(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गानगुरू पंडित विनायक केळकर

    शिवराम वाशीकर यांनी नंतर प्रभातसाठी ‘ज्ञानेश्वर’, ‘गोपाळकृष्ण’, ‘संत सखू’, ‘रामशास्त्री’ या चित्रपटांच्या पटकथा व संवाद लिहिले. त्यांनी लिहिलेले बहुतेक चित्रपट धार्मिक आणि पौराणिक आहेत. चित्रपटासाठी लेखन करताना वाशीकर यांचा अभ्यास सखोल आणि चौफेर होता. चित्रपटाच्या संपूर्ण विषयाचाच ते अभ्यास करीत. त्यांची भाषा साधी पण ठाशीव होती. त्यांच्या पटकथेत संयत विनोदाचाही शिडकावा असे.

      June 28, 2022


  • हिंदी, बंगाली सिनेमातील अभिनेता, निर्देशक, लेखक, नाटककार उत्पल दत्त

    उत्पल दत्त हे उच्च दर्जाचे अभिनेता, दिग्दर्शक आणि नाटककार होते. त्यांचा जन्म २९ मार्च १९२९ रोजी झाला. त्यांनी केवळ बंगाली चित्रपट वर आपली छाप टाकली नाही तर हिंदी चित्रपटावर पण. सीरियस पासून कॉमेडी पर्यंत त्यांनी प्रत्येक भूमिका अतिशय गंभीरपणे केली. मा.उत्पल दत्त यांचे शेक्सपियर साहित्यावर खूप प्रेम होते. १९४० मध्ये एका थिएटर कंपनीतून आपल्या अभिनयास सुरवात केली. थिएटर कंपनीतर्फे अनेक नाटके भारत आणि पाकिस्तानात आयोजित केली. १९५० पासून त्यांची बंगाली चित्रपट कारकीर्द सुरू झाली. अनेक बंगाली नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. या वेळी तो लिहिले नाही,. नाटकांच्या लिहिले बंगाली राजकारण अनेकदा वाद वाढ दिली. १९५० मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधू बोस यांनी चित्रपट माइकल मधुसुधन या चित्रपटात मुख्य भूमिका दिली. मा.उत्पल दत्त यांनी सत्यजित रे यांच्या चित्रपटांत अभिनय केला आहे. पण उत्पल दत्त हिंदी चित्रपट एक महान विनोदी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक लघुपटात पण कामे केली आहेत. गुड्डी, गोल-माल, नरम-गरम, रंग बिरंगी व शौ‌कीन या चित्रपटात उत्पल दत्त यांनी कमाल केली आहे. त्यांची सर्वात गाजलेली विनोदी भुमिका गोलमाल मधील होती त्यांना गोलमाल मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट हास्य अभिनेता फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. १९६० साली चित्रपट अभिनेत्री शोभा सेन यांच्याशी उत्पल दत्त यांनी विवाह केला. उत्पलदत्त हे मार्क्सवादी नेता होते. १९ ऑगस्ट १९९३ रोजी उत्पल दत्त यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 29, 2017


  • अश्विनी भावे

    अश्विनी भावे

    मराठी-हिन्दी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. अश्विनींने अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातुन तिने आपल्या करियला सुरुवात केली. १९९१ साली ’हिना’ या चित्रपटातुन तिने हिन्दी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला.

      June 9, 2017


  • रवी कदम

    कदम, रवी

    महाधिवक्ता या महत्वाच्या घटनात्मक पदाची जबाबदारी राज्य शासनाची उच्च न्यायालयात बाजू मांडणे एवढीच नसते. न्यायप्रक्रियेस साह्य, न्यायमित्र, कायदेशीर तरतुदी आणि सत्य बाजू न्यायालयासमोर परखडपणे सादर करणे, या भूमिका त्यांना पार पाडाव्या लागतात.

    शासनाची धोरणे व निर्णयांची न्यायालयात पाठराखण करीत असताना महाधिवक्ता म्हणून सरकारला कायदेशीर सल्ला देण्याचीही जबाबदारी असते. महाधिवक्ता रवी कदम यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात अनेक अडचणींना तोंड देत अतिशय कसोशीने हे सारे निभावून नेले. मुंबई उच्च न्यायालयातील महाधिवक्ता हे पद एच. एम. सिरवई यांच्यासारख्या ज्येष्ठ व नामांकित घटनातज्ज्ञाने १९७४ मध्ये तब्बल १७ वर्षे भूषविले. त्यांच्यानंतर सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा सन्मान कदम यांना मिळाला. कदम प्रसिध्दीमाध्यमांपासून नेहमी दूरच राहिले. ते आपल्या वर्तणुकीने किंवा वक्तव्याने कधीही वादग्रस्त ठरले नाहीत. बेधडक विधाने करणे त्यांच्या स्वभावातच नाही. मुख्यमंत्री बदलल्यावर महाधिवक्त्याने राजीनामा देण्याची प्रथा आहे. पण कदम यांनी विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या तीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात काम केले. प्रथेनुसार त्यांनी राजीनामा दिला तरी नवीन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करीत त्यांची जबाबदारी कायम ठेवली. त्यांनी या पदाचा कधीही राजकीय वापर होऊ दिला नाही. साधनशुचिता जपण्यासाठी त्यांनी शासकीय निवासस्थानही स्वीकारले नाही. कदम हे मुंबई विद्यापीठात १९८२ मध्ये एलएलबीला सर्वप्रथम आले होते. ट्रेडमार्क, पेटंट प्रकरणे हाताळण्यात त्यांचा लौकिक. गिरणजमिनींचा वाद, एन्रॉन, वनजमीन, डान्सबार बंदी, मुख्यमंत्र्यांविरुध्दची निवडणूक याचिका आदी प्रकरणांमध्ये त्यांनी शासनाची बाजू भक्कमपणे मांडली व निकाल शासनाच्या बाजूने लागले. बँकांच्या कर्जवसुलीच्या कायद्यासंदर्भातही (सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट) त्यांनी काम केले. विधिमंडळाला हक्कभंग प्रकरणात सा केले. तब्बल ३० वर्षे मुंबई उच्च न्यायालयात वकिली केल्यावर आता सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्याचा कदम यांचा मनोदय आहे.

      August 5, 2017


  • मानवी रक्तगट शोधणारा कार्ल लँडस्टायनर

    या अनोख्या कार रेसिंगच्या प्रकारात पहिल्यांदाच ३४ संघांनी आपल्या गाड्या उतरवल्या, त्यापैकी २५ कार हे फ्रान्सच्याच होते.सहा कार इटलीहून आणि तीन कार जर्मनीहून आल्या होत्या. गोर्डन बेनेट कप बंद झाल्याच्या निषेधार्थ ब्रिटनने यावर बहिष्कार टाकला. अशा प्रकारे, ती तीन देशांमधील स्पर्धा बनली. या कार्यक्रमात प्रवेशासाठी २०० पौंड फी ठेवली गेली होती आणि सर्व खर्च अंदाजे दहा हजार पौंड झाला होता. या शर्यतीत भाग घेण्यासाठी, ड्रायव्हरसह कारच्या वजनाची स्थिती १००० किलोपेक्षा जास्त नसावी ही अट होती.

      June 27, 2022


  • पंकज झारेकर

    निसर्ग प्रेम माणसाला कुठवर घेवुन जावु शकत याच मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पंकज झारेकर. फोटोग्राफीचा कुठलाही शैक्षणिक किंवा व्यावसायिक अनुभव गाठीशी नसताना या निसर्गवेड्या कलंदराने निसर्गाच्या विवीध ॠतुंनुसार बदलणार्‍या गहिर्‍या रंगांना व रूपांना ज्या सौंदर्यपुर्ण शैलीमध्ये कैद केले आहे, त्याबद्दल् त्याला साक्षात निसर्गदेवतेची दुवादेखील मिळाली असेल. पंकज हा चारचौघांसारखा दिसणारा, वागणारा परंतु चाकोरीबाहेरच्या स्वप्नांना अभिमानाने मिरवणारा, सर्व कलांचा प्रेमी असा स्वछंदी तरूण. ही स्वच्छंदीपणाची देणगी पण, त्याला बेधुंद करणार्‍या निसर्गाकडूनच मिळाली.

      August 16, 2011


  • श्रीधर देविदास इनामदार

    समीक्षक, कथालेखक आणि चोखंदळ अनुवादक श्रीधर देविदास इनामदार यांचा जन्म ३ सप्टेंबर १९४२ रोजी झाला. “अरण्यरुदन” व “रंगसावल्या” हे त्यांचे कथासंग्रह, तर “काचेचा पिंजरा”, “दिगंतराचे पक्षी” हे त्यांनी केलेले अनुवाद प्रकाशित झाले आहेत. “प्रक्तनाचे संदर्भ” हा त्यांच्या समीक्षापर लेखांचा संग्रह प्रसिद्ध आहे.

    ## Shridhar Devidas Inamdar

      July 27, 2017


  • गणेश कृष्ण जोशी

     

      June 20, 2014


  • लिसा कार्प्रिनी स्थळेकर

    व्यक्तिवेध : लिसा कार्प्रिनी स्थळेकर
    बुधवार, १९ मे २०१०

    इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघामध्ये भारतीय वंशाच्या वा भारतामध्ये जन्मलेल्या खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. नासिर हुसेन, हाशिम अमला यांच्यासारखी कितीतरी उदाहरणे देता येतील. ऑस्ट्रेलियाकडूनही एक भारतीय क्रिकेटपटू चमकदार कामगिरी करीत आहे. लिसा कार्प्रिनी स्थळेकर कांगारूंच्या महिला संघाचा आधारस्तंभ ठरली आहे.
    नुकत्याच विश्वविजेत्या झालेल्या संघाचे उपकर्णधारपदही तिने भूषविले. इतकेच नव्हे तर काही हंगामांपूर्वी ऑसी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीसुद्धा तिने समर्थपणे पेलली. लिसा जन्माने पुणेकर! मात्र त्यानंतर तिचा पुण्याशी फारसा संबंध आला नाही. बालपणीच कुटुंबीय ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्याने लिसा अनिवासी भारतीय ठरली. वडील महाराष्ट्रीय, आई ब्रिटिश आणि आता वास्तव्य ऑस्ट्रेलियामध्ये, असे आगळे नागरिकत्व लिसाने पटकावले. लिसा क्रिकेटवेडी झाली ती वडिलांमुळे! १९८० च्या दशकामध्ये भारतीय संघाचा सिडनीच्या ऐतिहासिक मैदानावरील कसोटी सामना पाहण्याची संधी मिळाल्यानंतर लिसाने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. शालेय स्तरावर क्रिकेटच्या मैदानात चमकून तिने विभागीय स्तरावर लक्ष वेधून घेतले. त्यानंतर न्यू साऊथ वेल्स संघाची ती नियमित सदस्य ठरली. २००१ पासून कांगारूंच्या संघातील तिचे स्थान अबाधित आहे. उजव्या हाताची घणाघाती फलंदाजी आणि ऑफस्पिन गोलंदाजी अशी उपयुक्त कामगिरी ती करते. विंडीजमधील विश्वचषकात उपान्त्य फेरीत ऑस्ट्रेलियाची गाठ भारतीय महिलांशी पडली. त्यावेळी मिताली राज या ‘टीम इंडिया’च्या भरवशाच्या खेळाडूला बाद करीत लिसाने ४ षटकांत फक्त २५ धावा दिल्या. अंतिम सामन्यात लिसाने चार षटकांत फक्त १९ धावा देत न्यूझीलंडच्या फलंदाजांना धावा काढणे मुश्कील केले. परिणामी कांगारूंना सलग दुसऱ्या विश्वचषकाचे मानकरी ठरता आले. पाच वर्षांपूर्वी विश्वचषक जिंकून देताना लिसाने अर्धशतकी खेळी केली होती. २००७ आणि ०८ अशी सलग दोन वर्षे ऑस्ट्रेलियातील सवरेत्कृष्ट महिला क्रिकेटपटू होण्याचा मान तिने मिळवला. २००७ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वार्षिक समारंभात सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू किताबाच्या शर्यतीत लिसा होती. मात्र भारताच्या ‘झुलान एक्स्प्रेस’, म्हणजेच झुलान गोस्वामीने तो किताब पटकावला. सध्याही गोलंदाजांच्या मानांकनामध्ये झुलानपाठोपाठ लिसा दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये लिसा एक हजार धावा व १०० विकेट अशी अष्टपैलू कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात लिसाचा खेळ बहरतो. अ‍ॅडलेड कसोटीमध्ये अर्धशतक झळकावल्यानंतर ३० धावांत पाच विकेट घेत ऑस्ट्रेलियाला डावाने विजय मिळवून दिला होता, तसेच ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, इंग्लंड आणि भारत या महिला क्रिकेटविश्वातील आघाडीच्या संघांमध्ये झालेल्या चौरंगी मालिकेत लिसाने ९८ च्या सरासरीने ३९४ धावा कुटल्या. ‘महिला क्रिकेटपटू म्हणून भारतात खूपच कष्टप्रद वाटचाल करावी लागली असती. आता भारतीय क्रिकेट मंडळ महिला क्रिकेटपटूंना चालना देत आहे. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटचे बाळकडू मिळाल्याने व्यक्तिमत्त्व व खेळाचा विकास करण्याची खूप संधी मिळाली,’ असे लिसाचे मत आहे. महिला क्रिकेटसाठी टी-२० सामने अतिशय प्रोत्साहनपर आहेत. त्यामुळेच गृहपाठ म्हणून ‘आयपीएल’चे सामने आवर्जून पाहाते, असेही लिसा स्पष्ट करते. मैदानाबाहेर मात्र पाककला आणि चित्रपट पाहण्याची लिसाला खास आवड आहे. वेस्ट इंडिजच्या डिंड्रा ड्रॉटिन या अठरावर्षीय महिला क्रिकेटपटूने नुकत्याच झालेल्या विश्वचषकात अवघ्या ४५ चेंडूंत सात चौकार व नऊ षटकारांच्या जोरावर ११२ धावा फटकावल्या. कोणत्याही टी-२० सामन्यामधील हे सर्वात जलद शतक ठरले. महिला क्रिकेटनेही ‘हम भी कुछ कम नहीं’चा नारा दिला आहे. आता प्रतीक्षा आहे, ती पुरुषांप्रमाणेच पुरस्कर्त्यांच्या गलेलठ्ठ पॅकेजची!

      August 5, 2017


  • फकिरराव मुंजाजी शिंदे (फ.मुं. शिंदे)

    फकिरराव मुंजाजी शिंदे यांना साहित्यिक वर्तुळात फ.मुं. शिंदे याच नावाने ओळखले जाते. ते मराठी कवी, लेखक आहेत. फ.मुं. शिंदे मराठीचे प्राध्यापकही आहेत. 

      May 25, 2014