जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मराठी मालिका आणि सन्मान सोहळ्यात दिसणारा एक चेहरा आपणा सर्वांच्याच ओळखीचा आहे. आपल्या निवेदनाने आणि अभिनयाने तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे संस्कृत भाषेतील प्रभुत्वामुळे सर्व श्रोत्यांना भुरळ घालणारी समीरा गुजर-जोशी ही देखील ठाण्यातलं एक रत्नच!
ठाणे महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या कार्यकाळात वावरत असताना, मनोज लासे यांनी ठाणे शहर अत्याधुनिक, अतिक्रमणरहित व हरित कसे राहील या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले. त्याचप्रमाणे शहरात रस्ते, स्वच्छ आणि मुबलक पाणी, नियमित वीज पुरवठा यासारख्या मुलभूत सुविधा त्यांनी गतिमानरित्या पुरविलेल्या आहेत. ठाणे शहराला हरित बनवण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवून जनतेला पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले व स्वतःही कार्यक्रमाचे आयोजन केले. संपूर्ण ठाणे शहराची काळजी घेताना त्यांनी गटारे, पदपथांचे काँक्रिटिकरण, पाणीगळती, व प्रत्येक चौकातील सुशोभिकरणाला त्यांनी प्राधान्य दिले.
विद्यार्थ्यांपासून वयोवृध्दांपर्यंतच्या सर्वच वयोगटातील लोकांच्या समस्यांना प्रत्यक्षात मदत करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. खारीगाव कळव्यातील राजपार्क सोसायटीजवळ वृध्दांसाठी अद्ययावत नाना नानी पार्क उभारले. शहरातील दळणवळण सुधारण्यासाठी सुसज्ज रस्त्यांना प्राधान्य देण्यासोबतच, खारेगांव येथील स्मशानभूमीचच्या दुरावस्थेमुळे उद्भवणार्या अनेक अडचणींची लक्षात घेत या स्मशानभूमीसाठी ५५ लाखांचा निधी उपललब्ध करून नुतनीकरणास सुरूवात केली.
त्याचप्रमाणे घोलाई भागातील पाणी, रस्ते, शौचालये आदी मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून, त्यांनी काही महिन्यांमध्येच या विभागाचा चेहरामोहरा पालटून दाखविला. सध्या या विभागामध्ये सुसज्ज रस्ते, पदपथावर दिवे, व घाणीचा निचरा करणार्या ड्रेनेज लाईनची व्यवस्था झाली आहे. या ठिकाणी विजेची समस्या असल्याने लासे यांच्या हस्तक्षेपामूळे येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे शाळा क्रमांक ६८ चे नुतनीकरणही त्यांनी केले. वास्तू आनंद सोसायटी येथे सधीकरणासाठी धबधबा उभारल्याने हा भाग अधिक रमणीय झाला आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
अच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना व प्रचाराचा विडा उचललेल्या अभ्यंकरांनी आकाशवाणी येथे उच्च श्रेणीचे कलाकार म्हणून अनेक गाण्याचे कार्यक्रम केले.
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते उमेश कामत यांचा जन्म १२ डिसेंबर १९७८ रोजी झाला. मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेटी नायक म्हणून उमेश कामत यांनी ओळख मिळवली आहे. "कायद्याच बोला" या चित्रपटातून त्यांनी २००६ साली आपली चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. ते प्रिया बापट यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत.
कायद्याच बोला,समर - एक संघर्ष, पटल तर घ्या, अजब लग्नाची गजब गोष्ट ,मणि मंगळसूत्र ,थोडी खट्टी थोडी हट्टी, धागे दोरे,,परीस, टाइम प्लीज, माय डिअर यश ,लग्न पाहावे करून, पुणे वीअ बिहार ,बाळकडू, अ पेइंग घोस्ट, मुंबई टाइम, अश्या अनेक मराठी चित्रपटातून अभिनय केला आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती करीता तुम्ही त्यांच्या www.umeshkamat.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. ते राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ आहेत.
जन्मः १३ नोव्हेंबर १८५५
मृत्यूः १४ जून १९१६
गोविंद बल्लाळ देवल हे आद्य मराठी नाटककार होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली नाटके - दुर्गा (१८८६), मृच्छकटिक (१८८७), विक्रमोर्वशीय (१८८९), झुंजारराव (१८९०), शापसंभ्रम (१८९३), संगीत शारदा (१८९९), आणि संशयकल्लोळ (१९१६). पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे.
गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म कोकणातला, त्यांचे बालपण सांगली जिल्ह्यात गेले आणि शालेय शिक्षण बेळगाव येथे झाले आणि तेथेच ते प्रख्यात नाटककार व अभिनेते बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संपर्कात आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर (१८७९) देवल त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करीत. बेळगाव येथे असतांनाच देवल यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत जाण्यास सुरूवात केली होती. त्यांना त्या नाटक कंपनीत भूमिकाही मिळत गेल्या तसेच किर्लोस्कर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही देवल काम करू लागले. १८८५ साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतरही देवल त्याच संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करीत राहिले. काही वर्षांनी (१८९४) मग देवल पुणे येथील शेतकी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. मूळ स्वभाव नाटककाराचा असल्याने देवल यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. १९१३ साली देवल बाल गंधर्व यांच्या गंधर्व नाटक मंडळीत गेले.
गोविंद देवल बल्लाळ यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
गोविंद बल्लाळ देवल (14-Jun-2017)
महान मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल (1-Apr-2019)
गिटारवादक, अभिनेता आणि 'किंग ऑफ द रॉक अँड रोल'
त्यांचा जन्म ८ जानेवारी १९३५ रोजी झाला. कॉलेज शिक्षणासाठी ट्रक चालकाचं काम करण्याऱ्या एल्व्हिस यांनी एका ठिकाणी गायक म्हणून 'ऑडिशन' दिली पण त्यात तो नापास झाला. परीक्षकाने त्याला तुझ्यासाठी ट्रक ड्रायव्हरचीच जागा योग्य आहे असा अनाहूत सल्लाही दिला. यानंतर काही महिन्यातच हा मुलगा आणखी एका ऑडिशनसाठी गेला. यावेळी ही त्याची भट्टी काही जमत नव्हती. दिवसभर प्रयत्न करून थकलेला हा मुलगा शेवटी शेवटी पार कंटाळला पण इतर वादकांनी ब्रेक घेतला असताना आपल्या गिटारवर एकटाच गाऊ लागला. 'आर्थर कृडूप'चं ते मूळ गाणं हा मुलगा पार वेगळ्या ढंगात आणि जलद लयीत गाऊ लागला नि म्युझिक रूम मध्ये जणू विजेचा झटका बसल्यासारखं होऊन एक उत्फुल्ल वातावरण निर्माण झालं. इतर वादकांनी क्षणात याला साथ द्यायला सुरुवात केली आणि हे मूळचं संथ गाणं निराळ्याच आवेशात रेकोर्ड झालं. हे गाणं पहिल्यांदा 'रेडिओ'वर वाजवलं जाताच लोकांनी 'रेडिओ स्टेशन'वर फोन करून गायकाची चौकशी करायला सुरुवात केली. सर्वांना उत्सुकता होती की हा कोण नवा कृष्णवर्णी गायक आलाय. आणि जेव्हा त्यांना कळलं की