(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • डॉ. गंगाधर पानतावणे

    डॉ. गंगाधर पानतावणे हे मराठीतील लेखक, समीक्षक व विचारवंत आहेत

  • अफाट कर्तृत्वाच्या वडिलांची तेवढीच अफाट कन्या.. !

    “अफाट कर्तृत्वाच्या वडिलांची ही तेवढीच अफाट कन्या.. ! संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आचार्य अत्रे, ‘नवयुग’ आणि ‘मराठा’ व ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै..! ‘हायकू’ हा जपानी काव्यप्रकार मराठीत रुढ करणा-या ज्येष्ठ कवयित्री म्हणजे शिरीष पै. असंख्य कविता, कथा शिरीषताईनी लिहिल्या. मराठी दैनिकाच्या पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांना बहुमान मिळाला. शिरीष पै यांच्या लेखनाची सुरुवात त्यांच्या पप्पांमुळे म्हणजे आचार्य अत्रे यांच्यामुळे झाली. त्यांच्याच लेखणीचा वारसा त्यांनी घेतला. त्यांच्या सहवासातच त्यांना लिखाणाची गोडी लागली. कथा, कविता, नाटक आणि प्रासंगिक लेखन असे चौफेर लिखाण त्यांनी केले.

  • डॉ. प्रकाश कोतवाल

    दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील अस्थिरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश कोतवाल हे हातावरील शस्त्रक्रियेतील देशातले आघाडीचे शल्यचिकित्सक. त्यांनी हे नैपुण्य अमेरिकेतील केंटकी लुईव्हिलमधील हॅंडसर्जरीची संस्था आणि न्यूयॉर्कमधील हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे मिळवले. आठ वर्षांपूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दोन्ही मनगटांवर शस्त्रक्रिया करुन त्यांना हाताच्या बोटांवरील गमावलेले नियंत्रण डॉ. कोतवाल यांनी परत मिळवून दिले.

    डॉ. प्रकाश कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला या हातांनी हात दिले मज हा लेख पुढील पानावर वाचा.

    डॉ. प्रकाश कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला या हातांनी हात दिले मज हा लेख वाचा.
    kotwal-dr-prakash-modified


    MM-022

    <!--डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हा लेख वाचा. या हातांनी हात दिले मज -->

