(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. के. पी. साळवे

    व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या साळवेंचा आंतरराष्ट्रीय अर्थकारणापासून जागतिक करव्यवस्थेपर्यंत गाढा अभ्यास होता. भारत हा सर्वाधिक करवसुली करणारा देश आहे, असे त्यांचे मत होते. इन्कम टॅक्स व प्रॉपटी टॅक्स कमी झाले पाहिजेत, याविषयी ते आग्रही होते. इंदिरा गांधी यांच्या कारकिदीर्त साळवे यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या संयुक्त समितीच्या शिफारशींनुसार, १९७५ साली भारतीय कर व्यवस्थेत महत्त्वाचे बदल झाले.

      April 1, 2022


  • सॉफ्ट कॉन्टेक्ट लेन्सचा शोध लावणारे ओटो विक्टरले

    ओटो हे स्वतः चष्मा वापरत होते आणि त्यांनी त्यावर उपाय म्हणून आधुनिक सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्सचा शोध लावला.

      October 27, 2021


  • (डॉ.) वा. द दिवेकर

    इतिहासाबद्दल प्रेम असणाऱ्या आणि इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना पुस्तकी किडे म्हणण्याची एक पद्धत आहे. प्रत्यक्षात इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या प्रत्येकाला ज्या दिव्यातून जावे लागते, ते दिव्य करायला आपल्यापैकी कुणीही सहसा तयार होणार नाही. उपलब्ध कागदपत्रांचे विश्लेषण करून त्याची संगती लावणे, हे काम अतिशय अवघड आणि कौशल्याचे असते. एखाद्या कागदाचा खरेपणा तपासणे आणि अन्य उपलब्ध सामग्रीतून या कागदातील आशयाचे तथ्य जाणणे हे ज्ञान संपादन करण्याएवढेच कठीण असते.

    पुण्यातील एक ज्येष्ठ इतिहास संशोधक वा. द. दिवेकर यांच्या निधनामुळे अशा ज्ञानमार्गातील एका यात्रिकाचा शेवट झाला आहे. अर्थशास्त्र आणि इतिहास हे दिवेकरांचे लाडके विषय. दोन्हीमध्ये त्यांना गती! इतिहासाबद्दलचा जिव्हाळा सांभाळतानाच अर्थशास्त्रासारख्या विषयाचाही लळा लागावा, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

    १८५७ च्या स्वातंत्र्यलढय़ाचा मागोवा घेण्यासाठी ते वर्षभर इंग्लंडमध्ये राहिले. याच काळात तेथील ग्रंथालयांमध्ये मिळालेल्या लोकमान्य टिळकांवरील कागदपत्रांचाही त्यांनी अभ्यास केला. जयंतराव टिळक यांच्या पुढाकाराने टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला, कारण या लढय़ाबाबतचा बराच तपशील मिळणे बाकी होते. दिवेकर यांनी त्याबाबत संशोधन करून ‘साऊथ इंडिया इन १८५७, द वॉर ऑफ इंडिपेन्डन्स’ या शीर्षकाचा ग्रंथ त्यांनी इंग्रजीतून सिद्ध केला. १८५७ च्या लढय़ात भाग घेणाऱ्या मुशाईसिंग यांची त्यांनी मिळवलेली माहिती थक्क करून सोडणारी होती. हाच ग्रंथ हिंदी आणि मराठीतूनही प्रसिद्ध झाला.

    इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांनी अभ्यास केलेल्या लोकमान्य टिळकांशी संबंधित कागदपत्रांच्या आधारे ‘टिळक इन लंडन’ हाही ग्रंथ समग्र टिळक या ग्रंथमालेतील नववा भाग म्हणून प्रसिद्ध करण्यात आला. इतिहासाची अर्थशास्त्राशी सांगड घालताना दिवेकर यांनी महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक घडामोडींच्या इतिहासावर लक्ष केंद्रित केले. जगात आर्थिक विषयावरील संशोधनासाठी नावाजलेल्या पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेत ग्रंथालयात काम करत असताना त्यांना या विषयाची गोडी लागणे स्वाभाविक होते. संस्थेत सुरू असलेल्या या विषयावरील संशोधनात त्यांचा वाटा होता.

