जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
प्रा.डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी एम. ए.,पीएच.डी., मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या होत्या. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९४३ रोजी झाला. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९६८ ते १९८० स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. २३ नाटय़महोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाट्यकथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका, अशी त्यांची नाट्य-चित्रपट कारकीर्द होती. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगामुळे डॉ. देशपांडे यांचा प्रेक्षक-श्रोता जगभर होता. एकूण ५२ पात्रांचे विविध आवाज आणि कमीतकमी प्रभावी हालचाली हे या एकपात्री प्रयोगाचे खास वैशिष्टय़ होते. मराठवाडय़ाच्या ग्रामीण जीवन शैलीशी एकरूप असलेले आणि अस्सल व्यक्तिरेखा असणारा हा प्रयोग केवळ मराठवाडय़ातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विविध देशांतील मराठी नाटय़रसिकांना भावला. ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा नोंद घेण्यात आलेले लक्ष्मण देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या. तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ची सुरुवात १९८० मध्ये झाली. डॉ. देशपांडे यांनी 'वऱ्हाड' लंडन, अमेरिका, कॅनडा, दुबई, मस्कत, ऑस्टेलिया, नायजेरिया, नैरोबी, कतार, कुवेत, थायलंड, सिंगापूर या देशांतही पोहोचवले. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'ने त्यांच्या या कार्याचा १९९६ मध्ये प्रथमत: गौरव केला. आजपर्यंत या एकपात्री प्रयोगाचे ३ हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले होते. डॉ. देशपांडे यांनी डॉ. अनुया दळवी यांच्याबरोबर द्विपात्री 'नटसम्राट'चे शंभरावर प्रयोग केले. त्यांनी दोन चित्रपटांतही काम केले. स्वेच्छानिवृत्तीनंतर ते परभणीच्या अ. भा. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. नाटकाच्या मिळकतीतून बरीचशी रक्कम त्यांनी नगिर्स कॅन्सर हॉस्पिटल (बाशीर्), अंधशाळा नाशिक आणि इतर ठिकाणी दिली. २००३ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले तर २००४ ला त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या शिवाय अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार त्यांना देण्यात आले.
प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
साहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर यांनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल १२ वर्षे केसरीच्या संपादकपदाची धुरा वाहिली.
कवी, कथाकार व अनुवादक सदानंद शांताराम रेगे यांचा जन्म २१ जून १९२३ रोजी झाला.
आधुनिक मराठी कविता समृद्ध करणार्या सदानंद रेग्यांनी आजच्या जगाशी सार्वकालिक “मी” चा विसंवाद आणि कालातीत मानवी विकार-वासना यांच्यावर बोट ठेवले.
“अक्षरवेल”, “गंधर्व”, “वेड्या कविता” हे त्यांचे काव्यसंग्रह, तर “काळोखाची पिसे”, “मासा आणि इतर विलक्षण कथा” हे कथासंग्रह यांसह त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
sadanand shantaram rege
भुपेश कुंभार हे भारताच्या गळ्यात सजणार्या तंत्रज्ञानाच्या माळेतील लकलकते मणी आहेत, व तंत्रज्ञान विकासाला विशेषतः गाड्या बनविण्याच्या गुंतागुंतीच्या क्षेत्रातील क्रांतीप्रती त्यांनी दिलेले योगदान अद्वितीयच मानले पाहिजे. सल्ला-मसलत हा त्यांचा आवडीचा प्रांत असल्यामुळे ते सध्या बजाज ऑटो लिमीटेड या नावाजलेल्या कंपनी क्षेत्रातील सर्व सल्ला मसलतींचे काम व ग्राहकांना आपल्या परिवारात खेचुन घेण्याचे काम मोठ्या निष्ठेने करीत आहेत.
सवड मिळताच निरनिराळ्या ठिकाणी जाऊन ते वनस्पती आणि प्राण्यांचे निरीक्षण करत. आवश्यकता वाटल्यास त्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत घेऊन येत. त्यांच्या या छंदामुळे पश्चिम घाटातील नद्या आणि पाणवठे यात लिम्नॉक्निडा इण्डिका या जलव्याल प्राणीसंघातील जलपुष्प गणातील प्राण्यांचे अस्तित्व असल्याचे आढळून आले. त्यापूर्वी पश्चिघम घाटात या जलपुष्पाचे अस्तित्व कोणासही ठाऊक नव्हते. तांबी, वेण्णा, धोम येथील धरणांमध्येही हे प्राणी आढळून आले. त्यावर ‘नेचर’ या प्रख्यात नियतकालिकात त्यांचा संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाला.
