जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ठाणे येथे सुरुवात करुन गेली ४५ वर्षे योगप्रसारासाठी सर्वस्व अर्पण करणारे ज्येष्ठ योगाचार्य श्रीकृष्ण उर्फ अण्णा व्यवहारे हे ठाणे शहराचे एक भूषण होते. २६ जानेवारी १९६५ रोजी त्यांनी घंटाळी मित्र मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसह अण्णांनी योगसाधनेची चळवळ ठाणे शहरात उभी केली.
हिमालयातील एव्हरेस्टसह जगातील चार सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करणारा आनंद बनसोडे हा सोलापूरचा तरुण महाराष्ट्रातील तमाम युवकांना प्रेरणावत ठरला आहे! त्याची शिखर सर करण्याची जिद्द आणि त्याने त्यासाठी केलेला संघर्ष जाणून घेताना आनंद बनसोडेबद्दल कौतुकच मनी दाटते.
हा सामना तीन दिवसांचा होता. मध्यमतेज गोलंदाज मोहंमद निसार यांनी (९३-५) सलामीवीरांना झटपट माघारी धाडल्याने पहिल्या तासातच ३ बाद १९ अशी यजमानांची वाईट अवस्था झाली.
ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक काशिनाथ बोडस यांचे ख्याल, तराना आणि भजन यावर प्रभुत्व होते.
मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी असताना गिरीश कुलकर्णी मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये आला. हा मुलगा पुस्तकातील मॅकॅनिक्स सिनेमामध्ये कसे वापरेल, सिनेमा काढण्यात तो यशस्वी होईल की नाही, अशा अनेक शंका सुरुवातीला होत्या. मात्र, गिरीश नि:संदेह होता. सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना अपील होणारा सिनेमा आपल्याला काढायचाय आणि त्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा पक्का आत्मविश्वास त्याला होता. त्याच्या या विश्वासानं आणि केलेल्या प्रयत्नानं 'वळू', 'विहीर', 'गाभ्रीचा पाऊस', 'देऊळ' हे उत्कृष्ट सिनेमे मराठी चित्रपटसृष्टीला मिळाले.
मराठी सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षकांना थिएटरकडे वळवण्यात हे सिनेमे महत्त्वाचे ठरले. यावर्षीचा उत्कृष्ट अभिनेता आणि संवादाचा तसंच 'देऊळ'ला बेस्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर गिरीशचं सिनेमा मेकिंगचं टॅलेंट पुन्हा एकदा अधोरेखित झालं. 'तुझा सिनेमा शहरी आणि ग्रामीण भागातील प्रेक्षकांना अपील होतो, हा मेळ साधणं कसं शक्य होतं,' यावर गिरीशचं एकच उत्तर असतं. ते म्हणजे,' आधी मीच माझ्या सिनेमाचा प्रेक्षक असतो. मला आवडला, तरच तो सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना आवडेल असा निष्कर्ष मी काढतो.' आवर्जून पाहावेत असे मराठी सिनेमा आता येत नाहीत, अशी ओरड मध्यंतरी होती. त्यावर 'इतर कुणी मराठी सिनेमा काढत नाही ना, मग आपणच काढू,' या ध्यासानं गिरीशनं कामाला सुरुवात केली. आज त्याचे 'रिझल्ट्स' 'वळू', 'देऊळ'च्या रूपात पाहायला मिळताहेत.
गिरीशला शाळेत असल्यापासूनच नाटकांची आवड. मॅकेनिकलचं शिक्षण घेत असताना नाटकांविषयीची आवड त्याला शांत बसू देत नव्हती. त्यामुळे अभ्यास सांभाळून प्रायोगिक नाटकंही तो करत होता. मध्यंतरी एका रेडिओ स्टेशनसाठी प्रोग्रामिंग हेड म्हणूनही त्यानं काम केलं. मग त्याला सिनेमाचे वेध लागले. या प्रवासात दहावीपासून मित्र असलेल्या उमेश कुलकर्णीची साथ त्याला मिळाली. उमेश एफटीआयआयमध्ये शिक्षण घेत होता. त्यामुळे गिरीशासाठी उमेश सिनेनिमिर्तीसाठी एक 'इन्स्टिट्यूट' झाला. सिनेमा मेकिंगमधल्या तांत्रिक गोष्टी कळण्यासाठी उमेश त्यासाठी माध्यम बनला. मग काय, या जोडगोळीनं मराठी सिनेइंडस्ट्रीला सोन्याचे दिवस देण्यासाठी एकदम भरारीच घेतली. आज ही भरारी यशस्वी ठरली आहे. यापुढेही मायबाप प्रेक्षकांना गिरीश-उमेशनं केलेले उत्कृष्ट सिनेमे पाहायला मिळतील, अशी अपेक्षा करणं नक्कीच फोल ठरणार नाही.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
गिरीश कुलकर्णी
गिरीश कुलकर्णी हा मराठीमधील नामांकित व सध्याचा आघाडीचा कथा व पटकथाकार आहे. वळू, विहीर, आणि देऊळ यांसारख्या दर्जेदार व यशस्वी चित्रपटांच्या कथा व पटकथा लिहून त्यांने सर्वसामान्य रसिकांच्या मनामध्ये मानाचे स्थान पटकाविले आहे. उमेश कुलकर्णी ने प्रथमच दिग्दर्शित केलेल्या गिरणी या डिप्लोमा फिल्मच्या कथेचे व पटकथेचे लेखन गिरीश कुलकर्णीच्या सक्षम व प्रभावी लेखणीकडून घडले. तो जस हाडाचा लेखक व कथाकार आहेच, तितक्याच नैसर्गिकरित्या तो अभिनयदेखील करू शकतो हे त्याने सिध्द केले आहे. गाभ्रीचा पाऊस या सतिश मनवर दिग्दर्शित चित्रपटातील दुष्काळाने पिडीत कर्जबाजारी शेतकर्याची भूमिका त्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्तम अभिनेत्याचे पारितोषिक मिळवून गेली. आज गिरीश त्याच्या बहुस्पर्शी कर्तुत्वामुळे लाखो मराठी तरूणांचा आदर्श ठरला आहे.
भारतीय चित्रपटामधील झंझावती अभिनेत्री म्हणून ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते अश्या काही मोजक्या स्त्रीकलाकारांमधील ‘शांता आपटे’ हे नाव वर्तमानकाळातील कलाकारांना प्रेरणा देत आहे. त्याकाळात पार्श्वगायनाची संकल्पना रुजली नसल्याने बहुदा गायक-गायिका या रुपेरी पडद्यावर भूमिका करत; पण शांता आपटे म्हणजे जायन आणि चतुस्थ अभिनयाचा आविष्कार होत.
श्रीराम ताम्रकर हे त्यांच्या चाहत्यांमध्ये ‘चित्रपटसृष्टीचा विश्वकोश’ म्हणून लोकप्रिय होते. मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाने २०१० मध्ये दादासाहेब फाळके अकादमीचा ‘ज्येष्ठ चित्रपट पत्रकार पुरस्कार’ आणि ‘बेस्ट फिल्म क्रिटिक’ पुरस्कार यांच्यासह त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
प्रख्यात लेखक व आत्मचरित्रकार म्हणून माधव कोंडविलकर हे महाराष्ट्र तसंच साहित्य रसिकंना परिचयाचे आहेत. माधव कोंडविलकरांनी लिहिलेल्या “मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे” नामक आत्मकथनाने तमाम वाचकवर्गावर आपली अनोखी छाप उमटविली होती. तरूण पिढीच्या असंख्य अव्यक्त महत्त्वाकांक्षांचे भावस्पर्शी चित्रण या आत्मचरित्रात करण्यात आले आहे.
“अजून उजाडायचं आहे”, “काहिली”, “अनाथ”, “वेध”, “भूमीपुत्र”, “डाळं”, “घालीन लोटांगण”, “हाताची घडी तोंडावर बोट”, “एक होती कातळवाडी” या पुस्तकांचं त्यांनी लेखन केले आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
इटावामध्ये करीमुद्दीन आसिफ उर्फ के. आसिफ यांचे वडील फाजल करीम हे डॉक्टर होते. त्यांचा जन्म १४ जून १९२२ रोजी झाला.चित्रपट क्षेत्रात करिअर करण्यासाठी के. असीफ नंतर मुंबईला गेले. तेथे त्यांनी फेमस फिल्म लॅब येथे नोकरी केली. त्यांच्या मनात चित्रपट काढण्याचे खूळ होते. या संस्थेचे मालक सिराज अली हकीम यांनी त्यांच्या गोष्टी ऐकून त्यास भांडवल द्यायचे कबूल केले. त्या वर त्यांनी फूल नावाचा एक चित्रपट काढला व त्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. त्यानंतर त्याने आपले नाव के. आसिफ असे केले. त्याच्या वाचण्यात मुगल-ए-आझम नावाचे नाटक आले.
मुघल-ए-आझम’ या चित्रपटाचा इतिहास.
‘‘१९२२ साली इम्तियाझ अली ताज या लेखकाने लिहिलेलं ‘अनारकली’ हे नाटक लाहोरमध्ये सादर झालं. के. आसिफ यांनी ते पाहिलं आणि त्यानं ते एवढे भारावले, की यावर आपण सिनेमा बनवायचाच, या ध्यासानं त्यांना पछाडलं. पण मनात आलं म्हणून सिनेमा बनवता येत नाही. त्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. १९४० मध्ये के. आसिफ यांचं हे स्वप्न सत्यात येईल अशी आशा निर्माण झाली. निर्माते शिराझ अली यांच्या साथीने त्यांनी या चित्रपटाचं काम सुरू केलं. मात्र, बॉम्बे टॉकिजमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू व्हायला प्रत्यक्षात १९४६ साल उजाडलं. चंद्रमोहन (अकबर), डी. के. सप्रू (सलीम) आणि नर्गिस (अनारकली) हे त्यात प्रमुख भूमिकेत होते. चित्रपट काहीसा मार्गी लागत असतानाच १९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणी झाली आणि चित्रपटाचं काम थंडावलं. शिराझ अली पाकिस्तानला निघून गेले. त्यांनी के. आसिफ यांना सुचवलं, की तुम्ही उद्योगपती शापूरजी पालनजी यांना भेटा, ते या सिनेमाला फायनान्स करतील. खरं तर शापूरजी पालनजींचा सिनेसृष्टीशी काहीच संबंध नव्हता. परंतु तरीही त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली याचं कारण- त्यांचं इराणी कनेक्शन आणि अकबरबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी. म्हणून त्यांनी अट घातली की, चित्रपटाचं नाव ‘मुघल-ए-आझम’ ठेवायचं. खरं तर ही सलीम-अनारकली यांची प्रेमकहाणी; परंतु निर्मात्यांच्या आग्रहाखातर सिनेमाचं नाव ठेवलं गेलं- ‘मुघल-ए-आझम’!’’ ‘‘पण अडचणी इथंच संपल्या नाहीत. सिनेमातील कलाकार चंद्रमोहन यांचं दरम्यान निधन झालं. त्यामुळे हा चित्रपट डबाबंद करावा लागला. आणि पुन्हा नव्यानं दिलीपकुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे आदी कलाकार घेऊन चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं. या सिनेमाच्या निर्मितीवर तेव्हा सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च झाले. प्यार किया तो डरना क्या या एकाच गाण्यासाठी त्यांनी ३५ लाख रूपयांचा सेट उभारला. या एका गाण्यावरच झालेल्या खर्चात तेव्हा एक सिनेमा निघाला असता असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या कारणास्तव हाही सिनेमा बरीच वर्षे रखडला. चित्रपटाच्या निर्मितीखर्चानं निर्माते मेटाकुटीस आले. पण के. आसिफना आपल्या भव्य-दिव्य स्वप्नापुढे कशाची तमा नव्हती. शेवटी एकदाचा चित्रपट तयार झाला. प्रदर्शितही झाला. पुढचा इतिहास सर्वानाच ज्ञात आहे. मुंबईत ५ ऑगस्ट १९६० रोजी मराठा मंदिर चित्रपटगृहात तो झळकताना अॅ डव्हान्स बुकिंगसाठीच्या प्रचंड धक्काबुक्कीत एकावर चाकूने हल्ला झाल्याचा किस्सा आजही रंगवून सांगितला जातो. फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी तर हत्तीवरून वाजत-गाजत प्रिंट आणत. मुळचा हा कृष्णधवल चित्रपट (अपवाद फक्त प्यार किया तो डरना क्याफ गाण्याचा) २००३ च्या दिवाळीत रंगीत स्वरूपात दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित करतानाही इरॉस चित्रपटगृहात त्याची प्रिंट अशीच हत्तीवरून आणली होती. मराठा मंदिरला सलग तीन वर्षे तो हाऊसफुल्ल गर्दी खेचत होता. ‘शोले’ येई तो ‘मुघल-ए-आझम’चा हा विक्रम अबाधित राहिला. त्याकाळी एकाच वेळी देशातल्या १५० चित्रपटगृहांत हा सिनेमा प्रदर्शित केला गेला. हाही तेव्हाचा विक्रम होता. उत्पन्नाचे नवे मापदंड ‘मुघल-ए-आझम’ ने निर्माण केले. हा चित्रपट पूर्ण झाला व एक अजरामर कलाकृती निर्माण झाली. मा.के. आसिफ यांच्या मा.सितारादेवी या पत्नी. मा.के.आसिफ यांचे ९ मार्च १९७१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
के.आसिफ यांचा मुघल-ए- आझम चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=WLKUdiTCrkg.
आपली विदेशी खेळणी, कपडे त्यांनी विदेशी कपड्यांच्या होळीत टाकून दिले. वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे १९३० साली त्यांनी आपल्या सवंगड्यांची वानरसेना स्थापन करून नेत्यांचे संदेश पोचवण्याचे काम केले. ब्रिटिशां विरुद्ध मिरवणुका काढल्या, घोषणा दिल्या, या सर्व गोष्टीबरोबर शिक्षणही चालूच ठेवले.
Copyright © 2025 | Marathisrushti