण विठ्ठल लाड

    भाऊ दाजी लाड हे मराठी इतिहास-अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते होते.

  • हिदुस्थानी संगीतातील जयपूर घराण्याचे श्रेष्ठ गायक मल्लिकार्जुन मन्सूर

    मन्सूरांचे आरंभीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य पं. नीळकंठबुवा यांच्याकडे झाले. जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँ यांचे पुत्र मंजीखाँ आणि भूर्जीखाँ यांच्याकडे त्यांनी पुष्कळ वर्षे तालीम घेतली. त्यांचा जन्म ३१ डिसेंबर १९१० रोजी झाला. विशेषत: मंजीखाँ यांच्या प्रतिभावंत पण बंडखोर गायकीचा मन्सूरांच्या शैलीवर विलक्षण प्रभाव दिसून येतो. मन्सूर यांनी अवघड गायकीला मुलायमपणा आणला व लोकभिमुख संगीत दर्जेदार नसते, हा विचार चुकीचा ठरविला. जयपूर घराण्याचे महाराष्ट्रातील संस्थापक उस्ताद अल्लादियाखाँ, त्यांचे सुपुत्र मंजीखाँ यांचं वास्तव्य काही वर्ष मुंबईत होतं.

    मंजीखाँ फ्रेंचब्रिजजवळच्या हाजी कासमवाडीत राहत. मल्लिकार्जुन मन्सूरांना तिथे त्यांची तालीम मिळाली. या तालमीविषयी मन्सूर म्हणत असत, “दररोज सकाळी `ते’ तालीम चाले. एक राग कितीही दिवस चालला असला तरी त्याचं रोजचं स्वरुप वेगळंच असे…. मंजीखाँ साहेबांचं गाणं मला नागाच्या विषाप्रमाणे चढलं.” मंजीखाँ यांच्याप्रमाणेच मन्सूर मराठी भावगीते उत्तम गात. ‘ही रात सवत बाई’ या त्यांच्या भावगीताने त्यांनी एके काळी सार्या् महाराष्ट्राला सुखविले. नाट्यगीते, ठुमर्याण आणि भजने मन्सूर उत्तम गात. पुर्वी ते संगीत कानडी नाटकांतून कामे करीत व आपल्या गायनाने कन्नड रशिकांना मुग्ध करीत. स्वच्छ, निकोप व सुरेल आवाज, उत्तम दमसास, लयकारीवरचे प्रभुत्व आणि रागमांडणीचे कल्पनाकौशल्य त्यांच्या गायनात प्रामुख्याने जाणवते. अनेक अनवट रागांचा त्यांच्या गायकीमध्ये अंतर्भाव होतो. उदा. त्रिवेणी, बिहारी, देवसाख इ. राग मल्लिकार्जुन मन्सूर मोठ्या अधिकाराने मांडतात. विद्वत्ता व रसिकता यांचे सुमधूर संमीलन म्हणजे मन्सूरांचे गाणे होय. पं. मल्लिकार्जुन मन्सूर भारतीय संगीताच्या क्षेत्रातले उच्चकोटीचे गायक होते. घराणेदार गायकीचे दर्शन घडवणारी त्यांची गायकी शुद्धता, सूक्ष्मता या बरोबरच भावात्मक अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध होती.

    भारत सरकारने मल्लिकार्जुन मन्सूर यांना ‘पद्मश्री’ व ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. कालिदास पुरस्कार मल्लिकार्जुन मन्सूर यांना लाभला. कर्नाटक विद्यापीठाने संगीत विभागाचे सन्माननीय प्रमुखत्व मन्सूरांना दिले होते. त्यांचे पुत्र राजशेखर मन्सूर आणि मट्टीगट्टी हे त्यांचे प्रमुख शिष्य होत. त्यांनी नन्न रसयात्रे हे आत्मचरित्र झाले आहे, त्यात संगीतसाधनेसाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट, गुणग्राहकता, गुरू प्रेम आणि कलावंताला शोभणारी नम्रता प्रकर्षाने दिसून येते. मल्लिकार्जुन मन्सूर १२ सप्टेंबर १९९२ यांचे रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    संदर्भ:- इंटरनेट / मराठी विश्वकोश