(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • केशव चैतन्य

    (सु.१५२४-२० मे १५७१)

    तुकाराम महाराजांच्या गुरूपरंपरेतील एक मराठी संत. त्यांचे मुळ नाव विश्वनाथ. जन्म पुनवाडी किंवा पुणेवाडी (पुणे) येथे. पित्याचे नाव नृसिंह, आईचे आनंदी. उपनाम राजर्षी किंवा राजऋषी. गिरिजानामक स्त्रीशी त्याचा विवाह झाला होता. त्याशिवाय त्याच्यावर मोहित झालेल्या झबुन्निसा आणि रोशन हया यवन स्त्रियांचाही त्याने भार्या म्हणून स्वीकार केला होता. पुढे आलेल्या एका आपत्तीत झाबुन्निसा आणि रोशन हयांना मरण आले व गिरिजेसह तो ओतुरास (जि. पुणे) आला. तेथे राघव चैतन्य हया सत्पुरूषाची गाठ पडून विश्वनाथाने त्यांचे शिष्यत्व पत्करले आणि संन्यास घेतला. केशव चैतन्य हे त्याचे संन्यास धर्मातील नाव होय. त्याची समाधी ओतूर येथेच आहे. कृष्णदास बैरागीकृत चैतन्यलीला हया अप्रकाशित ग्रंथात केशव चैतन्याने पुढील पाच ग्रंथ लिहिल्याचे म्हटले आहे भक्तिप्रकाश, वैकुंठपद, वासनामय देह, गीताभागवतसार आणि परमार्थविचार तथापि ते सर्व अनुपलब्ध आहेत.

  • मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर

    मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी अमरावती जिल्यातील अचलपूर येथे झाला. भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचे वडील वेदपंडित, तो वारसा भाऊसाहेबांनी कायम ठेऊन, संस्कृत, मराठी, उर्दू, इंग्रजी, भाषेवर प्रभुत्व मिळवले.

    नागपुरातून विधी शाखेची पदवी प्राप्त करून, १९३५ साली भाऊसाहेबांनी यवतमाळ येथे वकिली व्यवसायास सुरुवात केली. वकीली व्यवसायात भाऊसाहेबांनी फौजदारी खटल्यां मध्ये भरपूर यश संपादित करून वकील म्हणून नावोलौकिक मिळवला. भाऊसाहेब स्वतः वेदपंडीत, वकील, शिकारी होते, शिकारीचा तर त्यांचा छंद नुसता शौर्य दाखविण्यासाठी नव्हता, तर श्वापदांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्याचे निरीक्षण करुन भाऊसाहेबांनी कथा लिहिल्या होत्या, ज्या किर्लोस्कर, युगवाणी, अमृत इत्यादी अनेक मसिकात प्रकाशित झाल्या होत्या, त्यात शिकारीतील शौर्या पेक्षा, प्राण्यांच्या अभ्यासाला प्राधान्य असायचे.

    कालांतराने कायद्याने शिकारीला बंदी आली, त्यामुळे भाऊसाहेबांची शिकार पण बंद झाली, मोतीबिंदू मुळे भाऊसाहेबांच्या दोन्ही डोळ्यांची नजर गेली आणि त्याच कारणास्तव वकिली पण बंद करावी लागली, पण इतके होऊनही भाऊसाहेब हतबल झाले नाहीत, वेदाध्ययन,संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच, त्यातील चंपू प्रकारात शायरीचा उगम असल्याचे ते म्हणत, त्यातूनच त्यांनी मराठी शायरीची रचना केली, त्यांची शायरी ही उर्दू भाषेतील शायरी पेक्षा वेगळी होती, त्यातून नेहमीच स्वाभिमानी आणि अपेक्षित अशा शायरीची रचना त्यांनी केली, पुढे भाऊसाहेबांच्या शायरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला, महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात त्यांचे कार्यक्रम होऊन लोकप्रिय झाले.

    भाऊसाहेबांची मराठी शायरी, मराठी मुशायरा, मैफिल, दोस्तहो, जिंदादिल ही पुस्तके प्रकाशित झाली, खऱ्या अर्थाने त्यांनी मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या " दोस्त हो" आणि " जिंदादिल " ह्या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले. भाऊसाहेब पाटणकर यांचे २० जून १९९७ रोजी निधन झाले.

    भाऊसाहेब पाटणकरांची शायरी
    पेड वेणीचे तुझ्या तू सोडू नको मागे पुढे
    आम्ही तरी कैसे बघावे सारखे मागे पुढे
    आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही
    एकही ना चीज इथली घेऊनी गेलो आम्ही
    तेही असो आमुच्या सवे आणिला ज्याला ईथे
    भगवन अरे तो देहही मी टाकूनी गेलो ईथे
    आजवरी बेधुंद जैसा मांड आम्ही गाईला
    त्याच त्या तल्लिनतेने जोगिया ही गाईला
    जाणतो इतुकेच आम्हा मस्तीत आहे गायचे
    लोकहो हे दैव जाणे काय केव्हा गायचे
    येतो असाही काळ केव्हा काही असेही गायचा
    जोगिया डोक्यात आणिक मांड असतो गायचा
    कौशल्य माझ्या गायनाचे कळलेच ना कोणा कधी
    गेलो असा गाऊन नाही बेसूरही झालो कधी
    सन्मानिले वैराग्य आम्ही शृंगार ही सन्मानिला
    अंकावरी आहे रतिच्या बुद्ध येथे झोपला
    विसरला दुनियेस आपुल्या गुंजनाही विसरला
    कमलपोषी भृंग आता कमलासही त्या विसरला
    हे आले वैराग्य आम्हा निष्कामता ऐसी आली
    तैसी नको नुसतीच जेथे दाढी हवी लुंगी हवी
    "आपुल्याच दाती ओठ आपुला चावणे नाही बरे,
    हक्क अमुचा अमुच्यासमोरी मारणे नाही बरे"
    भाऊसाहेब पाटणकरांची स्वत:च्या मृत्युवरील ही शायरी.
    जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
    मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले
    आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
    होती आम्हा जाणीव की, मेलो आता, बोलू नये
    कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
    एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला
    बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
    जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी
    मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
    श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले
    थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
    जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले
    ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
    कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही
    त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
    झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला
    लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
    रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला
    जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
    चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • संगीतकार रवींद्र जैन

    आज ९ ऑक्टोबर
    आज संगीतकार रवींद्र जैन यांची पुण्यतिथी
    जन्म:- २८ फेब्रुवारी १९४४

    भावमधूर संगीताची कास कायम धरत भाषा कुठलीही असो, सहजी लोकांच्या ह्रदयाला भिडेल अशा संगीतातून त्या भावना पोहोचवणे ही संगीतकार मा.रवींद्र जैन यांची खासियत होती. अभिनेता राज कपूर यांनी रवींद्र जैन यांना खूपच मदत केली. ‘राम तेरी गंगा मैली’, ‘दो जासूस’, ‘हिना’ अशा राज कपूरच्या चित्रपटांना जैन यांनी संगीत दिले. राजश्री प्रॉडक्शन आणि रवींद्र जैन यांचे एक समीकरण बनले होते. याशिवाय, सुजाता, सुखम सुखकरम, आकाशा थिंटे निरम अशा प्रादेशिक चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. हिंदी चित्रपटांमध्ये जम बसत असताना रवींद्र जैन यांनी एक वेगळा प्रयोग करत धार्मिक चित्रपट आणि मालिकांच्या गीतांना संगीत देण्यास सुरुवात केली. ‘वनरात्री’, ‘गोपाल कृष्ण’, ‘जय करोली माँ’, ‘हर हर गंगे’ अशा चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. रामायण, श्रीकृष्ण, साईबाबा, श्री ब्रह्मा विष्णू महेश, द्वारकाधीश, जय गंगा मैय्या, वीर योद्धा पृथ्वीराज चौहान अशा मालिकांना त्यांनी संगीत दिले आणि मालिकांची गीतेही बरीच गाजली. दाक्षिणात्य गायक येसुदासला हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक देण्याचे संपूर्ण श्रेय रवींद्र जैन यांना जाते. ओ गोरिया रे, बीती हुअी रात की, गोरी तेरा गाव अशी रवींद्र जैन यांनी संगीत दिलेली गाणी येसूदास यांनी गायली. त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांमध्ये सचिन आणि रंजीतावर चित्रित झालेले ‘अखियों के झरोकोंसे..’ हे गाणे खूप लोकप्रिय ठरले. विरोधाभास एवढाच की दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्या या संगीतकाराने आपल्या संगीतामधून कधीच आपली वेदना जाणवू दिली नाही. सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटांमधून रविंद्र जैन यांनी अनेक हळूवार भावगीतांमधून सुरांची पखरण केली. प्रत्येक संगीतकाराचा आपला एक आवडता गायक किंवा गायिका असते. जैन यांच्या संगीताचे नाते जोडले गेले ते गायक येसूदास यांच्याशी.. किंबहूना दक्षिणेकडच्या या गायकाला हिंदी चित्रपटांमध्ये आणणाऱ्या जैन यांचे त्यांच्याशी इतके घट्ट नाते होते की जर आपल्याला दृष्टी मिळालीच तर पहिले येसूदास यांचा चेहरा पहायला आवडेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. मा.रवींद्र जैन यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. बदलत्या काळानुसार त्यांनी आपल्या संगीतात बदल केला तरी त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याची गोडी सुरेख होती. संगीतकार जैन यांनी फक्त चित्रपटांमधील गीतांना नव्हे तर प्रायव्हेट अल्बम, गझल, पौराणिक मालिकांनाही त्यांनी दिलेल्या संगीताला वेगळे महत्त्व होते. मा.रवींद्र जैन यांचे ‘दिल की नजर से’ हे शायरीवर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे. शायरीवर पुस्तक लिहिणारे ते पहिले संगीतकार आहेत.*मा.रवींद्र जैन* यांचे ९ ऑक्टोबर २०१५ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.रवींद्र जैन यांना आदरांजली.

    संजीव वेलणकर पुणे.
    संदर्भ:- इंटरनेट

    मा.रवींद्र जैन यांची गाजलेली गाणी
    ’आजसे पहेले आजसे जादा
    ’गोरी तेरा गाव बडा प्यारा
    जब दिप जले आना
    ’राम तेरी गंगा मैली,
    सुन सायबा सुन

  • मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी

    आज मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा वाढदिवस.
    उमेश कुलकर्णी यांचा जन्म ६ डिसेंबर १९७६ रोजी झाला.

    समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळणारा उमदा दिग्दर्शक म्हणजे उमेश कुलकर्णी. वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’ सारख्या आशयसंपन्न चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी केलेले आहे. वळू’ हे नाव देऊन चित्रपटातून बैलाबरोबरच त्यांनी गावाची गोष्ट मांडली. त्यांच्या चित्रपटातील रंजकता हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे. ‘विहीर’, ‘देऊळ’,हायवे,आरपार या त्यांच्या चित्रपटांनी इंटरनॅशनल फिल्म फेस्ट्रीवल मधील सारी महत्वपूर्ण बक्षिसे पटकावली. ‘आरभाट कलाकृती या नावाने गिरीश - उमेश कुलकर्णी संस्था चालवतात. ‘देऊळ’हा आशयघन आणि वेगळ्या धाटणीचा चित्रपट होता. ‘देऊळ’ या चित्रपटासाठी गिरीश - उमेश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय ‘सुवर्ण कमळ’ पुरस्कार मिळाला. मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांच्या नावावर चित्रपट चालतो अशा कलाकारांमध्ये लेखक - दिग्दर्शक म्हणून उमेश कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर असून दर्जेदार आणि वेगळ्या वाटेवरचे चित्रपट निर्माण करून ते रसिकांपर्यंत पोचविण्यात ही जोडी विशेष प्रवीण आहे. चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे. मा.जया बच्चतन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा अभिनय आणि त्यांच्याडतील कौशल्य सर्वप्रथम हेरलं आणि या चित्रपटाच्या निर्मितीस होकार दिला. उमेश कुलकर्णी गेली काही वर्षे लघुपटनिर्मितीसाठी चित्रपटकर्मीना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. लघुपटांवर उमेश कुलकर्णी यांचे खास प्रेम आहे. त्यांची दिग्दर्शक म्हणून ओळखही याच माध्यमातून झाली होती. त्यामुळे एक प्रकारे लघुपटनिर्मितीची चळवळच त्यांनी सुरू केली असून लघुपटनिर्मितीचे प्रशिक्षण देणारी कार्यशाळा ते घेतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • विजय तनपुरे (शिवशाहीर)

    विजय तनपुरे हे नगर जिल्ह्यातील राहुरीत राहणारे अपंग कलावंत. आकाशवाणी व दूरदर्शनवरून त्यानी अनेक कार्यक्रम केले आहेत. अपंगत्वावर मात करीत ते जिद्दीने, चिकाटीने शाहीर झाले. त्यांच्या पोवाड्यांच्या अनेक कॅसेट आज बाजारात उपलब्ध आहेत.

    शाहीर म्हणून यश मिळवल्यावर एकदा त्यांना कीर्तन करण्याचा आग्रह झाला. पण ती आपली पात्रता नाही म्हणून त्यांनी तेव्हा नम्र नकार दिला. पण त्यानंतर स्वस्थ न बसता त्यांनी ही किर्तन करण्यासाठी कला अवगत करण्याचा ध्यास घेतला. यासाठी त्यांनी सांस्कृतिक कार्यसंचालनालय, मुंबई यांच्याकडे प्रशिक्षणासाठी अर्ज केला. डिकसळच्या प्रकाश महाराज बोधले यांच्याकडे त्यांना प्रवेश मिळाला. तिथे आपण शाहीर आहोत, नामवंत शाहीर आहोत हे न सांगता त्यांनी अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे राहून कष्टाने कीर्तनाची कला सादर केली. लवकरच त्यांना कीर्तन कलेत पारंगत असल्याचे प्रमाणपत्र मिळाले. कीर्तनाचे कार्यक्रम मिळू लागले.
    तनपुरे हे जिद्दिने, मेहनत करुन शाहीराचे कीर्तनकार झाले.

    विजय तनपुरे यांची www.shivgarjana.com ही वेबसाईट आहे.

    संपर्कासाठी पत्ता:

    शिवशाहिर विजय तनपुरे,
    खळवाडी न. २, स्टेशन रोड,
    ता. राहुरी, जि. अहमनगर,
    फोनः ०२४२६-२३३७७९
    मोबाईलः ९३२५१४१८८२

  • सुनील गोडसे

    गडकरी रंगायतन हे ठाण्यातील एका नव्या पर्वाची नांदीच ठरलं. कारण रंगायतन झाल्यानंतर ठाण्यातील अभिनयाला एक मंच मिळाला आणि रंगायतनच्या कट्ट्यावर नाट्यसृष्टीला योगदान देणारे कलावंत मोठे होऊ लागले. त्यातलाच एक कलाकार म्हणजे “सुनिल गोडसे”!

  • डॉ. लक्ष्मण देशपांडे

    आज ५ डिसेंबर
    आज वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाने जगभर प्रसिद्ध झालेल्या डॉ. लक्ष्मण देशपांडे यांची जयंती.
    जन्म ५ डिसेंबर १९४३

    प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी एम. ए.,पीएच.डी.,मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९६८ ते १९८० स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. २३ नाटय़महोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाटय़कथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका, अशी त्यांची नाटय़-चित्रपट कारकीर्द आहे. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगामुळे डॉ. देशपांडे यांचा प्रेक्षक-श्रोता जगभर आहे. एकूण ५२ पात्रांचे विविध आवाज आणि कमीतकमी प्रभावी हालचाली हे या एकपात्री प्रयोगाचे खास वैशिष्टय़ होते. मराठवाडय़ाच्या ग्रामीण जीवन शैलीशी एकरूप असलेले आणि अस्सल व्यक्तिरेखा असणारा हा प्रयोग केवळ मराठवाडय़ातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विविध देशांतील मराठी नाटय़रसिकांना भावला. हे उत्तुंग प्रतिभेचा कलावंत होते. ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा नोंद घेण्यात आलेले लक्ष्मण देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या. तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ची सुरुवात १९८०मध्ये झाली. आजपर्यंत या एकपात्री प्रयोगाचे ३ हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत. प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • थोरले माधवराव पेशवे

    पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला.

  • प्रमोद पालव

    नैसर्गिक साहित्याचा पुरेपूर वापर करत इकोफ्रेंडली अशी गणेशमूर्ती तयार करुन हलक्या आणि मजबूत मूर्तीचा एक आदर्श सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील कलाकार प्रमोद पालव यांनी सर्वांच्या समोर ठेवलाय.

  • आशालता वाबगावकर

    आशालता वाबगावकर या सुप्रसिद्ध मराठी चित्रपट कलाकार आहेत.