जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
नाझिया हसन यांनी वयाच्या १५व्या वर्षीचं ‘आप जैसा कोई’ हे गाणं, १६ व्या वर्षीचा ‘डिस्को दिवाने’, १८ व्या वर्षीचं ‘बुम बुम’, २० व्या वर्षीचं ‘यंग तरंग’, २२ व्या वर्षीचं ‘हॉटलाइन’ आणि शेवटी ‘कॅमेरा कॅमेरा’ आणि ‘टूनाइट’. पाच अल्बम मधून त्यांनी क्रांती निर्माण केली. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९६५ रोजी झाला. संपूर्ण दक्षिण आशिया तिच्या प्रेमात पडला आणि त्यांच्या डिस्को दिवान्यांत ब्राझीलसारखे लॅटिन देशही सामील झाले. त्यांनी निर्माण केलेल्या पॉप वातावरणानंतर भारत आणि पाकिस्तान कायमचे बदलून गेले. नाझिया हसन यांनी स्वरांचं नवं दालन उघडून दिलं. १९८० सुमारास, ‘आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आए, तो बात बन जाए..’ हे गाणं सतत वाजू लागलं होतं. ते गाणं होतं फिरोज खानच्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील होते आणि गाणारी नाझिया हसन ही पाकिस्तानी मुलगी. संगीत बिड्डू याचं आहे. हेही समजलं की ते गाणं वेगळं वाटण्याचं कारण होते त्याला बिड्डूचं संगीत आणि लंडनमध्ये झालेलं गाण्याचं रेकॉर्डिंग. ते २४ ट्रॅकवर रेकॉर्ड केलेलं पहिलं भारतीय गाणं होतं. नाझिया यांचा आवाज दोनदा रेकॉर्ड करून त्यात एको म्हणजे प्रतिध्वनीचा परिणाम साधला होता. याच वर्षी ‘डिस्को दिवाने’ नावाचा एक म्युझिक अल्बम आला. त्यातील सगळी गाणी नाझिया हसन यांची होती. आणि एक दिवस व्हिडीओ अल्बमवर नाझिया हसन कोण हेही दिसलं. उजव्या हातात मायक्रोफोन आणि डाव्या हातात त्याची वायर धरलेली.. खांद्यावर ओघळेलेले तिचे लांब केस, तिचं गाणं जसं जगावर पसरलं तसे.
नाझिया हसन यांच्या ‘डिस्को दिवाने’ या पहिल्या अल्बमच्या जगभर सहा कोटी प्रती खपल्या. या अल्बमच्या माध्यमातून ती चिरंतन झाली पण तिचा शेवट खूप क्लेशकारक झाला. हे एवढंच नव्हतं. तिच्या असण्याचे काही ऐतिहासिक आणि अर्थातच सांस्कृतिक पैलू होते. तिने केवळ संगीत क्षेत्रात वादळ निर्माण केलं नव्हतं, तर एक सांस्कृतिक क्रांती घडवून आणली होती. नाझिया हसन आणि त्यांचा भाऊ झोहेब हसन यांनी एकत्रितपणे अनेक गाणी गायली. नाझिया हसन जगभरात इतकी लोकप्रिय होत होत्या की, असे म्हणतात तिला तिच्या देशात गाणं म्हणताना टीव्हीवर बघता येऊ नये, अशी व्यवस्था करणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिचा व्हिडीओ, कमरेपासून वरचाच भाग शूट करून तयार करण्यात आला. कारण इतकंच की, तिचे नाचणारे पाय दिसू नयेत.
‘वायटल साइन्स’, ‘स्ट्रिंग्स’, ‘जुनून’ हे नंतर भारतात लोकिप्रय बनलेले बँड सुरू झाले होते. त्यांच्यासाठी नाझियाच्या संगीताने त्यांच्या संगीताला रुजण्यासाठीची जमीन तयार केलेली होती.
नाझिया यांना कर्करोग झाला होता त्यावर त्वरित उपचार सुरू झाले. त्या त्यातून बरी झाल्या आणि नाझिया यांचे लग्न झालं. दोन वर्षांनी त्यांना मुलगा झाला. मात्र लाखो हृदयांत आपलं स्थान निर्माण करणाऱ्या या पॉप क्वीनचा फुप्फुसाचा कर्करोग पुन्हा उफाळून आल्याचं उघडकीस आलं.
नाझिया हसन यांनी अनेकदा आपल्या मुलाखतींतून सांगितलं होतं की, गाणं हे तिच्यासाठी कायम छंद होता आणि आहे. त्यांनी स्वत:साठी वेगळं करिअर उभं केलं होतं. नाझिया हसन यांनी लंडनच्या विद्यापीठातून बिझनेस अॅंडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली होती. संयुक्त राष्ट्रांच्या महिला विभागातील आंतरराष्ट्रीय नेतृत्व कार्यक्रमात सहभागी होती. त्या वेळी तरुणांची पिढी नष्ट करणाऱ्या अमली पदार्थाच्या विरोधात काम करण्यासाठी तिने संस्था काढली होती. कराचीतील ल्यारी या सर्वाधिक गरीब वस्तीत तिने त्यासाठी मोबाइल क्लिनिक सेवा सुरू केली होती. नाझिया हसन यांचे निधन १३ ऑगस्ट २००० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट / इब्राहिम अफगाण
नाझिया हसन यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=mWzTZE-B1fM
https://www.youtube.com/watch?v=mZqawa_lmSo
शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशचा गेल्या एक तपाचा हा प्रवास, हो तपच! तपश्चर्या, साधना या खेरीज दुसरा कुठलाही शब्द योजता येणार नाही अशी मेहनत करूनच महेशने हे यश मिळवलं आहे. स्वप्नवत वाटणारं हे यश मिळवताना स्वप्नात देखील बहुदा तो गाण्याचाच विचार करत असतो. महेशच्या गाण्याने लोकांना वेड लावलेलं आहे.
महेशने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केली. त्याची आई शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असे, जेव्हा त्याची आई शास्त्रीय संगीताचे तास घेत असे, तेव्हा महेश आलापावरून नोटेशन तयार करायचा. याच काळामध्ये त्याला संगीताबद्दल ओढ निर्माण झाली. यानंतर मा.रवींद्र धांगुर्डे यांच्याकडे त्याने काहीकाळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले; पण खर्याग अर्थाने त्याच्यातील गायक श्रोत्यांसमोर आला तो अभिषेकीबुवांमुळे. दहावीच्या सुट्टीमध्ये महेश अभिषेकीबुवांकडून संगीताचा रियाज केला. बुवांबरोबर कायम राहून तो त्यांचा पट्टशिष्यच झाला. या पट्टशिष्यावर बुवांनी भरपूर मेहनत घेतली. यानंतर शौनक अभिषेकींनीसुद्धा त्याला मार्गदर्शन केले. बुवांच्या सहवासामुळे महेशला शास्त्रीय संगीतातील बारकावे कळून आले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानासुद्धा महेश पहाटे चार वाजता उठून अभिषेकीबुवांकडे रियाजासाठी जात असे. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर महेश उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेत त्याने संगीतामध्ये (डबल) एम.एस. केले. अर्थातंच नोकरीच्या पुष्कळ संधी महेशसमोर चालून आल्या. परंतु, शास्त्रीय संगीतामध्ये असलेली ओढ. महेशला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून वडिलांची परवानगी घेऊन महेशने अमेरिकेच्या कॅलिफोनिर्यातील सनीवेल या ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केले. बघता बघता ३०० हून अधिक विद्यार्थी या क्लासला दाखल झाले. तेथे गेली १५ वर्षे तो या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहे. गेल्यावर्षी जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सनीवेलमध्ये