जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मनोहारी सिंग यांचे घराणे वादकांचेच असल्यामुळे बालपणापासून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले.
त्यांचा जन्म ८ मार्च १९३१ रोजी झाला.त्यांची वाद्यवादनाची सुरुवात पाश्चात्त्य बासरी (क्लॅरोनेट) आणि मेंडोलीन या वाद्यांपासून झाली. अखेर सॅक्सोफोन या वाद्याला त्यांनी आपलेसे केले व त्यावर हुकूमत मिळविली.
१९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सितारों से आगे’ या चित्रपटातील गाण्यांसाठी संगीतकार एस. डी. बर्मन यांनी मनोहारी सिंग यांना संधी दिली. ‘सट्टा बाजार’ चित्रपटातील ‘तुम्हे याद होगा’ या गाण्यातील त्यांचे सॅक्सोफोनवादन लोकप्रिय झाले होते. ‘सबसे बडा रुपैया’ आणि ‘चटपटी’ या दोन चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले होते. संगीतकार आर. डी. बर्मन यांचे सहाय्यक म्हणूनही ते काम पाहत होते.
शालिमार चित्रपटातील 'हम बेवफा हरगीज न थे', दाग चित्रपटातील 'मेरे दिल मे आज क्या है', मेरा साया चित्रपटातील 'तू जहॉं जहॉं चलेगा मेरा साया', कटी पतंगमधील 'ये शाम मस्तानी', मेरे जीवन साथीमधील 'ओ, मेरे दिल के चैन', शोरमधील 'एक प्यार का नगमा है' तसेच 'दर्या किनारे एक बंगला ग पोरी' अशा शेकडो गाण्यांना त्यांनी सॅक्सो फोनच्या सूरांचा साज चढविला. त्यामुळे त्या गाण्यांची लोकप्रियता वाढली.
शंकर-जयकिशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत-पॅरेलाल आदी नामवंत संगीतकारांसोबत त्यांनी काम केले होते. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा नेपाळ सरकारने गौरव केला होता. मनोहारी सिंग यांचा ‘सॅक्स अपील’ नावाचा अल्बमही प्रकाशित झाला होता.
मनोहारी सिंग यांचे १३ जुलै २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये अल्पवयीन भारतीय खेळाडुंनी दाखविलेले प्राविण्य आता जगमान्य झाले आहे. या क्रीडाप्रकारांमध्ये नव्यानेच आता एका आणखी आव्हानात्मक प्रकाराची भर पडली आहे ती म्हणजे जलतरण व जगभरातून वाखाणल्या गेलेल्या या क्रीडाप्रकाराच्या रथी महारथींमध्ये आपल्या अफाट कौशल्याच्या व आत्मविश्वासाच्या जोरावर अढळ ध्रुवस्थान मिळविणारी चिमुरडी म्हणजे स्वप्नाली यादव.
ते मराठी हिंदुस्तानी संगीत परंपरेतले गायक, संगीतकार होते.
ललिता पवार यांच्या व्यक्तिमंत्त्वात एकप्रकारचा नैसर्गिक खानदानी रुबाब असल्यामुळे त्यांच्या आवाजात हुकमी लय आहे आणि चेहर्यावरील विशिष्ट प्रकाराचा भाव असल्यामुळे खानदानी, तडफदार, सोजवळ तसेच प्रेमळ आणि खाष्ट अशा विरोधी भूमिकांही त्या यशस्वीपणे साकार करू शकल्या व त्यामध्ये नैसर्गिकता देकील पहायला मिळली.
करसन घावरी हे फास्ट बॉलर असून ते लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग ही करत असत. करसन घावरी आपल्या करीयर मध्ये ३९ कसोटी व १९ वनडे खेळले. १९७४ ते १९८१ पर्यत आपल्या क्रिकेट करियर मध्ये दोन वेळा १९७५ व १९७९ वर्ल्ड कप पण खेळले.
गोडबोले, उदयराज
भारतीय सांस्कृतिक जगतात १९३१ साली बोलणाऱ्या आणि ‘गाणाऱ्या’ चित्रपटांनी प्रवेश केल्यानंतर मराठी संगीत नाटकाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती. बालगंधर्वासारख्या रसिकांच्या गळय़ातील ताईत बनलेल्या कलावंतालाही चित्रपटात भूमिका करणे क्रमप्राप्त ठरले होते. संगीत नाटक महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे एक व्यवच्छेदक लक्षण बनले असताना चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेने या नाटकांची आर्थिक स्थिती हलाखीची होणेही स्वाभाविक होते.
नेमक्या याच काळात म्हणजे १९२५ साली उदयराज गोडबोले यांचा जन्म झाला. आयुष्यभर नाटकच करीन, अशी जणू प्रतिज्ञाच त्यांनी तारुण्यात घेतली आणि तिचे पालन करण्यासाठी येणाऱ्या सगळय़ा संधी नाकारत उदयराजांनी फक्त संगीत नाटकांतच भूमिका केल्या. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवरील एका ज्येष्ठ आणि तपस्वी कलावंताचा अंत झाला आहे. रंगभूमीच्या पडत्या काळात तिला पुन्हा सोनेरी दिवस यावेत, यासाठी प्रयत्न करणाऱ्या कलावंतांमध्ये गोडबोले यांचे स्थान महत्त्वाचे होते. चित्रपटांच्या झंझावातापुढेही संगीत रंगभूमी टिकवून ठेवण्यासाठी छोटागंधर्व, जयराम-जयमाला शिलेदार, चित्तरंजन कोल्हटकर, वसंतराव देशपांडे यांच्यासारखे बिनीचे कलावंत अथक प्रयत्न करीत होते. त्यांच्या या प्रयत्नांना रसिकांकडून पुरेसा प्रतिसादही मिळत होता. उदयराजांना संगीताचे बाळकडू घरातूनच मिळाले, कारण त्यांचे वडील दिनकर रामचंद्र गोडबोले सांगलीच्या संस्थानात दरबारी गायक होते. त्यांनी संगीताची विद्या अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य जाधवबुवा यांच्याकडून घेतली होती. असे घराणेदार संस्कार असतानाही उदयराजांचे मन मात्र संगीत रंगभूमीकडेच जास्त होते. त्यामुळेच सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी छोटागंधर्वानी अजरामर केलेल्या ‘देवमाणूस’ या नाटकाचा प्रयोग केला आणि जाणकारांची शाबासकी मिळवली. त्याचमुळे असेल कदाचित, पण संगीत रंगभूमीवरील ठेकेदार पंडितराव तरटे यांनी त्यांना नाटकात भूमिका करण्याचे निमंत्रण दिले. उदयराजांच्या दृष्टीने जे हवे होते, तेच घडत होते. घरातूनही त्यांच्या या साहसाला विरोध झाला नाही. त्याच काळात त्यांना एका विमा कंपनीत नोकरी ‘चालून’ आली होती. पण गोडबोले यांचा निर्धार पक्का होता आणि त्यांनी रंगभूमीवरचे पाऊल मागे न घेण्याचे ठरवले. नागेश जोशी यांचे ‘फुलपाखरे’ हे त्यांचे पहिले नाटक. पण ते खऱ्या अर्थाने रसिकमान्य झाले, ते आचार्य अत्रे यांच्या ‘प्रीतिसंगम’ या नाटकामुळे! त्या नाटकातील त्यांची गोविंदबुवाची भूमिका खूपच गाजली. त्याच नाटकात त्यांनी गायलेल्या ‘देह देवाचे मंदिर’ या गाण्याने त्यांचे नाव सर्वतोपरी झाले. त्या नाटकातील गीतांच्या ध्वनिमुद्रिका एवढय़ा गाजल्या की, उदयराज गोडबोले म्हणजे ‘देह देवाचे मंदिर’ असे जणू समीकरणच झाले. ‘अशी बायको हवी’ हे त्यांचे नाटकही गाजले. त्याच वेळी चित्तरंजन कोल्हटकर, रेखा, चंद्रकांत गोखले यांच्यासारख्या कलावंतांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या नटराज थिएटर्सतर्फे ‘संगीत भावबंधन’चे प्रयोग सुरू झाले. उदयराजांना कशाचीच उसंत मिळेना. तरीही त्यांच्या मनात अभिजात शास्त्रीय संगीत शिकण्याची जिद्द होतीच. गाणे शिकायचे तर ते किराणा घराण्याचेच आणि त्यातील तेव्हाचे दिग्गज होते, पंडित भीमसेन जोशी. गोडबोले यांनी गुरुजींना विचारणा केली आणि त्यांचा गंडाच बांधला. त्या गंडाबंधनाच्या कार्यक्रमालाही कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांच्यासारखे अनेक मोठे कलावंत आवर्जून उपस्थित होते. भीमसेनजी आणि उदयराज या दोघांनाही सततचे दौरे असायचे. त्यामुळे उदयराजांना प्रत्यक्ष गाणे शिकण्याची संधीच मिळाली नाही. आपल्या विनोदी स्वभावाने उदयराजांनी आयुष्यात अनेक मित्र मिळविले. कोणत्याही कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची त्यांची क्षमता होती. कुणापुढेही आयुष्यात हात पसरायचे नाहीत, हे त्यांच्या जीवनाचे ब्रीदच होते. अशा ज्येष्ठ आणि लोकप्रिय कलावंताच्या निधनामुळे संगीताची आणि संगीत रंगभूमीचीही मोठी हानी झाली आहे.
दलित चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते आणि लेखक, विचारवंत प्रा. अरुण कांबळे हे आघाडीचे आक्रमक दलित नेते म्हणून समस्त महाराष्ट्राला परिचित असलेले दलित पॅंथरचे अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य होते.
प्रा. दिलीप परदेशी यांचा कथा लेखना पासून प्रवास सुरु झाला. प्रा. परदेशी हे विलिंग्डन महाविद्यालयात सुमारे तीन वर्षे प्राध्यापक होते. त्या नंतर त्यांनी प्रदीर्घ काळ पुण्यात फर्गसन् व बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात अध्यापन केले. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांचे आजोबा पैलवान मारुतराव परदेशी सांगलीतील बडे असामी होते. साहित्याच्या वंशपरंपरेपासून दूर असलेल्या परदेशी यांनी मराठी नाटकात स्वतःचीच वाट तयार केली. त्यांनी सुमारे तीसहून अधिक नाटक व एकांकिका लिहिल्या.
राज्य नाट्यस्पर्धेत त्यांनी सांगलीला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले. अखिल भारतीय नाट्यविद्या मंदिर समितीने त्यांची अनेक नाटके राज्य नाट्यस्पर्धेत सादर करताना पुरस्कार पटकावले. त्यांच्या "काळोख देत हुंकार' या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत प्रचंड लोकप्रियता मिळवली. एक वर्ष तर असे होते, की त्यावर्षी अंतिम फेरीत महाराष्ट्रातील पाच नाट्य संस्थांनी नाटक सादर केले. चंदू पारखी, रिमा लागू, सदाशिव आमरापूरकर या यशस्वी कलावंताना त्यांच्या नाटकांमधून ब्रेक मिळाला. हिंदी चित्रपट अभिनेते देवानंद यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. त्यांच्या "हम नौजवान' आणि "सच्चे का बोलबाला' या चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले.
"सर्वमान्य नाटककार म्हणून प्रा. परदेशी यांनी महाराष्ट्रात लौकिक मिळवला. विदर्भात त्यांच्या नाटकांचा मोठा रसिकवर्ग होता. ते चांगले कवी होते, म्हणूनच नाटककार होऊ शकले. प्रयोगशीलता, व्यक्तीरेखेतील नेमकेपणा आणि प्रभावी संवाद लेखन ही त्यांच्या नाटकाची वैशिष्ट्ये होती. त्यांची ४५ नाटके व ३०० कविता, ४० कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. महाद्वार, फिनिक्स, मन पिंजर्याचे, काळाजपूर्वा ह्या एकांकिका व स्व्पन एका वाल्याचे, काळोख देते हुंकार,गोष्ट तशी जुनींच पण....,तळहातीच्या नाजूक रेषा,मन धुवाधार, निष्पाप,थेंब थेंब आभाळ, अश्या अनेक प्रोयोगीक व व्यवसाईक रंगभुमीवरील नाटकांनी त्यांना प्रसिध्दी मिळवुन दिली.
देवआनंद साहेब व दिलीप परदेशी यांचा विशेष स्नेह होता. देव साहेबांच्या हम नौजवान,व सच्चे का बोलाबाला या चित्रपटांच्या कथा व संवाद लेखन प्रा. दिलीप परदेशी यांनी केले आहे. त्यांनी काही मराठी चित्रपटात भूमिका पण केल्या आहेत. शेक्सपियरचे "ज्युलीयस सिझर' नाटक त्यांना मराठीत वेगळ्या ढंगात आणायचे होते. नाटककार वसंत कानेटकर यांनी एका जाहीर समारंभात "मी तुम्हाला उद्याचा वसंत कानेटकर देतो' अशी शब्दात त्यांची ओळख करून दिली होती. प्रा.दिलीप परदेशी ४ नोव्हेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
मूळचे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार असलेले श्री बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना या राजकीय पक्षाचे संस्थापक. बाळासाहेबांनी १९ जून, १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. श्री बाळासाहेब ठाकरे सामना या मराठी दैनिकाचे मुख्य संपादक होते.
१९७४ मध्ये जळगाव येथे भरलेल्या ज्योतिष संमेलनाचे क. वि. सोमणशास्त्री अध्यक्ष होते. त्यावेळी केलेल्या भाषणातही त्यांनी दृकप्रत्यय गणिताच्या पंचांगाचे महत्त्व वर्णन केले.
Copyright © 2025 | Marathisrushti