    गोखले अर्थशास्त्र संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर भारत इतिहास संशोधन मंडळात त्यांनी संशोधनकार्यासाठी वाहून घेतले. स्वातंत्र्यलढय़ात अंदमान येथे कारावास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची माहिती संकलित करण्याचे कामही दिवेकर यांनी आत्मीयतेने केले. हे काम करीत असताना जे सैनिक हयात असल्याचे लक्षात आले, अशांचा शोध घेऊन त्यांचा मेळावाही त्यांच्या पुढाकाराने पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. आयुष्यभर संशोधनात मग्न असणाऱ्या दिवेकर यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात ठाणे जिल्ह्य़ातील विक्रमगड येथे आदिवासींसाठीच्या शैक्षणिक कार्यात रस घेतला.

    दिवेकर पती-पत्नींनी आदिवासी मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या अंगी अध्यापन कौशल्ये बाणवण्यासाठी खूप प्रयत्न केले. आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा, यासाठी त्यांचे हे प्रयत्न खूप मोलाचे होते. आयुष्यात लौकिक अर्थाने काय मिळवायचे, अशा विवंचनेत असणाऱ्या अनेकांना दिवेकर यांचे आयुष्य म्हणजे एक आदर्श वाटावा असे होते. इतिहासातून जे काही शिकायचे, ते भविष्यासाठी उपयोगात आणायचे, याचे भान अनेकांना राहात नाही. हे भान येण्यासाठी नुसता अभ्यास किंवा संशोधन उपयोगाचे नसते. त्यासाठी आपल्या आयुष्याचा अर्थ लावण्याचीही गरज असते.

    वा. द. दिवेकर यांनी आयुष्यभर नेमके हेच केले. त्यामुळेच गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या ग्रंथालयात काम करत असताना, त्यांना ग्रंथांचा जो सहभाग मिळाला, तो त्यांचे आयुष्य घडवणारा ठरला. त्यांचे अलीकडेच पुण्यामध्ये ८३ व्या वर्षी निधन झाले.

      August 5, 2017


  • प्रभाकर पंडित

    प्रभाकर पंडित यांचा जन्म ३० सप्टेंबर १९३३ रोजी झाला. प्रभाकर पंडित यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्याला झाले. संगीताची आवड बालपणापासून असल्याने त्यांनी गायनाचे मार्गदर्शन मटंगेबुवा; तसेच पेंढारकरबुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे.वाय. पंडित यांच्याकडून मिळाले. संगीतात कारकिर्द घडविण्यासाठी ते मुंबईला आले. दादर येथे त्यांनी ३० वर्षे "मधुवंती व्हायोलिन विद्यालया"चे संचालन केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर १५ वर्षे ते काम करत होते. मुंबई विद्यापीठाच्या सुगम संगीत विषयाचे ते अभ्यागत व्याख्याते, तसेच परीक्षकही होते. संगीत क्षेत्रात सुमारे ४५ वर्षे कार्यरत असलेल्या पंडितांनी ध्वनिफीती, चित्रपट, नाटक, संगीतिका, संगीत नाटक यांसाठी संगीत दिले. संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या ध्वनिफितींमुळे मा.प्रभाकर पंडित नावाजले गेले. याखेरीज दहा चित्रपट, वीस नाटके, संगीतिका, संगीत नाटके यांकरताही त्यांनी संगीत दिले. तसेच जाहिरातींच्या जिंगल्सचीही निर्मिती त्यांनी मोठ्या प्रमाणावर केली. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या "देवाचिये द्वारी'या अजित कडकडे यांच्या आवाजातील ध्वनिफितीने अत्यंत दुर्मिळ अशा "डबल प्लॅटिनम डिस्क'चा बहुमान मिळवला होता. मंगेशकरांसह सुरेश वाडकर, सुमन कल्याणपूर, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम ते स्वप्नील बांदोडकर पर्यंत सुमारे ७८ विविध गायकांचे आवाज त्यांनी आपल्या ध्वनिफितींच्या माध्यमातून लोकांसमोर आणले. भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, अभंग, आरत्या, संतरचना, बालगीते असे अनेक गीतप्रकार त्यांनी संगीतबद्ध केले. रंग ओलेत्या फुलांचे, मन हा मोगरा, अभंग प्रभात, वृंदावनी वेणु, छंद हा विठ्ठलाचा, भक्तिप्रकाश, झुकझुक गाडी, देव दयानिधी अशा अनेक ध्वनिफितींची उदाहरणे सांगता येतील. "सुगम संगीताचे सौंदर्य' या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले होते. मा.प्रभाकर पंडित यांचे निधन २८ डिसेंबर २००६ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.विकिपीडिया