  • खंडेराव त्र्यंबक सुळे

    खंडेराव त्र्यंबक सुळे हे त्यांच्या प्रखर देशभक्तीला व समाजवादी विचारसरणीला, आपल्या दर्जेदार लिखाणाद्वारे वाट करून देणारे प्रतिभावंत लेखक व स्वातंत्र्य सेनानी होते. स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्मलेल्यायाखंडेराव सुळे यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव होता. त्यामुळेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यत व सत्याग्रहांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. आपल्या जाज्वल्य देशाभिमानामुळे व समाजवादी मागण्यांसाठी त्यांना अनेकदा तुरूंगात देखील पाठवण्यात आले होते. खंडेराव सुळे यांचे प्राथमिक शिक्षण बी.जे. हायस्कुल ठाणे येथे झाले. पुढे म्हणजेच १९१८ साली उच्च शिक्षणासाठी त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश मिळविला. १९२१ साली महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या गुजरात विद्यापीठामधून त्यांनी विज्ञानविशारद ही पदवी संपादन केली. त्यानंतर “महर्षी अरविंदां”नी सांगितलेल्या आध्यात्मिक मार्गाचा काही काळ मार्गक्रमणा केली. १९३० साली त्यांना केवळ स्वातंत्र्य व समानतेच्या तत्त्वांवर उभा असलेला भारतीय समाज पाहण्याची, त्यासोबतच आपण देशासाठी पाहिलेली स्वप्ने साकार करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला. सुळे यांच्या प्रखर देशभक्तीची समाजाच्या विविध स्तरांतून ज्याप्रमाणे कौतुक झाले, त्याचप्रमाणे ज्ञान व कला क्षेत्रांमधील त्यांचा व्यासंग व योगदान देखील कधीही न विसरता येण्याजोगे आहे. त्यांना अनेक ज्ञानशाखांत रस होता. संस्कृत, व साहित्य हे त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचे विषय होते. भेदक, चिकित्सक, डौलदार परंतु वास्तवाची धार असलेली परिणामकारक लेखनशैली ही त्यांना मिळालेली नैसर्गिक देणगीच होती. खंडेराव सुळेंनी “शेष” या नावाने ललित लेखन केले, तर “स्कंद” नावाने राजकीय स्वरूपाचे मार्मिक लेखन केले. वीणा मासिकामधून त्यांनी प्रकाशित केलेल्या अनेक लेखांनी गुलामगिरीची झापडे लावलेल्या, भारतामध्ये एकच खळबळ माजवून दिली होती. "ज्योत्स्ना" मासिकातून व इतर नियतकालिकांमधून देखील त्यांच्या अनेक कथा प्रकाशित झाल्या. लेखनासोबतच समीक्षा, हे त्यालाच समांतर असलेले परंतु मनाच्या एका वेगळ्याच विचारशील व संवेदनशील कप्प्याची परीक्षा पाहणारे क्षेत्रदेखील त्यांनी आजन्म आपलेसे केले होते. सुळेंचे कित्येक टीकालेख हे आजही, शुध्द पक्षपातीपणाचे व आभ्यासपुर्ण उत्खननाचे द्योतक मानले जातात. त्यांच्या समीक्षालेखांवर प्रखर मार्क्सवादी तत्व प्रणालीचा प्रभाव दिसून येतो. ख्रिस्तोफर कॉडवेलची सौंदर्य मीमांसा, जनतेचा कवी, बोरिस पॅस्टर नॅक आणि त्याची झिवॅगो इत्यादी प्रसिध्द लेख त्यांच्या मार्मिक व अष्टपैलू वाड्.मयदृष्टीची ग्वाही देतात. १९३८ साली झालेल्या ठाणे जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद खंडेराव सुळेंनी भुषविले होते .

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

  • मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक हरी नारायण उर्फ ह.ना.आपटे

    ह. ना. आपटेंनी अनेक पुस्तकांना प्रस्तावनाही लिहिल्या. ह. ना. आपटेंनी साहित्याच्या अनेक प्रांतांत मुशाफिरी केली असली, तरी ते गाजले त्यांच्या कादंबरी लेखनामुळेच. बारा सामाजिक व अकरा ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्या सर्वच लोकप्रियही झाल्या. पण त्यांचे नाव आजतागायत गाजत राहिले, ते त्यांच्या ‘पण लक्षात कोण घेते?’ या कादंबरीमुळे. ही कादंबरी मराठी साहित्याच्या वाटचालीतील मैलाचा दगड बनून राहिली.

  • सुभाष भेंडे

    प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला.

  • प्रसिध्द अभिनेत्री दिप्ती नवल

    दीप्ती नवल उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेतच,परंतु त्या कुशल कवीयत्री,चित्रकार आणि छायाचित्रकारसुध्दा आहेत. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५१ रोजी झाला.या व्यतिरिक्त त्यांना संगीताची सुध्दा आवड आहे आणि त्या स्वत:काही वाद्य वाजवतात,हे विशेष.त्यांच्या प्रकाशित पुस्तकांमध्ये'लम्हा-लम्हा'हे पुस्तक प्रसिध्द आहे.

    ५० वर्षांचे फिल्मी करिअर पूर्ण कराणा-या दीप्ती नवल यांनी'एक बार फिर','हम पांच','चश्मे बहाद्दूर','अंगूर','मिर्च मसाला'आणि'लीला'सारख्या काही सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे.तसे पाहता,दीप्ती नवल त्यांच्या'चश्मे बहाद्दूर'सिनेमामधून जास्त प्रसिध्द झाल्या होत्या.या सिनेमातील त्यांचा'चमको वाशिंग पाउडर'च्या'सेल्सगर्ल'चा अभिनय आजही लोकांच्या आठवणीत आहे.

    'जलियावाला बाग'सिनेमामधून सुरू झालेल्या दीप्ती नवल यांच्या फिल्मी करिअरचा प्रवास आजही सुरू आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या'यारियां'सिनेमात दीप्ती यांनी अभिनय केला आहे.जानेवारी २०१४ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात दीप्ती यांनी गर्ल्स होस्टेलच्या वॉर्डनची भूमिका साकारली होती.या सिनेमापूर्वी त्या २०१३ मध्ये'बीए पास'आणि'औरंगजेब'सिनेमातसुध्दा दिसल्या होत्या.या वर्षी रिलीज झालेल्या'महाभारत 3D'या अ‍ॅनिमेटेड सिनेमामधील'कुंती'पात्राला त्यांचा आवाज देण्यात आला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर

    ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’ या पहिल्याच लावणीच्या ठसक्याने मराठी गीतरसिकांना वेड लावले. ‘सामना’, ‘पिंजरा’, ‘साधी माणसं’ अशा सुमारे साडेतीनशे चित्रपटांसाठी जगदीश खेबुडकर यांनी तब्बल अडीच हजारांवर गाणी लिहिली. त्यांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला. यांत ‘तुम्हावर केली मर्जी मी बहाल’, ‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला’ अशा एकाहून एक सरस लावण्यांबरोबर ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’, ‘मला हे दत्तगुरू दिसले’ यांसारखी भक्तिगीते, तर ‘राजा ललकारी अशी दे’, ‘ही कशानं धुंदी आली’, ‘धुंदी कळ्यांना’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘बाई बाई… मनमोराचा’, ‘आकाशी झेप घेरे पाखरा’ अशा सर्वांगसुंदर गाण्यांचा समावेश आहे. आजवर कोणत्याही मराठी गीतकाराने खेबुडकर यांच्याइतके काव्यप्रकार वापरले नाहीत. गण-गवळण, लावणी, भारुड, गोंधळ, सवाल-जवाब, बालगीत, प्रेमगीत, स्फूर्तिगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीत, मुक्तछंद, अभंग अशा मराठीत यच्चयावत काव्यप्रकारांत खेबुडकरांनी आपल्या शब्दसामर्थ्याने असामान्य गीते लिहिली. या काव्यसांभाराला तब्बल ४८ संगीतकारांचे संगीत मिळाले आणि ३६ गायक आणि ३६ गायिकांनी ही गीते सुमधुर बनवली. व्ही. शांताराम, पेंढारकर, दादा कोंडके, शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके अशा दिग्गजांबरोबर जगदीश खेबुडकर यांनी काम केले. कमल हसन यांच्या ‘हे राम’ चित्रपटासाठी खेबुडकर यांनी गीते ही लिहिली होती. जगदीश खेबूडकर यांचे ३ मे २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • खलील शरिफ गिरकर

    खलील शरिफ गिरकर हे टी. व्ही. नाईन या नामांकित वृत्तवाहिनीवर पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. राजकीय व सामाजिक घडामोडींवरील त्यांचे अफाट ज्ञान, व ते ज्ञान सर्व बाजुंनी नीट विचार करून वाचकांसमोर अथवा प्रेक्षकांसमोर मांडताना त्यांनी जोपासलेला तटस्थ व निःपक्षपातीपणा हा सर्वज्ञात आहे. गेल्या पाच वर्षांपासुन पत्रकारितेचे व्रत मोठया निष्ठेने व प्रामाणिकपणे स्वीकारलेल्या गिरकरांनी आजवर अनेक राजकीय व सामाजिक विषयांचे अचुक विश्लेषण व उत्खनन करून त्यांवर विपुल लेखन व सादरीकरण केले आहे, व लेखनिक कौशल्यांबरोबरच प्रशासकीय कामांसाठी, त्यांनी त्यांच्यामध्ये प्रयत्नपुर्वक विकसीत केलेले व्यावसायिक अंग नक्कीच स्पृहणीय असे आहे.