नवीन गायक गौरवर्णी आहे पण याचं संगीत नि गायन मात्र 'ब्लूज-गोस्पेल' ढंगातलं आहे, त्यांचा विश्वासच बसेना. रेडिओवर या मुलाच्या मुलाखती प्रसारित होऊ लागल्या आणि त्यात मुख्यत्वाने त्याच्या शाळा आणि कॉलेजबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ लागले की ज्यातून त्याचं गौरवर्णत्व सिद्ध व्हावं. गौर आणि कृष्ण दोन्ही वर्णीयांमध्ये हा मुलगा प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या सांगीतिक आणि गायकी ढंगालाच पुढे 'रॉक एन रोल' अशी संज्ञा मिळाली. हा मुलगा होता 'द किंग' या नावाने नंतर ओळखला गेलेला 'एल्व्हिस प्रेस्ले' आणि ते गाणं होतं "That's All Right, Mama". १९६० च्या दशकात अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये पुकारलेल्या युद्धावर जाण्यासाठी 'एल्व्हीस'चे नावही लष्करात दाखल होण्यासाठी पुढे आले. यावेळी तो चांगलाच लोकप्रिय होता. आपल्या लोकप्रियतेच्या आश्रयाने तो स्वत:ला अपवाद म्हणून लष्कराच्या सेवेतून स्वत:ची सुटका करून घेऊ शकला असता पण त्याऐवजी त्याने सैन्यात दाखल होणे मान्य केले. सैन्यात २ वर्ष सेवा करून तो परत अमेरिकेत दाखल झाला. या २ वर्षांच्या काळातच फ्रायबर्ग, जर्मनी इथे त्याची भेट 'प्रिसिला बिलिव'शी झाली आणि तिच्याशी त्याने ७ वर्षांनंतर लग्न केलं. एल्व्हिस प्रिस्लेची मुलगी लिसा मेरी हिच्याशी मायकेल जॅक्सननं मे १९९४ मध्ये विवाह केला. 'एल्व्हिस' यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाणी या 'रॉक एण्ड रोल' संगीतात दिली किंबहुना त्याच्यासाठीच गीतकारांनी लिहिलेली गाणी आता खास त्याचीच म्हणून गणली जातात. यातलं संगीत, गायन आणि सादरीकरण हे 'एल्व्हिस' स्टाईलचंच आहे. मूळ 'जॉर्ज वाईस', 'ह्युगो पेरेत्ती' आणि 'लुइगी क्रियेटर' यांनी लिहिलेलं गाणं १९६१ साली 'एल्विस'ने गायलं आणि काही दिवसातच लोकप्रियतेच्या कळसाला पोहोचलं. या गाण्यातला 'एल्विस'चा आवाज, त्याची गायकी, हे गाणं म्हणताना त्याचा स्टेज वरचा वावर, त्याचे झ्याक प्याक कपडे, त्याचं ते पार डोळ्यात बघण सारं सारं जबरदस्त होतं. पुढे अनेक वर्ष तो आपल्या कार्यक्रमाची सांगता या गाण्याने करायचा. 'एल्विस' यांचे एक गाणं आहे, "Jailhouse Rock". 'जेरी लिबर' आणि 'माईक स्टोलर' यांनी लिहिलेलं हे परफेक्ट 'रॉक एन रोल' गाणं 'एल्विस'ने झकास गायलेलं आहेच पण याच नावाच्या त्याच्या चित्रपटात त्याने हे त्याच्या स्वत:च्या नृत्यशैलीत सादरही केलेलं आहे. 'लष्करी सेवेनंतर 'एल्व्हिस' यांनी आपलं करीअर पुन्हा सुरु केलं. संगीत, काव्य याबरोबरच त्यांनी अनेक सिनेमांमध्येही कामं केली. व्हिएतनाम युद्धापूर्वीपेक्षाही नंतर त्यांची लोकप्रियता कैक पटीने वाढली. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेकदा सलग दीड-दोन वर्षांचे संगीत दौरे त्याने केले. याच दरम्यान सिनेमातील कामंही होतीच. मा.एल्व्हिस प्रिस्टले यांचे १६ ऑगस्ट १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
'द किंग' एल्व्हिस प्रिस्लेची काही गाणी.
http://www.youtube.com/watch?v=zRu3tw9fYxE&feature=related
http://www.youtube.com/watch?v=-rS55BtfNtI&feature=related
http://www.youtube.com/watch?v=e1s-E1WWipc
रितेश देशमुख यांचा जन्म १७ डिसेंबर १९७८ रोजी झाला. बॉलीवूडमध्ये वेगळी उंची गाठल्यानंतर मराठमोठ्या रितेशने मराठी चित्रपट सृष्टीकडे वळून ‘लयभारी’ पदार्पण केले. चित्रपटात ‘अँग्री यंग मॅन’ लूकसोबत या चित्रपटाला रितेशने दुहेरी भूमिकेची किनार दिली आणि चाहत्यांना ‘लयभारी’ ट्रीट दिली. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व रेकॉर्ड मोडीस काढले. रितेश देशमुख यांनी मस्ती, हाऊसफुल आणि मराठी लय भारी यासारखी सिनेमे दिले. मात्र काही सिनेमांनी रितेश देशमुखला प्रोफेशनल आयुष्याबरोबरच पर्सनल आयुष्यात देखील खास मदत केली. रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या आणि चित्रपटसृष्टीत लक्षवेधी ठरलेल्या ‘यलो’ चित्रपटला यंदाच्या ६१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात विशेष परिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरी गाडगीळ या विशेष मुलीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘यलो’ चित्रपटाने सर्वांचे लक्षवेधून घेण्यास भाग पाडले. रितेश-जेनेलियाची प्रेमकथा सर्वांनाच माहित आहे. ३ जानेवारी २०१२ रोजी जेनेलिया रितेश देशमुखबरोबर विवाहबद्ध झाली. रितेश आणि जेनेलियाचे लग्नाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रीयन आणि ख्रिश्चन पद्धतीने या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.
प्रत्येक इव्हेन्ट व इतर कार्यक्रमांना एकत्रित उपस्थित राहताना एकमेकांबद्दलची काळजी आणि दोघांमधील प्रेमाचे नाते लग्नात बदलल्यानंतर आणखी बळकट झाल्याचे वारंवार दिसून आले. जेनेलियाच्या गर्भवती असताना रितेशने तिची घेतलेली काळजी, प्रेम याचं रितेशच्या चाहत्यांना अप्रूप वाटलं. बॉलिवूड अभिनेत्री असण्याबरोबरच जेनेलिया एक मॉडेल आणि होस्टसुद्धा आहे. बॉलिवूडशिवाय जेनेलियाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीतसुद्धा काम केले आहे. जाने तू या जाने ना, फोर्स, तेरे नाल लव्ह हो गया, मस्ती, चान्स पे डान्स या बॉलिवूड सिनेमांमध्ये जेनेलिया झळकली आहे. याशिवाय जेनेलियाने अनेक जाहिरातीसुद्धा केल्या असून एक टीव्ही रिअँलिटी शोही होस्ट केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९६६ रोजी झाला.
उदयनराजे भोसले यांचे शिक्षण पाचगणी येथे झाले. त्यांनी प्रॉडक्शन मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी घेतली आहे. १९९० पासून राजकारणात सक्रीय असलेल्या उदयनराजे यांनी सर्वप्रथम १९९१ मध्ये उगवता सूर्य या चिन्हावर रयत पॅनेलवर सातारा नपा निवडणूक लढवली होती. तत्कालिन १४ क्रमांकाच्या प्रभातून ते विजयी झाले. १९९६-९७ मध्ये विधानसभेची जागा त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढवली. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ही निवडणूक त्यांनी मोठ्या मताधिक्याने जिंकली होती. भाजप-सेना युतीच्या सरकारच्या काळात त्यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आले. त्याचवेळी त्यांना महसूल राज्यमंत्रीपदही देण्यात आले.
http://en.wikipedia.org/wiki/Udayanraje_Bhonsle
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
## Udayanraje Bhosale
शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक ग्रंथाचे लेखक गणेश विनायक अकोलकर यांचे निधन २३ नोव्हेंबर १९८३ रोजी झाले. माध्यमिक शिक्षण, शैक्षणिक तत्वज्ञानाची रूपरेषा, शैक्षणिक समाजशास्त्राची रूपरेषा हे त्यांचे शिक्षणशास्त्राचे सैद्धांतिकस्वरूप स्पष्ट करणारे ग्रंथ, तसेच माध्यमिक शिक्षणाची पुनर्घटना, शैक्षणिक मूलतत्वे, शैक्षणिक मनोविज्ञान, व्यक्तिमत्व विकास या ग्रंथासह लोकशाही व शिक्षण आणि शिक्षणाची अधुनिक तत्वज्ञाने हे अनुवादित ग्रंथही त्यांच्या नावावर आहेत.
## Ganesh Vinayak Akolkar
Copyright © 2025 | Marathisrushti