(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • बंगाली मातीची जादू असलेले सलिल चौधरी

    स्वतःच्या चालीबद्दल काटेकोर असणारा संगीतकार म्हणजे सलील चौधरी

  • नलिनी पुंडलिक गोखले – शंभर नाबाद

    एक व्यक्ती  विशेषतः स्त्री, जगाशी संघर्ष  करीत,   संसार पुढे पुढे  रेटत  असते, कठीण परिस्थितीतून मार्ग काढत असते  तेव्हा तिचं  कौतुकच करावं तेवढे थोडेच ! या शंभर वर्षांचा त्यांनी कथन केलेला त्यांच्या इतिहास चित्रपटासारख्या माझ्या डोळ्यां समोर तारळतो आहे..  

  • मराठी अभिनेते, नाट्य-चित्रनिर्माते अजित भुरे

    अजित भुरे आणि त्यांच्या काही मित्रमंडळींनी मिळून ‘आंतरनाट्य’ नावाची नाट्यसंस्था स्थापन केली. या संस्थेचे ’अनाहत’ नावाचे पहिले नाटक, राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पहिले आले.

  • चंद्रकांत सरदेशमुख

    संगीत हे केवळ कर्णसंपुटांना समाधान देणारे साधन नाही, तर संगीताचा प्रत्येक स्वर आणि त्यापासून निर्माण होणारी ध्वनिकंपने शारीरिक समाधान आणि प्रफुल्लित चित्तवृत्तींचे उगमस्थान असतात, ही आता केवळ समजूत राहिलेली नाही. भारतीय संस्कृतीने शतकांच्या सखोल साधनेतून सिद्ध केलेल्या या वास्तविकतेला पुन्हा जनमानसात रुजविण्याची गरज ओळखून स्वार्थनिरपेक्ष काम करणारे

    पं. डॉ. चंद्रकांत सरदेशमुख यांच्या निधनाने संगीतसाधनेच्या परंपरेतला एक अलौकिक दुवा निखळला आणि शरीर, मन व संगीत यांच्या नात्याची वैज्ञानिक उकल करण्याचे एक ‘संशोधनव्रत’ खंडित झाले. केवळ आंतरराष्ट्रीय ख्यातीचा उत्कृष्ट सतारवादक, एवढीच पं. सरदेशमुखांची ओळख नाही, तर संगीतविश्व हा मानवाच्या असंख्य भावविश्वांना सांधणारा प्रभावी दुवा आहे, हे ओळखून संगीतप्रसाराचा ध्यास घेतलेला एक आधुनिक मनस्वी माणूस अशी त्यांची खरी ओळख आहे. भारतीय संस्कृतीत संस्कृत मंत्रोच्चारांचे स्थान अढळ आहे, पण मंत्रोच्चार किंवा मंत्रपठण हा ‘पठडीबाज परंपरावाद’ असल्याचे अर्धज्ञान आजही उजळले जाते.

    संस्कृत श्लोकांचे संगीतशास्त्रीय पठण मानवी आयुष्याला परमोच्च समाधानाचे क्षण प्राप्त करून देते, मानसिक जाणिवा पराकोटीच्या प्रगल्भ करते आणि जीवन समृद्ध करते. संस्कृत श्लोकपठणातील ध्वनिलहरींच्या कंपनांतून शारीरिक व्याधींचे समूळ उच्चाटन होते, दुष्प्रवृत्ती दूर होतात आणि मनाला आपोआपच माणुसकीचा स्पर्श होतो. अशा तऱ्हेने, मंत्रपठण ही समृद्ध आयुष्यासाठीची एक तप:साधना बनते, हे पं. सरदेशमुखांच्या संशोधनाचे सार! वयाच्या चौथ्या वर्षीपासूनच्या कठोर संगीत साधनेतून साधलेला हा साक्षात्कार समाजास अर्पण करण्याच्या भावनेतून पुढे, संगीत हे आरोग्य आणि मानसिक समाधानप्राप्तीचे साधन ठरावे, यासाठी पं. सरदेशमुख यांचे संशोधन सुरू झाले. वसंत बहरला, की कोकिळेच्या कंठातील अलौकिक सूर माणसाला मोहवून टाकतात. त्या सुरांच्या स्वर्गीयतेची जाणीव त्या कोकिळेला असेलच असे नाही, पण संगीताचा ‘स्वर’ ओळखणारा आणि जोखणारा जाणकार कान प्रकृतीने माणसालाच बहाल केला आहे. हाच ‘जाणता कान’ जोपासावा, यासाठी पं. सरदेशमुख सतत तळमळले.

    कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आणि पुणे विद्यापीठातही संगीत साधना सुरू झाली, हे त्या तळमळीचेच फलित होय. याच तळमळीतून त्यांनी अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि कर्मभूमी जपानमध्ये भारतीय संगीताचे स्वर अजरामर केले. संगीत क्षेत्रातील नव्या दिशांचा शोध आणि वेध घेत नव्या पिढीसाठी संगीतात संशोधन करणाऱ्या पं. सरदेशमुख यांना त्यांच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा आयुर्वेदाचा वारसा मिळाला होता, पण तो केवळ व्यावसायिकतेसाठी न वापरता, मानवी आरोग्य आणि मनाच्या संपन्नतेसाठी आयुर्वेद आणि संगीतोपचारांची सुरेख सांगड घालणारे संशोधन पं. सरदेशमुखांनी सुरू केले. म्हणूनच, भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची खरी ओळख झालेल्या या ज्ञानवंताने आपल्या अध्र्यामुध्र्या आयुष्यात केलेल्या कामाचे महत्त्व मोठे आहे.

  • शरद पवारांनी सांगितलेला पी.सावळारामांवरील किस्सा

    शरद पवारांनी सांगितलेला पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत जेव्हा निवडून आले होते त्या वेळेचा किस्सा.

    १९६८ साली पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत निवडून आले होते, शरदरावजी पवार त्यावेळेस विधानसभा सदस्य व कॉंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते, गदिमा त्यावेळी साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी शरद पवारांना बोलावून घेतले,त्यावेळी गदिमा तेथे उपस्थित होते, नाईकांनी पवारांना सांगितले, "सावळाराम नगरपालिकेत निवडून आले आहेत, त्यांना नगराध्यक्ष करायचे आहे पण आपले येथे बहुमत नाहीये, दोन मते कमी पडत आहेत, काहीही कर पण त्यांना निवडून आण". बहुदा मा.गदिमांनी आपल्या मित्राला हे पद मिळावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना घातली असणार किंवा पी.सावळाराम यांनी गदिमांचा राजकारणी नेत्यांमधला दरारा पाहून तसे सुचवले असेल.

    शरद पवार तेथे दोन दिवस जाऊन राहीले (शरद पवार म्हणतात .... "मते कमी पडली की याला हाताशी धरा अशी माझी ख्याती त्यावेळेपासूनच होती!"), त्यांच्यापरीने जे राजकारणी डावपेच खेळावे लागतात ते सर्व खेळून त्यांनी शेवटी 'पी.सावळाराम' यांना ठाण्याच्या नगराध्यक्षपदी निवडू आणले. मा.शरद पवारांनी 'पी.सावळाराम' यांना गाडीत घातले व मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर घेऊन गेले, तेथे मुख्यमंत्र्यांबरोबर मा.गदिमाही उपस्थित होते, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की पी.सावळाराम निवडून आले, नगराध्यक्ष झाले. गदिमा ते ऐकत होते,ते जागचे उठले व शरद पवारांजवळ गेले,त्यांच्या पाठीवर एक जोरात थाप मारली व म्हणाले...
    "बहाद्दरा काय काम केलस!,येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....."

    त्यावेळी ठाणे हे मेंटल हॉस्पीटल साठी प्रसिद्ध होते, कोणी वेड्यासारखे वागत असेल तर लोक त्यावेळी गंमत करताना "याला ठाण्याला पाठवा रे" असे नित्यनियमाने म्हणत असत, त्याचा रेफरंन्स व 'येडेमच्छींद्र' हे पी.सावळाराम यांचे गाव व सावळाराम पाटील हे नाव याचे गदिमांनी 'येडयाचा पाटील' केले. "बहाद्दरा काय काम केलस!, येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....." , तेथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची हसून पुरेवाट लागली असेल!.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ परशुराम यशवंत वैद्य खडीवाले

    परशुराम वैद्य यांनी हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर पुण्यात येऊन ‘हरी परशुराम औषधालय’ सुरू केले. याचबरोबर त्यांनी आयुर्वेदाशी संबंधित अनेक पुस्तकेही लिहिली.

  • डॉ. एल.ए. पाटील

    सायनाइडपेक्षा पाचशे पटींनी घातक असलेल्या 'सरीन' सारख्या वायूचा वापर करुन रासायनिक अस्त्रे बनवले जाण्याचा धोका जगाला भेडसावत आहे. या वायूचे अस्तित्व शोधणारे सेन्सर डॉ. एल.ए. पाटील यांनी विकसित केले. विशेष म्हणजे, हे संशोधन त्यांनी अमळनेरसारख्या छोट्या शहरातील एका छोट्याशा लॅबमध्ये केले. त्यांच्या या संशोधनामुळे सेन्सर शोधणार्‍या निवडक देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळाले.

    डॉ. एल.ए. पाटील यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला अमळनेरची नॅनो लॅब हा लेख पुढील पानावर वाचा.

    डॉ. एल.ए. पाटील यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला अमळनेरची नॅनो लॅब हा लेख वाचा.

    patil-dr-l-a-modified

  • चरित्र अभिनेते इफ्तिखार

    इफ्तिखार हे १९४० ते ५० च्या काळात बॉलिवूडचे अतिशय बिझी अभिनेता होते. जसे कडक पोलीस अधिकारी या भूमिकांसाठी ते प्रसिध्द होते. तसेच नंतर च्या काळात वडील, काका, मोठा काका, आजोबा, पोलीस आयुक्त न्यायाधीश आणि डॉक्टर या भुमीकेत ते दिसून आले. बंदिनी, खेल खेल में, एजंट विनोद या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका केल्या होत्या.

  • नारायण श्रीधर बेंद्रे

    विसाव्या शतकातील भारतातील प्रतिभावंत व राष्ट्रीय किर्तीच्या कलाकारांमध्ये त्यांचा आवर्जुन उल्लेख केला जातो त्यापैकी मुख्य नाव म्हणजे नारायण श्रीधर बेंद्रे यांच. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९१० रोजी इंदोरमध्ये झाला. चिनी चित्रकलेपासून ते आदिम कलेपर्यंत, अशा निरनिराळ्या कलाप्रकारांमध्ये त्यांनी असामान्य कौशल्य व कुशलता संपादन केली होती. बेंद्रेंनी आग्रा विद्यापीठातून १९३३ साली बी. ए.ची पदवी संपादन केली. याच काळात इंदूर येथील “स्टेट स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये दत्तात्रय दामोदर देवळालीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कला शिक्षणही घेतले. १९४५ मध्ये ते शांतिनिकेतन येथे दाखल झाले व तेथे त्यांच्या कलाकारी वृत्तीला खर्‍या अर्थाने प्रतिभेला आकार मिळू लागला. नंदलाल बोस, रामकिंकर बाजी, व विनोद मुखर्जी अशा नामवंत कलाकारांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली.

    १९४७ ते १९५० या कालावधीत बेंद्रेंनी ग्रेट ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, हॉलंड, पश्चिम जर्मनी, इटली, ईजिप्त, लेबानन, जॉर्डन, इराक, इराण, अफगाणिस्तान आणि जपान या देशांना भेटी देऊन तेथील कलासृष्टीचा अभ्यास केला. तसेच न्यूयॉर्क येथील “आर्ट स्टुडंट्‌स लीग’ मध्ये “आर्मीन लॅंडेक“ या कलातज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आरेख्यक कलेचा अभ्यास केला. अनेक देशांमध्ये त्यांनी आपल्या कलाकृतींची प्रदर्शने आयोजित केली. १९५० ते १९६६ या कालावधीत बेंद्रे यांनी बडोद्याचा “महाराजा सयाजीराव विद्यापीठा“मध्ये चित्रकला विषयाचे प्राध्यापक व नंतर ललित कला विद्या शाखेचे अधिष्ठाता या नात्याने कार्य केले. बडोद्यातून प्राध्यापक म्हणून निवृत्त होऊन ते मुंबई येथे स्थायिक झाले आणि व्यावसायिक चित्रकार म्हणून काम करू लागले.

    नारायण बेंद्रेंनी कोणत्याही एका विशिष्ट चित्रशैलीची वा पंथाची बांधिलकी त्यांनी मानली नाही. दृक्‌प्रत्ययवादी तंत्राच्या प्रभावातून निर्माण झालेली स्वच्छंदतावादी चित्रशैलीतून स्वत:चे कलाविश्व रेखाटले. बेंद्रे यांची अनेक चित्रे भारतातील तसेच परदेशातील कलासंग्रहालयांतून जतन केलेली आहेत.

    १९५२ साली भारतातर्फे चीनमध्ये गेलेल्या पहिल्या सांस्कृतिक प्रतिनिधिमंडळामध्ये चित्रकार म्हणून नारायण बेंद्रें यांचा समावेश होता. “आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ चे तीन वर्षे अध्यक्ष होते. १९६२ ते १९७२ याकाळात दिल्ली येथील राष्ट्रीय कला-अकादमीच्या ललित कला शाखेचे उपाध्यक्ष म्हणून, तर १९७२ ते १९७३ व १९७७ ते १९७८ या काळात “बाँबे आर्ट सोसायटी’चे कार्य त्यांनी केले.

    आपल्या कारकिर्दीत त्यांनी भरपूर समाजसेवा केली व गरीब विद्यार्थ्यांच्या हितासाठी ते नेहमीच खंबीरपणे उभे राहिले. स्वातंत्र्योत्तर काळानंतर लगेचच जेव्हा गुरू राधा किशन ह्यांनी दिल्लीमध्ये पहिले जनता ग्रंथालय उघडण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुरूवात केली.

    १९५५ मध्ये नारायण बेंद्रेंना ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. १९६९ मध्ये “पद्मश्री“ आणि १९९२ मध्ये “पद्मभूषण“, अशा पुरस्कार देवून त्यांना भारत सरकारने यथेच्छ सन्मानित केले. १९८४ मध्ये त्यांना विश्वभारती विद्यापीठाकडून “अबन गगन पुरस्कार“, मध्य प्रदेश राज्य सरकारकडून “कालिदास सन्मान“ जाहीर झाला. मध्य प्रदेश येथील खैरागढच्या “इंदिरा कला संगीत विश्वविद्यालया’ तर्फे त्यांना डी. लिट् ही पदवी देऊन सन्मानित केले आहे.

  • बॉलिवूडचे गीतकार लालजी पांडेय उर्फ अंजान

    सुमारे तीन दशके आपली रोमँटिक गाणी देणारे हिंदी चित्रपट गीतकार लालजी पांडेय उर्फ अंजान यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९३० वाराणसी येथे झाला. अंजान गंगेकाठच्या वाराणसीतच लहानाचे मोठे झाले. गंगेच्या घाटावर फिरताना त्यांच्या काव्यप्रतिभेला एक आगळी खोली लाभली. त्यातूनच पुढे आला एक प्रतिभावंत गीतकार. आपल्या अद्वितीय गीतरचनांमुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.