(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • बालकुमार साहित्यकार सुधाकर प्रभू

    सुधाकर प्रभू मराठी भाषेतील बालकुमार साहित्यकार होते.

    सुधाकर प्रभू यांचा जन्म गोव्यात पेडणे गावी झाला. शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते मुंबईला गेले. या काळातच वयाच्या अठराव्या वर्षी `आनंद` व भा.रा. भागवतांच्या `बालमित्र` या मासिकांत त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या. बी.ए. व बी.एड्. पदव्या संपादल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला.

    सुधाकर प्रभू यांनी दोनशेहून अधिक पुस्तके लिहिली. त्यातील `राजू प्रधान` ही व्यक्तिरेखा भा.रा. भागवतांच्या `फास्टर फेणे`प्रमाणे लोकप्रिय ठरली.

    पुस्तकांखेरीज `साप्ताहिक स्वराज्य`, `रविवार सकाळ`, `साप्ताहिक हिंदू`, `साधना` यासारख्या नियतकालिकांतूनही त्यांनी लेखन केले.

    बालसाहित्यातील कामगिरीबद्दल गोवा कला अकादमी, गोवा सरकार, भारत सरकारचे पुरस्कार त्यांना लाभले.

    कोल्हापूर येथे 1991 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

    30 जुलै 2007 रोजी पुणे येथे सुधाकर प्रभू यांचे निधन झाले.

  • उस्ताद विलायत खाँ यांचे निकटवर्तीय शिष्य पं. मधुकर दीक्षित

    वडिलोपार्जित त्यांचा भिक्षुकी व्यवसाय होता. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९३५ रोजी वाराणसी येथे झाला. त्यांच्या कुटुंबात कोणतीही संगीताची पूर्वपीठिका नसताना त्यांना बालवयातच संगीताची आवड निर्माण झाली होती. परंतु, कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यांची सतार वादनाची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडील बंधूनी त्यांना त्या काळी सतार विकत घेण्यास ३५ रुपयांची मदत करून, त्यांना सतार शिकण्यास प्रोत्साहित केले. त्यानंतर त्यांनी वाराणसीतील तत्कालीन नामांकित सतारवादक पं. ज्योतीशचंद्र चौधरी या गुरूंकडे सतार शिकण्यास सुरुवात केली.

    पं. ज्योतीशचंद्र चौधरी हे त्यांचे आद्यगुरू. त्यानंतर त्यांनी सुमारे १९५७-५८मध्ये सतार वादनात प्रगती करण्याच्या दृष्टीने थेट मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर त्यांनी अफताब-ए-सितार उस्ताद विलायत खान यांची भेट घेऊन सतार शिकण्याचा मनोदय व्यक्त केला. दीक्षित हे पं. ज्योतीशचंद्र चौधरी यांचे शिष्य असल्याने, खाँसाहेबांना त्यांना शिष्य करून घेण्यास, अडचण वाटली नाही. तेव्हापासून उस्ताद विलायत खाँसाहेबांनी त्यांना शिष्य केले. मुंबईत त्यांचे कोणीही नसल्याने व आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने, त्यांची मुंबईत राहण्याची सोय होऊ शकली नाही. परिणामी, खाँसाहेबांनी त्यांना त्यांच्याकडेच आसरा दिला.

