जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
विदर्भातील एक सत्पुरूष. बालपणापासून ज्ञानेश्वरीचा व्यासंग. भरतातील नानाविध धार्मिक संप्रदाय; हिंदू, बौध्द, जैनाधी भारतीय धर्म आणि ख्रिस्ती, मूसलमानादी सर्व अभारतीय धर्म, वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहेत, असे समन्वयात्मक विचार त्यांनी प्रतिपादन केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि प्रदर्शनांमध्ये ५०० छायचित्रांहून अधिक छायाचित्रे प्रदर्शित करणारे हिरा पंजाबी यांना ठाणे गुणीजन हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
अपना बाजार' दुकानात दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच दादा कोंडके सेवादलाच्या बँडमध्ये काम करू लागले. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. तेथे कलेचा नाद शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवादलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली. आणि सेवादलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले. पथ-नाट्यात आपल्या विनोदाच्या टाईमिंगवर हशा उसळवणा-या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पाहवले नाही. 'खणखणपुरचा राजा' मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत दादा कोंडके यांनी स्वतःचा फड उभारला व दादा कोंडके वसंत सबनिसांच्या 'विच्छा माझी पुरी करा' नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादा कोंडके यांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. 'विच्छा'चे १५०० हून अधिक प्रयोग झाले, आणि दादांसारखे रत्न मा.भालजी पेंढारकरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे मा.दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे मा.दादा कोंडके यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत.'सोंगाड्या' ही मा.दादा कोंडके यांनी पहिली निर्मिती. हा चित्रपट खुप गाजला. दादांनी मराठीत एकुण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. हा विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. प्रख्यात विनोदी अभिनेते एवढीच त्यांची ओळख नव्हती. गीतं, संवाद, लेखनं यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, आणि एक उत्तम माणूस अशी मा.दादा कोंडके यांची ओळख होती. अनेक रजत व सुवर्णमहोत्सवी चित्रपट या गुणी कलवंताने दिले. खरे तर मा.दादा कोंडके यांच्यासारखा सारखा कलाकार पुन्हा झाला नाहीच मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक आणि सुवर्णकाळ म्हणजे मा.दादा कोंडके यांची कारकीर्द, दादांनी प्रेक्षकांना हसवले आणि प्रसंगी अगदी अलगद टचकन रडवले देखील, त्यांच्या काळातील सिनेसृष्टी आणि सध्याच्या काळातील सृष्टी यात प्रचंड तफावत आहे खूप अत्याधुनिक तंत्र आता उपलब्ध आहे. मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन मा.दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच किंबहुना त्याहूनही सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत. दादा कोंडके सारखे कलावंत मात्र नाहीत. आणि सध्याच्या युगात अशा… दादा कोंडके यांचे एकटा जीव सदाशिव, सोंगाड्या, रामराम गंगाराम, पांडू हवालदार असे गाजलेले चित्रपट कुठे टी व्ही वर दिसत नाहीत, जुन्या तंत्रात असलेल्या या चित्रपटांचे कोणी पुनरुज्जीवन केले नाही अनेक जुने चित्रपट, गाणी वारंवार टी व्ही वर दिसतात पण जणू दादा कोंडके यांचे चित्रपट रसिकांना बघायला मिळत नाहीत.
दादा कोंडके यांच्या जीवनावर ''एकटा जीव'' हे पुस्तक लिहिण्यात आले होता. या पुस्तकात मा.दादा कोंडके यांचे चरित्र आहे. त्यांचं व्यक्तिमत्व प्रगल्भ, बहुआयामी होतं, पडद्यावरचं त्यांचं आयुष्य अनेकांनी अनेक वेळा पाहिलं असेल, पण दादा पडद्यामागे कसे होते. याची ओळख लेखिका अनिता पाध्ये यांनी या पुस्तकात करून दिली आहे. प्रत्यक्ष दादांच्याच शब्दांत ती वाचायला मिळते. बालपण, तारुण्य, नातेसंबंध, सिनेमाचे जग, तेथील वातावरण, रसिकांचे मिळालेले प्रेम, सेन्सॉर बोर्ड, द्वयर्थी गीतांच्या गमतीजमती अशा अनेक विषयांवर दादा मोकळेपणानं बोलले आहेत. त्यांचा हजरजबाबीपणा आणि विनोदाची उत्तम जाण त्यातून ठळक होते. दादा जसे सदाहरित होते, तसें हे पुस्तकही!
दादा कोंडके यांचे १४ मार्च १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
''एकटा जीव'' या पुस्तकाची लिंक
http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5264348057482910856
आज मंगळवार १४ मार्च २०१७ रोजी दिवसभर झी टॅाकीजवर दादा कोंडकेच्या काही खास चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. सकाळी ९ वाजता ‘गनिमी कावा’, दुपारी १२ वाजता‘मला घेऊन चला’, सायंकाळी ६ वाजता ‘पळवा पळवी’ हे चित्रपट प्रेक्षकांना पाहता येतील. या चित्रपटांबरोबरच दुपारी ३ वाजता ‘दादागिरी’ या विशेष कार्यक्रमाअंतर्गत दादा कोंडके यांच्या कारकीर्दीचा पट उलगडला जाईल.
मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत.
दादा कोंडके यांनी अभिनय केलेली काही गाणी
अगं ये जवळ घे ना
मी तर भोळी अडाणी
नको चालूस दुडक्या चाली
काय ग सखू
माळ्याच्या मळ्या मंधी कोण ग उभी
दादा कोंडके यांचे चित्रपट.
पांडू हवालदार
www.youtube.com/shared?ci=-x8XEOwLsic
सोंगाड्या
www.youtube.com/shared?ci=eXYAL3Eh8aM
भारत सरकारतर्फे “अ” क्षेत्राच्या कथ्थक नृत्यांगना म्हणून मान्यता मिळालेल्या आणि गेली तीस वर्षे नृत्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुक्ता जोशी या ठाण्यातील कलारत्नांपैकी एक ! ठाण्याच नाव कोरिया, चीन, कंबोडिया, ग्रीस या देशांमध्ये पोहोचवण्याचा आणि उज्वल करण्याचा मान मुक्ता जोशी यांच्याकडे जातो
सेनेच्या स्थापनेनंतरची मुंबई महापालिकेची पहिली निवडणूक त्यांनी लढवली. ६८ साली ते नगरसेवक झाले. दोन वर्षांत मानाच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष बनले.
एकीकडे गणितासारखा विषय हाताळणारे उमर खय्याम हे कवी म्हणून देखील परिचित होते. आपल्या जीवन काळात त्यांनी जवळपास हजारहून देखील जास्त रुबायत व श्लोक तयार केले आहेत.
पुण्याच्या फिल्म अॅ ण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमधून सुवर्णपदक मिळवून नवीन निश्चल ‘सावन भादो’ या १९७० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर झळकले. त्यानंतर ‘संसार’, ‘परवाना’, ‘बुढ्ढा मिल गया’, ‘नादान’, ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’, ‘हँसते जख्म’, ‘धर्मा’, ‘छलिया’, ‘धुंद’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यांचा जन्म १८ मार्च १९४६ रोजी झाला. दोन पंजाबी आणि सुमारे ८०-९० चित्रपटांतून सुरुवातीला नायक किंवा सहनायक म्हणून आणि नंतरच्या काळात चरित्र नायकाच्या व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रेक के बाद’, त्यापूर्वी आलेल्या ‘राजू बन गया जंटलमन’ ‘खोसला का घोसला’, ‘बॉलीवूड कॉलिंग’, ‘आशिक बनाया आपने’, ‘रहना है तेरे दिल में’ यांसारख्या अलीकडच्या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका साकरल्या. बासू भट्टाचार्य दिग्दर्शित १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘आस्था’ चित्रपटात अभिनेत्री रेखासोबतची त्यांची प्रणयदृश्ये चांगलीच गाजली होती. नवीन निश्चल यांना मोठय़ा पडद्यावर नायकाच्या फारशा भूमिका नंतरच्या काळात मिळाल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी छोटय़ा पडद्याकडे मोर्चा वळवला. जया बच्चन निर्मित ‘देख भाई देख’ या दूरदर्शनवरील कौटुंबिक विनोदी मालिकेत मा.नवीन निश्चल यांनी बलराज दिवान ही भूमिका केली होती आणि ती चांगलीच गाजली.
नवीन निश्चल यांचे निधन १९ मार्च २०११ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
डॉ. राजेंद्रसिंह हे ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी आहेत.
स्नेहलता दसनूरकर या कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होत्या. अवंतिका, आशास्थान, जिव्हाळा, प्रपंच, अजून यौवनात मी, अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या आणि इंद्रधनुष्य, लाखो बायकांत अशी, ओलावा, रुपेरी पश्चिमा, स्वामिनी, स्वामीनी, ममता, शुभमंगल, किनारा यांसारखे त्यांचे अनेक कथासंग्रह वाचकप्रिय ठरले होते. अवंतिका’ मालिका आणि ‘शापित’ चित्रपटाची कथा-पटकथा स्नेहलता दसनूरकर यांनी लिहिली होती.
कादंबरीकार होण्याच्या आधी गुलशन नंदा दिल्लीतील बल्लीमारान भागात एका चश्माच्या दुकानात काम करत होते. गुलशन नंदा यांना एकदा बसने प्रवास करत असताना एकाने लिखाण करण्यास सांगितले व ते यशव्वी कादंबरीकार आणि हिंदी पटकथा झाले. साठच्या दशकात गुलशन नंदा हे लेखक पॉकेट बुक्सच्या पहिल्या पिढीतले तळपणारे तारे होते.
गुलशन नंदा यांच्या कादंबर्यांकनी विक्रीची नवनवीन विक्रम प्रस्थापित करतांनाच बॉलीवुडला कटी पतंग, दाग, अजनबी, नया जमाना, झील के उस पार, शर्मिली, खिलौना, आदींसारखे जवळपास २५ सुपरहिट चित्रपटही दिलेत.
गुलशन नंदा यांच्या हिंदी कादंबर्यावर जितके हिंदी चित्रपट निघाले तितके हिंदी चित्रपट इतर कोणत्याही हिंदी लेखकाच्या कादंबऱ्यांवर निघाले नसतील.
गुलशन नंदा यांचे निधन १६ नोव्हेंबर १९८५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti