जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी झाला. १९६९ साली देगलूर येथील महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची पदवी मिळविली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून एम. ए. आणि १९८१ साली पीएच. डी. ची पदवी ही त्यांनी मिळविली.
बॉलीवूडमध्ये नव्वदचे दशक गाजवणारी जूही चावला १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९६७ रोजी झाला. त्यानंतर १९८८ साली आलेला आमिर खानसोबतचा कयामत से कयामत तक हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व जुही रातोरात सुपरस्टार बनली. तेव्हापासून तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
हिंदी खेरीज जुहीने तेलुगू, तमिळ इत्यादी भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. अभिनयाखेरीज जुही चित्रपट निर्मितीमध्ये देखील कार्यरत आहे खळाळतं हास्य, चेहऱ्यावर एक हट के नटखटपणा आणि अभिनयातली जबरदस्त अदा. या गोष्टींमुळं या अभिनेत्रीनं एक काळ बॉलिवूडवर अक्षरश: राज्य केलं. जुही चावला ही बॉलीवूडची चुलीबुली अभिनेत्री म्हणुन सुध्दा ओळखली जाते.
बॉ़लीवूडमध्ये जूही चावला आणि शाहरुख खान यांची मैत्री नावाजली जाते. दोघही खूप चांगले मित्र-मैत्रिण आहेत. आमीर- जूही चावलाच्या जोडीने काही सुंदर चित्रपट दिले आहेत. जूही-शाहरुखची जोडी चित्रपटसृष्टीतील एक हीट जोडी राहिली आहे. या दोघांनी राजू बन गया जेन्टलमॅन, डर, डुप्लीकेट, यस बॉस यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 'गुलाब गँग' या सिनेमातल्या तिच्या खलनायकी भूमिकेचंही कौतुक झालं. जुही चावलाने हॉलीवूडमध्ये काम केले आहे. द हंड्रेड फूट जर्नी या चित्रपटातून जुहीने केले आहे. त्यांनी जय मेहता या गुजराती उद्योगपतीशी त्यांनी १९९८ मध्ये विवाह केला आहे. "आयपीएल‘मधल्या कोलकता नाईट रायडर्स टीमची सहमालकी त्यांच्याकडे आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संत साहित्य, शिलालेख यांच्या अभ्यासाबरोबरच लघुकथा, ललित लेख, व्यक्तिचित्रे हे वाङ्मयप्रकार त्यांनी लीलया हाताळले आहेत. ‘मराठवाड्यातील मराठी शिलालेख’ या ग्रंथात त्यांनी १२० शिलालेखांचं संपादन केलं आहे. या व्यतिरिक्त साहित्य संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेला फारशी – मराठी अनुबंध, सुफी संतांचं मराठी साहित्य, राज्य मराठी भाषा विकास संस्थेनं प्रकाशित केलेला मराठीतील पहिला मराठी – फारशी व्युत्पत्ती कोश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं प्रकाशित केलेला ‘मराठी बखरीतील फारशीचं स्वरूप’ या ग्रंथांचा समावेश आहे.
स्वरराज छोटा गंधर्व व पं. कुमार गंधर्व यांचे समकालीन असलेले परंतु फारसे परिचित नसलेले असे एक गंधर्व म्हणजे ‘महाराष्ट्र गंधर्व’ सुरेश हळदणकर. ते गोमांतकात जन्मले. गाणे शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात आले. त्यांना पं. बापुराव केतकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. त्याच सुमारास गोविंदराव टेंब्यांकडून काही नाट्यपदांचीसुद्धा तालीम मिळाली. सुरेश हळदणकर हे मा. दीनानाथ, बालगंधर्व व मा. कृष्णराव यांना गुरुस्थानी मानत. दैवयोगाने, त्यांना सुरेल, बारीक परंतु धारदार आवाज प्राप्त झाल्याने त्यांच्या गाण्यात दीनानाथ मास्तरांच्या गाण्यातील तडफदारपणा व बालगंधर्वांच्या गाण्यातील लडिवाळपणा या दोन्ही गोष्टी साधता आल्या व त्यामुळे अनेक वर्षे संगीत रंगभूमीवरून व खासगी मैफलीतून ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. ‘होनाजी बाळा’ या नाटकातील त्यांची भूमिका व विशेष करून त्यातील ‘श्रीरंग कमलकांता’ हे त्यांचे पद गाजले.
एके दिवशी त्या नाटकाच्या प्रयोगाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रणेते प्र. के. अत्रे हजर होते. त्या दिवशी ‘श्रीरंगा कमलकांता’ हे त्यांचे पद इतके रंगले, की अत्रे मोहित होऊन अंक संपल्यावर रंगमंचावर आले व सर्व रसिकांच्या समोर पडदा उघडून त्यांनी सुरेश हळदणकरांना ‘महाराष्ट्र गंधर्व’ ही पदवी बहाल केली. पुण्यातून मुंबईला आल्यावर हळदणकरांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण पं. मनहर बर्वे, पं. जगन्नाथबुवा पुरोहित, पं. गणपतराव देवासकर आदी संगीततज्ञांकडे झाले. पुढे ते प्रसिद्धीपासून दूर गेले. तरीसुद्धा त्या अगोदर अनेक वर्षे ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. त्यांनी गायलेल्या काही जुन्या रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. त्यांतील पदे उदाहरणार्थ, ‘विमल अधर निकटी’, ‘रघुराया गं माझा’, ‘श्रीरंगा कमलकांता’, ‘मानिली आपुली’, ‘सुरसुखकनी तू विमला’, ‘पद्ममनाथा नारायणा’ ही पदे त्यांना प्रसिद्धी देऊन गेली. मा.सुरेश हळदणकर यांचे १७ जानेवारी २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-thinkmaharashtara
मा. सुरेश हळदणकर यांची काही गाणी.
‘विमल अधर निकटी’
‘रघुराया गं माझा’
‘श्रीरंगा कमलकांता’
‘मानिली आपुली’
‘सुरसुखकनी तू विमला’
‘पद्ममनाथा नारायणा’
दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता व्हायला आवडेल, की जि.बी. पंत हॉस्पिटलचे संचालक? अशी विचारणा जागतिक कीर्तीचे कार्डियाक अॅनेस्थेटिस्ट डॉ. दीपक टेपे यांना केंद्र सरकरकडून अनौपचारिकपणे करण्यात आली.तेव्हा त्यांनी “मौलाना आझाद” च्या अधिष्ठाता पदाची निवड केली. कारण देशातील पहिल्या पाच अव्वल मेडिकल कॉलेजांत समावेश असलेल्या “मौलाना आझाद” चे अधिष्ठातापद सांभाळण्याचे आव्हान मोठे होते.पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांशी येणारा संपर्क आणि शिक्षण क्षेत्रात योगदानाची संधी त्यात दडली होती. या कॉलेजचे अधिष्ठाता होणारे डॉ.टेपे पहिले मराठीच नव्हे तर पहिले भूलतज्ज्ञही ठरले.
महाराष्ट्र टाईम्सच्या मराठी मुद्रा या सदरात आलेला डॉ. दीपक टेपे यांच्यावरील लेख पुढील पानावर वाचा...
दिल्लीला महाराष्ट्राची भूल!

बापू पटवर्धन यांनी गेले ९-१० वर्षे ब्लड कॅन्सरने आजारी होते. त्यांनी १५-२० केमो घेतल्या होत्या. त्यांनी कॅन्सरलाही मात दिली होती, असे त्यांचे शिष्यगण सांगतात. ३० किमो झाल्यानंतर त्यांनी कोलकात्याला जाऊन कार्यक्रम सादर केला.
पाटील, दत्ता
विधिमंडळाच्या कामकाजात संसदीय आयुधांचा वापर कोणत्या वेळी आणि कसा करावा, त्यासाठी कोणत्या नियमाचा आधार घ्यावा आणि तो घेताना आपला संदर्भ कोणालाही खोडता येणार नाही याची काळजी घेऊन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडून त्यांना त्यांची चूक मान्य करायला लावण्याचे कसब दत्ता पाटील यांच्या अंगी होते.
म्हणूनच १९८७ ते १९८९ या काळात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद अॅड. दत्ता पाटील यांच्या रूपाने सतत गाजत राहिले. रायगड जिल्ह्य़ामध्ये फुकटे वकील म्हणून ओळखले जाणारे दत्ता पाटील म्हणजे खऱ्या अर्थाने गरिबांचा कळवळा असलेले व्यक्तिमत्व होते. नारायण नागू पाटील यांच्या या सुपुत्राने वडिलांनी केलेल्या समाजकार्यामध्ये आपल्याही कार्याची ओंजळ ओतली आणि रायगडमधील कष्टकरी आणि शेतकरी यांचे ते तारणहार झाले. वडिलांच्या आग्रहास्तव फौजदारी वकील झालेल्या दत्ता पाटील यांनी गरिबांचे अनेक खटले फुकटात लढविले, म्हणून त्यांना फुकटे वकील म्हणत ते आपुलकीने. रायगडमध्ये एक निष्णात फौजदारी वकील असलेल्या दत्ता पाटील यांनी अनेकांना खटल्यातून सोडविले, याचा उल्लेख शरद पवार यांनी एकदा विधिमंडळात केला होता. दत्ता पाटलांचे वाचन अफाट होते. विधिमंडळाच्या ग्रंथालयाचा सर्वाधिक वापर करणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये त्यांचा अग्रक्रम होता. ज्येष्ठ सदस्य असूनही ते सभागृहात वेळेवर येत आणि सर्वाधिक काळ सभागृहात थांबत. प्रत्येक चर्चेत ते सहभागी होत. त्यांचे वक्तृत्व धारदार, हजरजबाबी होते. त्यांचा आवाज अत्यंत धारदार, मोठा होता. अनेकदा त्यांच्या नुसत्या आवाजानेच समोरच्या मंत्र्याची उत्तर देताना गाळण उडत असे. वसंतदादा मुख्यमंत्री असताना एका चर्चेमध्ये उत्तर देण्यासाठी दोन्ही गृहराज्यमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते आणि मंत्रिमहोदय सभागृहात येईपर्यंत सभागृहाचे कामकाज एकटय़ा दत्ता पाटील यांनी बंद पाडले होते, ते संसदीय आयुधांचा आणि नियमांचा योग्य वापर करीत. स्पष्ट आणि सडेतोड बोलण्यामुळे ते फटकळ वाटले तरी मनाने अत्यंत साधे होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो वा सीमा लढा, त्यांत दत्ता पाटील अग्रेसर होतेच; पण गेल्या वर्षी मुंबई मराठी पत्रकार संघाने केलेल्या सत्कार समारंभात आपण आजही सीमा लढा लढण्यासाठी तुरुंगात जायला तयार आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते. विधिमंडळाच्या सभागृहात असो वा बाहेर लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आणि तसाच पुढाकार त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे ते संस्थापक होते. मात्र १० वर्षांपूर्वी त्यांना पक्षाने बाहेर काढले तरी त्यांनी दुसऱ्या पक्षात जाणे टाळले. स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा दबदबा होता. गरीब मुलांसाठी त्यांनी कोकण एज्युकेशन सोसायटी सुरू केली. संस्थेच्या सर्व पसाऱ्यावर त्यांचे पूर्ण लक्ष होते. कुटुंबवत्सल, सार्वजनिक कामाविषयी आस्था असणारा आणि त्यासाठी विधिमंडळाचा योग्य वापर करून गरीब शेतकऱ्यांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत धडपडणारा लढवय्या लोकप्रतिनिधी त्यांच्या रूपाने आपण गमावला आहे.
त्याचे वडिल सधन होते. लिओनार्दोच्या शिक्षणाकडे, देखभालीकडे त्यांनी योग्य लक्ष पुरवले. त्याची कलेतील आवड लक्षात घेऊन त्याला वेरोशिओ या प्रसिद्ध चित्रकाराकडे शिक्षणासाठी पाठवले. चित्रकला, शिल्पकला अशा शास्त्रांचा अभ्यास त्याने वेरोशिओ कडे केला. याचवेळी त्याने स्वत: हुन इतर शाखांचाही अभ्यास चालु ठेवला. चर्चच्या दबावामुळे लिओनार्दोला अखेर मॅडोना ऑफ द रॉक्सचे दुसरे चित्र ही रंगवावे लागले. पहिले चित्र सध्या फ्रान्सच्या पॅरिस येथील लूव्र संग्रहालय येथे आहे तर दुसरे लंडन येथील म्युझियममध्ये आहे. पहिल्या चित्राला सध्या मॅडोना ऑफ द रॉक्स (लुव्र व्हर्जन) व दुसऱ्या चित्राला मॅडोना ऑफ द रॉक्स (लंडन व्हर्जन ) म्हणुन ओळखतात.
‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी डॉ. राजेंद्रसिंह यांचा जन्म ६ ऑगस्ट १९५९ रोजी बागपतमध्ये (उत्तर प्रदेश) येथे झाला.
डॉ. राजेंद्रसिंह हे ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी आहेत. १९७५मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या ‘तरुण भारत संघ’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जलसंवर्धनाचं खूप मोठं कार्य उभारलं आहे. राजस्थानात थर वाळवंटानजीकच्या गावांमध्ये पाणी साठवण्यासाठीच्या ‘जोहड’या पारंपरिक रचनांसोबतच छोटे बंधारे वगैरेंच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी त्यांनी लोकांना मार्गदर्शन आणि साह्य केलं. या संदर्भातल्या कामाची सुरुवात १९८५ मध्ये एका गावापासून झाली.
आजवर ८६००हून अधिक जोहड उभारली गेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे गावकरी जलस्वयंपूर्णतेसाठी एकत्र येऊ लागले. आज सुमारे एक हजार गावांमध्ये पाणी परत आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. तसंच, राजस्थानातल्या पाच नद्यांचं पुनरुज्जीवनही शक्य झालं आहे. राजस्थानातल्या अल्वर जिल्ह्यात त्यांचं काम मोठं आहे.
या क्षेत्रातल्या त्यांच्या अतुलनीय कार्याची दाखल घेऊन २०१५ साली डॉ.राजेंद्रसिंह यांना ‘नोबेल’च्या दर्जाचं मानलं जाणारं दीड लाख डॉलर्सचं ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ मिळालं आहे. तसंच रेमन मॅगसेसे पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार आणि अहिंसा पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
डॉ.राजेंद्रसिंह यांची वेबसाईट. http://tarunbharatsangh.in/
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती.
Copyright © 2025 | Marathisrushti