    खाँसाहेबांचे तत्कालीन निकटवर्ती असलेल्या शिष्य गणांपैकी पं. अरविंद पारिख, पं. गिरीराज सिंह तथा पं. हरिशंकर पुराणिक हे सर्व दीक्षितांचे गुरूबंधू होत. पं. दीक्षित हे उस्ताद खाँसाहेबांचे विश्वासू शिष्य म्हणून गणले जात. पं. दीक्षित बरीच वर्षे खाँसाहेबांच्या सान्निध्यात राहिल्याने खाँसाहेबांच्या सतार वादनातील गायकी अंग व त्यामधील बरेच बारकावे ज्ञात झाल्याने ते त्यांनी बऱ्यापैकी आत्मसात केले होते. त्यामुळे दीक्षित यांच्या सतार वादनात खाँसाहेबांचा पगडा भासत असे. तरीही नेहमी विनम्रपणे सांगताना खाँसाहेबांसारखे काम आणि गायकी अंगाने सतार वादन करणे कठीण असल्याचे ते म्हणत. त्यांची खाँसाहेबांवर निस्सीम भक्ती होती. ते घरी रियाज करतानाही खाँसाहेबांचा फोटो जवळ ठेवत. त्यांच्या मितभाषी स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार होता.

    मुंबईत कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खाँसाहेबांच्या परवानगीने स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी सतारीच्या शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. भाडेतत्त्वावर जागा घेऊन ते राहू लागले. मुंबईतील एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या संगीत विभागात सतारीचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांचा विशेष गुण होता, ते सदैव प्रसिद्धीझोतापासून दूर राहिले. प्रसिद्धी म्हणजे बाजारीपणा, थोतांड आहे, असे त्यांचे ठाम मत होते. परिणामी, आत्तापर्यंतच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना सतत झगडावे लागले. त्यांचा मुलगा श्री मिथिलेश दीक्षित यालाही त्यांनी सतारीचे धडे दिले, तो उत्तम सतार वादन करतो. पं. मधुकर दीक्षित यांचे २ सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ट्रॅजिडी किंग अभिनेते दिलीपकुमार

    पेशावर मधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते. उलट लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून बारा मुले, इतर नातेवाईक आणि पै-पाहुण्यांचे करता करता थकून गेलेल्या अम्मीचे कष्ट काही प्रमाणात कमी करता यावेत यासाठी लवकरात लवकर कमावता होणे याच एका उद्देशाने झपाटलेल्या युसूफने एकदा वडिलांशी उडालेला खटका मनाला लावून घेत तिरमिरीत घर सोडून थेट पुणे गाठले.

  • गणेश वासुदेव जोशी – सार्वजनिक काका

    (१८२८-१९३०)

    सार्वजनिक सभेचे संस्थापक. न्यायमुर्ती रानडे यांचे सहकारी. विविध सामाजिक, स्वदेशी चळवळीमध्ये सहभाग. पुण्यातील सार्वजनिक जीवनातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व. जातीयता निर्मूलनासंबंधी विचार निर्भीडपणे मांडले.

  • पं. प्रभाकर कारेकर

    पं. प्रभाकर कारेकर यांनी तीन दशकांहून अधिक काळ शास्रीय संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. मूळचे गोव्याचे असलेले कारेकर आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीची साधना करतात.

  • कथाकार आणि कादंबरीकार केशव पुरोहित

    जागतिक मराठी साहित्य परिषदेचे ते उपाध्यक्ष होते. संत्र्याची बाग, मनमोर, शिरवा, छळ, जमिनीवरची माणसं, अंधारवाट, सावळाच रंग तुझा, हेल्गेलंडचे चांचे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

  • हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक

    प्रसिद्धी पैसा यांसाठी कलाकार काम करतात परंतु काहीजण केवळ कलेसाठी जगतात त्यातील एक शाहू मोडक होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १९१८ रोजी झाला आणि शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट ‘श्यामसुंदर’ आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. मुंबईच्या ‘वेस्टएन्ड’ (नाझ) या चित्रपटगृहात तो सलग २७ आठवडे पडद्यावर झळकत होता. ‘श्यामसुंदर’ची याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट्यं होती. भारतातला तो पहिला ‘बाल चित्रपट’, शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती.

    शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. जन्माने ख्रिश्चन असूनही शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया केल्या. त्यांनी ज्ञानेश्वतराची भुमीका शब्दशः जगले कारण त्यांनी त्या भुमीकेनंतर मांसाहार वर्ज केला होता. त्यांनी केवळ या भूमिकांमधून केवळ अभिनयच केला नाही तर तो सात्विक भाव त्यांच्यामध्ये होता. संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शाहू मोडक अद्वितीय व्यक्तिमत्व होते शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत. ‘माणूस’ चित्रपटात नायकांच्या भूमिकेत मा.शाहू मोडक, तर नायिकेच्या भूमिकेत मा.शांता हुबळीकर होत्या. शाहू मोडक यांची नायकाच्या भूमिकेकरिता निवड झाली तेव्हा ते पीळदार शरीरयष्टीचे नव्हते. रोजचा व्यायाम आणि खुराकानं त्यांची तब्येत मजबूत झाली तेव्हाच चित्रीकरणाला सुरवात झाली. अतिशय सात्त्विक भूमिका साकारणाऱ्या शाहू मोडक यांची प्रत्यक्ष जीवनातील भूमिकाही तेवढीच तेजस्वी होती. रुपेरी पडद्यावर तर शाहूरावांनी अनेक विक्रम प्रस्थापित केलेच.

    माणूस, औट घटकेचा राजा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी महेता, झाला महार पंढरीनाथ अशा अनेक चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वरांची मानसिक अवस्था शाहू मोडकां यांच्या मध्ये सहजगत्या होती, म्हणून तितक्याच सहजतेने या दोन्ही भूमिका ते साकारू शकले. अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणारे शाहू मोडक हे व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत असत. शाहू मोडक यांचा ज्योतिषाचा अभ्यास चांगला होता. निर्मात्यांना चित्रपटाच्या शुभारंभासाठी व चित्रिकरणाचे महुर्तही ते काढून द्यायचे. शाहू मोडक आणि प्रतिभाताई जैन यांची ही प्रेम कहाणी एक अदभूत कहाणी आहे. शाहू मोडक हे ख्रिच्शन तर प्रतिभाताई जैन. जैन साध्वीचे व्रत झुगारून प्रतिभाताईंनी शाहू मोडक यांच्याशी लग्न करून एक इतिहास घडविला. शाहू मोडक यांचे ११ मार्च १९९३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    शाहू मोडक यांच्या पत्नी प्रतिभाताई यांनी लिहिलेल्या आणि सुधीर गाडगीळ यांनी शब्दांकित केलेल्या शाहू मोडक यांच्या आठवणी म्हणजे हे पुस्तक आहे!

    शाहू मोडक प्रवास ... एका देवमाणसाचा
    लेखिका: प्रतिभा शाहू मोडक
    अनुवाद: सुधीर गाडगीळ

  • मोगली व ‘जंगलबुक’चा कर्ता रुडयार्ड किपलिंग

    वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी त्यांना साहित्याचं नोबेल मिळालं. इतक्या कमी वयात दुसऱ्या कोणालाच साहित्याचं नोबेल मिळालेलं नाही.

  • लाडकोजीराव कृष्णाजी आयरे

    उत्तम व नैसर्गिक अभिनय क्षमता, निःपक्षपाती समिक्षा, कथा, व समाजकल्याण अशा विविध गुणांचा प्रभावी मिलाफ असणारे व आयुष्यभर अशा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये सारख्याच तन्मयतेने वावरणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लाडकोजीराव आयरे ! खेडयातील संस्कृती, रीतिरिवाज, रूढींशी त्यांचं जीवन निगडित असल्यामुळे, खेडयातील पार्श्वभूमी त्यांनी आपल्या नाटकांमधून अत्यंत कल्पकतेने उभी केली. समाजाच्या दृष्टीने ज्वलंत व खळबळजनक विषयावर त्यांनी १८ नाटके लिहून कित्येक सामाजिक समस्यांना व अन्यायाला वाचा फोडली.

    महाराष्ट्र राज्य सरकारचा साहित्य लेखन स्पर्धेत उत्कृष्ट नाटयलेखनाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला, तसेच अखिल भारतीय नाटय परिषदेने श्रमजीवी वर्गाचे रंगभूमीवरील पहिले यशस्वी नाटककार म्हणून त्यांचा गौरव केला गेला होता .

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

  • कोल्हापूर-दरबारचे सुप्रसिद्ध प्रभावशाली गायक अल्लादिया खाँ

    अल्लादिया खाँसाहेबांच्या घराण्याचे मूळ पुरुष नाथ विश्वंभर. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १८५५ रोजी झाला.

    मूळचे हे घराणे शांडिल्यगोत्री आद्यगौड ब्राह्मणांचे. पण दिल्लीजवळील अनूप-संस्थानाच्या आपल्या आश्रयदात्या अशा एका हिंदू अधिपतीला दिल्लीपती मुसलमान बादशहाच्या कैदेतून सोडविण्याच्या मोबदल्यात या घराण्यातील एक पूर्वज मुसलमान झाले.

    खाँसाहेबांचा जन्म जयपूर संस्थानामधील एका छोट्याशा जहागिरीच्या उनियारा या गावी झाला. मा.अल्लादिया खाँ यांचे पाळण्यातील नाव ‘गुलाम एहमद’ होते. परंतु त्यांच्या मातापित्यांच्या अनेक अपत्यांतील हे अपत्य वाचले, म्हणून त्यांना ‘अल्लादियाखाँ ’ (अल्लाने जगविलेले मूल) म्हणू लागले. खाँसाहेबांचे वडील ख्वाजा एहमदखाँ हे उनियारा व टोंक या दरबारचे नामांकित गायक होते. त्यांचे शिक्षण चुलते जहांगीरखाँ यांच्याकडे झाले. अल्लादियाखाँनी प्रथम चार पाच वर्षे धृपद-धमाराचे आणि नंतर सातआठ वर्षे ख्यालगायकीचे पराकाष्ठेच्या निष्ठेने शिक्षण घेतले.

    यानंतर खाँसाहेबांनी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इ. प्रदेशांत व थेट नेपाळपर्यंत मुशाफिरी केली आणि संगीताच्या विविध रीतींचा अनुभव घेतला. याचा त्यांच्या गायकीला उत्तरकाली उपयोग झाला. पूर्वीची आपली गायनशैली बदलून आपल्या पूर्वीपेक्षा जाड झालेल्या आवाजाला शोभेल, अशी स्वत:ची एक सर्वस्वी अभिनव व नमुनेदार गायकी त्यांनी निर्माण केली.

    १८९१च्या सुमारास खाँसाहेब दक्षिणाभिमुख होऊन प्रथम अहमदबाद व नंतर बडोदा, मुंबई करीत १८९५ साली कोल्हापुरास शाहूमहाराजांच्या आश्रयाला स्थायिक झाले, ते १९२२ मध्ये महाराजांचा अंतकाल होईपर्यंत.

    १९२२ पासून १९४६ पर्यंतची चोवीस वर्षे त्यांनी मुख्यत: शिकविण्यात मुंबईस काढली.

    खाँसाहेबांना दहाबारा हजार चिजा मुखोद्गत होत्या. या दृष्टीने ते एक ‘कोठीवाले’ गायक होते. खाँसाहेबांच्या शिष्य म्हणजे त्यांचे बंधू हैदरखाँ आणि दोन मुलगे यांच्या व्यतिरिक्त केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, तानीबाई, गोविंदबुवा शाळिग्राम, नथ्थनखाँ, लीलावती शिरगांवकर, गुलूभाई जसदनवाला, मोहनराव पालेकर इ. मंडळी आहेत.

    अल्लादियाखाँ यांचे १६ मार्च १९४६ रोजी निधन झाले. कोल्हापुरात देवल क्लबसमोरच्या चौकात त्यांचा अर्धपुतळा आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट