(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • लेखक, निर्माते आणि वितरक शरद पिळगावकर

    शरद पिळगावकर यांचे गाव 'पिळगाव'. शरद पिळगावकर मुंबईत छोटामोठा ऑर्केस्ट्रा चालवायचे. यात ते स्वतःही गायचे आणि सचिनची आईदेखील. सचिन यांच्या जन्मानंतर पिळगावकरांचं संगीत क्षेत्रातील बस्तान चांगलंच बसत आलं होतं. चित्रपटसृष्टीमध्ये शरद पिळगावकरांची ब-यापैकी ओळख होवू लागली. कलागुणांना उत्तेजन देणारे आणि कलेचे व्यासंगी असलेल्या पिळगावकरांनी आपल्या मुलातील असलेली चुणुक ओळखली नसती तरच नवल. राजा परांजपे या आपल्या मित्राला त्यांनी सचिनबद्दल सहज म्हणुन सांगुन पाहिलं.

    'हा माझा मार्ग एकला' ची तयारी तेव्हा सुरू होती. साडेचार वर्षाच्या सचिनला यात महत्त्वाची बालकलाकाराची भुमिका मिळाली, आणि या भुमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही. शरद पिळगावकरांनी जेव्हा मराठीत चित्रपट करायचे ठरवले तेव्हा गाणी एन. दत्ताच करतील, असा निश्चय केला होता. त्याप्रमाणे पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त यांनी कथा ऐकवताच त्याला तात्काळ होकार दिला आणि अपराध हा माईल स्टोन चित्रपट निर्माण झाला,'अपराध मीच केला' हे नाटक शरद पिळगावकर यांनी मधुसुधन कालेलकरांना सुचविले होते, ज्याचा विषय होता 'कमांडर नानावटी खटला'.

    सव्वा शेर, चोरावर मोर जागृती, अपराध व अष्टविनायक हे त्यांचे गाजलेले चित्रपट. त्यातील अष्टविनायक हा तर लोकांना आवडलेला सर्वात चित्रपट. सांगली जिल्ह्यातल्या एका गणेश भक्त असलेल्या उद्योगपतीच्या जीवनात १९७५ साली घडलेल्या घटनेवर हा चित्रपट आधारित असल्याच चित्रपटाच्या सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे. शरद पिळगावकर यांचे चिरंजीव सचिन पिळगावकर हे आज सुद्धा मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. शरद पिळगावकर यांचे १७ जून १९८३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • चतुरस्त्र तरुण – पराग सावंत

    आवड असली की सवड मिळते असं म्हणतात; मात्र आवड असली की शिक्षणही मिळतं हे आता पराग सावंतकडे पाहिल्यावर कळतं. बीएससी झाल्यावर इंटरनेटलाच आपला गुरू मानून नृत्य, फोटोग्राफी, व्हीडिओग्राफी, एडिटिंग यांचं शिक्षण घेतलं.

    आवड म्हणून बाबांनी त्याला कॅमेरा आणून दिला. त्यावेळेस तो एका एशियन हार्ट कार्डिकमध्ये कंपनीत नुकताच कामाला लागलेला. बीएससी झाल्यावर नोकरी मिळाल्याचा आनंद त्याला होताच; मात्र मनात कुठेतरी रुखरुख सुरू होती.

    कॅमेरा हातात आल्यावर इतर नवख्या फोटोग्राफर्ससारखं तोही मिळेल ते कॅप्चर करत जायचा. अर्थात ते सारं काही नवीन होतं. ऑटोमॅटिक मोडवर कॅमेरा ठेवून तो फोटो काढायचा. कधी कधी अगदी उत्कृष्ट फोटो यायचे. मित्रांची वाहवा मिळायची. त्यातून अधिक प्रेरणा मिळत गेली. त्यातून ओळखी वाढत गेल्या.

    तेव्हा एका फोटोग्राफर मित्राने एक लाख मोलाचा संदेश दिला, खरा फोटोग्राफर असशील तर कॅमेरा ऑटोमॅटिक मोडवरून काढ आणि मॅन्युअली फोटो काढायला सुरुवात कर. तेव्हापासून त्याने मॅन्युअली फोटो काढायला सुरुवात केली आणि तेव्हापासून फोटोग्राफीमधले अनेक बारकावे तो शिकला. फोटोग्राफीमधलं शास्त्रशुद्ध शिक्षण त्यानं घेतलं नव्हतं; मात्र आवड म्हणूनच तो या क्षेत्रात वळला. खरं पाहायला गेलं तर तो एक उत्तम डान्सर आहे.

    महाविद्यालयीन काळात अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत. तेव्हा त्याचा नृत्याचा क्लासही होता. डान्स शिकवता शिकवता तो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डान्स स्वत:ही यू-टय़ूबवर शिकत असे. कालांतराने त्याने क्लास बंद केला आणि एका एशियन हार्ट कार्डिक कंपनीत कामाला लागला. त्यानंतर तो फोटोग्राफीकडे वळला. त्याचं शिक्षण बीएससीचं, डान्सचं कौशल्य आणि फोटोग्राफीची आवड अशा त्रिकोणात तो जगतो.

    डान्स असो वा फोटोग्राफी, सारं काही तो अनुभव आणि इंटरनेट या दोन माध्यमांतून शिकला. कोणत्याही प्रकारचा क्लास नाही, की कोणाकडे मार्गदर्शन नाही. चालता बोलता स्वत:च्या निरीक्षणाने शिकेल तेवढंच त्याचं शिक्षण. मात्र आज त्याचे यू-टय़ूब आणि फेसबुकवर हजारो फॉलोअर्स आहेत.

    फोटोग्राफीची आवड जोपासता जोपासता त्याला व्हीडिओ तयार करण्याचंही वेड लागलं. तयार केलेल्या फोटोंचे सुंदर व्हीडिओ तो बनवू लागला. फोटोंना अधिकपणे खुलवू लागला. त्याचंही शिक्षण त्यानं इंटरनेटवरच घेतलं. सकाळी फोटोग्राफी झाली की, रात्री कामाला जायचा. मात्र नंतर नंतर त्याला फोटोग्राफीतच पूर्ण वेळ झोकून घ्यावं असं वाटलं. आयुष्यात रिस्क घ्यावी का, असा प्रश्न पडला.

    शेवटी त्याने ती रिस्क घेतली. आपल्या जॉबला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ व्हीडिओग्राफी, फोटोग्राफीकडे वळला. डॉक्युमेंटरी, शॉर्टफिल्म तयार करू लागला. ओळखींच्याच्या लग्नात जाऊन तिथे व्हीडिओग्राफी केली. त्या व्हीडिओ एडिट करून त्याला योग्य दिग्दर्शन केलं. या लग्नाच्या व्हीडिओ तो यू-टय़ूबवर टाकतो. जवळपास लाखो व्ह्यूवर्स या व्हीडिओजना आहे.

    फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर या व्हीडिओ प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियामुळे मला प्रचंड प्रसिद्धी मिळाली असं तो अभिमानाने म्हणतो. त्याचसोबत या काळात योग्य मित्रांची संगत लाभली. कोणी सृजनशील तर कोणी कॅलिग्राफी करण्यात हुशार. यामुळे त्याला नेहमीच प्रोत्साहन मिळत गेलं.

    बाप्पाविषयी त्याचं एक वेगळं आकर्षण आहे. गेल्या तीन वर्षात गणेशोत्सवादरम्यान त्याने खूप व्हीडिओ आणि फोटो काढलेत. मुंबईत गाजणाऱ्या प्रत्येक सणांवर त्याची एक तरी व्हीडिओ यू-टय़ूबवर आहेच. या काळात त्याने अनेक स्पर्धामध्ये सहभाग घेतला. त्यात त्याला अनेक पारितोषिकेही मिळाली आहेत. चिंचपोकळीचा चिंतामणीने गेल्यावर्षी स्पर्धा भरवली होती. त्यातही त्याने पहिला क्रमांक मिळवला.

    अनेक ऑनलाईन स्पर्धामध्येही तो पहिला राहिला आहे. २६/११ला झालेल्या हल्ल्याबाबत केलेल्या शॉर्टफिल्मलाही पारितोषिक मिळालं. कोणतंही शिक्षण नसताना, मार्गदर्शक नसताना केवळ स्वत:च्या आवडीच्या जोरावर आणि इंटरनेटच्या साहाय्याने त्याने एवढं यश मिळवलं आहे. पुढे याच क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा बाळगून असलेला पराग म्हणतो की, आता मला प्रोफेशनली सिनेमॅटोग्राफीकडे वळायचं आहे. स्वत:चा चित्रपट तयार करायचा आहे.

    -- स्नेहा कोलते

  • राज वसंत शिंगे

    सर जे.जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट तसेच सर जे.जे स्कुल ऑफ आर्ट मधून राज शिंगे यांनी जी.डी.आर्ट व जी.डी. आर्ट मेटल या पदव्या प्राप्त केल्या. कलानिर्मितीचा ध्यास घेतलेल्या राज शिंगे यांनी आपल्या कलाप्रवासाला १९८५ सालापासून सुरुवात केली.

  • सुप्रसिद्ध नाटककार, लेखक विजय तेंडुलकर

    तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्‍न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते.

  • प्रा. द. के. बर्वे

    १९५० साली ‘आंबटषौक’ हा त्यांचा प्रौढ वाचकांसाठी पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला, पण त्यानंतर ते प्रामुख्याने वळले बालकुमार साहित्याकडे. बालवाङ्मयाची जवळजवळ सत्तर उत्तमोत्तम पुस्तके लिहून त्यांनी बालसाहित्यकार म्हणून चांगले नाव मिळवले आणि बालसाहित्यात मोलाची भर घातली.

  • कथालेखक श्रीकृष्ण दामोदर पानवलकर

    १९६० नंतरच्या काळात, आपल्या मोजक्या पण प्रभावी लेखनाने ज्या मराठी कथालेखकांनी कथालेखनाकडे लक्ष वेधून घेतले त्यात श्रीकृष्ण दामोदर पानवलकर यांची प्रामुख्याने गणना होते.

  • चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी’ बाबूराव पेंटर

    बाबूराव पेंटर यांचे मूळ नाव बाबुराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यांचा जन्म ३ जून १८९० रोजी झाला. १९३० च्या सुमारास त्यांनी तयार केलेली सिनेमाची पोस्टर्स पाहून जे. जे. स्कूलचे तत्कालीन संचालक सालोमन यांनी त्यांचा सत्कार केला. जे. जे. स्कूलमध्ये काहीही शिक्षण घेतलेले नसतानादेखील रंगांच्या शुद्धतेविषयी व मिश्रणाविषयी बरीच माहिती त्यांना होती. चित्रकलेतील त्यांचे तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन ते थोडेदेखील ढासळू देत नसत. त्यातूनच ते एक कल्पनारम्य, उत्कृष्ट अशी प्रतिमा निर्माण करत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या शिल्पकृती आजही कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात. मा.बाबूराव पेंटर यांना कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ‘कलामहर्षी’ या पदवीने गौरवण्यात आले होते. मा.बाबूराव पेंटर यांनी १ डिसेंबर १९१८ साली त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. स्त्री पात्रे असलेला पहिलाच चित्रपट त्यांनी निर्माण केला तो म्हणजे सैरंध्री. पुण्यातील आर्यन थिएटरमधे तो ७ फेब्रुवारी, १९२० रोजी दाखविला गेला. यातील भीम व कीचक यांच्या द्वंद्वयुद्धाचे दृश्य पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले होते, इतके ते दृश्य-कोणतेही ट्रिक सीन्स नसतांनाही-जिवंत चित्रित झाले होते. यावरूनच ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू केली, जी आजही सुरू आहे. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून बाबुराव पेंटर यांनी फ्लॅशबॅक पद्धत प्रथमच वापरून १९२५ साली ‘सावकारी पाश’ हा सामाजिक मूकपट तयार केला. परदेशात चित्रपट प्रदर्शनात पाठविलेला हा भारतातील पहिला चित्रपट ठरला. चित्रपटाचे तंत्र, मंत्र व मर्म जाणणारे बाबुराव पेंटर हे एकमेवाद्वितीय दिग्दर्शक होते. त्यांच्या कंपनीमधून मद्रासचे एच. एम. रेड्डी, नागी रेड्डी, व महाराष्ट्रातील व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल, धायबर, बाबुराव पेंढारकर, मा. विनायक, नानासाहेब सरपोतदार यांसारखे कलाकार तयार झाले. मूकपटांतून रुबी मायर्स, मा. विठ्ठल, पृथ्वीराज कपूर, झेबुन्निसा, ललिता पवार असे कलावंत तयार झाले. कल्पकता, कलात्मकता, वास्तववाद आणि सामाजिक प्रबोधन ही गुणवैशिष्ट्ये बाबुरावांसारख्या श्रेष्ठ गुरूने भारतीय चित्रपटसृष्टीला दिली. त्यांनी १९२० ते १९२८ या कालावधीत १७ मूकपट निर्माण केले होते. मा.बाबूराव पेंटर यांचे १६ जानेवारी १९५४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- ग्लोबल मराठी

  • वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’

    संगीत संशोधक आणि अभ्यासक विश्वास नेरुरकर यांनी संगीतकार वसंत देसाई यांची संपूर्ण कारकीर्द रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. ग्रंथाचं नाव आहे, ‘वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’.

    केवळ हिंदी चित्रपटसृष्टीचा विचार केला तर वसंत देसाई हे कधीच व्यावसायिकदृष्टय़ा आघाडीचे संगीतकार नव्हते. परंतु वसंतरावांच्या सांगितिक आयुष्याचा, हिंदी चित्रपट हा केवळ एक पैलू आहे. मराठी चित्रपट संगीत, नाटय़संगीत गैरफिल्मी संगीत असा त्यांच्या प्रतिभेचा व्याप मोठा आहे. अशा प्रत्येक क्षेत्रातील कामगिरीची विस्तृत माहिती मिळवून, त्याची वर्गवारी करून ते या ग्रंथात अतिशय आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले आहे. छायाचित्रांची नुसतीच संख्यात्मक रेलचेल नाही, तर ती चित्रे आणि त्यातील व्यक्ती पाहता पाहता अनेक दुर्मिळ क्षण जे कुठे कुठे विखुरले होते ते एकत्रितरीत्या गवसल्याचा आनंद मिळतो. ‘मराठी संस्कृती’चे जतन करण्यासाठी अलीकडे अनेकांचे हात शिवशिवत असतात, त्या सर्वाना असे ग्रंथ पाहिल्यावर ‘संस्कृती जतना’चा खरा अविष्कार म्हणजे काय, ते खरे तर लक्षात यायला हवे!

    कलावंताला, त्याच्या चाहत्यांना, कलावंताच्या वारसांना त्या कलावंताच्या कामगिरीचे चीज झाले अशी भावना हा देखणा ग्रंथ पाहताना होते. वसंतरावांच्या कर्तृत्वाचा विभागवार आढावा घेणाऱ्या या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यांच्या एकूण कारकीर्दीची ओळख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, सुहृदांनी सांगितलेल्या आठवणी आहेत. त्यात पुस्तकाचे संकलक, संपादक विश्वास नेरूरकर यांनी ‘टेल ऑफ द मिस्टिक मिन्स्ट्रल’ या १५ पानी प्रदीर्घ लेखात वसंत देसाई यांच्या संपूर्ण प्रवासाची ओळख करून दिली आहे. त्यात वसंतरावांच्या सुरुवातीच्या अभिनय प्रवासाची व संगीत कारकिर्दीची माहिती आहे. लेखक, गीतकार गुलजार यांनी ‘गुड्डी’, ‘आशीर्वाद’ या चित्रपटांच्या वेळी आलेले आपले अनुभव अतिशय मोजक्या परंतु भावपूर्ण शब्दात व्यक्त केलेले आहेत. ‘गुड्डी’साठी वसंतरावांनी संगीतबद्ध केलेली ‘हमको मन की शक्ती देना’ ही प्रार्थना ए. आर. रहमानलासुद्धा स्तिमित करते, हे गुलजार यांनी आवर्जून नमूद केले आहे. वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये ‘सोयरी’ झालेल्या वाणी जयराम हिने अत्यंत आत्मियतेने वसंतरावांवर लेख लिहिला आहे. ‘आय वॉज लाईक ब्लॉटिंग पेपर, अॅाब्सर्बिग एव्हरीथिंग ही टॉट मी’ असे ती म्हणते तेव्हा वसंतरावांचे तिच्या कारकिर्दीतील स्थान अधोरेखित होते. विकास देसाई, वैजयंतीमाला, भालचंद्र पेंढारकर, सुलोचना चव्हाण, इनॉक डॅनिअल्स, डॉ. मंदार बिच्छू, जगदीश खेबुडकर, फैयाज, हेमंत पंडित, बाळ देशपांडे यांच्या लेखांमधून वसंतराव एक संगीतकार आणि एक व्यक्ती म्हणून म्हणून उलगडत जातात. चित्रपट संगीताचे आस्वादक-अभ्यासक राजू भारतन यांनी त्यांच्या ‘ही टय़ून्ड विथ गॉड’ या लेखात वसंतरावांच्या दैवी प्रतिभेचे मर्म उलगडून दाखविले आहे. गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे..’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे.

    विश्लेषण, माहिती आणि आठवणींनी भरलेली ही सव्वाशे पाने संपली की मग सुरू होतो लेखा-जोखा! त्यात पहिल्या भागात हिंदी चित्रपट भेटतात. १९४२ साली ‘शोभा’ या चित्रपटापासून सुरू झालेला संगीतकार म्हणून प्रवास १९७६ साली ‘शक’ या चित्रपटाशी थांबला तो वसंतरावांच्या अकाली अपघाती मृत्युमुळे. या दरम्यान त्यांनी संगीतबद्ध केलेले ५२ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले तर ‘अमर समाधी’ आणि ‘कामदेव’ अप्रदर्शित राहिले. या चित्रपटांमधील कलावंत, गाणी, गायक असा सर्व तपशील यात आहे. याच पद्धतीने पुढील भागांमध्ये २१ मराठी चित्रपट (सात अप्रदर्शित मराठी चित्रपट), गुजराती, बंगाली चित्रपट, १४ संगीत नाटके, माहितीपट, गैरफिल्मी गीते, नृत्यनाटके यांची १९ तपशीलांसह नोंद आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची व्यवस्थित दखलही घेण्यात आली आहे.

    पुस्तकातील लेख आणि फोटोखालील ओळी इंग्रजीत तरी इतर सर्व तपशील आणि माहिती हिंदी/मराठी व इंग्रजीत देण्यात आली आहे. पुस्तकात सर्वत्र वसंतरावांचे विविध मूडस् टिपणारी आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व ठसठशीतपणे दाखविणारी छायाचित्रे आहेत. सहकाऱ्यांसमवेत गाण्यांची चर्चा करणाऱ्या भावमुद्रा आहेत. मासिकाच्या आकारातील पुठ्ठा बांधणीचे सुंदर मुखपृष्ठ, उत्तम दीर्घ-जीवी कागद आणि अप्रतिम छपाई यामुळे हे पुस्तक म्हणजे वसंतरावांच्या प्रतिभेला खरा सलाम ठरते. ‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे संगीत यात बंदिस्त आहे. अशा प्रतिभावंतांचे संगीत या मातीत जन्मते, हेच ‘ऋणानुबंधांच्या सुरेल गाठी’सारखे असते, याचा प्रत्यय देणारे हे पुस्तक आहे! ‘वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’, संशोधन, संकलन, संपादन- विश्वास नेरूरकर, बिश्वनाथ चॅटर्जी, गायत्री पब्लिकेशन व स्वरयोग, पृष्ठे- ४०८, किंमत- ८०० रुपये!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.श्री.श्रीकांत बोजेवार

    वसंत देसाई यांनी संगीत दिलेली काही गाणी
    एक था बचपन
    रम्य ही स्वर्गाहून लंका
    हमको मनकी शक्ती देना
    उठी उठी गोपाला
    बोल रे पपी
    ऋणानुबंधाच्या जिथुन
    ए मलिक तेरे बंदे हम

  • ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल

    श्याम बेनेगल यांनी चित्रपट सृष्टीत भरीव योगदान दिले आहे. आजही अशाप्रकारचे योगदान देण्यामध्ये सक्रिय आहेत. त्यांनीच स्मिता पाटील यांची ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ आणि ‘मंडी’ चित्रपटासाठी निवड केली होती.

  • अभिनेत्री व कवीयीत्री स्पृहा जोशी

    आज १३ ऑक्टोबर
    आज लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत 'वैनुडी वैनुडी' करत कुहूची भूमिका करणारी अभिनेत्री व कवीयीत्री स्पृहा जोशीचा वाढदिवस.

    जन्म १३ ऑक्टोबर १९८९

    बालमोहन विद्या मंदिरमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. शाळेत असताना तिला सर्जनशील लिखाणासाठीचा ‘बालश्री २००३’ पुरस्कारही मिळाला होता. अनेक एकांकिकांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारल्या आणि अनेक पारितोषिकेदेखील पटकावली. प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या ‘चिरायू’ या लघुपटातही स्पृहाने काम केले होते. स्पृहा पहिल्यांदा टीव्हीच्या पडद्यावर आली ती ‘दे धमाल’ या मालिकेमुळे. तेव्हा ती शाळेत असली तरी तिने साकारलेली हुशार मुलगी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. तिने लिहलेल्या ‘चांदणचुरा’ या काव्यसंग्रहासाठी तिला कवी ‘कुसुमाग्रज’ हा पुरस्कार मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच ‘लोपामुद्रा’ हा तिचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणारी स्पृहा झी मराठी वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’, ‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ व ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ इत्यादी मालिकांमध्ये चमकली. उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडेंची तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे. याव्यतिरीक्त तिने ‘मोरया’, ‘मायबाप’, 'बायोस्कोप' आणि 'पेईंग घोस्ट' या चित्रपटांमध्येही काम केले आहे. भक्ती बर्वे, स्मिता पाटील, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, रसिका जोशी, मुक्ता बर्वे यांच्यासारखं काम आपल्यालाही करता यावं अशी स्पृहाची इच्छा आहे. आपल्या समूहातर्फे स्पृहा जोशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भः लोकसत्ता