मिरजकर, युसूफ
भारतीय वाद्यांच्या निर्मितीमागील विज्ञान समजून घेऊन त्यात आपला जीव ओतणारे कारागीर ते वाद्य वाजविणाऱ्यांसाठी फार महत्त्वाचे असतात. पुण्याचे युसूफभाई मिरजकर हे अशांपैकी एक होते. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांनी तयार केलेल्या वाद्यांवर आनंद निर्माण करणारे अनेक कलावंत आणि रसिक दु:खी होणे स्वाभाविक आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्यापासून ते रईस खाँ यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठ कलावंत युसूफभाईंनी तयार केलेल्या वाद्यांवर फिदा असत.
वाद्यनिर्मिती ही जरी आनंद निर्माण करण्याचे साधन असले, तरीही त्यामागे विज्ञानाची पक्की बैठक असते. सतार, सरोद, विचित्र वीणा, व्हायोलिन, तबला, हार्मोनियम अशा वाद्यांमधील विज्ञानाचे सार लक्षात आल्याशिवाय त्या वाद्यांची निर्मिती अशक्य असते. त्यासाठी विज्ञान शिकावे लागत नाही, तर त्या विज्ञानाचा उपयोग समजून घ्यावा लागतो. सुमारे २०० वर्षांपूर्वी मिरजेत आलेल्या वाद्यनिर्मितीकारांनी भारतीय संगीतात आपण अपरिहार्य असल्याचे सिद्ध केले आहे. युसूफभाई हे अशा वाद्यनिर्मितीकारांच्या ३६ व्या पिढीचे प्रतिनिधी. भाईबंद मिरजेत राहिले आणि युसूफभाईंचे वाडवडील पुण्यात आले. पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर त्यांनी आपले दुकान थाटले आणि मग तिथे अनेक ज्येष्ठ कलावंतांचा राबता सुरू झाला. एखादा पदार्थ तयार करताना त्या माऊलीच्या ‘हाताची चव’ त्यात सहजपणे विरघळते, असा अनुभव आपल्या सगळय़ांना येतो. पुस्तकात वाचून पदार्थ तयार करण्याचा सोस असणाऱ्यांना ‘काहीतरी कमी’ असल्याचे जाणवत राहते. वाद्यांच्या बाबतीत तसेच घडते. त्या वाद्याच्या जडणघडणीमागे असणाऱ्या हाताची कमाल ते वाद्य बोलायला लागल्यावर लक्षात येते. युसूफभाईंचा हात प्रत्येक वाद्यावर ज्या मायेने फिरत असे, ते प्रेमच त्यांच्या वाद्याला सजीव करत असे. लाकडावर ताणून बसविलेल्या तारांचा झंकार होण्यासाठी जवारीची गरज असते. जवारी हा भारतीय संगीतातील एक वैज्ञानिक असला तरीही मनाला जाणवणारा चमत्कार आहे. ही जवारी काढणे ही मोठी कुशलतेची गोष्ट असते. प्रत्येकाला ती जमतेच असे नाही. युसूफभाई मात्र जवारी काढण्यात पटाईत होते. वाद्य तयार करणाऱ्याला त्यातून निर्माण होणाऱ्या संगीताची मोठी जाण असावी लागते. युसूफ मिरजकर हे त्या अर्थाने वादक नसले, तरीही त्यांच्या तंतुवाद्यांवरची हुकमत अफाट होती. त्यांच्या हाती वाद्य आले, की ते त्याच्यावर ज्या आत्मीयतेने ‘उपचार’ करायचे, की त्या वाद्यानेही सजीव होऊन त्यांचे आभार मानावेत! पुण्याच्या मानाच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात येणाऱ्या सगळय़ा दिग्गज कलावंतांना युसूफभाई तिथे आहेत, याचाच आधार असायचा. आपली वाद्ये सुस्थितीत ठेवून ती संगीतानुकूल ठेवण्यात त्यांचा हातखंडा होता. वादक आणि संगीतकार म्हणूनच या पडद्यामागील खऱ्या कलावंताच्या प्रेमात असत. आयुष्यभर संगीताची खरी सेवा करणारा हा एक वाद्यनिर्मिती करणारा कलावंतच होता. रस्त्यावरील अपघातात त्यांचा जागीच मृत्यू होणे ही जशी धक्कादायक बाब आहे, तशीच मनाला चटका लावून जाणारी घटना आहे.
अंजनीबाई मालपेकर भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका होत्या. त्यांचा जन्म २२ एप्रिल १८८३ रोजी झाला. अंजनीबाई मालपेकर यांनी नजीरखाँ व खादिमा, हुसेनखाँ या तीन भावांच्या कडून संगीताचे शिक्षण घेतले. राग `यमन’ हा भेंडीबाजार घराण्याच्या उस्ताद नजीरखाँनी अंजनीबाईंना शिकवलेला पहिला राग. त्याची तालीम साडेतीन वर्ष चालली होती. अंजनीबाईंचा `मध्यम’ स्वर एखाद्या ज्योतीसारखा कसा प्रज्वलित व्हायचा याचं वर्णन खुद्द कुमार गंधर्वांनी करून ठेवलं आहे. कुमार गंधर्व म्हणत असत, “देवधर मास्तरांच्या सांगण्यावरून अंजनीबाई मला शिकवायला तयार झाल्या. त्यावेळी त्यांचा प्रत्येक सूर चैतन्यानं पुलकित होऊन समोर येई. सुरांचं हे सामर्थ्य मी यापूर्वी कधी बघितलं नव्हतं.” अंजनीबाई मालपेकर ह्याचे शब्दलालित्य, सुंदर सांगीतिक आशय आणि लयीची गंमत यासाठी या घराण्यातील चिजा प्रसिद्ध होते. त्या बंदिश धृपद अंगाने म्हणत. खानेपुरी, मुखविलास, आलापी, बोल भरणे, खुलाबंद बोल, उचकसमेट, मींड, कणस्वर, लयीच्या अंगाने सुंदर सरगम करणे इ. त्यांचे गानविशेष म्हणता येतील. हेमराज नावाच्या कर्नाटकातील विख्यात वाद्यनिर्मात्यानं संपूर्ण आयुष्यात बारा-तेराच तंबोरे केले. पैकी एक तंबोरा त्यांनी अब्दुल करीम खाँना भेट दिला आणि दुसरा अंजनीबाईंना. अंजनीबाईंना कोणी भेटायला आलं की यमन रागातील चिज गुणगुणून त्या पाहुण्यांचं स्वागत करीत. भेंडीबाजार घराण्याचा खरा उत्कर्ष झाला तो अंजनीबाई मालपेकर आणि उस्ताद अमान अली खाँ यांच्या काळात. अंजनीबाईकडे बेगम अख्तर, नैनादेवी, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी संगीताचे धडे घेतले. विदुषी अंजनीबाई मालपेकर यांनी आपल्या अतीव सुरेल स्वरलगावाने आणि लयीच्या समझदारीतून ही गायकी पेश केली. विदुषी अंजनीबाई यांची आग्रा-परंतु मुलायम गमक असलेल्या अशा-गायकीची दुर्दैवाने कुणीच दखल घेतली नाही.अंजनीबाई मालपेकर यांचे ७ ऑगस्ट १९७४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
जितेंद्र हे बॉलीवुडचे केवळ एक लोकप्रिय नायक अथवा अभिनेते नाहीत तर त्याचबरोबर अनेक दूरदर्शन मालिका आणि चित्रपट यांचे ते निर्माते आहेत. बालाजी टेलेफिल्म्स, बालाजी मोशन पिक्चर्स या उद्योगांचे ते अध्यक्ष आहेत.
प्राध्यापक असलेले रज्जू भैया संघाच्या कार्य व प्रचारासाठी उ.प्र. मध्ये बसने प्रवास करत असत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढील वर्षापासून संघाची पहिली सैनिकी शाळा सुरू करणार आहे. या शाळेचे नाव राजेंद्र सिंह यांच्या नावावरून ‘रज्जू भैय्या सैनिक विद्या मंदिर’ असे असणार आहे.
व .पु . काळे हे तरुणांना , समाजाला बरोबर घेऊन जाणारे लेखक होते . त्यांनी समाज आणि समाजातील माणसे जी तुमच्या आमच्यात असतात त्याच्या कथा , व्यथा चांगल्या , आकर्षक भाषेत मांडल्या.
Copyright © 2025 | Marathisrushti