  • दत्ता नाईक उर्फ एन. दत्ता

    दत्ता नाईक उर्फ एन. दत्ता यांचा जन्म १२ डिसेंबर १९२७ रोजी झाला. एन. दत्तांचं नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी, तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’सारख्या मराठी चित्रपटांची मालिकाच डोळ्यांपुढून तरळून जाते.

    लहानपणापासूनच गोवन व पोर्तुगीज लोकसंगीत सातत्याने कानावर पडत असल्याने जात्याच संगीतात रस असणारे मा.एन. दत्ता नादावून गेले नसल्यासच नवल. शालान्त परीक्षेनंतर त्यांनी थेट मुंबई गाठली व देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. त्या वेळी गुलाम हैदर बॉम्बे टॉकीज व व फिल्मस्तानच्या चित्रपटांचे संगीत करीत असत.

    स्वातंत्र्यपूर्व काळात होत असलेल्या देशभक्तिपर मेळ्यातून एन. दत्तांना आगळ्यावेगळ्या ढंगातील गाणी गाताना सचिनदेव बर्मन यांनी ऐकले होते व आपल्याकडे साहाय्यक म्हणून काम करण्याची ‘ऑफर’ही दिली होती. फाळणीनंतर गुलाम हैदर पाकिस्तानात निघून गेले व सचिनदेव फिल्मस्तानचे संगीतकार बनले. त्यानंतर एन. दत्ता त्यांचे साहाय्यक बनले. सचिनदांच्या ‘अफसर’, ‘एक नजर’, ‘नौजवान’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘मुनीमजी’ ते थेट ‘देवदास’पर्यंत त्यांनी सचिनदांकडे साहाय्यक संगीतकाराची धुरा समर्थपणे सांभाळली. या काळातल्या एस.डी. बर्मन यांच्या कित्येक चालींवर एन. दत्तांच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो.

    एस.डी. बर्मन यांच्या ‘बुजदिल’ मधील लताबाईंचं शास्त्रीय सुरावटीतील ‘झन झन झन पायल बाजे’ हे लोकप्रिय गाणं एन. दत्ता यांचं असल्याची चर्चा त्या काळी सर्वत्र होत होती. ‘जाल’ (१९५२) या चित्रपटाची पाश्र्वभूमी गोव्याची असल्याने या चित्रपटाचं संगीत गोमंतकीय लोकसंगीतावर आधारित होतं. सचिनदांना एन. दत्ता हे गोवेकर असल्याचे माहीत असल्याने त्यांनी गोवन लोकसंगीतावर आधारित गाण्यांना चाली लावण्याचं स्वातंत्र्य एन. दत्ता यांना दिलं होतं. दत्ताजींचा स्वभाव विनम्र व भिडस्त असल्याने त्यांनी अशा गोष्टीचं भांडवल करून चालींचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न कधीच केला नाही.

    ‘टॅक्सी ड्रायव्हर’पासून एस.डी. बर्मन यांचे दुसरे साहाय्यक बनलेले जयदेव मात्र परखड स्वभावाचे असल्याने अशा गोष्टी ते स्पष्टपणे बोलून दाखवत. ‘बुजदिल’ व ‘जाल’ या चित्रपटांचे निर्माते असलेल्या फत्तेचंद यांनी एन. दत्तांची प्रतिभा ओळखली होती म्हणूनच १९५५ साली राज खोसला दिग्दर्शित ‘मिलाप’ या चित्रपटाच्या संगीताची धुरा त्यांनी विश्वासाने त्यांच्यावर सोपविली होती. एन. दत्तांनी फत्तेचंद यांचा विश्वास सार्थ ठरवीत पदार्पणातच अप्रतिम कामगिरी केली. या चित्रपटातील ‘ये बहारों का समां, चांद तारों का समां’ ही लता मंगेशकर व हेमंतकुमारने वेगवेगळी गायलेली गाणी, गीता दत्तने गायलेली ‘जाते हो तो जाओ पर जाओगे कहां’, ‘हमसे भी कर लो कभी कभी तो मिठी मिठी दो बातें’ व ‘चाहे भी जो दिल तो जाना न वहां’ ही सोलो गाणी व रफीबरोबर गायलेलं ‘बचना जरा ये जमाना है बुरा’ या युगुलगीताने अक्षरश: धमाल उडवून दिली होती.

    बी. आर. चोप्रांच्या ‘धूल का फूल’ या चित्रपटात एकापेक्षा एक सरस व यादगार गाणी एन. दत्तांनी या चित्रपटात दिली आहेत. लता मंगेशकरांबरोबर महेंद्र कपूरने गायलेलं ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं’ हे शायरी ढंगातलं युगुलगीत व ‘धडकने लगी दिल के तारों की दुनिया’ हे महेंद्र कपूर व आशा भोसलेच्या स्वरातलं चिरतरुण प्रेमगीत एन. दत्तांनी अप्रतिम सुरावटीत बांधलं आहे. ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’ हे अर्थपूर्ण गाणं रफीच्या, तर ‘कासे कहूं मन की बात’ हे गाणं सुधा मल्होत्राच्या अजरामर गाण्यांपैकी एक समजलं जातं. ‘झुकती घटा गाती हवा सपने जगाए.’ या कर्णमधुर गाण्याच्या मुखडय़ाची चाल गजानन वाटवेंच्या ‘फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’ या गाण्यावर बेतलेली आहे, हे एका मुलाखतीत एन. दत्तांनी सांगितले होते.

    एरवी दोन गाण्यांतलं साधम्र्य सहजासहजी लक्षात येणार नाही अशी बहारदार सुरावट व ऑर्केस्ट्रेशनची ट्रीटमेंट एन. दत्तांनी या गाण्याला दिली आहे. कोरसचा कल्पक वापर, महेंद्र कपूरचं ‘हमिंग’, लता मंगेशकरांचे उन्मनी आलाप व लडिवाळ तानांची आतषबाजी मन मोहून टाकते. अंतऱ्यात एके ठिकाणी साहिरच्या ‘परछाईंयां’ या दीर्घ काव्यातल्या काही आशयघन ओळी ‘रवां है छोटीसी कश्ती.’ जेव्हा डोकावतात तेव्हा एन. दत्तांमधला संगीतकार ज्या हळुवार व तरल अंदाजात त्यांना स्वरात गुंफताना दिसतो, ते पाहून त्यांच्या बहुआयामी प्रतिभेला मनापासून सलाम करावासा वाटतो. ‘दीदी’ (१९५९) या चित्रपटातली एन. दत्ता यांची ‘बच्चों तुम तकदीर हो कलके हिंदूस्तान की’ व ‘ मेरे भैया को संदेसा पहंचाना’ ही गाणी कमालीची गाजली. पुण्यातील एका समारंभात पु.ल. देशपांडेंनी एन. दत्ता यांचे नाव न घेता या गाण्याचे श्रेय एका मराठी माणसाचे असल्याबद्दल गौरवोद्गार काढले होते.

    १९८० साली प्रदर्शित झालेला ‘चेहरे पे चेहरा’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. महाराष्ट्र शासनाने नागरी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. ते राहत असलेल्या अंधेरी भागातील त्यांच्या निवासस्थानाजवळच्या रस्त्याला मुंबई महापालिकेने ‘एन. दत्ता पथ’ असे नाव आहे.

    एन. दत्ता यांचे ३० डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट