जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
‘पवित्र रिश्ता’मधून त्याने आपल्या छोट्या पडद्यावरील अभिनयाला सुरुवात केली आणि ‘झलक दिख ला जा’ मध्येही आपल्यातील चमक दाखवून दिली होती. स्टार प्लसवरील ‘किस देश मै हे मेरा दिल’ ही त्याची पहिली सिरीअल. त्यानंतर जवळपास तीन वर्षं त्याने झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या कार्यक्रमात काम केले. यात त्याने मानव ची भूमिका साकारली होती.
बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकरांच्या कार्याची दखल इंग्लंडच्या राणीनेही घेतली. त्यांचा सत्कार केला. त्यांचा सत्कार केला. कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अॅन्ड डिसॅबिलिटीज या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेचे अध्यक्ष बनलेल्या डॉ. बोधनकरांनी ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या आरोग्यावर सतत लक्ष केंद्रित केले आहे. आंतरराष्ट्रीय परीघ वाढूनही सेवाभावी वृत्ती सोडली नाही...
डॉ. उदय बोधनकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सने छापलेला निरामय बालकांसाठी हा लेख पुढील पानावर वाचा ..
डॉ. उदय बोधनकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सने छापलेला निरामय बालकांसाठी हा लेख..

## Dr.Uday Bodhankar
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या गाजलेल्या कवितेचे कवी यशवंत. १९५० साली मुंबईस भरलेल्या तेहतिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कवी यशवंत हे अध्यक्ष होते.
’सुखाचे सोबती’, ’बोलकी बाहुली’, ’देवा तुझी सोन्याची जेजुरी’, ’मानाचा मुजरा’, ’करावं तसं भरावं’, ’दीड शहाणे’, ’ठकास महाठक’, ’गडबड घोटाळा’, ’तुझी माझी जमली जोडी’ अशा अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. राजा बारगीर यांचे १८ डिसेंबर १९९३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ समाजसुधारक, महिला सबलीकरणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे धोंडो केशव उर्फ अण्णा साहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म ८ एप्रिल १८५८ ला कोकणातील मुरुड या गावी झाला. शालेय शिक्षण मुरुड आणि रत्नागिरी येथे पूर्ण झाल्यावर एलफिनस्टन महाविद्यालयातून गणित विषय निवडून पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.
मराठी साहित्यात सामाजिक वास्तवाचे भान असावे, या मताचा हिरीरीने पुरस्कार करणारे साहित्यिक डॉ. मनोहर जाधव हे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख. विचारमंथनातून निमिर्तीक्षम साहित्यसेवा आणि अध्यापनातून कृतिशील संवेदना जपणारे जाधव समतावादी परंपरा पुढे नेणारे असे कवी.
साहित्यिकांनी सामाजिक दृष्टिकोनातून बदलत्या समाजजीवनाचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे, या त्यांच्या भूमिकेचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात उमटते. वास्तवाची जाणीव, आसपासच्या घटनांचे भान आणि लेखन परंपरेचे अधिष्ठान त्यांच्या लेखनातून ठळक होते. या जाणीवेतूनच दलित साहित्याकडे ते पाहतात.
समाजव्यवस्थेचे बळी ठरलेल्या दलितांच्या आत्मभानाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी सहसंवेदनेची आहे. दलित कविता ही मराठी कवितेचे एक वैशिष्ट्यपूर्ण वळण आहे. या कवितेच्या मुळाशी असलेला जीवनानुभव त्यांना स्पर्श करतो. दलित कवींच्या तिसर्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे कवी शेषराव धांडे यांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत दलित कवितेवर होणारा आक्रस्ताळेपणाचा आरोप ते खोडून काढतात. आक्रस्ताळेपणा आणि आक्रमकपणा, स्थितिशीलता आणि परिवर्तन, आक्रोश आणि विदोह यातील फरकावर ते नेमके भाष्य करतात.
'दलित स्त्रियांची आत्मकथने', 'प्रत्ययपर्व', 'साहित्य : शोध आणि बोध' यांसारखी त्यांची पुस्तके समीक्षकांनी गौरविली आहेत. समतावादी साहित्य संमेलन असो वा भटक्या-विमुक्तांवरील राष्ट्रीय चर्चासत्र, जाधव आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून आलेली सुधारणावादी भूमिका आग्रहाने मांडतात.
त्यांनी हिंदी भाषेतही मुशाफिरी केली आहे. कवी अरुण काळे यांच्या कवितासंग्रहाच्या 'सायरन के शहर' या अनुवादाला डॉ. जाधव यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. हिंदीतील सहा समकालीन मान्यवर कवींच्या कवितांच्या अनुवादाचे कामही त्यांनी केले आहे.
फैजपूर येथे अध्यापन करून १९९५ मध्ये ते पुण्यात आले. पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुखपद सांभाळताना त्यांची कृतिशीलता अधिक स्पष्ट होते. मराठी विषयात व्यवसायाभिमुख कौशल्यावर आधारित चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचे धोरण काळाबरोबर जाण्याच्या त्यांच्या आग्रहाला पुष्टी देते.
अमराठी भाषकांना मराठी शिकविण्यासाठी सहा महिन्यांचा मराठीचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. बालवाङ्मयाचा विद्यापीठ पातळीवर अभ्यास व्हावा, अशी निराळी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
डॉ. जाधव यांना बुलढाणा जिल्हा साहित्य संघातर्फे उत्कृष्ट साहित्य निमिर्तीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
लामणदिवा हा १९४७ साली प्रसिध्द झालेला मोकाशी यांचा हा पहिलाच कथासंग्रह. रोजच्या जीवनातल्या साध्यासुध्या प्रसंगांतून आकारणारी लेखकाची कथा सौम्य आणि संयत प्रकृतीची आहे. ह्या पुस्तकात प्रारंभी ‘ पहिली पावले’ ह्या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी लिहिले आहे. तेही कथेइतकेच रंजक आहे.
“शास्त्रीय मराठी व्याकरण‘ हा सुमारे एक हजार पृष्ठांचा ग्रंथ मोरो केशव दामले यांनी लिहिला. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांस आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथात असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले आहेत. हे व्याकरणाच्या क्षेत्रातील मोठे काम म्हटले गेले.
आतापर्यंत खलनायकाचं एक विशिष्ट रूप मराठी कलाक्षेत्रात दाखवलं जायचं , पण अशोक शिंदेने ते साफ मोडीत काढून खलनायक हा स्टलयलिश जरी असला तरी तो तितकीच , किंबहुना काकणभर जास्तच भीती मनात निर्माण करू शकतो हे दमदार अभिनयातून दाखवून दिलं.
त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ नामस्मरणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासात घालवून स्थूल देहबुद्धीतून सूक्ष्म आत्मबुद्धीत शिरण्याचा समजून अभ्यास केला होता आणि सामान्यजनांना त्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘नामसमाधी सहजसमाधी’ हा ग्रंथ लिहिला.
Copyright © 2025 | Marathisrushti