(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • दत्तात्रेय नरसिंह गोखले

  • अभिनेत्री पूर्णिमा

    अभिनेत्री पूर्णिमा यांचे खरे नाव ‘मेहर बानो’ होते. पूर्णिमा यांचे वडील हे मनमोहन देसाई यांचे वडील किकूभाई देसाई जे फ़िल्म डिस्ट्रीब्यूटर होते त्यांच्या ऑफिस मध्ये अकाऊंट्सचे काम बघत होते. पूर्णिमा यांची आई मुस्लिम होती. पूर्णिमा यांना चार बहिणी व एक भाऊ. पूर्णिमा यांची मोठी बहीण शिरीन यांनी १९३०च्या दशकात ‘बम्बई की सेठानी’, ‘पासिंग शो’, ‘ख़्वाब की दुनिया’, ‘स्टेट एक्स्प्रेस’ व ‘बिजली’ अशा चित्रपटात कामे केली होती.

  • तबल्याचे जादूगार उस्ताद अल्लारक्खा खान

    वयाच्या १२ व्या वर्षापासून अल्ला रक्खा खान यांच तबल्याशी नात दृढ झाल होते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९१९ रोजी फगवाल जम्मू येथे झाला. उस्ताद अल्ला रक्खा खान यांनी आपली कारकीर्द १९४० साली मुंबई आकाशवाणी चे स्टाफ़ आर्टिस्ट म्हणून केली. तेव्हा लोकांना तबला हे फक्त संगीतातील वाद्य आहे अशी धारणा होती. ही धारणा अल्ला रक्खा खान यांनी बदलली. १९४५ ते १९४८ हिंदी चित्रपटाला संगीत दिले पण ते बॉलीवूड मध्ये यशस्वी झाले नाहीत. उस्ताद अल्ला रक्खा खान यांनी बड़े ग़ुलाम अली ख़ाँ, उस्ताद अलाउद्दीन ख़ाँ, पंडित वसंत राय व पंडित रविशंकर यांना खूप वेळा तबल्याची साथ केली. उस्ताद अल्ला रक्खा खान यांनी भारत व विदेशात तबल्याला एक स्वतंत्र वाद्य म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. भारत सरकारने १९७७ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.१९८२ साली संगीत नाटक अकादमी अवार्ड त्यांना मिळाले होते. त्यांचे शिष्य त्यांना अब्बाजी म्हणत. उजवा तसेच डावा असे दोन्ही हातांचा उत्तम समन्वय साधत तबलावादन करणे ही अल्ला रक्खा खान यांची विशेषता होती. अल्ला रक्खा खान यांना तीन मुले, झाकीर हुसेन, फझल कुरेशी, तौफिक कुरेशी.

    झाकीर हुसेन आणि र्फ्क्युनिस्ट तौफिक कुरेशी लोकांना माहिती आहेत. पण तबलावादक फझल कुरेशी नेहमीच लो-प्रोफाइल राहिले आहेत. मुंबईत क्लासिकल संगीताची नवी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी ते पार पाडत आहे. जेव्हा जेव्हा पंजाब घराण्याची चर्चा होते तेव्हा उस्ताद अल्लारखा खान यांच्या नावाची चर्चा होते. उस्ताद अल्ला रक्खा खान यांचे ३ फेब्रुवारी २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • चंद्रकांत रघुनाथ गोखले

    चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते. मराठी अभिनेत्री कमळाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र मा.विक्रम गोखले हेदेखील अभिनेते आहेत. यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन,राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या. मा.चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. गदिमा लिखीत, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गीतरामायण या गीत काव्यातील १० व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. मा.चंद्रकांत गोखले यांचे २० जुन २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकिपीडिया

  • २२ जून १८९७…. गोंद्या आला रे…

    २२ जून १८९७. पुण्यात प्लेगची साथ सुरु असताना घराघरात घुसून आमच्या आया बहिणींच्या इभ्रतीवर हात टाकणाऱ्या रँड नावाच्या नराधमाचा चाफेकर बंधूनी वध करुन त्याला यमसदनी धाडले होते.

  • ऋचा पुजारी

    बुद्धिबळाच्या या खेळात अल्पावधीतच उत्तुंग झेप घेणाऱ्या ऋचा पुजारी या युवा खेळाडूचा मोठा वाटा आहे.

  • प्रख्यात भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे चापेकर

    नृत्यासाठी त्यांच्या आई-वडिलांचे उत्तेजन मिळाले, मेडिकलच्या अभ्यासक्रमास जाता येईल इतके मार्क पडूनही केवळ नृत्यातच करिअर करायचे, या दृढनिश्चेयाने त्या या क्षेत्राकडे वळल्या. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९४८ रोजी मुंबई येथे झाला.

    सुचेता भिडे यांचे शिक्षण मुंबईतील बालमोहन विद्यामंदिरात झाले. आचार्य पार्वतीकुमार आणि तंजावरचे गुरू के. पी. किटप्पा यांच्याकडे त्यांनी नृत्याचे शिक्षण घेतले. कला अधिक चांगली शिकता यावी म्हणून त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घेतला. त्या वेळी चित्रकलेच्या परीक्षा दिल्याशिवाय इकडे प्रवेश मिळत नसे. मग काय, एक वर्षाचा गॅप घेणे आले. तो त्यांनी घेतला आणि रीतसर चित्रकलेच्या परीक्षा दिल्या. त्या वर्षाच्या काळात त्यांनी पार्वतीकुमार यांच्याकडे नृत्याचेच केवळ धडे गिरवले.

    संपूर्ण वर्ष केवळ नृत्याचाच विचार, ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब होती. आज कधीही त्या वर्षाची आठवण आली, की पुन्हा लहान व्हावे आणि ते वर्ष जगावे, असे सुचेता भिडे सहजतेने लिहून जातात. सकाळी सात ते सायंकाळी सात, त्या नृत्याच्याच विश्वाीत असत. सुचेता भिडे चापेकर यांनी भारतात व भारताच्या बाहेर अनेक नृत्याचे कार्यक्रम केले आहेत, त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. पुणे महापालिकेने रोहिणी भाटे यांच्या नावाने दिला गेलेला २०१५ सालचा ’स्वर्गीय गुरू पंडिता रोहिणी भाटे पुरस्कारही मिळाला आहे. सुचेता भिडे-चापेकर यांनी केलेली नृत्यगंगा ही नृत्य शैली ही कला क्षेत्राला दिलेली मोठी देणगी आहे.

    सुचेता भिडे-चापेकर यांची कलावर्धिनी ही संस्था आहे. ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ ही भरतनाट्यम् या विषयासाठी वाहून घेतलेली संस्था आहे. नृत्यात्मिका हे त्यांचे आत्मचरित्र वाचण्यासारखे आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ अभिनेते जॉय मुखर्जी

    लव्ह इन टोकियो', "शागीर्द', "लव्ह इन सिमला', "जिद्दी', "एक मुसाफिर एक हसीना' अशा गाजलेल्या चित्रपटांनी रसिकप्रिय झालेले जॉय मुखर्जी यांचे वडील शशधर मुखर्जी हिंदी चित्रपटनिर्माते होते; अंधेरीतील फिल्मालय स्टुडिओ त्यांच्या मालकीचा होता. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९३९ रोजी झाला."लव्ह इन सिमला' हा जॉय मुखर्जी यांचा पहिला चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटातील "रोमॅंटिक' नायकाच्या भूमिकेमुळे ते प्रसिद्ध झाले. पुढे त्यांच्या वडिलांनी "हम हिंदुस्थानी' आणि "एक मुसाफिर एक हसीना' असा "डबल बार' उडवून दिला. जॉय मुखर्जी यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले; त्यातून त्यांची "स्टाईल' निर्माण झाली. ते साठच्या दशकातील लोकप्रिय अभिनेते होते. "लव्ह इन टोकियो' या चित्रपटानंतर आलेला "सांज और आवाज' हा चित्रपट फारसा चालला नाही. अभिनय करत असतानाच, त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली, तसेच दिग्दर्शनही केले. माला सिन्हा आणि शर्मिला टागोर यांना घेऊन "हमसाया' हा चित्रपट त्यांनी बनवला. मात्र चकवा देणारे कथानक आणि नायिकांतील वादामुळे या चित्रपटाला "बॉक्स ऑफिस'वर चांगली कामगिरी करता आली नाही. "सांझ की बेला' आणि "उम्मीद' या चित्रपटांचीही त्यांनी निर्मिती केली."बहुत शुक्रिया, बडी मेहरबानी', "ओ मेरे शाहे खुबा, ओ मेरी जाने जनाना', "वो है जरा खफा खफा', "बडे मिया दीवाने' अशी त्यांची गाणी अत्यंत गाजली आहेत. मा.जॉय मुखर्जी यांचे ९ मार्च २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी

    मौसमी चॅटर्जी यांचे खरे नाव इंदिरा. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९४८ रोजी झाला. १९६७ मध्ये बंगाली दिग्दर्शक तरुण मजुमदार यांच्या बालिका वधू या सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर १९७२ मध्ये रिलीज झालेल्या 'अनुराग' या सिनेमाद्वारे मौसमी यांच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली. 'कच्चे धागे', 'जहरीला इंसान', 'स्वर्ग नरक', 'फूल खिले हैं गुलशन गुलशन', 'मांग भरो सजना', 'दासी', 'अंगूर', 'घर एक मंदिर', 'जल्लाद' हे त्यांचे काही निवडक गाजलेले सिनेमे आहेत. मौसमी आणि विनोद मेहरा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंत केले. याशिवाय जितेंद्र, संजीव कुमार, राजेश खन्ना, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतही मौसमी यांनी काम केले. मा.मौसमी चॅटर्जी या प्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांच्या सुनबाई. मौसमी चॅटर्जी यांच्याविषयी म्हटले जाते की, रडण्याचे दृश्य त्या अगदी सहज करायच्या. यासाठी त्यांना ग्लिसरीनची आवश्यकता भासत नव्हती. याविषयी त्या एका मुलाखतीत म्हणतात, ''होय हे खरं आहे. हे देवाने दिलेले एक वरदान आहे. जेव्हाही मी रडण्याचे दृश्य करायची, तेव्हा ती घटना आपल्यासोबत प्रत्यक्षात घडतेय असं मला वाटायचं, त्यामुळे आपोआप डोळ्यात अश्रू तरळायचे.'' मौसमी चॅटर्जी यांची मुलगी मेघा चॅटर्जीही रुपेरी पडद्यावर आली आहे. 'रुसलान' या चित्रपटाद्वारे ती हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी समीक्षक व विचारवंत दिनकर केशव बेडेकर

    नवकाव्य”,”नवकथा”,”सौंदर्यमीमांसा”,”अस्तित्ववाद”,”चित्रकलेतील नवप्रवाह” अशा वेगवेगळ्या विचारप्रणालींचे उत्खनन करून त्यात आपल्या बुध्दीचा व तात्विक निकषांचा अर्क टाकून त्याचा अर्थ सुध्दा रसिकां पर्यंत पोहोचविला. दिनकर बेडेकरांच्या लेखणीने त्यांच्या नियमित वाचकांच्या मनातील प्रगल्भ विचारांची दालने उघडण्याचा सदैव प्रयत्न केला, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.