जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी झाला. भाऊसाहेब स्वतः वेदपंडीत, वकील, शिकारी होते, शिकारीचा तर त्यांचा छंद नुसता शौर्य दाखविण्यासाठी नव्हता, तर श्वापदांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्याचे निरीक्षण करुन भाऊसाहेबांनी कथा लिहिल्या होत्या, ज्या किर्लोस्कर, युगवाणी, अमृत इत्यादी अनेक मसिकात प्रकाशित झाल्या होत्या, त्यात शिकारीतील शौर्या पेक्षा, प्राण्यांच्या अभ्यासाला प्राधान्य असायचे. कालांतराने कायद्याने शिकारीला बंदी आली, त्यामुळे भाऊसाहेबांची शिकार पण बंद झाली, मोतीबिंदू मुळे भाऊसाहेबांच्या दोन्ही डोळ्यांची नजर गेली आणि त्याच कारणास्तव वकिली पण बंद करावी लागली, पण इतके होऊनही भाऊसाहेब हतबल झाले नाहीत, वेदाध्ययन,संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच, त्यातील चंपू प्रकारात शायरीचा उगम असल्याचे ते म्हणत, त्यातूनच त्यांनी मराठी शायरीची रचना केली, त्यांची शायरी ही उर्दू भाषेतील शायरी पेक्षा वेगळी होती, त्यातून नेहमीच स्वाभिमानी आणि अपेक्षित अशा शायरीची रचना त्यांनी केली, पुढे मा.भाऊसाहेबांच्या शायरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला, महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात त्यांचे कार्यक्रम होऊन लोकप्रिय झाले. भाऊसाहेबांची मराठी शायरी, मराठी मुशायरा, मैफिल, दोस्तहो, जिंदादिल ही पुस्तके प्रकाशित झाली, खऱ्या अर्थाने त्यांनी मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या " दोस्त हो" आणि " जिंदादिल " ह्या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले. भाऊसाहेब पाटणकर यांचे २० जून १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
भाऊसाहेब पाटणकरांची शायरी
पेड वेणीचे तुझ्या तू सोडू नको मागे पुढे
आम्ही तरी कैसे बघावे सारखे मागे पुढे
आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही
एकही ना चीज इथली घेऊनी गेलो आम्ही
तेही असो आमुच्या सवे आणिला ज्याला ईथे
भगवन अरे तो देहही मी टाकूनी गेलो ईथे
आजवरी बेधुंद जैसा मांड आम्ही गाईला
त्याच त्या तल्लिनतेने जोगिया ही गाईला
जाणतो इतुकेच आम्हा मस्तीत आहे गायचे
लोकहो हे दैव जाणे काय केव्हा गायचे
येतो असाही काळ केव्हा काही असेही गायचा
जोगिया डोक्यात आणिक मांड असतो गायचा
कौशल्य माझ्या गायनाचे कळलेच ना कोणा कधी
गेलो असा गाऊन नाही बेसूरही झालो कधी
सन्मानिले वैराग्य आम्ही शृंगार ही सन्मानिला
अंकावरी आहे रतिच्या बुद्ध येथे झोपला
विसरला दुनियेस आपुल्या गुंजनाही विसरला
कमलपोषी भृंग आता कमलासही त्या विसरला
हे आले वैराग्य आम्हा निष्कामता ऐसी आली
तैसी नको नुसतीच जेथे दाढी हवी लुंगी हवी
सुहास शिरवळकर हे एक जबरदस्त लोकप्रिय लेखक होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘पुण्यापासून गोव्यापर्यंत आणि पुण्यापासून नागपूरपर्यंत मी चालत गेलो तर प्रत्येक गावात मला माझा चाहता भेटेल. मला हॉटेलात जेवावं लागणार नाही. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या ‘ दुनियादारी ‘ या पहिल्याच कादंबरीला भरपूर लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला.
सुजित कुमार यांनी अनेक हिंदी आणि भोजपुरी सिनेमांतून भूमिका साकारल्या होत्या. त्यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९३४ रोजी झाला. आराधना या हिंदी सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.
सुजित कुमार यांनी छूटे राम, विदेशिया, दंगल, गंगा कहे पुकार के, गंगा जइसन भौजी हमार, सजनवा बैरी भइले हमार, हमार भौजी, माई के लाल, संपूर्ण तीर्थयात्रा अश्या लोकप्रिय भोजपुरी चित्रपटात कामे केली. त्यांना भोजपुरी चित्रपटातील पहिला सुपरस्टार समजले जाते. त्यांचे इतर हिंदी चित्रपट कोहरा, आँखें, ‘द बर्निंग ट्रेन’, आराधना, इत्तफाक, मन की आँखें, आन मिलो सजना, हाथी मेरे साथी, अमर प्रेम, शरारत.
त्यांनी खेल, चॅम्पियन, ऐतबार या हिंदी सिनेमांची निर्मिती केली. सुजित कुमार यांचे ५ फेब्रुवारी २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आपलं हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक असतो आणि त्याचीच आपण योग्यरितीनं काळजी घेत नाही; अशावेळी काही विपरित घडलं तर डॉ. हाच देव ठरतो!
बांबूची तिरडी वापरण्याऐवजी अॅल्युमिनिअमची तिरडी वापरली तर? मृत्युनंतर सरसकट नदीत रक्षाविसर्जन करण्याऐवजी त्यासाठी स्वतंत्र कुंड तयार केले तर? धार्मिक क्रियाकर्मांबाबत अशी क्रियाशीलता दाखविणे भावनिक प्रश्नामुळे अवघड वाटते. पर्यावरणाचा प्रश्न अशावेळी थोडा मागे पडतो. कोल्हापूरचे दीपक पोलादे यांनी मात्र शेकडो वर्षे चालत असलेल्या आर्थिक चालीरीती, क्रियाकर्मे याबाबत पर्यावरणरक्षणाची एकखांबी चळवळच उभारली आहे.
दीपक पोलादे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कर्म-क्रियाशील हा लेख पुढील पानावर वाचा.
दीपक पोलादे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कर्म-क्रियाशील हा लेख वाचा.
जेष्ठ बॉलीवूड अभिनेते फिरोझ खान हे अफगाण वंशाचे होते. त्यांचे वडील अफगाणिस्तानच्या गजनी भागातील तर आई ईराणी होती.
फिरोज खान यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ रोजी झाला. १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘दीदी’ या चित्रपटाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘टारझन गोज टू इंडिया’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी व्यक्तिरेखा साकारली होती. १९६५ साली प्रदर्शित झालेला ‘ऊँचे लोग’ हा चित्रपट त्यांचा पहिला ‘हिट’ चित्रपट ठरला. त्यानंतर आलेल्या ‘आरजू’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील स्थान पक्के केले आणि सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी फिरोझ खान यांना पसंती देण्यात येऊ लागली.
‘आदमी और इन्सान’मधील भूमिकेसाठी त्यांना पहिला सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘धर्मात्मा’ या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला खूप लोकप्रियता लाभली. सत्तर-ऐंशीच्या दशकात फिरोझ खान यांचा चाहतावर्ग तयार झाला. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘कुर्बानी’ ‘जाँबाज’ आणि ‘दयावान’ हे चित्रपटही हीट ठरले. १९९२ साली दिग्दर्शित केलेल्या ‘यल्गार’नंतर फिरोझ खान चित्रपटसृष्टीपासून दूर गेले होते.
पुत्र फरदीन खानला ‘लॉँच’ करण्यासाठी १९९८ साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश लाभले नाही. ‘वेलकम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘आरडीएक्स’ची भूमिका लोकप्रिय झाली होती.
फिरोझ खान यांचे २७ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
(7 ऑक्टोबर 1866-7 नोव्हेंबर 1905)
आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी. पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले. काव्यरत्नावली हया मासिकाचे संपादक. नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून `केशवसुत` या टोपण-नावाचा स्वीकार केला. जन्म रत्नागिरी जिल्हयातील मालगुंड हया गावी. शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठाकणी, शिक्षण कालातच 1880 मध्ये त्यांचा विवाह झाला. मॅट्रिकनंतर (1889) मुंबईला 1897 पर्यंत निरनिराळया हंगामी नोकऱया केल्या. पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले. आरंभी भडगावच्या नगर पालिकेच्या शाळेत दुय्यम शिक्षकाची नोकरी केली. 1901 पासून फैजपूरला मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. 1904 मध्ये धारवाडच्या सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून बदली झाली. 1905 साली हुबळीला गेले असताना प्लेगने त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागून आठच दिवसांनी त्यांची पत्नीही मरण पावली.
केशवसुतांनी विद्यार्थिदशेतच काव्यलेखनास आरंभ केला असला, तरी त्यांचा मुख्य काव्यरनाकाल 1885 ते 1905 हाच होय. या काळातील त्यांच्या सु. 135 कविता आज उपलब्ध आहेत. नागपुरास असताना रेव्ह. टिळक व कवी वसंत यांचा सहवास त्यांना लाभला होता. काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. या प्रयत्नात प्रारंभीच्या संस्कृत काव्याचा आदर्श अल्पकालीन ठरला व पूर्वकालीन मराठी काव्य प्रभावशून्य ठरले. परंतु इंग्रजीतील स्वच्छंदतावादी मनोवृत्तीच्या वर्ड्स्वर्थ, शेली आणि कीट्स यांसारख्या कवींचे काव्य मात्र त्यांना प्रेरक व अनुकरणीय वाटले. इंग्रजी अभ्यासक्रमातून व वि. मो. महाजनींनी विविधज्ञान विस्तारातून प्रकाशित केलेल्या भाषांतरांवरून इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्य त्यांस काहीसे परिचित झाले होते. त्या काव्याचा चिंतनमननातून केशवसुतांनी आत्मलेखनात्क स्फुट भावकविता लिहिली व मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आतविष्काराचे नवे व क्रांतिकारक वळण दिले. त्यांच्या काव्यात व्यक्तिगत स्नेहसंबंध, कवी व कवित्व स्त्रीपुरूषांतील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूट (साक्षात्कारी) अनुभूती अशा विविध विषयांवरील भावानुभवांचा आविष्कार आढळतो. एका दृष्टीने स्वच्छंदतावादी मनोवृतीचा आविष्कार मराठी काव्यक्षेत्रात निश्चित क्रांतीकारक ठरला, म्हणूनच केशवसुतांच्या, संख्येने अल्प असलेल्या प्रत्येक प्रकारच्या काव्यरचनेला नंतरच्या काळात स्वतंत्र परंपरा लाभू शकली.
आनंदीबाई शिर्के या त्यांच्या ‘सांजवात’ या आत्मचरित्रामुळे प्रसिद्ध झाल्या. त्यांचा जन्म ३ जून १८९२ रोजी झाला. आनंदीबाईंनी ‘सांजवात’या पुस्तकातून जुन्या काळातील स्त्रीजीवनाचं वास्तव आणि प्रांजळ चित्रण केलं आहे. एकत्र कुटुंबपद्धती, मुलींवर आणि स्त्रियांवर असलेली बंधनं, समाजातल्या रूढी, अशा अनेक गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे.
आनंदीबाईंचं माहेरचं नाव अनसूया होतं. त्यांचे वडील पुण्यातले. पण त्यांनी बडोदे संस्थानात सयाजीराव गायकवाडांकडे नोकरी घेतली व ते तिथे राहायला गेले. आनंदीबाई तेव्हा तशा लहान होत्या. १९१० मध्ये मासिक मनोरंजनमध्ये कु. आनंदी या नावानं एक कथा छापून आली. अनेकांचं या नव्या नावाने लक्ष वेधून घेतलं. कथेचं नाव होतं ‘शारदाबाईंचे संसारचित्र’ या नावातच सारं काही समजतं.मात्र १९१२ मध्ये ‘मराठा मित्र’ ने याच लेखिकेची ‘बेगम दिलआरा’ ही एक मोगल काळातील प्रेमकथा छापली. आणि या लेखिकेला खूप मान्यता मिळवून दिली. प्रसिद्ध लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी संपादकांकडे विचारणा केली. ‘या कथेचे रचनाकौशल्य, पात्रांचे स्वभाव रेखाटन इतके वाखाणण्यासारखे आहे, एखाद्या पुरुष लेखकानेच टोपण नावाने ही कथा लिहिली नाही ना?’ आणि मग आनंदीबाई लिहीतच राहिल्या. सर्व महत्त्वाच्या आणि सामाजिक भान असणा-या पत्रांमधून लेखन करत राहिल्या. शिकणा-या, नोकरी करू पाहणा-या, अर्थार्जनानं येणा-या स्वातंत्र्याची चव चाखू पाहणा-या स्त्रियांची चित्रं, त्यांचे प्रश्न आनंदीबाईंच्या कथांमधून उमटायला लागले. प्रत्यक्ष आयुष्यातही आनंदी एक धाडसी, कणखर, आधुनिक विचारांची तरुणी होती. घरातच त्यांच्यातलं वेगळेपण आणि तेज जाणवू लागलं होतं. परिचाचरिकेचं प्रशिक्षण घेऊन, तोच व्यवसाय पत्करणार आणि वडिलांना हातभार लावणार असा निश्चय करून त्या एकविसाव्या वर्षापर्यंत विवाहापासून दूर राहिल्या. त्या काळात ही बंडखोरीच होती. आपला परिचारिकेचा व्यवसाय निष्ठेने सुरू करून आनंदीबाईंनी लेखनालाही प्रारंभ केला.
