(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सई परांजपे

    रँग्लर परांजपे यांची नात तर शकुंतला परांजपे यांची कन्या असलेल्या सई परांजपें यांना साहित्याचा आणि लेखनाचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचा जन्म १९ मार्च १९३८ रोजी झाला.त्या शाळेत शिकत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. मुलांचा मेवा हे त्यांचे पुस्तक १९४४ साली त्यांच्या वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांचं बरचसं लेखन हे लहान मुलांसाठी लिहिलेलं आहे. त्यांची बालनाट्येही अतिशय गाजली. अनेक बालनाट्यांना पुरस्कारही लाभले. लहान मुलांच्या मनाच्या पातळीवर येऊन त्यातील बाल्य हेरून त्या बाल्याचे सहज रूप रंगभूमीवर उभे करून आणि त्यात बालप्रेक्षकांना गुंगवून ठेवणे हे काम दिसतं तेवढं सोपं नाही त्यासाठी सिद्धहस्त लेखक आणि जातिवंत कलावंत असण्याची नितांत आवश्यकता आहे आणि ही भूमिका आयुष्यभर मा.सई परांजपे यांनी उत्कृष्टपणे साकार केली. त्यांच्या काही बालनाट्याची नावं जरी वाचली तरी आपले बाल्य आपल्या डोळ्यापुढे उभे राहते. शेपटीचा शाप, जादूचा शंख, झाली काय गंमत, पत्तेनगरी, भटक्यांचे भविष्य, हरवलेल्या खेळण्यांचे राज्य, जास्वंदी, माझा खेळ मांडू दे ही त्यांची काही गाजलेली बालनाट्य. याबरोबरच चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही त्यांना चांगलेच यश मिळाले. जादू का शंख आणि सिकंदर हे दोन बालचित्रपट चांगलेच गाजले. तर बालचित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी दिग्दर्शित केलेले चष्मेबद्दूर, स्पर्श आणि कथा हे चित्रपटही त्यांचा प्रभाव दाखवून गेले. याही चित्रपटात त्यांनी सहजतेतून सौंदर्य साधले होते आणि त्यामुळे एक कलात्मक चित्रपट म्हणून ते प्रेक्षकांना आवडून गेले. हिंदी सिनेसृष्टीतील एक क्लासिक सिनेमा म्हणजे 'चष्मे बद्दूर'. सई परांजपे यांचं दिग्दर्शन, फारूख शेख, दीप्ती नवल यांचा सहज सुंदर अभिनय, यामुळे हा सिनेमा सिनेरसिकांच्या 'ऑल टाईम फेव्हरेट कलेक्शन'मध्ये आजही गणला जातो. त्यांच्या स्पर्श या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार लाभले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    सई परांजपे यांचे चित्रपट, कथा
    https://youtu.be/nLos9zq0FhQ

    चष्मेबहादुर

    https://youtu.be/BsHd1EGA46A

    साझ
    https://youtu.be/zc9rozVQQ4I

  • नरेंद्र बल्लाळ

    बल्लाळ, नरेंद्र

    नरेंद्र बल्लाळ यांनी ऐन आणीबाणीच्या काळामध्ये, “ठाणे वैभव“ नावाचे दैनिक काढण्याचा जो निर्णय घेतला होता, तो त्या काळातील एकंदर राजकीय “घडामोडी पाहता अत्यंत धाडसाचा होता. ठाण्याच्या सार्वजनिक जीवनावर वेगळा ठसा उमटवित, ह्या दैनिकाने घेतलेली प्रगतीची गरूडभरारी नक्कीच वाखाण्यासारखी आहे. ठाण्यातील विविध क्षेत्रांमधील अचूक नोंद करणारे विश्वासार्ह दैनिक अशी या दैनिकाची किर्ती आहे. जिल्हा दैनिक सुरू करण्यासाठी नरेंद्र बल्लाळांनी महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातील नोकरी सोडून , हे वृत्तपत्र सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.

    सध्या त्यांचे चिरंजीव मिलिंद बल्लाळ व नातू निखील बल्लाळ हे नव्या संकल्पना आणिव्यावसायिक गणितांची आखणी करुन नरेंद्र बल्लाळ यांचा वारसा पुढे चालवीत आहेत.

  • पं. कृष्ण गुंडोपंत उर्फ के. जी. गिंडे

    १९६२ मध्ये ते वल्लभ संगीत विद्यालयाचे प्राचार्य पदी नियुक्त झाले. एक उत्तम शिक्षक, विद्वान, गायक व संगीत रचनाकार अशा विविध भूमिका त्यांनी निभावल्या. त्यांनी कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीतही ज्ञानदानाचे कार्य केले.

  • सुप्रसिद्ध बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय

    साहित्याचे विविध प्रकार हाताळलेल्या सुनील गंगोपाध्याय यांचे खरे प्रेम कवितेवरच होते. दोनशेहून अधिक ग्रंथसंपदा असलेल्या गंगोपाध्याय यांनी कथा, कादंबरी, नाटक, टीका, प्रवासवर्णन, बालसाहित्य असे विविध साहित्यप्रकार लिलया हाताळले.

  • बाळासाहेब गंगाधर खेर

    बाळासाहेब गंगाधर खेर

  • प्रा. रावसाहेब रंगराव बोराडे

    कथा-कादंबरीकार प्रा. रावसाहेब रंगराव बोराडे यांचा २५ डिसेंबर १९४० रोजी जन्म झाला. 'पेरणी, मळणी, राखण, खोळंबा' मिळून १५ कथासंग्रह. तसेच 'पाचोळा, सावट, चारापाणी, आमदार सौभाग्यवती' या कादंबर्‍या. 'पिकलं पान, विहीर' ही नाटके आणि काही बालसाहित्य त्यांच्या नावावर आहे.

  • प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक पं. वामनराव सडोलीकर

    पं. वामनराव सडोलीकर यांच्याबद्दल आजच्या पिढीला काही माहित नाही, पण मागच्या दोन पिढ्या मात्र जरूर त्यांची आठवण काढतात. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९०७ रोजी कोल्हापूरपासून जवळच कोथळी गावी झाला. पं. वामनराव सडोलीकर यांना घरात भाऊ म्हणत. फार लहान वयात घर सोडून मुंबई आणि नाशिकला पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या 'गांधर्व महाविद्यालया'त मा.पं. वामनराव सडोलीकर दाखल झाले. अल्पकाळ घरी कोल्हापूरला राहून पुन्हा, अल्लादिया खाँसाहेब शंकरराव सरनाईक यांना तालीम देताना त्यांचं गाणं ऐकता येईल; या मोहाने १९२५ ला 'यशवंत नाटकमंडळी'त भाऊ नायक झाले. तो काळ त्यांना संगीतातली दृष्टी, ऐकलेली तालीम प्रत्यक्षात आणण्याचं धाडस आणि परिणामी प्रसिद्धी देणारा ठरला. पं. वामनराव सडोलीकर यांनी संगीत सम्राट अल्लादिया खाँसाहेबांच्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचा फार लहान वयात ध्यास घेतला. त्यांना मनोमनी आराध्यदैवत मानलं. काही कारणांमुळे खाँसाहेबांनी ब्राह्मणाला शिकवणार नाही अशी शपथ घेतली होती. त्यामुळे भाऊंनी त्यांचे सुपुत्र उस्ताद भूजीर्खाँ यांचा गंडा बांधला. कालांतरानं भूजीर्खाँ प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबई सोडून कोल्हापूरला गेले. जाताना थोरल्या खाँसाहेबांकडे पं. वामनराव सडोलीकर यांना सुपूर्द करून म्हणाले, 'अब्बाजी, वामनराव आपले आहेत. आता आपण त्यांना तालीम द्या.' अल्लादियाखाँना भाऊंचा परिचय नव्यानं करून द्यायची जरुरी नव्हती.

    कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात भूजीर्खाँ सेवा करीत, तर भवानी मंडपात छत्रपतींच्या कुलस्वामिनीची अल्लादिया खाँ संगीत सेवा करीत. भाऊंचे वडील (दादा) दत्तोपंत माधव कुलकणीर् (सडोलीकर) स्वत: उत्तम सतार वाजवीत. ते रागदारीचे जाणकार होते. लहानग्या वामनला घेऊन ते संगीतसेवेच्या वेळी दोन्ही देवळात हजर असत. एवढंच नव्हे, तर छत्रपतींच्या कुटुंबातील व्यक्तींच्या छत्र्या (स्मारकं) असत तिथे त्यांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात भूजीर्खाँ गात असत. याही ठिकाणी दादा भाऊंना घेऊन ऐकायला हजर असत. काळासावळा तरतरीत लहान मुलगा आणि त्याचे गोरेपान उंच वडील खाँसाहेबांना परिचित झाले होते. नाटककंपनीत असताना शंकरराव सरनाईकांची तालीम ऐकून तिचे पडसाद वामनच्या नाट्यपदातून उमटताना, त्याच्या तानांच्या लडीवर लडी ऐकून बेभान झालेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केलेला पाहून खाँसाहेबांना आपली तालीम ऐकून ऐकून हुबेहूब उचलणारा एकलव्य दिसला होता. काही वेळा खाँसाहेब भाऊंना रियाजाच्या आणि तानांच्या बाबतीत सूचना देत. केलेल्या रियाजावर टिप्पणी करत. पण त्या काळात गंडाबंधनाबद्दल विचार करणं भाऊंना शक्यच नव्हतं. कारण गंडाबंधनाची दक्षिणा होती रुपये दहा हजार! कलदार सुरती रुपये! आपल्या वडिलांवर असा भार टाकणं भाऊंच्या कल्पनेबाहेरचं होतं. आधीच गाणं शिकण्यासाठी घरापासून दूर राहिल्यामुळे आणि शिरस्त्याप्रमाणे शाळा न शिकल्याबद्दल आजूबाजूच्या लोकांनी आईवडिलांना टोमणे मारलेले होते. त्यामुळे खाँसाहेबांचं कंपनीतलं वास्तव्य ही भाऊंच्या दृष्टीनं मोठी पर्वणी होती.

    खाँसाहेब कधीकधी फिरायला जाताना भाऊंना घेऊन जात. फिरता फिरता त्यांचे काही अनुभव, कधी उपदेश, कधी त्या दिवशी भाऊंचा ऐकलेला रियाज यावर टिप्पणी करून खाँसाहेब सूचना करीत. ते दिवस भाऊंनी हृदयात जपून ठेवले होते. खाँसाहेब आणि त्यांचं कुटुंब हे भाऊंनी जन्मभर पुण्य मानलं. पं. पलुस्कर यांच्या सहवासात मिळालेलं 'रामनाम-धन', 'शिस्तीचे पाठ', 'रामायणावर भक्ती' आणि 'स्वरसाधनेचा मूलमंत्र' हे देखील मा.पं. वामनराव सडोलीकर यांच्या आयुष्याला स्थिरता देणारं ठरलं. सुदैवानं दोन्ही गुरू एकाच मार्गाचे प्रवासी होते. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही प्रवाहांचं त्यांच्या आयुष्यात अचल अधिष्ठान होतं. त्यामुळे कुठेही वैचारिक द्वंद्वात सापडून दिशा भ्रष्ट होण्याचा धोका भाऊंच्या आयुष्यात आला नाही. गुरू सच्चरित्र, स्थितप्रज्ञ आणि सर्वार्थानं मोठा असणं हे फार मोठं भाग्य असतं. भाऊंना हे सद््भाग्य लाभलं आणि त्यांच्यामुळे आम्हालाही तो आशीर्वाद लाभला. मा.पं. वामनराव सडोलीकर यांनी नाट्यकलेची सेवा नायक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक या रूपात केली. अनेक होतकरूंना ही कला शिकवली. आपल्या स्थानावरून न उठता केवळ भूमीसंवाद आणि त्यामागचा विचार समजावून देऊन ते कलाकारांकडून उत्कृष्ट काम करून घेत.

    मैफलीत गायला बसले आणि आवाज लागला नाही अशी त्यांनी कधीच तक्रार केली नाही. खाँसाहेबांनी भूजीर्खाँ, मंजीखाँ आणि बडेजींना जे आपल्या गायकीचं मर्म समजावून दिलं ते भाऊंनाही दिलं. तालाचा विचार अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून करून सर्वसामान्य रागही कसे अभिनव रीतीनं सोडवायचे आणि मांडायचे, अवघड राग कसे उलगडायचे याची मर्मभेदक दृष्टी भाऊंना मिळाली आणि श्रोत्यांच्या अनुनयासाठी कोणताही समझौता न करता शुद्ध गायकीच भाऊंनी मैफलीतून सतत मांडली. त्या काळी साधं पांढरं धोतर, स्वच्छ, कडक इस्त्रीचा पांढरा झब्बा किंवा शर्ट-कोट, माथ्यावर टोपी (बुलबुले आणि कं. कोल्हापूर यांच्याकडून खास बनवलेली) हा त्यांचा वेष त्यांची ओळख बनला होता. आज जरासं नाव झालं की कलाकार 'पंडित किंवा उस्ताद' होतात. आता अधिक शिकायची आपल्याला गरज नाही, असं त्यांना वाटतं. पण भाऊंनी आपलं उत्तरायुष्यही शिकण्यात-शिकवण्यात व्यतीत केलं. त्यांच्या वैयक्तिक गरजा इतक्या माफक होत्या की त्या गरजांसाठी आपल्या मूल्यांशी तडजोड करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. त्यांचा स्वभाव येणाऱ्या प्रसंगातून किंवा अनुभवातून सकारात्मक विचार जोडणारा होता. दु:खानं पिचून जाणं किंवा निराशेनं दैवाला दोष देणं त्यांनी कधी केलं नाही.

    रागीट होते, पण त्यांचा राग समोरच्याचा मनोभंग करणारा, त्याच्या व्यक्तित्त्वाला जाळून टाकणारा नव्हता. पं. वामनराव सडोलीकर आपले गुरू उस्ताद अल्लादिया खान यांनी स्थापन केलेल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीने गायन करत असत. किशोरवयात त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्याकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढच्या काळात त्यांनी हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण जयपूर-अत्रौली घराण्याच्या उस्ताद भुर्जी खान व उस्ताद अल्लादिया खान यांचेकडे घेतले. त्यांच्या शिष्यांत बंधू मधुकर सडोलीकर, कन्या श्रुती सडोलीकर-काटकर आणि मंजिरी आलेगांवकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. ‘पं. वामनराव सडोलीकर फौंडेशन’ तर्फे वामनराव सडोलीकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरांजली अर्पित केली जाते. गानसम्राज्ञी श्रृती सडोलीकर आपले वडिल मा. वामनराव सडोलीकर यांच्या स्मरणार्थ दर वर्षी कार्यक्रम करुन त्यांना श्रध्दांजली वाहतात. पं. वामनराव सडोलीकर राहात असलेल्या दादरच्या हिंदु कॉलनीतील चौथ्या रस्त्याला मुंबई महानगर पालिकेने पं. वामनराव सडोलीकर यांचे नाव दिले आहे. वामनराव सडोलीकर यांचे २५ मार्च १९९१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ श्रृती सडोलीकर

  • माझी माणसं – बनुचा बाबा

    तर हा असा ‘ बनूचा बाबा ‘ . बिन चेहऱ्याचा , बिन अस्तित्वाचा ! ‘बनूचा बाबा ‘ या पलीकडे त्याला आयडेंटिटी नाही ! कसलीही महत्वकांक्षा नाही , तो जगतो तो फक्त बनू साठी !

  • मल्टीस्टारर चित्रपटांचे निर्माते गुलशन राय

    मल्टीस्टारर चित्रपटांचे निर्माते गुलशन राय यांचा जन्म २ मार्च १९२४ रोजी झाला.

    गुलशन राय यांचे नाव बॉलीवूडमध्ये एक चित्रपट निर्माते म्हणून स्मरणात ठेवले जाते ज्यांनी त्यांनी निर्मिती केलेल्या मल्टीस्टारर चित्रपटांमधून प्रेक्षकांमध्ये एक विशेष ओळख निर्माण केली. गुलशन राय यांनी वितरक म्हणून करिअरची सुरुवात केली. गुलशन राय यांनी त्यांच्या त्रिमूर्ती फिल्म्स बॅनर खाली १९७० मध्ये आलेल्या जॉनी मेरा नाम या चित्रपटातून निर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

    'जॉनी मेरा नाम' मध्ये देवानंद, हेमा मालिनी, प्राण, प्रेमनाथ, आय एस जोहर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला हा चित्रपट तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.१९७३ मध्ये गुलशन राय यांनी पुन्हा एकदा देवानंद आणि हेमा मालिनी यांच्या जोडीने जोशिलाची निर्मिती केली. यश चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट तिकीट खिडकीवर विशेष कामगिरी दाखवू शकला नाही.

    १९७५ साली प्रदर्शित झालेला 'दीवार' हा चित्रपट गुलशन राय यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये गणला जातो.
    यश चोप्रा दिग्दर्शित 'दीवार' या चित्रपटातून दोन्ही भावांमधील द्वैत उत्तम प्रकारे मांडण्यात आले. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यातील संघर्ष पाहण्यासारखा होता. हा चित्रपट तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला, त्याचप्रमाणे निरुपा रॉयलाही आईच्या भूमिकेसाठी खूप प्रसिद्धी मिळाली.

    १९७७ मध्ये गुलशन राय यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना घेऊन 'ड्रीमगर्ल'ची निर्मिती केली होती. 'ड्रीमगर्ल'ही तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.१९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'त्रिशूल' चित्रपटाद्वारे गुलशन राय यांनी अनेक मल्टीस्टारना एकत्र आणले. या चित्रपटात संजीव कुमार, वहिदा रहमान, अमिताभ बच्चन, शशी कपूर, हेमा मालिनी, राखी, पूनम ढिल्लन, सचिन, प्रेम चोप्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

    यश चोप्रा दिग्दर्शित 'त्रिशूल'मध्ये गुलशन राय यांनी पिता-पुत्रांमधील संघर्ष रुपेरी पडद्यावर आणला. 'त्रिशूल' तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.१९८२ साली प्रदर्शित झालेला 'विधाता' हा चित्रपट गुलशन राय यांच्या कारकिर्दीतील यशस्वी चित्रपटांमध्ये गणला जातो. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटाने पुन्हा एकदा सुपरस्टार्सची फौज उभी केली. 'विधाता'मध्ये दिलीप कुमार, संजीव कुमार, शम्मी कपूर, संजय दत्त, पद्मिनी कोल्हापुरी, सुरेश ओबेरॉय आणि अमरीश पुरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
    १९८५ मध्ये गुलशन राय यांनी 'युद्ध'ची निर्मिती केली होती. त्यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांचा मुलगा राजीव राय यांच्याकडे सोपवली. 'युद्ध'ला तिकीट खिडकीवर सरासरी यश मिळाले.१९८९ मध्ये गुलशन राय यांनी आणखी एक मल्टीस्टारर चित्रपट 'त्रिदेव' तयार केला. राजीव राय दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल, नसीरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित, संगीता बिजलानी, अमरीश पुरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.

    यानंतर गुलशन राय यांनी मोहरा आणि गुप्ता सारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. गुलशन राय यांचे ११ ऑक्टोबर २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • एफ. एम. रेडिओचे संशोधक ई एच आर्मस्ट्राँग

    आर्मस्ट्रॉंगनं डेव्हिड सारनॉफच्या साथीत अनेक संशोधनं केली. त्यांनी मिळून पहिला ‘पोर्टेबल’ रेडिओसुद्धा बनवला. त्यांच्या कंपनीतल्या एका सेक्रेटरीशीच आर्मस्ट्रॉंगनं लग्न केलं. यानंतर आर्मस्ट्रॉंगचा द फॉरेस्टशी पेटंटवरून लढा सुरू झाला. खरं म्हणजे द फॉरेस्टचा यात पराभव होईल असं वाटत होतं. कारण द फॉरेस्टनं सांगितलेल्या काही गोष्टी आणि कागदपत्रांमधल्या नोंदी तसंच साक्षीदारांची जबानी या सगळ्यांमध्ये खूप तफावत होती.