(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आर. के. नारायण आणि मालगुडी डेज

    १९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले.

  • पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी

    १९९४ मध्ये इंद्रा नूई पेप्सिकोमध्ये सामील झाल्या त्यांना पेप्सिकोच्या दीर्घकालीन विकास धोरणाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते.

  • मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी

    समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळणारा उमदा दिग्दर्शक म्हणजे उमेश कुलकर्णी. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९७६ रोजी झाला. वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’ सारख्या आशयसंपन्न चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी केलेले आहे. वळू’ हे नाव देऊन चित्रपटातून बैलाबरोबरच त्यांनी गावाची गोष्ट मांडली. त्यांच्या चित्रपटातील रंजकता हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे.

    ‘विहीर’, ‘देऊळ’,हायवे,आरपार या त्यांच्या चित्रपटांनी इंटरनॅशनल फिल्म फेस्ट्रीवल मधील सारी महत्वपूर्ण बक्षिसे पटकावली. ‘आरभाट कलाकृती या नावाने गिरीश - उमेश कुलकर्णी संस्था चालवतात. ‘देऊळ’हा आशयघन आणि वेगळ्या धाटणीचा चित्रपट होता. ‘देऊळ’ या चित्रपटासाठी गिरीश - उमेश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय ‘सुवर्ण कमळ’ पुरस्कार मिळाला.

    मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांच्या नावावर चित्रपट चालतो अशा कलाकारांमध्ये लेखक - दिग्दर्शक म्हणून उमेश कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर असून दर्जेदार आणि वेगळ्या वाटेवरचे चित्रपट निर्माण करून ते रसिकांपर्यंत पोचविण्यात ही जोडी विशेष प्रवीण आहे. चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे.

    जया बच्चकन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा अभिनय आणि त्यांच्याडतील कौशल्य सर्वप्रथम हेरलं आणि या चित्रपटाच्या निर्मितीस होकार दिला. उमेश कुलकर्णी गेली काही वर्षे लघुपटनिर्मितीसाठी चित्रपटकर्मीना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. लघुपटांवर उमेश कुलकर्णी यांचे खास प्रेम आहे. त्यांची दिग्दर्शक म्हणून ओळखही याच माध्यमातून झाली होती. त्यामुळे एक प्रकारे लघुपटनिर्मितीची चळवळच त्यांनी सुरू केली असून लघुपटनिर्मितीचे प्रशिक्षण देणारी कार्यशाळा ते घेतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • लेखक दिलीप पुरूषोत्तम चित्रे

    तुकारामांचे अभंग इंग्रजीत नेऊन त्यांना ‘ग्लोबल’ करणारे लेखक दिलीप पुरूषोत्तम चित्रे अर्थात ‘दि.पु.’,, दिलीप चित्रेंच्या मराठी आणि इंग्रजी कवितांची भारतीयच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली.

  • श्रीपादशास्त्री किंजवडेकर

    श्रीपादशास्त्री किंजवडेकर हे हिंदू धर्माच्या विविध पैलूंचे आणि योगशास्त्राचे अभ्यासक होते. मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगांचे संपादन त्यांनी केले. तसेच 'भक्तीच्या वाटा' हे सुगम पुस्तकही त्यांनी लिहिले. रुद्रार्थदीपिका, परिव्राजकाचार्य आदी त्यांची पुस्तके अभ्यासूंसाठी उपयुक्त ठरली. त्यांच्या अशा पुस्तकांची यादी बरीच मोठी आहे.

    श्रीपादशास्त्री किंजवडेकर यांचे २१ ऑक्टोबर १९७७ रोजी निधन झाले.

    ## ShripadShastri Kinjavadekar

  • अभिनेते टॉम अल्टर

    ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते टॉम अल्टर यांचा जन्म २२ जून १९५० मसुरी येथे झाला. सोनेरी केस, निळे डोळे आणि टॉम अल्टर या नावामुळे चटकन अमेरिकन किंवा ब्रिटिश वाटणारा हा ज्येष्ठ अभिनेता-लेखक जन्माने आणि मनाने मात्र पक्का भारतीय होता.

  • आंनदयात्री कवी मा.बा भ. बोरकर

    आज ३० नोव्हेंबर
    आज आंनदयात्री कवी मा.बा भ. बोरकर यांची जयंती
    देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके,
    चांदणे ज्यातून वाहे, शुभ पार्यासारखे.
    असे देखणे जीवन जगणारे, आणि रसिकांना भरभरून आनंद देणारे आंनदयात्री कवी!

    जन्म:- ३० नोव्हेंबर १९१९

    १९३० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांचा प्रतिमा हा काव्यसंगह प्रकाशित झाला. त्यांच्या या काव्यसंगहावर केशवसुत, बालकवी, गोविंदागज यांचा प्रभाव विशेषत्वाने जाणवतो. बोरकरांच्या मनावर घरातील धार्मिक वातावरण, प्रेमळ आप्त परिवार, शालेय जीवनातील संस्कार आणि गोव्याचा व कोकणचा रमणीय निसर्ग यांचा खोल परिणाम झालेला त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो.

    निसर्गाच्या भव्योत्कट सौंदर्याचा त्यांना जणू ध्यास जडला होता. निसर्ग हीच त्यांची भाषा बनली; त्यांच्या अविष्काराचे माध्यम बनले. गोव्याच्या निसर्गरम्य भूमीचे वर्णन ते पुढील शब्दांत करतात, - या गोव्याच्या भूमीत मधाचे नारळ असतात. कड्याकपारीतून दुधाचे घट फूटतात; आंब्या फणसांची रास असते. इथे चांदणे माहेरी येते आणि पावसात दारापुढे सोन्या-चांदीच्या धारा खेळतात... किती नितांत सुंदर आणि अत्यंत कल्पनारम्य, पण जिव्हाळ्याने केलेले हे वर्णन आहे! त्यांच्या सर्वच प्रकारच्या लेखनात, विशेषत: कवितेत नियमितपणे निसर्ग डोकावतो. निसर्ग भाषा हेच त्यांचे वेगळेपण.
    १९३२ साली बोरकरांच्या कवितेने भारावून जाऊन श्रेष्ठ कवी भा. रा. तांबे यांच्या तोंडून Here is a new star on horisen असे कौतुकाचे उद्गार निघाले. १९३४ मध्ये बडोदा येथील साहित्य संमेलनात तेथे कर माझे जुळती या कवितेसाठी त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले.

    कवीवर्य भा. रा. तांबे यांच्या विचारसरणीचा, काव्यशैलीचा त्यांच्यावर खूप परिणाम झालेला दिसतो. एकलव्यासारखे तांबे यांचे गुरुपद त्यांनी मनोमन स्वीकारले व मानाने मिरवलेही. त्यामुळे तांब्यांच्या घराण्याची गायकी पुढे नेणारे कवी अशी त्यांची प्रतिमा झाली. बोरकरांचे वि. स. खांडेकर, काकासाहेब कालेलकर, कुमार गंधर्व, पु.ल.देशपांडे, चित्रकार दलाल, यांच्यासह म. गांधी, डॉ. लोहिया, पं. नेहरू, योगी अरविंद बाबू यांसारया विविध प्रांतांतील थोर लोकांबरोबर स्नेहपूर्ण नाते होते. त्यामुळे त्यांचे अनुभवविश्र्व व जीवन अधिक समृद्ध झाले. १९६७ साली पद्मश्री हा किताब मिळाला.
    बोरकरांच्या संपूर्ण काव्यप्रवासात त्यांची कविता जीवनाच्या गतीनुसार आशयदृष्ट्या समृद्ध होत गेलेली दिसते. ते सौंदर्यलुब्ध मनाचे कवी होते. या सौंदर्यातूनच त्यांना दिव्यत्वाचा, अपार्थिवाचा साक्षात्कार होतो.
    दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती,
    यज्ञी ज्यांनी देऊनी निज शीर, घडिले मानवतेचे मंदिर
    परी जयांच्या दहनभुमीवर, नाही चिरा नाही पणती,
    तेथे कर माझे जुळती.

    या कवितेतील मानवतावादामागील सच्चेपणा आपणास आजही भावतो. अतिशय प्रगल्भ व अर्थगर्भ शब्दयोजनेमुळे ही कविता मैलाचा दगड ठरली. ज्ञानदेव गेले तेव्हा, देखणे ते चेहरे, जीवन त्यांना कळले हो अशा एकाहून एक सरस कविता त्यांनी लिहिल्या. स्त्री सौंदर्य आणि प्रेमभावना हेदेखील त्यांच्या कवितांचे प्रमुख विषय होते. त्यांचे गोव्यावर व कोकणी भाषेवरही अतिशय उत्कट प्रेम होते. कोकणी भाषेतही त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित आहेत. त्यातील सासाय या कोकणी संगहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. वास्तवाच्या प्रखर आचेतही बोरकरांच्या कवितेने काव्यात्मतेची स्वप्नील धुंदी टिकवून ठेवली. सुंदरतेच्या श्रद्धेतून, श्रुतिमधूर, गीतधर्मी व भावपूर्ण कवितांसाठी आजही ते आदरपूर्वक ओळखले जातात. मा.बा भ. बोरकर यांचे ८ जुलै १९८४ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-इंटरनेट

  • ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे

    वर्षाचे आजवरचे अनेक फोटो मी पहिले होते. वर्षातल्या अभिनेत्रीसोबतच तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू एकाच छायाचित्रात मांडण्यासाठी हा फोटो महत्त्वाचा ठरणार होता. फोटो काढताना वर्षाला मी पूर्वकल्पना न देता केवळ या बोर्डाच्या बाजूला शिक्षिकेच्या पात्रात तुम्ही असाल तर कसे हावभाव असतील असं विचारून मी त्यांचे हे भाव टिपत होतो.

  • फुटबॉलपटू लियोनल मेस्सी

    गरिबांसाठी त्यांनी स्वस्त किमतीमध्ये घरे बांधून शासनासमोर आणि संपूर्ण देशासमोर नवा आदर्श निर्माण केला. ‘सिमेंट घोटाळा’ ‘एन्रॉन प्रकल्प’ या विरोधात त्यांनी आवाज उठवला. शासनातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांनी बाहेर काढली.

  • एक चित्रकर्मी: श्री मोहन लोके

    लहानपणापासून जे पाहिले, अनुभवले त्या क्रित्येक प्रसंगाची, व्यक्तीची, व्यंगाची, चालीरीतींची अनेक प्रतिबिंब मनावर कोरली गेली आहेत. अशीच एक व्यक्ती समईच्या प्रकाशात शिवपिंडीवर विराजमान असलेल्या बेलपत्रावर गुलाबाच्या फुलाने छानपैकी विराजावे त्याप्रमाणे मनाच्या सांदीकोपऱ्यात दडलेली आहे. ती महानता आपणां सर्वाना ठाऊक असेलही.पण त्या व्यक्तिमत्वाकडे पाहिले तरी एक गोड कहर उसळतो. वामनमूर्ती ... गव्हाळवर्णाची आणि सदैव प्रसन्न आणि हसतमुख चेहरा.बोलण्यात ऐट होती. अदब होती. पण लाचारी दिसत नव्हती. त्यांच्याविषयी लिहिताना डोक्यात भुंगे अनेक घोंघावत आहेत पण शब्द अपुरे पडतील असा त्यांचा जीवन परिचय. शून्यातून विश्व निर्माण करणारा हे विशेषण सर्वार्थाने एखाद्या व्यक्तीला लावतो. पण मी यांच्याविषयी असं लिहिणं टाळतो.कारण हा माणूस किती मोठा असला तरी त्याने आपले आयुष्य घोडपदेवच्या छोट्याश्या घरात व्यतीत केले आणि करीत आहेत. कुणालाही मैत्री करावीशी वाटावी असा लोभस माणूस सन्माननीय श्री मोहन लोके.

    आठवणीतील माणसं लिहिताना सुंदर सुंदर आठवणींची ओंजळ रीती केली परंतु अफाट सागरातून मुठभर वाळू घेताना शिंपले हाताला लागले आणि त्यातल्या मोत्याविषयी माझ्याकडून झरझर उतरत गेले. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया म्हणजे स्वर्गीय सुखाचा अभिषेक झाल्यासारखे वाटले. आज मला आपल्याबरोबर राहत असलेले श्री मोहन लोके गेली ५ दशके मराठी चित्रपटसृष्टीसाठी योगदान देणाऱ्या.... कॅमेऱ्याने सिनेतारे- तारकांना ग्लँमर मिळवून देणारे .... दादा कोंडके पासून आजच्या निर्मात्यापर्यंत आणि अभिनेत्यापर्यंत सलोख्याचे संबंध असलेले... सहकलाकार म्हणून अनेक चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे.... भावनिक अविष्कारांना कॅमेऱ्यात कैद करणारा... जवळ जवळ १५८ चित्रपटात स्थिरचित्रणाचे काम करून स्टुडीओ एक तुही निरंकारचे नांव झळकविणारा...आपला माणूस.

    एक वेळा लेखनाचा इतिहास बदलता येतो पण फोटोग्राफीचा इतिहास बदलता येत नाही. श्री लोके यांची छायाचित्रण या विषयावरील आस्था ही त्यांची जीवनमूल्य ठरली आहेत. कौशल्य उत्तम रंगसंगतीची जाण, नवनिर्मितीची क्षमता, कलात्मक भान, दृश्यमांडणीची कल्पकता, निरीक्षण शक्ती, आत्मविश्वास, प्रसंगावधान, जागरूकता, मेहनत आणि मुळात छायाचित्रण हा आपला आत्मा मानणारा एक मनस्वी छायाचित्रकार. फोटो काढताना डोक्याने न काढता आपल्या हृदयापासून काढून त्या भावनांचे तांत्रिक क्षण टिपणारा एक प्रतिभावंत माणूस.

    जीवनात अनेक दुर्दैवाचे प्रहार झेलीत, आव्हानं, संकट यांचा स्विकार करीत त्यांनी आयुष्यात आपल्या निराशमनावर गुलाबपाण्याचे शिंतोडे शिंपडून आनंद फुलवीत जीवनाला खरा आकार दिला. १९४२ साली गरीब कुटुंबात जन्मलेल्या या भूषणावह व्यक्तीचे सध्या अमृतमहोत्सवी वर्ष सुरु आहे. पांडू हवालदार, येऊ का घरात, आली अंगावर,शूर आम्ही सरदार, बजरंगाची कमाल, सून लाडकी सासरची, जिवलगा, नवरा माझा नवसाचा आदि अनेक चित्रपटात त्यांच्या छोट्या भूमिका कौतुकास्पद आहेत. असे अभिनय करीत असताना दादा कोंडके यांना भारी खुमखुमी यायची. असाच प्रसंग आली अंगावर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना एक छोटीशी भूमिका होती.. भगवान दादा पोलीस इन्स्पेक्टर होते. लोके गावातल्या टपोरी माणसाची भूमिका करीत होते. नुकतीच सासू निर्वतल्यामुळे सर्व कार्य त्यांना करावे लागले होते.त्यामुळे डोक्यावर केस नाहीत म्हणून दादांनी केसाचा विग त्यांच्या डोईवर घातला होता. त्यावेळेस भगवानदादांनी टपोरीला खोटं खोटं मारायचा शॉट घ्यायचा होता. तसं ठरले होते पण मध्येच भगवानदादांच्या कानात दादा कोंडके कुजबुजले. तेव्हा भगवानदादांनी सहनायकाला डोक्यातला विग काढून बुटाने मारला तेही खरेखुरे. सर्व शूटिंग स्टाफ अवाक होऊन पाहत राहिला पण परत शॉट घेण्याचा प्रसंग दादांवर आला नाही. त्यांना हवा असलेला प्रसंग प्रत्यक्षात त्यांना मिळाला होता. पण शूटिंग संपेपर्यंत मात्र दादाच नव्हे सारा स्टाफ पोट धरून हसत होता. दादा कोंडके यांचे या माणसावर अतीप्रेम. घरातल्याची चौकशी नेहमीच करीत. अशा या माणसाला सन २०११ साली अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने *स्टील फोटोग्राफी* क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल त्यांना चित्रकर्मी पुरस्कार देऊन गौरविले. रविंद्र नाट्य मंदिरात झालेल्या सोहळ्यात आपल्या श्री मोहन लोके यांना सन्मानचिन्ह घेताना पाहिलेला क्षण आम्हां घोडपदेव समूहाच्या दृष्टीने अविस्मरणीय आहे. अभिनंदनीयच. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना उदंड आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

    -- अशोक भेके
    घोडपदेव