जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
गेली जवळपास पन्नास वर्षे त्या व्रतस्थपणे कविता लिहितायत. या पन्नास वर्षांत त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहे. ‘दिगंत’ (१९८१), ‘तरीही’(१९८५), ‘दिवसेंदिवस’(१९९२), ‘वाळूच्या पात्रांत मांडलेला खेळ’(२००५) आणि ‘कदाचित अजूनही’(२०१७). या संग्रहांतून प्रामुख्याने आत्मपर कविता आलेली आहे. या कवितेचा केंद्रबिंदू विशेषत्वाने स्त्रीच राहिलेली आहे.
सखाराम विनायक आपटे यांनी यंत्रशास्त्राच्या मूलतत्वांवरील पुस्तक, तसेच “वाहती वीज़” हे पुस्तक लिहून शास्त्रीय परिभाषेचा पाया रुंदावण्याचे काम केले.
१८ जुलै १९७४ रोजी त्यांचे निधन झाले.
Sakharam Vinayak Apte
प्रख्यात अभिनेत्री शकिला यांचा जन्म १ जानेवारी १९३५ रोजी झाला. सीआयडी, आरपार, रेशमी रुमाल, श्रीमान सत्यवादी अशा एकाहून एक सरस कृष्णधवल हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या प्रख्यात अभिनेत्री शकिला यांचे “बाबूजी धीरे चलना’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे व त्यांच्या भूमिकाही चित्रपट रसिकांच्या मर्मबंधातली ठेव होती. गुरुदत्त यांच्या आरपार व सीआयडी या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. शक्ती सामंता यांच्या चायना टाऊन या चित्रपटात शम्मी कपूर यांच्या सोबत शकिला यांनी भूमिका केली होती.
पोस्ट बॉक्स ९९९ या चित्रपटातील शकिला यांची अदाकारी लाजवाब होती. त्यांनी १९६३ साली चित्रपट संन्यास घेतला होता. शकिला या जॉनी बार्बर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या होत्या. लग्नानंतर त्या आपल्या पतीबरोबर लंडन येथे गेल्या. जॉनी बार्बर यांचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. शकिला यांना मीनाझ नावाची एक मुलगी होती. मीनाझचे १९९१ साली निधन झाले होते. मनोजकुमार, राज कपूर, देव आनंद, सुनील दत्त या अभिनेत्यांबरोबरही शकिला यांनी विविध चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. शकिला यांचे २१ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.
शकिला यांचे चित्रपट.
दुनिया (१९४९), दास्तान (१९५०), अरमान (१९५३), मदमस्त (१९५३), शहनशाह (१९५३), आगोश (१९५३), आरपार, दान, हल्लागुल्ला, गुलबहार, खुशबू, लैला, लाल परी, अलिबाबा ४० चोर, नूरमहल (१९५४), मस्त कलंदर, रत्नमंजरी (१९५५), सीआयडी, कारवाँ, हातीमताई, झाँसी की रानी, मलिका, पैसा ही पैसा, रुपकुमारी (१९५६), बेगुनाह, नागपद्मिनी, परिस्तान, आग्रा रोड (१९५७), अल हिलाल, चौबीस घंटे, पोस्ट बॉक्स नं. ९९९ (१९५८), फोर्टी डेज, गेस्ट हाऊस, काली टोपी लाल रुमाल, स्कूल मास्टर (१९५९).
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
१९६९ साली म्युन्सिपल नाट्यस्पर्धेत ‘सुतक’ नावाची एकांकिका त्यांनी लिहिली. या स्पर्धेतत्यांच्या लिखाणाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्यानंतर वामन तावडे यांनी ‘छिन्न’ हे दोन अंकी नाटक लिहिले. हे नाटक सदाशिव अमरापूरकर यांच्या वाचनात आले आणि त्यांनी ते स्पर्धेसाठी घेतले. या नाटकाचा प्रवास पुढे वामन तावडे यांच्या नाट्यलेखनातील कारकिर्दीला पुढे घेऊन गेला. वामन तावडे यांच्या ‘छिन्न’ या नाटकाने अनेक पारितोषिके मिळवली.
नरेंद्र श्रवणजी लोहबरे यांचा जन्म 16 एप्रिल, 1976 रोजी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामध्ये झाला. व्यवसायाने शिक्षक असलेल्या नरेंद्रजी यांना देश विदेशांतील पुरातन तसेच आर्वाचीन काळामधली नाणी जमविण्याचा फार मोठा छंद आहे
त्याकाळी सुमारे आठ कोटींचं साहित्य स्क्रॅप करण्याऐवजी त्यांनी तेच साहित्य दुसऱ्या कारला असेंबल करण्याचं ठरवलं. त्यांनी ते करुन दाखवलं. हणमंत गायकवाड यांच्या चाणाक्ष बुद्धीची चुणूक टाटा प्रशासनाला आली.
अजीत हे हिंदी चित्रपट सृष्टीतील जुन्या पिढीतील प्रसिद्ध खलनायक अभिनेता होते. त्यांचे खरे नाव हामिद अली खान असे होते.
आज २२ आक्टोबर. प्रसिद्ध बॉलिवूड खलनायक अभिनेता अजीत यांची पुण्यतिथी. अजित यांचा जन्म २७ जानेवारी १९२२ रोजी झाला.
अजीत यांनी जंजीर सिनेमात सेठ धरम दयाल तेजा हे पात्र साकारले होते. अजीत या सिनेमातील मुख्य खलनायक होते. 'जंजीर'नंतर अजीत यांना खलनायकाच्या रुपात वेगळी ओळख मिळाली. खरं तर त्यांनी सिनेसृष्टीतील त्यांची एन्ट्री ही हीरोच्या रुपात झाली होती.
अजित यांचे अनेक डॉयलॉग प्रसिध्द आहेत.
मोना डार्लिंग, सारा शहर मुझे 'लायन' के नामसे जनता है, वाटस युवर प्रॉब्लम?, आई लास्ट मई ग्लासेस, स्मार्ट बॉय , हव वैरी इंटरेस्टिंग...
लिली डोंट बी सिली, मोना लूटलो सोना,
अजित यांचा कालीचरण मधील डायलॉग तर खूप गाजला होता.,तो म्हणजे "मै तुम्हे लिक्वीड ऑक्सीडजनमे रखुंगा. लिक्वीड तुम्हे जीने नही देगा, ऑक्सीतजन तुम्हे मरने नही देगा‘.
अजीत यांचे २२ ऑक्टोबर १९९८ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
नाट्य व चित्रपटसृष्टीत स्वत:च्या अभिनयाने एक वेगळी जागा लाभलेले किशोर चौघुले ह्यांनी आतापर्यंत अनेक नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
१८७६ साली त्यानं जगातील पहिली इंडस्ट्रियल रिसर्च लॅबोरेटरी मेनलो पार्क, न्यूजर्सी येथे चालू केली. पण त्याला प्रसिद्धी मिळवून दिली ती १८७७ साली लावलेल्या फोनोग्राफच्या शोधाने.
त्याने आपल्या ओघवत्या शैलीने अनेक कादंबऱ्या लिहुन अक्षरशः जगाला वेड लावले आणि चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटाशी स्पर्धा असताना, त्याला सर्वोत्कृष्ट कथेसाठी ऑस्कर एवॉर्ड मिळाला.
Copyright © 2025 | Marathisrushti