जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
किस्सा असा आहे की बिली बावडनला झालेला तो आजार म्हणजे rheumatoid arthritis म्हणजेच संधिवात. बिलीला संधिवाताने ग्रासले अणि त्याला स्नायूंच्या हालचाली करणे अवघड जाऊ लागले. त्यामुळे त्याला इतक्या तरुण वयात क्रिकेट सोडावे लागले. पुढे बिली अंपायर झाला अणि तिथे सुद्धा त्याला संधिवाताचा त्रास होऊ लागला. त्याला पटकन हात वरती करता येत नाहीत, एकाच ठिकाणी स्तब्ध उभे राहिले की त्याला परत हालचाल करणे कठीण जाते. अंग दुखू नये म्हणून त्याला थोड्या थोड्यावेळाने स्ट्रेचिंग करण्याचे डॉक्टरांचे निर्देश आहेत. आता बिली परत त्याचे काम सोडू शकत नव्हता. यावेळेस त्याने लढायचे ठरवले आणि त्याने त्याच्या अंपायरिंग मध्ये कराव्या लागणाऱ्या हालचालींमध्ये काही कल्पक बदल केले.
‘ग्रामीण जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि सर्व चळवळींना नैतिक अधिष्ठान असले पाहिजे’ असे उदात्त विचार आणि तपस्वी जीवनाचा पुरस्कार करणारे विठ्ठल रामजी तथा महर्षी अण्णासाहेब शिदे. जमखिडी येथील एका धार्मिक कुटुंबात १८७३ ला अण्णासाहेब शिद्यांचा जन्म झाला.
अँडी रॉबर्ट्स यांचे बाउन्सर सर्वाधिक धोकादायक समजले जात असत. बाउन्सरच्या आधीचा चेंडूही काहीसा उसळे, पण तो मऊ भागावर आपटवला जाई.
पूर्वी एक जिंगल तयार व्हायला चार ते पाच तास लागत. माझ्या बाबतीत सांगायचं तर दोन तासांत दोन जिंगल्स तयार करून मी पुन्हा तिसऱ्या कामासाठी दुसऱ्या स्टुडिओत जायचो. एक काळ असा होता की, सकाळी रेडिओवाणीला (वरळी) ८ ते १० मध्ये दोन जिंगल्स, मग १० ते ६ वेस्टर्न आऊटडोअर (फाऊंटन), पुन्हा संध्याकाळी ६ ते १० दोन जिंगल्स (रेडिओवाणी किंवा रेडिओ जेम्स- वरळी) आणि रात्री १० ते २ बॉम्बे लॅब किंवा फिल्म सेंटरला फिल्मची जिंगल्स मी करत असे आणि पहाटे तीन वाजता घरी जात असे. आणि पुन्हा सकाळी साडेसहाला उठून आठ वाजता रेडिओवाणीला हजर!
अशोक पत्की यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://www.marathisrushti.com/articles/ashok-patki-jingles-king/
# Patki, Ashok
लालबहादूर शास्त्री यांचा संस्कृत भाषेवरही मोठ्या प्रमाणावर पगडा होता. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ते भारत सेवक संघासोबत जोडले गेले. येथेच त्यांनी देशसेवेचे व्रत घेतले. या सोबतच त्यांच्या राजकीय कार्याला येथूनच सुरुवात झाली.
प.पू. श्रीदत्तमहाराज कवीश्वर यांचे आजोबा प.पू. श्रीवक्रतुंड महाराज आणि वडील प.पू. श्रीधुंडिराज महाराज दोघेही अधिकारी सत्पुरुष होते. प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजाचे कृपाछत्र कवीश्वर घराण्यावर होते. प.पू. श्रीदत्तमहाराज यांचा जन्म झाल्यावर त्यांना मांडीवर घेवून स्वामी महाराजांनी सांगितले की या ‘बालकाच्या रुपात आजोबांनीच म्हणजे प.पू. श्रीवक्रतुंड महाराजांनी पुन्हा जन्म घेतला आहे
आज ८ ऑक्टोबर. देवरुख येथील 'मातृमंदिरच्या मावशी ऊर्फ मा.इंदिराबाई हळबे यांची पुण्यतिथी.
इंदिराबाई हळबे या समाजसेविका होत्या. इंदिराबाई रघुनाथ तथा मावशी हळबे मूळच्या रत्नागिरीतील केळय़े-मजगावच्या, पूर्वाश्रमीच्या चंपावती वासुदेव खेर-कुलकर्णी. प्रचंड गरीबीमुळे अवघ्या ४ इयत्तेपर्यंतचेच शिक्षण झालेल्या मावशींचे वयाच्या १३ वर्षीच लग्न झाले. लग्नानंतरचा काही काळ सुखात जात असतानाच त्यांना दुदैवाने वेढले. लग्नानंतर अवघ्या १० वर्षात त्यांना वैधव्य आले, त्यातून सावरत असतानाच त्यांना अपत्य वियोगाचे दुखही पेलावे लागले. मात्र या धक्क्यातून खचून न जाता आपली मुलगी मीनाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्यांनी नर्सिंग शिकण्याचा निर्णय घेतला. आपल्या एकाकी आयुष्य त्यांनी समाजसेवेसाठी वाहून घेतले. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात इंदिराबाई हळबे यांनी देवरूखसारख्या ग्रामीण भागात राहून रूग्णसेविकेसारखा खडतर कोर्स पूर्ण केला.
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख गावी १९५४ साली त्यांनी 'मातृमंदिर' ही संस्था स्थापली. समाजसेवेसाठी आणि गोरगरिबांना आरोग्य सेवा पुरविता याव्यात यासाठी दोन खाटांच्या प्रसूतिगृहाने मातृमंदिरची सुरवात केली. मावशींच्या धडाडीने प्रभावित होऊन देवरुखच्या लक्ष्मणराव राजवाडेंनी आपली २४ एकर जागा मावशींना सामाजिक कार्यासाठी मोफत दिली. या जागेतच मातृमंदिररुपी रोपटयाचा महाकाय वृक्ष आज विस्तारला आहे. ग्रामीण दुर्गम भागात कार्यरत असताना अनाथ मुलांची होणारी परवड नजरेत आल्यावर त्यांनी गोकुळ या अनाथालयाची स्थापना केली. मुलांवर चांगले संस्कार रुजविण्यासाठी वाचनालयासह होतकरुंना चांगले शिक्षण घेता येण्यासाठी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली. शिक्षणाचे महत्व तळागाळात पोहोचवण्यासाठी बालवाडय़ांची निर्मिती झाली. ग्रामीण भागातील वीज-रहदारीचे प्रश्न विचारात घेऊन ग्रामविकास हा व्यापक दृष्टीकोन विचारात घेऊन त्यांनी शेती, मृदसंधारण, वनीकरण व पाणलोटक्षेत्र विकासाचे कार्य उभारले. तालुक्यातील महिलांच्या व शेतकऱयांच्या आजच्या प्रगतीचे सार या प्रयत्नांमध्ये सामावले आहे. तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञानाने होणारी शेती, शेतकऱयांचे उंचावलेले जीवनमान, आरोग्य-पाणी-स्वच्छतेविषयी झालेली जाणीवजागृती, महिलांमध्ये नेतृत्वासाठी निर्माण झालेला आत्मविश्वास यासर्वासाठी मातृमंदिरचे योगदान निश्चितच मोठे राहिले आहे.
बचत-पाणी-शेती-वनीकरणाचे ६० वर्षांत हजारो प्रयोग संस्थेने यशस्वी केले आहेत. विविध परदेशी संस्थांशी तांत्रिक सहकार्य करत येथील शेतकऱयाला अधिकाधिक ज्ञानाने समृध्द बनवून त्यांचे जीवनमान उंचावले आहे. श्रमप्रतिष्ठेचे मर्म समजावून देत नैसर्गिक जाद्धूद्बूरह्नर्द्ब व छोटय़ा नळपाणी पुरवठा योजना आखून तालुक्यातील मोठा पाणी प्रश्न संस्थेने हलका करुन आपला लोकचळवळीचा विशेष पर्टनच तयार केला आहे. त्यामुळेच संस्थेचा उल्लेख आज ग्रामविकासाचे विद्यापीठ या आदराने होताना दिसतो. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र, उद्यानपंडीत या मानांच्या पुरस्कारांसह महाराष्ट्र राज्य सिंचन परिषदेचा विशेष सन्मानही संस्थेने मिळवला आहे.
गेल्या ५६ वर्षांत देवरूख येथील मातृमंदिर संस्थेचा विस्तार विविध क्षेत्रात झाला. रुग्णालयाच्या बरोबरीने शेती, बचत गट, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अनाथालय, पाणीपुरवठा, ग्रामीण विकास आणि शेती विद्यालय अशा क्षेत्रांत संस्थेने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. मा.इंदिराबाई हळबे ८ ऑक्टोबर १९९८ यांचे निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
संपर्क :- 02354-241056
विजय नारकर, मातृमंदिर संस्था
चित्रपटनिर्मती, लेखन, दिग्दर्शनात तिचा हातखंडा आहे. चित्रपट आणि संस्कृती हा तिचा अभ्यासाचा विषय आणि त्यासाठीच इराणच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ती विशेष निमंत्रित होती. ती एका राष्ट्रीय चॅनेलच्या उपाध्यक्षपदापर्यंतही पोहोचली आहे. इंग्रजी विषयात जेएनयू मधून एमए केलेली मानसी सप्रे हिने हैदराबादच्या रामोजी राव समुहात मराठी विभागाचे प्रमुखपदही भूषविले आहे. अशा अष्टावधानी चित्रकर्मीच्या कामाची ओळख...
