(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु. ल. देशपांडे

    महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व आणि ज्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसण्यास शिकवले अशा पु. ल. देशपांडे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला.

    'पु लं'चे शालेय शिक्षण पार्लेच्या टिळक विद्यालयात झाले. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेज येथून कॉलेज पूर्ण केले. भास्कर संगितालय येथील दत्तोपंत राजोपाध्याय यांच्याकडून त्यांनी हार्मोनियमचे (पेटी) धडे घेतले. पु ल,नी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयात शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. मा.पु. ल. देशपांडे यांचा विनोदी लेखक हा गुण त्यांच्या असंख्य गुणांपैकी केवळ एक गुण होता.

    त्यांनी साहित्य, चित्रपट, नाटक या कलांच्या प्रांतात विलक्षण समृद्ध कामगिरी केली. पु. ल नी मराठीवर खूप प्रेम केले आणि त्या भाषेतील सर्व बोलीभाषा त्यानी आपल्या मानल्या. संगीत नाटके भरात होती, तो मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ जो होता त्याचे सर्व नजाकतीसह दर्शन घडविताना त्यानी मराठी रंगभूमीचे सांस्कृतिक संचित जोपासले. पु. ल. याना एक खेळिया मानले जाते. कारण ते एक श्रेष्ठ परफॉर्मर होते. त्यांच्या लेखनात शिल्प, चित्र, संगीत, अभिजात साहित्य, तत्वज्ञान, नाटक, अशा सार्याग क्षेत्रांविषयी सृजनशील चिंतन खेळकरपणे मांडले आहे. पु. ल नी गुळाचा गणपती या चित्रपटात पटकथा लेखन, दिग्दर्शन, अभिनय आदि सबकुछ पु. ल असा कार्यक्रम केला.

    दूधभात, नवरा बायको, देवबाप्पा आदि चित्रपटांमध्ये त्यानी भूमिका केल्या. त्यांच्या अभिनयाचा अत्यंत प्रसन्न आविष्कार वार्यारवरची वरात (रविवार सकाळ), असा मी असामी, वावटळ अशा कार्यक्रमांमधून सादर झाला. चित्रपटांमध्ये तो अभिनय रसिकाना भुरळ घालत होता. त्यानी केलेले व्यक्ति आणि वल्ली, गणगोत असे व्यक्तिचित्रणात्मक लेखन हे त्या प्रकारच्या लेखनात अजरामर झाले. मा.पु.ल. देशपांडे यांची सहृदय जीवनदृष्टी त्यातून व्यक्त झाली आहे. त्यांच्या साहित्यात दुसर्या महायुद्धानंतर महाराष्ट्रात झपाटयाने उ्दयाला आलेल्या मध्यमवर्गाच्या सार्याख संवेदना आहेत आणि त्या वर्गाचे कमालीचे जिवंत चित्रण आहे.पण त्यापुरतेच पु.ल. मर्यादित नाहीत. त्यानी जीवनाच्या सर्व क्षेत्राना स्पर्श करणारे लिहिले तरी किंवा त्यात सहभागी तरी झाले. पुलंनी जवळपास ४० वेगवेगळी पुस्तके लिहिली. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांच्या तर २० हून अधिक आवृत्या खपल्या.

    मराठी वाडमयाचा (गाळीव) इतिहास, खोगीरभरती, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक ही त्यांची इतर विनोदी पुस्तकेही गाजली. त्यांच्या आवृत्त्यांचेही विक्रम झाले. त्यांची निरीक्षण शक्ती अफाट होती, हे त्यांनी लिहीलेल्या प्रवासवर्णनावरूनच कळेल. त्यांनी अमेरीका, युरोप, आशियातील अनेक देश पाहिले.

    त्यात त्यांना प्रवासात आलेले अनुभव त्यांनी अतिशय गमतीदार पध्दतीने लिहिले आहेत. पूर्वरग, अपूर्वाई, जावे त्याच्या देशा , वंगचित्रे आदी प्रवासवर्णने आहेत. त्यांची नाटकेही अतिशय गाजली. वार्यावरची वरात, तुझं आहे तुझपाशी, अमलदार, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, फुलराणी ही काही नाटके आहेत. याशिवाय त्यांनी लिहिलेली काही व्यक्तिचित्रेही अजरामर ठरली आहेत. गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी यात पुलंनी आपल्या सुह्रदांबद्दल लिहिले आहे. पुलंच्या नावावर काही चांगले अनुवाद आहेत. द ओल्ड मॅन अॅण्ड द सी या हेमिंग्वेच्या गाजलेल्या पुस्तकाचे एका कोळीयाने या नावाने पुलंनी केलेला अनुवाद निव्वळ अप्रतिम.

    याशिवाय मनोहर माळगावकरांच्या कान्होजी आंग्रे हे ऐतिहासिक व्यक्तिचित्र रेखाटलेले अनुवादीत पुस्तकही मा.पुलंच्या नावावर आहेत. बटाट्याची चाळ व असा मी असामी चे त्यांनी एकपात्री प्रयोगही बरेच केले. बा. भ. बोरकरांच्या कविता त्यांनी व सुनीताबाई देशपांडे यांनी एकत्र वाचण्याचे कार्यक्रमही त्यांनी केले. त्यांनी आपल्या लेखनातून एक मूल्यविवेक मात्र जागा केला. तो मूल्य विवेक आहे मानवतावादाचा.समतेचा, सामाजिक विषमतेच्या विरोधात लढण्याचा. आविष्कार स्वातंत्र्याचा आणि अभिजात सौदर्यदृष्टी जोपासण्याचा.त्यांचे एकूणच जगण्यावर विलक्षण प्रेम होते. जीवन हे सौदर्याचं दर्शन घेण्यासाठी आहे, सौदर्याचा उत्सव पाहण्यासाठी आहे ही त्यांची धारणा होती. त्यानी जे सौदर्य अनुभवले त्याचे दर्शन त्यानी सार्याद वाचकाना घडविले. निखळ आनंद दिला. जीवनातील आनंदाचा आस्वाद कसा घ्यावा हे त्यानी दाखविले. पु. ल देशपांडे यांनी रवींद्र साहित्य, संगीतापासून कुमार गंधर्वाच्या सूफी संगीतापर्यंत, निर्गुणी भजनापर्यंत,त्यांच्या संगितातील प्रयोगांपर्यंत सारे कलाजीवन समरसून अनुभवले. बालगंधर्वांच्या काळातील संगीत नाटकांचा अत्यंत समृद्ध असा काळ अनुभवला.

    गुरुदेव रवीद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये राहून त्यानी तेथील कलासाधना आणि शिक्षणाचा अनुभव घेतला. त्यानी बाबा आमटे यानी घनदाट जंगलात कुष्ठ रोग्याना नेऊन त्याच्या पुनर्वसनाचे काम करताना कुष्ठ रोग्यांच्या श्रमातून फुलविलेल्या आनंदवनाच्या प्रतिसृष्टीमध्ये तर रमले. तेथे त्यांना मानवतावादाचा प्रकाश दिसला. ते दलितांची वेदना व्यक्त करणार्या् साहित्याशी एकरूप झाले आणि तो विद्रोह ज्या विषमतेच्या विरोधात होता त्या विषमतेच्याविरोधात चाललेल्या लढ्यामध्ये ते सहभागी झाले.

    मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु. लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले. ते लेखक, अभिनेते, संगितकार, प्रभावी वक्ते, चित्रपट व सिरिअल्सचे निर्माते-दिग्दर्शक होते. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणार्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.

    पुलंचा भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण केला होता.एखाद्यानं सार्वजनिक क्षेत्रातील केलेल्या संस्मरणीय कामगिरीचा गौरव म्हणून त्याच्या नावाचा स्टॅम्प प्रसृत करण्याची भारतीय टपाल खात्याची प्रथा आहे. टपाल खात्यानं मा.पु. ल. यांच्या नावाचा स्टॅम्प काढलेला आहे.पु. ल. देशपांडे यांचे १२ जून २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • एस.एम.जोशी

    एस.एम. यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात स्वातंत्र्य चळवळीतूनच झाली. काही विशिष्ट ध्येये, जीवनमूल्ये आणि निष्ठा घेऊनच एस.एम. जोशी यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला.

  • पांडुरंग महादेव बापट (सेनापती बापट)

    राजकिय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भाग घेत असतांना राजदोहात्मक भाषणे केल्याबदल अनेकदा अनेक वर्षे सक्तमजूरीची शिक्षा झाली. संस्थानाची प्रजांच्या हक्कांकरिता चालु असलेल्या आंदोलनात भाग घेऊन संस्थानच्या प्रवेशबंद्या त्यांनी मोडल्या त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी ओदोलन गोवामुक्ती आंदोलन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इ. ओदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.

  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्रेष्ठ भारतीय चित्रपट-दिग्दर्शक सत्यजित रे

    पथेर पांचाली,अपराजितो,अपूर संसार,(‘अपू चित्रपटत्रयी’), अभिजन, चारुलता, शतरंज के खिलाडी आणि असे अनेक दर्जेदार चित्रपट देणारे सत्यजित रे. त्यांचा जन्म २ मे १९२१ रोजी कलकत्ता येथे झाला. सत्यजित रे यांना प्रेमाने "माणिकदा‘ असे ही म्हटले जाई. नावाप्रमाणे ते भारतीय सिनेमातील एक "माणिक‘ होते. अमूल्य रत्न होते. सत्यजित रे यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर, कलेच्या ओढीमुळे १९४० साली ते रवींद्रनाथ टागोरांच्या प्रेरणेने शांतिनिकेतन मध्ये दाखल झाले. नंदलाल बोस यांच्यासारख्या चित्रकार-कलातज्ञाचे तेथे मार्गदर्शन लाभल्यामुळे रे यांची अंगभूत कलासक्ती आणि सौंदर्यदृष्टी वृद्धिंगत होत गेली. तेथून बाहेर पडल्यावर १९४३च्या सुरुवातीला ‘डी. जे. केमर अँड कंपनी’ या ब्रिटिश जाहिरातसंस्थेत त्यांची वाणिज्य कलाकार म्हणून नेमणूक झाली. पुस्तकांची मुखपृष्ठे अत्यंत कलात्मक रीतीने सजविण्यात त्यांचा हातखंडा होता. नोकरीत असतानाच त्यांची चित्रपटाची रुची आणि व्यासंग वाढत गेला. रे त्यावेळी अनेक नियतकालिकांतून चित्रपटविषयक लेख लिहीत असत. १९४७ मध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘कलकत्ता फिल्म सोसायटी’ सुरू केली. १९५० मध्ये त्यांना कंपनीतर्फे उच्च शिक्षणाकरिता इंग्लंकडला पाठविण्यात आले. तेथील सहा महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी शेकडो उत्तमोत्तम चित्रपट पाहिले. मात्र त्यांना स्वतःचा चित्रपट काढण्याची प्रेरणा मिळाली, ती मुख्यत्वे डी सिका या दिग्दर्शकाच्या द बाय्‌सिकल थीफ या चित्रपटामुळे. १९५० मध्ये भारतात परतल्यावर त्यावेळी येथे वास्तव्य असलेल्या फ्रेंच दिग्दर्शक झां रन्वार यांचा सहवास व मार्गदर्शन त्यांना लाभले. तत्पूर्वी बिभूतिभूषण बंदोपाध्याय या सुप्रसिद्ध लेखकाच्या पथेर पांचाली या कथेने त्यांच्या मनात घर केले होतेच. त्याच कथेवर चित्रपट काढावा असे त्यांना इतक्या तीव्रतेने वाटू लागले, की बोटीतून हिंदुस्थानात परत येत असतानाच त्यांनी त्यावर चित्रपटकथा लिहायला सुरुवात केली होती. नोकरी सांभाळून फावल्या वेळात चित्रपट तयार करायचा असल्याने चित्रणकाळ अगोदरच लांबत गेला होता आणि पैशाचे सर्व प्रवाह आटले होते.

    योगायोगाने पश्चिम बंगालचे तेव्हाचे मुख्यमंत्री डॉ. बी. सी. रॉय यांनी चित्रपटाची कलात्मक मांडणी पाहून त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी बंगाल सरकार आपल्या अंगावर घेईल, असे घोषित केले. त्यामुळेच ३-४ वर्षे रखडलेला चित्रपट १९५५ साली एकदाचा पुरा झाला. त्याच वर्षी न्यूयॉर्कची ‘म्यूझीयम ऑफ मॉडर्न आर्ट’ ही प्रसिद्ध संस्था भारतीय कलेचे प्रदर्शन भरविणार होती. संस्थेच्या रे यांना परिचित असलेल्या एका प्रतिनिधीने चित्रपटाचा काही भाग तत्पूर्वी पहिलाही होता. अचानक न्यूयॉर्कहून चित्रपट दाखविण्याबद्दल मागणी आली. अशी अमोल संधी दवडू नये म्हणून रात्रंदिवस मेहनत करून चित्रपटाचे सर्व संस्कार पुरे करण्यात आले आणि पथेर पांचालीचे पहिले प्रदर्शन न्यूयॉर्कमध्ये झाले. त्यानंतर सु. दोन महिन्यांनी चित्रपट भारतात, म्हणजे कलकत्त्यात दाखविण्यात आला. पथेर पांचालीच्या न्यूयॉर्कच्या प्रदर्शनामुळे अनेक दूरगामी फायदे झाले. तज्ञांना तो चित्रपट इतका आवडला, की तेथील एक प्रसिद्ध वितरक एडवर्ड हॅरिसन यांनी १९५६ च्या कॅन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखविण्याची व्यवस्था केली. पथेर पांचाली मधील वास्तवता व कलात्मकता पाहून तेथील परीक्षक भारावून गेले आणि ‘मानवतेचा अत्युत्कृष्ट आलेख’ अशी त्यांनी चित्रपटाची एकमुखी शिफारस केली. कॅनखेरीज अनेक देशांत पथेर पांचालीला पारितोषिके मिळाली आणि सत्यजित रे यांना या पहिल्याच चित्रपटाने दिगंत कीर्ती मिळवून दिली. पथेर पांचाली या कथामालिकेत पुढे त्यांनी अपराजितो (१९५६) व अपूर संसार (१९५९) हे आणखी दोन सलग चित्रपट निर्माण केले. ही ‘अपू चित्रपटत्रयी’ विशेष मान्यता पावली. त्यांची पटकथा पुस्तकरूपात उपलब्ध आहे (द अपू ट्रिलॉजी, इं. भा. शंपा बॅनर्जी, १९८५). दरम्यान रे यांनी परश पथर (१९५७) आणि जलसाघर (१९५९) हे दोन चित्रपट तयार केले. त्यांचा देवी हा चित्रपट (१९६०) बंगालच्या सरंजामदारी परंपरेच्या पार्श्वभूमीवर होता. या पहिल्या सहा चित्रपटांना पं. रवि शंकर, विलायतखाँ, अली अकबर खाँ असे नामवंत संगीत दिग्दर्शक लाभले होते. नंतरच्या सर्व चित्रपटांना मात्र स्वतःच उत्तम जाणकार असलेल्या सत्यजित रे यांनी संगीत दिले आहे. १९५५ ते १९८५ या तीन दशकांत रे यांनी पंचवीस चित्रपट व काही अनुबोधपट निर्माण केले. रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित एक अनुबोधपट त्यांनी १९६१ मध्ये तयार केला.

    शिवाय टागोरांच्या कथेवरील तीन कन्या हा चित्रपटही त्याच वर्षी निर्माण केला. त्यानंतर कांचनजंगा व अभिजान (१९६२), महानगर (१९६३), टागोरांच्या कथेवरील चारुलता (१९६४), कापुरुष ओ महापुरुष (१९६५) आणि नायक (१९६६) इ. उत्तमोत्तम चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. चिडियाखाना (१९६७) व गोपी ग्याने बाघा ब्याने (१९६८) हे त्यांनी खास मुलांसाठी तयार केलेले चित्रपट होत. अरण्येर दिन रात्री व प्रतिद्वंदी (१९७०), सीमाबद्ध (१९७१) आणि दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील, १९४३ च्या मानवनिर्मित दुष्काळाचे चित्रण करणारा अशनी संकेत (१९७३) हे त्यांचे नंतरचे चित्रपट. सोनार केल्ला हा आणखी एक बाल-चित्रपट त्यांनी १९७४ साली काढला. १९७५ ते १९८५ या दशकातील रे यांचे चित्रपट म्हणजे जनअरण्य (१९७५), शतरंज के खिलाडी (१९७७), स्वतःच लिहिलेल्या गुप्तहेर कथेवर आधारित जय बाबा फेलुनाथ (१९७८), हीरक राजर देशे (१९८०) आणि अनेक वर्षे मनात घोळत असलेल्या टागोर कथेवरील घरे बैरे (१९८४). मा.सत्यजित रे हे चतुरस्त्र प्रतिभेचे कलावंत होत. साहित्य, चित्रकला, संगीत, रेखन, छायाचित्रण अशा विविध कलाक्षेत्रांत त्यांनी विपुल निर्मिती केली. चित्रपटाप्रमाणेच साहित्याचीही उत्कृष्ट जाण असल्याने संदेश या नियतकालिकाचे पुनरुज्जीकवन करून त्यांनी आपले आजोबा आणि वडील यांचा साहित्यिक वारसा पुढे चालू ठेवला आहे. तसेच त्यांनी स्वतःही विपुल कथावाङ्‌मय निर्माण केले आहे. त्यांचे अवर फिल्म्स देअर फिल्म्स (१९७६) हे पुस्तकही चित्रपटसमीक्षेत मोलाची भर घालणारे आहे. चित्रपटक्षेत्रात प्रवेश केल्यानंतर या विविध कला-संस्कारांचे संमिश्र प्रतिबिंब त्यांच्या चित्रणशैलीवर पडणे स्वाभाविक होते.

    पडद्यावरील आकृतिबंधाची रचना, प्रमाणबद्धता, दृश्यप्रकार, चित्रणकोन, अवकाशीय खोली, रंगसंगती, त्याचबरोबर बाह्य प्रतिमा व संगीत, कॅमेऱ्याची आशयानुरूप हालचाल, त्याद्वारे साधली जाणारी पोषक लय व तीच लय दृढ करणारे संकलन, नैसर्गिक ध्वनींचा केलेला मार्मिक उपयोग असे घटक रेंच्या चित्रपटात क्षणोक्षणी दृग्गोचर होतात. त्यासाठी त्यांचे चित्रपट एकदा पाहून पूर्णपणे आस्वादले जाऊ शकत नाहीत. कारण चित्रपट वेगाने पुढेपुढे सरकतो. प्रथम पहात असताना त्यांच्या इतर बारकाव्यांकडे दुर्लक्ष होऊ शकते. विशेषतः पथेर पांचाली या त्यांच्या पहिल्या कलाकृतीत साधी साधी दृश्ये केवळ रचनात्मकतेमुळे दृष्टीला सुखावणारी वाटतात. रे यांचे मोठेपण केवळ दर्जेदार कथावस्तू पडद्यावर पेश करण्यात नसून, ते भारतीय कथाशय चित्रपट-माध्यमाच्या सर्व घटकांच्या योग्य, कलात्मक संयोगातून प्रेक्षकाप्रत पोचविण्याच्या त्यांच्या प्रभावी शैलीतून सिद्ध झाले आहे. रे यांनी १९५९ पासून आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवाचे ज्यूरी म्हणून अनेक देशांत काम केले होते. त्यांना अनेक मानसन्मान लाभले होते, रामॉन मागसायसाय पारितोषिक, ‘ब्रिटिश फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्’तर्फे गेल्या अर्धशतकातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून सन्मान, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट मा.सत्यजित रे यांना मिळाला होता. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सत्यजित रे यांचा गौरव केला होता. फ्रान्स राष्ट्रातर्फे ‘लीजन ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च बहुमानाचा किताब रे यांना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मीत्तरां यांच्या हस्ते कलकत्ता येथे देण्यात आला. अनेक देशांतील चित्रपटविषयक पारितोषिके आणि मानसन्मान सातत्याने तीस वर्षे मिळविणारा सत्यजित रे यांच्यासारखा भारतीय कलावंत तसा दुर्मिळच म्हणावा लागेल. आगंतुक हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.या अवलियाच्या कामाचा गौरव १९९२ मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कार पुरस्कार देऊन करण्यात आला. सत्यजीत रे हे ऑस्कार मिळवणारे एकमेव भारतीय दिग्दर्शक होते. सत्यजित रे यांचे यांचे २३ एप्रिल १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • भारतीय-कॅनेडियन अभिनेत्री सनी लियोन

    केरेन मल्होत्रा हे सनी लियोनचे खरे नाव. भारतीय वंशाची कॅनेडियन अभिनेत्री असलेल्या सनी लियोनचा जन्म कॅनडातील सर्निया शहरात झाला. भारतीय-कॅनेडियन अभिनेत्री सनी लियोन यांचा जन्म १३ मे १९८१ रोजी झाला. सनी सुरूवातीला नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. सनी लियोनही शृंगारचित्रपटातील अभिनेत्री, उद्योगपती आणि मॉडेल आहे. सनीच्या आईवडिलांनी आपल्या मुलीचे नाव कॅथलिक शाळेत घातले होते. कारण शीख परिवारात वाढल्यामुळे पब्लिक स्कुलमध्ये सनीला अडचणी येतील असा विचार तिच्या आईवडिलांनी केला होता.

    सनी १५ वर्षांची असतांना तिने पहिला जॉब एका जर्मन बेकरीमध्ये केला होता. मात्र, पेंटहाऊस मॅग्झिनचा फोटोग्राफर जे एलेनला भेटण्यापूर्वी सनी लियोनने ऑरेंज काऊंटीमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. सनीने २००५ मध्ये एमटीव्ही इंडियाच्या रेड कार्पेटवर रिपोर्टरची भूमिका साकारली होती. ती २००३ मध्ये पेंटहाऊस पेट ऑफ दी इयर होती, आणि त्याचवेळी व्हिव्हिड एन्टरटेनमेंट यांच्याकटे कंत्राटी पद्धतीने काम करत होती. मॅक्झिम मासिकाने २०१० मध्ये तिला पहिल्या १२ अग्रेसर शृंगार अभिनेत्र्यांमध्ये स्थान दिले होते.

    भारतात २०११ मध्ये सनी पहिल्यांदा बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या पाचव्या पर्वात टीव्हीवर झळकली होती. बॉलिवूडमध्ये तिने जिस्म-२ या सिनेमाने पदार्पण केले. त्यानंतर तिने सिनेमांत काम करायला सुरुवात केली. बालपणापासूनच सनीची यशस्वी अभिनेत्री होण्याची इच्छा होती. सनी लियोनचे स्वतःचे एका प्रॉडक्शन आहे. तिच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव सनलस्ट पिक्चर्स असे आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • दिग्दर्शक,लेखक निर्माता रमेश सहगल

    रमेश सहगल जे इश्क पे जोर नहीं (१९७०), समाधी (१९५०) आणि शोला और शबनम (१९६१) साठी प्रसिद्ध होते. रमेश सहगल चित्रपट दिग्दर्शक होते तसेच त्यांनी निर्माता, कथा लेखक, संवाद लेखक आणि पटकथा लेखक म्हणूनही काम केले.

  • बालवाङ्‍मयाचे जनक  विनायक कोंडदेव ओक

    इंग्रजी तीन इयत्तांपर्यंतच त्यांचे शिक्षण झालेले असले, तरी इंग्रजी व मराठी भाषांवर त्यांनी चांगले प्रभुत्व मिळविले होते. शिक्षणक्षेत्रात प्रथम एक शिक्षक या नात्याने शिरून पुढे ते एक शिक्षणाधिकारी झाले, १८८१ साली मुलांसाठी बालबोध या नावाचे एक मासिक काढून त्यातून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. विविध प्रकारचे लेखन वैपुल्याने केले

  • निळू फुले

    निळू फुले हे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते.

  • भारतीय सिनेमाची ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी

    मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी एका सुन्नी मुस्लीम परिवारात झाला. आधीच खुर्शीद नावाची मुलगी असल्याने मुलगा व्हावा, अशी तिच्या आई-वडिलांची अपेक्षा होती. पण मुलगी जन्माला आल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यावेळी तर त्यांच्याकडे डॉक्टरांचे बिल देण्यासाठीही पुरसे पैसे नव्हते. म्हणून जन्मल्यानंतर लहानग्या महजबीनला मुस्लीम समाजाच्या अनाथालयात सोडण्याचे तिच्या जन्मदात्यांनी ठरवले. मात्र अनाथालयाच्या पायरीवर तिला सोडून जात असताना ऐनवेळी तिच्या वडिलांचे हृदयपरिवर्तन झाले आणि माघारी परतून महजबीनला छातीशी घट्ट कवटाळले. तसेच जमेल तसे तिचे पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला.

    मीना कुमारी यांना कलेचा वारसा तिच्या आई-वडिलांकडूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट तसेच पारसी रंगभूमीवरील एक कलाकार होते. काही चित्रपटांत संगीतकार म्हणूनही त्या काळी त्यांनी काम केले होते. आई इक्बाल बानो, पूर्वाश्रमीची प्रभावती देवी ही एक प्रसिद्ध नृत्यांगना होती. कामिनी या नावाने ती रंगभूमीवर अभिनय करत असे. पंडित रवींद्रनाथ टागोर यांच्या परिवाराशी त्यांचे जवळचे नातेसंबंध होते. मीना कुमारीला यांच्या परिवारात त्यांना ‘मुन्ना’ या नावाने संबोधले जात असे. चौथ्या वर्षापासूनच तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. विजय भट्ट यांचा ‘लेदर फेस’ हा त्यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट. खरंतर त्यांना शिकायची खूप इच्छा होती. पण चित्रपटांत अभिनय करून त्यांना लहानवयातच कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली. अधुरी कहानी, फरजद ए हिंद, लाल हवेली, अन्नपूर्णा, तमाशासारख्या वीस चित्रपटांत त्या बाल कलाकार ‘बेबी मीना’ म्हणून चमकली. नायिका म्हणून अभिनय केलेला ‘बच्चों का खेल’ हा पहिला चित्रपट. त्यावेळी मा.मीना कुमारी अवघी चौदा वर्षाची होती. सुरुवातीला त्यांनी पौराणिक चित्रपटांतून अभिनय केला. नर्गिस, निम्मी, सुचित्रा सेन, नूतनसारख्या नव्या दमाच्या अभिनेत्रींचा तो काळ होता. ‘महल’ या चित्रपटाच्या यशानंतर एका चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक कमाल अमरोही यांना तिने अभिवादन केले असता त्यांनी तिच्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. मा.मीना कुमारी नायिका म्हणून यशस्वी ठरल्यानंतर कमाल अमरोही यांच्याकडूनच तिला त्यांच्या ‘अनारकली’ चित्रपटात काम करण्याबाबतचा प्रस्ताव आला. मागील अनुभव चांगलाच लक्षात असल्याने मा.मीना कुमारीने प्रस्ताव नाकारला. त्यामागचे कारण समजल्यानंतर कमाल अमरोही यांनी समक्ष भेटून तिचा गैरसमज दूर केला. त्यानंतर मीना कुमारीने सदर चित्रपट करण्यासाठी होकार दिला. दरम्यानच्या काळात मीना कुमारी यांना अपघात झाला. तिच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्या कालावधीत कमाल अमरोही तिला ससून हॉस्पिटलला नियमित भेटावयास येत असत. ‘अनारकली’ चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेबाबत तिने अमरोही यांना विचारले असता तिच्या हातावर ‘मेरी अनारकली’ असे लिहीत. त्या भूमिकेसाठी अन्य कुणाच्या नावाचा विचारही करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले. अपघातात हाताला इजा झाल्यामुळे मीना कुमारीला कायमस्वरूपी बँडेड लावावे लागले. साडी अथवा ओढणीत तो हात तिला लपवावा लागत असे. पुढे ‘अनारकली’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होऊनही आर्थिक बाबींमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. मात्र त्या दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अमरोही यांना मा.मीना कुमारी ‘चंदन’ तर अमरोही तिला ‘मंजू’ या नावाने संबोधत असत. वडिलांच्या संमतीशिवाय निकाह करण्यास मीना कुमारी तयार नव्हती. आधी लग्न करू आणि मग घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांची संमती मिळवू, असे अमरोही यांनी पटवून दिल्याने मा.मीना कुमारी राजी झाली. १४ फेब्रुवारी १९५२ रोजी मीना कुमारीला वडिलांनी तिची लहान बहीण महलिकासह फिजिओथेरपी उपचारासाठी एका दवाखान्यात सोडलेले असताना रात्री ८ ते १० वाजताच्या दरम्यान प्रथम शिया आणि सुन्नी पद्धतीने मोजक्या साक्षीदारांसह दोघांचा निकाह झाला. पुढे वडिलांना समजल्यावर ते संतापले. तलाक व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी दोघांच्या भेटीगाठींवर निर्बंध आणले. मीना कुमारी यांना पती, कमाल अमरोहीच्या ‘डेरा’ चित्रपटात अभिनय करायची इच्छा होती. मात्र अली बक्ष यांनी मेहबूब खान यांच्या ‘अमर’ या चित्रपटात अभिनय करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. त्या चित्रपटाचे चार-पाच दिवसांचे चित्रीकरण झालेले असताना मेहबूब खान यांच्याशी मतभेद झाल्याने मीना कुमारी ‘अमर’ चित्रपटाचे चित्रीकरण अर्धवट सोडून पती कमाल अमरोही यांच्या ‘डेरा’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निघून गेली. या कारणामुळे वडिलांनी रात्री घरात न घेतल्याने पयार्याने मा.मीना कुमारी यांना कमाल अमरोही यांच्या घरी जावे लागले. मा.अमरोही यांना पहिल्या पत्नीपासून तीन अपत्ये होती. त्यामुळेच खूप इच्छा असूनही मीना कुमारीला मूल होऊ न देण्याचा निर्णय त्यांचेकडून तिच्यावर लादला गेला.

    परिणिता, दिल अपना और प्रीत पराई, दायरा, एक ही रास्ता, शारदा, दिल एक मंदिर, साहिब बिवी और गुलाम, काजल, फूल और पत्थर हे मा.मीना कुमारी यांनी अभिनय केलेले काही उल्लेखनीय चित्रपट. ‘परिणिता’ या चित्रपटापासून तिला भारतीय नारीच्या भावुक भूमिकाच मिळत गेल्या. फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली मा,मीना कुमारी ह्या पहिली अभिनेत्री. १९५३ साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी ‘बैजू बावरा’ आणि ‘परिणिता’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. पुढे ‘साहिब बिवी और गुलाम’ आणि ‘काजल’ चित्रपटांतील भूमिकांसाठी असे एकूण चार फिल्मफेअर पुरस्कार तिला मिळाले. दहाव्या फिल्मफेअर पुरस्कारावेळी ‘मैं चुप रहूंगी’, ‘आरती’ आणि ‘साहब बिवी और गुलाम’ चित्रपटांसाठी सवरेत्कृष्ट नायिकेच्या पुरस्कारासाठीची नामांकने तिलाच मिळालेली होती. मा.मीनाकुमारी ही अभिनेत्रीबरोबरच गायिका तसेच कवयित्रीदेखील होती. मात्र आपल्या रचना प्रकाशित करण्याचा फारसा प्रयत्न तिने कधीच केला नाही. ‘नाझ’ या नावाने तिच्या काही उर्दू रचना प्रकाशित आहेत. मा.मधुबाला ह्या मीना कुमारीच्या आवाजाची चाहती होती. दिलीप कुमार तिच्यासमोर नि:शब्द होत असे तर राजकुमार आपले संवाद विसरून जात असे. अभिनेता भारतभूषण तिच्या एकतर्फी प्रेमात होते. मा.मीना कुमारी यशाचे शिखर काबीज करत होती. मात्र कमाल अमरोही यांना तिच्या यशाचा हेवा वाटू लागला होता. सोहराब मोदी यांनी एका चित्रपटाच्या प्रीमियरवेळी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल यांना कमाल अमरोही यांचा परिचय लोकप्रिय अभिनेत्री मीना कुमारी यांचे पती असा करून दिला होता. तेव्हा ‘मी कमाल अमरोही व ही माझी पत्नी मीना कुमारी’ असे नमूद करत अमरोही त्या कार्यक्रमातून निघून गेले. मीना कुमारीने अभिनय करणे सोडून द्यावे, असे त्यांना वाटत असे. मात्र मीना कुमारीने नकार दिल्याने त्यांनी काही अटींवर तिला अभिनय कारकीर्द सुरूठेवण्यास अनुमती दिली. चित्रीकरण आटोपून साडेसहा वाजण्याच्या आत घरी परतणे. मेकअपरूममध्ये मेकअपमनशिवाय अन्य कुणाशी संवाद न साधणे. स्वत:च्याच वाहनाने प्रवास करणे, अशा त्या अटी होत्या. मात्र मीना कुमारीने त्या निमूटपणे स्वीकारल्या. तरी त्यांच्या वैवाहिक संबंधात दुरावा येत होता. पुढे ते विभक्त राहू लागले. मीना कुमारी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अभिनेता धमेंद्र हा चित्रपटांत जम बसवण्यासाठी धडपडत होता. मीना कुमारीच्या यशाचा धमेंद्रला मोठया प्रमाणावर फायदा झाला. दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याची जोरदार चर्चा होती. त्यावेळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मीना कुमारीची विमानतळावर भेट झाली असता त्यांनी तिच्याकडे धमेंद्रबाबत विचारणादेखील केली होती. पुढे मात्र ‘फूल और पत्थर’ चित्रपटानंतर धमेंद्रने तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती अत्यंत व्यथित झाली. तिची प्रकृतीही दिवसेंदिवस खालावत होती. डॉक्टरांनी झोप येण्यासाठी तिला एक पेग ब्रँडी घेण्याची सूचना केली. पण एक पेगचे दोन, दोनचे चार असे पेग वाढतच गेले आणि मीना कुमारी पुरती नशेच्या आहारी गेल्या. चित्रीकरणावेळी, प्रवासात सगळीकडे तिच्यासोबत पर्समधे मदिरेची छोटी कुपी असायची. ‘साहिब बिवी और गुलाम’मधील ‘छोटी बहू’ हे पात्र आपल्या वास्तव जीवनाशी साधम्र्य असल्याचे मीना कुमारी सांगत असत. त्यानंतरच्या काळात कमाल अमरोही त्यांच्या महात्त्वाकांक्षी ‘पाकिजा’ चित्रपटाची निर्मिती करत असताना आर्थिक संकटांना तोंड देत होते. त्या चित्रपटात मा.मीना कुमारी केवळ अभिनयच करत होती, असे नाही तर तिने तिची सर्व मालमत्ता अमरोही यांच्या चित्रपटासाठी पणाला लावली होती. तरीही ‘पाकिजा’चे चित्रीकरण अनेक वर्षे रखडले गेले. सुनील दत्त आणि नर्गिस यांनी पुढाकार घेऊन पुन्हा चित्रीकरण केले. ३ फेब्रुवारी १९७२ रोजी ‘पाकिजा’ प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला सुरुवातीला फारसा प्रतिसाद फारसा मिळाला नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनंतरच मा.मीना कुमारीचे निधन झाले. मीना कुमारी यांचे ३१ मार्च १९७२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / श्रीराम वाघमारे

    मीनाकुमारी यांची काही गाणी, पाकिजा चित्रपट, बायोग्राफी
    https://youtu.be/0R04XbzDNjU

    https://youtu.be/qkD39k9xaVQ

    https://youtu.be/XtdGZd7vR-U

    https://youtu.be/jNdVm0W7Vtc

    https://youtu.be/TnM5g4eTYUI

    https://youtu.be/Q2X6u0Zg8P8

  • अभिनेत्री रति अग्निहोत्री

    रति अग्निहोत्रीने अनेक हिंदी चित्रपटात काम केले असून तिचा"एक दुजे के लिए'हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यांचा जन्म १० डिसेंबर १९६० रोजी मुंबई मध्ये झाला.

    रतीने बॉलिवूडमध्ये या चित्रपटाने पाऊल ठेवले. या पहिल्याच चित्रपटाने रतीला रातोरात स्टार बनवले. हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटामुळे तिला ३ वर्षात ३२ तेलगु चित्रपटात काम करायाची संधी मिळाली. रतीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीची भूमिका केलीय. लग्नानंतर रतीने एक मोठ्ठा ब्रेक घेतला. यानंतर तब्बल सोळा वर्षांनी ‘कुछ खट्टी, कुछ मीठी’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.

    या चित्रपटात तिने काजोलच्या ग्लॅमरस आईची भूमिका साकारली होती. अलीकडच्या काळात ‘शादी के साइड इफेक्ट्स’,‘सिंह इज ब्लिंग’ यासारख्या सिनेमात रती अलीकडे दिसली होती. रतीला तनूज नावाचा एक मुलगा आहे. ‘लव्ह यू सोनीयों’ या चित्रपटातून तनूजने बॉलिवूड डेब्यू केला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट