कृष्णाजी केशव (कवी केशवसूत) दामले

(7 ऑक्टोबर 1866-7 नोव्हेंबर 1905)

आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी. पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले. काव्यरत्नावली हया मासिकाचे संपादक. नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून `केशवसुत` या टोपण-नावाचा स्वीकार केला. जन्म रत्नागिरी जिल्हयातील मालगुंड हया गावी. शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठाकणी, शिक्षण कालातच 1880 मध्ये त्यांचा विवाह झाला. मॅट्रिकनंतर (1889) मुंबईला 1897 पर्यंत निरनिराळया हंगामी नोकऱया केल्या. पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले. आरंभी भडगावच्या नगर पालिकेच्या शाळेत दुय्यम शिक्षकाची नोकरी केली. 1901 पासून फैजपूरला मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. 1904 मध्ये धारवाडच्या सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून बदली झाली. 1905 साली हुबळीला गेले असताना प्लेगने त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागून आठच दिवसांनी त्यांची पत्नीही मरण पावली.

केशवसुतांनी विद्यार्थिदशेतच काव्यलेखनास आरंभ केला असला, तरी त्यांचा मुख्य काव्यरनाकाल 1885 ते 1905 हाच होय. या काळातील त्यांच्या सु. 135 कविता आज उपलब्ध आहेत. नागपुरास असताना रेव्ह. टिळक व कवी वसंत यांचा सहवास त्यांना लाभला होता. काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. या प्रयत्नात प्रारंभीच्या संस्कृत काव्याचा आदर्श अल्पकालीन ठरला व पूर्वकालीन मराठी काव्य प्रभावशून्य ठरले. परंतु इंग्रजीतील स्वच्छंदतावादी मनोवृत्तीच्या वर्ड्स्वर्थ, शेली आणि कीट्स यांसारख्या कवींचे काव्य मात्र त्यांना प्रेरक व अनुकरणीय वाटले. इंग्रजी अभ्यासक्रमातून व वि. मो. महाजनींनी विविधज्ञान विस्तारातून प्रकाशित केलेल्या भाषांतरांवरून इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्य त्यांस काहीसे परिचित झाले होते. त्या काव्याचा चिंतनमननातून केशवसुतांनी आत्मलेखनात्क स्फुट भावकविता लिहिली व मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आतविष्काराचे नवे व क्रांतिकारक वळण दिले. त्यांच्या काव्यात व्यक्तिगत स्नेहसंबंध, कवी व कवित्व स्त्रीपुरूषांतील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूट (साक्षात्कारी) अनुभूती अशा विविध विषयांवरील भावानुभवांचा आविष्कार आढळतो. एका दृष्टीने स्वच्छंदतावादी मनोवृतीचा आविष्कार मराठी काव्यक्षेत्रात निश्चित क्रांतीकारक ठरला, म्हणूनच केशवसुतांच्या, संख्येने अल्प असलेल्या प्रत्येक प्रकारच्या काव्यरचनेला नंतरच्या काळात स्वतंत्र परंपरा लाभू शकली.



(7 ऑक्टोबर 1866-7 नोव्हेंबर 1905)

आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी. पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले. काव्यरत्नावली हया मासिकाचे संपादक. नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून `केशवसुत` या टोपण-नावाचा स्वीकार केला. जन्म रत्नागिरी जिल्हयातील मालगुंड हया गावी. शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठाकणी, शिक्षण कालातच 1880 मध्ये त्यांचा विवाह झाला. मॅट्रिकनंतर (1889) मुंबईला 1897 पर्यंत निरनिराळया हंगामी नोकऱया केल्या. पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले. आरंभी भडगावच्या नगर पालिकेच्या शाळेत दुय्यम शिक्षकाची नोकरी केली. 1901 पासून फैजपूरला मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. 1904 मध्ये धारवाडच्या सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून बदली झाली. 1905 साली हुबळीला गेले असताना प्लेगने त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागून आठच दिवसांनी त्यांची पत्नीही मरण पावली.

केशवसुतांनी विद्यार्थिदशेतच काव्यलेखनास आरंभ केला असला, तरी त्यांचा मुख्य काव्यरनाकाल 1885 ते 1905 हाच होय. या काळातील त्यांच्या सु. 135 कविता आज उपलब्ध आहेत. नागपुरास असताना रेव्ह. टिळक व कवी वसंत यांचा सहवास त्यांना लाभला होता. काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. या प्रयत्नात प्रारंभीच्या संस्कृत काव्याचा आदर्श अल्पकालीन ठरला व पूर्वकालीन मराठी काव्य प्रभावशून्य ठरले. परंतु इंग्रजीतील स्वच्छंदतावादी मनोवृत्तीच्या वर्ड्स्वर्थ, शेली आणि कीट्स यांसारख्या कवींचे काव्य मात्र त्यांना प्रेरक व अनुकरणीय वाटले. इंग्रजी अभ्यासक्रमातून व वि. मो. महाजनींनी विविधज्ञान विस्तारातून प्रकाशित केलेल्या भाषांतरांवरून इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्य त्यांस काहीसे परिचित झाले होते. त्या काव्याचा चिंतनमननातून केशवसुतांनी आत्मलेखनात्क स्फुट भावकविता लिहिली व मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आतविष्काराचे नवे व क्रांतिकारक वळण दिले. त्यांच्या काव्यात व्यक्तिगत स्नेहसंबंध, कवी व कवित्व स्त्रीपुरूषांतील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूट (साक्षात्कारी) अनुभूती अशा विविध विषयांवरील भावानुभवांचा आविष्कार आढळतो. एका दृष्टीने स्वच्छंदतावादी मनोवृतीचा आविष्कार मराठी काव्यक्षेत्रात निश्चित क्रांतीकारक ठरला, म्हणूनच केशवसुतांच्या, संख्येने अल्प असलेल्या प्रत्येक प्रकारच्या काव्यरचनेला नंतरच्या काळात स्वतंत्र परंपरा लाभू शकली.

Author