जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
बीड येथे गुरूलिंग सोनवणे नामक सेवानिवृत्त चित्रकला शिक्षक आहेत. ते शिरूरकासार (बीड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत होते. दरवर्षी नियमितपणे शासनाच्या चित्रकला परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ट करत असत.
मी आठवीत असताना चित्रकलेची आवड लक्षात घेऊन सरांनी मला परीक्षेस बसवले. बीड येथील मल्टिपर्पज शाळेत या परीक्षा होत. राहण्याची सोय तर नाही. मग सरांच्या बीड येथील घराशिवाय पर्याय नव्हता. तीन-चार दिवस वीस-पंचवीस मुले त्यांच्या घरी मोफत राहण्यासाठी असत. त्यांच्या अर्धांगिनी आनंदाने मुलांना जेवू घालत. अशावेळी गरीब विद्यार्थ्यांचा खर्च सर स्वत: करत असत. मुले परीक्षा देत. घरी जात. रंग, डीश, ब्रश, कागद हा कमी पडला की सोनवणे सर ते मोफत पुरवत असत. मुलांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी सतत धडपडत असत.
त्यांची दोन्ही मुले वैद्यकीय क्षेत्रात आहेत. त्यांचा चित्रसंग्रह अप्रतिम आहे. आमच्यासह अनेक मुले त्यांच्यामुळे संस्कारशील झाली. आमचे हस्ताक्षर आणि चित्र यावर त्यांचीच छाया आहे. आमच्या वडिलांशी ते सातत्याने संपर्क करत. आदरभाव जोपासत. मुलांची प्रगती आणि अडचणी याविषयी बोलत.
असे गुरू भेटणे प्रत्येकाचे भाग्यच असते. विद्यार्थीदशेत असताना त्यांचे महत्त्व कळाले नाही; पण आज नतमस्तक होतोय.
आज सरांचे सर्व विद्यार्थी नावारूपास आले आहेत. विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. उतारवयात त्यांना चांगले आरोग्य लाभो ही सदिच्छा! त्यांचे आमच्या आयुष्यात येणे कलाटणी देणारेच आहे!
विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
आज नागपंचमी....
महाराष्ट्रभूषण श्री.बाबासाहेब पुरंदरेंचा तिथीने जन्म दिवस....
बाबासाहेब...तुम्हांस देवी तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो...तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत....
बाबासाहेब
"छत्रपती शिवाजी महाराज किती वाजता बसले हो बाबासाहेब सिंहासनावर राज्याभिशेकाच्या दिवशी ?
नाहीतरी आपण शिवाजी महाराजांचे नाव या आपल्या प्रदर्शनाच्या माध्यमाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवत आहोत तर महाराज सिंहासनावर विराजमान झाले, ठीक त्यावेळीच आपण आपल्या या 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' प्रदर्शनाचे उद्घाटन करूया.
कशी आहे कल्पना बाबासाहेब.?"
"छानच आहे कल्पना मिलिंदराव....
पहाटे ५ वाजता महाराज सिंहासनाधिष्ठीत झाले. म्हणजे बाकी सगळे विधी आधीपासूनच सुरु झाले होते पण प्रत्यक्ष सिंहासनावर महाराज पहाटे ठीक ५ वाजता बसले.....
आणि राज्याभिषेक झाला." बाबासाहेब उत्तरले.
पहाटे ५ वाजता म्हटल्यावर अंग शहारलं माझ...
माझ गिनीज बुक साठीच छायाचित्र प्रदर्शन आणि महाराजांचं नाव पहिल्यांदाच गिनीज बुक मध्ये कोरल जाण्याचा सुवर्णक्षण....
पण पहाटे ५ वाजता उद्घाटन...?
कसं होणार ?
कोण येणार ?
पण लगेच विचार केला, नाहीतरी आपण प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचाच निवडला आहे ना....
मग...
जे काही असेल ते असेल महाराज ५ वाजता बसले ना सिंहासनावर, आपण ही आपल्या प्रदर्शनाच उद्घाटन पहाटे ५ वाजताच करायचं बाबासाहेबांच्या आशीर्वादाने.
"मस्त कल्पना आहे न बाबासाहेब?
तुम्हाला जमेल का पहाटे ५ वाजता यायला ?
राजसाहेबांना मी विनंती करतो.
ते नक्की येतील."
मी दबकत दबकत विचारलं.
विलक्षण चपळाईने बाबासाहेब उद्गरले,"नक्कीच...मी येतो ४.४५ वाजता ठीक. राजसाहेबांना फोन लावता का? बोलून घेऊ त्यांच्याशी लगेचच."
मी श्री. राज ठाकरेंना फोन लावला त्यांच्या सेलफोनवर...
श्री. राज ठाकरे सुद्धा क्षणाचाही विलंब न लावता तयार झाले...
२८ जून २००७....
पहाटे घड्याळात ठीक ४.४४ वाजले आणि बाबासाहेब पोचले गणेश कला क्रीडा केंद्रात....
त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे...घड्याळाच्या ठोक्यावर...
एका अदभूत ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी.........
तुडुंब ओसंडून वहात होत गणेश कला क्रीडा केंद्र तेव्हा पहाटे ५ वाजता सुद्धा...
मुंगीलाही शिरायला जागा नव्हती शब्दशः...
शेकडो जण बाहेर उभे राहिले होते...
किमान ४ वाहिन्यांच्या ओबी vans आल्या होत्या हा सोहळा जगाला लाइव्ह दाखवण्यासाठी...
बाबासाहेब आणि माझा परिचय होता आधीपासूनच पण २००० साली निनादराव बेडेकर यांच्या सोबत रायगडावर गेलो होतो तेव्हा बाबासाहेब खूप जवळून पहिले...
अनुभवले...
ऐकले...
आणि नंतर आम्ही एकत्र काम करत असलेल्या प्रोजेक्टमुळे बाबासाहेबांसोबत असंख्य अगणित वेळा भेट झाली...असंख्य वेळा , अनेक प्रसंगी मनमोकळ्या गप्पा झाल्या...
काही माणसांना तुम्ही ऐकता,
काही माणसांना पाहता...
पण काही थोर माणसे ऐकण्या-पाहण्या पलीकडे महान असतात...
अश्या विभूतींना पंचप्राण एकवटून अनुभवावे लागते...
त्यांच्या आपल्या पाठीवर पडलेल्या आशीर्वचनाच्या थापेने मोहरून जायचे असते...
थरारून उठायचे असते....
प्रेरित व्हायचे असते....
आणि त्या विभूतींच्या आशीर्वादाने कामाला लागायचे असते...
श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे अशीच एक थोर विभूती आहे..........
विलक्षण सामर्थ्यवान आणि दैवी व्यक्तिमत्व आहे...
आज नागपंचमी....
महाराष्ट्रभूषण श्री.बाबासाहेबांचा तिथीने जन्म दिवस....
बाबासाहेब...तुम्हांस देवी तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो...तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत....
आणि त्या आदिशक्ती तुळजा भवानी चरणी एकच प्रार्थना...
बाबासाहेबांचा तो खणखणीत पहाडी धारदार आवाज शिवचरित्र सांगण्यासाठी पुन्हा एकदा तसाच्या सप्त-सप्तकांत तसाच तेजस्वी लागू दे...
बाबासाहेबांचे ते तेज:पुंज शब्दभांडार कानावर आदळणारा तो हजारोंचा जनसमुदाय हल्लकल्लोळ करत तसाच थरारून उठू दे...
आमच्या डोळ्यांतून यथार्थतेच्या अथांग अथक घळाघळा अश्रुंचे पाट वाहू दे....
आमच्या थिजलेल्या, मरगळलेल्या, विस्कळीतलेल्या मनांना महाराजांच्या चिरंतन प्रेरणेचे अदभूत अंकुर फुलू दे....
आमचे कानच नव्हे तर अंग-प्रत्यंग पुन्हा एकदा चेतून पेटू दे...
हे तुळजा भवानी आदिशक्ती माते.......
हा एक आशीर्वाद आज तू या उभ्या महाराष्ट्राला देच...देच...देच.....
-- मिलिंद वेर्लेकर
प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक अशी ख्याती असलेल्या विनायक भावे यांचा जन्म ६ नोव्हेंबर १८७१ साली कोंकणातील पळस्पे या गावी झाला होता. त्यांचे बालपण व शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या जनार्दन बाळाजी मोडक या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली. विनायक भावे यांनी विल्सन विद्यापीठातून बी. एस्सी ची पदवी संपादन केली. त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली आणि त्यांतूनच विनायक लक्ष्मण भावे यांनी ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली.
विनायक भावे यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपले सारे आयुष्य महाराष्ट्र कवी नावाच्या मासिकासाठी अर्पण केले. या मासिकाने सलग चार वर्षे रसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजविताना अनेक ग्रामीण व होतकरू कविंच्या व लेखकांच्या, उजेडात न आलेल्या कवितांना व इतर कलाकृतींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. या मासिकाने अनेक मराठी काव्ये, बखरी, व इंग्रजी अमदानीच्या पुर्वी होऊन गेलेल्या कवींच्या कवीतांना पुन्हा उजाळा देऊन या सांस्कृतिक ठेव्याचे संवर्धन करण्याची धडक मोहिम राबवली होती. हे एकीकडे सुरु असताना, दुसरीकडे त्यांचे वाचून झालेल्या ग्रंथसंपदेचे विवेचनात्मक व रसभरित विश्लेषण करणेही चालूच होते. त्यांनी इतिहास संशोधनाची नवी व प्रगल्भ दालने इतरांसमोर उघडली होती.
साहित्य व इतिहासाव्यतिरीक्त निसर्गातील प्राणी, पक्षी, किटक यांवर अतिशय उपयुक्त टिपणवजा माहिती त्यांनी संग्रहित करून ठेवलेली आहे. विनायक भावे यांनी आजवर अनेक जुने अप्रकाशित लेखक व कवींच्या, काव्य-लेखनसंपत्तीचे आभ्यासपुर्ण मंथन केले. आध्यात्मिक व वृत्तालंकारादी व्याकरणाच्या जंजाळात फसलेल्या कवितांपेक्षा, त्यांनी मुक्तेश्वरांच्या व शाहिरांच्या कवितांचे, रसग्रहण करण्यात अधिक धन्यता मानली. कारण या कवितांमध्ये भक्तीरसापेक्षा, त्या कवितेच्या आशयाला व भावनेला अधिक आपलेसे केले गेले होते. “महाराष्ट्र सारस्वत“ ही तर त्यांच्या काव्यप्रेमाने गाठलेली उत्कटतेची परिसीमा मानली जाते. ह्या कधीही विसरता न येणार्या दर्जेदार साहित्य विवेचकी वृत्तीने रसिकांसमोर उलगडुन दाखविले होते.
महाराष्ट्र सारस्वतची पहिली आवृत्ती ग्रंथमाला नावाच्या मासिकामध्ये प्रसिध्द झाली होती. त्यानंतर ह्या ग्रंथाच्या पाच आवृत्त्या निघाल्या. ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती म्हणजे केवळ ९८ पृष्ठांचा एक निबंध होता. भावे यांनी पुढे त्यात सतत भर घातली. त्यामुळे हा ग्रंथ तिसर्या आवृत्तीपर्यंत ७४४ पृष्ठांपर्यंत वाढला. “ग्रंथमाला“त पेशवाई अखेरपर्यंतचा मराठी वाङ्मयाचा इतिहास त्रोटकपणे सांगितला आहे “चक्रवर्ती नेपोलियन“ हा देखील त्यांच्यामधील प्रतिभावंत व बोलक्या लेखकाचा, एक विनम्र प्रयत्न होता. भावे हे कोणताही ऐतिहासिक प्रसंग आपल्या सिध्दहस्त लेखणीच्या बळावर जिवंत करण्यात तज्ञ होते, याचा प्रत्यय हा ग्रंथ वाचताना वारंवार येतो.
१२ सप्टेंबर १९२६ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.
सुहासिनी मुळगावकर यांनी आपले संगीताचे शिक्षण किशोरी आमोणकर यांच्या कडून घेतले. सुहासिनी मुळगावकर यांनी सौभद्र व मानापमान या जुन्या लोकप्रिय संगीत नाटकांतील भिन्न पात्रांचे संवाद एकटीनेच म्हणून दाखविण्याची नवीनच प्रथा सुरू केली व याचे त्यांनी ५०० हून अधिक प्रयोग केले होते.
भास्कर काशीनाथ चांदूरकर हे “काव्यशेखर” या टोपण नावाने कविता लिहित असत.
देवरूख येथील अक्षय पाटील याने बनवलेल्या ‘अजाण’या लघुपटाला कुणालने आपल्या मित्रांच्या सोबत संगीत दिले आहे. हा लघुपट नाशिक येथील फेस्टिव्हल मध्ये दाखवला गेला होता.
चंद्रकांत गिरी हे शिक्षण क्षेत्रात झळकलेले, मराठी तरूणाचे नाव असून ते सध्या सी. एस. कॉर्डिनेटर या पदावर काम करीत आहेत. इंग्रजी संभाषण कौशल्यावर प्रभुत्व कसं मिळवायच याचं साध्या व रोचक भाषेत सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना सविस्तर व शास्त्रशुध्द ज्ञान देणारा व मुंबई विद्यापीठाने अनिवार्य केलेला हा विषय आहे व या विषयाशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये व वस्तूंमध्ये सुसुत्रता आणण्याचे काम ते त्यांच्या पदाच्या व अधिकारांच्या अख्त्यारित राहून मोठ्या प्रामाणिकपणे करीत असतात.
पुरुषप्रधान संस्कृतीवर हल्ला चढविणार्या अनेक महिला आपल्या पाहण्यात येतात. परंतु ही रुळलेली वाट सोडून महिलांइतकाच पुरुषांचाही अभ्यास करुन समान सामाजिक व्यवस्थेसाठी मधू चौगावकर देशभरात काम करीत आहेत. स्त्री-पुरुष समानता खर्या अर्थाने प्रत्यक्षात यावी, यासाठी त्या स्वत:च्या घरापासूनच प्रयत्नशील झाल्या आहेत. युनिसेफच्या जेन्डर एम्पॉवरमेन्ट विषयीच्या कोअर समितीच्या त्या सदस्य आहेत.
स्त्री-पुरुष समानतेसाठी
डॉ. राजन रेळेकर यांनी १९९२ साली ठाण्यात स्वत:चा स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. १९९७ साली डॉ. राजन यांनी “समर्थ नर्सिंग होम” हे स्वत:चे रुग्णालय सुरु केले. १९९२ पासून डॉ. राजन हे कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सेवा देत आहेत.
शास्त्रीय संगीतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व व स्वरलिपीचे जनक
Copyright © 2025 | Marathisrushti