जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
उदयशंकर चौधरी ऊर्फ उदयशंकर मुळचे नाराली गावचे. त्यांचे वडिल जमीनदार होते. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९०० रोजी राजस्थान मधील उदयपुर येथे झाला.हारचौधरी ही त्यांना पदवी होती. पुढे चौधरी हेच रुढ झाले. त्यांचे वडिल संस्कृतचे पंडित होते. त्यांना तीन लहान भावंड होती. राजेंद्रशंकर, देवेंद्रशंकर, भुपेंद्रशंकर व रवीशंकर. पैकी रवीशंकर हे पुढे जगप्रसिद्ध सतार वादक झाले. मा.१९१८ साली शिक्षणा साठी मुंबई जेजे स्कुल ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला.पुढे गंधर्व महाविद्यालयातही शिक्षण घेतले. १९२० साली लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला .
तीथे भारतीय नृत्य व पाश्चात्य नृत्य यांचा सखोल अभ्यास करुन दोन्हीचे फ्युजन केले.
१९३१ साली पँरीस येथे Indian Dance Academy ची स्थापना केली.
जानेवारी १९३३ ला ते अमेरिकेत गेले. न्युयॉर्क मधे पहिला शो झाला. त्या नंतर अमेरिकेतील ८४ शहरात त्यांचे शो झाले. १९६२ साली ' संगीत नाटक अकादमी ' चा पुरस्कार त्यांना मिळाला. १९६५ साली कोलकाता येथे त्यांनी Udayshankar center for dance या संस्थेची स्थापना केली. १९७१ साली भारताच्या सरकारने त्यांना पद्मविभुषणने सन्माननीत केले. संपुर्ण युरोप, अमेरिका ,रशिया सह जगातील अनेक देशात त्यांचे नृत्याचे कार्यक्रम झाले.
त्यांना दोन अपत्य ,आनंदशंकर व ममताशंकर.
आनंदने न्रत्यातच आपले करियर केले. तर ममताने अभिनयात आपला ठसा ऊमटवला.
सत्यजीत रे, मृणाल सेन सारख्या दिग्दर्शका सोबत काम केले. ममताने हॉलीवुड चित्रपटात बालकलाकार म्हणुन काम केले.
बहुदा ती पहिली भारतीय, हॉलीवुड चित्रपटात काम करणारी कलाकार असावी.
उदयशंकर यांच्या कलेने भारतीय न्रुत्य जगभर प्रसिद्ध झाले. उदयशंकर यांचे निधन २६ सप्टेंबर १९७७ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मराठी साहित्यातील मानदंड ठरलेले त्यांचे सत्यकथा हे मासिकही अत्यंत लोकप्रिय होते. त्यातील कथांची निवड भागवतांकडून अतिशय तावून सुलाखून व्हायची व मगच त्या कथा छापखान्याकडे जायच्या.
‘सिंहासन’ या सिनेमात अरूण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, दत्ता भट, सतीष दुभाषी, रिमा लागू, लालन सारंग, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते. ३० वर्ष त्यांनी पत्रकारिता केली.
गुलशन बावरा यांचे मूळ नाव गुलशन कुमार मेहता. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९३७ रोजी झाला. त्यांचे वडील बांधकाम संबंधित व्यवसाय करीत होते. गुलशनदांचे आयुष्यच मुळी लहानपणापासून संकटांनी घेरलेले होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोरच आई वडिलांची हत्या झाली. त्यानंतर भेदरलेल्या गुलशन बावरा यांनी त्यांच्या लहान भावासकट एका छावणीत आश्रय घेतला आणि त्यानंतर माघारी परतणाऱ्या जमावाबरोबर ते भारतात आले. तेथून ते जयपूरमधल्या आपल्या बहिणीच्या घरी आले. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास जयपूरमधूनच सुरू झाला.
नंतर गुलशन बावरा यांनी दिल्लीस येऊन मॅट्रिक आणि दिल्ली विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली होती.
पदवी मिळाल्यानंतर त्यांनी रेल्वेत नोकरीसाठी अर्ज केला. रेल्वे भरती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना कोटा येथे नियुक्ती देण्यात आली, पण जेव्हा ते कामावर हजार होण्यास कोट्याला पोहचले तर ती जागा अगोदरच भरलेली होती. मग त्यांना मुंबईस पुनर्नियुक्ती देण्यात आली आणि अशा तऱ्हेने ते माया नगरीत दाखल झाले.
