जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
संतती नियमनाच्या प्रचारकार्यात उघडपणे स्वत:ला झोकून देणार्या शकुंतलाबाई परांजपे या देशातल्या पहिल्या महिला कार्यकर्त्या होत्या.
वसंत देसाई यांचे बालपण कोकणात गेले. त्यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी सोनवाड, सावंतवाडी येथे झाला. काही तरी वेगळे करण्याची उर्मी त्यांना कोल्हापुरात घेऊन आली. कोल्हापुरात प्रभातमध्ये असतांना पडेल ते काम करीत असत. त्यांचे आयुष्य घडण्याला येथेच सुरुवात झाली. देवल क्लबमधे असतांना अल्लादियां खॉं व मंजी खॉं यांसारख्याचे गाणे ऐकून त्यांचे कान तयार झाले. अयोध्येचा राजा तील पहिली नांदी ही नाटकातल्या नांदीप्रमाणे होती. या नांदीमध्ये वसंत देसाईंचा आवाज होता. म्हणजेच बोलपटांची सुरुवात देसाईंच्या आवाजाने झाली असे म्हणता येईल. त्यांनी सुरुवातीला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गीते गायली. प्रभातमध्ये संगीत, पार्श्र्वसंगीत देण्यास सुरुवात झाली होती. संत ज्ञानेश्र्वरमधील गाडीवानाची भूमिका, संगीतासाठी बैलांचे खूर व बैलगाडीचा आवाज, विविध पक्ष्यांचे आवाज, ग्रामीण वाद्यांचा सुयोग्य वापर… मा.वसंत देसाई यांच्या कारकीर्दीतील अशा अनेक गोष्टी सांगता येतील. केशवराव भोळे, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव हे प्रभातचे सुरुवातीचे संगीत दिग्दर्शक. त्यांच्या हाताखाली मा.वसंत देसाई तयार झाले. पुढे ते शांतारामबापूंबरोबर राजकमलमध्ये आले. त्यांच्या पहिला स्वतंत्रपणे संगीत दिलेला चित्रपट होता नायिका जयश्रीचा शकुंतला(हिंदी). राजकमलच्या ह्या शकुंतलाने उत्पन्नांचे सर्व रेकॉर्डस् मोडले. पहिला तमाशाप्रधान चित्रपट राम जोशी मधील ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या लावण्यांना वसंतरावांनी फक्कड चाली दिल्या. कवी होनाजी बाळा यांच्या जीवनावर काढलेल्या `अमरभूपाळी’ ह्या चित्रपटातील घन:श्याम सुंदरा ही भूपाळी अप्रतिम स्वररचनेमुळे खरोखरच अमर झाली आहे.
अभिजाततनेने ओतप्रोत भरलेल्या नृत्यांवर आधारित झनक झनक पायल बाजे चे संगीत वसंत देसाईंनी अजरामर केले आहे. त्यांनी त्यासाठी भारतांतील वेगवेगळ्या प्रांतांमधे प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा अभ्यास केला. झनक झनकने अफाट यश संपादन केले. त्यांची कीर्ती सगळीकडे झाली. आचार्य अत्रे यांनी १९५६ मध्ये काढलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाचे संगीत वसंत देसाईंचे होते. कवी यशवंत यांची आई ही अतिशय भावूक, करुण कविता त्यांनी स्वरबद्ध केली. श्यामची आई मध्ये ६ गाणी होती. मराठमोळे वातावरण निर्माण करणारे अप्रतिम पार्श्र्वसंगीत त्यांनी या चित्रपटास दिले. म्हणूनच या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा वसंतरावांकडे जातो. मा.वसंत देसाईंनी एकूण २० मराठी चित्रपटांना संगीत दिले. छोटा जवान मधील माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू हे गाणे किंवा मोलकरीण मधील देव जरी मज, दैव जाणिले कुणी ही गाणी सर्वश्रृत आहेत. इये मराठीचिये नगरीतील गीतांसाठीचे संगीतही प्रसंगानुरूप होते. त्यांनी पाठ्यपुस्तकांतील अनेक कवितांना या बाई या, देवा तुझे किती, माझ्या मामाची रंगीत गाडी, लेझिम चाले जोरात, घाल घाल पिंगा वार्या, आनंदी आनंद गडे इत्यादी कवितांना – सोप्या, सुंदर चाली दिल्या. शास्त्रीय रागांवर आधारीत असंख्य गाणी त्यांनी हिंदी -मराठीतून दिली.
शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी चित्रपट माध्यमात आणले. ‘गूंज उठी शहनाई’मधून बिस्मिल्ला खान खाँसाहेबांची शहनाई अक्षरश घराघरात पोचली. त्यांचे वादन समारोहामधून होत असे तेव्हा सामान्य श्रोते ‘गूंज उठी’ची फर्माईश करीत आणि खाँसाहेबही ती मान्य करीत असत. सतारनवाझ अब्दुल हलीम जाफर खान यांनीही ‘झनक झनक’ च्या पाश्र्वसंगीतातला संपन्न करण्यात मोठी भूमिका बजावली. या चित्रपटाने गर्दीचे सर्व उच्चांक मोडले होते. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी खेळानिमित्ताने ‘लिबर्टी’ चित्रपटागृहात हलीम जाफर खान यांचे सतारवादन अहमदजान थिरकवा खाँ साहेबांच्या तबला संगतीसह आयोजित करण्यात आले होते असे जाणकार सांगतात.
पं. शिवकुमार शर्मा, पं. सामताप्रसाद, व मृदुंगवादक रामदास हे वादकही ‘झनक झनक ’मुळे प्रथम चमकले. रागावर आधारित रचना आणि तीही समूहगानाच्या रूपाने साकार करणे हा वसंत देसाईंचा हातखंडा होता. ‘केदार’ रागातली ‘गुड्डी’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं ‘हमको मनकी शक्ती देना’ ही रचना इतकी लोकप्रिय झाली की शाळाशाळांमधून प्रार्थना म्हणून ती गायली जाऊ लागली. ‘दो आँखे बारह हाथ’ मधले ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ या प्रार्थना गीताला ‘मालकंस’ रागाचा आधार आहे. या गीताने तर सीमेपलीकडच्या पाकिस्तानातही लोकप्रियता मिळविली. भारतातीलच नव्हे तर पाकिस्तानातील तुरुंगांमध्येही प्रार्थना गीत म्हणून गाणं गायले जाऊ लागले.
वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये वाणी जयराम प्रसिद्ध झाल्या. गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे..’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची आहे.
‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे वसंत देसाई यांनी संगीत दिले आहे. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे ’जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. १९४२ ते १९७६ या कालावधीत मा.वसंत देसाई यांनी एकूण ४६ चित्रपटांना उत्कृष्ट संगीत दिले. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. मा.वसंत देसाई हे १९७३ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी काही चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या. हिंदी व मराठी चित्रपटांमधे स्वत: गायलेली उत्तम गाणी त्यांनी दिली. १९६० ते १९७५ मध्ये संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करून त्यांना संगीत दिले. त्यांनी १३ लघुपटांनाही संगीत दिले.
www.vasntdesai.com या वेब साईटवर मा.वसंत देसाई यांची गाणी,माहिती व फोटो आहेत.
वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’ या नावाने पुस्तक लिहून श्री.विश्वास नेरुरकर यांनी संगीतकार वसंत देसाई यांची संपूर्ण कारकीर्द रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. मुंबईतल्या एका अतिउंच इमारतीच्या लिफ्टच्या दारात अडकून त्यांचा २२ डिसेंबर १९७५ रोजी अपघाती निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
वसंत देसाई यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=mRx1i1puP9A
https://www.youtube.com/watch?v=jX7m86CMDIg
https://www.youtube.com/watch?v=YKMZNH5qnY0
https://www.youtube.com/watch?v=yyHK9v5Vjgg
https://www.youtube.com/watch?v=1VbcBKWYTSA
https://www.youtube.com/watch?v=QSOSKrpHvyE
धर्मवीर भारतीं यांचे आडनाव वर्मा. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९२६ रोजी अलाहाबाद येथे झाला. १९४७ मध्ये हिंदी साहित्याची पदवी संपादन केलेले भारती विद्यार्थीदशेपासूनच स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्योत्तर काळात काही काळ त्यांनी हिंदी साहित्याचे अध्यापन केले.नंतर ‘अभ्युदय’ या हिंदी साप्ताहिकेतून आपल्या पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली.
अलाहाबाद विद्यापीठात काही काळ हिंदीचे अध्यापन करून १९६० मध्ये टाईम्स समूहाच्या ‘धर्मयुद्ध’ मध्ये त्यांनी प्रवेश केला. १९८७ पर्यंत ‘धर्मयुग’चे ते संपादक होते. डॉ. धर्मवीर भारतींना आधुनिक हिंदी साहित्याचे अध्वर्यू मानले जाते. त्यांनी ऑस्कर वाईल्डच्या कथांचे हिंदी अनुवादही केले. त्यांचा ‘कनुप्रिया’ हा काव्यसंग्रह हिंदी साहित्यातील एक नवा टप्पा मानला जातो.
‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ या त्यांच्या साहित्यकृतींवर चित्रपट झाले. सुमारे ५० वर्षे हिंदी साहित्य आणि पत्रकारिता ही क्षेत्रे गाजविणा-या धर्मवीर भारतींची ‘अंधा युग’ ही कलाकृती अजरामर ठरली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना अनेक साहित्य पुरस्कार दिले. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला. धर्मवीर भारती यांचे ४ सप्टेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३.
संदर्भ.इंटरनेट
‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ चित्रपट
https://youtu.be/adP9erjnDQo
https://youtu.be/JS00ybwPZtw
आज ५ डिसेंबर
आज खलनायिका, अभिनेत्री नादिरा यांची पुण्यतिथी.
जन्म. ५ डिसेंबर १९३२
भारतीय चित्रपटसृष्टीतील एके काळची आघाडीची साहाय्यक अभिनेत्री नादिरा ह्या मूळच्या बगदादच्या, एका ज्यू कुटुंबातली. जन्म बगदादमध्ये. फरहान इझिकेल (नादिरा) ह्या फ्लोरेन्स या नावाने अधिक ओळखली जायच्या. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के गर्ल’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या गेलेल्या नादिरा यांनी एकूण ६३ हिंदी चित्रपटांत भूमिका करून १९५० ते १९६० हे दशक गाजविलं. नादिरा या दिग्दर्शक मेहबूब खान यांची पत्नी सरदार बेगम हिची मत्रीण होत्या. त्यांच्या आग्रहामुळे नादिरा या मुंबईत वयाच्या १९ व्या वर्षी दाखल झाल्या आणि आवारासाठी मा.नर्गिस यांनी आन चित्रपटावर वर पाणी सोडल्यानंतर मेहबूब खान यांनी त्यांच्या ‘आन’ या चित्रपटात एका फरहान इझिकेल या फिल्मी क्षेत्रात अगदी नवख्या असलेल्या बगदादी ज्यू मुलीची निवड केली व तिलाच ‘नादिरा’ या नावाने स्टार बनविण्याचा निर्धार केला. ‘आन’मधील एका राजपूत राजकन्येच्या तिच्या भूमिकेनंतर त्यांच्यावर साहाय्यक खलनायिकेचा शिक्का बसला. ‘आन’, ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘दिल अपना प्रीत पराई’, ‘ज्यूली’, ‘सागर’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या. यापकी ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘ज्यूली’ या चित्रपटांतील तिच्या भूमिकांमुळे त्यांना सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. ‘श्री ४२०’ मधील ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ या गाण्याने आणि ‘ज्यूली’तील मार्गारेट ऊर्फ मॅगीच्या भूमिकेने नादिरा यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले. नादिरा यांच्या वेगळ्या, पाश्चिमात्य व्यक्तिमत्त्वामुळे इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळेपण उठून दिसे. २००० साली प्रदíशत झालेला ‘जोश’ हा नादिरा यांचा अखेरचा चित्रपट. दोन वेळा लग्न करून घटस्फोट झालेल्या नादिराचे मुंबईतील सर्व नातेवाईक इस्रायलमध्ये स्थायिक झाल्याने म्हातारपणी नादिराच्या नशिबी एकटेपणा आला. विविध विषयांच्या वाचनाची आवड असलेल्या नादिराच्या खासगी ग्रंथसंग्रहात शेक्सपियर, विवेकानंद, हिटलर, ज्युडाइझम, दुसरे विश्वयुद्ध आणि तत्त्वज्ञानविषयक विपुल पुस्तके होती. हिंदी चित्रपटसृष्टीत मा.नादिरा ह्या स्वत:कडे रोल्सराइस असलेली पहिली अभिनेत्री. मा.नादिरा यांचे ९ फेब्रुवारी २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्यांनी मुंबईतील 'सेंट झेवियर्स महाविद्यालया'तून अर्थशास्त्र हा विषय घेऊन बी.ए. ही पदवी घेतली होती. इंग्रजी साहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय होता. बालसाहित्य लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, भाषांतरकार, कादंबरीकार आणि विनोदी लेखक भास्कर रामचंद्र भागवत उर्फ भा.रा. भागवत यांचा जन्म ३१ मे १९१० रोजी इंदूर येथे झाला. लहानपणापासून इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाची भागवतांना आवड होती. शालेय जीवनात 'माय मॅगझिन' हे पुस्तक/नियतकालिक आणि गिबन्स, डिकन्स, थॅकरे तसेच ह. ना. आपटे, विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांचे साहित्य ह्यांमुळे प्रभावित होऊन भा.रा. भागवतांनी बालवयातच लेखन सुरू केले. घरातल्या साहित्यप्रेमी पोषक वातावरणामुळे त्यांनी 'वसंत' नावाचे मासिक काढले होते. बालपणी त्यांनी त्यांची आतेबहीण दया परांजपे हिच्या मदतीने 'निळे पाकीट' या रहस्यमय कादंबरीचे लेखन केले. ते छापूनही आले. वयाच्या दहाव्या वर्षी भागवतांची मांजरीवरील कविता 'आनंद' मासिकात छापून आली होती. त्याच सुमारास त्यांनी चित्रावरून लिहिलेली एक गोष्ट 'बालोद्यान' ह्या मासिकात प्रसिद्ध झाली होती. भागवतांनी १९३० च्या दशकापासून पत्रकारितेस आरंभ केला.