होते, तेव्हा महेशला राष्ट्रगीत गाण्याकरिता सांगण्यात आले. महेशने आपल्याबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले, तर ही सुवर्णसंधी ठरेल, असे मत मांडले. त्यानुसार अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्याऱ्या विद्यार्थ्यांसह त्याने आपल्या भारताचे राष्ट्रगीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केले. लॉस एंजेलिसमध्ये प्रसिद्ध विंडप्लेअर पेद्रो युस्ताच यांच्या सोबत ‘रागाजॅझ’ बॅण्डमध्ये परफॉर्म केलंय. प्रख्यात कीबोर्ड आर्टिस्ट फ्रँक मार्टिन आणि प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रुक्स यांच्यासोबत परफॉर्म केलंय. हरिहरन, विक्कू विनायकम, झाकीर हुसेन अशा दिग्गजांबरोबर कोलॅबरेशन केलंय. प्रख्यात तालवाद्य कलाकार शिवमणींबरोबर आणि त्रिलोक गुर्टू यांच्यासोबतही परफॉर्म केलंय. प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णीनी रागमालेवर आधारित गाणं रचलं आहे. या डय़ुएटचं रेकॉर्डिग अलीकडंच प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतीसोबत महेशनी केलं. सध्या ‘सूर निरागस हो’ या कार्यक्रमातून महेश आजवरचा गायनप्रवास उलगडतोय. देशविदेशातील तरुणवर्गाशी महेश संवाद साधतो सुरांच्या भाषेत. कट्यार काळजात घुसलीच्या गीत गायना साठी महेश काळेला सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शास्त्रीय गाण्यासाठी पुष्कळ वर्षांनंतर मराठी गायकाने हा सन्मान प्राप्त केला आहे. महेश आई-वडील-गुरू व संगीतावर निष्ठा असणारा अतिशय नम्र साधक आहे. कट्ट्यार. नाटकासाठी भारतात महेशला पुन्हा भारतात आणण्याची संधी राहुल देशपांडे यांनी शोधून काढली. त्यांनी कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी सदाशिवच्या भूमिकेकरिता महेश काळे याला निवडले. त्याच्याशी अमेरिकेमध्ये संपर्क करून त्याला या संगीत नाटकाची स्क्रीप्ट पाठवली. महेश काळे यांनी अमेरिकेतच या स्क्रिप्टवर काम केले. तिथं तालमी करूनच तो भारतात आला. भारतात आल्याआल्या तो तत्काळ प्रयोगात सहभागी झाला. आज या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग पूर्ण झाले आहेत. राहुल देशपांडे आणि महेश काळे हे दोघेही समृद्ध गायक आहेत. राहुलच्या अनुभवाचाही उपयोग महेशला नक्कीच झाला आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटात सदाशिवची भूमिका सुबोध भावे यांनी केली तरी महेश काळेनी सदाशिवची गाणी गायली. अरुणी किरणी या गीतामध्ये तर त्याने संपूर्ण चित्रपटाची झलकच प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. त्याचा आवाज, त्याची क्षमता आणि संगीताबद्दलची त्याची आसक्ती या गीतामधून आधोरेखित होते. ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हवाई छायाचित्रण या अनोख्या कलेत देशाच्या पटलावर स्वत:चं अढळ स्थान निर्माण करणारे गोपाळ मधुकर बोधे हे मूळचे सांगली जिल्ह्याचे. छंद म्हणून नव्हे, तर पोटापाण्यासाठी वयाच्या दहाव्या वर्षी हातात कॅमेरा घेतला.
चारुदत्त सरपोतदार हे पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातलं एक बहुआयामी आणि उत्साही व्यक्तिमत्त्व होते. गेली सुमारे सत्तरहून अधीक वर्षे ‘पूना गेस्ट हाउस’च्या माध्यमातून कलावंतांपासून सर्वसामान्य पुणेकर खवय्यांचे चोचले पुरविणारे चारुदत्त सरपोतदार हे शेवटपर्यत पुण्याच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत होते.
कैलास जीवनचे क्रीम ही सर्वांत मऊ व इलाजकारक असल्याची खात्री ते देतात.चंदनाचे तेल, दुवा, शंखजीरा, राळ, तेल तसेच पाण्याचे सममिश्रण करुन त्यापासून हे मऊ क्रीम तयार केला जात. केवळ भारतातच नव्हे तर जगात या प्रकारचे आयुर्वेदिक क्रीम कसे तयार केले जात नसल्याचा कोल्हटकर यांचा दावा आहे. या उत्पादनात कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल वापरले जात नसल्याने त्याचा परिणाम लगेच दिसून येता असे ही ते म्हणतात. ग्राहकाला कमीत कमी खर्चात हे क्रीम उपलब्ध व्हावे यासाठी हे क्रीम १२ ग्रँम पासून २० ग्रँम पर्यंतच्या ट्यूब मध्ये ही ते उपलब्ध केले आहे. विश्वास व सचोटी हे बीदवाक्य नेहमी पाळले जात असेही ते म्हणतात.
ख्यातनाम साहित्यिक डॉ. विद्याधर गंगाधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२४ रोजी झाला.
टेकडीवरचे पीस, देवचाफा, माळ, फॅन्टॅसिया हे कथासंग्रह, चार्वाक, माता द्रौपदी, कुणीकडून कुणीकडे ही नाटके तसेच आवडलेली माणसे (व्यक्तिचित्रे) आणि शाश्वताचे रंग (समिक्षात्मक) ही त्यांची साहित्यसंपदा.
१९८९ मध्ये त्यांचे निधन झाले.
## Dr Vidyadhar Gangadhar Pundlik
शंकर वासुदेव किर्लोस्कर तथा ‘शं. वा. कि.’ यांचा जन्म ८ ऑक्टोबर १८९१ रोजी झाला. शंकर वासुदेव किर्लोस्कर यांचे वडील सोलापुरातील पहिले पदवीधर डॉक्टर होते. त्यांना यंत्रकलेची अफाट आवड होती. किर्लोस्कर कंपनीने या वेळी कडबा कापण्याचे यंत्र बनविले होते. त्याची जाहिरात बनविण्याचे काम शंकररावांना देण्यात आले. दोन बैलांचे संभाषण. एक बैल या यंत्राने कापलेला कडबा किती स्वच्छ असतो हे सांगताना त्या जाहिरातीत दर्शविले होते. शंकररावांची ही पहिलीच जाहिरात. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना एक बॉक्स कॅमेरा मिळाला व येथून पुढे शंकररावांनी छायाचित्रणाचे धडेही गिरविले. पुढे शंकररावांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला, नंतर मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना वरच्या वर्गात प्रवेश मिळाला. तेथेही केवळ दिसते तसे चित्र न काढता, त्यामध्ये कल्पनाशक्तीची भर टाकणे आवश्यक आहे, हे त्यांच्या मनात रुजले व त्यासाठी शंकररावांनी संस्कृत, इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. वाचन वाढविले व आपल्यातील कलावंत परिपूर्ण केला. दर मंगळवारी ‘केसरी’मध्ये किर्लोस्कर नांगराची जाहिरात येत असे.
शंकररावांनी जाहिरातीची सूत्रे हातात घेतली. हळूहळू कंपनीचा बोलबाला वाढला. उत्पादने वाढली व किर्लोस्करला चिन्हाची गरज भासू लागली आणि आज सर्व परीचित झालेले विशिष्ट वळणाचे ‘किर्लोस्कर’ हे नाव हाताने लिहून ते रजिस्टर करण्यात आले. त्या वेळी विदेशातून किर्लोस्करकडे बरेच टपाल येत असे. एकदा त्यात फोर्ड कंपनीची ‘फोर्ड टाइम्स’ ही पुस्तिका आली. ती पाहताच शंकररावांच्या मनात आले, की आपल्या कारखान्याचे असे मासिक का असू नये? त्याचे नावही त्यांनी निश्चित केले. ‘किर्लोस्कर खबर!’ उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडमोडी. गावातील लोकांच्या कथा-कविता असे स्वरूप होते या मासिकाचे व ते छापायला एक जुना हॅण्डप्रेसही विकत घेतला आणि १९२० साली पहिला ‘किर्लोस्कर खबर’चा अंक प्रकाशित झाला. अन् मराठी साहित्य जगतात लहानशी खळबळ उठली.
