(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • दिग्दर्शक राजू फुलकर

    कलाक्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून राजू फुलकर यांच्याकडे पाहिले जात होते. एकांकिकेतून त्यांनी विविधांगी विषय मांडले. राजू फुलकर यांनी चाळीस वर्षे रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात काम केले. ‘लोकधारा’ कार्यक्रमात हृदयस्पर्शी लोकगीते गाणारे गायक, अनेक वाद्ये वाजवणारे वादक ही त्यांची ओळख होती.

  • प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

    गिरीश कर्नाड दिग्दर्शित ‘चेलुवी’ या कन्नड सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणा-या सोनालीने केवळ देशांतच नव्हे, तर परदेशातही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

  • राजीव तांबे

    युनिसेफ आणि इतर काही सामाजिक संस्थांसोबत काम करताना त्यांनी राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक शाळांना भेट दिली आहे.

  • ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके

    कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य,चित्रपटगीते,समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन शांता शेळके केलेल्या वृतपत्र, संपादक तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून आजच्या पिढीतही विशेष प्रसिद्ध आहेत. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.

  • दुर्गा खोटे

    दुर्गा खोटे यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी मुंबई झाला. पूर्वाश्रमीचे त्यांचे आडनाव लाड होते. महाविद्यालयात शिकत असतानाच बॅ. विश्वनाथ खोटे यांच्याशी विवाह झाला. मोहन भवनानींच्या “फरेबी जाल“ या मूक चित्रपटात त्यांना पहिल्यांदा भूमिका देण्यात आली. या चित्रपटातील काही भाग बोलका होता. प्रभात फिल्म कंपनीच्या अयोध्येचा राजा या पहिल्या हिंदी व मराठी बोलपटातून दुर्गाबाईंनी तारामतीची भूमिका साकारली. “अयोध्येचा राजा“ या पहिल्या मराठी बोलपटात मध्ये दुर्गा खोटेंनी गायिलेली 'बाळा का झोप येईना', 'आनंद दे अजि सुमन लीला', 'बाळ रवि गेला' ही गाणी त्यावेळी अतिशय लोकप्रिय झाली होती. त्यानंतर “सीता“, “पृथ्वीवल्लभ“, “अमरज्योति“, “लाखाराणी“, “हम एक हैं“ ,“मुगले आझम“, “नरसीभगत“, “बावर्ची“, “खिलौना“, “बॉबी“ “अश्या विविध हिंदी चित्रपटांमधून दुर्दाबाई खोटेंनी दर्जेदार व्यक्तीरेखा साकारल्या. त्याचप्रमाणे “गीता“, “विदुर“, “जशास तसे“, “पायाची दासी“, “मोरूची मावशी“, “सीता स्वयंवर“, “मायाबाजार“ यांसारख्या मराठी चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या.

    पॉल झिलच्या “अवर इंडिया“ आणि इस्माईल मर्चंट यांच्या“हाऊस-होल्डर“ या दोन इंग्रजी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या.

    १९४८ साला पासून दुर्गाबाईंचा मराठी रंगभूमीशी संबंध आला होता. “बेचाळीसचे आंदोलन“, “कीचकवध“, “भाऊबंदकी“, “शोभेचा पंखा“, “वैजयंती“, “खडाष्टक“, “पतंगाची दोरी“, “कौंतेय“, संशयकल्लोळ या नाटकांमधुन त्यांनी भूमिका केल्या आहेत. १९६१ रोजी दिल्लीमध्ये आयोजित झालेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

    १९८० रोजी दुर्गाबाईंनी आपल्या “ दुर्गा खोटे प्रॉडक्शन ” द्वारे दूरदर्शन मालिका, माहितीपूर्ण ध्वनी-चित्रफित, मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच शॉर्ट फिल्म्सची निर्मिती या संस्थेतून करण्यात आली.

    “धरतीची लेकरं” या दुर्गा खोटे प्रॉडक्शनचा चित्रपट राज्य मराठी चित्रपट महोत्सवातही गौरयाण्यात आले व दुर्गा खोटेंना या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गेला.

    २०० पेक्षा ही अधिक चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारत तसंच वैशिट्यपूर्ण दिग्दर्शन कौशल्यामुळे दुर्गाबाईंनी कलाविश्वात सुवर्णक्षरांनी नाव कोरले.

    वेळोवेळी दुर्गाबाईंचा सन्मान देखील करण्यात आला. १९४२ च्या“चरणो की दासी” आणि १९४३ सालच्या “भारत मिलाप” या चित्रपटातल्या त्यांच्या भुमिकांना "बेंगॉल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन"च्या पुरस्कारने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर १९७४ च्या “बिदाई“ चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांना फिल्म फेअर पुरस्काराने गौरविण्यात आले; त्यासोबतच संगीतनाटक अकादमीने १९५८ साली त्यांचा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव केला तर मराठी नाट्यपरिषदेतर्फे विष्णुदास भावे सन्मानपदक, १९६८ साली भारत सरकारच्या “पद्मश्री” आणि १९८४ साली भारतीय सिनेसृष्टीतल्या सर्वोच्च असलेल्या “दादासाहेब फाळके पुरस्काराने“ गौरविण्यात आले आहे.

    आपला जीवन व रुपेरी पडद्यावरचा प्रवास दुर्गाबाई खोटेंनी “मी दुर्गा खोटे” या पुस्तकातून शब्दबध्द केले असून या पुस्तकाचं इंग्रजी भाषेत “आय दुर्गा खोटे” नावाने प्रकाशन झाले आहे.

    उतारवयात दुर्गाबाई अलिबागच्या एका बंगल्यात स्थलांतरीत झाल्या. २२ सप्टेंबर १९९१ या दिवशी म्हणजेच वयाच्या ८६व्या वर्षी दुर्गा खोटे यांचे निधन झाले.

    २०१३ साली भारतीय चित्रपटांच्या शतकमहोत्सवी वर्षात भारत सरकारने दुर्गा खोटेंच छायाचित्र असलेलं टपाल तिकिट प्रकाशित करुन त्यांच्या प्रतिभेचा सन्मान केला.

    ( लेखन व संशोधन - सागर मालाडकर )

    दुर्गा खोटे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

    स्मरणीय भूमिका करणार्‍या दुर्गा खोटे (22-Sep-2016)

    स्मरणीय भूमिका करणार्‍या दुर्गा खोटे (14-Jan-2019)

    स्मरणीय भूमिका करणार्‍या दुर्गा खोटे (7-Oct-2017)

    स्मरणीय भूमिका करणार्‍या दुर्गा खोटे (15-Jan-2018)

    ## Durga Khote

  • श्रीलंकन क्रिकेटपटू मुथय्या मुरलीथरन

    मुरलीथरनचे नाव ऐकले तरी त्याचा संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीचा इतिहास डोळ्यासमोर उभा रहातो. मुरलीथरनने १३३ कसोटी सामन्यांमध्ये फक्त १,२५६ धावा केल्या आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ६७ . त्याने ८०० कसोटी विकेट्स घेतल्या त्या २२.७२ ह्या सरासरीने . त्याने ६७ वेळा ५ किंवा ५ पेक्षा जास्त खेळाडू एक इनिंगमध्ये बाद केले. तर २२ वेळा एका इनिंगमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त खेळाडू बाद केले. त्याने एक इनिंगमध्ये ५१ धावा देऊन ९ खेळाडू बाद केले तर ७२ झेल पकडले.

  • बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री राखी

    राखी म्हणताच रसिकांच्या एका पिढीला घाऱ्या डोळ्यांची, फारशी टामटूम न करता विविध प्रकारच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री आठवते. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९४७ रोजी झाला. राजश्री प्रॉडक्शनच्या सत्येन बोस दिग्दर्शित ‘जीवनमृत्यू’ हा राखी यांचा पहिला चित्रपट. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाने, मॅटिनी शोला नवीन चित्रपट प्रदर्शित करण्यास काहीच हरकत नाही, हा नवा ट्रेण्ड आणला. दक्षिण मुंबईतील ‘अलंकार’मध्ये हा चित्रपट मॅटिनीला १०२ आठवडे चालला शशी कपूरसोबत राखीची जोडी छान शोभली.

    संजीवकुमार, जितेंद्र मनोजकुमार संजय खान, राजेंद्रकुमार, राजेश खन्ना, देव आनंद अश्या अनेक नायकाबरोबर कामे केली. या रूपेरी प्रवासात तिनं रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शक्ती’मध्ये दिलीपकुमारची पत्नीही (अमिताभची आई) साकारली. अभिनेत्री म्हणून तिची ही सर्वोच्च कामगिरी. साधारणपणे एक तप नायिकापद साकारल्यावर राखी अपेक्षेप्रमाणं चरित्र- भूमिकांकडे वळल्या.

    ‘राम लखन’, ‘डकैत’, ‘प्रतिकार’ इत्यादी चित्रपटांतून तिनं अशा भूमिका साकारल्या. राखी यांच्या या दीर्घ प्रवासातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे गुलजार यांच्याशी झालेला विवाह आणि काही वर्षांनी बोस्कीला दिलेला जन्म. राखीशी गुलजार यांनी मे १९७३ मध्ये लग्न केले. राखीचे ह्याचे दुसरे लग्न होते. तत्पूर्वी राखी ह्या अजय विश्वालस नामक एका बंगाली पत्रकाराची पत्नी होत्या. या लग्नाच्या वेळी त्यांचे वय १८ वर्षे होते.

    लग्नानंतर राखी यांना चित्रपटात काम करायची इच्छा होती. मात्र, अजय यांचा विरोध होता. त्यांनी बंगाली चित्रपट दिग्दर्शित केला होता. मात्र, त्याने राखीला घेतले नव्हते. यानंतर त्याचा विरोध झुगारून राखीने बंगाली चित्रपटात काम करणे सुरू केले होते. शेवटी अजय यांच्याशी घटस्फोट घेऊन त्या मुंबईला अभिनेत्री होण्यासाठी आल्या. राखी व गुलझार यांचा काही वर्षे संसार सुरळीत चालला. त्यांना मेघना नावाची मुलगी झाली. गुलज़ार यांचा बहुतांश वेळ शायरी आणि गीत रचण्यात जात होता. ते राखी यांना खूप कमी वेळ देत असत.

    एकटेपणामुळे राखी यांना चित्रपटात काम करण्याची इच्छा होतीच. याच वेळी यश चोपडा यांनी ‘कभी कभी’साठी राखी यांना ऑफर दिली व ती गुलज़ार यांना न सांगताच स्वीकारली. ‘कभी कभी’ झळकला, प्रचंड हिट झाला. त्यांनी सुंदर अभिनय केला. मात्र, यानंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात मोठे वादळ आले. गुलज़ार यांनी आपल्या ‘मौसम’ या चित्रपटात राखीला डावलून शर्मिला टागोरला घेतले होते. याचा सुप्त राग राखीच्या मनात होता व त्यामुळेच त्यांनी ‘कभी कभी’ करण्याचे धाडस केले असे म्हणले जाते. अमिताभसोबत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या.

    ‘बरसात की एक रात’ मध्ये ती त्याची प्रेयसी, तर ‘कस्मे वादे’ मध्ये पत्नी झालीच, पण ‘शक्ती’ मध्ये त्याची आईदेखील तिनं साकारली. ‘त्रिशूल’, ‘काला पत्थर’, ‘लावारिस’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘शान’, ‘जुर्माना’, ‘बेमिसाल’ अशा अनेक चित्रपटांतून अमिताभ-राखी विविध नात्यांनी प्रेक्षकांसमोर आले. ‘कभी कभी’तही ते दोघं होते. त्यात ती अमिताभची प्रेयसी असली तरी पुढं ‘कहानी एक ऐसा मोड लेती है’ की ती शशी कपूरची पत्नी होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मंगला बर्वे

    अन्नपूर्णा या पुस्तकावर कित्येक महिला आणि परदेशात जाणारी, एकटी राहणारी तरुणाई स्वयंपाक करायला शिकली. त्यांच्या या पुस्तकाने विक्रीचे अनेक रेकॉर्ड मोडले. सध्या या पुस्तकाची ७७ वी आवृत्ती बाजारात आहे.

  • प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार भालचंद्र नेमाडे

    भालचंद्र नेमाडे यांचे उच्च शिक्षण, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून, व डेक्कन कॉलेजातून झाले. नंतर त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले. नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे. त्यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी सांगवी, खानदेश येथे झाला. १९७४ पासून औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात व शेवटी ते मुबई विद्यापीठात तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासाठी स्थापन झालेल्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले. नेमाडे हे गोवा विद्यापीठातही इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख होते.

    'कोसला' हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५ व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते... ' भालचंद्र वनाजी नेमाडे यांच्या कोसला' या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता. कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार (१९६७), जरीला (१९७७) व झूल(१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबर्यार लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली. कादंबर्यां्शिवाय त्यांचे 'देखणी' आणि 'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत. टीकास्वयंवर या टीकाशास्त्रावरच्या पुस्तकासाठी नेमाडे यांना १९९० साली साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच २०१३ साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कारही त्यांना देण्यात आला. नेमाडेंनी कादंबरी, कविता व समीक्षा ग्रंथांची निर्मिती या सर्व क्षेत्रांत साहित्यिक कामगिरी केली.

    रंजनवादी मूल्यांना कडाडून विरोध करतानाच परंपरेविषयी चिकित्सक असण्याकडे त्यांचा कल आहे. मराठीवरील इंग्रजी साहित्याचा प्रभाव, शैलीशास्त्रीय दृष्टीने अभ्यास ही वैशिष्ट्ये असणार्याल नेमाडेंनी इंग्रजीतूनही साहित्यनिर्मिती केली. "साहित्याची भाषा‘ हे त्यांचे भाषाविज्ञानविषयक तात्त्विक स्वरूपाचे पुस्तक वाचकांना वेगळी दृष्टी देते.

    नेमाडेंनी आपल्या साहित्यात बोलीभाषेला अधिकाधिक वाव दिला. कोकणी, गोंयची, हिंदीमिश्रित उर्दू आणि वैदर्भीय या बोलींमध्ये त्यांनी कविता लिहिल्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ विकिपीडिया.

  • मन्ना डे

    मन्ना डे यांचे खर नाव प्रबोधचंद्र डे असे होते. मन्ना डे, यांना खरे तर पैलवानकी करायची होती. त्यासाठी ते कोलकात्यात तालमीत पैलवानांकडे सरावही करायचे. त्यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला. पण चष्म्यामुळे त्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करता आलं नाही. कुस्ती खेळताना चष्मा आडवा येऊ लागला. अखेर पैलवानकीचा नाद सोडून महाविद्यालयीन जीवनात ते संगीताकडे वळले. कोलकाता येथील विद्यासागर कॉलेजमध्ये त्यांनी संगीतसाधना सुरू केली. त्या वेळीही त्यांच्या मनात शास्त्रीय संगीत की फिल्म संगीत असा संभ्रम होता. मन्ना डे यांचे वडील पुमाचंद्र डे हे चार्टर्ड अकाउंटंट होते, मुलाने बॅरिस्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु मन्ना डे यांना तोपर्यंत आपल्या काकांसारखे म्हणजेच के. सी. डे यांच्यासारखे अभिनेते, गायक होण्याच्या ध्यासाने पछाडले होते. के. सी. डे हे न्यू थिएटर्समध्ये काम करीत असत. त्यांनी मन्ना डे यांना आपला शिष्य केले आणि तिथूनच मन्ना डे यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली.

    मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. मन्ना डे हे नावही के. सी. डे यांनीच ठेवले होते. त्यांनी एस.डी.बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते. पार्श्वगायनाची सुरवात मा. मन्ना डे यांनी १९४२ मधील ’तमन्ना’या चित्रपटापासून केला.’तमन्ना’चे संगीत दिग्दर्शक के.सी.डे हेच होते मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर "जागो आयी उषा "हे युगलगीत गायिले होते. मन्ना डे ची खरी ओळख त्यांच्या "बसंत बहार " मधील "सुर ना सजे" मुळे तसेच "श्री चारसौबीस" मधील "प्यार हुआ "सीमा मधील"तू प्यारका सागर है""दो आंखे बारह हाथ"मधील "ऐ मालिक तेरे बंदे हम" किंवा "लागा चुनरीमे दाग" अश्या निवडक गीतातूनच झाली. राजकपूरसाठी त्यांचा आवाज काही चित्रपटातून वापरला गेला व तो योग्यही वाटला. शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली. विशेषत: रफी यांच्याबरोबर गायलेले परवरिश चित्रपटातील "मामा ओ मामा"किंवा चलतीका नाम गाडी"मधील "बाबू समझो इशारे" किंवा "पडोसन" मधील किशोरकुमारबरोबर गायलेले "एक चतुर नार" ही गीते त्याची साक्ष देतात.

    मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत गाणी गायली आहेत. मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्य गीतांची संख्या इतर कोणाही मराठी गायकाच्या (एक बाबूजी सोडले तर) तोडीस तोड आहे.त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत " अ आ आई म म मका "(चित्रपट एक धागा सुखाचा) :धुंद आज डोळे" (चित्रपट दाम करी काम). त्याचबरोबर "घन घन माला नभी "(चित्रपट वरदक्षिणा) ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते."घरकुल" चित्रपटातील "हाउस ऑफ बॅम्बू "हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. मन्ना डे यांचे २४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट