(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • चित्रकार सावळाराम हळदणकर

    १९२५ मध्ये त्यांना त्यांच्या मॉहमेडन पिलग्रिम या कॅन्व्हासवरील तैलरंगातील फकिराच्या चित्राला बाँबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. त्यांच्या निर्मितीत प्रामुख्याने व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे व पौराणिक विषयांवरील प्रसंगचित्रे यांचा समावेश होतो. जलरंग व तैलरंगया दोन्ही माध्यमांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांतील तंत्रविशिष्ट बारकावेत्यांनी विलक्षण कौशल्याने आपल्या चित्रांतून दर्शविले; पण त्यांनी शुद्ध पारदर्शक जलरंगांत रंगविलेली चित्रे त्यांतील अप्रतिम तंत्रकौशल्यासाठी देश-विदेशात वाखाणली गेली. चित्रांत साधलेले छायाप्रकाशाचे परिणाम, चित्रणासाठी वापरलेल्या कमी-अधिक जाडीच्या रंगछटा व रंगलेपनाचे कौशल्य ही त्यांची शैलीवैशिष्ट्ये जलरंग व तैलरंग या दोन्ही माध्यमांत जाणवतात.

  • माधव कृष्ण पारधी

    “मुसलमानी आमदानीत भारतीय संगीत” हे त्यांनी अभ्यासान्ती लिहिलेले पुस्तक, तर “भारतीय सैन्याची परंपरा” (मूळ लेखक धर्मपाल), “स्वातंत्र्याचा लढा” (बिपिनचंद्र त्रिपाठी), “भारतीय वाद्ये” (चैतन्यदेव) आदी पुस्तके त्यांनी अनुवादित केली.

  • ज्येष्ठ दिग्‍दर्शक आणि निर्माते बी.आर.चोपडा

    धूल का फुल (१९५९), वक्त (१९६५), नया दौर (१९५७), कानून (१९५८), हमराज (१९६७), इन्साफ का तराजू (१९८०) आणि निकाह (१९८२) असे एकापेक्षा एक सरस चित्रपट मा.बी. आर.चोपडा यांनी दिले आहेत. बी. आर. चोपडा यांचा जन्म २२ एप्रिल १९१४ रोजी झाला. भारतीय चित्रपटातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने १९९८ साली बी. आर. चोपडा यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान केला होता. त्याआधी त्यांना १९६० साली कानून चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर आणि १९९८ साली फिल्मफेअर जीवनव्रती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

    मोठ्या पडद्यावरील यशानंतर बी. आर. यांनी आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवून "महाभारत' महामालिका तयार करून ती दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरात पोहोचविली होती. या मालिकेनेही लोकप्रियतेचे शिखर गाठले होते.

    बी. आर.चोपडा यांचे ५ नोव्हेंबर २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • डॉ.नरेंद्र दाभोळकर

    आज १ नोव्हेंबर.. आज मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची जयंती.
    डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला.
    एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही. मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोळकर हे एकमेकांचे समानर्थी शब्द बनून गेलेले होते. मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली. नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या १९८३ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.

    महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’ हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुस्तक. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची पार्श्वभूमी या पुस्तकातील सर्व लेखांना आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनचा विचार, प्रसार, अंगीकार करण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे सूत्र या पुस्तकातील सर्व लेखांच्या मुळाशी आहे. या पुस्तकात धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा केलेली आहे. पुस्तकात छत्तीस लेख आहेत. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांच्यातर्फेचा पहिला समाजगौरव पुरस्कार ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ला दिला होता. भारत सरकारने दाभोळकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार दिला. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र फाउंडेशनने २०१३ सालापासून समाजहितार्थ एखाद्या कार्यात वाहून घेणाऱ्या व्यक्तीला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार सुरू केला आहे. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते. मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचे निधन २० ऑगस्ट २०१३ रोजी झाले. आपल्या समूहातर्फे मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना आदरांजली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • सर्वाधिक वयाचे निवृत्त हयात पोलीस अधिकारी विश्वेश्वर चटर्जी

    इंडियन पोलीस सर्व्हिस हे नावही ज्या काळात 'पोलीस सेवेला दिलं गेलं नव्हतं, त्या काळात पोलीस सेवेत वरिष्ठ पदावर रूजू झालेले आणि निवृत्त हयात पोलीस अधिकाऱ्यांमधले देशभरातले सर्वाधिक वयाचे ज्येष्ठतम पोलीस अधिकारी म्हणून गणले जाणारे विश्वेश्वर चटर्जी रविवारी काळाच्या पडद्याआड गेले. चटर्जी ब्रिटीश सत्ताकाळात पोलीस सेवेत दाखल झालेले १९४० च्या बॅचचे अधिकारी. त्या बॅचच्या अधिकाऱ्यांपैकी ९१ वर्षे वयाचे रणजीत गुप्ता हयात आहेत. बंगालमधल्या सेरामपूरमध्ये गुप्तांनी चटर्जीनंतर सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणून काम केले.

    स्वाभाविकपणेच चटर्जी गेल्याचे कळताच त्यांच्या आठवणी जागवल्या त्या गुप्तांनी. चटर्जी मूळचे अविभक्त बंगालचे. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर चटर्जी पोलीस सेवेत दाखल झाले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास चटर्जी कोलकाता पोलीस दलात उपायुक्त पदावर होते. हाझरातील अॅलेंबरी कंपनीतील कामगार आंदोलन हाताळण्याची जबाबदारी चटर्जीवर होती. चटर्जीनी ते आंदोलन कौशल्याने हाताळलेच, पण गुप्तचर खात्यात काम करीत असताना आपल्यातील अंगभूत नेतृत्वाची, राजकीय विश्लेषणाची आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या चिकित्सक अभ्यासाची चुणूकही राज्यकर्त्यांना दाखवून दिली.

    १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारत-चीन सीमावर्ती भागासाठी स्वतंत्र रक्षक दल स्थापन करण्याचा विचार केंद्र सरकारने केला तेव्हा स्वाभाविकपणेच चटर्जीची निवड त्या दलाच्या प्रमुखपदासाठी करण्यात आली. हा सीमावर्ती भाग सव्वा दोन हजार किलोमीटरचा. त्याचं रक्षण करण्यासाठी लागणारं दल खरं तर कितीतरी मोठ्या संख्येचं. पण प्रारंभी अवघ्या चार बटालियन्सच्या जोरावर दलाचं काम सुरू झालं.

    आज लडाखमधल्या काराकोरम खिंडीपासून अरूणाचल प्रदेशातल्या दिफू ला पर्यंत या दलाचं कार्यक्षेत्र विस्तारलं आहे. माऊंटेनिअरिंग, डिझास्टर मॅनेजमेंटबरोबरच न्यूक्लिअर, बायॉलॉजिकल आणि केमिकल डिझास्टर्स हाताळण्याचं काम हे दल करतं. प्रारंभीच्या काळात इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल नावानं ओळखल्या जाणाऱ्या या दलासाठी स्वंत्र महासंचालक नव्हताच. चटर्जीनी पहिलं दशकभर दलाचे महानिरिक्षक र चटर्जी म्हणून काम पाहिलं, पण या काळात आणि त्यानंतर त्यांनी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाला जो आकार दिला, जी दिशा दिली, तिनं भारताच्या सर्व सुरक्षा दलांमधलं मानाचं दल म्हणून इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल ओळखलं जाऊ लागलं. १९६४ मध्ये एलिंट नावाचं एक गुप्तवार्ता अभियान चालवण्यात आलं. एलिंटचा अर्थ होता, 'इलेक्ट्रॉनिक इंटरसेप्ट अॅण्ड अॅनॅलिसिस ऑफ इंटेलिजन्स'. १६ ऑक्टोबर १९६४ ला चीननं आपल्या पहिल्या अण्वस्त्र उपकरणाची चाचणी केली. चीनची अण्वस्त्रक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढल्याची धास्ती त्या घटनेनंतरच अमेरिका आणि भारताच्या मनात उत्पन्न झाली. चीननं ज्या ठिकाणी ही चाचणी केली ते ठिकाण इतकं सुदूर आणि आडबाजूला होतं की गुप्तचरांकडून त्याविषयीची माहिती सहजासहजी मिळणं शक्यच नव्हतं. सीआयएनं रॉ आणि एव्हिएशन रिसर्च सेंटरच्या सहकार्यानं 'एलिंट' हे शोध अभियान हाती घेतलं ते त्यासाठी. नंदादेवी शिखर मोहीमेच्या नावाखाली एम. एस. कोहली या गिर्यारोहकानं त्या शिखरावर एक शोध-उपकरण बसवायचा प्रयत्न केला. ते उपकरण बसलंही, पण पाठोपाठ हिमवादळ आलं आणि मोहीम अर्धवट सोडून तुकडीला परत यावं लागलं. पुन्हा एकदा तीच मोहीम हाती घेण्यात आली, पण उपकरण जे हरवलं ते हरवलंच. १९७४ मध्ये चटर्जी निवृत्त झाले. निवृत्तीनंतरचा बराचसा काळ त्यांनी सामाजिक सेवांसाठी घालवला. दक्षिण दिल्लीतील सत्यनारायण मंदिराचे ते संस्थापक होतेच पण रायसीना बंगाली स्कूलचेही ते तीन दशकांहून अधिक काळ अध्यक्ष होते. इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशनशी त्यांचे निकटचे संबंध तेव्हापासून राहिले ते अखेरपर्यंत!

  • शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

    खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ रोजी मुंबई येथे झाला.

    श्रीकांत शिंदे यांनी नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. ते एमएस ऑर्थोपेडीक ( MS Orthopaedic) आहेत. वडील एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लहानपणापासूनच राजकारणाचे धडे गिरवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ समाजकार्य केले. त्यानंतर २०१४ मध्ये थेट लोकसभेच्या रिंगणात उतरून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. आपल्या साडेसहा वर्षांच्या काळात श्रीकांत शिंदे यांनी अनेक संसदीय समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

    २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ३ लाख ४४ हजार ३४३ इतके मताधिक्य मिळवून विजय मिळवला.

    गेल्या साडेसहा वर्षांच्या कार्यकाळात श्रीकांत शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघात चांगला जम बसवला आहे.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • मकरंद प्रधान

    देशोदेशी व्यापार करणार्‍या प्रत्येक उद्योजकाकडे कंटेनर भरुन पाठविण्याइतका माल नसतो. अशा कंटेनर पेक्षा कमी आकाराच्या मालाची दाही दिशांना निर्धोक ने-आण करण्याच्या व्यवसायात मकरंद प्रधान यांनी संधी शोधली. त्यांच्या सीपी वर्ल्ड ग्रुपने जगात १४०० कोटी तर देशांतर्गत कंपनीने ३०० कोटींच्या वार्षिक उलाढालीपर्यंत मजल मारली. युरोप, आशिया, अफ्रिका, आखात व अमेरिका अशा जगभर पसरलेल्या उद्योगाबरोबरच प्रधान यांनी भारतातही मोठा विस्तार केला...

    दाही दिशा व्यापाराच्या

  • महान धावपटू फ्लाइंगसीख मिल्खासिंग

    महान धावपटू फ्लाइंगसीख मिल्खासिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.

    मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा स्थित शीख कुटुंबात झाला होता. मिल्खा सिंग यांनी आपल्या जीवनात ८० शर्यतीत भाग घेतला. त्यात ते ७७ वेळेस विजयी झाले. तीन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९५८ मधील कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटरच्या शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलं होतं. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली १९६० च्या रोम ओलिम्पिक स्पर्धेमुळे. त्या स्पर्धेत ४०० मीटरच्या शर्यतीत अगदीच सूक्ष्म फरकानं त्यांचं कांस्यपदक चुकलं होतं.

    रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर शर्यत ४५.७३ सेकंदांमध्ये पूर्ण केली होती. जर्मनीचा धावपटू कार्ल कूफमॅनपेक्षा ते सेकंदाच्या १०० व्या भाग एवढ्या कमी फरकानं मागं राहिले होते. पण त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ त्यानंतर पुढचे ४० वर्षं राष्ट्रीय विक्रम म्हणून कायम होती.मिल्खा कॉमनवेल्थ खेळात वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते.१९५८ च्या टोकियो इथं झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये मिल्खा सिंग यांनी २०० मीटर आणि ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर १९६२ च्या जकार्ता आशियाई स्पर्धांमध्ये ४०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण पदक जिंकलं होतं.

    लष्करात जाण्याची मिल्खा सिंग यांची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला; मात्र तीन वेळा त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांनी लष्करात जाण्याचा विचार सोडला. मिल्खा सिंग यांना 'फ्लाइंग सीख' हे नाव पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आयुब खान यांनी १९६० मध्ये दिले होते. त्या वेळी मिल्खा यांनी पाकिस्तानचा सुवर्णपदक विजेता अब्दुल खालिकला पाकिस्तानातच हरवले होते. मिल्खा सिंगच्या आई-वडिलांचा मृत्यू फाळणीदरम्यानच्या दंगलीमध्ये झाला. मिल्खा यांचे लग्न भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौरसोबत झाले. मिल्खा सिंग यांची पत्नी देखील एक खेळाडू होती. हे अनेक जणांना माहीत ही नसेल कदाचित. दोन महान खेळाडूंच्या मृत्यूमुळे क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. मिल्खा सिंह आणि त्यांची पत्नी निर्मला कौर यांची लव्हस्टोरी वेगळी आहे. मिल्खा सिंह हे पहिल्या नजरेतच निर्मला यांच्या प्रेमात पडले होते.

    मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजर ही खेळाच्या मैदानावरच भिडली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली. मिल्खा सिंग यांचं अनेक मुलींसोबतच्या अफेअरच्या चर्चाही गाजल्या होत्या. एक दोन नव्हे तर तीन मुलींसोबत मिल्खा सिंह यांचं नाव जोडलं गेलं होतं. या मुलींसोबत प्रेमाचे किस्सेही चांगलेच रंगले होते. मात्र मिल्खा यांचा जीव जडला तो मैदानावरच्या हॉलीबॉल खेळणाऱ्या राणीवर.

    1955 मध्ये श्रीलंकेमध्ये मिल्खा सिंग आणि निर्मला कौर पहिली भेट झाली होती. याच ठिकाणी दोघांची एकमेकांशी ओळखही झाली. मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ते पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिला असल्याचा किस्साही फार गाजला आहे.
    पहिल्या भेटीनंतर 1958 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा झाली. 1960 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाली. तेव्हा मिल्खा सिंग खेळातील मोठं नाव बनलं होतं. या काळात कॉफीसाठी एकत्र येताना त्यांचं प्रेम वाढत गेलं.

    दरम्यान या दोघांच्याही लग्नासाठी निर्मला कौर यांच्या घरातून मात्र विरोध होता. मिल्खा सिंग शिख असल्याने निर्मला कौर यांचे वडील दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे लग्नाच्या मार्गात अडथळा येत होता. अशावेळी पंजाबच्या तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.

    १९६२ मध्ये मिल्खा आणि निर्मला या दोघांचं लग्न झालं. मिल्खा सिंग यांनी अनेकदा आपल्या पत्नीचे जाहीरपणे कौतुक केलं केलं होतं. ते आपल्या बायकोला स्वतःची सर्वात मोठी ताकद मानत असत.

    त्यांचा मुलगा जीव सिंग गोल्फचा प्रसिद्ध खेळाडू आहे. भारत सरकारने त्यांना अर्जून पुरस्कार आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

    भाग 'मिल्खा भाग मिल्खा' हा चित्रपट मिल्खा सिंग यांच्या १९४६ ते १९६० पर्यंतच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. यात फरहान अख्तर यांनी मिल्खा सिंग यांचा अभिनय केला आहे. या वयात ही मिल्खा सिंग हे देशातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत असत. यासाठी सरकारनंही त्यांना मदतीचा हात दिला होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचं १३ जून २०२१ कोरोनामुळं निधन झाले होते.

    मिल्खा सिंग यांचे १८ जून २०२१ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • प्रतिभाताई पवार

    शरद पवार ६१ वर्षाचे झाले तेव्हा त्यांचा एकसष्टीचा वाढदिवस त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत साजरा केला होता. त्यावेळी भाषण करताना वाजपेयींनी पवार यांच्या अनेक गुणांचे वर्णन केले होते आणि शेवटचे वाक्य ते असे म्हणाले की, ‘सबसे बडी और महत्त्वपूर्ण बात यह है की, अनेक गुणों से मंडित पवारसाब ‘प्रतिभा’संपन्न भी है।’

  • सुप्रसिद्ध गायक, संगीतकार व निर्माता हेमंत कुमार

    हेमन्ता कुमार मुखोपाध्याय उर्फ हेमंत कुमार यांना संगीताचे औपचारिक शिक्षण मिळाले नव्हते. त्यांचा जन्म १६ जून १९२० रोजी झाला. त्यांचा कुटुंबीयांचा संगीतक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. कोलकाता येथील महाविद्यालयात शिकताना १९३५ साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परिक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला पात्र झाले. गायनात गती असणाऱ्या हेमंत कुमार यांना साहित्यक्षेत्रात देखिल रस होता.

    १९३७ साली त्यांनी लिहिलेली एक लघुकथा आणि गायलेले एक गाणे ह्या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध झाल्या आणि त्यांच्या मधील कलाकार जन्मास आला. वर्षभर विद्युत अभियांत्रिकी शिकल्यावर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 'निमोई संन्यासी' ह्या बंगाली चित्रपटासाठी तर 'ईरादा' ह्या हिंदी चित्रपटांसाठी गाणी गाऊन मा.हेमंत कुमार यांनी चित्रपटातील पार्श्वगायकाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांनी बंगाली चित्रपटासाठी संगीतकार हरि प्रसन्नो दास ह्यांच्या हाताखाली सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणूनही हेमंतदांनी काम केले.

    स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांनी पूर्बोरंग ह्या बंगाली तर आनंदमठ ह्या हिंदी चित्रपटाला संगीत दिले. नागिन चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शित केलेले त्यांची गाणी खूप गाजली. ह्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कारदेखिल मिळाला. गायक म्हणून हेमंत कुमार यांनी हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रातील जवळपास सर्व आघाडीच्या संगीतकारांकडे गाणी गाईली. हेमंत कुमार यांनी मृणाल सेन दिग्दर्शित नील आकाशेर नीचे ह्या चित्रपटाद्वारे चित्रपटनिर्मीती क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या गीतांजली प्रॉडक्शन्स ह्या चित्रपट कंपनीने निर्माण केलेले बीस साल बाद, कोहरा, खामोशी ह्यांसारखे हिंदी चित्रपट त्यांतील गाण्य़ांसकट लोकप्रिय झाले. ह्या सर्व चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शनाची जबाबदारी देखिल हेमंतदांनी यशस्वीपणे संभाळली होती.

    हेमंत कुमार यांनी गायलेली मराठी गाणी ही लोकप्रिय झाली. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, ’मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ ही हेमंत कुमार यांची मराठी गाणी खूपच गाजली. हेमंत कुमार यांचे १६ सप्टेंबर १९८९ यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट