(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अशोक शिंदे – स्टायलिश खलनायक

    अशोक शिंदे – स्टायलिश खलनायक

    आतापर्यंत खलनायकाचं एक विशिष्ट रूप मराठी कलाक्षेत्रात दाखवलं जायचं , पण अशोक शिंदेने ते साफ मोडीत काढून खलनायक हा स्टलयलिश जरी असला तरी तो तितकीच , किंबहुना काकणभर जास्तच भीती मनात निर्माण करू शकतो हे दमदार अभिनयातून दाखवून दिलं.

  • बंडखोर लेखिका आणि अभिनेत्री प्रिया तेंडूलकर

    विविध मालिकांतून आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी रसिकांची लाडकी बंडखोर लेखिका प्रिया तेंडूलकर यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला.

    प्रिया तेंडूलकर या प्रख्यात साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर यांच्या कन्या. प्रिया लहानपणापासून ती ज्यांना आदर्श मानायची, ते वडील हे तिचे सर्वोत्तम मित्र होते. लहानपणी ती एकदम दुबळी, लाजाळू, रडूबाई होती. तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. त्याच प्रिया तेंडुलकरने नंतर बँक कर्मचारी, मॉडेल, हवाई सुंदरी, अभिनेत्री, साहित्यिका, पत्रकार, चित्रवाणी मालिकांतील यशस्वी सूत्रसंचालिका - अशा निरनिराळया भूमिका जीवनात यशस्वीपणे वठवल्या. वडिलांबरोबर त्या नाटयसृष्टीत आल्या पण नंतर तेथे त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. 'तो राजहंस एक' हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी 'बेबी', 'एक हट्टी मुलगी', 'सखाराम बाईंडर', 'कन्यादान', 'कमला', 'गिधाडे', 'फुलराणी' आदी नाटकांत भूमिका केल्या. शिरिष पै यांच्या 'कळी एक फुलत होती' या नाटकात वयाच्या अठराव्या वर्षी काम करण्याची संधी त्यांना लाभली. बासू चतर्जींनी तिला 'रजनी' या दैनंदिन जीवनातील अन्यायाविरूध्द लढणा-या सामान्य गृहिणीची मालिका दूरदर्शनसाठी करायला लावली आणि या मालिकेने प्रिया तेंडूलकर या नावाला ख-या अर्थाने वलय मिळवून दिले. अगदी अलीकडे त्यांनी 'प्रिया तेंडूलकर टॉक शो' सुरू केला. या 'शो'त त्यांनी राजकीय व सामाजिक विषयांना स्थान दिले. त्याचबरोबर 'अडोस-पडोस', 'जिंदगी', 'खानदान', 'बॅ. विनोद', 'हम पाँच', 'दामिनी' यांसारख्या मालिकांतून त्यांनी आपल्यातील विविध पैलूंचे दर्शन घडवले.

    श्याम बेनेगल यांना १९७४ साली 'अंकुर' चित्रपट बनवताना त्यातील अनंत नागच्या पत्नीच्या भूमिकेसाठी तिला घ्यावेसे वाटले आणि ही अभिनेत्रीही बनून गेली. 'गोंधळात गोंधळ', 'माळावरचं फूल', 'मायबाप', 'देवता', 'राणीने डाव जिंकला', 'मुंबईचा फौजदार', 'माहेरची माणसं', 'सस्ती दुल्हन महँगा दुल्हा', 'कालचक्र', 'माझं सौभग्य', 'हे गीत जीवनाचे', 'और प्यार हो गया', अशा चित्रपटांत, त्यांनी भूमिका केल्या. गुजराती मराठी चित्रपटांतील काही भूमिकांबद्दल त्यांनी अभिनयाचे पुरस्कारही मिळवले.

    आपल्या चित्राची प्रदर्शनेही त्यांनी भरवली होती. बी. ए. झाल्यानंतर जे. जे. मधून चित्रकला विषयातील प्रशिक्षणही दोन वर्षे घेतलेल्या प्रियाला केवळ चित्रकला शिक्षिका व्हायचे नव्हते. 'जन्मलेल्या प्रत्येकाला' हा तिचा कथासंग्रह दमाणी साहित्य पुरस्कार देऊन गेला. 'जगले जशी', 'ज्याचा त्याचा प्रश्न', 'जावे तिच्या वंशा' आदी पुस्तकांनी तिला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळवून दिला. एक वेगळया वाटेने जाणारी कथालेखिका म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला.

    प्रिया तेंडुलकर यांचे १९ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मैत्री दिवस

    ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा ‘फ्रेंडशिप डे’ अर्थात ‘मैत्री दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
    मैत्री म्हणजे काय असतं? एकमेकांचा विश्वास असतो? अतूट बंधन असत? की हसता खेळता सहवास असतो? मैत्री म्हणजे मैत्री असते, व्याख्या नाही तिच्यासाठी; बंधन नसत, त्या असतात रेशीमगाठी.
    मैत्री म्हणजे काय? कुणासाठी कट्टय़ावरची मज्जामस्ती तर कुणासाठी प्रेम, कुणासाठी आधार देणारी यारी तर कुणासाठी केवळ दुनियादारी, तर काहींसाठी शब्दांत सांगता न येणारं बरंच काही..!

    काही नाती एका व्याखेत बसवणं अगदी अवघड होऊन जातं. कारण प्रत्येकाने त्याकडे ज्या वेगळ्या दृष्टीने पाहिलेलं असतं, त्यामुळे त्या नात्यातील अनेक पैलू समोर येत असतात. मैत्री हे नातंच असं आहे, जे प्रत्येकानं अनुभवलेलं असतं. या मैत्रीला साजरं करण्याचा दिवस म्हणजे मैत्री दिवस, अर्थात फ्रेंडशिप डे. तसं मित्रमैत्रिणी एकत्र भेटले की तो दिवस उत्साहाचा नि उत्सवाचाच असतो. पण आवर्जून भेटीचं एक कारण म्हणजे हा फ्रेंडशिप डे..!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जॅकी श्रॉफ

    हिरो' सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या जॅकी श्रॉफ यांचा जन्म गुजराती कुटुंबात झाला होता. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९६० रोजी झाला. जॅकी श्रॉफ यांचे पूर्ण नाव जय किशन श्रॉफ. सिनेमांत झळकण्यापूर्वी जॅकी यांनी काही जाहिरातीत काम केले होते. सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ यांना 'हिरो ' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये लाँच केले. या सिनेमात त्यांचे नाव जॅकी होते. जॅकी श्रॉफ यांच्या या सिनेमाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. जॅकी श्रॉफ यांचा अभिनेता म्हणून पहिला सिनेमा 'हीरो' होता. मात्र त्यापूर्वी त्यांनी 'स्वामी दादा' या सिनेमाद्वारे फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.

    १९८३ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात जॅकी देव आनंद यांच्यासह झळकले होते. जॅकी श्रॉफ फिल्म इंडस्ट्रीतील असे अभिनेते आहेत, ज्यांनी हिंदीसह तब्बल आठ भाषांमध्ये काम केले. त्यांनी बंगाली, तेलगु, मल्याळम, कन्नड, मराठी, तामिळ, पंजाबी आणि उडिया या सिनेमांत अभिनय केला आहे. ऐंशीच्या दशकात त्यांनी आयशा दत्तसह लग्न केले. जॅकी श्रॉफ यांना आपल्या फिल्मी करिअरमध्ये तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांना हिंदी सिनेसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी स्पेशल ऑनर ज्युरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. 'रंगीला' या सिनेमात जॅकी श्रॉफ यांनी आमिर खानसोबत काम केले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी 'धूम ३' या सिनेमात जॅकी आणि आमिर यांनी एकत्र काम केले. जॅकी श्रॉफ यांनी आपल्या पत्नीसह मिळून एक मीडिया कंपनी सुरु केली होती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • गजानन दिगंबर माडगूळकर

    गजानन दिगंबर माडगूळकर

    अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने गीतरामायणा सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी!

  • जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ

    अली अकबर खाँ यांच्या घराण्याचा सम्राट अकबराच्या दरबारातील तानसेनाच्या घराण्याशी थेट संबंध होता. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९२२ रोजी झाला. त्यांचे वडील पद्मविभूषण अल्लाउद्दीन खाँ हे त्या काळातील भारतीय संगीतातील एक अग्रणी व्यक्तित्व होते. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे वडील व काका फकीर अफताबुद्दीन यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास प्रारंभ केला. बारा वर्षांहून अधिक काळ दिवसाला १८ तासांहून अधिक काळ सराव करणाऱ्या अली अकबर खाँ यांना त्यांचे वडील वयाची शंभरी पार केली तरी संगीताचे धडे देत होते. १९७२ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर उस्तादांनी घराण्याची संगीताची परंपरा अखेरयत कायम ठेवली. वयाच्या १३ व्या वर्षी अलाहाबादला पहिला जाहीर कार्यक्रम करणाऱ्या खाँसाहेबांनी २० व्या वर्षी एचएमव्हीसाठी लखनौला ध्वनिमुद्रण केले. जोधपूर घराण्यात राजगायक म्हणून सात वर्षे काम करत असतानाच त्यांना उस्ताद हा पहिला सन्मान बहाल केला गेला. लॉर्ड येहुदी मेन्युहिन यांच्या विनंतीवरून १९५५ ला न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम केल्यापासून त्यांना व भारतीय शास्त्रीय संगीताला साऱ्या संगीत विश्वाचे दरवाजे खुले झाले. १९५६ मध्ये कोलकात्ता येथे त्यांनी अली अकबर संगीत महाविद्यालयाची स्थापना केली. पाश्चिमात्य जगाचा शास्त्रीय संगीताकडे असलेला ओढा पाहून १९६५ मध्ये अमेरिकेत संगीत केंद्र सुरू केले.

    कॅलिफोर्नियात अली अकबर संगीत महाविद्यालय स्थापन केल्यानंतर स्वित्झर्लण्डमध्येही त्यांनी त्याची शाखा उघडली. जगभर दौरे करणाऱ्या उस्तादांनी चेतन आनंद यांच्या आँधिया, आयव्हरी-र्मचट यांच्या हाऊस होल्डर, सत्यजित रे यांच्या देवी, बर्नाडो बटरेलुस्सी यांच्या लिटल बुद्धा इ. चित्रपटांनाही त्यांनी पाश्र्वसंगीत दिले. भारतीय अभिजात संगीताला जगभर मान्यता मिळवून देणाऱ्या उस्तादांचे पौर्वात्य व पाश्चिमात्य संगीतविश्वात असंख्य चाहते आहेत. जगविख्यात व्हायोलिन वादक लॉर्ड येहुदी मेन्युहिन यांनी तर त्यांचे ‘ग्रेटेस्ट म्युझिशियन इन द वर्ल्ड’ असे वर्णन केले होते. भारताच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त संयुक्त राष्ट्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना सरोदवादनाचा कार्यक्रम करण्याची विनंती भारतीय राजदूतवासाने केली होती. अमेरिकेत त्यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप बहाल केली होती. त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. खाँसाहेब पाश्चात्य आणि भारतीय शास्त्रीय संगीतातील अढळ ध्रुवतारा म्हणून गेली पाच दशके ओळखले जात होते. अली अकबर खाँ यांचे १८ जून २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • ज्येष्ठ अभिनेत्री मीनाकुमारी

    परिणिता, दिल अपना और प्रीत पराई, दायरा, एक ही रास्ता, शारदा, दिल एक मंदिर, साहिब बिवी और गुलाम, काजल, फूल और पत्थर हे मीना कुमारी यांनी अभिनय केलेले काही उल्लेखनीय चित्रपट. ‘परिणिता’ या चित्रपटापासून तिला भारतीय नारीच्या भावुक भूमिकाच मिळत गेल्या. फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली मा. मीना कुमारी ह्या पहिली अभिनेत्री. १९५३ साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी ‘बैजू बावरा’ आणि ‘परिणिता’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.

  • नरेंद्र रघुवीर बोडके

    मराठीला मोजक्या पण खानदानी काव्यसंग्रहांची लेणी चढविणारे नरेंद्र बोडके हे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते.

  • प्रसिद्ध अभिनेत्री बेबी नंदा

    विनायक दामोधर कर्नाटकी म्हणजेच मास्टर विनायक यांची कन्या असलेल्या बेबी नंदा यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. त्यांच्या आईचे नाव सुशीला. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ रोजी कोल्हापूर येथे झाला. नंदाने चित्रपटांत लहानपणी बेबी नंदा या नावाने बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्‌गुरु आदी १५ ते १६ चित्रपटांत, आणि तरुणपणी अनेक हिंदी चित्रपटांत नायिकेच्या भूमिका केल्या.

    बेबी नंदा यांनी १९४६ साली मंदिर या चित्रपटात एका मुलाची भूमिका साकारली. तोच त्यांचा पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मास्टर विनायक यांचे निधन झाले. तेव्हा हे कुटुंब दादर-शिवाजी पार्क येथील आशीर्वाद बंगल्यात राहत होते. नंदा या आयडियल हायस्कूलमध्ये असताना वयाच्या बाराव्या वर्षी कुलदैवत या दिनकर पाटलांच्या मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून झळकल्या, तर त्यांना त्यांचे मावसकाका व्ही. शांताराम यांनी हिंदी चित्रपटात प्रवेश मिळवून दिला. कुलदैवत नंतर सहा मराठी चित्रपट नंदा यांनी केले.

    सदाशिव जे रावकवि दिग्दर्शित शेवग्याच्या शेंगा, राजा परांजपे दिग्दर्शित देव जागा आहे, देवघर, यशवंत पटेकरांचा झालं गेलं विसरुन जा, हंसा वाडकरसोबतचा मातेविना बाळ हे ते चित्रपट. शेवग्याच्या शेंगा मधील बहिणीच्या भूमिकेसाठी नंदा यांना जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते गौरवण्यात आले होते. व्ही. शांताराम यांच्या तुफान और दिया या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा मोठा ब्रेक मिळाला. १९६५ पासून नंतर पुढे त्यांच्या यशाची घौडदौड वाढतच गेली.

    १९५७ मध्ये आलेल्या `भाभी` सिनेमातल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं फिल्मफेअर एवार्डसाठी नामांकन मिळालं होतं. मात्र या पुरस्कारांमध्ये लॉबिंग होत असल्याचा सनसनाटी आरोप करत त्यांनी रोखठोक भाष्य केलं होतं. राज कपूर, शशी कपूर, देवानंद, मनोजकुमार, अशा गाजलेल्या अभिनेत्यांसोबत त्यांचे अनेक सिनेमे हिट झाले. कानून, ऑंचल, मेहंदी लगी मेरे हाथ, जब जब फुल खिले, जोरू का गुलाम अशा अनेक हिट सिनेमांची नोंद बेबी नंदा यांच्या नावावर आहे. मा.नंदा यांचे निधन २५ मार्च २०१४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • अनंत कान्हेरे

    अनंत कान्हेरे हे मूळचे औरंगाबादचे. त्यांचे शालेय शिक्षण हे बरेचसे औरंगाबाद येथेच झाले, परंतु नंतर ते शिक्षणासाठी नाशिक येथे झाले. जुलमी इंग्रज अधिकारी जॅक्सनच्या हत्येची शिक्षा म्हणून त्यांना फाशी देण्यात आले.