(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चित्रपट पत्रकार, समीक्षक इसाक मुजावर

    हिंदीप्रमाणे मराठी चित्रपटांवर त्यांनी प्रकाश टाकला. हिंदीमधीलदेखील राज कपूर, देव आनंद, बी. आर. चोप्रा यांच्यासह अनेक कलावंतांसोबत त्यांनी प्रत्यक्ष सेटवर जाऊन त्या काळी लिखाण केले. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, नायक, नायिका, संगीतकार, गीतकार, विनोदी कलावंत, खलनायक या सर्वांसोबत त्यांची बातचीत आजही त्यांच्या ध्यानात आहे.

  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे  विक्रम सावरकर

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कट्टर अनुयायी, सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक, हिंदूमहासभेचे ज्येष्ठ नेते, ‘प्रज्वलंत’चे संपादक अशी विक्रम सावरकर यांची ओळख होती.

  • पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर

    हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे गायक पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर यांचा जन्म १ जानेवारी १९०० रोजी झाला.

    त्यांचे वडील श्री नारायण गोविंद रातंजनकर हे ब्रिटिश राजवटीत पोलिस अधिकारी होते, तसेच उत्तम सतारवादकही होते. वयाच्या सातव्या वर्षी श्रीकृष्ण नारायण रातंजनकरांनी कारवारच्या पं. कृष्णम् भट्ट (कृष्णभट्ट होनावर) यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांना ग्वाल्हेर घराण्याचे पं.अनंत मनोहर जोशी व नंतर आग्रा घराण्याचे उस्ताद फैय्याज खान यांचेही मार्गदर्शन लाभले. किशोर वयातच त्यांनी अनेक संगीत परिषदांना आपली उपस्थिती लावली. १९११ मध्ये त्यांनी गायक व संगीतज्ञ पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली व आजमितीला ते भातखंडेबुवांचे सर्वात ख्यातनाम शिष्य मानले जातात. १९२६ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यांनी लखनौच्या भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट चे मुख्याध्यापकपद कैक वर्षे भूषविले व संगीत क्षेत्रातील अनेक नामी मंडळींना संगीत शिक्षण दिले.

    पं.रातंजनकर हे अनेक वर्षे लखनौ येथील भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. नंतर त्यांची छ्त्तीसगड राज्यातील खैरागढ येथील इंदिरा संगीत कला विश्व विद्यालयाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. तिथून त्यांना पुन्हा भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी २ वर्षांसाठी आमंत्रित केले गेले. मुंबईच्या भारतीय विद्या भवनाच्यी ’भातखंडे संगीत आणि नर्तन विद्यापीठा’ची स्थापना रातंजनकरांनी केली. तसेच शीव येथील ’श्रीवल्लभ संगीतालय’ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आकारास आले. त्यांच्या शिष्यवर्गात के.जी. गिंडे, चिदानंद नगरकर, व्ही.जी. जोग, दिनकर कैकिणी, शन्नो खुराणा, सुमती मुटाटकर, आचार्य प्रभाकर चिंचोरे, सी.आर. व्यास, पं.एस.सी.आर. भट्ट, चिन्मय लाहिरी व संगीत दिग्दर्शक रोशनलाल यांचा समावेश होतो. त्यांनी आग्रा घराण्याच्या ध्रुपद व ख्याल शैलीतील अनेक रचना गायल्या.

    आपले उस्ताद भातखंडेबुवा यांप्रमाणेच त्यांनी ८०० पेक्षा जास्त चिजा रचल्या. या चिजा त्यांनी 'सुजन' या टोपणनावाने बांधल्या होत्या. त्यांचे शिष्य के.जी. गिंडे यांनी त्या चिजांची पद्धतशीरपणे कागदोपत्री नोंद करून ठेवली आहे. त्यांनी अभिनव गीतमंजरी, अभिनव संगीत शिक्षा, तानसंग्रह, हिंदुस्थानी संगीताची स्वरलिपी, यांसारखी अनेक पुस्तकेही लिहिली. तसेच रजनी कल्याण, केदार बहार, सावनी केदार, मार्ग बिहाग, यमनी बिलावल, सालग वराळी, गोपिका वसंत, हंसरंजनी अशा नव्या रागांचीही रचना पंडित रातंजनकरांनी केली. अण्णासाहेब रातांजनकर यांचे १४ फेब्रुवारी १९७४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • अॅडगुरु आणि अभिनेते अशी ओळख असलेले अॅलेक पद्मसी

    अभिनेता अशी ओळख असली तरी त्यांची जाहिरात क्षेत्रातील गुरु म्हणून ख्याती होती. त्यांचा जन्म ५ मार्च १९३१ रोजी झाला. अॅडगुरु असलेल्या पद्मसी यांची भारतातील अव्वल दर्जाची जाहिरात एजन्सी होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक प्रसिद्ध कंपन्यांसाठी जाहिराती बनविल्या.

    'गांधी' या ऐतिहासिक चित्रपटात मोहम्मद अली जिनाह यांची भूमिका पद्मसी यांनी केली होती.
    'ब्रँड फादर ऑफ इंडियन अॅडव्हर्टायजिंग' असे त्यांना ओळखले जायचे. 'सर्फ', 'लिरील गर्ल', 'चेरिंग ब्लॉसम शु पॉलिश', 'हमारा बजाज', 'एमआरएफ मसल मॅन' अशा अनेक प्रसिद्ध जाहिरातींची निर्मिती त्यांनी केली.

    जाहिरात क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना २००० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच मुंबईतील अॅडव्हर्टायजिंग क्लबतर्फे 'अॅडव्हर्टायजिंग मॅन ऑफ द सेंच्युरी' असे गौरविण्यात आले होते. संगीत नाटक अकादमीतर्फे २०१२ मध्ये टागोर रत्न पुरस्कार दिला होता. अलेक पदमसी यांचे १७ नोव्हेंबर २०१८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • संजय केळकर

    श्री संजय केळकर हे ठाणे शहराचे आमदार आहेत. ते २०१४ च्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. १९८५ पासून सतत शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ केळकर यांनी २०१४ मध्ये काबिज करुन शिवसेनेला धक्का दिला.

    ते राजकारणासोबतच विविध सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत.

    # Sanjay Mukund Kelkar
    BJP MLA - Thane Constituency

  • ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेले

    पेलें यांना ब्रिटनच्या राणीने ‘सर’ हा किताब दिला. रोनाल्ड रेगन अमेरिकेचे अध्यक्ष असताना अमेरिकन कॉग्रेसने त्यांचा सत्कार केला.

  • आंनदयात्री कवी बा भ.बोरकर

    आंनदयात्री कवी बा भ.बोरकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९१० रोजी गोव्यातील कुडचडे येथे झाला.
    देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके,
    चांदणे ज्यातून वाहे, शुभ पाऱ्यासारखे.
    असे देखणे जीवन जगणारे, आणि रसिकांना भरभरून आनंद देणारे आंनदयात्री कवी! बाळकृष्ण भगंवत बोरकर उर्फ बा भ. बोरकर.

    १९३० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच बा भ. बोरकर यांचा प्रतिमा हा काव्यसंगह प्रकाशित झाला. त्यांच्या या काव्यसंगहावर केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांचा प्रभाव होता. मा.बोरकरांच्या मनावर घरातील धार्मिक वातावरण, प्रेमळ आप्त परिवार, शालेय जीवनातील संस्कार आणि गोव्याचा व कोकणचा रमणीय निसर्ग यांचा खोल परिणाम झालेला त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो.

    निसर्गाच्या भव्योत्कट सौंदर्याचा त्यांना जणू ध्यास जडला होता. निसर्ग हीच त्यांची भाषा बनली; त्यांच्या अविष्काराचे माध्यम बनले. गोव्याच्या निसर्गरम्य भूमीचे वर्णन ते पुढील शब्दांत करतात, - या गोव्याच्या भूमीत मधाचे नारळ असतात. कड्याकपारीतून दुधाचे घट फूटतात; आंब्या फणसांची रास असते. इथे चांदणे माहेरी येते आणि पावसात दारापुढे सोन्या-चांदीच्या धारा खेळतात... किती नितांत सुंदर आणि अत्यंत कल्पनारम्य, पण जिव्हाळ्याने केलेले हे वर्णन आहे! त्यांच्या सर्वच प्रकारच्या लेखनात, विशेषत: कवितेत नियमितपणे निसर्ग डोकावतो. निसर्ग भाषा हेच त्यांचे वेगळेपण.

    १९३२ साली बोरकरांच्या कवितेने भारावून जाऊन श्रेष्ठ कवी मा.भा. रा. तांबे यांच्या तोंडून Here is a new star on horisen असे कौतुकाचे उद्गार निघाले. १९३४ मध्ये बडोदा येथील साहित्य संमेलनात तेथे कर माझे जुळती या कवितेसाठी त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले.

    कवीवर्य भा. रा. तांबे यांच्या विचारसरणीचा, काव्यशैलीचा त्यांच्यावर खूप परिणाम झालेला दिसतो. एकलव्यासारखे तांबे यांचे गुरुपद त्यांनी मनोमन स्वीकारले व मानाने मिरवलेही. त्यामुळे तांब्यांच्या घराण्याची गायकी पुढे नेणारे कवी अशी त्यांची प्रतिमा झाली. मा.बोरकरांचे वि. स. खांडेकर, काकासाहेब कालेलकर, कुमार गंधर्व, पु.ल.देशपांडे, चित्रकार दलाल, यांच्यासह म. गांधी, डॉ. लोहिया, पं. नेहरू, योगी अरविंद बाबू यांसारया विविध प्रांतांतील थोर लोकांबरोबर स्नेहपूर्ण नाते होते. त्यामुळे त्यांचे अनुभवविश्र्व व जीवन अधिक समृद्ध झाले. कोकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळावा, असा त्यांचा आग्रह होता .भारत सरकारने ‘पद्मकश्री ’ हा किताब देउन त्यांचा गौरव केला होता. गोव्याच्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना ताम्रपट मिळाला होता. मा.बा भ. बोरकर यांचे ८ जुलै १९८४ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    बा भ. बोरकर यांची मा.पु.ल.देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत
    https://www.youtube.com/watch?v=JbqvWiVvJoI
    https://www.youtube.com/watch?v=gFFLRyizEKQ

    तव नयनांचे दल हलले ग
    https://www.youtube.com/watch?v=34DeXdkusBY

    आयुष्याची आता
    https://www.youtube.com/watch?v=q_6Pp56xHSU
    बा भ. बोरकर यांची कविता मा.पु.ल.देशपांडे यांच्या आवाजात
    इतुक्या लवकर येई न मरणा
    https://www.youtube.com/watch?v=UGmkOw7M1eU
    बा भ. बोरकर यांची कविता मा.पु.ल.देशपांडे यांच्या आवाजात
    बा. भ. बोरकर यांच्या 'जपानी रमलाची रात्र' या कवितेचे पु. ल. देशपांडे यांनी केलेले वाचन
    https://www.youtube.com/watch?v=uQrxXJ70lcM

  • संजय लक्ष्मण बोरकर

    अभिनय दिग्दर्शन, लेखन, डबींग, नेपथ्य व प्रकाश योजना ह्या आणि अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे संजय बोरकर ह्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयातून एकांकिका स्पर्धांमधून झाली.

  • आनंद रतन यादव

  • माधव श्रीहरी अणे (लोकनायक बापूजी अणे)

    माधव श्रीहरी अणे (लोकनायक बापूजी अणे)

    विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे. ह्यांचा जन्म २९ ऑगस्ट १८८० साली झाला. त्यांच्या घराण्याचे मूळ नाव वणी. त्यांचे आजोबा हे वैदिकी होते. त्याचे लहानपणापासूनच संस्कार अणे यांच्यावर झाले.