१९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चंद्रसेना या चित्रपटाद्वारे त्यांना ब्रेक मिळाला. या चित्रपटातील त्यांनी लिहिलेले मैं क्या जानूँ कहाँ लागे ये सावन मतवाला रे हे गीत लता मंगेशकरांनी गायले. या चित्रपटाला कल्याणजी-आनंदजी या द्वयींचे संगीतदिग्दर्शन लाभले. त्यांनी १९६१ साली नोकरी सोडून दिली.चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असले तरी गुलशनदांना गीतकार म्हणून खरी मान्यता मिळाली ती सट्टा बाजार या चित्रपटाद्वारे. चित्रपटसृष्टीत अगदी नवखे असल्याने त्यांची वेषभूषा ही गबाळ्यासारखी होती. त्यामुळे या चित्रपटाचे वितरक असणाऱ्या शांतिभाई पटेल यांनी त्यांचे नामकरण बावरा असे केले. तेव्हापासून ते गुलशन बावरा या नावाने ओळखले जाऊ लागले.
चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी गुलशनदा केवळ वीस वर्षांचे होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ २४० गाणी लिहिली आहेत. पैकी कल्याणजी-आनंदजी ह्या संगीतकारांसाठी गुलशन बावरा यांनी एकूण ६९ गाणी लिहिली तर आर. डी. बर्मन यांच्यासाठी १५० गाणी लिहिली.त्यांना मेरे देश की धरती आणि यारी है इमान मेरा या गाण्यांसाठी दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. मेरे देश की धरती (उपकार), यारी है इमान मेरा (जंजीर), अगर तुम ना होते (अगर तुम ना होते), वाद कर ले साजना ( हाथ की सफाई), कस्मे वादे निभायेंगे हम (कस्मे वादे) ही काही त्यांची गाजलेली गीते. गुलशन बावरा यांचे ७ ऑगस्ट २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
एन. दत्तांचं नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी, तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ सारख्या मराठी चित्रपटांची मालिकाच डोळ्यांपुढून तरळून जाते. मा.एन. दत्ता हे गोवेकर अगदी लहानपणापासूनच गोवन व पोर्तुगीज लोकसंगीत सातत्याने कानावर पडत असल्याने जात्याच संगीतात रस असणारे दत्ता नादावून गेले नसल्यासच नवल. शालान्त परीक्षेनंतर त्यांनी थेट मुंबई गाठली व देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. त्या वेळी गुलाम हैदर बॉम्बे टॉकीज व व फिल्मस्तानच्या चित्रपटांचे संगीत करीत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात होत असलेल्या देशभक्तिपर मेळ्यातून एन. दत्तांना आगळ्यावेगळ्या ढंगातील गाणी गाताना सचिनदेव बर्मन यांनी ऐकले होते व आपल्याकडे साहाय्यक म्हणून काम करण्याची ‘ऑफर’ही दिली होती. फाळणीनंतर गुलाम हैदर पाकिस्तानात निघून गेले व सचिनदेव फिल्मस्तानचे संगीतकार बनले. त्यानंतर एन. दत्ता त्यांचे साहाय्यक बनले. सचिनदांच्या ‘अफसर’, ‘एक नजर’, ‘नौजवान’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘मुनीमजी’ ते थेट ‘देवदास’पर्यंत त्यांनी सचिनदांकडे साहाय्यक संगीतकाराची धुरा समर्थपणे सांभाळली. या काळातल्या एस.डी. बर्मन यांच्या कित्येक चालींवर एन. दत्तांच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो.
एन. दत्ता (दत्ता नाईक) यांचे मराठीसृष्टीवरील विविध लेख:
# Naik, Datta
समर्थ श्री रामदासस्वामी
सामाजिक समतेचा व ऐक्याचा विचार प्रत्यक्षात आणणारे, त्या काळचे तीव्र जातिभेद न मानता भक्तिमार्ग सर्वाना खुला असतो हे जाणणारे व स्वत: या मार्गाचा प्रसार करण्या साठी दक्षिणेत रामेश्वरपर्यत तर उत्तरेकडे हिमाचल प्रदेशापर्यत पदयात्रा करणारे संतशिरोमणी नामदेव यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला. (तिथीने कार्तिक शुध्द एकादशी, शके ११९२)
पंजाब व उत्तर प्रदेशात नामदेवाची मंदिरे आहेत.शिखांच्या गुरु ग्रंथसाहेब मध्ये नामदेवाच्या ६१ पदांना स्थान मिळाले आहे.
वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी श्रेष्ठ संतकवीपैकी ते एक. पित्याचे नाव दामाशेट, आईचे गोणाई. नसरी बामणी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव म्हणून सांगितले जाते. तथापी हे गाव नेमके कोठले हयाबद्दल अभ्यासकांत ऐकमत नाही. कराडजवळील नरसिंगपूर हेच ते गाव असावे, असे एक मत आहे. नरसी-ब्राम्हणी‘ असा उल्लेख करुन महाराष्ट्र-सारस्वतकार वि. ल. भावे हयांनी ते सोलापूरकडचे गाव असल्याचे म्हटले आहे, तथापि असे गाव सोलापूर जिल्हयात नाही. मराठवाडयात नरसी आणि बामणी अशी दोन गावे आहेत. त्यांतील अंतरही फारसे नाही. नरसी हया गावाजवळच नामदेवांची समाधी व देऊळ आहे. हया गावी त्यांच्या घराची जागा दाखविली जाते. त्यांचे आजोळ कल्याणी किंवा काणणी हेही हयाच परिसरातले. नरसी आणि बामणी ही दोन स्वतंत्र गावे असली, तरी त्यांचा उल्लेख एकत्रच केला जातो. हे लक्षात घेऊन नामदेवांची नरसी बामणी ही हया दोन गावांत सामावलेली असावी, असे सामान्यतः मानले जाते. नामदेव कृत म्हणून समजले जाणारे एक ‘आत्मचरित्र‘ नामदेवांच्या संकलित गाथ्यात अंंतर्भूत आहे. त्यात ‘गोणाई दामाशेटी झाले पाणिग्रहण संसारी असोन नरसी गावी असा निर्देश सापडतो.
नामदेवांचा जन्म नरसी बामणीचा, की पंढरपूरचा हयासंबंधीही वाद आहे. वि.ल.भावे व महाराष्ट्र कविचरित्रकार ज. र. आजगावकर हयांच्या मते नामदेव नरसी-बामणी येथेच जन्मले, तथापि नामदवे पंढरपूरी जन्मल्याचा निर्वाळा बहूतेक प्राचीन संतचरित्रकारांनी दिलेला आहे. एकनाथांनी लिहिलेल्या नामदेव-चरित्रावरुन नामदेवांच्या आईने पुत्रप्रांप्तीसाठी पंढरीच्या विठोबास नवस केला होता आणि त्यापूर्वीच नामदेवांचे आईवडील पंढरपुरात येऊन राहू लागल्याचे दिसते. नामदेवांचे बालपण पंढरपुरात गेल्याचेही हया चरित्रात नमूद आहे.
परभणी जिल्हात नरसी येथे जन्म. ते पांडुरंगाचे मोठे भक्त होते. त्यांनी खुप अभंग लिहिले, ज्ञानेश्वरांचे समकालीन, ज्ञानेश्वर, चोखामेळा, सावता माळी यांच्याबरोबर तीर्थयात्रा, उत्तर भारतात बरीच वर्षे वास्तव्य, भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला.
श्रीविठुरायाने आपल्या भक्ताचे गार्हाणे ऐकले विठुमाऊली प्रसन्न झाली. कार्तिका एकादशीला गोणईने एका सुदर बाळाला जन्म दिला. दामाजीशेठना खूप आनंद झाला. मोठया थाटाने त्यांनी बाळाचे बारसे केले. त्यांनी मुलाचे नाव ‘नामदेव‘ ठेवले.
पाळण्यात खेळतांना नामदेव आता सहा-सात वर्षाचा झाला. कधी कधी तो वडीलांबरोबर देवळात जाऊ लागला. देवापुढे हात जोडून डोळे मिटून उभा राहू लागला. एक दिवस दामाजीराव बाहेरगावी गेले हेते. गोणाईने नैवेद्याचे ताट तयार केले. नामदेवाला आईने हाक मारली. ‘नामदेव, जा राजा! आज देवाला नैवेद्य घेऊन जा!‘ ‘हो!‘ नामदेवाने मान डोलावली. आईने त्याला पितांबर नेसवला. कुणाची दृष्ट लागेल म्हणून गालबोट लावले अन् नैवेद्याचे ताट त्याच्या हाती दिले. नामदेव देवळाकडे निघाला. नामदेवाला आनंद झाला. ‘रोज बाबा नैवेद्य दाखवतात. आज आपण नैवेद्य दाखवू देवाला वा!‘
नामदेव देवळात आला. देवापूढे नैवेद्य ठेवला. डोळे मिटले. देवाची प्रार्थना केली आन हात जोडून तो उभ राहिला. काही वेळाने नामदेवाने डोळे उघडले. अन् बघतो तर काय? नैवेद्य आपला जशाच तसाच! नामदेवाला वाटले देव आपल्यावर रागवला. त्याने पुन्हा देवाला हात जोडले अन् म्हणाला, ‘बाबा आले नाहीत. मी नैवेद्य आणलास म्हणून तू रागवलास काय ? देवा, रोज बाबा नैवेद्य आणतात तेव्हा तू नैवेद्य खातोस अन् आज असं रे काय करतोस? देवा, तू नैवेद्य खाल्ला नाहीस तर मी मुळीच येथून हलणार नाही.‘
निश्चयपूर्वक नामदेवाने देवाला हाक मारली. ती लहानगी मूर्ती ही हात जोडून बसूनच राहिली. केविलवाण्या नजरेने मान कलती करून ती बाल नामदेवाची मूर्ती देवाकडे पाहू लागली. हळूहळू पाय दुखू लागले. कंटाळा आला, पण नामदेवाने मान हलविली नाही. देवाने नैवेद्य खाल्ला नाही तर येथून हालायचे नाही असा दृढ निश्चय केला. दीनांचा दयाळू कळवळला. तो देव श्यामसुंदर प्रकट झाला. नैवेद्याच्या ताटातील अन्नपदार्थ त्याने खावयास सूरूवात केली. देवदर्शनाने नामदेव आनदंला! मोठया भक्तीभावाने त्याने देवाला नमस्कार केला. देव भावाचा भूकेला! नामदेवाची भक्ती पाहून प्रत्यक्ष विटेवरील परब्रह्य विरघळले. नामदेवाने देवाजवळ हट्ट धरला. देवाने नैवेद्य खाल्ला!
नामदेवाचे संसारात लक्ष लागेना. सदोदित ‘विल विल‘ चालू असायचे त्यांचे गोणाई-राजाई रागावल्या. एक दिवस त्यांनी खूप बोलून घेतले त्यांना. म्हणल्या, देव करतो. देव करतो! म्हणून देवाला कष्ट पाडा. स्वतः तुम्ही काही करू नका अन देवाला झोजी वाहायला सांगा.‘
नामदेवाला फार लागले ते बोलणे. त्यांनी ठरविले काही तरी उद्योधंदा करायचा. त्यांनी तसे आईला सांगितले. दामाजी-गोमाईला आनंद झाला. दामाजीशेठची बाजारात पत चांगली होती. ते बाजारात गेले. त्यांनी निरनिराळया लोकांच्या गाठी घेतल्या. खुपसे कापड घरी घेऊन आले अन् नामदेवाला म्हणाले,
‘नामदेवा, चांगलं कापड मिळाल आहे. खूप फायदा होईल या व्यापारात. पण हे बघ, शक्य तो रोखीचाच व्यावहार कर. अन तारण घेतल्याशिवाय कुणलाही उधार माल देऊ नको.‘
‘बरं आहे!‘ नामदेव म्हणाले. त्यानी गाडी जोडली. गाडीत कापड भरले. विलाचे नाव घेतले अन निघाले बाजाराला. बाजाराच्या वाटेवर एक माळ होता. गाडी माळावरून जाऊ लागली. त्या माळावर उघडीनागडी माणसे वावरत होती. नागडी मुले-मुली हिंडत होती.
नामदेवाच्या ती नागडी मुलेबाळी दृष्टीस पडली. त्यांना गहिवरून आले. त्यांना वाटले ‘ही माण्से इथेच राहतात. रात्री खूप थंडी पडते. तेव्हा ती काय अंथरणार अन काय पांघरणार.‘
आपल्याजवळ आता कापड आहे. ते सर्व आपण यांना वाटून टाकू. त्यायोगे ते सुखावतील. नाहीतरी आपण सारी त्या एकाच देवाचीच लेकरं. त्यांचं सुख तेच आपलं सुख नामदेवाच्या मनातं! नामदेवाने गाडी थांबवली. ते खाली उतरले, त्यांनी त्या मुलांना जवळ बोलावले. त्यांच्याजवळ चौकशी केली. मुले कुणाशी बोलतात म्हणून त्यांचे आईवडील आले आणि थोडयाच वेळात नामदेवाभोवती कडेच केले तिथल्या माणसांनी! नामदेव त्यांच्या पुढार्याला म्हणला ‘गणोबा मी तुम्हाला सर्व कापड देणार आहे.‘‘देवा, आम्हाला काय करायचं कापड-चोपड? आम्ही आहोत तशी बरी आहोत.‘
‘का? तुम्हीला थंडी लागत नाही रात्रीची?‘
‘देवा, थंडी लागते, पण कपडा घायचा म्हणजे काय पैसे पडतात ना?‘
‘पण तुम्ही आता पैसे देऊ नका. मग तर झालं ना! हो, पण तारण द्यावं लागेल तुम्हाला‘
‘तारण? कसलं तारण देणार आम्ही? माळावरचे दगड देऊ फार झालं तर.‘
‘चालेल, दगडदेखील चालेल मला.‘
झालं! नामदेवांनी सर्वाना कापड वाटलं. त्यांचे सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले. त्यांनी नामदेवांना दुवा दिला. एक भलामोठा दगड नामदेवाच्या गाडीत ठेवून दिला. तो दगड घेऊन नामदेव घरी आले. मुखाने नास्मरण चालूच होते. घरी आल्यावर त्यांनी तो दगड नेऊन तिजोरीत ठेवला.
माजीशेठ(नामदेवाचे वडील) बाहेर गेले होते. घरी येताच त्यांनी विचारले,
‘काय, नामदेवा! कसा काय झाला व्यापार?‘ ‘फार, छान! सर्व कापड संपलं.
‘उत्तम, मग पैसे आणले असतील तेवढे ते दे! म्हणजे व्यापारांची देणी देऊ टाकतो.‘ दामाशेठ म्हणाले. ‘पैसे नाही आणले. सर्व माल तारण घेऊन दिले. गणोबा नाईकांना! त्यांना तारण धोंडोबांना दिलं आहे.‘ ‘अन् त्यांनी तारण काय दिलं? धोंडा ना? वा छान, फारच चांगलं तारण आहे ना काय? व्यापारांना काय मी दगड देऊ?‘ नामदेव कहीच बोलले नाहीत. ते मुकाटयाने खोलीत गेले. कुलूप उघडून त्यांनी तो धोंडा बाहेर काढला.
दामाजींच्या आपल्या डोळयावर विश्वास बसेना. तो सोन्याचा दगड पाहून त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. एवढे सोने कधी पाहिलेदेखील नव्हते त्यांनी. राजाई-गोणाई आ वासून पाहत राहिल्या. थोडा वेळ गेला आणि मग त्याचे भांडण सूरू झाले. नामदेव म्हणत, आपण फक्त आपल्या मालाचे पैसे घ्यायचे बाकींचं सोनं गणोबा नाईकांना परत द्यायचं.‘ छे, तसं कसं करायचं? त्याने आपल्या मालाबद्दल तर हे दिलं. आता सगळं आपलं!‘ त्यांच भांडण चालू असतांना लोक गोळा झाले. त्यांनी हे पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. काही लबाड आणि लोभी लोक गणोबा नाईकांकडे गेले. त्याला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. अन् म्हाणाले, ‘गणोबा तू आता नामदेवाकडे जा. त्याला सांग की, तुझा मालाचे तेवढे पैसे काढून घे आणि उरलेल सोने दे ‘गणेबाला पुढे करूण लबाड लोक नामदेवाकडे गेले अन् नामदेवाला म्हणाले, ‘नामदेवा, हे गणोबा नाईक. त्याचं उरलेल सोनं ते परत मागत होते.
‘नामदेवांनी आपल्या मालाच्या किंमतीचे सोने काढून घेतले, ‘हे गणोबा, जा घेऊन तुमचं सोनं.‘ गणोबांनी सोने उचलले. माळावर येताच त्यांनी डोक्यावरचे सोने खाली उतरविले.पण...सोने कुठे ते? काळकुळकुळीत दगड होऊन पडला होता त्यांच्यासमोरं. देवाने न्याय दिला होता. संत नामदेवांच्या घराशेजारी एक ब्रा्रण राहत होता. तो पूर्वी दारिद्री होता. पण नतंर त्याने देवी लक्ष्मीची उपासना केली. देवी प्रसन्न झाली. तिने त्याला एक परिस दिला. अन् म्हणाली, ‘हा परिस तू लोखंडाला लावलास की त्याचे सोने होईल. तुझी इच्छा पूर्ण होईल!‘ ब्राणाचे दारिद्र पळाले. लोक त्यांच्या श्रीमंतीचा हेवा करू लागले. पण परिसाची प्राप्ती झाल्याने त्याने काही कुणाला कळू दिले नाही. एक दिवस राजाई (नामदेवाची आई) त्या ब्राणाच्या घरी गेली.
त्यावेळी ब्राणाची बायको कमळजा ही घरी होती. तिला फार लोभ वाटे या कुटूंबाविषयी. तिने राजाईची हकीकत विचारली. आपली दारिद्रयाची कहाणी राजाईने तिला सांगितली. कमळजाला राजाईची दया आली. आपल्या खोलीत जाऊन तिने परिस आणला अन् तो परिस राजाईला देऊन म्हणाली. ‘बाई, हा परिस मी तुम्हाला देते आहे. लोखंडाचे या परिसाने खूप सोने करून घ्या अन् माझा परिस लवकर परत आणून द्या.‘
राजाई घरी गेली. तिने घरातील भांडयांना, लोखंडाला परिस स्पर्श करून सोने केले. ते सगळे सोने घरात लपवून ठेवले. मग थोडे सोने घेऊन ती बाजारात गेली. धान्य, किराणा वगैरे घेऊन परत आली. नंतर ती परिस परत करण्यासाठी निघली. तेवढयात नामदेव आले. नामदेवांना पाहून राजाई कमळजाडके न जाता माघारी वळली. राजाईची घागरलेली मुद्रा व अन् घरातला थाटमाट पाहून नामदेवाला संशय आला, ‘काय गडबड आहे आज घरात?‘ राजाई दादपत्ता लागू देईना. नामदेवांनी तिचा पिच्छा सोडला नाही. त्यांनी तिला खोदूनखोदून विचारल. शेवटी नाईलाजाने राजाईने नामदेवांना सर्व काही सांगितले.
नामदेवांनी राजाईजवळून तो परिस मागून घेतला. अन् श्रीविलाचे नास्मरण करीत ते चंद्रभागा नदीवर आंघोळीसाठी गेले.
नामदेवाला जाऊन थोडा वेळ झाला. तोच ब्राण स्वतःच्या घरी आला. त्याने आंघोळ केली अन् तो पूजेसाठी बसला. परिसाचादेखील तो देवाबरोबर पूजा करीत असे. त्याने आपल्या पत्नीस पूजेसाठी परिस आणण्यास सांगितले. तिला ब्रम्हांड आठवले. आता परिस कोठून आणून देणार? ती अळमटळम करू लागली. ब्राणाने तर निकड लावली. शेवटी तिला सर्व सांगणे भाग पडले. ब्राण खूपच रागावला.
कमळजा राजाईकडे आली. तिने राजाईकडे परिस मागितला. तीही मोठया संकटात सापडली. मोठया विश्वासाने ब्राण पत्नी कमळाजाबाईनी आपल्याला परिस दिला. होता. आपले दारिद्र दूर व्हावे असे तिला वाटत होते. पण आपण योग्य वेळी परिस परत केली नाही. आता तर आपल्याजवळ परिस नाही. नामदेव परिस घेऊन, नदीवर गेल्याचे राजाईने कमळजाबाईला सांगितले. बिचारी ब्राणपत्नी! तिने तो निरोप नवर्याला सांगितला. ब्राण खूपच रागावला. त्याने बायकोला खूप बोलून घेतले अन् तो नदीकडे धावत सुटला. तो काय धावतो? म्हणून आणखी काही लोक त्याच्या मागून धावू लागले. नदीत नामदेव आंघोळ करीत होते. मुखाने विठ्ठलाचे नामस्मरण करीत होते. ब्राण तेथे पोहोचला आणि म्हणाला, ‘नामदेवा माझा परिस मला परत द्या पूजेला खोळंबा होतो आहे.
‘नामदेव म्हणले, ‘कसला परिस? मी तर तो दगड नदीत टाकून दिला.‘ आजूबाजूचे लोक गंमत पाहत होते. कुणी म्हणाले ‘हा नाम्या लबाड बरं का!‘ त्याने परिस लपवून ठेवला असेल! परिस काय कोणी नदीत टाकून देते काय?‘ ‘हे पहा नामदेवा! उगीच ढोंग करू नकोस. खोटे बोलू नकोस. परिस कोणता शहाणा माणूस नदीत टाकीलं बरं!‘ ‘तुम्हाला वाटत असेल खोटे आहे तर नदीत उतरून पाहा!‘ नामदेंवाचे वरील बोलणे एकूण सगळे लोक हसू लागले. बुडी मारून नदीच्या तळाशी जाणार कोण? अन् तळ गाठला तरी पाण्याच्या तळाशी किती दगडं. त्यातून परिस कसा शोधून काढणार? तोच नामदेवांनी पाण्यात बुडी मारली. ओंजळभर दगडं घेऊंन ते वर आले आणि ब्राणाला म्हणाले, ‘हे घ्या तुमचे परिस!
‘लोकांना हे ऐकून चेष्टा वाटली. इतक्यात एकाने आपल्या जवळच्या लोखंडी टाचण्या काढल्या. त्या त्याने सर्व दगडांना लावून पाहिले. सर्व टाचण्या सोन्याच्या झाल्या. सारेच दगड परिस होते. ब्राण ओशाळला. त्याने संत नामदेवांचे पाय धरले. सगळया लोकांनी एकच गजर केला.‘संत नामदेव महाराज की जय! पुंडलिक वरदा हरी विठ्ठल महाराज की जय.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
## Sant Namdeo ; Sant Namdev
शिल्पकार, चित्रकार, कवी, वास्तुशिल्पी अशा अनेक भूमिकांमध्ये साऱ्या जगावर अमिट ठसा उमटविणाऱ्या ‘मायकेल अँजेलो’ या कलावंताची ही रोमहर्षक कहाणी! डॉ. माधवी मेहेंदळे यांनी लिहिलेल्या आणि अमेय प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘दैवी प्रतिभेचा कलावंत : मायकेल अँजेलो’ या पुस्तकातील हा संपादित अंश!
सीकेपी समाजातील अनेक महिला आज जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये अग्रणी राहून आपल्या समाजाला गौरवीत करत आहेत. खासगी संस्था ते मल्टिनॅशनल कोर्पोरेट्स, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पाककला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रांत सुद्धा आपल्या महिलांचा वावर वाखाणण्याजोगा आहे. तलवार आणि लेखणीचा वारसा सांगणाऱ्या आपल्या या समाजात लेखणीचा उत्तम वापर करत साहित्य निर्मिती करणाऱ्या अनेक महिला आजही विविध माध्यमांतून आपले साहित्यिक योगदान देत असतात. योगायोगाने या वर्षी २२ मे रोजी पुणे येथे दुसरे सीकेपी साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सीकेपी समाजातील शंभराहून अधिक लेखिका कवयित्रींना आणि अगदी पाकशास्त्रावरील पुस्तके लिहिणाऱ्या सुगरणींना तुमच्यासमोर आणायचा हा एक छोटासा प्रयत्न.
आपल्या करीयरची सुरुवात त्यांनी १९७० साली ‘नटसम्राट’ या नाटकाने केली.‘नवरा माझा नवसाचा’ मधील भूमिकेमुळे सुनील तावडे यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. ‘दुहेरी’ या मालिकेत काही काळ ते नर्सच्या रुपात दिसले होते. ‘माझा होशील ना’ ही सध्या त्यांची मालिका गाजत आहे. ‘नटसम्राट’,’बॅरिस्टर’ तरुण तुर्क म्हातारे अर्क,लग्नाची गोष्ट, एकदा पहावे करून, लेकुरे उदंड झाली ही त्यांची काही नाटके होत.
Copyright © 2025 | Marathisrushti