आनंदीबाईंचा विवाह म्हणजे त्या काळात लेखिका आणि संपादक यांचे भावबंध जुळून प्रेमविवाह होण्याचं हे दुर्मीळ उदाहरण आहे. पण शिवराम शिर्के हे मराठा मित्रचे कार्यकारी संपादक होते. कोकणातील खानदानी मराठा. ते विचारांनी पुरोगामी, पण देशावरल्या मराठा मुलीशी लग्न ठरवल्याबद्दल शिर्के यांच्या कुटुंबाला त्यावेळी फार त्रासातून जावं लागलं. आनंदीबाई आणि शिवरामपंत दोघांनीही खूप संयमानं अनेक गोष्टी सहन केल्या. वडील लवकर निवृत्ती घेऊन मुंबईला आल्यानंतर सारेजण मुंबईत राहिले. मुलींची लग्नं उरकणं हा वडिलांसमोरचा एककलमी कार्यक्रम होता. विवाहाच्या संदर्भात लिहिताना आनंदीबाईंनी मराठा समाजाच्या एकूण मानसिकतेवर प्रकाश टाकला आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या, घराण्याच्या जुनाट परंपरांच्या अभिमानापुढे इतर हितकर बाबींकडे दुर्लक्ष करण्याया या समाजाच्या प्रवृत्तीवर त्यांनी बोट ठेवलं आहे. आनंदीबाईंना शिकण्याची आवड होती, पण उत्तमप्रकारे शिक्षण घेणं त्यांना परिस्थितीमुळे जमलं नाही. शिकता न आल्याने नोकरी मिळवणं कठीण बनलं. नर्सिंग शिकून ते काम करता येईल असं त्यांना वाटत होतं, पण या गोष्टीला घरातून विरोध झाला. पुस्तकांची सोबत आणि वाचनाची आवड मात्र त्यांनी मनापासून जोपासली. वाचनातूनच त्यांना लिहायची प्रेरणा मिळाली. नर्सिंगला जाता आलं नाही, तरी त्या चंद्राबाई नावाच्या सुईणीबरोबर जाऊन बाळंतपणाच्या केसेस बघत. त्या कथालेखन करत आणि लेखनामुळे त्यांचा परिचय ‘मराठामित्र’चे सहसंपादक शिवराम शिर्के यांच्याशी झाला. परिचयाचं रूपांतर पुढे प्रेमात आणि त्यानंतर लग्नात झालं. दोघेही मराठा समाजातले असले तरी शिर्के हे कोकणस्थ मराठा आणि शिंदे देशस्थ मराठा असा फरक असल्यामुळे माहेरून या लग्नाला विरोध झाला. कारण त्याकाळी असे विवाह होत नसत. लग्नाची ही गोष्ट सांगताना आनंदीबाईंनी मराठा समाजातील बंदिस्त व झापडबंद रूढींकडे निर्देश केला आहे. या सा-या लिखाणात कमालीचा मोकळेपणा आहे.
विवाहोत्तर जीवनाबद्दल लिहिताना आपल्या सहजीवनातील अनेक तपशील त्या देतात. त्या स्वतः अत्यंत थेट बोलणा-या अन् परखड स्वभावाच्या होत्या, तर पती शिवराम शिर्के स्वभावाने नरम, सरळपणे सगळ्या गोष्टीकडे बघणारे. दुस-याला नावं न ठेवता आपल्या मार्गाने जाणारे. संसारातले अनेक बरेवाईट प्रसंग यामुळे निभावले गेले. दुस-यामुळे स्वतःला नुकसानीत जायची पाळी आली तरी शिर्के काही न बोलता शांतपणे वागत, त्यामुळे आनंदीबाई चिडत. एकमेकावरील प्रेमाने आणि विश्वासाने त्यांचा संसार खूपच उत्तम झाला.
आनंदीबाई लिखाण करता करता, कौटुंबिक वर्तुळाच्या पलीकडे गेल्याच होत्या. पुढे तर त्या समाजकारण व राजकारणातही सक्रिय बनल्या हा सारा अनुभव त्यांच्या जीवनाला एक नवं भान देणारा ठरला. सतत स्थलांतर करतच त्यांचा संसार झाला. पुणं, मुंबई, सातारा, खानदेश अशा विविध ठिकाणी नवं घर मांडण्याचा आणि ते चालवण्याचा खटाटोप आनंदीबाई हिमतीने करत. जळगावला राहत असताना स्कूल बोर्डावर सदस्य म्हणून त्या गेल्या आणि त्यांना यामुळे सभेत बोलण्याचा सराव झाला. १९३५ साली जळगावला माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यसंमेलन झालं तेव्हा त्यांची निवड स्वागताध्यक्ष म्हणून झाली होती. साहित्यक्षेत्रात त्यांचा अनेक मोठ्या लेखकांशी परिचय झाला. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांना आपली मुलगीच मानत असत. मा.आनंदीबाई शिर्के यांचे ३१ ऑक्टोबर १९८६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. नंदिनी आत्मसिध्द /ग्लोबल मराठी
मातब्बर मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापूर येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना मा.दत्ता धर्माधिकारी कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक वामनबुवा पाध्ये यांच्याकडे शास्त्रोक्त गाणे शिकायला जात. ‘प्रभात फिल्म कंपनी’त त्यांना नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यांना ‘टाईमकीपर’ची ‘हजेरी मास्तर’ नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यावेळी कुठल्याही कर्मचार्याचला चित्रपटात एखादी किरकोळ भूमिका करावयास सांगत. काही मंडळी अगदी हौसेनं ती भूमिका करीत. हजेरी मास्तर असलेल्या दत्ताजींना १९३७ सालच्या ‘कुंकू’मध्ये नायिका शांता आपटे हिला लग्नासाठी दाखवण्यात येणार्या् एका तरुण मुलाचे काम देण्यात आले. नायिका शांता आपटे हिचा त्यावेळी इतका प्रचंड दबदबा होता की तिच्यासमोर दत्ताजी जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांना दरदरून घाम फुटला व त्यांनी कॅमेर्याहसमोरून एकदम पळ काढला. ते काम मग संकलन विभागात काम करणार्या् अनंत माने यांनी केलं.
कॅमेर्या समोरून घाबरून पळणार्याे याच दत्ताजींनी पुढे ‘माणूस’मधील ‘कशाला उद्याची बात’ या गाण्यातल्या सारंगीयाचं व ‘संत ज्ञानेश्व्र’ या चित्रपटातील सोपानदेवाचं काम अगदी निर्भयपणे केलं होतं. ‘संत ज्ञानेश्वतर’च्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक राजा नेने यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री झाली. ‘प्रभात’मध्ये असल्यापासून दत्ताजींनी राजा नेने यांची धरलेली संगत ‘प्रभात’ सोडल्यावरही सुटली नव्हती. राजा नेने यांनी ‘प्रभात’बाहेरच्या दिग्दर्शित केलेल्या सर्व चित्रपटांचे सहाय्यक म्हणून दत्ताजींनी काम केले होते. १९४७च्या ‘शादी से पहले’ या चित्रपटापर्यंत ते राजा नेने यांचे सहाय्यक होते. ‘मायाबाजार’ पासून दत्ता धर्माधिकांरींची दिग्दर्शक म्हणून ओळख झाली. त्यांनी स्वत:ची ‘आल्हाद चित्र’ नावाची चित्रपट काढणारी संस्था स्थापन केली. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. वि. बोकील यांच्या ‘गाठीभेठी’ या कथेवरून ‘आल्हाद’चा पहिला चित्रपट ‘बाळा जो जो रे’ निघाला.
आशा भोसलेंच्या आवाजातलं ‘बाळा जो जो रे’ हे अंगाईगीत महाराष्ट्रातल्या घराघरात गेलं. ‘आल्हाद’चा पुढचा ‘स्त्री जन्माही तुझी कहाणी’ हाही चित्रपट खूप गाजला. त्याच्या यशामुळे हिंदीतील प्रसिद्ध निर्माते सरदार चंदूलाल शहा यांनी त्यांच्या ‘रणजित मूव्हीज’तर्फे औरत तेरी कहानी (भारतभूषण- निरूपा रॉय) हा चित्रपट काढला. आधीचे दोन्ही चित्रपट बाहेरच्या निर्मात्यांनी हिंदीत काढल्यामुळे यावेळचा म्हणजे पुढचा तिसरा चित्रपट ‘आल्हाद’ने मराठी व हिंदी दोन्ही भाषात काढायचं ठरवलं. चित्रपटाचे नाव होते - ‘चिमणी पाखरं’ (हिंदीत-नन्हे मुन्ने) याही चित्रपटाने रौप्यमहोत्सव केला. १९५२ सालचा हा काळ म्हणजे ‘आल्हाद चित्र’चा ऐश्वनर्याचा काळ होता. सर्वांचं भलं चिंतणार्या् धर्माधिकारींची नियत अतिशय चांगली होती. चित्रपटसृष्टीत शोधून सापडणार नाही असा प्रामाणिकपणाचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता. वेगळ्या विषयावरचा म्हणजे बहिर्या -मुक्या मुलीच्या भावस्पर्शी कथेवरचा ‘अबोली’ हा सुंदर चित्रपट अपयशी ठरला.
खादीचा पांढराशुभ्र शर्ट, पायजमा व टोपी घालणारे पुढार्या सारख्या पोषाखातले धर्माधिकारी चित्रपटसृष्टीतले वाटत नसत. चेहर्याावर कायम हास्य असणार्याय धर्माधिकारींचे सर्वांशी जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध असत. दत्ता धर्माधिकारी यांचे ३० डिसेंबर १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ मधू पोतदार
प्रसिद्ध बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी यांचा जन्म १९ एप्रिल १९६८ रोजी झाला.
तरुण पिढीमध्ये सर्वात लोकप्रिय बासरी वादक रूपक कुलकर्णी यांनी आपले वडील मल्हार कुलकर्णी यांच्या कडून सुरवातीचे शिक्षण घेतले. रूपक कुलकर्णी हे वयाच्या ९ व्या वर्षी पद्म विभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य झाले. वयाच्या ९ वर्षांच्या पासूनच, कठोर प्रशिक्षण घेत रुपक कुलकर्णी यांनी ध्रुपद, खयाल आणि बासरीच्या तंत्रशैली शैलीत चांगली कामगिरी केली.
रुपक कुलकर्णी यांचा पहिला एकल बासरी परफॉरमिंग वयाच्या ११ व्या वर्षी दरबार हॉल, बडोदा येथे झाला जिथे सुमारे १५०० संगीत प्रेमींना त्यांनी मंत्रमुग्ध केले होते. पुढे त्यांनी संपूर्ण भारतात आणि परदेशात जवळजवळ सर्व नामांकित संगीत सभाच्या मध्ये आपले बासरी वादन सादर केले आहे. त्यांचा पहिला संगीत अल्बम ‘TENDERLY’ वयाच्या १८ व्या वर्षी तबला वादक पं. अनिंदो चॅटर्जी यांच्या बरोबर आला. पुढे रूपक कुलकर्णी यांनी टाईम्स म्युझिक, एचएमव्ही, नवरस, प्लस म्युझिक, रिदम हाऊस, निनाद, एबीसीएल, सेन्स वर्ल्ड (लंडन), कॉप रेकॉर्ड्स इत्यादी म्युझिक कंपन्यांमार्फत आपले अल्बम प्रसिद्ध केले आहेत.
रूपक कुलकर्णी यांच्या बासरी मैफिली नियमितपणे आकाशवाणी आणि दूरदर्शन, स्टार टीव्ही, झी टीव्ही आणि सीएनएन-आयबीएन इत्यादी टीव्ही चॅनेलवर होत असतात.
रूपक कुलकर्णी यांची वेब साईट
http://www.fluterupakkulkarni.com
रूपक कुलकर्णी यांची मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=ZXSKV4P04Gg
रूपक कुलकर्णी यांचे बासरी वादन
https://www.youtube.com/watch?v=OP9N6GBVvpY
https://www.youtube.com/watch?v=Z-_-Hdq6-RU
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Copyright © 2025 | Marathisrushti