(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • महान पार्श्वगायक मुकेश

    १९४८ साली आलेल्या ‘आग’मध्ये राज कपूर यांच्यासाठी मा.मुकेश यांनी पार्श्वगायन केले. येथूनच मग राज कपूर-मा.मुकेश हे समीकरण जुळले आणि उदयास आली अवीट गोडीची श्रवणीय गाणी! आग, आवारा, श्री ४२०, बरसात, परवरिश, अनाडी, संगम ते मेरा नाम जोकर असे मा.मुकेश यांच्या सदाबहार गाण्यांनील नटलेले ‘आरके’ कॅम्पमधले चित्रपट म्हणजे कानसेनांना मेजवानीच ठरली.

  • चंद्रशेखर गाडगीळ

    चंद्रशेखर गाडगीळ

    रसिकांना आपल्या पहाडी तसंच खणखणीत स्वरांनी संगीतानुभव देणार्‍या चंद्रशेखर गाडगीळ यांचा जन्म पुण्याचा. लहानपणापासूनच राकट पण तितकाच श्रवणीय आवाज लाभलेल्या चंद्रशेखर गाडगीळ यांचे त्याकाळी बालगंधर्व यांनी भरभरुन कौतुक केले होते. पंडित हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, पंडित गोविंदप्रसाद जयपूरवाले, पंडित मनोहर चिमटे, पंडित सदाशिवराव जाधव यासारख्या दिग्गजांकडे त्यांनी गायनाचे शास्त्रोक्त धडे घेतले होते. ऑर्केस्ट्रा क्षेत्रमध्ये त्यांनी आपल्या गायना कारकीर्दीची सुरुवात केली. एका कार्यक्रमात संगीतकार राम कदम आलेले असताना त्यांनी गाडगीळ यांचा आवाज ऐकून ,चित्रपटात पाश्र्वगायनाची त्यांना संधी दिली.

    पुढे अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमधून एकापेक्षाएक सुरेल गाणी सादर करुन कानसेनांना अक्षरश: मंत्रमुगध केले. त्यांचे “कुदरत” चित्रपटातील “सुखदुख की हर एक माला” आणि “अशांती” चित्रपटातील “शक्ती दे मां” ही गीतं आज देखील रसिकांच्या मनात घर करुन आहे. तर मराठीत “निसर्गराजा ऐक सांगतो”, “कोण होतीस तू, काय झालीस तू”, “अजून आठवे ती रात पावसाळी”’, “अरे कोंडला कोंडला देव”, “दूर का तू साजणी”, “जाई ग जाई पांडोबा”, “पांडोबा पोरगी फसली पांडोबा ”, “माणसं रे माणसं”, “देवमानुस देवळात आला”, “अन्‌ हल्लगीच्या तालावर”, “अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत निसर्गात भरूनी राहे अनादि अनंत” ही गाडगीळ यांची आवाजातील गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली! तसंच ‘अष्टविनायक’ या मराठी चित्रपटातील “अष्टविनायका तुझा महिमा कसा” या गीतातील दोन कडवी गाडगीळ यांनी स्वरबद्ध केली होती.

    मराठीमध्ये राम कदम तर हिंदीत आर.डी.बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रवींद्र जैन अश्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले आहे. केवळ गायक म्हणूनच नव्हे तर संगीतकार म्हणूनही चंद्रशेखर गाडगीळ यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. हिंदी चित्रपटांमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रीत झालेल्या अनेक गाण्यांना गाडगीळ यांनी स्वरसाज चढवला आहे. मन्ना डे आणि महमद रफी यांच्या गायनातील सुरांची सर्फा आपल्याही गळ्यात यावी, यासाठी अभिजात संगीताबरोबरच उच्चार आणि शब्दफेक यांचा त्यांनी अभ्यास केला होता .

    गायिका रश्मी समवेत त्यांनी “रश्मी ऑर्केस्ट्रा”ची स्थापना केली. पुढे चंद्रशेखर गाडगीळ यांनी ‘स्कूल ऑफ म्युझिक’ या संस्थेची स्थापना केली. युवा संगीतकारांना, गायकांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कॉपीराईट्स, रॉयल्टी या संकल्पना युवा कलाकारांना पटवून सांगितल्या.

    “माणसापरिस मेंढरं बरी” या चित्रपटातील एका गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून चंद्रशेखर गाडगीळ यांना राज्य शासनाच्या पुरस्काराने, तर २०१० यावर्षीच्या “राम कदम कलागौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे

    खासदार विजय दर्डा यांच्या पत्नी आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा स्व.ज्योत्स्ना दर्डा यांच्या भजनांची ‘महावीर नमन’ ही कॅसेट चंद्रशेखर गाडगीळ यांनी संगीतबद्ध केली होती. या कॅसेटमधील भजने वैशाली सामंत, सुरेश वाडकर, साधना सरगम, आर. जैन आदी गायकांनी गायली आहेत. ही त्यांची शेवटची कॅसेट ठरली.

    २ ऑक्टोबर २०१४ या दिवशी चंद्रशेखर गाडगीळ त्यांच्या वयाच्या ६७व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात निधन झाले.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

    ( लेखन व संशोधन - सागर मालाडकर )

  • महान धावपटू फ्लाइंगसीख मिल्खासिंग

    महान धावपटू फ्लाइंगसीख मिल्खासिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.

    मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा स्थित शीख कुटुंबात झाला होता. मिल्खा सिंग यांनी आपल्या जीवनात ८० शर्यतीत भाग घेतला. त्यात ते ७७ वेळेस विजयी झाले. तीन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९५८ मधील कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटरच्या शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलं होतं. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली १९६० च्या रोम ओलिम्पिक स्पर्धेमुळे. त्या स्पर्धेत ४०० मीटरच्या शर्यतीत अगदीच सूक्ष्म फरकानं त्यांचं कांस्यपदक चुकलं होतं.

    रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर शर्यत ४५.७३ सेकंदांमध्ये पूर्ण केली होती. जर्मनीचा धावपटू कार्ल कूफमॅनपेक्षा ते सेकंदाच्या १०० व्या भाग एवढ्या कमी फरकानं मागं राहिले होते. पण त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ त्यानंतर पुढचे ४० वर्षं राष्ट्रीय विक्रम म्हणून कायम होती.मिल्खा कॉमनवेल्थ खेळात वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते.१९५८ च्या टोकियो इथं झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये मिल्खा सिंग यांनी २०० मीटर आणि ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर १९६२ च्या जकार्ता आशियाई स्पर्धांमध्ये ४०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण पदक जिंकलं होतं.

    लष्करात जाण्याची मिल्खा सिंग यांची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला; मात्र तीन वेळा त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांनी लष्करात जाण्याचा विचार सोडला. मिल्खा सिंग यांना 'फ्लाइंग सीख' हे नाव पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आयुब खान यांनी १९६० मध्ये दिले होते. त्या वेळी मिल्खा यांनी पाकिस्तानचा सुवर्णपदक विजेता अब्दुल खालिकला पाकिस्तानातच हरवले होते. मिल्खा सिंगच्या आई-वडिलांचा मृत्यू फाळणीदरम्यानच्या दंगलीमध्ये झाला. मिल्खा यांचे लग्न भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौरसोबत झाले. मिल्खा सिंग यांची पत्नी देखील एक खेळाडू होती. हे अनेक जणांना माहीत ही नसेल कदाचित. दोन महान खेळाडूंच्या मृत्यूमुळे क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. मिल्खा सिंह आणि त्यांची पत्नी निर्मला कौर यांची लव्हस्टोरी वेगळी आहे. मिल्खा सिंह हे पहिल्या नजरेतच निर्मला यांच्या प्रेमात पडले होते.

    मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजर ही खेळाच्या मैदानावरच भिडली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली. मिल्खा सिंग यांचं अनेक मुलींसोबतच्या अफेअरच्या चर्चाही गाजल्या होत्या. एक दोन नव्हे तर तीन मुलींसोबत मिल्खा सिंह यांचं नाव जोडलं गेलं होतं. या मुलींसोबत प्रेमाचे किस्सेही चांगलेच रंगले होते. मात्र मिल्खा यांचा जीव जडला तो मैदानावरच्या हॉलीबॉल खेळणाऱ्या राणीवर.

    1955 मध्ये श्रीलंकेमध्ये मिल्खा सिंग आणि निर्मला कौर पहिली भेट झाली होती. याच ठिकाणी दोघांची एकमेकांशी ओळखही झाली. मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ते पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिला असल्याचा किस्साही फार गाजला आहे.
    पहिल्या भेटीनंतर 1958 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा झाली. 1960 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाली. तेव्हा मिल्खा सिंग खेळातील मोठं नाव बनलं होतं. या काळात कॉफीसाठी एकत्र येताना त्यांचं प्रेम वाढत गेलं.

    दरम्यान या दोघांच्याही लग्नासाठी निर्मला कौर यांच्या घरातून मात्र विरोध होता. मिल्खा सिंग शिख असल्याने निर्मला कौर यांचे वडील दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे लग्नाच्या मार्गात अडथळा येत होता. अशावेळी पंजाबच्या तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.

    १९६२ मध्ये मिल्खा आणि निर्मला या दोघांचं लग्न झालं. मिल्खा सिंग यांनी अनेकदा आपल्या पत्नीचे जाहीरपणे कौतुक केलं केलं होतं. ते आपल्या बायकोला स्वतःची सर्वात मोठी ताकद मानत असत.

    त्यांचा मुलगा जीव सिंग गोल्फचा प्रसिद्ध खेळाडू आहे. भारत सरकारने त्यांना अर्जून पुरस्कार आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

    भाग 'मिल्खा भाग मिल्खा' हा चित्रपट मिल्खा सिंग यांच्या १९४६ ते १९६० पर्यंतच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. यात फरहान अख्तर यांनी मिल्खा सिंग यांचा अभिनय केला आहे. या वयात ही मिल्खा सिंग हे देशातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत असत. यासाठी सरकारनंही त्यांना मदतीचा हात दिला होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचं १३ जून २०२१ कोरोनामुळं निधन झाले होते.

    मिल्खा सिंग यांचे १८ जून २०२१ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • पत्रकार, नाटककार, लेखक, कवी आत्माराम सावंत

    पत्रकार, नाटककार, लेखक, कवी आत्माराम सावंत यांचा जन्म ७ मार्च १९३३ रोजी  हुमरस अण्हेरी, सिंधुदुर्ग जिल्हा येथे झाला. त्यांना नाटककार म्हणून अपार लोकप्रियता मिळाली. राजकारण गेल चुलीत–वरचा मजला रिकामा हि त्यांची नाटके खुप गाजली. १९९४ साली मालवण येथे भरलेल्या ७४व्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष राहिले होते.

  • इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार चार्ली चॅप्लिन

    इंग्लिश अभिनेता तसेच दिग्दर्शक व संगितकार मा.चार्ली चॅप्लिन यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ लंडन येथे झाला.

    पहील्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात जगभरातल्या सर्वात प्रसिद्ध सिनेतारकांपैकी एक आणि मुकपटांमध्ये विनोदी अभिनय करणारा कलाकार म्हणजे चार्ली चॅप्लिन. अभिनयासोबतच मुकपटांचे लेखन ही त्याची विशेष ख्याती होती. तो मुकपट करणारा अतिशय प्रख्यात तसेच रचनात्मक अभिनेता होता. चार्ली चॅप्लिन यांनी आपल्या करियरची सुरुवात वयाच्या ९ व्या वर्षी केली. शाळेत शिकता शिकता वडिलांच्या ओळखीनं चार्ली एका नृत्यपथकात दाखल झाला. या पथकातून फिरता फिरता, त्याचं शाळेकडे दुर्लक्ष होऊ नये याकडे त्याच्या आईचं लक्ष असायचं. पण आईच्या मानसिक आजारामुळे आणि एकूण परिस्थितीमुळे त्यानं १३ व्या वर्षीच शाळा सोडली. पोट भरण्यासाठी अनेक छोटी मोठी कामं केली, पण ही कामं करत असताना त्यानं आत्मविश्वास जराही ढळू दिला नव्हता, जो त्याच्या आईनं सतत त्याच्या मनावर बिबंवला. त्याच्यातला कलाकार तिनं जोपासला. त्या वेळच्या परिस्थितीबद्दल चार्ली यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय, ‘‘मला त्या परिस्थितीचे चटके फार कमी वेळा जाणवले, कारण आम्ही त्या परिस्थितीतून सतत वाटचाल करत होतो आणि लहान असल्यामुळे हा त्रास मी सहजच विसरून जायचो.’’ छोटी-मोठी कामं करतानासुद्धा तो कधीही आपल्या ध्येयापासून ढळला नाही. अभिनेता होण्याचं ध्येय कायम त्यानं आपल्या उराशी बाळगलं. त्यासाठी तो स्वत:चे बूट पॉलिश करायचा, कपडे साफ ठेवायचा, नाटक कंपन्यांना नित्य नेमाने संपर्क करत राहायचा.

    जेव्हा जेव्हा चार्लीच्या आईचं सादरीकरण असायचं, त्या रात्री त्याला भाडय़ाच्या घरात ठेवण्यापेक्षा ती त्याला स्वत:बरोबर नाटय़गृहात आणायची. स्वत: उपाशी राहून या मुलांना खायला द्यायची. त्याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर व्हायला लागला होता. चार्लीनं यशस्वी अभिनेता व्हावं ही तिची तीव्र इच्छा होती. या इच्छेपुढे त्यानं स्वत:समोर पर्यायही ठेवला नव्हता.

    स्वत:तल्या आत्मविश्वासामुळे अनेक वैशिष्टय़पूर्ण युक्त्या तो पडद्यावर साकारू शकला. पडद्यावरच्या मस्तमौला चार्लीचं आगळंवेगळं रूप होतं, ‘एक टाइट कोट, बॅगी पॅन्ट, छोटी हॅट आणि मोठे शूज, आणि हो, चेहऱ्यावरची त्याची ती छोटीशी मिशी.’ त्याने त्याचं हे रूप समजून उमजूनच ठरवलं होतं. त्याला त्याचं बाह्य़रूप संपूर्णपणे विरोधाभासी हवं होतं. ती छोटीशी मिशी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न लपवता वयातला मोठेपणा, परिपक्वता देऊ शकेल हा त्याचा अंदाज होता आणि त्याचं हे बाह्य़रूप त्याची ओळखच ठरलं. या व्यक्तिरेखेबद्दल त्याचं म्हणणं होतं, ‘‘ज्या क्षणी मी तो पोशाख केला, मेकअप केला, त्या क्षणी मी ते व्यक्तिमत्त्व अनुभवू लागायचो. मी त्याला ओळखायचो आणि रंगमंचावर असेपर्यंत तो माझ्यात भिनलेला असायचा.’’

    आयुष्याचं सार त्यानं पडद्यावर अनेक तऱ्हेनं जगापुढे मांडलं. खिल्ली उडवण्यासाठी दु:ख हे कारण असतं. खिल्ली उडवणे म्हणजे प्रतिकार करणे. निसर्गाच्या शक्तीपुढे स्वत:च्या हतबलतेतही आपण हसत राहिलं पाहिजे. प्रतिकूलतेचा हसत हसत सामना केला पाहिजे, नाही तर मानसिकरीत्या खचून जाल. म्हणूनच त्याच्या आयुष्याच्या जवळचा चित्रपट ‘द किड्’ याचं ओपिनग टायटल होतं, ‘‘अ पिक्चर विथ अ स्माइल अँड परहॅप्स अ टिअर.’’

    आईचं स्वप्न हेच आयुष्याचं अंतिम ध्येय मानत अंगच्या निर्वविाद कलागुणांनी जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू! मा.चार्ली चॅप्लिनने त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला गडाबडा लोळायला लावून हसवलं, पण त्याचबरोबर त्यानं डोळ्यात टचकन् पाणी आणून रडवलंही. विचार करायला लावलं. जागतिक पटलावर एक महानायक म्हणून वावरला! स्वत:तल्या आत्मविश्वासामुळे अनेक वैशिष्टय़पूर्ण युक्त्या तो पडद्यावर साकारू शकला. १९१५ मध्ये विश्व युद्धाच्या काळात कठीण परीस्थितीतही त्याने लोकांना हसवण्याचे मौल्यवान कार्य केले. २५ वर्षानंतर महामंदी आणि हिटलरच्या काळात देखिल त्याने लोकांना हसवण्याचे आपले कार्य थांबवले नाही. तो निरंतर लोकांना हसवत राहिला. लोकांना ज्याकाळात मनोरंजनाची आणि हास्याची अधिक गरज होती. त्याकाळात चार्ली चॅप्लिनने लोकांसाठीची उत्तम भुमिका बजावली. ह़ॉलिवुड मध्ये चार्ली चॅप्लिन यांचे बोलते चित्रपट द ग्रेट डिक्टेटर (१९४०),लाइमलाइट आणि मोसिओर वरडॉक्स हे चित्रपट आले होते. चार्ली चॅप्लिन यांचा “दिस इज माई सॉग” हा चित्रपट वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित करण्यात आला. त्यात ‘अ काऊंटेस फ्रम हांगकांग’ हा प्रथम श्रेणीतला होता. हा शेवटचा चित्रपट. १९७२ मध्ये अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. १९६४ मध्ये चार्ली चॅप्लिन यांनी त्यांचे आत्मचरीत्र प्रदर्शित केले. मार्टिन सिएफफ यांनी २००८ मध्ये “चॅप्लिन अ लाइफ” हे पुस्तक लिहिले. मा.चार्ली चॅप्लिन यांचे २५ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    चार्ली चॅप्लिन चित्रपट

    https://www.youtube.com/watch?v=1ZW820852ws
    https://youtu.be/ZNyttSbCUCU
    https://youtu.be/WZVp5v-cNak
    https://youtu.be/OUh7UTUZIXc
    https://youtu.be/-GYhvdRNKzg

  • दीपक पोलादे

    बांबूची तिरडी वापरण्याऐवजी अॅल्युमिनिअमची तिरडी वापरली तर? मृत्युनंतर सरसकट नदीत रक्षाविसर्जन करण्याऐवजी त्यासाठी स्वतंत्र कुंड तयार केले तर? धार्मिक क्रियाकर्मांबाबत अशी क्रियाशीलता दाखविणे भावनिक प्रश्नामुळे अवघड वाटते. पर्यावरणाचा प्रश्न अशावेळी थोडा मागे पडतो. कोल्हापूरचे दीपक पोलादे यांनी मात्र शेकडो वर्षे चालत असलेल्या आर्थिक चालीरीती, क्रियाकर्मे याबाबत पर्यावरणरक्षणाची एकखांबी चळवळच उभारली आहे.

    दीपक पोलादे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कर्म-क्रियाशील हा लेख पुढील पानावर वाचा.

    दीपक पोलादे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कर्म-क्रियाशील हा लेख वाचा.

    polade-deepak-modified

  • शिल्पकार नानासाहेब करमरकर (विनायक पांडुरंग करमरकर)

    आठ टन वजनाच्या आणि साडेतेरा फूट उंच छत्रपतींचा अश्र्वारूढ एकसंध 'पुतळा' बनवणारे शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर ऊर्फ नानासाहेब करमरकर यांचा जन्म २ ऑक्टोबर १८९१ रोजी रायगड जिल्ह्यातील सासवणे येथे झाला.

    त्यांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे चित्र काढण्याचा नाद असलेल्या करमरकरांना मूर्ती घडवण्याचेही शिक्षण घरीच मिळाले. गावातील देवळाच्या भिंतीवर त्यांनी काढलेले शिवाजी महाराजांचे चित्र पाहून ऑटो रॉथफिल्ड या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याने पुढाकार घेऊन त्यांना मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल केले.

    मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी कलकत्ता इथे स्टुडिओ थाटून व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्या काळात त्यांनी रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजनदास, महात्मा गांधी, पी.सी. रे प्रभृतींची व्यक्तिशिल्पे घडवली. त्यानंतर 'लंडन रॉयल अॅतकेडमी'मध्ये पुढील शिक्षणासाठी गेल्यावर त्यांना इटली, फ्रान्स, स्वित्झरलंड या देशांमधील कलाकृतींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच ब्राँझ कटिंग, 'स्टोन क्रशिंग' ही तंत्रेही आत्मसात करून १९२३ साली ते परतले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय सरकारने १९६२ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. नानासाहेब करमरकर यांचे निधन १३ जून १९६७ रोजी झाले.

    करमरकर यांची कलाकृती बघायच्या असतील तर अलिबागजवळच्या सासवणे गावातील 'करमरकर शिल्पालया'ला नक्की भेट द्या. सत्तरहून अधिक वर्ष जुन्या घरातच शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचं हे शिल्प संग्रहालय आहे. विविध व्यक्तींचे पुतळे, शेतकरी, कोळीण, कुत्रा, म्हैस असे खूप पुतळे हे त्यांच्या अंगणात प्रवेश करताच दिसू लागतात. आतमध्ये जवळ जवळ २०० हून अधिक लहान-मोठी शिल्पं पाहायला मिळतात. सगळी शिल्पं पाहून त्यांच्या कलेला दाद द्यावीशी वाटते.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #NanasahebKarmarkar #VinayakPandurangKarmarkar

  • नंदू भेंडे

    ज्या काळात मराठी घरांमध्ये पॉप आणि रॉक संगीत हे शब्द अनभिज्ञतेच्या किंवा विनाकारण हेटाळणीच्या सुरात उच्चारले जात, त्या काळात नंदू भेंडे यांनी छेडलेली मराठी रॉकची तार आज अन्य कितीतरी जणांमुळे झंकारत राहिली आहे.

  • अच्युत केशव अभ्यंकर

    अच्युत केशव अभ्यंकर

    अच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना व प्रचाराचा विडा उचललेल्या अभ्यंकरांनी आकाशवाणी येथे उच्च श्रेणीचे कलाकार म्हणून अनेक गाण्याचे कार्यक्रम केले.

  • भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेड कंपनीचे मालक हणमंतराव गायकवाड

    त्याकाळी सुमारे आठ कोटींचं साहित्य स्क्रॅप करण्याऐवजी त्यांनी तेच साहित्य दुसऱ्या कारला असेंबल करण्याचं ठरवलं. त्यांनी ते करुन दाखवलं. हणमंत गायकवाड यांच्या चाणाक्ष बुद्धीची चुणूक टाटा प्रशासनाला आली.