      January 3, 2017


  • हिंदी, बंगाली सिनेमातील अभिनेता, निर्देशक, लेखक, नाटककार उत्पल दत्त

    उत्पल दत्त हे उच्च दर्जाचे अभिनेता, दिग्दर्शक आणि नाटककार होते. त्यांचा जन्म २९ मार्च १९२९ रोजी झाला. त्यांनी केवळ बंगाली चित्रपट वर आपली छाप टाकली नाही तर हिंदी चित्रपटावर पण. सीरियस पासून कॉमेडी पर्यंत त्यांनी प्रत्येक भूमिका अतिशय गंभीरपणे केली. मा.उत्पल दत्त यांचे शेक्सपियर साहित्यावर खूप प्रेम होते. १९४० मध्ये एका थिएटर कंपनीतून आपल्या अभिनयास सुरवात केली. थिएटर कंपनीतर्फे अनेक नाटके भारत आणि पाकिस्तानात आयोजित केली. १९५० पासून त्यांची बंगाली चित्रपट कारकीर्द सुरू झाली. अनेक बंगाली नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. या वेळी तो लिहिले नाही,. नाटकांच्या लिहिले बंगाली राजकारण अनेकदा वाद वाढ दिली. १९५० मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधू बोस यांनी चित्रपट माइकल मधुसुधन या चित्रपटात मुख्य भूमिका दिली. मा.उत्पल दत्त यांनी सत्यजित रे यांच्या चित्रपटांत अभिनय केला आहे. पण उत्पल दत्त हिंदी चित्रपट एक महान विनोदी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक लघुपटात पण कामे केली आहेत. गुड्डी, गोल-माल, नरम-गरम, रंग बिरंगी व शौ‌कीन या चित्रपटात उत्पल दत्त यांनी कमाल केली आहे. त्यांची सर्वात गाजलेली विनोदी भुमिका गोलमाल मधील होती त्यांना गोलमाल मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट हास्य अभिनेता फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. १९६० साली चित्रपट अभिनेत्री शोभा सेन यांच्याशी उत्पल दत्त यांनी विवाह केला. उत्पलदत्त हे मार्क्सवादी नेता होते. १९ ऑगस्ट १९९३ रोजी उत्पल दत्त यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 29, 2017


  • प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर

    हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९२० रोजी झाला. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "प्रेमा तुझा रंग कसा'"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "वेड्याचे घर उन्हात", "तू वेडा कुंभार" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि श्रीराम लागूंसारख्या मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले. मा.भालबा केळकर यांचे ६ नोव्हेंबर १९८७ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 6, 2017


  • ए.टी.एम.(ऑटॉमेटेड टेलर मशिन)चे जनक जॉन शेफर्ड बॅरन

    ऐका सत्यनारायणाची कथा, पाऊले चालती पंढरीची वाट, चल गं सखे पंढरीला, बाप्पा मोरया रे, उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली… अशी शेकडो भक्तिगीते, भावगीते, कव्वाली, कोळीगीते गाऊन आपल्या गायकीचा वेगळा ठसा उमटवणारी शिंदे यांची गाणी आजही मराठी रसिकांच्या हृदयात घर करून आहेत.

      June 28, 2022


  • मराठी लेखक, कोशकार लक्ष्मण शास्त्री जोशी

    लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते, हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाला. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते. लक्ष्मण शास्त्री जोशी यांची ओळख मुख्यत: `मराठी विश्वकोषाचे शिल्पकार' अशी असली, तरी ती ओळख अपुरी म्हणावी लागले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते थोर स्वातंत्र्य सैनिक, साहित्यिक, समाजसुधारक, हिंदू धर्माचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, अशी अनेक विशेषणे तर्कतीर्थांच्या नावापुढे लावणे शक्य आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे बिरुद म्हणजे त्यांना मिळालेली `तर्कतीर्थ' ही पदवी!

    हिंदू धर्माच्या अभ्यासासाठी ते वयाच्या चौदाव्या वर्षी घराबाहेर पडले आणि सातारा जिह्यातील कृष्णाकाठच्या वाई येथे स्थायिक झाले. त्यांच्या तारुण्यात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात होती. त्या काळातील संवेदनशील तरुणांच्या ज्या भावना असत, त्याच भावना तर्कतीर्थांच्याही होत्या. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत सक्रीय सहभाग घेतला. वयाच्या २९व्या वर्षी, म्हणजे १९३२ साली त्यांना तुरुंगात जावं लागलं. या वयापर्यंत तर्कतीर्थांनी संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवलं होतं. हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. चारही वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलायला लागले होते. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते. आचार्य विनोबा भावे जेव्हा केवलानंद सरस्वती यांच्याकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाई येथे मुक्कामाला होते, तेव्हा तर्कतीर्थांचा विनोबाजींबरोबरचा सहवास वाढला. विनोबाजींनी त्यांना इंग्रजी शिकविले. त्याच दरम्यान एक घटना घडली. महात्मा गांधींचे पुत्र देवीदास यांचा सी. राजगोपालाचारी (स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल) यांच्या मुलीशी आंतरजातीय विवाह करण्याचा मनोदय होता. पण हिंदू पंडितांचा त्याला विरोध होता. हा पेच सोडविण्यासाठी तर्कतीर्थांना पाचारण करण्यात आले. त्यांनी आपल्या तर्कबुद्धीची चुणूक दाखवून असे विवाह हिंदू धर्माविरुद्ध नाहीत हे पटवून दिले. त्यामुळे गांधीजींनी खूश होऊन त्यांनाच लठाचे विधी करण्याचा मान दिला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर तर्कतीर्थांना अनेक पुरोगामी बुद्धिवाद्यांचा सहवास लाभला. एम. एन. रॉय हे त्यांपैकीच एक. १९५१ साली सरदार वल्लबभाई पटेल यांनी सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. जीर्णोद्धारानंतर मंदिर अस्पृश्यांसहित सर्वांना खुले करण्यात येणार होते. नेमके याच गोष्टीमुळे काशीच्या कर्मठ पंडितांनी मूर्ती प्रतिष्ठापनेचे धार्मिक विधी करण्यास नकार दिला. या काळातही तर्कतीर्थांनी आपल्या तर्कशुद्ध बुद्धीने पंडितांना पटवून दिले की, असे करण्यात कोणताही धर्मलोप नाही, उलट हाच खरा हिंदू धर्माचा विचार आहे.

    १९५१ साली त्यांनी पुणे विद्यापीठात सहा प्रदीर्घ व्याख्याने दिली. त्या व्याख्यानांवर आधारीत `वैदिक संस्कृतीचा विकास' हा ग्रंथ त्यांनी लिहिला. या ग्रंथाद्वारे त्यांनी भारतीयांना वैदिक धर्मावर आधारीत जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. भौतिक सुख आणि अध्यात्म यांच्या कात्रीत भारतीय समाज सापडला आहे. त्यामुळे तो गोंधळलाही आहे, असे त्यांनी अतिशय तर्कशुद्ध रितीने प्रतिपादन केले. हा ग्रंथ अतिशय प्रभावी झाला. १९५५ साली या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. अर्थातच त्यांचे विचार काही कर्मठ पंडितांना पटण्यासारखे नव्हते. त्यामुळे तर्कतीर्थांना अशा तथाकथित पंडितांच्या वर्तुळात स्थान नव्हते. पण महाराष्ट्राचे द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण यांनी मात्र तर्कतीर्थांच्या विचारांवर संपूर्ण विश्वास टाकला. १९६० साली दोन अतिमहत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम तर्कतिर्थांवर सोपविण्यात आले. पहिला म्हणजे मराठी `विश्वकोषा'ची निर्मिती, तर दुसरा `धर्मकोषा'ची निर्मिती. ही दोन्ही कामे अतिशय अवघड अशी होती. `विश्वकोष' आणि `धर्मकोष' यांसारख्या ग्रंथांची निर्मिती करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले, त्याचे कारणही तसेच होते. त्यांनी त्याआधीसुद्धा अनेक महाकाय ग्रंथ लिहिले होते.

    `शुद्धिसर्वस्वम्' हा त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ संस्कृत भाषेत होता, आणि तो १९३४ साली प्रकाशित झाला. त्याच वर्षी त्यांनी `धर्ममोक्ष' या ग्रंथाचे अठराशे पानांचे सहा अध्याय लिहिले. `हिंदू धर्माची समीक्षा', `वैदिक संस्कृतीचा विकास', `आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा', इत्यादी अनेक उत्तमोत्तम ग्रंथांची निर्मिती करून त्यांनी मराठी भाषेतील साहित्य समृद्ध करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांनी अठरा प्रमुख उपनिषदांचे मराठीत भाषांतरही केले. प्राचीन वैदिक धर्माचे समर्थक असूनही तर्कतीर्थ यांना वास्तवाचे भान होते. आधुनिक शास्त्रे, इंग्रजी भाषा, भारताची औद्योगिक प्रगती यांबाबत त्यांचे विचार अतिशय पुरोगामी होते. त्यामुळे तर्कतीर्थ हे अनेक जणांचे प्रेरणा स्थान राहिले. भारत सरकारने तर्कतीर्थांना १९७६ साली `पद्मभूषण', तर १९९२ साली `पद्मविभूषण' पुरस्कार देऊन गौरव केला होता. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी यांचे २७ मे १९९४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 27, 2017


  • चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू

    हा माणूस दिग्दर्शक म्हणून सिनेमात आला, पण त्यांनी अनेक चित्रपटात नायकाच्या भूमिका केल्या, वीस चित्रपट दिग्दर्शित केले व सात चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९१५ रोजी झाला. किशोर साहू हे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. 'दिल अपना और प्रीत परायी' सोडल्यास त्यांनी दिग्दर्शित केलेला एकही चित्रपट लोकप्रिय बनला नाही. १९४९ मध्ये किशोर साहू यांनी आपल्या चित्रपटाचे नाव सावन आया रे असे ठेवले होते. १९५४ सालचा मयुरपंख हा त्यांनी दिग्दर्शित केलेला एक संगीतमय चित्रपट होता.

    शंकरजयकिशन यांचे संगीत व शैलेन्द्र-हसरत यांची गीते असलेल्या या चित्रपटात त्याने नायकाची व सुमित्रादेवीने नायिकेची भूमिका केली होती. किशोर साहू यांचे २२ ऑगस्ट १९८० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 22, 2018


  • संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स

    संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स हे भारतीय चित्रपट संगीतातील एका गुणी कलाकाराचं नाव. इनॉक डॅनियल्स यांचा जन्म १६ एप्रिल १९३३ रोजी पुणे येथे झाला. वयाच्या नव्वदाव्या वर्षा नंतर देखील ते त्याच तडफेने अकॉर्डियन वाजवतात.

    शंकर-जयकिशन, राम कदम, सी. रामचंद्र यांच्यासारख्या अनेक संगीतकारांसोबत इनॉक यांनी काम केलं आहे. त्यांनी आपल्या संगीत संयोजनानाने आणि वादनाने सर्व संगीतकारांना मोहून टाकलं. अप्रतिम गाणी करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. पाश्चात्य शास्त्रीय संगीतावर त्यांची कमालीची पकड आहे .

    पंचहौद मिशनच्या चर्चसमोर असलेल्या ख्रिस्ती जमातीसाठी बांधलेल्या चाळीत त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील बेंजो, मोठा भाऊ व्हायोलिन तर दुसरा भाऊ क्लॅरियोनेट वाजवत होते. या सुरिल्या परिवारामध्ये इनॉक यांचा ‘बालपणीचा काळ सुरांचा’ गेला. इनॉक यांच्या वादनाची सुरुवात ड्रमसेटवर झाली. नियतीच्या मर्जीनुसार इनॉक यांच्या नशिबी अॅ्कॉर्डियन होते, पण उपलब्ध असलेल्या वाद्यांत ते नव्हते. त्यांचे वडील ख्रिश्चन बॉईज हॉस्टेलचे अधीक्षक होते. चर्च संबंधित असलेल्या युरोपियन फादर यांना वाटले की, हॉस्टेलमधील मुलांना एखादे तरी वाद्य यावे, संगीताची ओळख व्हावी, सुरांची माहिती व्हावी. या उद्देशाने त्यांनी विविध प्रकारची वाद्ये युरोपातून मागवली आणि ती इनॉकला सुवर्णसंधी वाटली; कारण फक्त पाहण्यासाठीही दुर्मिळ असणारी ट्रंपेट- ट्रॉम्बोनसारखी वाद्ये त्याला उपलब्ध झाली. सदर फादर मुलांना आवडेल ते वाद्य शिकवत असत. छोटा इनॉक त्याकडे आसुसून पाहात असे.

    युरोपातून एक रेव्हरंड फादर स्लेड पुण्याच्या पंचहौद मिशनमध्ये आले होते. त्यांची मराठी शिकण्याची इच्छा होती. त्यांची आणि इनॉकची चांगली गट्टी जमली. इनॉक यांचे शिक्षण मराठीतूनच झाल्याने त्याच्याकडे मराठीचे ज्ञान होते- आजही ते अस्खलित मराठीतच बोलते- पण इंग्रजी मात्र त्या वेळी चांगले नव्हते. मोडक्यातेडक्या इंग्रजी-मराठीत त्यांचा संवाद चाले. त्यांचा आग्रह होता ‘तुम्ही इंग्रजी बोलू नका. मी मराठीत बोलताना ज्या चुका होतील त्या दाखवा व दुरुस्त करा.’ यामुळे त्यांची चांगली दोस्ती झाली. त्यांना वाटले की, या मुलाला थोडेफार वाजवायला शिकवले पाहिजे. ते उत्कृष्ट पियानोवादक होते. चर्चमध्ये रविवार प्रार्थनेसाठी ऑर्गन असतेच. ऑर्गन व पियानोच्या स्वरपट्टय़ा एकच असतात. रेव्हरंड स्लेडच्या मार्गदर्शनाखाली इनॉकची शिकवणी सुरू झाली. एका वर्षांतच ते ऑर्गन मोठय़ा सफाईने वाजवू लागले. घरीच ऑर्गन असल्याने शिकलेल्या पाठाची उजळणी वेळ मिळेल तेव्हा ते करीत असे. चर्चमधील क्वायर्स, हीम्स आदी प्रार्थना वाजवू लागले.

    संगीतातील गायन, हार्मनी, मेलडी हे प्रकार चर्चमध्ये वारंवार वाजवले जातात. प्रख्यात पाश्चात्त्य संगीतकार बिथोवेन, बाख, मोझार्ट यांच्या रचनांचा त्यामध्ये समावेश होते. त्यांचे थोरले बंधू रेल्वेमध्ये नोकरी करीत होते. कानपूर येथे बदली झाली तेव्हा एक अँग्लो-इंडियन परिवार भारत सोडून ऑस्ट्रेलियाला चालले होते. त्यांच्याकडून त्यांचा पियानो स्वस्तात मिळाल्याने आपल्या धाकटय़ा भावासाठी ते रेल्वेने पुण्यास पाठवला. घरचेच वाद्य मिळाल्याने इनॉक चोवीस तास रियाज करून कुशल वादक बनला.

    इनॉकने पियानो अॅवकॉर्डियनवर वाजवलेले पहिले गाणे ‘आह’ चित्रपटातील ‘सुनते थे नाम हम..’ होते. खूप धमाल आली. इनॉकला पियानो अॅ कॉर्डियन खूपच आवडले. (ओरिजनल ‘पतिता’, ‘आह’, ‘दाग’ या चित्रपटांतील अॅइकॉर्डियनचे सूर मात्र व्ही. बलसारा याने हार्मोनियमवर काढले होते ही माहिती अनेक संगीतप्रेमींना मनोरंजक वाटेल) दिल्लीमध्ये झालेल्या कॉलेज यूथ फेस्टिवलमध्ये इनॉकच्या वादनाने खूपच प्रसिद्धी मिळवली व वाडिया कॉलेजला पहिले बक्षीस मिळाले. त्यांची ओळख व्हॅन शिप्ले या प्रख्यात हवाईयन गिटारवादकाशी झाली व एक चांगला सुरेल ग्रुप तयार झाला. त्यांचे संयुक्त वादन श्रवणीय होत असे. शिप्ले मेलडी वाजवत असे तर इनॉक हार्मनीने गाणे सुशोभित करीत असे. साथीला स्पॅनिश गिटार व दोन रिदमिस्टही होते. कॉलेजमधून संगीताकडे वाटचाल चालू झाली व अर्थार्जनही सुरू झाले. त्यांच्या कार्यक्रमात लोकप्रिय हिंदी गाणी व ‘कम सप्टेंबर’, ‘लाराज थीम फॉर अ फ्यू मोअर डॉलर’ यांसारखी इंग्रजी गाणीही असत.

    आता इनॉकचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण अपरिहार्य होते. पुण्याच्या नवयुग स्टुडियोमध्ये चित्रपट चित्रीकरणाबरोबरच गाण्यांचेही ध्वनिमुद्रण होत असे. सुधीर फडके, वसंत पवार, पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर इनॉकचा परिचय झाला. पु. ल. देशपांडे हे आपल्या ‘गुळाचा गणपती’चे चित्रीकरण व ध्वनिमुद्रण करीत होते. त्यांना अॅ्कॉडयन खूप आवडत होते, कारण पेटीवादनात ते प्रवीण होते. त्यांनी अॅीकॉर्डियन ऐवजी पियानो वाजविण्याची सूचना केली. खरे तर पियानोमध्येच इनॉक प्रवीण होता. त्यांचे पहिले चित्रपटवादन पियानोनेच झाले. राम कदम वसंत पवारचे साहाय्यक होते, पुणे आकाशवाणीवर क्लॅरियोनेट वादक म्हणून कामाला होते. त्यांना इनॉकचे वादन आवडत असे. त्यांनी स्वतंत्र काम मिळाल्यावर इनॉकला संगीत संयोजक नेमण्याचा शब्द दिला. राम कदम यांच्या सर्व चित्रपटांना इनॉकनेच संयोजन केले. वादन हेच अंतिम ध्येय ठेवणाऱ्या इनॉकचे मुंबईला प्रयाण आता अपरिहार्य होते.

    १९६०-६१ ला इनॉक यांनी मराठी चित्रपटात वादन व संगीत संयोजनाला प्रारंभ केला. मुंबईत आल्यावर त्याला पहिला हिंदी संगीतात ब्रेक बिपिन-बाबुल यांच्या संगीत संयोजनाने मिळाला आणि ते लोकप्रिय झाला. त्याने संगीतकारांचे लक्ष वेधले. संगीताची प्रचंड आवड असलेल्या श्रोत्यांना अरेंजमेंट तथा संगीत संयोजनाबद्दल कुतूहल नसल्याने संगीत संयोजक यांची योग्य दखल घेतली गेली नाही. संगीतकारांच्या असामान्य प्रतिभेला सुचलेल्या चालींचे सोने संयोजकांनी केले, अगदी तेडीस तेड काम करून गाण्याला भरजरी रूप दिले व त्यांचे सौंदर्य नटवले, खुलवले.

    संगीतकार खय्याम यांनी स्वरबद्ध केलेल्या कैफी आजमी यांच्या ‘शगुफ्ता’ अल्बमला इनॉक संयोजक होते. एका गाण्याचे संयोजन इनॉक यांनी इतके अप्रतिम केले की, कलाकार, वादक व ध्वनिमुद्रक सर्वाना ते आवडले. त्यांनी मनापासून दाद दिली.. ध्वनिमुद्रणाच्या वेळी खय्याम नव्हते. त्यांना जेव्हा ती रचना ऐकविली तेव्हा त्यांनी लागलीच इनॉकला रात्रीच फोन केला. ते म्हणाले, ‘डॉन! गाना बहुत अच्छा हुवा है, लेकिन उसमें पोएट्री छूट गयी है। हमें उसकी अरेंजमेंट बदलनी चाहिए, और कल फिर से रेकॉर्ड करेंगे। वैसी ते तुम्हारी अरेंजमेंट गाने से भी बढिम्या हो गई है।..’ त्यानुसार इनॉकने अॅकरेजमेंट बदलून गाणे ध्वनिमुद्रित केले. राम कदम स्वत: वादक असल्याने त्यांच्याबरोबर काम करणे इनॉक यांना सोपे जाई. त्यांची चतुरस्र प्रतिभा रामभाऊ जाणत असल्याने त्याच्या कामात ढवळाढवळ करीत नसत. त्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळे. रामभाऊंचा झपाटाही विलक्षण होता. एकेका दिवशी पाच-सहा रचना ते ध्वनिमुद्रित करत. मुंबईच्या स्टुडिओत ध्वनिमुद्रण होत असल्याने पंडित विधाते या तालवादकाला व इतरही कोरस कलावंतांना पुण्यावरून मुंबईला आणीत. मैलाचा दगड असलेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत.. त्यामागची कहाणी सांगण्यासारखी आहे. गीतकार, संगीतकार व इनॉक यांच्या अलौकिक मेहनतीची कल्पना येते. शांतारामबापूंचा चिकित्सक स्वभाव, रामभाऊंची अथक कार्यशैली. सी. रामचंद्र यांच्या कडे इनॉक यांनी खूप काम केले. शंकर-जयकिशनकडे अॅीकॉर्डियनसाठी गुडी सिरवाई, धीरजकुमार, सुमित मिश्रा यांसारखे वादक असल्याने इनॉक यांनी त्यांच्याकडे मोजकेच काम केले. रेडिओ सिलोनवर ‘साज और आवाज’ या सात ते सव्वासातच्या सुमारास सकाळी कित्येक वर्षे इनॉक यांच्या अॅजकॉर्डियनवर वाजविलेल्या रचना वाजवल्या जातात. त्यांची सुरुवात कशी झाली याचा योगायोगही विलक्षण आहे. १९५५ ते ५७ मध्ये इनॉकने व्हॅन शिप्लेबरोबर आफ्रिकेचे अनेक दौरे केले.. तेथील संगीतप्रेमींना त्या दोघांचे वादन खूपच पसंत होते.. त्या वेळी तलत मेहमूद व सी. एच. आत्मा यांचेही कार्यक्रम होत. जानेवारी १९५७ ला भारतात परतताना इनॉक व शिप्ले भेटले. त्यांची लोकप्रियता आत्मानेही अनुभवली होती. भारतात आल्यावर सी. एच. आत्माने एचएमव्हीचे जनरल मॅनेजर चढ्ढांना इनॉकच्या वादनाच्या तबकडय़ा काढण्याची सूचना केली.. एचएमव्हीने त्यानंतर इनॉकच्या खूप गाण्यांच्या तबकडय़ा काढल्या. त्यांचा अभूतपूर्व खप रसिकांमध्ये झाला. इनॉक संयोजक म्हणून अपरिचित असलेल्या गानरसिकांना अॅणकॉर्डियन वादक इनॉकला मात्र आजही खूप जण ओळखतात. त्याच्या रेकॉर्ड्सही संग्रही आहेत. त्यांची रेकॉर्ड झालेली पहिली धून ‘सोलवा साल’मधील ‘है अपना दिल ते आवारा’ आहे. कानसेनांच्या दुनियेत रेडिओ सिलोनचे नाव अग्रगण्य आहे. त्यावर गोपाल शर्मा, विजयकिशोर दुबे नंतर आले. त्यांनी लोकप्रिय झालेल्या कितीतरी कार्यक्रमांची संकल्पना आखली. त्यामध्येच ‘साज और आवाज’ हा कार्यक्रम आहे.. होता वैशिष्टय़ संगीतकार गायक/वादकांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांनी गायलेली/ वाजवलेली/ संगीत दिलेली गाणी पूर्ण वेळ ऐकवली जातात. १६ एप्रिलला सिलोनने पूर्णवेळ इनॉक यांच्या पंच्याहत्तराव्या वर्षांच्या वाढदिवशी रेडिओ सिलोनने इनॉकचे वाद्यसंगीत ऐकवले व त्याचा फोन नंबर दिला. तलत महमूद, व्हॅन शिप्ले व इनॉकचे संयुक्त दौरे आफ्रिकेला झाले. अॅंकॉर्डियनमध्ये ‘गोरे गोरे, ओ बाके छोरे’ वाजवणाऱ्या रेगोला व शंकर-जयकिशनकडे वाजवणाऱ्या गुड्डी सिरवाईला ते गुरुस्थानी मानते.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ विलासदत्त राऊत

    इनॉक डॅनियल्स यांची वेबसाईट
    http://www.enochdaniels.com/about/

    इनॉक डॅनियल्स यांचे वादन
    https://www.youtube.com/watch?v=b57Ke-2Is0E
    https://www.youtube.com/watch?v=mnZM8ANG2Kc

      April 17, 2017