१९२९ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी किर्लोस्कर कारखान्यास भेट दिली. त्यांच्या पाहण्यात ‘किर्लोस्कर खबर’ आले व त्यातील ‘खबर’ हा फारसी शब्द त्यांना खटकला, त्यानंतर केवळ ‘किर्लोस्कर’ हे वाङ्मय क्षेत्रात गाजलेले नाव मासिकाला राहिले. पुढे शंकररावांनी त्यामध्ये ललित व वैचारिक लेख समाविष्ट केले. १९३० मध्ये स्त्रियांनी सामाजिक बदलांना सामोरे जावे या हेतूने ‘स्त्री’ मासिकाची स्थापना झाली. तसेच तरुण युवकांना उत्तेजन देण्यासाठी १९३४ मध्ये ‘मनोहर’ हे मासिक सुरू करण्यात आले. हळूहळू ‘किर्लोस्कर’ मासिकाचा व छापखान्याचा विस्तार वाढला. ‘किर्लोस्कर’वाडीचे क्षेत्र त्याला अपुरे पडू लागले. तेव्हा ‘किर्लोस्कर’चे स्थलांतर पुणे येथे १९५९ च्या जून महिन्यात झाले. किर्लोस्कर नावाला केवळ उद्योग जगतापुरते मर्यादित न ठेवता त्याला जनसामान्यांमध्ये लोकप्रिय करण्याचे श्रेय ‘किर्लोस्कर', 'स्त्री' व 'मनोहर' ही मासिके व त्यांचे संपादक शंकर वासुदेव किर्लोस्कर तथा ‘शं. वा. कि.’ यांनाच द्यावे लागेल.
किर्लोस्कर घराण्याच्या औद्योगिक कार्यास शंकररावांनी सामाजिक आणि सांस्कृतिक उत्तरदायित्वाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. शंकर वासुदेव किर्लोस्कर यांचे १ जानेवारी १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू.. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते म्हणजे दिलीप प्रभावळकर. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. दिलीप प्रभावळकर यांचे शिक्षण मुंबईत झाले.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रभावळकरांनी जैवभौतिक शास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमधून पदविकाही घेतली त्यांनंतर त्यांनी अनेक वर्षे एका फार्मा कंपनीत नोकरीही केली. हे काम करत असतानात त्यांनी बालनाट्यात भूमिका करायला सुरूवात केली. पण खरया अर्थाने त्यांचा रंगभूमीवरचा प्रवेश विजय तेंडूलकर लिखित ‘लोभ नसावा ही विनंती’ या नाटकातून झाला. या नाटकाचे प्रयोग मोजकेच झाले. पण त्यांच्या भूमिकेला रसिकांनी चांगली दाद दिली. त्यानंतर मात्र त्यांनी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.
दरम्यानच्या काळात त्यांनी रत्नाकर मतकरी यांच्या नाटकात काम करण्यास सुरूवात केली. बाल रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी आणि व्यवसायिक रंगभूमी तसंच सिनेमा, दूरचित्रवाणी आणि लेखन अशा क्षेत्रांमध्ये आपला स्वत:चा ठसा दिलीप प्रभावळकरांनी उमटवला आहे. 'वासूची सासू', 'संध्याछाया', 'जावई माझा भला', 'घर तिघांचे हवे' या नाटकातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.
वैशिष्ट्य म्हणजे या सर्व भूमिका वेगळ्या होत्या. . एक झूंज वाऱ्याशी, कलम ३०२ आणि नातीगोती यासारख्या नाटकांमधील गंभीर भूमिका प्रभावळकरांनी जीवंत केल्या. नाटकांसोबतच त्यांनी 'चिमणराव' या विनोदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. दिलीप प्रभावळकर यांनी नेहमीच आपल्या अभियाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्यांनी एक डाव भुताचा, एक होता विदुषक, आपली माणसं, पछाडलेला, छक्की माणसं, झपाटलेला असे अनेक चित्रपट मराठीत दिले आहेत. त्यांच्या "चौकट राजा', "रात्र आरंभ' या सिनेमातील अभिनयाचे विशेष कौतुक झाले.
दिलीप प्रभावळकरांचा आणखी एक पैलू म्हणजे ते एक चांगले लेखकही आहेत. त्यानी अनेक वृत्तपत्रातून स्तंभलेखनही केली आहे. विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. 'गुगली', 'हसगत' या त्यांच्या पुस्तकांना पुरस्कारही मिळाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
http://www.dilipprabhavalkar.com
भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक व्यक्तीमत्व म्हणून अन्नपूर्णा देवी देशाला परिचित आहेत. मात्र त्यांचे स्वर्गीय सितार वादन ऐकण्याचे भाग्य अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोकांना लाभलं आहे. जवळपास गेली साठ वर्षे त्या एकांतवासात होत्या. त्यांनी अनेक वर्षापासून संगीत वादन सोडलं आणि एकांतवास स्वीकारला.
अन्नपूर्णा देवी यांचा जन्म २३ एप्रिल १९२६ रोजी झाला. त्या सरोद वादनातील अध्वर्यू अल्लाउद्दीन यांच्या कन्या. उस्ताद अल्लाउद्दीन हे शास्त्रीय संगीतातील महारथी होते.
अन्नपूर्णा देवींनी आपले बंधू उस्ताद अली अकबर खान यांच्यासमवेत आपल्या वडिलांकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण प्राप्त केले. १९३८ साली रवी शंकर वयाच्या अठराव्या वर्षी अल्लाउद्दीन यांच्याकडे मैहरला शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी आले. अल्लाउद्दीन यांनी अन्नपूर्णा देवींना प्रथम ध्रूपद आणि सितार शिकवलं. पण नंतर सूरबहार वादनावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. सूरबहार आणि सितार यांच्यात साम्य असलं तरी, ते सितारपेक्षा अधिक जड आणि वाजवण्यास अधिक अवघड समजलं जातं. अन्नापूर्णा देवी सूरबहार उत्तम वाजवत असत. अन्नापूर्णा देवी आणि पंडित रवीशंकर यांचा विवाह व्हावा असं उदय शंकर यांचे मत होते. उदय शंकर हे रवी शंकर यांचे वडिल बंधू होते. देशातील कलेच्या क्षेत्रातील दोन दिग्गज कुटुंबं विवाहामुळे एकत्र येतील, ही उदय शंकर यांची कल्पना होती. उदय शंकर यांनी अल्लाउद्दीन यांच्याकडे विवाहासाठी परवानगी मागितली. अल्लाउद्दीन हे प्रथमत: या विवाहाला परवानगी देण्यास तयार नव्हते, पण नंतर त्यांनी विवाहास होकार दिला. अन्नपूर्णा देवी आणि रवीशंकर यांचा विवाह हिंदू पद्धतीने १९४१ साली झाला आणि त्यानंतर वर्षभरातच त्यांना पूत्ररत्न झाले. शूभेंद्र शंकर असे त्याचे नाव. पण शुभेंद्र शंकर यांचा १९९२ साली अमेरिकेतच अकाली मृत्यू झाला. पंडितजींनी शुभेंद्र शंकर यांची योग्य ती काळजी घेतली नाही आणि एका धर्मादाय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. पंडितजींनी शुंभेंद्रकडे दुर्लक्ष केलं आणि त्यासाठी आपला दुसरा विवाह झाला असल्यानं जबाबदारी फेटाळली. याबाबत बोलताना अन्नपूर्णा देवी म्हणाल्या कि, याचा अर्थ पंडितजी शुंभकरला आपल्या कुटुंबाचा सदस्य मानत नव्हते. पण अल्लाउद्दीन यांच्याप्रती मात्र पंडितजींनी कर्तव्यात कोणतीही कसर ठेवली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. अन्नापूर्णा देवी यांनी आपला शेवटचा कार्यक्रम १९५६ साली सादर केला. त्यानंतर पंडितजी फक्त एकदाच १९८० साली अन्नपूर्णा देवींना भेटायला आले. अन्नपूर्णा देवींनी अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच शिष्यांना कला शिकवली आहे. त्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित नित्यानंद हळदीपूर, उस्ताद आशिष खान, पंडित बसंत काब्रा, पंडित प्रदीप बारोट आणि पंडित सुरेश व्यास या सरोद वादकांचा समावेश आहे. उस्ताद अल्लाउद्दीन यांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांनाही अन्नपूर्णा देवींचा आधार होता. त्यात पंडित निखील बॅनर्जी आणि उस्ताद बहाद्दूर खान यांचा समावेश आहे. अन्नपूर्णा देवींनी मैफिलींना राम राम केल्यानंतरही अनेकांनी त्यांना त्यासंदर्भात विनंती केली. पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. पंतप्रधान इंदिरा गांधींसह देश आणि परदेशातल्या अनेक नामांकित व्यक्तीमत्वांनी त्यांना वादन चालू करण्याबद्दल आग्रह केला होता पण अन्नपूर्णा देवींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. अन्नपूर्णा देवींना १९९७ साली पद्मभूषण, १९९९ साली देशिकोत्तम आणि २००४ साली संगीत-नाटक अकादमीची फेलोशीप मिळाले. हे कोणतेही पुरस्कार स्वीकारण्यास त्या स्वत: गेल्या नाहीत. उस्ताद अली अकबर खान एकदा म्हणाले होते की, रवी शंकर, पन्नालाल घोष आणि मी एका पारड्यात आणि अन्नपूर्णा देवी दुसऱ्या पारड्यात ठेवल्या तरीही त्यांची बाजू वरचढ ठरेल हे अगदी यथार्थ असं वर्णन आहे. मात्र नुकतच त्यांनी आपले एकांतवासाचे आजवर बाळगलेलं मौन सोडलं आहे. पंडित रवी शंकर यांची पत्नी म्हणून ओळख असलेल्या अन्नपूर्णा देवी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. पंडित रवी शंकर यांच्या बरोबरचा विवाह टिकवण्यासाठीच आपण संगीताला तिलांजली दिली. आम्ही दोघे एकत्र सितार वादन सादर केल्यानंतर लोकं मला अधिक दाद देत असत. मात्र हे रवी शंकर यांना आवडत नसे असं त्यांनी सांगितलं. रसिक माझ्या वादनाला देत असलेल्या प्रतिसादामुळे आमच्या वैवाहिक आयुष्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ लागला. पंडित रवी शंकर यांनी मला मैफिलीत सादरीकरण करु नये असं जरी स्पष्टपणे सांगितलं नाही, तरी मला मिळणारी दाद यामुळे ते आनंदी नव्हते. मला व्यवसायिक यश किंवा विवाहातील सौख्य यात निवड करण्याची वेळ आली, तेंव्हा मी विवाह सौख्याला प्राधान्य दिलं. मला नाव आणि लौकिक यापेक्षा लग्न टिकवणं अधिक महत्वाचं वाटलं. पण दुर्दैवाने एवढा त्याग करुनही हा विवाह टिकू शकला नाही. मी सर्वतोपरी प्रयत्न करुन पाहिले, पण मला यश आलं नाही. मला माझे वडिल उस्ताद अलाऊद्दिन खान यांना दुखावयचे नव्हते. उस्तादजी हे पापभिरु व्यक्तिमत्व होते. उस्तादजींना आपल्या मुलीचा विवाह मोडला हे आवडलं नाही. रवी शंकर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर १९८२ साली अन्नपूर्णा देवींनी आपले शिष्य ऋषीकूमार पंड्या यांच्याशी विवाह केला.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti