जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले “सहकार” मंत्री म्हणून बाळासाहेब भारदे यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाने गौरविले. ते त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते.
शिवसेनेचे खासदार. माजी केंद्रिय अर्थ राज्यमंत्री, सहकारी बॅंकांच्या युनियनचे नेते.
पद्मा खन्ना या ट्रेंड ड्रान्सर असून वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पंडीत बिरजू महाराज यांच्याकडे कथ्थकचे धडे गिरवले. त्यांचा जन्म १० मार्च १९४९ रोजी बनारस येथे झाला.अभिनेत्री पद्मिनी आणि वैजयंती माला यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. वयाच्या १२ व्या वर्षी त्या पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकल्या. १९६१ मध्ये 'भैय्या' या भोजपुरी सिनेमाद्वारे पद्मा यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरवात केली. १९७० मध्ये त्यांना बॉलिवूडमध्ये पहिली संधी मिळाली. 'जॉनी मेरा नाम' या सिनेमात त्यांनी कॅबरे डान्सरची भूमिका वठवली. त्यानंतर 'लोफर', 'जान-ए-बहार', 'पाकिजा', 'सौदागर', 'हेरा फेरी', 'यार मेरी जिंदगी', 'प्यार दिवाना', 'जोशिला', 'अनोखी अदा', 'रामपूर का लक्ष्मण' या सिनेमांमध्ये काम केले. पद्मा यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये कॅबरे डान्स केला. हिंदी सोबतच जवळजवळ १४ भोजपुरी सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला.याशिवाय १९७७ मध्ये 'घेर घेर माती ना चुली' या गुजराती आणि १९७८ मध्ये' आलेल्या जिन्द्रा यार दी' आणि' शेर पुत्तर' या पंजाबी सिनेमातही त्यांनी काम केले. १९८३ मध्ये आलेल्या 'देवता' या सिनेमातील 'खेळ कुणाला दैवाचा कळला' आणि १९८६ मध्ये 'माफिचा साक्षीदार'या सिनेमातील 'शमा ने जब आग. 'या गाण्यांमध्ये त्यांचा गेस्ट अपिअरन्स होता. १९८० च्या दशकात छोट्या पडद्यावर दाखल झालेल्या 'रामायण' या मालिकेत पद्मा खन्ना यांनी राणी कैकयीची भूमिका साकारली.या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. २००४ मध्ये त्यांनी 'नाहीर हुताल जया' या भोजपूरी सिनेमाचे दिग्दर्शन केले. दिग्दर्शक जगदीश सिडना यांच्यासोबत पद्मा खन्ना विवाहबद्ध झाल्या.त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. लग्नानंतर मा.पद्मा खन्ना या युएसए मधील न्यू जर्सी येथे स्थायिक झाल्या आहेत. तेथे त्या डान्स अकॅडमी चालवतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/shared?ci=oHntWZBPB1Y
https://www.youtube.com/shared?ci=y40aBf3QxLA
आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या ‘कल्याणी’ या पात्रामुळे अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेली गडकरींची पणती म्हणजे जुई गडकरी.
मराठी साहित्य आणि नाटय़सृष्टीत मोलाचं योगदान केलेल्या राम गणेश गडकरींची ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ आणि ‘भावबंधन’ ही नाटकं, तर ‘वाग्वैजयंती’ हा काव्यसंग्रह आजही रसिकांवर गारुड घालत आहे. याच गडकरींचा मराठी धागा पुढे कायम राखत आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या ‘कल्याणी’ या पात्रामुळे अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेली गडकरींची पणती म्हणजे जुई गडकरी.
जुईचा चेहरा फोटोजेनिक आहे. जुईचे फोटोशूट करण्याचा योग अनेकदा आला. फोटोशूटपूर्वी आणि शूटदरम्यान जुईशी तिच्या अभिनयातल्या अनुभवांबद्दल आम्ही बोलतो. जुई अभिनय क्षेत्रात कशी आली याविषयी तिच्याशी गप्पा मारत असताना ती भरभरून बोलते. अनेक गोड – कटू अनुभव ती सांगते. सहायक दिग्दर्शकाच्या भूमिकेतून तिने या इंडस्ट्रीत प्रवेश केला खरा. मात्र पुढे तिने अभिनयात यावं यासाठी तिच्या सहकाऱयांनी आणि विशेषतः तिच्या आईने तिला प्रोत्साहन दिले. जुई या क्षेत्रात येण्यापूर्वी तिला मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राज्याध्यक्ष यांचं. गौतमजींनी योग्य वेळी आणि योग्य लोकांशी ओळख करून दिल्याने जुईचा प्रवास पुढे सुखकर झाल्याचं ती सांगते. ‘बाजीराव मस्तानी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे’ या एकापाठोपाठ एक मालिकांतून जुईचा चेहरा दिसू लागला, तर पुढे ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील ‘कल्याणी’ हे पात्र महाराष्ट्रभर चांगलंच गाजलं. कलर्स मराठीवरील ‘सरस्वती’ या मालिकेतूनही जुईने रसिक मनावर मोहिनी घातली.
राम गणेश गडकरींचा इतिहास आणि जुईच्या त्याकाळी सुरू असलेल्या मालिका हे लक्षात घेऊन आम्ही जुईचं पारंपरिक वेशभूषेत फोटोशूट करायचं ठरवलं. यासाठी लाल रंगाची साडी आम्ही निवडली होती. पारंपरिक वेशभूषा, कपाळावर सजलेली चंद्रकोर टिकली, नाकात पिटुकली नथ, अंबाडय़ावर लगडलेला गजरा, दागिन्यांचा देखणा साज असा मराठमोळा शृंगार केलेल्या जुईचं मोहक रूप मी कॅमेराबद्ध करत होतो.
पोर्ट्रेट टिपताना त्या व्यक्तीची चांगली बाजू, डोळ्यातली चमक आणि चेहऱयावरचे भाव हे प्रत्येक वेळी महत्त्वाचं असतं. अनेकदा ही आपली बाजू कलाकारांना माहीत असते, तर काही वेळा व्यक्तीचा चेहरा बघताच क्षणी छायाचित्रकाराला त्या व्यक्तीच्या प्रिफरेबल साईडचा अंदाज येतो. जुईच्याही बाबतीत जुईची एक बाजू फोटोसाठी जास्त चांगली आहे. जुईचे फोटो टिपत असताना जुईच्या स्मितहास्यामुळे तिच्या गालावर हलकीशी खळी पडत असल्याचं मला ध्यानात आलं, तर तिच्या डोळ्यांजवळही दोन नैसर्गिक रेषा असल्याचं मला लक्षात आलं. हीच बाब हेरून जुईचा प्राधान्य असलेल्या बाजूने फोटो टिपायचे मी ठरवलं. जुईचे मोहक स्मितहास्य यावेळी मला कॅमेराबद्ध करता आलं.
जुईचे अनेकदा पारंपरिक वेशभूषेत छायाचित्र टिपल्यानंतर साधारण वर्षभराने तिचं एका मॉडर्न लूकमध्ये फोटोशूट करायचं आम्ही ठरवलं. तिचा हा लुक कुठे अनैसर्गिक वाटणार नाही ना, तसंच तिची प्रतिमा यातून वेगळी निर्माण नाही ना होणार याची काळजी आम्ही घेतली. पहिल्या शूटसाठी हिरव्या रंगाचा वन पीस तिने परिधान केला. या कॉस्च्यूमची गरज असलेली वेशभूषा आणि मेकअप आम्ही करून घेतला.
जुईला काही वेगळे कॉस्च्यूम दाखवले, त्यावरचा लूक सांगितला. काही फोटोंचे रेफरन्स दाखवले. जुईला शूट करायची इच्छा होती, परंतु तिची मानसिक तयारी नव्हती हे तिच्या देहबोलीतून समजत होतं. शूटला ती तयार होती, सांगेल तशी पोजेस देत होती, परंतु चेहऱयावर चिंतेचे भाव होते. जुईला यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही काही काळ शूट थांबवलं. कॅमेरा बाजूला ठेवून तिच्याशी बोलून, गप्पा मारून तिला थोडं फ्री करून आम्ही पुन्हा फोटोशूटला सुरुवात केली. नंतर आमच्या समोर आली ती बिनधास्त वावरणारी, मॉडर्न लूकमधली, नेहमीच्या चेहऱयापेक्षा वेगळी, ग्लॅमरस जुई. तिचे वेगवेगळ्या कॉस्च्यूममध्ये नंतर आम्ही शूट केलं. जुई हळूहळू अधिक खुलत गेली आणि मला तिचे हवे तसे फोटो मिळत गेले. जुईचे नंतर काही काळ्या रंगाच्या वन पीसमध्ये आम्ही फोटोशूट केले. या फोटोत ती अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस वाटत होती.
चौकटीत राहून आपला पिढीजात मराठी बाणा जपणारी जुई पारंपरिक वेशभूषेत सुंदर दिसतेच, परंतु आजच्या युगात स्वच्छंद वावरणारी मॉडर्न जुईदेखील कॅमेऱयात तितकीच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू शकते हे तिने सिद्ध केलंय. कलाकाराला त्याच्या चेहऱयावर रंग घेऊन वावरताना त्याच्या वैयक्तिक मतापेक्षा त्या रंगांना न्याय देण्यासाठी नेहमी धडपड करावी लागते. ही धडपड अनुभव आणि अभ्यासाच्याच जोरावर करता येऊ शकते हे जुईशी बोलताना, शूट करताना जाणवतं.
धनेश पाटील
उत्तर हिंदुस्थानी गायकी ज्यांनी सर्वप्रथम दख्खनमध्ये किंवा महाराष्ट्रात आणली ते पं बाळकृष्णबुवा इचलकरजीकर.मा.विष्णू दिगंबर पलुसकर हे त्यांचेच शिष्य होते.
१९९७ साली सरनाईक राष्ट्रवादीचे सदस्य झाले आणि त्यांनी सक्रीय राजकरणामध्ये उडी घेतली. ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरातून ते तीन वेळा पालिकेवर निवडून गेले होते. २००८ मध्ये त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. लगेचच २००९ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले आणि ते ठाण्यातून आमदार झाले.
रणधीर कपूर यांची एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता व करीश्मा व करीना कपूर यांचे वडील व राजकपुर यांचा मुलगा अशी ओळख आहे. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला. रणधीर कपूर यांना चित्रपट क्षेत्र हे वारसाने मिळाले आहे. त्यांचे वडील राज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. तर रणधीर कपूर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात ‘श्री ४२०’ चित्रपटात बालकलाकार म्हणून केली होती. ‘दो उस्ताद’ चित्रपटात काम केलेल्या रणधीर कपूर यांनी १९६८ सालच्या ‘झुक गया आसमान’ चित्रपटा दरम्यान सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले होते. १९७१ च्या ‘कल आज और कल’ चित्रपटात अभिनय केलेल्या रणधीर कपूर यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात देखील पाऊल ठेवले. चित्रपटात कपूर कुटुंबातील पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर या तीन पिढ्यांनी अभिनय केला होता. याशिवाय बबीताने देखील महत्वाची भूमिका साकारली होती. सत्तर ऐंशीच्या दशकात त्यानी हिंदी चित्रपट जवानी दिवानी, हाथ कि सफाई, रामपूर का लक्ष्मण, ढोंगी, खलिफा, कच्चा चोर, कल आज और कल, पोंगा पंडित, कस्मे वादे, बिवी ओ बिवी, भंवर, हरजाई, हमराही, चाचा भातीजा,राम भरोसे,आज का महात्मा, लफंगे, खलिफा आखरी डाकू, पुकार असे चांगले व उत्तम चित्रपट दिले. किशोरकुमार व त्याचे चांगले जमत असे. किशोरकुमार यांनी गायलेली गुम है किसीके प्यारमे दिल सुबह शाम', 'जा ने जा धुंडता फिर रहा' व 'भवरे की गुंजन ए मेरा दिल' ही गाणी अजून लोकांच्या तोंडावर आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ मा.भालबा केळकर हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले
जॉन लॉय जे एक BBC प्रोड्युसर होते त्यांनी मि बीन यांचा एक शो बघितल्यांनंतर त्यांना टिव्ही शो मधे काम करायची ऑफर दिली, तेव्हा मि बीन यांचं वय फक्त २२ वर्ष होतं. त्या वेळी मिस्टर बीन यांना खुप विचार करावा लागला कारण एकीकडे त्यांचे मित्रांसोबचे स्वत:चे शो होते आणि दुसरीकडे आलेली ऑफर, शेवटी त्यांनी टिव्ही शो मधे काम करायचं ठरवलं आणि नॉट द नाईन ओ क्लॉक शो मधुन ते टिव्ही विश्वात उतरले.
विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाइंडर हे नाटक प्रचंड वादग्रस्त व वादळी ठरले. या नाटकाविरुद्ध दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लढा द्यावा लागला. नाटकाविरुद्ध खटला भरला गेला. हे नाटक म्हणजे ‘विवाह संस्था’ संकटात सापडण्याचे भय आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता. सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखानं प्रयोग सुरू झाले.
Copyright © 2025 | Marathisrushti