१९३५-३६ मध्ये ते दैनिक सकाळचे उपसंपादक होते. इ.स. १९३७-३८ कालखंडात ते प्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते. ऑल इंडिया रेडियोच्या दिल्ली केंद्रावरील वार्तापत्राचे ते मराठी अनुवादक होते. महात्मा गांधींच्या अटकेची बातमी प्रसारित न करण्याचे आदेश असतानाही त्यांनी ती केली आणि नोकरीचा राजीनामा देऊन ते भूमिगत झाले. तेव्हा त्यांचा विवाह लीलावती भागवत यांच्याशी झालेला होता व त्या गरोदर होत्या. पण भा.रा. भागवत भूमिगत झाल्यावर त्यांना लपतछपत मुंबईत परत येणे भाग पडले. याच काळात एस.एम. जोशी यांच्यासोबत भागवत भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. विसापूरच्या तुरुंगात त्यांनी त्याबद्दल कारावासही भोगला. त्याच काळात त्यांची आई वारली. तुरुंगवासाच्या काळातही भागवतांचे लेखन चालू होते. सुरुवातीच्या काळात ते विनोदी कथालेखन करत असत. माझा विक्रम, वैतागवनातील वाफारे हे त्यांचे सुरुवातीच्या काळातले काही विनोदी कथासंग्रह. मराठीतील उत्कृष्ट विनोदी कथासंग्रहात श्री. राम कोलारकरांनी त्यांच्या जवळपास वीस कथा अंतर्भूत केलेल्या आहेत. स्वतंत्र विनोदी कथा, भाषांतरित व रूपांतरित विनोदी कथा, लोकप्रिय रहस्यकथा व प्रेमकथांची विडंबने अशा सर्व प्रकारचे लेखन त्यांत आहे.
बाल-कुमारांसाठीच्या बालमित्र या पाक्षिकाचे भागवत संस्थापक होते. हा अंक त्यांनी जवळजवळ सात वर्षे काढला. त्यातले बहुतेकसे लेखन भागवत एकटाकी करत. त्यासाठी ते विविध टोपणनावे वापरत असत. १९७५ सालच्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.
त्यांनी लहान मुलांसाठी - विशेषत: कुमार वयोगटासाठी - अनेक कादंबर्याव व साहसकथा लिहिल्या. तसेच अनेक कथा, कादंबर्याय व विज्ञानकथा यांची इंग्रजीतून भाषांतरे आणि रूपांतरे केली. त्यांनी 'ज्यूल व्हर्न' या प्रसिद्ध व आद्य-विज्ञानकथा लेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरीत वा रुपांतरित केले. त्यांनी निर्माण केलेले फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार हे नायक इ.स. १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिद्धी पावले. मा.भा.रा. भागवत यांचे २७ ऑक्टोबर २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
भा.रा. भागवत यांच्यावरील विषेशांक खालील लिंकवर वाचता येईल.
http://www.aisiakshare.com/brbf
दुटांगी पांढरधोतर , वर पांढरा सदरा , डोक्यावर पांढरी /काळी कोणतीतरी टोपी , अन बगलेत धरलेली आडवी छत्री या खेरीज दत्ताकाकाला इतर पोशाखात पाहिल्याचे मला स्मरत नाही .दत्ताकाका माझ्या वडिलांचा दूरचा भाऊ . वडिलांपेक्षा सहा-सात वर्षांनी लहान . त्याचे आई वडील प्लेगात गेले . जाताना ‘ रंगनाथा, आमच्या दत्ताला अंतर देऊ नकोस ‘ असे वचन घेतले होते म्हणे . ते आमच्या वडिलांनी म्हणजे अण्णांनी मरे पर्यंत पाळले . अगदी पाठच्या भावा प्रमाणे मानले आणि वागवले सुद्धा ! तो हि अगदी सख्या भावा सारखाच वागला !
हिमाचल प्रदेशातील एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अहनिर्श झटणार्या 'सुत्र' संस्थेचे संस्थापक सुभाष मेंढापुरकर.
हिमाचल प्रदेशातील निराधार, अविवाहित, विधवा, परित्यक्त्या, वृद्ध महिलांच्या पुनर्वसनासाठी 'सोशल अपलिफ्टमेंट थ्रू रुरल अॅक्शन' अर्थात 'सुत्र' या संस्थेची स्थापना करणारे मेंढापूरकर हे मूळचे सोलापूरचे. पुण्यात राहून त्यांनी मराठीत एमए आणि त्यानंतर टीआयएसएस मधून एमएसडब्ल्यू केल्यानंतर १९७७ साली एका प्रकल्पाच्या निमित्ताने ते हिमाचल प्रदेशात गेले. महिलांवर होणारे अत्याचार, कौटुंबिक हिंसा, दारू पिऊन महिलांना मारहाण असे प्रकार तेथे सर्रास सुरू होते. त्या परिस्थितीत गरज होती ती तेथील महिलांच्या सक्षमीकरणाची तसेच त्यांना संघटित करण्याची. मेंढापूरकरांनी हे आव्हान उचलले आणि वंचित महिलांना 'सुभाष भय्या'चा मोठा आधार मिळाला. सुरूवातीच्या काळात मेंढापूरकरांना गावकर्यांचा बराच रोष पत्कारावा लागला, पण ते मागे हटले नाहीत. महिला सक्षमीकरण, आथिर्क स्वावलंबन, बचतगट, आरोग्य सुविधा, विधवांच्या मुलांना शिष्यवृत्या अशा विविध पातळ्यांवर त्यांचे काम सुरू राहिले.
स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात आवाज उठवणारी पहिली संस्था म्हणून 'सुत्र'कडे पाहिले जाते. आज मात्र सामाजिक आणि आथिर्क संदर्भ बदलले असल्याचे मेंढापूरकरांना प्रकर्षाने जाणवते आहे. आजच्या राजकारण्यांना सभ्यतेचा आदर करण्याची सवय राहिलेली नाही. पूर्वी विरोधकांनाही इज्जत होती, पण आता सगळे चित्रच बदललेय असे ते सांगतात.
महाराष्ट्रात संस्था-संघटना खूप आहेत. पण मनापासून काम करण्याची त्यांची तयारी नाही. एकीकडे व्यावसायिक संस्था तर दुसरीकडे राजकारणाबाबत जागृती नसणार्या संघटना भरपूर झाल्या आहेत, हेही त्यांचे एक निरीक्षण. आत्ताच्या लोकांना राजकारणाचे मर्म कळत नसल्यामुळे त्यांना आपल्या कामाचे राजकारण करता येत नाही म्हणूनही ते मागे पडतात किंवा दुर्लक्षित राहतात असे त्यांचे मत बनले आहे. याला कारण म्हणजे १९८० नंतर महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचा किंवा युवकांचा कोणताच लढा उभा राहिलेला नाही. त्यामुळे आत्ताची पिढी प्रगल्भ असली तरी राजकारणाचे भान, जाण त्यांना नाही असे ते सांगतात. पूर्वीच्या लोकशाहीत सर्वसामान्यांमध्ये संघर्ष करण्याची ताकद होती. आता लढ्यांमध्ये मध्यमवर्ग कुठेच दिसत नाही. लोकशाहीच्या लढ्यांची जागा हिंसेने, दंडुकेशाहीने घेतली आहे आणि लोकशाहीला ते सर्वात घातक ठरू शकते याची चिंता मेंढापूरकरांना सतावते आहे.
शेती करू इच्छिणार्या महिलांना जमीन द्या यासाठी सध्या त्यांचा लढा सुरू आहे. शेती करून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात असा विश्वास मेंढापूरकरांना असून त्यासाठी ते लढताहेत.
त्यांना 'सारडा समान संधी पुरस्कार' बहाल करण्यात आला आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
संत एकनाथांनी समाजमनाची नस ओळखली आणि भारुडांच्या माध्यमातून समाजातील अपप्रवृत्तींवर हल्लाबोल केला. नाथांच्या याच सामाजिक प्रबोधनाचा वारसा सांगत चंदाबाई तिवाडी या लोककलावंत सध्या महाराष्ट्रभर भ्रमंती करत आहेत. भारुडाच्या माध्यमातून समाजातील दुष्प्रवृत्तींवर कडाडून हल्ला चढवत आहेत.
शंकर काशिनाथ गर्गे हे ‘नाट्यछटाकार दिवाकर’ म्हणून अवघ्या मराठी जनमानसांत लोकप्रिय असणारे लेखक होते. त्यांचा जन्म १८ जानेवारी १८८९ रोजी पुणे येथे झाला. वर्डस्वर्थ, ब्राउनिंग, शेक्सपीअर हे त्यांचे आवडते साहित्यिक होते. लॉर्ड टेनिसन यांनी १८४२ मध्ये पहिला ड्रामॅटिक मोनोलॉग लिहिला होता, जो पुढे मॅथ्यू अरनॉल्डने आणि रॉबर्ट ब्राउनिंगने लोकप्रिय केला. त्यापासून स्फूर्ती घेऊन शंकर गर्गे यांनी दिवाकर टोपण नाव घेऊन हा नाट्यप्रकार लिहून मराठीत रूळवला आणि तो ‘दिवाकरांच्या नाट्यछटा’ या नावानेच ओळखला गेला. नाट्यछटा म्हणजे एक छोटेखानी, एकपात्री स्वगतासारखा प्रकार.
आपल्या शेजारी एक किंवा काही पात्रे आहे अशी कल्पना करून नाट्यछटा सादर करणारा त्यांच्याशी संवाद साधत असतो, त्याचे संवाद तो मोठ्याने म्हणत असतो, त्यावर शेजारच्याची प्रतिक्रिया “काय म्हणालात ..”अशी सुरुवात करून स्वतःच म्हणत असतो. त्यामुळे वरपांगी हे स्वगत वाटत असले तरी सुप्त स्वरुपातले संवाद असल्यामुळे नाट्यछटा हा प्रकार अत्यंत नाट्यपूर्ण असतो. नाट्यछटा हा अगदी छोटेखानी नाट्यप्रकार, त्याचा विस्तार आणि त्याचा कालावधी हा मर्यादित स्वरुपाचा असतो, फारफारतर पन्नास-पंचावन्न ओळींचा, पण ह्या मर्यादित अवकाशातही अतिशय वेधक पद्धतीने प्रसंगाचे वर्णन केलेले असते.
दिवाकरांच्या नाट्यछटा ही मराठी साहित्याला मोठी देणगी आहे. अरेरे! ओझ्याखाली बैल मेला!, अशा शुभदिनी रडून कसें चालेल?, अहो, आज गिऱ्हाइकच आलें नाही, एका नटाची आत्महत्या, काय! पेपर्स चोरीस गेले?, कार्ट्या! अजून कसें तुला जगातलें ज्ञान नाही?, कोकिलाबाई गोडबोले, चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच, पंत मेले - राव चढले, बाळ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें!, माझी डायरेक्ट मेथड ही!, मुंबईत मजा गमतीची।, म्हातारा इतुका न | अवघें पाऊणशे वयमान, स्वर्गांतील आत्मे!, हें काय उगीचच?, हें काय सांगायला हवें! – अशा त्यांच्या एकूण ५१ नाट्यछटा लोकप्रिय आहेत. शंकर काशिनाथ गर्गे यांचे १ ऑक्टोबर १९३१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
लक्ष्मीकांत बेर्डे हे हे मराठी रंगभूमी व चित्रपट तसंच हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता होय, त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९५४ ला झाला.लहानपणापासूनच लक्ष्मीजींना विविध कलांची आणि अभिनयाची आवड असल्यामुळे गणेशोत्सवात व इतर सार्वजनिक कार्यक्रमा व महाविद्यालयीन महोत्सवांमध्ये भाग घेत आणि त्यामध्ये अनेकवेळा पारितोषिके पटकावली होती.
Copyright © 2025 | Marathisrushti