अष्टावधानी चित्रकर्मी
"मालगुडी डेज'सह आपल्या इतर लेखनाने भारतासह जगभरातील वाचकांना भुरळ घालणारे भारतीय लेखक आर.के. नारायण यांचे पुर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी झाला.
१९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात.
या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट 'दि गाईड' यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट निघाला. दि गाईडचे मराठी रूपांतर श्री.ज.जोशी यांनी केले आहे. आर.के.नारायण यांच्या मिस्टर संपत आणि दि फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्तकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या मालगुडी डेज वर आधारित १९८० च्या दशकात दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात ‘मालगुडी डेज्’ ही मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेसाठी नारायण यांचे बंधू प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या रेखाचित्रांमुळे ती मालिका आणि ते पुस्तक यांच्या लोकप्रियतेत भरच पडली.
मालगुडी या एकाच गावातील विविध व्यक्ती, घटना, परिसर, बदलत्या जगाच्या तिथे उमटणार्याच पाऊलखुणा, त्यातून तिथे बदलत जाणारे विश्व, अगदी लहान मुलापासून ते इंग्रजी साहेबाकडे कारकुनी करणार्याल नव-बूर्ज्वा समाजाचे वेधक चित्रण त्या पुस्तकाने केले. प्रचंड लोकप्रिय झालेल्या या मालिकेचे काही वर्षांपूर्वी ‘मालगुडी डेज् रिटर्न’ या नावाने पुनप्रसारणही करण्यात आले होते. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या या मालिकेचे तेव्हा ३९ भाग प्रसारित झाले होते. मालिकेतील ‘स्वामी’ हा लहान मुलगा, त्याचे मित्र आणि त्यांचे भावविश्व मालिकेतून सादर करण्यात आले होते. आर. के. नारायण यांनी लिहिलेल्या काही लघुकथांवर ही मालिका आधारीत होती. साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियनलेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जात असे. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.
नारायण यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी आदी सन्मान मिळाले होते. आर.के.नारायण यांचे १३ मे २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट.
दत्ता नाईक उर्फ एन. दत्ता यांचा जन्म १२ डिसेंबर १९२७ रोजी झाला. एन. दत्तांचं नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी, तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’सारख्या मराठी चित्रपटांची मालिकाच डोळ्यांपुढून तरळून जाते.
लहानपणापासूनच गोवन व पोर्तुगीज लोकसंगीत सातत्याने कानावर पडत असल्याने जात्याच संगीतात रस असणारे मा.एन. दत्ता नादावून गेले नसल्यासच नवल. शालान्त परीक्षेनंतर त्यांनी थेट मुंबई गाठली व देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. त्या वेळी गुलाम हैदर बॉम्बे टॉकीज व व फिल्मस्तानच्या चित्रपटांचे संगीत करीत असत.
स्वातंत्र्यपूर्व काळात होत असलेल्या देशभक्तिपर मेळ्यातून एन. दत्तांना आगळ्यावेगळ्या ढंगातील गाणी गाताना सचिनदेव बर्मन यांनी ऐकले होते व आपल्याकडे साहाय्यक म्हणून काम करण्याची ‘ऑफर’ही दिली होती. फाळणीनंतर गुलाम हैदर पाकिस्तानात निघून गेले व सचिनदेव फिल्मस्तानचे संगीतकार बनले. त्यानंतर एन. दत्ता त्यांचे साहाय्यक बनले. सचिनदांच्या ‘अफसर’, ‘एक नजर’, ‘नौजवान’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘मुनीमजी’ ते थेट ‘देवदास’पर्यंत त्यांनी सचिनदांकडे साहाय्यक संगीतकाराची धुरा समर्थपणे सांभाळली. या काळातल्या एस.डी. बर्मन यांच्या कित्येक चालींवर एन. दत्तांच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो.
एस.डी. बर्मन यांच्या ‘बुजदिल’ मधील लताबाईंचं शास्त्रीय सुरावटीतील ‘झन झन झन पायल बाजे’ हे लोकप्रिय गाणं एन. दत्ता यांचं असल्याची चर्चा त्या काळी सर्वत्र होत होती. ‘जाल’ (१९५२) या चित्रपटाची पाश्र्वभूमी गोव्याची असल्याने या चित्रपटाचं संगीत गोमंतकीय लोकसंगीतावर आधारित होतं. सचिनदांना एन. दत्ता हे गोवेकर असल्याचे माहीत असल्याने त्यांनी गोवन लोकसंगीतावर आधारित गाण्यांना चाली लावण्याचं स्वातंत्र्य एन. दत्ता यांना दिलं होतं. दत्ताजींचा स्वभाव विनम्र व भिडस्त असल्याने त्यांनी अशा गोष्टीचं भांडवल करून चालींचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न कधीच केला नाही.
‘टॅक्सी ड्रायव्हर’पासून एस.डी. बर्मन यांचे दुसरे साहाय्यक बनलेले जयदेव मात्र परखड स्वभावाचे असल्याने अशा गोष्टी ते स्पष्टपणे बोलून दाखवत. ‘बुजदिल’ व ‘जाल’ या चित्रपटांचे निर्माते असलेल्या फत्तेचंद यांनी एन. दत्तांची प्रतिभा ओळखली होती म्हणूनच १९५५ साली राज खोसला दिग्दर्शित ‘मिलाप’ या चित्रपटाच्या संगीताची धुरा त्यांनी विश्वासाने त्यांच्यावर सोपविली होती. एन. दत्तांनी फत्तेचंद यांचा विश्वास सार्थ ठरवीत पदार्पणातच अप्रतिम कामगिरी केली. या चित्रपटातील ‘ये बहारों का समां, चांद तारों का समां’ ही लता मंगेशकर व हेमंतकुमारने वेगवेगळी गायलेली गाणी, गीता दत्तने गायलेली ‘जाते हो तो जाओ पर जाओगे कहां’, ‘हमसे भी कर लो कभी कभी तो मिठी मिठी दो बातें’ व ‘चाहे भी जो दिल तो जाना न वहां’ ही सोलो गाणी व रफीबरोबर गायलेलं ‘बचना जरा ये जमाना है बुरा’ या युगुलगीताने अक्षरश: धमाल उडवून दिली होती.
बी. आर. चोप्रांच्या ‘धूल का फूल’ या चित्रपटात एकापेक्षा एक सरस व यादगार गाणी एन. दत्तांनी या चित्रपटात दिली आहेत. लता मंगेशकरांबरोबर महेंद्र कपूरने गायलेलं ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं’ हे शायरी ढंगातलं युगुलगीत व ‘धडकने लगी दिल के तारों की दुनिया’ हे महेंद्र कपूर व आशा भोसलेच्या स्वरातलं चिरतरुण प्रेमगीत एन. दत्तांनी अप्रतिम सुरावटीत बांधलं आहे. ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’ हे अर्थपूर्ण गाणं रफीच्या, तर ‘कासे कहूं मन की बात’ हे गाणं सुधा मल्होत्राच्या अजरामर गाण्यांपैकी एक समजलं जातं. ‘झुकती घटा गाती हवा सपने जगाए.’ या कर्णमधुर गाण्याच्या मुखडय़ाची चाल गजानन वाटवेंच्या ‘फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’ या गाण्यावर बेतलेली आहे, हे एका मुलाखतीत एन. दत्तांनी सांगितले होते.
एरवी दोन गाण्यांतलं साधम्र्य सहजासहजी लक्षात येणार नाही अशी बहारदार सुरावट व ऑर्केस्ट्रेशनची ट्रीटमेंट एन. दत्तांनी या गाण्याला दिली आहे. कोरसचा कल्पक वापर, महेंद्र कपूरचं ‘हमिंग’, लता मंगेशकरांचे उन्मनी आलाप व लडिवाळ तानांची आतषबाजी मन मोहून टाकते. अंतऱ्यात एके ठिकाणी साहिरच्या ‘परछाईंयां’ या दीर्घ काव्यातल्या काही आशयघन ओळी ‘रवां है छोटीसी कश्ती.’ जेव्हा डोकावतात तेव्हा एन. दत्तांमधला संगीतकार ज्या हळुवार व तरल अंदाजात त्यांना स्वरात गुंफताना दिसतो, ते पाहून त्यांच्या बहुआयामी प्रतिभेला मनापासून सलाम करावासा वाटतो. ‘दीदी’ (१९५९) या चित्रपटातली एन. दत्ता यांची ‘बच्चों तुम तकदीर हो कलके हिंदूस्तान की’ व ‘ मेरे भैया को संदेसा पहंचाना’ ही गाणी कमालीची गाजली. पुण्यातील एका समारंभात पु.ल. देशपांडेंनी एन. दत्ता यांचे नाव न घेता या गाण्याचे श्रेय एका मराठी माणसाचे असल्याबद्दल गौरवोद्गार काढले होते.
१९८० साली प्रदर्शित झालेला ‘चेहरे पे चेहरा’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. महाराष्ट्र शासनाने नागरी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. ते राहत असलेल्या अंधेरी भागातील त्यांच्या निवासस्थानाजवळच्या रस्त्याला मुंबई महापालिकेने ‘एन. दत्ता पथ’ असे नाव आहे.
एन. दत्ता यांचे ३० डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti