जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
जोशी, बापूसाहेब
‘प्रसाद’ प्रकाशनाचे संस्थापक, साहित्यिक य. गो. जोशी ऊर्फ भाऊ यांच्या अखेरच्या काळातील ही गोष्ट. भाऊंनी त्यांच्या चिरंजीवाला सांगितले, ‘बघ, या व्यवसायात पडणार असशील, तर मी बरीच प्रकाशने करून ठेवली आहेत. ती विकत राहिलास तरी तुझा चरितार्थ चालेल.’ त्यावर चिरंजीव म्हणाले, ‘काय भाऊ, य. गो. जोशींच्या मुलाला तुम्ही स्टॉक विकायला सांगताय. मी तुमच्याही पुढे जाईन.’ भाऊंचे चिरंजीव म्हणजे मनोहर ऊर्फ बापूसाहेब जोशी.
ऐन विशी-बाविशीतच बापूसाहेब वडिलोपार्जित प्रकाशन व्यवसायात उतरले, प्रसाद मासिकाचे संपादक झाले आणि व्यवयासात यश मिळवत, कर्तृत्वाचा ठसा उमटवत त्यांनी वडिलांना दिलेला शब्द खरा करून दाखवला. बापूसाहेब म्हणजे सदाप्रसन्नता, उत्साह आणि उमदेपणा. बापूसाहेबांचे गेल्या शुक्रवारी पुण्यात निधन झाले. सदाशिव पेठेतील प्रसाद प्रकाशनाच्या कार्यालयात आता बापूसाहेबांचा दरबार पुन्हा कधीच भरणार नाही, ही कल्पनाही खूप वेदना दायक आहे. मराठी ग्रंथांसाठी ठेव म्हणून रक्कम ठेवा, ठेवीच्या व्याजातून ग्रंथ मिळवा आणि मुदतीनंतर ठेव परत न्या, अशी अभिनव योजना बापूसाहेबांनीच १९८० मध्ये प्रथम आणली आणि पुढे अशा सहा योजना त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. या योजनांमधील ९९ ग्रंथांपैकी ८४ ग्रंथ आजवर प्रसिद्ध झाले आहेत आणि उर्वरित प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. ‘आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे,’ ‘सुबोध शांकर ग्रंथावली,’ ‘देवभाषेचे देणे: मराठीचे लेणे’ या ग्रंथ ठेव योजना मोठय़ा प्रतिसादाने पूर्ण झाल्या आणि ‘समर्थ वाग्वैजयंती,’ ‘अभिनव प्रसन्न दर्शन’ ‘पंचमहाकाव्ये’ या योजनातील ग्रंथ प्रसिद्धीचे काम सुरू आहे. भारतीय संस्कृतीची सर्वार्थाने नव्याने ओळख करून देणारे बापूसाहेबांचे हे ग्रंथप्रकल्प यशस्वी झाले ते त्यांच्या परिश्रमांमुळे, बिनचूक नियोजनामुळे, अफाट लोकसंग्रहामुळे आणि पारदर्शी व्यवहारांमुळे. गेली ५० वर्षे ‘प्रसाद’ मासिक प्रसिद्ध करताना त्यांनी दरवर्षी एक दैवत विशेषांक प्रसिद्ध करण्याची योजना सलग २८ वर्षे चालवली. त्यानंतर नद्यांवरील विशेषांक प्रसिद्ध केले. प्रत्येक दिवाळी अंकात ते एक विस्तृत संतचरित्र प्रसिद्ध करीत असत. त्यांचे हे सारे विशेषांक आजही संदर्भग्रंथासारखेच वापरले जातात. प्रकाशनाचा व्याप सांभाळतानाच प्रसिद्ध श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त म्हणूनही बापूसाहेबांनी अतिशय उत्साहाने सुमारे २५ वर्षे काम पाहिले. बापूसाहेबांवर मराठी वाचकांनी मोठा विश्वास दाखवला. ‘आमची ठेवीची रक्कम परत नको. आमचे पैसे तुमच्या चांगल्या कामासाठीच वापरा,’ असे सांगून अनेक ठेवीदार मुदत संपल्यानंतर त्यांची ठेव बापूसाहेबांनाच परत देत असत. असे प्रेम करणारे वाचक बापूसाहेबांना लाभले आणि तीच त्यांची प्रकाशन व्यवसायातील ‘मोठी ठेव’ ठरली. बापूसाहेबांच्या बरोबरीने त्यांची कन्या उमा बोडस याही गेली दोन दशके प्रकाशनाचे काम पाहत आहेत. बापूसाहेबांनी हाती घेतलेल्या अनेक योजना पुढे नेण्याची जबाबदारी आता या पुढच्या पिढीकडे आली आहे.
आयबीएम कंपनीत काम करीत असताना जॉजॅ लॉरर यांनी युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड म्हणजे बारकोड विकसित केले होते. हा बारकोड वाचण्यासाठी लागणारा स्कॅनरही त्यांनी विकसित केला.
डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर हे लेखक, प्राच्यविद्या संशोधक होते.
स्कूबी हा कुत्रा आणि त्याला पाळणारे मित्रमंडळ, कोठेही काही चुकीचे घडत असेल तर तेथे पोहोचते पण दांडगटांपुढे आपले काही चालणार नाही असे त्यांना वाटत असतानाच स्कूबीच्या करामतींमुळे, दुष्टांना धडा शिकवला जातो, अशा स्वरूपाची ही मालिका मुळात जॉन केनेडींच्या हत्येनंतर, ‘चित्रवाणी सचेतपटांमध्ये फार हिंसाचार असतो’ या तक्रारीला उत्तर म्हणून सुरू झाली.
नाशिकच्या राजकीय क्षितीजावर ज्या झपाट्याने नीलेश चव्हाण हे नाव उदयास आले तितक्यात वेगाने हा उमदा तरुण जीवनपटावरून अस्तंगत होईल, याची कुणी कल्पनाही केली नसावी.
मीना कपूर यांचे वडील विक्रम कपूर हे कलकत्त्याच्या न्यू थिएटर्स स्टुडिओचे अभिनेते होते. चित्रपट निर्माते पी.सी. बरुआ हेही त्यांचे नातेवाईक होते. यांमुळे कपूर यांचा चित्रपटात प्रवेश सुकर झाला. मीना कपूर यांनी आपल्या लहानश्या करीयरची सुरवात १९४६ साली नीनु मुजुमदार यांच्या आठ दिन या चित्रपटापासून केली. याला संगीत एस.डी.बर्मन यांचे हो. गायिका मीना कपूर या संगीतकार अनिल विश्वास यांच्या पत्नी. मीना कपूर यांचा संगीतकार अनिल विश्वास यांच्याशी १९५९ मध्ये विवाह झाला.
मीना कपूर यांचे नाव घेताच चटदिशी आठवते ते गाणे म्हणजे "कुछ और जमाना केहता है" हे 'छोटी छोटी बाते' या स्वर्गीय मोतीलाल निर्मित चित्रपटातील अनिल विश्वास यानीच संगीतबद्ध केलेले सुरेख गीत, जे नादिरा यांच्यावर चित्रीत झाले होते. 'परदेसी' मधील 'रसिया रे मन बसिया रे' हे एक आणि "आँखे" मधील 'मोरे अटरिय पे कागा' हे आणखीन एक प्रकर्षाने आठवणारे गीत. अनिलदांच्या निधनानंतर 'अमर उत्पल' या त्यांच्या मुलांजवळ राहात असत अमर उत्पल या जोडीने बिग बी च्या 'शहेनशहा' चे संगीत दिग्दर्शन केले होते. मीना कपूर यांनी १२५ हून अधिक गाणी गायली होती. यातील सी रामचंद्र यांच्या बरोबरचे मेरी जान संडे के संडे', व'रसिया रे मन बसिया रे' ही त्यांची गाजलेली गाणी. मीना कपूर यांचे २३ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मीना कपूर यांची गाणी
https://www.youtube.com/playlist…
मेरी जान संडे के संडे'
https://www.youtube.com/watch?v=eQT_HmOUdRc
https://www.youtube.com/watch?v=Va739fEuuZg
नाटयसमीक्षक, नाटककार, चरित्रकार असलेले वसंत शांताराम देसाई यांनी नाटयक्षेत्रात बरेच कार्य केलेले आहे. वसंत देसाई यांचा जन्म २७ डिसेंबर १९०४ साली इंदूर येथे झाला. त्यांचे वडील हे होळकर कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. १९२८ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर वसंत देसाई यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याच काळात मराठी रंगभूमी आणि बालगंधर्व हे अवघ्या महाराष्ट्रात गाजत होते, नाटक आणि बालगंधर्व यांच्याबद्दल अतिशय ओढ वाटून नाटक कंपनीतील अनेक नटांशी आणि नाटककारांशी त्यांनी ओळख करुन घेतली. त्याच काळात एल. एल. बी. ची पदवीही त्यांनी मिळविली आणि पुण्यात वकिली सुरु केली. परंतु रंगभूमीचा त्यांनी ध्यास घेतला होता. १९२७ मध्ये वसंत देसाईंना बालगंधर्व यांनी नाटक लिहायला सांगितले. विधिलिखित‘ हे पहिले वसंतरावांनी लिहिले बालगंधर्वानी ते रंगभूमीवर आणले. त्यानंतर ‘अमृतसिध्दी‘ हे नाटक तर त्यांनी लिहिलेच परंतु त्यातील, पदेसुध्दा त्यांनीच लिहिली. ही पदे आणि नाटक दोन्हीला चांगलीच प्रसिध्दी मिळाली. गडकरींच्या प्रेमसन्यासासाठी सुध्दा त्यांनी पदे लिहिली होती. उपवनी गात कोकीळा, सखे मी मुरारी‘ ही हिराबाई बडोदेकरांनी गायलेली पदेसुध्दा वसंतरावांनीच लिहिली होती. वसंत देसाई यांनी नाटयविषयक, रंगभूमीविषयक बरेच लेखन केले आहे. ‘कुलीन स्त्रिया आणि रंगभूमी‘, कलेचे कटाक्ष, ‘मखमलीचा पडदा‘ नट, नाटक आणि नाटककार, इत्यादी पुस्तके तर विद्याहरणाचे अंतरंग , खाडिलकरांची नाटयसृष्टी इत्यादी नाटयसमीक्षा आणि कलावंतांच्या सहवासात , बालगंधर्व व्यक्ती आणि कला, रागरंग इत्यादी ग्रंथांतून त्याचे लेखन प्रकाशित झालेले आहे. विष्णूदास भावे, किर्लोस्कर, देवल, खाडिलकर, गडकरी, गणपतरव जोशी, कोल्हटकर, केशवराव भोसले. भास्करबुवा बखले, गणपतराव बोडस केशवराव दाते, दिनानाथ मंगेशकर, हिराबाई बडोदेकर, ज्योत्सना भोळे अशा अनेक कलावंतांवर त्यांनी लेखन केलेले आहे. अंशीच एकाची गोष्ट हे त्यांचे आत्मचरित्र चांगले गाजले. बडोदा येथे भरलेल्या अखिल भारतीय नाटयसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. अशा या श्रेष्ठ रंगधर्मीचे २३ जून १९९४ रोजी निधन झाले.
वसंत देसाई यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार वसंत शांताराम देसाई (27-Dec-2018)
नाटककार वसंत शांताराम देसाई (27-Dec-2021)
एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्या लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जातात. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ सालचा. पूर्वाश्रमीच्या त्या सरकार घराण्यातील. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध आहेत.
कादंबरीकार होण्याच्या आधी गुलशन नंदा दिल्लीतील बल्लीमारान भागात एका चश्माच्या दुकानात काम करत होते. गुलशन नंदा यांना एकदा बसने प्रवास करत असताना एकाने लिखाण करण्यास सांगितले व ते यशव्वी कादंबरीकार आणि हिंदी पटकथा झाले. साठच्या दशकात गुलशन नंदा हे लेखक पॉकेट बुक्सच्या पहिल्या पिढीतले तळपणारे तारे होते.
गुलशन नंदा यांच्या कादंबर्यांकनी विक्रीची नवनवीन विक्रम प्रस्थापित करतांनाच बॉलीवुडला कटी पतंग, दाग, अजनबी, नया जमाना, झील के उस पार, शर्मिली, खिलौना, आदींसारखे जवळपास २५ सुपरहिट चित्रपटही दिलेत.
गुलशन नंदा यांच्या हिंदी कादंबर्यावर जितके हिंदी चित्रपट निघाले तितके हिंदी चित्रपट इतर कोणत्याही हिंदी लेखकाच्या कादंबऱ्यांवर निघाले नसतील.
गुलशन नंदा यांचे निधन १६ नोव्हेंबर १९८५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पीटर सेलर्स यांनी आपल्या करीयरची सुरुवात स्टेज कलाकार म्हणून किंग्स थिएटर, साउथसी पासून केली.
Copyright © 2025 | Marathisrushti