जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अजीत या सिनेमातील मुख्य खलनायक होते. ‘जंजीर’नंतर अजीत यांना खलनायकाच्या रुपात वेगळी ओळख मिळाली.
दिप्ती नवल यांच्या वडिलांना न्यूयॉर्कमध्ये नोकरी मिळाल्यावर त्या आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेला गेल्या. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९५७ रोजी अमृतसर येथे झाला. न्यूयॉर्कच्या सिटी युनिव्हर्सिटीतून दिप्ती नवल यांनी शिक्षण घेतले. खरे तर अभिनेत्री होणे हे दीप्ति नवल यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दीप्ति यांनी आपल्या आई-वडिलांकडे ही इच्छा बोलून दाखवली. पण दीप्ति नवल यांच्या वडिलाची इच्छा तिने एक मोठी चित्रकार बनावी, अशी होती. वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी पेन्टिंग आणि अभिनय या दोन्ही कला जोपासण्याचा निर्णय घेतला. कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दीप्ति ने न्यूयॉर्कमध्येच एका रेडिओ स्टेशनवर काम सुरु केले. यावर हिंदी कार्यक्रमही यायचे. यानंतर तिने अॅडक्टिंग आणि फिल्ममेकिंगचा कोर्स केला. यापश्चात दीप्तिला भारतात येण्याची संधी मिळाली आणि याच काळात दीप्तिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले. श्याम बेनेगल यांच्या ‘जुनून’ या चित्रपटापासून दीप्ति नवल यांनी आपल्या करीयरची सुरवात केली. दीप्ति नवल ‘जुनून’मध्ये ती केवळ दोन तीन दृश्यांत दिसल्या. त्यामुळे त्याची फार दखल घेतली गेली नाही. पण १९७९ मध्ये ‘एक बार फिर’मधील दीप्ति नवल यांना या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. दीप्ति नवल यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास ६० चित्रपटांमध्ये अभिनय केला. ‘चश्मे बहादूर’,‘अनकही’,‘मैं जिंदा हू’,‘कमल’ असे तिचे चित्रपट प्रचंड गाजले. केवळ अभिनयच नाही तर लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन या क्षेत्रातही त्यांनी काम केले. ‘थोडा सा आसमान’ या टीव्ही मालिकेची पटकथा दीप्ति नवल यांची होती. शिवाय या मालिकेची दिग्दर्शकही त्यांनी केले होते.
चित्रकार या नात्याने अनेक मोठ्या चित्रप्रदर्शनात त्यांची पेन्टिंग झळकल्या. कवयित्री म्हणून १९८३ मध्ये त्यांचा ‘लम्हा लम्हा’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. २००४ मध्ये ‘ब्लॅक विंड अॅेण्ड अदर पोयम्स’ हा तिचा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला. याशिवाय २०११ मध्ये एक लघूकथा संग्रहही आला. त्यांच्या प्रकाशित पुस्तकां मध्ये 'लम्हा-लम्हा' हे पुस्तक प्रसिध्द आहे. १९८४ मध्ये प्रकाश झा यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. तेव्हा त्यांची भेट दीप्ति नवलशी झाली. यानंतर प्रकाश झा यांनी दीप्तिला घेऊन ‘दामुल’ हा चित्रपट बनवला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. येथून दोघांमध्ये प्रेम बहरले. यानंतर दीप्ति व प्रकाश झा विवाहबंधनात अडकले. हे लग्न १७ वर्षे चालले. या दोघांना दोन मुलेही आहेत. मुलगा प्रियरंजन झा आणि मुलगी दिशा झा. प्रकाश व दीप्ति यांनी २००२ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर दीप्ति प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचा मुलगा विनोद पंडित यांच्या जवळ आली. दोघांनी लग्नाचा निर्णयही घेतला होता. पण त्याचपूर्वी विनोद यांचे निधन झाले. सध्या दीप्ति नवल मानसिकदृष्ट्या दुर्बल लोकांच्या आजाराबद्दल जनजागृतीचे काम करतात. 'जलियावाला बाग' सिनेमामधून सुरू झालेल्या दीप्ती नवल यांच्या फिल्मी करिअरचा प्रवास आजही सुरू आहे. 'यारियां' सिनेमात दीप्ती यांनी अभिनय केला आहे. जानेवारी २०१४ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात दीप्ती यांनी गर्ल्स होस्टेलच्या वॉर्डनची भूमिका साकारली होती.या सिनेमापूर्वी त्या २०१३ मध्ये 'बीए पास'आणि'औरंगजेब'सिनेमातसुध्दा दिसल्या होत्या. 'महाभारत 3D'या अॅनिमेटेड सिनेमा मधील 'कुंती 'पात्राला त्यांचा आवाज देण्यात आला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
तसा राजेंद्रकुमार म्हणजे म्हटला तर स्टार, म्हटला तर नट तरी पण ६० च्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट सिल्वर जुबली झाले. या मुळे त्यांचे नाव ‘ज्युबिली कुमार’ म्हणून पडले.
दि.बा. मोकाशी हे विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ मराठी लेखकांपैकी एक होते. मराठी नवकथेत मोलाची भर घालणाऱ्या प्रारंभीच्या आघाडीच्या कथाकारांत त्यांची गणना होते. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९१५ रोजी उरण येथे झाला. दि. बा. मोकाशी हे १९४० नंतर नवकथेत झळकणारे महत्त्वाचे नाव. तीन कादंबऱ्या, तीन ललित व प्रवासवर्णनपर लेखसंग्रह, सात कथासंग्रह आणि पाच बालवाङ्मयपर पुस्तके असा त्यांचा भरगच्च साहित्यसंभार आहे. लामणदिवा हा १९४७ साली प्रसिध्द झालेला मोकाशी यांचा हा पहिलाच कथासंग्रह. रोजच्या जीवनातल्या साध्यासुध्या प्रसंगांतून आकारणारी लेखकाची कथा सौम्य आणि संयत प्रकृतीची आहे. ह्या पुस्तकात प्रारंभी ' पहिली पावले' ह्या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी लिहिले आहे. तेही कथेइतकेच रंजक आहे.
संध्याकाळचे पुणे हे माणूस साप्ताहिकात ७९-८० च्या कालखंडात प्रसिध्द झालेले, पुण्यातील सांस्कृतिक हालचालींचे दर्शन घडवणारे लेख.पुण्यात रोज झडणाऱ्या उपक्रमांबद्दल, व्यक्तींबद्दल आणी संस्थांबद्दल अत्यंत रसिकतेने लिहिलेले हे लेख आहेत. प्रसन्नता आणि निर्व्याजता, चितनशीलता आणि ताजेपणा ही मोकाशी यांच्या साहित्यातील वैशिष्ट्ये या लेखांमध्ये आढळतील.
आम्ही मराठी माणसं हा, १३ वैशिष्ट्यपूर्ण कथांचा हा संग्रह दि.बा.मोकाशींच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. आपल्या अवतीभवतीच्या माणसांचे नितळ विश्व सरळ साध्या पध्दतीने उभे करावे, ते नाट्यपूर्ण आणि शैलीदार पध्दतीने मांडण्यात त्यामागच्या वास्तवाची हानी होते असे त्यांना वाटे. या संग्रहातील हलक्या-फुलक्या कथा सामान्यांच्या सुप्तासुप्त भावनांचे खेळकर भूमिकेतून चित्र रेखाटणाऱ्या आहेत.
त्यांच्या निधनानंतर साहित्य अकादमीने १९८८ मध्ये "दि. बा. मोकाशी यांची कथा " (निवडक कथांचा संग्रह) हे पुस्तक प्रसिद्ध केले. पण त्याच्या प्रस्तावनेत मोकाशींच्या इतर साहित्याचा परामर्श घेताना त्यांनी ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ या कादंबरीचा मात्र उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. सरोजिनी वैद्य यांच्या मार्गदार्शनाखाली सौ. माधुरी पणशीकर यांनी मोकाशी यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट घेतली. दि.बा. मोकाशी यांनी लामणदिवा, वणवा मिळून ११ कथासंग्रह. देव चालले, आनंद ओवरी, या कादंबऱ्या, तसेच पालखी, अठरा लक्ष पावलं अशी प्रवासवर्णने, संध्याकाळचे पुणे (ललित), रेडिओदुरुस्ती व्यवसाया-बद्दलचे पुस्तक व बालसाहित्यदेखील त्यांनी लिहिले. ‘अठरा लक्ष पावलं’मध्ये त्यांनी प्रवासवर्णनातून समाजजीवनाचा शोध घेतला. त्यांच्या ‘आनंद ओवरी’ या संत तुकारामाच्या जीवनावरील कादंबरीचे अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेट यांनी इंग्रजीत भाषांतर करून ते ‘ट्विटर’वर ठेवले आहे. त्यांच्या इतरही अनेक पुस्तकांची हिंदी व इंग्रजी भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या पालखी या पुस्तकातून पंढरीच्या वारीवर विपुल लेखन केलंय. खरे म्हणजे "पालखी"च्या पार्श्वभूमीवर एखादी कादंबरी लिहावी अशी मोकाशींची फार इच्छा. त्यांच्या कल्पनेतल्या कादंबरीतील एका वारकर्यााच्या डॉक्टर मुलाला, वडिलांच्याऐवजी, वारीला जावं लागतं. पालखी सुरू होते तेव्हा कादंबरी सुरू होते आणि पालखीबरोबरच ती संपते. ही कादंबरी लिहिणे मोकाशींना शक्य झाले नाही. मात्र पालखीबाबतचे आकर्षण मनात मात्र कायम राहिले.
एक महिना व्यवसाय बंद करून, महिन्याभरासाठी संसाराची रक्कम व पालखीबरोबरचा खर्च यांची तरतूद करून जावे लागेल या कारणाने काही वर्षे पालखीला जाण्याचे त्यांनी टाळले. मोकाशींच्याच भाषेत सांगायचे तर "यंदा तगमग अतिशय वाढली. काळे ढग आले. पाऊस कोसळू लागला. हवा कुंद झाली. वारकरी दिसू लागले. एके दिवशी लौकर दुकान बंद करून घरी आलो आणि जाहीर केलं - काही झालं तरी यंदा पालखीला जाणार!" ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ ही त्यांची १९७८ मध्ये प्रकाशित झालेली चरित्रात्मक कादंबरी. त्यांच्या या कादंबरीची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही. जानेवारी २०१४ मध्ये त्यांची कन्या ज्योती कानेटकर यांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर अमेझॉनवर टाकले आहे. कामसूत्र हे पुस्तक कसं आहे ते अनुभवायचं असेल तर दि बा मोकाशी यांची वात्स्यायन ही कादंबरी वाचावी.
दि. बा. मोकाशी यांचे २९ जून १९८१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हिंदी चित्रपट सृष्टीचा सन १९५० ते १९७० हा चित्रपट संगीताच्या दृष्टीने सुवर्ण काळ मानला जातो. या काळात अनेक प्रथितयश संगीतकारांनी अनमोल अशा गाण्यांची रसिकांवर अगदी बरसात केली. नुसते गाण्यांवर चित्रपट चालण्याचे ते दिवस होते. ज्येष्ठ संगीतकार रोशन यांनी याच काळात आपल्या सुमधुर गीतांची देणगी चित्रपट सृष्टीला दिली.
त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणाऱ्या मराठी कुटुंबात जन्मलेली चित्रपट-अभिनेत्री सारिका ठाकूर माहेरचे नाव सारिका ठाकूर. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९६० रोजी झाला. १९६० च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून बेबी सारिका या नावाने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. अभिनेत्री सारिका ने गीत गाता चल, खुशबू, जानी दुश्मन, क्रांति , सत्ते पे सत्ता, रजिया सुलतान , राजतिलक, परजानिया अश्या अनेक चित्रपटात काम केले. सचिन-सारिका या जोडीच्या ‘गीत गाता चल’ या चित्रपटाला रवींद्र जैन यांच्या गीत-संगीताने चार चाँद लावले.
यातील गीत गाता चल ओ साथी, शाम तेरी बन्सी पुकारे राधा नाम आदी गाण्यांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले. सारिका यांना दोन वेळा नॅशनल अवार्ड पण मिळाले आहेत. लग्नाशिवाय एकत्र राहून कमल हसन व सारिका यांनी १९८० च्या दशकात सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. त्यांना श्रुती व अक्षरा या दोन मुली असून अक्षराच्या जन्मानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र २००४ साली ते दोघेही वेगळे झाले.
35 वर्षां पुर्वी फ़िल्मफ़ेअर मासिकात एक आर्टिकल आले होते" Those who speaks with their eyes" या आर्टिकल मधे तिच्या डोळ्यांचे वर्णन " एका छोट्या मांजरी सारखे दिसतात असे केले होते आणि बिंदुचे डोळे एखाद्या बोक्या सारखे दिसतात असे केले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
डॉ. नारळीकर एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ तर आहेतच पण ते उत्तम साहित्यिकही आहेत.
आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सतारवादक उस्ताद रईस खान यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३९ रोजी इंदौर मध्य प्रदेश येथे झाला. त्यांचे आजोबा इनायत अली खान हे भारतीय उपखंडातील एक अव्वल सतारवादक म्हणून प्रख्यात होते. रईस खान यांनी वडील मुहम्मद खान व चुलते वलायत अली खान यांच्याकडे सतारवादनाचे धडे घेतले. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी सतारवादनाचा पहिला कार्यक्रम मुंबईत केला. सततचा रियाझ व चिंतन यामुळे रईस खान यांनी सतारवादनावर विलक्षण प्रभुत्व मिळवले. हिंदी चित्रपटसृष्टीशीही त्यांचा घनिष्ठ संबंध आला. बहारों मेरा जीवन भी सवांरो.. चंदन सा बदन.. बैय्या ना धरो.. अशा असंख्य गाण्यांमध्ये ऐकू येणारी सतार ही रईस खान यांची आहे. असंख्य सुमधूर गाणी देणारे संगीतकार मदनमोहन यांची कित्येक गाणी रईस खान यांच्या सतारवादनाने अधिक खुलली. रईस खान सन १९६८मध्ये पाकिस्तानला वास्तव्यासाठी गेले. मा.रईस खान यांच्या मातोश्री उत्तम गायिका होत्या व वडील उत्कृष्ट बीनवादक होते.
मामा इनायत खान मेवात घराण्याचे पट्टीचे गायक होते. मा.रईस खान यांनी तर अगदी बालवयात सूर आणि स्वर यावर इतके प्रभुत्व मिळविले होते की, मुंबईच्या सुंदराबाई हॉल मध्ये त्यांनी, मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर महाराज सिंह यांच्या समोर आपल्या कलेचे पहिले जाहीर सादरीकरण केले तेव्हा ते केवळ आणि केवळ पाच वर्षांचे होते. १९५५ साली पोलंड देशातील ' वॉर्सा ' या राजधानीच्या शहरात संपन्न झालेल्या यूथ फेस्टिव्हल साठी त्यांची निवड होऊन त्यांनी तिथे आलेल्या देशोदेशीच्या शंभराहून अधिक तंतु-वादकांमध्ये सर्वोत्तम वादन करून, भारताला सुवर्णपदक मिळवून दिले तेव्हाही ते फक्त आणि फक्त सोळा वर्षांचे होते. ते उत्तम रागदारी गात असत परंतु ते जगभर विख्यात झाले ते त्यांच्या सतार वादनामुळे. त्यांनी आपल्या सतारवादनाची साथ अनेक दिग्गज हिंदुस्थानी गायकांना केली होती.
बिस्मिल्ला खान, हरिप्रसाद चौरसिया, एल. सुब्रह्मण्यम यांच्या बरोबर त्यांची जुगलबंदी गाजलेली होती. पाकिस्तानी गायिका, बिल्किस खातूम, यांच्याशी लग्न केल्याने ते पाकिस्तानातील कराची शहरात राहत असत. तेथे त्यांनी आपली मूळची इंदौरी मेवात घराण्याची गायकी जपली होती व हिदुस्थानी रागदारी पाकिस्तान मध्ये पोहचवण्याचे काम केले. पाकिस्तानात वास्तव्य असतानाही ते भारतीय चित्रपट -संगीताशी समरस झालेले होते. संगीतकार मदन मोहन हे त्यांचे खास मित्र होते. मा.मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटातल्या गाण्याना रईस खान यांनी सतारीचा स्वरसाज चढविला आहे.
१९६४ च्या " पूजा के फूल " या चित्रपटातले लता मंगेशकर यांच्या आवाजातले गाणे, " मेरी आँखों से कोई नीन्द लिये जाता है " या गाण्याला रईस खान यांच्या सतारीची साथ आहे. अगदी अलीकडचा, " गॉड तूसी ग्रेट हो " असो अथवा आणि साजिद -वाजिद या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेला " पार्टनर " चित्रपट असो,मा. रईस खान यांच्या सतारीचे स्वर त्यातल्या गीताना होते. रईस खान यांचे ६ मे २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सरदार हे गांधीवाद आणि मार्क्सवाद या दोन्ही विचारसरणीचा संस्कार असणारे समाजवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. सर्व जातीतील त्यांचे मित्र होते. त्यांनी कधीच जात-पात मानली नाही. आपल्या अनेक मित्रांचे , वारल्यांचे आयुष्य मातीमोल झालेले त्यांनी पाहिलेले होते. त्याचा परिणाम त्यांच्यावर खूप झाला आणि समाजवादी प्रेरणा त्यांना तेथूनच झाली.
भारतीय पिता आणि आयरिश मातेपोटी जन्मलेल्या लिला नायडू यांनी १९५४ साली 'मिस इंडिया' हा बहुमान पटकावला होता. 'व्होग' नियतकालिकानेही जगातील पाच सौंदर्यवताइपैकी एक असा त्यांचा उल्लेख केला होता.
त्यांचे पिता, डॉ. रामैय्या नायडू एक ख्यातनाम अणु संशोधक होते तर आई स्विस मुळाची भारतीय संस्कृतीची (Indology)अभ्यासिका होती – त्यांच्या कडूनच लीला नायडू यांना भारतीय आणि युरोपियन मिश्रित सौंदर्याचा वारसा मिळाला होता! त्यामुळेच त्यांच्या सौंदर्यातील वेगळेपणा हा त्या काळच्या हिरोइन्स (नर्गिस, मीना कुमारी इ.) मध्ये उठून दिसायचा.
बलराज साहनी यांच्या 'अनुराधा' चित्रपटापासून नायडू यांनी १९६० मध्ये चित्रपटातील कारकिर्दीस प्रारंभ केला होता. बॉलीवूड मध्ये लीला नायडू सारखे आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या नायिका फारच कमी पहावयास मिळतील. "वोग" (Vogue ) सारख्या आंतरराष्ट्रीय आणि ख्यातनाम मासिकाने १९५०-६० च्या दशकात या आकर्षक आणि डौलदार व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या अभिनेत्रीचा समावेश "जगातील १० अति सुंदर" महिलांमध्ये उगाचच केला नव्हता!
हृषीकेश मुखर्जी यांनी डायरेक्ट केलेला "अनुराधा" हा लीला नायडू यांचा बॉलीवूड मधील पहिला चित्रपट! या चित्रपटात त्यांनी अशा एकाकी पडलेल्या पत्नीची भूमिका अतिशय उठावदार पणे केली कि जी आपले सारे गानविश्वातील करिअर आपल्या डॉक्टर पतीकरता (बलराज सहानी) करिता सोडून देते. या चित्रपटाची गणना एका महान बॉलीवूड चित्रपटांमध्ये होते.
पंडित रविशंकर यांनी दिलेले अतिश्रवणीय संगीत (जाने कैसे सपनोमे, कैसे दिन बीते इ. गाणी) आणि बलराज सहानी यांचा दमदार अभिनय ह्या "अनुराधा" या चित्रपटाच्या इतर जमेच्या बाजू! या चित्रपटाला १९६१ चा भारत सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि बर्लिन आंतराराष्ट्रीय फिल्मोत्सव पुरस्कार मिळाला!
"येह रास्ते हैं प्यारके" हा त्यांचा अजून एक गाजलेला चित्रपट (१९६३)! ह्या चित्रपटाची कथा त्या वेळच्या गाजलेल्या "नानावटी प्रेमप्रकरण" यावर आधारित होती. ह्या चित्रपटात सुनील दत्त, रेहमान आणि लीला नायडू यांनी हा प्रेमाचा त्रिकोण अतिशय समर्थपणे साकारला आहे. खरे तर, ही अपारंपारिक भूमिका स्वीकारावयास त्या वेळच्या कोणत्याही प्रसिद्ध नायिका तयार नव्हत्या. पण लीला नायडू यांचा दाखविलेला धीटपणा त्यांच्या चांगलाच उपयोगी पडला आणि हा चित्रपट हिट ठरला!
जेम्स आईव्हरी यांचा "The householder" (१९६३) आणि श्याम बेनेगल यांचा "त्रिकाल" (१९८५) हे लीला नायडू यांचे इतर गाजलेले चित्रपट! श्याम बेनेगल तर लीला नायडू यांच्या अभिनया बद्दल म्हणतात "It was a sheer haunting experience to work with Leela Naidu, who breethed innocence and serenity in her performance!”
परंतु, इतक्या प्रतिभाशाली अभिनेत्रीला केवळ बोटावर मोजण्या इतकेच चित्रपट मिळाले - कदाचित त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि तेजस्वी प्रतिभा त्यांच्या प्रगतीआड आली असावी!
लीला नायडू यांचे वैयक्तिक आयुष्य तितके सुखकारक नव्हते. त्यांचे दोनदा लग्न आणि घटस्फोट झाले - टिक्की ओबेरॉय (ओबेरॉय हॉटेल्स चे मालक) आणि डोम मोरास (कवी आणि लेखक) यांच्याबरोबर! त्यांनी आपल्या जीवनाची शेवटची काही वर्षे एकाकीपाणेच घालविली. या एकटेपणात त्यांना जे. कृष्णमुर्ती यांच्या शिकवणुकीची खूप साथ मिळाली.
लीला नायडू यांचे २८ जुलै २००९ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti