जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
नुरी ओ दिलबर ...आजा रे ....
नुरी ह्या चित्रपटातील या ओळी आज ही आपल्याला फारूक शेख यांचा गोड चेहरा..
आणि सुंदर अभिनय आठवून जातात ..आपल्या सहजसुंदर अभिनयाने व अनोख्या अदाकारीच्या जोरावर सामान्यजनांच्या हृदयात स्थान मिळविणारे फारुख शेख यांनी वकिलीचे शिक्षण घेत असतानाच नाटय़क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा जन्म २५ मार्च १९४८ रोजी बडोदा जिल्ह्यातील अमरोली येथे झाला.बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी नाटकांत भूमिका केल्या. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट "गर्म हवा' होता. या चित्रपटात त्यांनी बलराज साहनीच्या मुलाची भूमिका केली होती. त्यात त्यांनी साकारलेला `सिकंदर मिर्झा’ सिनेप्रेमींच्या मनावर ठसला त्यानंतर, एकापेक्षा एक झक्कास भूमिकांमधून, आपल्या अनोख्या स्टाइलने मा.फारुख शेख यांनी बॉलिवूडमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केले. बाजार’ किंवा `उमराव जान’सारखा कलात्मक चित्रपट असो किंवा `चष्मेबद्दूर’सारखा विनोदी चित्रपट असो. त्यातली आपली व्यक्तिरेखा फारुख शेख यांनी सारख्याच ताकदीने साकारली. सत्यजित रे यांच्या `शतरंज के खिलाडी’, `नुरी’, `किसी से ना केहना’ या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाला साऱ्यांनीच दाद दिली. मा.नासिरुद्दीन, मा.शाह दीप्ती नवल यांच्या बरोबर ‘कथा’ या चित्रपटात मा.फारुख शेख यांनी रंगवलेला व्हिलनही भाव खाऊन गेला होता. मा.दीप्ती नवलव मा. फारुख शेख जोडी तर बराच काळ हिट चित्रपटासाठीचा फॉर्म्युलाच होऊन गेली होती. दीप्ती नवल आणि फारुख शेख ही रुपेरी पडद्यावरील जोडी भारतीय प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली. त्यानंतर "सास ७०-८० च्या दशकात फारूक शेख यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. समांतर चित्रपट आणि तसेच मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये त्यांचा मुक्त संचार सुरू होता. त्यांमनी अनेक दर्जेदार चित्रपट दिले. विनोद आणि संवेदनशील विषयांवर त्यां चा हातखंडा होता. नुरी, शतरंज के खिलाडी, चष्मे बद्दुर, गरम हवा इत्यारदी चित्रपट गाजले. सहजसुंदर अभिनय ही त्यांची जमेची बाजू होती. मा.फारुक शेख यांनी अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले होते. `चमत्कार’, `जी मंत्रीजी’, `श्रीकांत’ या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने एक वेगळाच प्रभाव निर्माण झाला होता. झी टिव्हीवरील प्रसिद्ध `जीना इसी का नाम’ या शोचे त्यांनी सूत्रसंचालन केले होते. या शोमध्ये त्यांनी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची मुलाखतही घेतली होती. सत्यजित रे, मुज्जफर अली, हृषिकेश मुखर्जी आणि केतन मेहता यांसारख्या दिग्दर्शकांसोबत फारुक शेख यांनी काम केले होते. शबाना आझमी, दीप्ती नवल अशा अभिनेत्रींसोबत फारूक शेख यांची जोडी अधिक गाजली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांच्या आवाजामध्ये एक वेगळेपणा होता. त्यांची विनोदशैली आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची वृत्ती यासाठी फारुक शेख यांची ओळख होती. फारुख शेख निव्वळ कलाकार नव्हते, तर माणुसकी जपणारे कलाकार होते. एक अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, प्रचंड अभ्यासू कलावंत, असे फारुख शेख यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, निरागस चेहरा आणि सहजसुंदर अभिनय या गुणांमुळे समांतर चित्रपटांत काम करतानाही मा.फारुख शेख सर्वसामान्य चित्रपट रसिकांचे ‘नायक’ बनलेले होते. `क्लब ६०′ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. `यह जवानी है दिवानी’ या चित्रपटामध्ये त्यांनी रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेला सिकंदर मिर्झा प्रेक्षकांना खूपच भावला होता. बहू और सेन्सेक्सो', "टेल मी ओ खुदा', "लाहोर' हे चित्रपटही गाजले. २०१० मध्ये या चित्रपटातील बॉक्सिं ग कोचच्या भूमिकेबद्दल त्यांना सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
फारुख शेख यांचे २७ डिसेंबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
फारुख शेख यांची गाणी व चित्रपट
https://youtu.be/E08DZkSc0S8
https://youtu.be/ycouT7JuZhs
https://youtu.be/BsHd1EGA46A
लोकमत मिडिया समूहाचे कार्यकारी संचालक.
वसंत देसाई यांनी १९४२ साली ‘शोभा’ या चित्रपटापासून संगीतकार म्हणून प्रवास सुरू केला. त्यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी झाला. त्यांची ही संगीत कारकीर्द पुढे तीस वर्षे चालूच राहिली. केवळ हिंदी चित्रपटसृष्टीचा विचार केला तर वसंत देसाई हे कधीच व्यावसायिकदृष्टय़ा आघाडीचे संगीतकार नव्हते. परंतु वसंत देसाई च्या सांगितिक आयुष्याचा, हिंदी चित्रपट हा केवळ एक पैलू आहे. मराठी चित्रपट संगीत, नाटय़संगीत गैरफिल्मी संगीत असा त्यांच्या प्रतिभेचा व्याप मोठा होता. ‘गुड्डी’साठी वसंत देसाईनी संगीतबद्ध केलेली ‘हमको मन की शक्ती देना’ ही प्रार्थना अजरामर आहे. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये वाणी जयराम प्रसिद्ध झाल्या.
गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे..’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे. या दरम्यान त्यांनी संगीतबद्ध केलेले ५२ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले तर ‘अमर समाधी’ आणि ‘कामदेव’ अप्रदर्शित राहिले. याच पद्धतीने २१ मराठी चित्रपट (सात अप्रदर्शित मराठी चित्रपट), गुजराती, बंगाली चित्रपट, १४ संगीत नाटके, माहितीपट, गैरफिल्मी गीते, नृत्यनाटके यांची १९ तपशीलांसह नोंद आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची आहे. ‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे वसंत देसाई यांनी संगीत दिले आहे. ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे त्यांनी संगीत दिले. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे ’जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. वसंत देसाई यांचे २२ डिसेंबर १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
हिंदी विषयात एम.ए.पी.एच.डी. करणार्या मुंबई विद्यापीठात आणि बेडेकर महाविद्यालयात २५ वर्षं अध्यापनाचे कार्य करणार्या; तसंच नियतकालिकं, वृत्तपत्र यांतून सातत्याने लेखन करणार्या डॉ. शुभा चिटणीस या ठाण्यातील एक यशस्वी व्यक्तिमत्व !
मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील एक लोकप्रिय अभिनेते होते
‘समर्थाघरचे श्वान, त्यास सर्वही देती मान’ असे म्हटले जाते, पण रस्त्यावरच्या बेवारशी कुत्र्यांच्या नशिबी मात्र आयुष्यभर हाड्तुड सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. परवा एक भटका कुत्रा माझ्या अंगावर भू भू करीत आला.सोबत त्याची सवंगडी खानदानही भुंकू लागली. मला त्याचे विशेष असे काही वाटले नाही. उलट मला त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांची दया आली. या कुत्र्यांसाठी माझे काहीतरी योगदान आहे. त्यांना ठाऊक नाही. खांब बघितल्यानंतर एक तंगडी वर करून घाण करणाऱ्या कुत्र्यांविषयी कविवर्य सुरेश भट म्हणतात, ‘जुना कुत्रा असो वा नवा कुत्रा, शेवटी कुत्र्याप्रमाणे वागती कुत्रे.’ मला नेहमीच किंव वाटते. कारण मी रात्री अपरात्री फिरत असतो. पण असा प्रसंग माझ्यावर कधी गुदरला नाही. या कुत्र्यांकडे आपण नेहमी भूतदयेच्या दृष्टीकोनातून पाहणे हा आपला मानवी धर्म आहे. आपण या भटक्या कुत्र्याविषयी जाणून आहात. उष्ट्या खरकट्यां अन्नाच्या ढिगात स्वत:साठी अन्न शोधीत असतात. खाण्यालायक असेल ते खातात व न खाण्यासारखे देखील खातात. पण हा उद्योग करीत असताना त्या ढिगाऱ्यातून अन्य गोष्टी बाहेर फेकल्या जातात.अस्ताव्यस्त कचरा होतो. घाण निर्माण होते. रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांची दहशत सर्वत्र पसरली आहे. एकट्या माणसावर धावून जाणारी कुत्री, गाड्याच्या मागे भुंकत पळणारी कुत्री, काही कुटुंब काबिल्यासह फिरणारी, तर टोळीने फिरणारी कुत्री.... यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढीस लागला आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा कोठे तरी बंदोबस्त व्हावा या दृष्टीने आज तरी प्रयत्नांची गरज आहे. एकूणच श्वान प्रेम आणि त्यांच्याविषयीचा कळवळा या गोष्टी कितीही खऱ्या असल्यातरी आपल्याला त्यांच्या दहशतीपासून दूर राहणे किंवा त्यांच्यावर काही उपाय करण्याची वेळ आली आहे.
वाघ आणि मांजर यात ज्याप्रमाणे साम्य आढळते त्याप्रमाणे लांडगे आणि कुत्रा यामध्ये साम्य आढळत आले आहे. कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. आपल्या धन्याची, घराची शेताची राखण आदि इमानेइतबारे सेवा करीत असतो. वेळेला स्वत:चा जीव धोक्यात घालून मालकाचे प्राण वाचवितो. त्यामुळे काही मंडळीना भन्नाट प्रेम असते. ते नियंत्रणात असतात. स्वच्छ ठेवले जातात. वेळोवेळी डॉक्टर तपासतात. कुणाला घेतलेला चावा, गुरगुरणे मालकाला मात्र आपल्या बाब्या चिडला असं वाटत असतं. तर त्याने दुसऱ्याच्या जागेत जाऊन केलेली घाण आणि त्यातून उद्भवलेला तंटा... मालकाने म्हणावे ‘ह्यांना मुक्या जनावरांविषयी प्रेमच नाही.’ गमतीची एक गोष्ट आपणापुढे व्यक्त करू इच्छितो की, एका पत्रलेखकाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोणत्याही सिनेमात यापुढे ‘कुत्ते मै तेरा खून पी जाउंगा’ ‘कुत्ते की मौत मार दुंगा’ कुत्ते की औलाद’ अशी कुत्र्याची बदनारे संवाद उच्चारण्यास कायद्याने मनाई करावी आणि पालन न करणारावर ATROCITY अंतर्गत कारवाई करावी. ते पुढे असेही लिहितात ‘ कुत्ता मेरा साथी’ असे कुत्र्याचे महती सांगणारे चित्रपट काढेल त्याला ५०% अनुदान द्यावे. जसे वर्षातून विविध दिवस साजरे केले जातात त्याप्रमाणे भटका कुत्रा दिन सर्वत्र साजरा करण्यात यावा. हे वाचून आम्ही धन्य झालो.
जानेवारी २०१४ मध्ये ह्युमन सोसायटी इंटरनँशनल या स्वयंसेवी संस्थेने ‘हाय-टेक’ साधनाचा वापर करीत मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण केले होते.त्यात असे आढळले की, मुंबईत दर १३० माणसामागे एक भटका कुत्रा आहे. मुंबई एकूण ९५१७२ भटकी कुत्री वावरत आहेत त्यापैकी ६६ हजार ही रस्त्यावर आहेत तर २९ हजार गल्लीबोळात बस्तान ठोकून आहेत. मुंबई पालिकेच्या सर्वेक्षणानुसार २००७ -०८ साली ४९ हजार भटकी कुत्री होती. आज दुप्पट झाली आहेत. निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करूनही दिवसेंदिवस वाढणारी संख्या आणि त्याबरोबर त्यांचा वाढलेला उपद्रव चिंता करण्यासारखा आहे. मुंबई महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री जयराज फाटक यांनी सिंगापूर धर्तीवर भटके कुत्रे दिसताक्षणी ठार करा , असा आग्रह धरला होता. पण विधी खात्याने तसे केल्यास न्यायालयीन प्रक्रियेचे आव्हान पेलणे कठीण जाईल अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे हा विषय अर्ध्यातच थांबला. घरी येणाऱ्या दैनिकात दररोज एकतरी भटक्या कुत्र्याची बातमी असते. मध्यंतरी एका खाजगी वाहनचालकाने गाडीखाली कुत्र्याला चिरडले म्हणून त्यावर गुन्हा दाखल झाला. वर्तमानपत्रात कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही तर माणूस कुत्र्याला चावला, ही मजेशीर बातमी वूत्तपत्र उचलून धरतात. कारण तसे प्रशिक्षण दिलेले असते. गमतीची गोष्ट सांगायची झाली तर दहिसर कांदरपाडा येथून २४० क्रमांकाची बस लिंक रोडच्या दिशेने निघाली. रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने वाहनचालक अर्जुन खरात याने बसचा वेग वाढविला होता. अचानक एक भटका कुत्रा धावत बसखाली आला. ब्रेक करकचून दाबला गेला. त्यामुळे प्रवाशी हादऱ्याने दचकले, काही उभे राहिले. काही उत्साही मंडळी खाली उतरली. तो भटका कुत्र्याची अखेरची धडपड सुरु होती. वाहनचालक नम्रपणे गाडीत बसा म्हणून विनवीत होता. पण प्रवाश्यांपैकी एकाने पावा संघटनेच्या कार्यकर्त्याला फोन लावला. अल्पावधीत संघटनेचा कार्यकर्ता हजर झाला. त्याने आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बिचारा अर्जुन खरात यांना निष्काळजीपणाने वाहन चालविल्याबद्दल अटक झाली. पण ही बातमी कुठल्याही वर्तमानपत्रात आली नाही की यावर विशेष विचारमंथन झाले नाही. इतकी दहशत भटक्या कुत्र्यांची पसरलेली आहे. हाड म्हणायला देखील नागरिक घाबरू लागले आहेत. दररोज श्वानदंशामुळे माणसेही मरत असतात. दर मिनिटाला एक अपघात होतो तर दर तीन मिनिटांनी एकजण मृत्युमुखी पडत असतो. रेल्वेच्या रुळावर दररोज दहाबारा जणांना मृत्यू येतो. त्याबद्दल कुणी फारसे दु:ख व्यक्त करीत नाही. एखाद्या माणसाने भटक्या कुत्र्यावर केलेला जीवघेणा हल्ला याबाबतीत आपण विचारमंथन का घडवून आणायचे. अंगावर धावून आलेल्या, चावा घेतलेल्या कुत्र्याला चोप देण्याचा स्व:सरक्षणात्मक अधिकार मानवाला असायला हवेत, याविषयावर चर्चा घडविली पाहिजे.
या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायचा तरी कसा....! यांच्या दहशतीला लगाम घालणार कोण...? उपद्रवी कुत्र्यांपासून संरक्षण देणार तरी कोण....? भारतीय लोकशाहीत हे तरी आजमितीला कठीण होऊन बसले आहे. प्राणीमित्र संघटना याला कडाडून विरोध करतील. विचार करा भविष्यात या भटक्या कुत्र्याची दहशत वाढण्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. श्वानप्रेमी माझ्या लेखाविषयी गरळ ओकतील पण मी भटक्या आणि उपद्रवी कुत्र्याविषयी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
साहित्य क्षेत्रातील ठाण्यातलं एक अग्रगण्य नाव म्हणजे निलीमा पालवणकर IM.A.M.Phil (मराठी साहित्य) या विषयातून करुन त्यांनी एक वर् मराठीची प्राध्यापिका म्हणून आचार्य मराठे महाविद्यालयात अध्यापनाचं कार्य केलं. १८ महिने “वृत्तमानस” मध्ये दर पंधरा दिवसांनी एक, कवितेवर आधारित रसग्रहण पद्धतीचे स्तंभलेखनही त्यांनी केलं.
रसिका जोशी यांच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील त्यांची भूमिका गाजली. तसेच मराठीत खबरदार, यंदा कर्तव्य आहे, अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका स्मरणीय होत्या.
जानिसार अख्तर म्हणजे उर्दूतील पुरोगामी चळवळीतील एक नज्मगी शायर. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९१४ रोजी झाला.रोमँटिक संवेदनशील मनोवृत्ती, तरल शब्दभांडार, गेय छंदांवर असामान्य प्रभुत्व, ग़ज़्ालीयतचे सखोल ज्ञान या दुर्मीळ प्रतिभेमुळे जानिसार अख्तर यांचे समग्र काव्य, अन्य समकालीन शायरांपेक्षा वेगळे होते. जान निसार अख्तर हे जावेद अख्तर यांचे वडील. जावेद अख्तर यांच्या जन्माच्या वेळी जान निसार अख्तर हे एका चित्रपटांसाठी गाणे लिहीत होते. त्यांत एक गाजलेला शेर होता. ‘लम्हा लम्हा किसी जादू का फसाना होगा' या शेर वरून त्यांचे नाव ‘जादू’ ठेवण्यात आले होते व शाळेत नाव टाकताना ‘जादू’ च्या जवळपासचे नाव म्हणून ‘जावेद’ ठेवण्यात आले होते. जानिसार अख्तर म्हणजे उर्दूतील पुरोगामी चळवळीतील एक नज्मगी शायर. रोमँटिक संवेदनशील मनोवृत्ती, तरल शब्दभांडार, गेय छंदांवर असामान्य प्रभुत्व, गजलीयतचे सखोल ज्ञान या दुर्मीळ प्रतिभेमुळे जान निसार अख्तर यांचे समग्र काव्य, अन्य समकालीन शायरांपेक्षा वेगळे उठून दिसतं. त्यांना सामाजिक, राजकीय जाण परिपक्व होती. त्यांची ओळख उर्दूतील पुरोगामी चळवळीतील एक नज्मगी शायर अशी होती. त्यानंतर ‘घर आंगन’ या पती पत्नीच्या प्रेमातील प्रेयस छटांचं मोहक विश्लेषण करणाऱ्या ‘रुबाइयां’ संग्रहाचा हा संवेदनशील कवी. अन् मग आयुष्याच्या उत्तरार्धात रचलेल्या लक्षणीय प्रतिभेच्या गजल संग्रह ‘पिछले पहर’चा ग़ज़्ालकार.- ते म्हणजे जाँनिसार अख्तर. खरं तर चित्रपट रसिकांत जावेद अख्तरांचे स्थान काही असो उर्दू वाङ्मयविश्वात मात्र त्यांची ओळख अजूनही जाँनिसार अख्तर यांचा मुलगा अशीच आहे व तीच राहील. रोमँटिक संवेदनशील मनोवृत्ती, तरल शब्दभांडार, गेय छंदांवर असामान्य प्रभुत्व, ग़जलीयतचं सखोल ज्ञान या दुर्मीळ प्रतिभेमुळे जाँनिसार अख्तरांचं समग्र काव्य अन्य समकालीन शायरांपेक्षा वेगळं-उठून दिसतं. जाँनिसार अख्तरांनी युद्धकाळात ‘आवाज दो हम एक है’सारखे समर गीत लिहिले. थोडय़ा थोडक्या नव्हे तर तब्बल ८० चित्रपटांसाठी जाँनिसार अख्तरांनी गाणी लिहिली. ज्येष्ठ शायर निदा फाजली म्हणतात, फिल्मी दुनियेत दोन प्रकारचे शायर सापडतात. एक ते ज्यांना फिल्मी जग शायर बनवते. अन् दुसरे ते जे स्वत: शायर असतात अन् ते आपआपल्या काव्यसंग्रहासह फिल्म इंडस्ट्रीमध्ये येतात. जाँनिसार हे दुसऱ्या प्रकारचे शायर होते. १९४८ मध्ये ‘शिकायत’ या प्रथम चित्रपटासाठी गाणे लिहिण्यापूर्वी जानिसार यांचे ‘जाविदाँ’, ‘खाके-दिल’, ‘नजरे-बुताँ’ हे काव्यसंग्रह प्रकाशित होते. साहिर लुधियानवी हा मित्र असल्याने त्यांच्या काव्यावर ते परिक्षण करीत असत. साहिर हा अल्पप्रसव शायर तर जान निसार हे आशुकवी होते. साहिर हे चित्रपटसृष्टीत आपल्या डाव्या विचारसरणीच्या, प्रेमपद व विद्रोही काव्यामुळे चांगलेच लोकप्रिय होते. त्यामुळे त्यांना गीतकार म्हणून बरीच मागणी होती. मागणी तेवढा पुरवठा करणे शक्य न झाल्याने कदाचित आर्थिक विवंचनेतील मा.जाननिसार अख्तर यांनी अनेक जण म्हणतात त्याप्रमाणे साहिर यांच्या साठी घोस्ट राइटिंग केलेही असेल. ‘चित्रलेखा’ या चित्रपटातील ‘संसार से भागे फिरते हो’ या गीतांची भाषा नीरज शैलीची आहे. मा.जान निसार अख्तर यांची सामाजिक, राजकीय जाण परिपक्व होती. मध्यवयानंतर ते गजल-सृजनाकडे वळले अन् सत्तर-ऐंशी ग़जलात साहिर, मजरूह, कैफी, जाफरी मख्दूम यांना त्यांनी मागे सोडले. मा.जानिसार अख्तर यांच्या काव्याचा अन् ग़जलचा मूलभूत विषय म्हणजे प्रेम. पत्नी व प्रेयसी या द्वैतामध्ये त्यांनी एकरूपता आणली. ती एकरूपता मनाची शरीराची अन् विचारांची होती. मात्र ‘घर आंगन’ या रुबाई संग्रहात ते स्वत: पत्नीच्या भूमिकेतून प्रेमरंगाच्या विविध छटा शब्दबद्ध करतात. उर्दू ग़जलने वली, मीर, गालिब, फानी, यगाना , जिगर, फैज, नासिर, बानी अशी अनेक वळणे पाहिली. जान निसार अख्तर हे वेगळं वळण अधोरेखित केल्याशिवाय उर्दू गजलचा इतिहास अपूर्णच म्हणावा लागेल. एवढंच नव्हे तर त्यांनी संपादित केलेल्या ‘हिन्दोस्तां हमारा’ या मौल्यवान बृहद् उर्दू शायरीच्या संकलनामुळे, भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक पलूला उर्दू साहित्यिकांनी गेली सातशे वर्षे किती आत्मीयतेने शब्दरूप दिलंय हे कळतं. रोमँटिक ग़जलचा हा पुरोगामी शायर फिल्मी जगतात उपेक्षित राहिला पण उर्दू काव्यरसिकांत अजूनही त्यांच्या आठवणी तेवत आहे. मा.जान निसार अख्तर यांचे निधन १९ ऑगस्ट १९७६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.इंटरनेट / डॉ. राम पंडित
सत्तेच्या राजकारणात निवडणूका या अत्यंत महत्वाच्या असल्या तरी जनमाणसांच्या मनात आपुलकीचं नातं निर्माण करणारा नेता हाच खरा लोकनायक समजला जातो. प्रत्येक राजकीय पक्षाला संघर्ष हा करावाच लागतो. निवडणुकीत जय – पराजय हा नित्याचाच आहे. उतार चढाव हा तर राजकारणाचा स्थायीभावच आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. आणि सध्या अशा संघर्षातून राज ठाकरे नावाचा योद्धा तावून सुलाखून बाहेर पडत आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti