जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
महाराष्ट्रातील पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि संपूर्ण देशाला ज्याचा अभिमान वाटेल अशी घटना घडली आहे .कप्तान अमोल यादव यांची कथा एखाद्या कादंबरीतल्या कथानका प्रमाणे आहे.
ब्रिटिश कथाकार, कवी आणि कादंबरीकार व मोगली व जंगलबुकचे लेखक जोसेफ रडयार्ड किपलिंग यांचा जन्म ३० डिसेंबर १८६५ रोजी मुंबई येथे झाला. जोसेफ रडयार्ड किपलिंग हे रडयार्ड किपलिंग या नावानेच प्रसिद्ध होते. जोसेफ रडयार्ड किपलिंग हे पाच वर्षांचा झाल्यावर त्याला आई-वडिलांनी इंग्लंडला शिकण्यासाठी नेलं होतं. पुढे ते वयाच्या १८व्या वर्षी पुन्हा भारतात परतले आणि त्यांनी पत्रकारिता केली. भारतातलं ग्रामीण जीवन त्यांनी जवळून अनुभवलं होतं. कथेइतकंच त्या काळात त्याचं काव्यलेखनसुद्धा सुरू होतं आणि ‘गंगादीन’, ‘मंडाले’, ‘डॅनी डिव्हर’ या त्यांच्या ब्रिटिश राजवटीतल्या कविता चांगल्याच गाजल्या होत्या.
त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या कथाही गाजल्या होत्या. त्याची ‘दी जंगल बुक’, ‘दी सेकंड जंगल बुक’ आणि ‘किम’ ही पुस्तकं अफाट लोकप्रिय झाली. बच्चे कंपनीला प्रिय अशा मोगली आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या जंगलातल्या त्याच्या साथीदारांवर अनेक फिल्म्स, टीव्ही सीरिज बनल्या आणि लोकप्रिय झाल्या. त्यांना १९०७ सालचं साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं.
जस्ट सो स्टोरीज, रिकी टिक्की तावी, कॅप्टन्स करेजस, दी मॅन हू वुड बी किंग, प्लेन टेल्स फ्रॉम दी हिल्स, स्टॉकी अँड कंपनी, अंडर दी देवदार्स, तुमाई ऑफ दी एलिफंट्स अशी त्याची इतर अनेक पुस्तकं वाचकप्रिय आहेत. जोसेफ रडयार्ड किपलिंग यांचे १८ जानेवारी १९३६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झाल्यावर, महाराष्ट्र राज्याचे बावीसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची २८ ऑक्टोबर २०१४ या दिवशी पक्षातर्फे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.
उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते.
कोकणातील देवगड सारख्या निसर्गरम्य गावात व सध्या ठाण्यात वास्तव्यास असलेल्या चित्रकार किशोर नादावडेकर हे अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी आहेत. निसर्गचित्रे व व्यक्तीचित्रे यांची आवड असलेल्या श्री. किशोर नादावडेकर यांना चित्रकार वासुदेव कामत सर व विजय आचरेकर सर यांचे योग्य ते मार्गदर्शन मिळाले.
जगभरात ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजारांच्या यादीत कर्करोग महत्त्वाचा आजार म्हणून समोर येत आहे. भारतात, कुठल्याही घडीला २५ लाख कर्करोगपीडित रुग्ण आढळतात, त्यात दरवर्षी आठ-नऊ लाख नवीन रुग्णांचे निदान होते. एका अहवालानुसार बालकांमध्ये कर्करोगाच्या प्रमाणात दरवर्षी मोठी वाढ होत आहे. कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे १०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास अथवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्यांचेच नाव कर्करोगाला दिले जाते – उदा. आतड्यांमध्ये सुरू होणार्याप कर्करोगास आतड्याचा कर्करोग किंवा त्वचेखालील बेसल पेशींमध्ये उगमस्थान असलेल्या कर्करोगास बेसल सेल कार्सिनोमा म्हणतात इ.
ज्या आजारांमध्ये असामान्य पेशींचे अनियंत्रित विभाजन होऊन त्या इतर ऊतींवर हल्ला करु शकतात अशा सर्व आजारांसाठी कर्करोग हा शब्द वापरला जातो. कर्करोगाच्या पेशी रक्त तसेच लसिका प्रणालींमार्फत शरीराच्या इतर भागांमध्ये पसरु शकतात. एक काळा असा होता की, कॅन्सर अर्थात कर्करोग म्हणजे आयुष्य संपल्याची खूण समजली जायची; मात्र या जीवघेण्या आजारावर आणि त्याच्या उपचारासंबंधी कित्येक दशकांच्या संशोधनानंतर कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. वाजवी खर्चाचे विविध उपायांसोबतच इच्छाशक्ती वापरून यावर मात केलेल्या रुग्णांच्या यशोगाथेमुळे हे चित्र आता पालटत आहे.
कर्करोगावर मात करण्याचे उपाय
कर्करोग पूर्णत : टाळता येणे जरी शक्य नसले तरी त्यावर मात करण्याचा दुसरा उपाय म्हणजे त्याचे प्राथमिक अवस्थेत निदान करणे. वेळेत निदान झाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. कर्करोगाची सूचक लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा.
नियमितपणे शरीराची स्वतपासणी करा, स्त्रियांनी स्वत:चे स्तन तपासणी करणे गरजेचे.
नियमितपणे तज्ज्ञ डॉक्टरांकडून संपूर्ण शारीरिक तपासणी व काही प्रयोगशालीय तसेच रेडिओलॉजीकल चाचण्या करवून घेणे आवश्यक आहे. कर्करोगाच्या उपचारांकरिता खूप खर्च लागतो हा समज चुकीचा आहे. सध्याच्या उपचार पध्दतीत एक लाख रुपयांच्या आत 90 टक्के कर्करोगांवर पूर्ण उपचार करता येतो. फक्त योग्य अशा कर्करोग रुग्णालयात उपचारांना सुरुवात होणे गरजेचे असते. राजीव गांधी योजना आणि जीवनदायिनी योजना या शासकीय योजनांतूनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळतो.
कर्करोगाच्या उपचार पद्धती
किमोथेरपी किमोथेरपी ही तात्पुरत्या स्वरूपात त्रायदायक ठरते. या थेरपीनंतर केस गळतात, अशक्तपणा जाणवतो, रक्त कमी होते, मळमळते यांसारख्या तात्पुरत्या त्रासांना सामोरे जावे लागते.
टार्गेटेड थेरपी
यापूर्वी कोबाल्टच्या मशीनव्दारे रेडिएशन दिले जात; मात्र जगभरात या तंत्रज्ञानावर बंदी आली आहे, त्याऐवजी आता बायोटेक्नॉलॉजीच्या आधारावरील तंत्रज्ञानाने टार्गेटेड रेडिएशन थेरपी केली जाते. लिनियर अँक्सेलेटर आणि एक्सरे जनरेटेड याव्दारे ही थेरपी होते. यात कॅन्सर ट्यूमरच्या (गाठीच्या) आकार आणि खोलीनुसारच रेडिएशन दिले जाते, त्याचा परिणाम केवळ ट्यूमरवरच होतो.
कर्करोगापासून दूर राहण्यासाठी
समतोल आहार : आहारात सर्व डाळी, कडधान्ये, विशेषत: मोड आलेली कडधान्ये, सालीच्या डाळी यांचा समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या व सर्व प्रकारची फळे (सालीसह) तर कोशिंबीर (गाजर, मुळा, काकडी, बीट इत्यादी.) मुबलक खावीत. शरीराला तंतुमय पदार्थ व रोगप्रतिबंधक घटक मिळतात. जंक फूड, कृत्रिम अन्नपदार्थ, अतिशय तिखट आहार, अतिरिक्त मांसाहार, स्निग्ध पदार्थांचे अतिसेवन टाळा.
व्यसनांना ठेवा दूर
धूम्रपान व इतर कोणत्याही स्वरूपात तंबाखूचा वापर पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. अतिरिक्त प्रमाणात मद्यपानदेखील यकृत व पचनसंस्थेच्या कर्करोगाचा धोका वाढवते. तरुणांनी या व्यसनांची सुरुवातच न करणे केव्हाही हितकारकच ठरते.
नियमित व्यायाम करा
नियमित व्यायामाव्दारे वजन नियंत्रणात राखण्यास मदत होते. त्यायोगे स्तनांच्या, आतड्यांच्या कर्करोगाची जोखीम कमी होते. उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह या आजारांनाही नियंत्रणात ठेवता येते.
लसीकरण
हिपॅटायटीस बी या विषाणूविरुध्दची लस यकृताच्या कर्करोगापासून बचाव करते. या लसीचे तीन प्राथमिक डोस घेणे गरजेचे आहे. स्त्रियांमधील गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एच.पी.व्ही. (ह्युमन पॉपीलोमा व्हायरस) या विषाणूविरुध्दची लस उपयुक्त आहे. 9 ते 26 वयोगटातील मुलींनी ही लस घेणे आवश्यक आहे. केवळ 2500 रुपयांत ही लस स्त्रीरोगतज्ज्ञांसह कर्करोग हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध असते.
डॉ. नगरकर
संकलनसंजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बारभाईच राज्यकारभार पहात होते. श्रीमंत सवाई माधवराव नाममात्र पेशवे होते. बाळाजी विश्वनाथ, बाजीराव बल्लाळ, चिमाजीअप्पा, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब, सदाशिवराव भाऊसाहेब, विश्वासराव, माधवराव यांच्यामुळेच पेशवे या तीन अक्षरांचाच भारतात दरारा निर्माण झाला होता. दिल्लीच्या लाल किल्यावर भगवे निशाण डौलदारपणे, दिमाखात फडकायला लागले. सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत महादजी शिंदे यांनी दिल्लीची पातशाही कबजात घेतली. दरमहा ६५००० रूपये तनखा ठरवून दिल्लीच्या बादशहाकडून वकील ई मुतालिक आणि मिरबक्षी अशा स्वतंत्र दोन सनदा सन १७८४ साली मिळवल्या. दिल्लीचे संस्थान झाले.
एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्या लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जातात. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ सालचा. पूर्वाश्रमीच्या त्या सरकार घराण्यातील. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध आहेत.
डॉ. सुरेंद्र शिवराम बारलिंगे हे महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष होते. १३ मराठी, सहा हिंदी व आठ इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली.
मिलिंद तुळाणकर हे सुमारे ३५ हून अधिक वर्षं जलतरंग वाजवत आहेत. जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात.
Copyright © 2025 | Marathisrushti