(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • भालचंद्र नीळकंठ पुरंदरे

    डॉ. पुरंदरेंनी कुटुंबनियोजनासाठी विशेष कामगिरी बजावली आहे. गर्भपातविषयक कायद्यासंबंधी नेमलेल्या ‘शांतिलाल शाह समिती’चे ते सभासद होते. डॉ.पुरंदरेंच्या कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देण्यात आला.

  • श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुत

    मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्मविष्काराचे नवे क्रांतिकारी वळण देणार्याच या कवीने आपल्या कवितांतून स्त्री-पुरुषातील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतींचा आविष्कार केला. त्यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी झाला.‘एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन मी ती स्वप्राणाने’ अशी हाक देऊन पृथ्वीला ‘सुरलोक साम्य’ प्राप्त करून देण्याचे महास्वप्न आपल्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहणार्याक कवी केशवसुत. कवी केशवसुत म्हणजे मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे म्हणत; आशय, अभिव्यक्ती अन् काव्यविचार यात आमूलाग्र परिवर्तन घडवत; आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणारे युगप्रवर्तक कवी!

    इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत रूढ केला.
    गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.

    करा अपुल्या तू पहा चाचपून, उरा अपुलिया पहा तपासून
    प्रकृती माझीही तिथे तुज कळेल, विकृती माझी तुज तिथे आढळेल.

    किंवा

    आपल्या घराची, पत्नीची आठवण काढताना ते म्हणतात;
    श्वासांनी लिहिली विराम दिसती ज्यांमाजि बाष्पीय ते,
    प्रीतीचे बरवे समर्थन असे संस्पृत्य ज्यांमाजि ते,
    कांतेची असली मला पवन हा पत्रे आता देतसे,
    डोळे झाकुनि वाचिता त्वरित ती सम्मूढ मी होतसे.

    अशा प्रकारे प्रेमाचे विशिष्ट तत्त्वज्ञानही त्यांनी फार सूक्ष्म रीतीने व मराठीत तर प्रथमच आपल्या कवितेतून मांडले.

    त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला.
    ‘वर्डस्वर्थचा प्रभाव असणार्यात केशवसुतांनी ‘भृंग’, ‘पुष्पाप्रत’, ‘फुलपाखरू’ अशा निसर्गकविता लिहिल्या. ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘गोफण केली छान’ या कवितांतून आपले क्रांतिकारी सामाजिक विचार ओजस्वीपणे मांडले. ‘झुपुर्झा’ ही त्यांची गूढ अनुभूती व नावीन्पूर्ण अभिव्यक्तीची कविता. ‘म्हातारी’ या त्यांच्या गूढगुंजनात्मक कविता.

    केशवसुत यांचे निधन ७ नोव्हेंबर १९०५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • गझलसम्राज्ञी

    बिहारमध्ये आलेल्या भयानक पुराने असंख्य नागरिकांचे जीवन उध्वस्त झाल्यामुळे व्यथित झालेल्या एका मुलीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा ध्यास घेतला. स्वतःच पुढाकार घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणून एका संगीत मैफलीचे आयोजन केले. या संगीत मैफलीत येण्याचे अनेक मान्यवर गायक तसेच वादकांनी मान्य केले होते. मात्र ऐनवेळी त्यांच्यापैकी कोणीच फिरकले नाही. मात्र ही मुलगी मुळीच विचलित झाली नाही. या संगीत मैफलीत तिने स्वतःच गाण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी अवघे सात वर्षे असलेल्या त्या मुलीने तब्बल सहा तास एकटीने गाऊन ती संगीत मैफल साजरी केली व पूरग्रस्तांसाठी निधी जमविला. या जिद्दी मुलीचे नाव होते बेगम अख्यर. मोठेपणी गझलसप्राज्ञी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. बेगम अखर मुळच्या कोलकात्याच्या. लहानपणापासून त्यांना सुगम संगीताची खूप आवड होती. त्यांना शास्त्रीय संगीताची फारशी आवड नव्हती. तरीही पतियाळाचे उस्ताद आत्ता अहमदखान यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे रितसर धडे घेतले. मात्र पुढे त्यांनी गझल, भजन, सुमरी, दादरा आदी प्रकारांमध्येच जास्त रुची दाखवून त्यात प्रभुत्व मिळविले. मिर्झा गालिब व जिगर भोरादाबादी हे त्यांचे आवडते कवी. त्यांच्या अनेक गझलांना बेगम अस्त्ररनी स्वत: संगीत दिले तसेच स्वतः गाऊन अनेक गझला लोकप्रिय केल्या. गझलगायकीमुळेत्या केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तान, अफगाणिस्तानातही त्या प्रचंड लोकप्रिय होत्या. आदरातिथ्य करण्याच्या त्यांच्या लखनवी पद्धतीमुळे त्या आजही असंख्य रसिकांच्या स्मृतीमध्ये आहेत.

  • भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे

    आज ११ सप्टेंबर.. थोर गांधीवादी आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे याी जयंती.

    विनोबाजींचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी झाला.

    भगवद्गीतेचे सार सोप्या रसाळ शैलीत ‘गीताई’ आणि ‘मधुकर’ सारख्या ग्रंथांतून सांगणार्‍या विनोबांची भेट ७ जून १९१६ रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली आणि त्यांच्या आयष्यानेच एक नवे वळण घेतले. त्याक्षणापासून ब्रह्मचर्याची शपथ घेऊन त्यांनी जीवनसाधनेस सुरूवात केली. वाई मुक्कामी स्वामी केवलानंद सरस्वतींच्या चरणाशी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, शांकरभाष्य व पतंलजोगाचे शिक्षण घेतले.

    पुढे १९२१ मध्ये जमनालाल बजाजांनी साबरमतीच्या आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. तिचे संचालक म्हणून ८ एप्रिल १९२१ रोजी महात्माजींच्या १९४० त्या वैयक्तिक सत्याग्रहाचे गांधीजींनी निवडलेले पहिले ते सत्याग्रही होते.

    विनोबांनी १९५१ ते ५३ हा भूदान यात्रेचा कालावधी वगळता सारे आयुष्य वर्ध्याच्या पवनार आश्रमात काढले.

    भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मान केला.

    विनोबा भावे यांचे १५ नोव्हेंबर १९८२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ.इंटरनेट

  • हिंदी सिनेमांतील पहिली संगीतकार जोडी – हुस्नलाल-भगतराम पैकी हुस्नलाल

    हुस्नलाल व भगतराम हे दोघेही लाहोरच्या सुप्रसिद्ध संगीतकार पंडित अमरनाथ शर्मा यांचे धाकटे बंधू. त्यांचा जन्म १९१६ रोजी जालंधर येथे झाला. हुस्नलाल उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते.

  • मेंडोलिन वादक उप्पलपू श्रीनिवास उर्फ  यू श्रीनिवास

    मेंडोलिन आणि यू. श्रीनिवास ही काही वेगळी नावं नव्हती एवढं त्यांच्यात जीवैक्य होतं. मैफलीत यू. श्रीनिवास आपल्या बोटांच्या नाजुक करामतीतून मेंडोलिनमधून अशी काही जादुई सुरावट निर्माण करायचे की, रसिकांसमोर सुरांचं एक अनोखं मायाजाल विणलं जायचं.

  • सी. डी. एस. अधिकारी बिपिन रावत

    रावत यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्षे लष्करासाठी समर्पित केली होती. त्यांच्याकडे आणखी अनेक जबाबदाऱ्या होत्या आणि ते देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी एक काम करत होते. बिपिन रावत म्हणत असतत, की त्यांनी एकट्याने काहीही केलं नाही. टीम वर्कमुळेच यश मिळालं. त्यांनी गोरखा बटालियनपासून सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी सैन्यात अनेक पदांचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते लष्करप्रमुख झाले, आता ते भारतातील पहिले सीडीएस अधिकारी म्हणूनही काम करत होते.

  • न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी

    कसोटीत तीनशेहून अधिक विकेट आणि चार हजारहून अधिक धावा करणाऱ्या भारताचा महान अष्टपैलू कपिलदेव आणि इंग्लंडचा इयन बोथम यांच्या पंक्तीत व्हेटोरीने स्थान मिळवलेय. त्यानं ६ शतके आणि २३ अर्धशतके ठोकलीत. ३४ आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये व्हेटोरीने ३८ विकेट घेतल्यात. कर्णधार म्हणूनही डॅनियल व्हेटोरी यशस्वी ठरलाय.

  • दिग्दर्शक एन एस वैद्य

    त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांचे संकलन केले होते व एक उत्कृष्ट संकलक म्हणून नावलौकिक मिळविला होता. ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक दादा कोंडके, कमलाकर तोरणे, अण्णासाहेब देऊळगावकर, जब्बार पडेल, महेश कोठारे आदींच्या चित्रपटांचे संकलन वैद्य यांनी केले होते.

  • धृपद-धमाराचे गायक मुकुल शिवपुत्र

    मुकुल शिवपुत्र हे पद्मभूषण पंडित कुमार गंधर्व यांचे पुत्र आणि प्रमुख शिष्य आहेत आणि त्यांना भारतीय संगीतातील एक उत्तम गायक मानले जाते. त्यांचा जन्म २५ मार्च १९५६ रोजी झाला. मुकुल शिवपुत्र यांनी वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे यांच्याकडून धृपद-धमाराचे, तर एम. डी.रामनाथन यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले.मुकुल हे ख्याल, भक्तिसंगीत व लोकगीतांसाठी विशेष ओळखले जातात. १९७५ पासून ते शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करीत आहेत. २३ व्या सवाई गंधर्व महोत्सवापासून त्यांनी गायनाचा श्रीगणेशा केला. ते कुमार गंधर्वांचे चिरंजीव अन् शिष्य असले तरी त्यांच्या गायकीतून कोठेही कुमारजी फारसे डोकावत नाहीत. "तब्बल वीस वर्षे केवळ मंदिरांमध्ये गाणारा मुकुल जर बैठक न मोडता कार्यक्रम करत गेला असता तर आज तो त्याच्या बापाच्याही पुढे गेला असता" असे पंडित वसंतराव देशपांडे म्हणाले होते. ग्वाल्हेर घराण्याची गायकी घेऊन हे अवधूत भारतभर फिरले.

    संस्कृतमध्ये केलेल्या संगीत रचना ही मुकुल शिवपुत्र यांची भारतीय शास्त्रीय संगीताला दिलेली देणगी आहे. मुकुल शिवपुत्र हे रागांच्या सादरीकरणातील संपूर्ण नव्या दृष्टीकोनाच्या कलेसाठी ओळखले जातात. ते या सादरीकरणाला एक नवीन आयाम देतात आणि त्यातून त्यांचे वेगळे अंग रसिकांसमोर येते. हिंदुस्तानी शास्त्रिय संगीत आणि ठुमरी, चौती, कजरी आणि होरी यांसारख्या काही अर्ध शास्रीय संगीत प्रकारांवरही त्यांचे एकसारखे प्रभुत्व आहे. सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही भजनांचे अगदी उत्तम असे सादरीकरण ते करतात. आपल्या समूहातर्फे मुकुल शिवपुत्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचे त्यांच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वाच्या घरी मुक्कामाला असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण बारा वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी सात वर्षे झाली होती. आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो. हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजाने कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोटय़ा मुकुलचा गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवांधार पाऊस.. बाहेरही होता.. आणि आतही.. कवी अनिल बेचैन झाले. त्यांनी वही पेन घेतलं आणि ते लिहून गेले..

    ‘‘कुणी जाल का.. सांगाल का..
    सुचवाल का त्या कोकिळा..
    रात्री तरी गाऊ नको
    खुलवू नको अपुला गळा..
    आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
    परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
    कळवाल का त्या कोकिळा की झार होती वाढली
    आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली!’’
    सकाळी त्यांनी ही कविता मुकुलच्या हातात ठेवली. म्हणाले, ‘मुकी, हे घे. फक्त तुझ्यासाठी..’ महाराष्ट्राच्या या लाडक्या कवीने हे सर्वाग सुंदर गीत, मुकुलजींसाठी लिहिलं आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मकुल शिवपुत्र यांचे गायन
    https://youtu.be/exX364lveFA

    https://youtu.be/p1XddjLg818